Avdhut-अवधूत

Avdhut-अवधूत श्री स्वामी समर्थ
(1)

निर्णय चुकलाच माझा…📖✒️जयश्री कन्हेरे -सातपुते          श्वेताने घरचे काम आवरले व निवांत पेपर घेऊन बसली. पेपर उघडताच पहिल...
16/07/2025

निर्णय चुकलाच माझा…

📖✒️जयश्री कन्हेरे -सातपुते

श्वेताने घरचे काम आवरले व निवांत पेपर घेऊन बसली. पेपर उघडताच पहिल्या पानावर MPSC टॉप केलेल्याची फोटो व पोस्ट दिलेलं होतं. सर्व नावे वाचताना एका नावावर येउन तिची नजर खिळली…ही तिचं का याची शहनिशा करून पुन्हा श्वेता त्या फोटोकडे बघू लागली…. नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले आणि पेपर ओला करू लागले..

त्यानंतर आतील पानावर काही मुलाच्या MPSC टॉपरच्या मुलाखती होत्या..त्या बघताना पुन्हा तीला हवं असलेलं नाव दिसलं आणि ती वाचू लागली…

” माझ्या या यशाचे श्रेय मी माझ्या आईला देते माझी आई सौ. रेखा वरद कपले. माझ्याघरचे सगळेच बाबा, आजोबा, आजी यात सामील आहेत. शिक्षक मार्गदर्शक म्हणून मला ज्यांनी मदत केली प्रोत्साहन दिले त्या सर्वांची मी आभारी आहे. माझी मेहनत तर होतीच या DC च्या पोस्ट साठी. पण जी जिद्द हवी होती ती मला माझ्या आईने दिली. आज मला सर्वांसमोर आईला धन्यवाद म्हणायची संधी मिळते आहे तर ती मी गमावू शकत नाही. Thanks आई & I love you so much.. आई “

ही मुलाखत होती वैष्णवी वरद कपले ची. जी आज DC (Deputy Collector ) झाली होती.

हे वाचून तर श्वेताला आणखीच रडायला आलं.. आणि ती 22वर्ष मागे विचारांच्या, भूतकाळाच्या गाभाऱ्यात गेली.आणि स्वतःच्या खाणाखुणा शोधू लागली सुरुवात झाली ती वरसंशोधनापासून

(श्वेता स्वतःच आपला पाढा गिरवू लागली तो पुढील प्रमाणे… तिच्याच तोंडून )

“वरद एक साधा सरळ पण रग्गड शेतकरी. मी जरा सावळी त्यामुळे वरदच्या घरचे नाही नाही म्हणत होतें. वरदला मी आवडली म्हणून सगळ्यांनी होकार दिला. आमच्यात 10….12 वर्षाचं वायाच अंतर होतं. माझ्या बाबांना वाटलं श्रीमंत घर आहे काय फरक पडतो, मला विचारलं तर मीही होकार दिला.. सगळ ठरलं व पार पडलं लग्न एकदाच. आणि मी वरद च्या घरी नवीन स्वप्नांसोबत गृहप्रवेश केला.

नवीन सुन आली म्हणून वरदच्या आईने सर्व जबाबदारी सुनेला देऊन दिली. एकुलता एक मुलगा व सुन, त्यांनीच सगळं करावं ही माफक अपेक्षा होती माझ्या सासू -सासऱ्यांची. (आता वाटत काय चुकलं होतं त्यांचं )

मला माहेरी जाण्याची व फिरण्याची भारी हौस होती. माहेरी जाताना आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन करायला खुप आवडायच मला.. मग कधी कपडे, गिफ्ट, खायचं सामान न्यायचे. सुरुवातीला वरद पण यायचे…शेतीची कामे वाढली त्यामुळे त्यांना ही वेळ मिळत नव्हता.. आणि त्यातच माझी good news आली त्यामुळे प्रवास कमी झाला..

दोघांन मधे वयाच अंतर जास्त होतं… त्यामुळे की काय हळू हळू काही गोष्टी त्याला खटकायला लागल्या होत्या (वरदला वाटायचं आपलीच पसंत आता काय करायचं.)

म्हणून वरद मला नेहमी समजवायचा.. पण इकडे माझा स्वार्थीपणा वाढत होता. सासू -सासरे नको.. राजा -राणीचा संसार करायचे स्वप्न मी रंगवू लागले होतें .. “एकदाच बाळ झालं की आपण वरदला वेगळं राहण्यासाठी तयार करू “असं ठरवलंच होतं मी . वाट होती बाळ होण्याची.

बाळ झालं “चार महिन्याचं ” आणि माझं झालं सुरु “सगळे वेगळे राहतात आपणही वेगळं राहूया.. माझ्यानी इतक्या लोकांचे काम होतं नाही “

माझं हे बोलणं ऐकून वरदला रागच आला.तो मला दिसत होता पण मला तो काहीच बोलला नाही कदाचित त्याने विचार केला असेल मनात “कुणापासून वेगळं व्हायला लावते ही मला.. आई -बाबांपासून? या वयात त्यांना एकटं सोडायचं? मुलगा हा म्हातारपणात आपल करायला पाहिजे असं म्हणतात आणि मी त्यांच्यापासून वेगळं कस राहू.. ” (त्यांच बरोबर होतं हे आता पटतंय )

हाच वेगळं होण्याचा मुद्दा घेऊन कितीदा वाद केला मी.. किती भांडले.. घरातील वातावरण दूषित केल.. आणि एकदिवस वरदनी माझ्यावर हात उचलला.. रागाच्या भरात.. झालं माझा ego आडवा आला मी जेवनच बंद केल.. आजही स्पष्ट आठवत सासूबाई कितीदा आल्या मला “जेवण कर ग. बाळ दूध पीत. चक्कर येईल तुला ”

मी मात्र माझ्या रागात होती, कुणाच ऐकलं नाही.. शेवटी यांनी माझ्या माहेरी फोन करून सांगितलं “ही अशी वागतेय, जेवण करत नाही तुम्ही तिला जरा समजवता का? “

वरदनी साधेपणाने फोन केला व माझे बाबा.. पाच पंच घेऊनच आले.. नको -नको ते बोलले वरद व माझ्या सासरच्याना. शेवटी मला माहेरी न्यायचं ठरवलं पण आलेल्यापैकी एक जण म्हणाला “यांना चांगला धडा शिकवूया चला पोलीस स्टेशनला ” मग काय खोटे आरोप करून रिपोर्ट करायला गेलो तर मेडिकल चेकअप शिवाय रिपोर्ट लिहिणार नव्हते.. माझा मेडिकल चेकअप झाला त्यात काहीच निघालं नाही… कारण काही त्रास नव्हताच न. त्यामुळे रिपोर्ट दाखल झाली नाही.. तिथून सरळ मी 10 महिन्याच्या बाळाला घेऊन माहेरी आले..

मधे -मधे वरद फोन करायचा, “अग राग शांत झाला असेल तर ये परत घरी ” म्हणायचा.. माझा igo जरा जास्तच मोठा झाला होता न. मी एकच म्हणायचे ” वेगळ राहत असाल तर मी येते नाहीतर नाही “ असं करता करता दोन महिने झाले.. बाळाचा पहिला वाढदिवस इकडे करूया असं वरद म्हणाले.. माझी अट तिचं होती.. मुलीच्या प्रेमासाठी इकडे वरद आई -बाबाला, बहिणीला एकत्र बोलावून सांगत होता.

“मी आता वेगळं राहतो.. आणि मला बाबांच्या संपत्तीतला हिस्सा नको. श्वेताला कळलं पाहिजे की सासू-सासरे नाही तर त्यांची संपत्ती पण नाही “

अशांनी तरी मी एकत्र राहायला तयार होईल असं सगळ्यांना वाटत होतं.. वरदचा कॉल आला.. “मी वेगळा राहायला तयार आहे तू परत ये.. मी बाबांच्या संपत्तीमधला हिस्सा घेणार नाही. आपण आपला संसार नव्याने उभा करू.. ते जर आपल्याला नको तर त्यांचे शेत/संपत्ती घेऊन काय उपयोग.. तू लवकर ये आपण बाळाचा वाढदिवस इकडे अपल्या नवीन घरी करूया “

मी हे घरी सांगितले.. तेंव्हा घरच्यांचे हावभावच बदलले. मला माहेरी आणताना जे पाच लोकं बाबा घेऊन आले त्यांना बोलावून विचारले तर.. ते म्हणाले आता “दोन हातावर बायको पोरीच कस काय भागेल..”

दुसरा म्हणाला “तुमची मुलगी आहे तुम्ही बघा “.

तिसरा म्हणाला ” त्यांचा इतका अपमान केला आता परत त्या घरी जायचं नाक राहील का ” असं बोलून ते निघून गेले..

घरी मग त्यावर विचार सुरु झाला.मी म्हंटल “मला जायचं आहे परत “

बाबा -“तुला जायचं असेल तर तुझ्या भरवशावर जा.. इथून पुढे भांडण झाले व मला फोन आला तर मी येणार नाही तुझ्या घरी “

भाऊ – ” किती अपमान केला तुझ्या सासरच्यांचा. त्यांच्या समोर जायची लाज नाही का वाटणार मी तर कधी येणार नाही तिथे. “

आई -“पोरी आधी विचार करायचास न आता तू परत गेलीस तर तुझ्या बाबांचा पण मान जाईल न.”

बाबा – “तुला जायचं तर जा परत माहेरी येऊ नकोस “

सर्वांचे बोलणे ऐकून मी गोंधळले होतें यात बाळाचा पहिला वाढदिवस झाला तरी मी सासरी गेले नाही. विचार सुरु होता… “सासरी गेले तर माहेर तुटेल. माहेरी राहिले तर नवरा सुटेल ” काय करू..?

जेंव्हा मला राग आला तेंव्हा का नाही समजावलं यांनी मला.. हे लोकं सरळ माहेरी घेऊन आले.. आणि आता तुझं तू बघ म्हणतं आहेत. मी जरा जास्तच केल का वेगळं राहण्यासाठी? मी मूर्खपणा केला का? या विचारात होतें तोच भाऊ म्हणाला काय ठरवलंस… जातेस स्वताच्या भरवंशावर की वकील बघायचा. माहेर मला महत्वाचे होतेच.. घरच्यांनी आणलं आता त्यांच्याच मताने वागायचं ठरवलं व वकील बघून वरदला घटस्फोटाचा नोटीस पाठवला.

नोटीस मिळताच घरचे (सासरचे )हादरले.. वेगळं राहायला तयार असूनही ही अशी का वागतेय.. सगळे(सासरचे ) पुन्हा समजवायला आले.पण मी कुणाचाच ऐकलं नाही (आता वाटत ऐकलं असत तर…परिस्थिती वेगळी असती )

वरदने नोटीसला उत्तर दिले. “मी तुला नांदवायला तयार आहे तुझ्या सर्व अटी मान्य करून. तू परत ये “

मी.. मी म्हंटल्या पेक्षा माझ्या घरचे घटस्फोट घेण्यावर जोर देत होतें. या नोटीस च्या प्रकरणात तीन वर्ष निघून गेली. केस जागच्या जागेवर… शेवटी वकिलांच्या मध्यस्तीने घटस्फोट घेण्यावर शिक्कामोर्तब झाली. घरच्यांनी मुलीची दुसऱ्या लग्नात अडचण होईल म्हणून तिला वडिलांकडे देण्याचं ठरवलं मला मान्य करावं लागल… शेवटी त्या घटस्फोटच्या कागदावर दोघांनीही सह्या केला.. त्यात मुलीला भेटण्याची तरतूद पण केली नाही वकिलाने.. म्हणजे माझं बाळ तुटलं मला नेहमीसाठी. बाळाला वरदला सोपवून मी जे निघाले ते पालटून एकदाही मागे बघितलं नाही. किती रडत होती वैष्णवी.. आता पर्यंत आईला बघितलं.. आणि 3 वर्षानंतर अनोळखी चेहरे दिसलें तिला म्हणून ती खुप रडत होती. मी कसलाही विचार केला नाही… तेंव्हा.. सही करण्याआधी जरी मी माझा निर्णय घेतला असता तर….? आज खरच काहीतरी वेगळीच परिस्थिती असती…

आज 22वर्षांनी ती वैष्णवीला फोटोत बघतेय व मुलाखती मधे ऐकतेय.. “तिच्या यशाचे श्रेय तिच्या आईला जाते… ” मला नाही जन्मदात्रीला नाही तर पालनकर्तीला… आज माझी चिमुरडी DC झाली त्यात आनंदच आहे.. पण… त्या वेळी 22वर्षाआधी जर मी योग्य निर्णय घेतला असता तर आज परिस्थिती काही वेगळीच असती… हे शंभरदा डोकयात आलं पण आता.. वेळ निघून घेल्यावर

इतक्यात…. आत्या..कितीवेळचा आवाज देतेय कुठे हरवलीस म्हणून तनुजा (माझ्या भावाची मुलगी ) आली.. आणि मी भूतकाळातून निघून भानावर आले…. श्वेता…

समाप्त…..

खरच वेळ निघून जाते व निर्णय चुकत जातात..

रागाच्या भरात नाते तुटत जातात…

“साप गेल्यावर काडी मारण्यात काय अर्थ आहे ” या म्हणी प्रमाणे लोकांचं जीवन होतं.. जसं श्वेताच… अशा बऱ्याच श्वेता आहेत ज्या विभक्त झाल्या व काहींची केस अजूनही सुरु आहे… 5वर्ष.. 6वर्ष झालीत बऱ्याच जणींना. अशा स्त्रियांच्या मनातलं श्वेताच्या पात्रातून सांगण्याचा प्रयत्न केला. लिहिताना “मी ” हा शब्द खास वापरला तो यासाठी की ज्यांच्यावर ही परिस्थिती आहे त्यांना ही स्टोरी स्वतःची वाटावी… आजूबाजूच्या घटनेवरून प्रेरित होऊन लिहिण्याचा प्रयत्न केला मी…

ही स्टोरी वाचून जर कुणाचे चुकलेले निर्णय योग्य होईल तर फारच छान व कुणी चुकत असेल व वेळीच सावध होतील तर आणखीनच छान….

तर वाचकांनो… वाचण्यासाठी धन्यवाद 🙏… Like करायला विसरू नका…. तुमच्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत… आणि शेअर करायचा असेल तर नावासकट शेअर करा…

📝जयश्री कन्हेरे-सातपुते.. 🙏
Avdhut-अवधूत

विश्वास          खूप दिवस झाले दीपिका खूप स्ट्रेस मध्ये होती. त्याच टेन्शनमुळे तिला रात्री ना धड झोप लागत होती ना धड जेव...
15/07/2025

विश्वास

खूप दिवस झाले दीपिका खूप स्ट्रेस मध्ये होती. त्याच टेन्शनमुळे तिला रात्री ना धड झोप लागत होती ना धड जेवण जात होतं. एकाच ठिकाणी शून्यात नजर लावून बसायची.अचानक मोबाईल वाजला की खूप अपेक्षितपणे मोबाईल बघायची पण पुन्हा तोच हिरमोड आणि पुन्हा तेच रडणं आणि परत शून्यात नजर लावून बसणं. आई नव्हती तिला,पण वडिलांचा फोन आला की कामात आहे असं सांगून तुटक बोलायची आणि पुन्हा फोन ठेवून द्यायची. हेच तिचं पंधरा दिवसापासून सुरू होतं. वडिलांचा,आईचा फोटो बघून खूप खूप रडायची आणि सलील चा फोटो बघून पुन्हा सुन्न होऊन जायची.
हो सलीलच,दीपिकाचा बॉयफ्रेंड ज्याच्याबद्दल तिच्या घरच्यांना तिने अजिबात काही सांगितलं नव्हतं.कारण तिला तसं सांगायची गरजच वाटली नव्हती. गरज नाही म्हणण्यापेक्षा तिने घरच्यांना गृहीतच धरलं होतं,कारण आई गेल्यानंतर वडिलांनी तिला खूप लाडात वाढवलं,कशाचीच कमी पडू दिली नाही. गावात फारशी शिक्षणाची सोय नसल्यामुळे,त्यांनी तिला शहरात चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन दिली. त्यांच्या घरी छोटसं दुकान होतं आणि त्यात तिच्या लहान भावाचं पण शिक्षण सुरू होतं,म्हणून पोटाला चिमटा काढून वडील दीपिकाला पैसे पाठवत होते. दीपिका पण या सगळ्यांची जाण असल्यामुळे कॉलेजमध्ये अभ्यासात टॉपर होती. आणि म्हणूनच कॉलेजच्या शेवटच्या वर्षालाच तिला एका नामांकित कंपनीमधून जॉब ची ऑफर आली.दीपिका खूप खुश झाली.वडिलांना तर त्यांच्या लाडक्या दिपूला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालं होतं. नोकरीमध्ये पण दीपिका मन लावून काम करत होती. पण म्हणतात ना "नियतीने पुढे आपल्यासमोर कोणता खेळ मांडला आहे हे कोणी सांगू शकत नाही". अशातच दीपिकाच्या आयुष्यात सलील आला,तो तिच्याच कंपनीमध्ये कंपनीच्या गाडीवर ड्रायव्हर होता. एकदा दोनदा रात्री काम करता करता उशीर झाल्यामुळे त्याने दीपिकाला कंपनीच्या गाडीतून तिच्या रूमवर सोडलं होतं. त्यामुळे दीपिकाची आणि त्याची चांगली ओळख झाली होती. ओघाओघाने बाहेर फिरणे, एकमेकांच्या घरी जाणे सुरू झाले. दीपिकाला पण त्याच्याबद्दल आपुलकी वाटू लागली होती. कारण तो पण तिच्याप्रमाणे सामान्य कुटुंबातला होता. आईची आणि बहिणीच्या लग्नाची जबाबदारी त्याच्यावर असल्यामुळे तो कंपनीमध्ये पडेल ते काम करीत असे.त्यामुळे त्याला तेवढेच चार पैसे जास्त मिळत, दीपिकाच्या मनात त्याचा हाच स्वभाव घर करून गेला. आणि ती त्याच्यावर मनापासून प्रेम करू लागले हळूहळू ते दिवस-रात्र एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले.आणि एक दिवस अचानक दीपिका ऑफिसमध्ये एकटी बसलेली असताना, सलीलने बरोब्बर डाव साधला. तो त्याच्या मित्राला घेऊन आला आणि म्हणाला,"दिपू हा माझा मित्र हा एका मोठ्या कंपनीत एजंट म्हणून काम करतो. याच्या कंपनीत पैसे गुंतवले तर आपले पैसे एका वर्षात दुप्पट होतात.मी सुद्धा मागच्याच वर्षी गुंतवले आणि बघ यावर्षी ते पैसे मिळाले पण. आणि म्हणून तर मी माझ्या आईचे ऑपरेशन करू शकलो".असे बोलून त्यांनी मित्राकडे हळूच बघितले आणि डोळ्यांनी इशारा केला. मित्र पण लगेच त्याला साथ देत तिला स्कीम समजावून सांगू लागला.अर्धा तास तो स्कीम सांगत होता आणि सलील ही स्किम घेणं कसं फायद्याचा आहे हे तिला पटवून देत होता आणि फायनली दीपिका ने स्कीम मध्ये सेविंग मधले सगळे पैसे गुंतवले. आणि पैसे डबल होणाच्या आनंदातच ती घरी आली. तिने त्यातील वडिलांना काही सांगितले नाही,कारण तिला माहिती होते वडील विरोधच करणार, यामुळे पैसे मिळाल्यावरच ती त्यांना ही आनंदाची बातमी सांगणार होती.
आज घरी आल्यावर तिला जरा शरीर जड वाटत होतं,आणि जरा चक्कर पण येत होती.पण ऑफिसमध्ये वर्क लोड जास्त असल्याने होत असेल असा तिचा समज झाला,आणि पुढच्या कामाला ती लागली.पण तिला नंतर त्रास जरा जास्तच झाला आणि सोबत उलट्या पण होऊ लागल्या.म्हणून ती डॉक्टरांकडे गेली आणि डॉक्टरांचे बोलणे ऐकून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. हो, पण तिचा सलीलवर खूप विश्वास होता.सलील तिला कधीही अशा परिस्थितीत एकट टाकून जाणार नाही असा तिला ठाम विश्वास होता.तशी मनातून ती खुश झाली होती कारण तिला तिच्या सलील सोबत बांधून ठेवणारा एक जीव तिच्या पोटात होता. त्यामुळे तिने घरी येऊन लगेच सलीलला फोन लावला. कारण ती आज त्याला लग्नाबद्दल विचारणार होती. याशिवाय तिच्या काही पर्याय नव्हता. पण सलील चा फोन चार वेळा लावून सुद्धा स्विच ऑफ येत होता. आता ती खूप घाबरली कारण पैसे आणि शील या दोन्ही गोष्टी ती गमावून बसली होती.पंधरा दिवस तिने घरातच स्वतःला कोंडून घेतलं.जॉब वरून तर तिने केव्हाच सुट्टी घेतली होती.गेले पंधरा दिवस फक्त शून्यात नजर लावून बसायची आणि खूप खूप रडायची.
पण आज तिने मनाशी एक निर्धार केला आणि एक ओढणी घेतली ती पंख्याला बांधली. ओढणी बांधताना हजारो विचार तिच्या मनात येत होते. पण तिच्याकडे त्या विचारांकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता,किंबहुना तिच्याकडे पर्यायच नव्हता कारण ती वडिलांना तोंड सुद्धा दाखवू शकत नव्हती. आज जे घडलं ते वडिलांना जर कळलं तर वडील काय करतील,गावात लोक काय म्हणतील,नातेवाईक वडिलांना किती दोष देतील, या सगळ्या विचारांनी ती पूर्ण खचून गेली होती. आणि म्हणूनच तिने पंख्याला ओढणी बांधली आणि स्टूलवर चढणार तेवढ्यात, डोअर बेल वाजली घाबरून ती खाली उतरली आणि की होल मधून पाहिलं,तर एक डिलिव्हरी बॉय तिला दिसला. आता जर दार उघडलं नाही तर तो पुन्हा जोरा जोरात दार वाजवेल आणि सगळे शेजारचे गोळा होतील. म्हणून तिने लगेच दार उघडलं. दीपिकानेच मागे ऑर्डर केलेलं कसलं तरी एक पार्सल तो घेऊन आला होता. त्याच्या हातून पार्सल घेताना त्याच्या टी-शर्ट वर असलेल्या नेम प्लेट वरच नाव वाचलं, " विश्वास "
आणि पुन्हा तिचे डोळे पाणवले.
विश्वास तसा खूप स्मार्ट होता. तिच्या डोळ्यातलं पाणी लगेच त्यांनी ओळखलं आणि मग घरात कानोसा घेण्याच्या उद्देशाने त्यांनी थोडी नजर फिरवली. तर अचानक खिडकीतून त्याला बेडरूम मध्ये बांधलेला ओढणीचा फास दिसला. तो खूप घाबरला पण आता घाबरून चालणार नव्हते त्याला विचार करायला थोडा वेळ हवा होता आणि म्हणूनच त्याने दीपिकाला पिण्यासाठी थोडे पाणी मागितले. कारण त्याला माहिती होतं जर आज ही बोलली तर आणि तरच तिचा जीव वाचेल,त्यामुळे त्यांनी मनाशी पक्क ठरवलं आणि एकदम विषयालाच हात घातला, " मॅडम एवढ्या टोकाचा पाऊल का उचलत आहात "?अचानक आलेल्या या प्रश्नाने दीपिका घाबरली पण, तुला काय करायचंय? तू तुझा बघ?अशी उडवा उडवी ची उत्तर ती देऊ लागली,पण विश्वास नावाप्रमाणेच विश्वास होता तो तिला म्हणाला," एवढ टोकाचं पाऊल उचलताना स्वतःच्या आई-वडिलांना आठवा मॅडम" त्यावर ती कणखरपणे म्हणाली, " आई तर बिचारी केव्हाच सुटली. तिला माझं असं वागणं सहन झालं नसतं म्हणून देवानेच तिला नेलं माझ्यापासून दूर. आणि आता फक्त वडील आहेत पण त्यांना त्रास नको म्हणूनच तर हे पाऊल उचलते आहे". आता ती बोलायला लागल्यामुळे विश्वासला थोडा धीर आला. तो थोडा पुढे येऊन तिला म्हणाला, "मॅडम मी तुम्हाला ओळखत नाही पण ज्या अर्थी वडिलांना त्रास नको म्हणून तुम्ही एवढं मोठं पाऊल उचलत आहात,याचा अर्थ तुमच तुमच्या वडिलांवर खूप प्रेम आहे आणि साहजिकच त्यांचं पण तुमच्यावर आहे. पण खरं सांगू का मॅडम,"हा जो बाप नावाचा माणूस असतो ना त्याला देवाने काही वेगळच बनवलेलं असतं,म्हणजे दिसताना तो खूप कठोर दिसतो पण त्याचं मन मात्र लेकरांसाठी लोण्याहून मऊ असतं. मी तुम्हाला आग्रह करणार नाही की तुम्ही हे पाऊल का उचलत आहात हे मला सांगा. पण एवढं मात्र नक्की सांगेन की तुमचा प्रॉब्लेम तुमच्या वडिलांपेक्षा आणि तुमच्या आयुष्यापेक्षा मोठा नाही. त्याचं बोलणं ऐकून दीपिकाला आपण काहीतरी चुकीचं करतो आहे हे मनात कुठेतरी वाटून गेलं.तिचे चेहऱ्यावरचे हावभाव एकदम बदलले आणि ती वडिलांचा फोटो घेऊन रडायला लागली आणि म्हणाली," आयुष्यभर हा माणूस मानाने जगला,पण आज माझ्यामुळे पैशाने आणि इज्जतीने दोन्ही गोष्टींनी हरला,मी त्याची खूप मोठी गुन्हेगार आहे. त्यामुळे मलाही शिक्षा व्हायलाच पाहिजे ".आणि परत एकदा तिचा चेहरा कठोर झाला.आता विश्वास ला भीती वाटू लागली. तो म्हणाला," हे बघा मॅडम आज मी पण एक सात वर्षाच्या मुलीचा बाप आहे.त्यामुळे मी तुम्हाला विश्वासाने सांगू शकतो कि तुमचा प्रॉब्लेम किती मोठा असो,जगातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असला तरीही त्याचे सोल्युशन तुम्हाला वडिलांच्या शब्दात आणि त्यांच्या प्रेमात मिळेल. त्यामुळे फक्त एकदा मी ही विनंती करतो तुम्ही तुमच्या वडिलांना एक फोन लावा आणि बघा तुमचा बाप कसा तुमच्या पाठीशी उभा राहतो ते " असं म्हणून तो तिचा फोन तिला आणून देतो. ती पण निर्विकार पणे बाबांना फोन लावते. दोन रिंग होताच पलीकडून आवाज येतो, " बोल दिपू बाळा कशी आहेस?काय म्हणते? बाबांचा आवाज ऐकून एवढ्याच शब्दांनी दीपिकाला रडायला येत तेवढ्यात तिचे बाबा म्हणतात, "दिपू काही प्रॉब्लेम आहे का? काय झालं तू का रडतेस? तुला काही टेन्शन आहे का? मी असताना तू कशाचही टेन्शन घेऊ नको." हे आश्वस्थ करणारे शब्द ऐकून दीपिका धाय मोकलून त्यांच्या कुशीत शिरल्यासारखी रडायला लागते. आणि त्यांना पहिल्या दिवसापासून आजपर्यंत घडलेलं सगळं सांगते.तितक्यात बाबांचा आवाज परत येतो, " तू काही टेन्शन घेऊ नको. मी आहे ना, मी दुपारीच निघतो आणि येतो तुझ्याजवळ मी बघून घेईन सगळं. बाळा मला फक्त तू हवी आहेस. त्यामुळे तू निश्चिंत रहा आणि हो दिपू बाळा माझं एक वाक्य नेहमी लक्षात ठेव, " जगात कुठलाही प्रॉब्लेम असू दे मग तो छोटा असो किंवा मोठा असो हे असं टोकाचे पाऊल उचलण्याआधी, दिपू बाळा तू फक्त मला एक फोन कर". आणि वडील सुद्धा रडायला लागतात. बाबांच्या या शब्दांनी दीपिका स्वतः चा निर्णय बदलते.ती मनात विचार करते,आज आपण हे काय करायला जात होतो हा विश्वास देवासारखा आला नसता तर... या विचारानेच तिला घाबरायला होतं.
तेवढ्यात विश्वास धावत बेडरूम मध्ये जातो, लगेच ओढणीचा बांधलेला फास सोडतो आणि तिच्या जवळ येतो.तिच्या डोक्यावर हात ठेवतो, आणि म्हणतो, " मॅडम जगावर नाही तर तुमच्या वडिलांवर विश्वास ठेवा.काही मदत लागली तर नक्की या भावाला हाक मारा." एवढे बोलून तो निघून जातो.दीपिका विश्वास च्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत मनोमन विश्वास चे आणि देवाचे आभार मानते.

" मैत्रिणींनो प्रत्येकीला वाचवायला हा असा विश्वास प्रत्येक वेळी धावून येईलच असे नाही, पण तुमच्या मनातील, तुमच्या आई-वडिलांवर असलेला विश्वास कधीही ढळू देऊ नका. आयुष्यात कितीही वादळं आली तरी,आई-वडील हे असे एक रसायन आहे ना, की ज्याच्या पुढे प्रत्येक वादळाला शांत व्हावंच लागतं,त्यांच्यामध्ये त्या वादळाला शांत करण्याची शक्ती असते. त्यामुळे आयुष्यात कोणताही निर्णय घेताना फक्त एकदा आई-वडिलांशी बोला. त्यांना डोळ्यासमोर आणा. तुम्ही चुकला असाल तर ते तुमच्याशी सुरवातीला कठोर वागतीलही, पण शेवटी तेच खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे राहतील ,पण खरं सांगू त्यांच्या एवढं प्रेम तुमच्यावर कोणीही करू शकत नाही.

--- शरयू निंबाळकर

दिवस बदलतात …,धन्या ते ना. धनंजय मुंडे साहेब- Story Behind scene…खरं तर धनंजय मुंडे हे मोठ्या घराण्यात, तसं पाहिलं तर सो...
15/07/2025

दिवस बदलतात …,

धन्या ते ना. धनंजय मुंडे साहेब- Story Behind scene…

खरं तर धनंजय मुंडे हे मोठ्या घराण्यात, तसं पाहिलं तर सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले असले तरी त्यांना ही फार भोगावं लागलं, संघर्ष करावा लागला.

लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना सोडून त्यांचे राजकीय विरोधक असलेल्या पवार साहेबांच्या पक्षात गेल्यावर धनंजय मुंडे यांच्यावर प्रचंड टीका टिप्पणी झाली,
जाहीर सभेत असो की,
नुकतच बाळसं घेतलेल्या सोशल मीडियावर देखील त्यांना शिव्याची लाखोळी वाहीली गेली.

आधीच आक्रमक असलेल्या वंजारी समाजाला तर त्यांचं मुंडे साहेबांना सोडून पवार साहेबांच्या पक्षात जाणे अजिबात मान्य नव्हते.

त्याकाळी त्यांना सर्रास धन्या म्हटलं जायचं,
इतकच काय..,
भगवान गडाच्या एका मेळाव्यात त्यांच्यावर दगडफेक झाली.
त्यांना तिथून हाकलून लावण्यात आलं.

गोपीनाथ मुंडे साहेबांच्या अपघाती निधनानंतर त्यांना त्यांचे अंतिम दर्शन सुद्धा घेणे कठीण झाले होते.

पण काळ सरत गेला,
पवार साहेबांनी दिलेल्या संधीचं सोनं या युवा नेत्याने केलं, आपल्या अमोघ वाणीने महाराष्ट्र जिंकला.
काळाच्या कसोटीवर स्वतःचं नेतृत्त्व सिध्द केलं.

ज्यांनी दगडं मारली त्याच लोकांना त्यांनी फूलं टाकायला भाग पाडलं.
राज्याचा नेता म्हणून धनंजय मुंडे साहेब सिद्ध झाले.

कष्ट प्रामाणिक असले की दिवस बदलतात.
पण नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी विरोधाच्या काळात खंबीर
तर
सत्तेच्या काळात सांभाळून रहायचं असतं.

श्री. धनंजय मुंडे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

✍️ चांगदेव गीते
Dhananjay Munde FC Pankaja Gopinath Munde DhananJay GundeKar

बारा वाजायला एक मिनिट ©राजश्री बर्वे #कथाविश्व तो दिवस… अगदी वेगळा … सकाळीच निघाले होते ऑफिसला. नेहेमीप्रमाणे. तीच ट्रेन...
15/07/2025

बारा वाजायला एक मिनिट ©राजश्री बर्वे
#कथाविश्व

तो दिवस… अगदी वेगळा …
सकाळीच निघाले होते ऑफिसला. नेहेमीप्रमाणे. तीच ट्रेन पकडायची होती. ८.१७. चर्चगेट. नेहेमीच्या लगबगीने कामं चालू होती. जास्त मेंदूला ताण न देता हात काम करत होते. नेहेमीच्या सवयीच्या कामांचं असंच असतं. त्यात फक्त हाताचा पायांचा सहभाग असतो. मेंदू काम नाही करत. त्याच्या सवयीचं काम असतं ना ते. चष्मा, मोबाईल, किल्ली सर्व काही पर्सच्या ठराविक जागेत गेलं. डबा वेगळ्या पिशवीत गेला. गॅस, गिझर बंद आहेत ना ह्याची खातरजमा केली नि पर्स खांद्याला लावली. निघणार तोच फोन वाजला. दुर्लक्ष करून निघणार होते. पण वाटलं नको. महत्त्वाचं काही असलं तर?

फोन घेतला. सरितामावशीचा फोन होता. तिच्या सुनेच्या डोहाळजेवणाचं आमंत्रण. नाही म्हटलं तरी पाच मिनिटं गेलीच. काहींना मुळीच समजत नाही. नोकरी करणाऱ्या बायकांना सकाळी फोन करावाच का म्हणते मी? आधीच इतकी कामं उरकायची असतात, मस्टर मिळतंय का याचं टेन्शन असतं आणि त्यातून हे फोन …

छे! उगाच फोन घेतला असं झालं मला. आता कुठली ८.१७ मिळायला? जाऊदे. आजचा लेट ठरलेला. लेटचं एकदा नक्की झालं की मन निवांत होतं. कारण आता काही करू शकत नाहीच. मग काय? लेट तर लेट. आता ९.१३ पर्यंतची कुठलीही ट्रेन चालेल. आता लेट लागणारच आहे तर बँकेचं एखादं काम उरकूनच जावं असं ठरवलं. लगेच बँकेचं पासबुक काढलं आणि निघाले.

रस्त्यावरून चालताना नेहेमीप्रमाणे मोबाईल हातात होताच. व्हाट्स ऍप, फेसबुक आल्यापासून घाणेरडी सवय लागली आहे. वेळ वाचवण्याकरता चालताना, जिने उतरताना मेसेजेस वाचायचे. एक दोनदा जिन्यात पडलेही होते. पण सवय काही जात नाही. आजही तेच झालं. समोरून येणाऱ्या गाडीने करकचून ब्रेक लावला. तेव्हा भानावर आले. बाई माणूस म्हणून ड्रायव्हरने शिव्या घातल्या नाहीत पण नाराजी व्यक्त केलीच. मीही सॉरी सॉरी म्हणून मोबाईल पर्समध्ये टाकला. आजूबाजूच्या लोकांनी विचित्र नजरेने बघून ओशाळवाणं केलंच. पण तरीही तिकडे दुर्लक्ष करून देवाचे आभार मानले कारण एक अपघात टळला होता. बरं ती काही छोटी गल्ली नव्हती तर चांगला मेन रोड होता. त्याने ब्रेक लावला नसता तर कदाचित वरचा रस्ता धरावा लागला असता.

ओह गॉड! नॉट अगेन! परत एकदा ठरवलं. चालत असताना, पायऱ्या चढत असताना अजिबात मोबाईल बघायचा नाही. बँकेत गेले. पासबुक अपडेट केलं. नेहेमीच्या सवयीने एफडी चा बोर्ड पाहिला. मागे पाहीले होते तेव्हा ६.५% होते. आता ७.५%. अरे वा ! एक टक्का वाढलाय. चौकशी केली तर समजलं. आजचा शेवटचा दिवस. उद्यापासून रेट परत कमी होणारेत. बँकेत बॅलन्सही वाढलाच होता. एफडी करायला झालीच होती. लगेच निर्णय घेतला. करून टाकू आताच. फॉर्म घेतला. भरला. पण बँकेला आधार कार्ड वगैरे अजून काही डॉक्युमेंट्स हवी होती. मग ह्यांना फोन लावला आणि त्यांची वाट पाहात बसले. दहाव्या मिनिटाला हे हजर झाले. घड्याळाचा काटा भराभर पुढे सरकत होता. ९.१३ कशीही गाठायला हवीच होती. हे आले ते बरंच झालं. बरोबर स्कुटर असणार. काम झालं की रिक्षा शोधत रहायला नको. एफडीचं काम आटपून बाहेर पडलॊ.

“मला जरा स्टेशनला सोडताय ना?”

“हो. बस.”

एरवी ड्रेस असला की मी दोन बाजूला पाय सोडून बसते पण आज नेमकी साडी होती. त्यामुळे कशी बशी एका बाजूला दोन्ही पाय घेऊन बसले.

“जरा फास्ट हं. नाहीतर ९.१३ जाईल माझी.” ह्यांच्या कानात कुजबुजले.

एरवी ‘हळू चालवा जरा.’ म्हणणारी मी आज फास्ट न्यायला सांगतेय त्यामुळे त्यांना बरंच झालं. सुसाट वेगाने स्कुटर निघाली. काय कसं माहीत नाही पण स्कुटरचं पुढचं चाक गर्रकन फिरलं आणि ती एका बाजूला कलंडली. आम्ही दोघंही पडलो. आणि क्षणात मागच्या बसने करकचून ब्रेक लावला. मी डोकं सावरलं होतंच. उचलून पाहिलं तर अक्षरशः तीन चार पावलांवर बस होती. दोघंही सुखरूप होतो. थोडंसं खरचटण्यापलीकडे काहीही इजा झाली नव्हती. ह्यांनी उठून परत स्कुटर चालू केली. ‘सावकाश’ मी परत ह्यांच्या कानात कुजबुजले. अजून हृदयात धडधडत होतं.

९.१३ मिळाली एकदाची. खूप गर्दी होती. खूप म्हणजे खूपच. नेहेमीपेक्षा डबल. शिवाय गाडी रडत खडत चालली होती. बाकीच्या बायका जे बोलत होत्या त्यावरून कळलं. ८.१७ ला अपघात झाला होता. लेडीज डबा घसरला होता रुळावरून. ऐकल्यावर छातीत धस्स झालं. ८.१७ म्हणजे आपली नेहेमीची ट्रेन जी आज सरितामावशीमुळे चुकली होती. तिला आपण नावं ठेवली सकाळीच फोन केला म्हणून. पण तिच्यामुळेच वाचलो आपण. आज हे काय होत होतं? तीन वेळा वाचलोय आपण आज. मृत्युच्या अगदी जवळ जाऊन परत आलोय. काय वाढून ठेवलंय आज? हे म्हणत होते तसं परतायला हवं होतं का घरी? नकोच पण. आज २ तारीख. शेड्युल्स, बँक रिको येतील आमच्या सगळ्या ब्रांचेसची. आमचं शेड्युल टॅली आहे पण आमचं हेड ऑफिस असल्याने आमच्या खालच्या ब्रॅंचेसचंही टॅली आहे की नाही हे पहायला लागतं. त्यांना मदत करणं ही आमची जवाबदारी असते.

तेवढयात विचारे मॅडमचा फोन वाजला.

“कुठे आहेस? आज रजा आहे का तुझी?”

“नाही मॅडम. येतेय. निघायला उशीर झाला थोडा. पोहोचते अर्ध्या तासात.”

“बरं बरं. काहीच हरकत नाहीय. फक्त आज आपल्या ऑफिसमध्ये नको येऊस. सरळ फोर्ट ब्रांच मध्ये जा.”

“का हो ? काय झालं?”

“अगं, सर्व्हर डाऊन आहे त्यांचा. त्यामुळे रिकंसिलेशन बॅक एंडला करावं लागेल. त्यांना ते जमत नाहीय. बाकी सर्वांचं सकाळीच आलंय रिको. त्या एका ब्रान्चचंच राहिलंय. त्यांचं झालं तर आपल्या डिव्हिजनला फ्लॅश मिळेल रिको प्रथम पाठवल्याचं.”

चला. बरंच झालं. आपल्या ऑफिसमध्ये न जाता सरळ फोर्ट ब्रांचमध्ये जायचं म्हणजे मला ऑन ड्युटी मार्क होणार. लेट वाचणार. नोकरी करणाऱ्यांचं हे असंच. एक लेटमार्क वाचला तर कोण आनंद? त्या आनंदात सकाळच्या त्या अपघातांचं मी विसरून गेले.

ब्रान्चमध्ये माझी वाटच पाहात होते. मी रिकंसिलेशन करण्यात एक्स्पर्ट आहे. त्यात अगदी एका पैशाचा फरक जरी आला तरी तो शोधून ते टॅली करण्यात माझा हातखंडा आहे. त्यामुळे ब्रांचला अडचण आली की आमच्या विचारे मॅडम मलाच पाठवतात. एकंदरीतच विचारे मॅडम माझ्यावर खुश आहेत. मी यायच्या आधी आमचं डिपार्टमेंट खूप अस्ताव्यस्त होतं. पाच सहा महिन्यांची कामं शिल्लक होती. वरच्या ऑफिसमधून सारखे फोन यायचे. मी आल्यानंतर उशिरापर्यंत बसून सर्व शिल्लक कामं हातावेगळी केली. दोन तीन महिन्यातच सर्व सुधारलं. एवढंच नाही तर आम्हाला वेगवेगळ्या गोष्टींकरता बक्षीसही मिळाली. आणि आता रिको, शेड्युल वगैरे वरच्या ऑफिसला पाठवण्यात आमचा नेहेमीच पहिला नंबर असतो. म्हणूनच विचारे मॅडम माझ्यावर खुश आहेत. मी त्यांच्याकरता लकी आहे असं त्या म्हणतात. ह्या लकी बिकी असण्यावर माझा मुळीच विश्वास नाही. हे सर्व आपल्या मानण्यावर असतं आमचे हे सुद्धा नशीब, ज्योतिष वगैरेवर फार विश्वास ठेवतात. म्हणूनच सकाळी आलेल्या अनुभवांमुळे ते मला आज ऑफिसला पाठवायला तयार नव्हते. आज महत्वाचं काम आहे. जायलाच हवं असं सांगून मी आले. तरी बरं ह्यांना अजून ती गोष्ट माहीत नाहीय. मुद्दामच बोलले नाहीय मी. अशा गोष्टी मी लगेच सांगून नाही टाकत. उगीच त्यांच्या डोक्यात तो किडा वळवळत रहातो मग.

***

मी धापा टाकत ब्रँचमध्ये पोहोचले. मला पाहून तिथल्या ऑफिसरचा जीवही भांड्यात पडला. मी रिकंसिलेशन टॅली करूनच निघणार याची खात्री होती त्यांना. चहा वगैरे झाल्यावर त्या मला आयटी (कॉम्प्युटर) रूममध्ये घेऊन गेल्या. बॅक एन्ड काम करायचं होतं त्यामुळे त्या छोट्या आय टी रूम मध्ये बसूनच काम करावं लागणार होतं. खरं तर आयटी रूममध्ये सर्व्हर, राऊटर्स, स्विचेस वगैरे कॉम्पुटर संबंधित उपकरणं असतात. त्यामुळे तिथलं तापमान कमी असायला लागतं. त्याच्या मोठ्या मोठ्या बॅटरीज असतात त्या वेगळ्या खोलीत असायला हव्या असा नियम आहे. फायर फायटिंग (अग्निशामक) मशीनही तिथे असायलाच हवं आणि तेही चालू अवस्थेत. पण ही ब्रँच अगदी गचाळ होती. एक तर जागा फार कमी होती. शिवाय व्हेंटिलेशन अजिबात नव्हतं. उजेड वारा अतिशय कमी. कधी पाण्याचे प्रॉब्लेम्स तर कधी विजेचा. त्यामुळे एकंदरीतच कर्मचाऱ्यांमध्ये खूपच असंतोष होता. आम्ही हेडऑफिसवाले गेलो की आम्हाला त्यांची सर्व गाऱ्हाणी ऐकून घ्यावी लागत असत.

आजही तसंच झालं. अर्थात ह्या त्यांच्या अडचणींशी माझं काहीच देणंघेणं नव्हतं. ते सांगत होते त्या गोष्टी माझ्या किंवा माझ्या डिपार्टमेंटच्या अखत्यारीतील नव्हत्या. मला माझ्या कामाशी मतलब होतं. त्यामुळे ते ज्या इतर समस्या सांगत होते त्या मी एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून दिल्या आणि मी ज्या कामाकरता आले होते ते काम सुरु केलं. लंच नंतरही आमचं काम सुरुच होतं. घामाने आम्ही बेजार झालो होतो. त्यामुळे कामाला म्हणावा तसा वेग येत नव्हता. ह्या अशा वातावरणात रोज काम करणं खरंच अवघड होतं. मला तिथल्या कर्मचाऱ्यांची दया आली. प्रोग्रॅमरची तर खूपच. बिचारा अख्खा दिवस या छोट्याश्या आयटी रूम मध्ये काम करत असतो.

केवढी अडगळ होती तिथे. वायर्सचं जाळं पसरलेलं होतं. बॅटरीज नियमाप्रमाणे वेगळ्या रूममध्ये न ठेवता तिथेच ठेवल्या होत्या. नियमाप्रमाणे इथलं तापमान २४ डिग्रीपेक्षा कमी हवं. पण एसी काम करत नव्हता त्यामुळे ते तापमान ३२ डिग्री होतं. हाशहुश करत आम्ही कॉम्पुटर वर आमचं काम करत होतो.

तेवढयात ‘फाट’ असा स्विच उडाल्यासारखा आवाज झाला. आणि क्षणात तिथे आगीचा मोठा लोळ उठला. आम्ही घाबरून दरवाजाच्या दिशेने गेलो. दरवाजा उघडायला गेलो तर तो दरवाजा एवढा घट्ट बसला की आम्हाला तो उघडताच येईना. किती प्रयत्न केला तरी दरवाजा उघडेना. इथे आग वाढत चालली होती. प्रोग्रॅमरने हुशारी करून तिथलं फायर फायटिंग मशीन वापरून आग कमी करायचा प्रयत्न केला. बाहेरचं कोणीतरी खालून वॉचमनला घेऊन आलं. त्याच्या जवळच्या आयुधांनी त्यांनी त्या रूमचा काचेचा दरवाजा चक्क फोडला आणि आम्हाला बाहेर काढलं.

बाहेर पडल्या पडल्या माझ्याबरोबर कामाला बसलेल्या ऑफिसरला चक्कर आली आणि मलाही श्वासोश्वासाचा त्रास होऊ लागला. इथे आग आटोक्यात आली होती. त्यामुळे सर्वाचं लक्ष आमच्याकडे वळलं. डॉक्टरना बोलावलं. आम्हा दोघांचंही बीपी शूट झालं होतं. आम्हाला डॉक्टरानी इंजेक्शन देऊन विश्रांती घ्यायला सांगितली. मला तिथल्या कोणीतरी टॅक्सीत घालून घरी सुखरूप पोहोचवलं. ह्यांना फोन करून आधीच सांगितलं होतं. त्यामुळे ते घरी आले होते. मला डॉक्टरांनी दिलेल्या इंजेक्शनमुळे शांत झोप लागली. उठले तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते. नुसती खिचडी कढी केली आणि भराभर आवरून बेडरूममध्ये आले. झोप झाली असली तरी डोकं दुखत होतं. दिवसभराच्या ताणामुळे असणार.

आजचा दिवस फारच विचित्रपणे गेला होता. एकाच दिवसात मी वेगवेगळ्या प्रकारच्या अनुभवातून गेले होते. त्याही साध्या सुध्या नव्हे तर मृत्यूच्या. मृत्युचं दर्शन मी आज अगदी जवळून घेतलं होतं. त्याला मी सकाळपासून हुलकावणी दिली होती. एकदा दोनदा नव्हे तर अनेकदा. यामागे काय असेल? भूत प्रेत, कर्ण पिशाच्च, नशीब, पत्रिका, ज्योतिष कशाकशावर विश्वास न ठेवणारी मी आज पुरती गोंधळून गेले होते.

दोन महिन्यापूर्वी आईकडे आलेला तो माणूस मला आठवला. बहिणीचा अशा सर्व गोष्टींवर भलताच विश्वास. तिची तब्येत सारखी बिघडायची म्हणून तिने त्याला बोलावलं होतं. त्याला म्हणे कर्णपिशाच्च येऊन समोरच्याचं भविष्य त्याच्या कानात सांगतं आणि तो ते आपल्याला सांगतो. त्या दिवशी तो माझ्याकडे बघून म्हणाला होता, “खूप जपावं लागेल. २ जानेवारीला अपघातामुळे जबरदस्त मृत्युयोग आहे. आडमृत्यू म्हणा ना.”
त्यावर मी त्याला गप्प केलं होतं. बहीण म्हणत होती, “अगं, उपाय विचार ना.” पण मी तिच्यावरही रागावले होते. तो गेल्यावर आईला, बहिणीला मोठठं लेक्चरही दिलं होतं. आणि ह्यांना यातलं काही कळता कामा नये अशी सक्त ताकीदही दिली होती.
त्याने सांगितलेलं मी काही मनावर घेतलं नव्हतं. एवढंच काय तर सर्व विसरूनही गेले होते. पण आज २ जानेवारीला हे सर्व घडल्यावर मात्र मला त्याची आठवण आली होती. ८.१७ च्या ट्रेनचा अॅक्सिडन्ट, मोबाईल बघत जाताना गाडीने लावलेला ब्रेक, स्कुटर उलटून पडले तेव्हाच अपघात आणि आता ब्रान्चमध्ये आगीतून सहीसलामत बाहेर पडले तो प्रसंग. लागोपाठ चार वेळा मी मृत्यूच्या अगदी जवळ जाऊन परत आले होते. त्याला हुलकावणी दिली होती. केवळ माझं नशीब जोरदार होतं म्हणूनच मी वाचले होते.

आजचा दिवस सरला होता. आता मी काही बाहेर नव्हते. माझ्या घरात मी सुखरूप होते. माझा अपघाती मृत्यु टळला होता. बिछान्यावर पडल्या पडल्या मला सर्व आठवत होतं. कर्णपिशाच्च खरंच येऊन कानात सांगत असेल त्याच्या? तारखेसकट सगळं? इतकं तंतोतंत? माझा थोडा का होईना त्या माणसावर विश्वास बसला होता. आज होताच माझ्या नशिबात आडमृत्यू. नक्कीच. आईला सांगावं का उद्या त्याला बोलाव म्हणून. अजून काही असेल आणि शांत वगैरे करायची असेल तर करून घेऊ. खूप रात्र झाली होती म्हणून. नाहीतर आताच फोन केला असता. तसंही त्या माणसाबद्दल मला ह्यांच्याशी बोलायचं होतं. ह्यांना सर्व सांगायचं होतं. पण हे अजून झोपायला आले नव्हते. ते अजून का येत नाहीत हे पाहण्याकरता म्हणून मी उठायला गेले तोच.....
तोच वरचं छत वेगाने पंख्यासकट माझ्या दिशेने मला येताना दिसलं. मी बावरले. घाबरले. बाजूला होण्याइतकाही वेळ नव्हता. अंधारी येणाऱ्या डोळ्यासमोर फक्त समोरचं घड्याळ आलं. त्यात बारा वाजायला एक मिनिट होतं. फक्त एकच मिनिट होतं…
समाप्त..
कथाविश्व - आपले कथांचे अनोखे विश्व🎉
Avdhut-अवधूत

दगडांवर झोपलेल्या ह्या व्यक्तीकडे पाहून तुम्हाला काय वाटते? की हा नक्कीच यूपी, बिहार किंवा छत्तीसगड वरून आला असणार? बरोब...
13/07/2025

दगडांवर झोपलेल्या ह्या व्यक्तीकडे पाहून तुम्हाला काय वाटते? की हा नक्कीच यूपी, बिहार किंवा छत्तीसगड वरून आला असणार? बरोबर ना?
बिलकुल नाही !
------------------------------------------------
हा अमरावतीच्याच जवळपासचा विदर्भातील एक पोरगा...बारावी पास विथ 70% ! पण इथे मागच्या आठवड्यात काही दिवस आमच्या साईटवर जेसीबी ऑपरेटर म्हणून काम करत होता...कधी डंपर चालवयचा, मशनरीजची देखभाल ठेवयचा...
पुढे शिकायचे आहे त्याला.
गावाला शेती आहे भरपूर..पण पाणी नाहीये ! वाळवंट झालाय पार. घरात दाणा नाही खायला त्यामुळे सध्या गाव सोडून पोटापाण्यासाठी शहरात. दोन मोठ्या बहिणी आहेत लग्नाच्या...लग्न जमत नाही.
दोघी काम करतात नागपूरच्या एमआयडीसीमध्ये. हा पुण्यामध्ये. वडील आणि आई खूप वर्षे आधीच गेले. लाखो रुपयांचे कर्ज मागे ठेवून...परिस्थितीचे चटके झेलत,हाय खाऊन गेले ! - त्याने त्याची कर्मकहानी सांगितली.
------------------------------------------------
मी म्हटलं,"बघतो मी तुला अजून कुठे चांगले काम असेल तर आणि तुला कोणी शैक्षणिक मदत करील असं ही बघतो"
तो म्हटला, "चालेल सर...ह्या आमच्या शेठ ने अजून काही पैसे नाही दिले..पुढे देईल का तेही माहीत नाही. काल ताईचा फोन आलेला. नागपूरला एका ठिकाणी नोकरी मिळत आहे. त्यामुळे चाललो आहे मी उद्या,परवा !"

"ओक्के.. मग परवा पासून कुठे मुक्काम केला होतास? शेठ कडे?"
"नाही हो सर.. शेठ अजून आला पण नाही जेवायला पैसे देतो बोलला ते पण नाही.. इथेच झोपलो दोन दिवस !"
"ह्या मुरुमावर? अरे येड्या मग मला सांगायचे ना.. वॉचमनच्या घरामध्ये तुझी राहायची व्यवस्था केली असती."
"त्यात काय उलट बरं आहे इथे मस्त हवा खात चांदण्या बघत झोप लागते की.."
"आणि हे दगड? पाठीला टोचत नाहीत का?"
" नाही सर, सवय आहे आम्हाला !"
"बर जेवायचे काय?"
"काल पर्यंत होते थोडे पैसे आज नाहीत म्हणजे आहेत पण गावाला जायला,इमर्जन्सी साठी ठेवले आहेत...रात्री जेवण करीन मी...आत्ता भूक नाही"
"अरे कशाला जीवाला मारतो.. चल जाऊ.. हॉटेल मध्ये चांगली मिळते राईसप्लेट.."
दोघेही जेवलो...नंतर दुसऱ्या दिवशी मला म्हटला- "सर मला एक हजार देता का? गावाला जायचे आहे..माझ्याकडे आहेत पण कमी पडत आहेत. तुमचा अकाऊंट नंबर द्या..तुम्हाला तुमचे पैसे पाठवुन देईन नागपूरला पोचल्यावर !"
------------------------------------------------
बिचारा गरीब आहे..कदाचित नाही देणार हा पैसे, असं मनाशी ठरवून मी एक मदत म्हणून त्याला एक हजार दिले...
-----------------------------------------------
आज सकाळी त्याने एक हजार साठ रुपये जमा केले !
त्याला कॉल करून विचारले , " अरे मी तुला एक हजार दिले होते ना? तू साठ रुपये काय बोनस म्हणून दिलेस?".
हसत हसत बोलला," नाही हो सर..तुम्ही मला जेवू घातले होते ना? ती राईसप्लेट साठ रुपयांची होती ! ते पैसे दिले."
"अरे काय वेडा माणूस आहेस रे तू? ते पैसे द्यायची गरज काय होती?"
"तुम्ही माझ्या परिस्थितीकडे पाहून माझ्या गरिबीकडे पाहून मला ती मदत केली होती. मी जर हे पैसे परत केले नसते तर तुम्हाला वाटले असते, बघा हे लोक गरीब गरीब म्हणून असे लुबाडतात,फुकटचे खातात ! तुमचा असा कुठलाच गैरसमज होऊ नये म्हणून ते पैसे परत केले ! "
------------------------------------------------
अपघाताने आयुष्यात येणारे असे काही दिवस आणि असे काही लोक आपल्याला नेमका काय धडा देऊन जातील, हे कधीच सांगता येत नाही !
आवडल्यास जरूर शेअर करा

Yogesh Ram Atre

Address

Ashti

Alerts

Be the first to know and let us send you an email when Avdhut-अवधूत posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Avdhut-अवधूत:

Share