PustakNaka

PustakNaka असा नाका जिथं असतं ट्रॅफिक पुस्तकं आणि वाचकांचं...

पु.ल. देशपांडे    #पुलदेशपांडे  #वटपौर्णिमा
10/06/2025

पु.ल. देशपांडे

#पुलदेशपांडे #वटपौर्णिमा

नित्शे आणि वेडाचा झटका     मला काही दु:खांचं, वेदनांचं, शोकांतिकांचं आकर्षण नाहीय. अनेकदा माझ्या परिचयातील अनेकांना तसं ...
05/06/2025

नित्शे आणि वेडाचा झटका

मला काही दु:खांचं, वेदनांचं, शोकांतिकांचं आकर्षण नाहीय. अनेकदा माझ्या परिचयातील अनेकांना तसं माझ्याबद्दल वाटत राहतं. म्हणजे, हेमिंग्वेच्या आत्महत्येबद्दल मी कायम सांगत राहतो किंवा त्याच्या घरातल्याच इतर दोन आत्महत्यांबद्दल. किंवा मग सिल्व्हिया प्लाथनं ओव्हनमध्ये डोकं टाकून केलेल्या आत्महत्येबद्दल किंवा व्हर्जिनिया वुल्फनं नदीत हळूहळू सरत जात केलेल्या आत्महत्येबद्दल. किंवा मग आल्बेर काम्यूच्या काहींना विचित्र वाटणाऱ्या स्वभावाबद्दल. हे सगळं मला थोडं क्युरिएसिटीच्या पातळीवरच इंटरेस्टिंग वाटतं. मृत्यूबद्दल दु:ख आहे. आकर्षण नाहीय. हेमिंग्वे असो सिल्व्हिया असो किंवा व्हर्जिनिया असो, किंवा काम्यू असो, हे सगळे इंटेलेक्चुअली आणि क्रिएटिव्हिटीच्या पातळीवर कमाल माणसं होती. पण मग मनावरचे (खरंतर, मेंदूवरचेच. कारण मन नावाचा काही प्रकार नसतो. सगळं ओझं असतं ते मेंदूवरच. आपलीच सोय म्हणून मन नावाचा प्रकार वेगळा काढून, मेंदूच्या ताणाला काहीशी हुलकावणी दिलीय! असो.) हे आघात ही मंडळी का सहन करू शकली नसतील, असं काहीसं वाटून जातं. हेही असो. हाही एक वेगळ्याच चर्चेचा स्वतंत्र विषय आहे. नुकतेच हे पुस्तक वाचलं. हे म्हणजे, नित्शेवरंच. तेही याच कुतुहलातून.

खरं सांगू का, मला अशी पुस्तकं कमालीची आवडतात. मागे विशाखा पाटलांचं 'करून जावे असेही काही' वाचले. ते होते जॉर्ज ऑर्वेलवरचं. तेही असंच होतं. 'असंच' म्हणजे, लेखक किंवा विचारवंत त्यांचं कार्य आणि त्याचं आयुष्य यांचं समांतर नातं कसं राहिलं, हे मांडणारं पुस्तक. विशाखा पाटलांनी ऑर्वेलवरील पुस्तकात किती सुंदररित्या ऑर्वेलचं लेखन आणि त्याचं समांतर चाललेलं खाचखळग्यांचं आयुष्य मांडलंय. विश्वास पाटील या रत्नागिरीस्थित लेखकानं लिहिलेलं फ्रेडरिख नित्शेवरचं हे पुस्तक तसंच आहे. नित्शेचं आयुष्य आणि लेखन याचं समांतर चित्रण. (इथे 'रत्नागिरीस्थित लेखक' असं नमूद करण्याचं कारण, हे काही ते 'पानिपत'वाले विश्वास पाटील नाहीत, हे कळावे यासाठी!)

तर नित्शे माझ्या कुतुहलाच्या यादीतलाच तत्वज्ञ. त्यानं अफलातून मांडणी केलीय. पुढे त्याच्या मांडणीत सर्वच विचारधारांच्या अनुयायांनी आपापल्या विचारांना समर्थनीय काही सापडतं का, ते शोधलं. असला अफलातून नित्शे. म्हणजे, कुणी एक विचारधारा आपल्याला बाजूला त्याला खेचून घेत नाही. पण तो त्याची भूमिका घेऊन ठाम, निश्चित ठिकाणी मात्र उभा आहे.

नित्शेचं वैयक्तिक आयुष्य फार इंटरेस्टिंग होतं.

नित्शे १८४४ साली जन्मून १९०० साली मृत्यू पावला. म्हणजे, मोजून ५४ वर्षे जगला. मरणाआधीची त्याची १० वर्षे भ्रमिष्ट अवस्थेत गेली. १८८९ साली त्याला वेडाचा झटका आला. नित्शेच्या जन्मानंतर काही वर्षांनी त्याच्या वडिलांनाही भ्रमिष्टपणाचा झटका आला आणि त्यातच ते गेले.

नित्शे जेव्हा गेला, तेव्हा त्याच्या शरीराचं शवविच्छेदन झालं. त्याला अनुवांशिक काही आजार होता वगैरे असं काही नाही. पण वडिलांसारखाच त्यालाही वेडाचा झटका आला हे खरं.

नित्शे जेव्हा बोर्डिंग स्कूलमध्ये शिकत होता. तिथं एकदा शिक्षकांनी विद्यार्थ्यांना 'माझा आवडता कवी' यावर निबंध लिहायला सांगितला गेला. नित्शेनं फ्रेडरिख होल्डरलीन या कवीवर निबंध लिहिला. तेव्हा बहुतांश जर्मन लोक होल्डरलीनला ओळखत नव्हते किंवा त्याला मोठा कवी वगैरे मानतही नव्हते. शिक्षकानं काहीसा नकारात्मक शेराच नित्शेच्या या निबंधावर दिला.

पुढे होल्डरलीन हा जर्मनमधला गटेनंतरचा दुसरा सर्वात महान कवी म्हणून नावाजला गेला. विशेष म्हणजे, या होल्डरलीननं आयुष्याची शेवटची काही दशकं वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये घालवली.

नित्शे आणि वेडाचा झटका, असं काहीसं गूढ नातंच जणू होतं की काय, अशी शंका यावी, असं. नित्शे खरंच ट्रॅजिक फिलॉसॉफर होता. त्याच्याबद्दल, त्यानं मांडलेल्या विचारांबद्दल, त्यानं देव-धर्म-परंपरांवर उपस्थित केलेल्या प्रश्नांवरून त्याच्या कामाबद्दल कुतुहल वाटतं, आवाक् व्हायला होतं. जवळपास पाच दशकांचं आयुष्य, त्यातली शेवटची दहा वर्षे भ्रमिष्टावस्थेत, सुरुवातीची एक-दीड दशक अर्थातच बालपण-शिक्षण वगैरे. म्हणजे दोन-अडीच दशकात त्यानं केलेल्या कामाकडे पाहता, तो खऱ्या अर्थानं महान तत्वज्ञ होता!

मला व्यक्तिश: या पुस्तकामुळे नित्शेच्या मांडणीबद्दल अधिक नीट कळू शकलं. विशेषत: त्याचं वैयक्तिक आयुष्य, त्याच्या आयुष्यातील मित्रपरिवार, कुटुंब यांचं महत्त्वं, शाळा-कॉलेज-विद्यापीठं, त्याचं काम - असं सगळंच कळलं. नित्शेबद्दल अधिक वाचण्यासाठी प्रवृत्त करणारं हे पुस्तक आहे.

— नामदेव काटकर

तुझ्यापुढे तर काहीच नाही...Apurv Rajput
05/06/2025

तुझ्यापुढे तर काहीच नाही...

Apurv Rajput

सचिन तेंडुलकरला जेव्हा त्याच्या शेवटच्या, वेस्ट इंडीज विरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये सगळ्यांनी खांद्यावर घेऊन स्टेडियमभर फिर...
04/06/2025

सचिन तेंडुलकरला जेव्हा त्याच्या शेवटच्या, वेस्ट इंडीज विरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये सगळ्यांनी खांद्यावर घेऊन स्टेडियमभर फिरवलं होतं, तेव्हा घळाघळा डोळ्यांतून पाणी आलं होतं... अख्खं बालपण, कुमारवय सचिनची नक्कल करण्यात, किस्से सांगण्यात-ऐकण्यात आणि त्याच्या मॅचेस पाहण्यात गेलं होतं... त्यानंतर काल विराट कोहलीला रडताना पाहून पुन्हा डोळ्यांतून पाणी आलं... सचिनच्या निवृत्तीनंतर आता क्रिकेट पाहायचं कुणासाठी? असा जो मला (कदाचित माझ्या पिढीतल्या काहींनाही) प्रश्न पडला होता, तेव्हा त्याचं उत्तर मिळालं होतं – विराट कोहली!
सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव म्हटलं जायचं. अतिशयोक्तीचा भाग सोडला तरी, जेव्हा सचिन कव्हर ड्राइव्ह, स्ट्रेट ड्राइव्ह किंवा बॅक फूट पंच करायचा तेव्हा हा माणूस हे शॉट खेळतो तरी कसा, असा प्रश्न पडून काही क्षण वाटायचं की, निदान हे शॉट्स खेळताना तरी ‘अमानवीय’ असं काहीतरी त्याच्यात जागृत होत असलं पाहिजे. (नंतर त्याचा स्ट्रेट ड्राइव्ह म्हणजे जणू एक कविताच आहे असं वाटू लागलं!)
विराट सचिन नव्हता हे खरंच, त्याच्यात दोष होतेच/आहेत. (सचिनमध्येही होते. पण ते वेगळं प्रकरण होतं.) पण विराटने सराव, फिटनेस आणि प्रचंड मेहनत यांच्या जोरावर क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये वर्चस्व प्रस्थापित केलं आणि तो ‘किंग’ झाला. नुकतीच रोहितपाठोपाठ त्याने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तेव्हा फार वाईट वाटलं. त्याने अजून टेस्ट खेळायला पाहिजे असं अजूनही वाटतं... त्यालाही सचिनसारखाच टेस्टमधून निरोप मिळायला हवा होता, तो न मिळल्याने चुटपुट, रुखरुख लागून राहिली आणि सचिननंतर आता क्रिकेट कुणासाठी असा प्रश्न पडून जसं रितं वाटलं होतं, तसंच वाटलं... त्या रितेपणाला अजून तरी उत्तर मिळालं नाहीये, तो प्रश्न अजूनही टोचतोय... विराट जिथून उदयाला आला, पुढे किंग झाला, त्या आरसीबीने १८ वर्षांनी प्रथमच आयपीएल कप जिंकला. तेव्हा या टोचणीवर थोडीशी फुंकर घातली गेली... तरी तो प्रश्न आहेच... विराटनंतर कोण? कदाचित इंग्लंड दौऱ्यात उत्तर मिळेल!
द्रविड, गांगुली, कांबळी किंवा धोनी, रोहित, रहाणे असे अनेक गुणवान क्रिकेटर्स आहेत... पण सचिनचा नंबर पहिला, विराटचा दुसरा हे कायमच राहील, माझ्या मनात तरी... 🙂🙂

प्रणव सखदेव

अक्षरनामावरून साभार!स्पर्धा परीक्षांच्या कृष्णविवरातून बाहेर कसे पडावे, हे सांगणारा उत्कृष्ट आणि मार्गदर्शक संदर्भग्रंथ◼...
18/05/2025

अक्षरनामावरून साभार!

स्पर्धा परीक्षांच्या कृष्णविवरातून बाहेर कसे पडावे, हे सांगणारा उत्कृष्ट आणि मार्गदर्शक संदर्भग्रंथ

◼️ ‘मी अधिकारी - स्पर्धा परीक्षा : वास्तव, भवितव्य आणि दिशा’

◼️ लेखक – डॉ. ज्ञानेश्वर प्रकाश जाधवर

◼️ अभिप्राय लेखन – राहुल विद्या माने

अलीकडेच यूपीएससी म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा अंतिम निकाल जाहीर झाला. त्यात महाराष्ट्रातील मेंढपाळ समाजाचा बिरदेव ढोणे आणि मुस्लीम समाजातील एका रिक्षाचालकाची मुलगी आदीबा अनाम, हे उल्लेखनीय यशामुळे प्रकाशझोतात आले. इतर यशस्वी परीक्षार्थी उमेदवारांचेही कौतुक झाले, पण आपले समाजमन अजूनही अपयशी उमेदवारांचा संघर्ष, त्यांच्यासमोरील पुढील पर्याय आणि इतर सुसंगत बाबींवर का चर्चा करत नाही?

वर्षानुवर्षे यूपीएससी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत नाही, तर दिवसेंदिवस वाढतच आहे. परीक्षेचा अति ताण, वाढती बेरोजगारी, स्पर्धा परीक्षेत यशाने दिलेल्या हुलकावणीमुळे लांबलेले लग्न, पर्यायी रोजगार-उद्योग कौशल्ये नसणे आणि आपल्या बरोबरच्या मित्र-मैत्रिणी करिअरच्या वाटेत पुढे गेल्याने आलेला न्यूनगंड या सर्वांमुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी Depression HotSpot आणि Demographic Disaster बनले आहेत.

पुण्यातील एका खाजगी कोचिंग क्लासच्या सत्कार कार्यक्रमात आदीबा अनाम यांनी धाडसी मांडणी केली. तिचे भाषण राज्य वा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे निकाल जेव्हा लागतात, तेव्हा कसा विचार करावा, हे प्रसारमाध्यमे, कोचिंग क्लासेसवाले, जाहिरातदार, आणि भविष्यातील सोनेरी आयुष्याची खात्री पटल्याने आश्वस्त झालेले नातेवाईक, अशा सर्वांच्या डोळ्यात अंजन घालणारे होते.

गेली काही वर्षे नेमका हाच धागा पकडून मतपरिवर्तन करण्यासाठी बरेच जण बरेच जण झगडत आहेत. याच विषयावर डॉ. ज्ञानेश्वर प्रकाश जाधवर यांनी लिहिलेले ‘मी अधिकारी - स्पर्धा परीक्षा : वास्तव, भवितव्य आणि दिशा’ हे संशोधनात्मक पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. शीर्षकातूनच या पुस्तकामागची भूमिका स्पष्टपणे दिसते. हे पुस्तक स्पर्धा परीक्षेच्या कृष्णविवरावर प्रकाशझोत टाकून त्यातून बाहेर पडण्याचे दृष्टीकोन बदलाचे गुरुत्वाकर्षण बल वाढवण्याचे काम करते.

मुळात हा एक संशोधन प्रकल्प आहे. जे स्पर्धा परीक्षेत अपयशी ठरले, अशांच्या आयुष्यात आशा, प्रगतीचा शुभ्र प्रकाश कोणी आणला, त्या न मळलेल्या वाटांना समजून घेण्यासाठी हा प्रचंड मेहनतीने केलेला प्रयत्न आहे. अपयशामुळे सर्वांच्या उपेक्षेचे धनी झालेल्यांच्या निराशेवर फुंकर घालण्याचा हा कौतुकास्पद प्रयत्न आहे.

‘यशदा’चे अधिकारी बबन जोगदंड या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेत म्हणतात, “आतापर्यंत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कसा करावा? स्पर्धा परीक्षेचे स्वरूप, यशस्वी अधिकाऱ्यांच्या मुलाखती, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप यावरच पुस्तके प्रकाशित झाली आहेत; परंतु या पुस्तकांमध्ये स्पर्धा परीक्षेची वास्तविकता, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना घ्यावयाची काळजी, संघर्षातून यश मिळवलेल्या अधिकाऱ्यांच्या यशोगाथा, वाढती बेरोजगारी आणि पालकांची ढासळत चाललेली आर्थिक परिस्थिती, तरुणांचे मानसिक स्वास्थ्य, शारिरीक आजार, शासनयंत्रणेची भूमिका, स्पर्धा परीक्षेतील विविध नोकरीच्या संधी, वास्तवतेच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील दिशा, त्याचबरोबर परीक्षेचे स्वरूप, पद्धती, स्पर्धा परीक्षेचा इतिहास, प्रशासकीय यंत्रणेचा इतिहास असे अनेक पैलू या ग्रंथामध्ये संशोधनात्मक पद्धतीने मांडले आहेत.”

या ग्रंथाची मांडणी तीन भागांत केली आहे. पहिल्या भागात बऱ्यापैकी वस्तुनिष्ठ माहिती आहे. स्पर्धा परीक्षेची प्रक्रिया, जाहिरात, परीक्षा स्वरूप, अभ्यासक्रम, पदांची रचना, त्यातील आकडेवारी, त्यातील धोरणात्मक बदल-उत्क्रांती, संबंधित प्रशासकीय यंत्रणा, अशा बाबींची चर्चा आहे. याच अंगाने स्पर्धा परीक्षेतून भरल्या जाणाऱ्या पदांची आरक्षण व्यवस्था कशी आहे, याबद्दल विश्लेषण आहे. भाग दोनमध्ये स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांचे मानसिक स्वास्थ्य व वाढते शारिरीक आजार, पालकांची ढासळती आर्थिक परिस्थिती या विषयांचा ऊहापोह आहे. भाग तीनमध्ये बारावी आणि पदवीनंतरची शिक्षण व्यवस्था, रोजगार निर्मिती यंत्रणा, आर्थिक जगातील घडामोडी यांची चर्चा आहे.

या पुस्तकाची एक उल्लेखनीय बाजू म्हणजे या सगळ्या मुद्द्यांशी संबंधित धोरणे, आकडेवारी, व्यावहारिक मर्यादा यांची तार्किक दृष्टीकोनातून मांडणी केली आहे. पण जमेची बाजू म्हणजे स्पर्धा परीक्षेत अपयशी झाल्यानंतर खचून न जाता आपल्या आवडीच्या क्षेत्रात यशस्वी करियर करणाऱ्यांच्या यशोगाथा यात आहेत. ही कहाणी आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या, अपघातातून बरे होऊन नवीन वाट शोधलेल्या, अत्यंत गरिबीतून-उपासमारीतून-दारिद्रयातून बाहेर येऊन विजिगीषू जिद्दीने निराशेवर मात करून पुढे आलेल्या आणि आपला स्वतंत्र मार्ग शोधणाऱ्या लढवय्यांची आहे.

या पुस्तकाने प्रशासकीय अधिकारी पदांच्या पलीकडे जाऊन ‘अधिकारी’ या संकल्पनेला आव्हान दिले आहे. हे आव्हान ‘अधिकारी’ या शब्दाच्या लोकप्रिय अशा सत्ता-शक्ती संदर्भ असलेल्या आयामालासुद्धा आहे. लेखक ज्ञानेश्वर जाधवर म्हणतात, “ ‘अधिकारी’ ही संकल्पना शासनातील पद किंवा अधिकारांपुरती मर्यादित नाही. ती व्यक्तीच्या कर्तृत्वावर, योगदानावर आणि जिद्दीवर आधारित आहे. ती व्यक्ती कुठल्याही क्षेत्रांत कर्तृत्वाने समाजात आपली छाप निर्माण करणारा असतो. एखाद्या क्षेत्रात अधिकारी होण्यासाठी केवळ पदवी किंवा सरकारी मान्यता नव्हे तर आत्मविश्वास, चिकाटी आणि समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी योगदान महत्त्वाचे आहे.”

अलीकडेच यूपीएससी म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा अंतिम निकाल जाहीर झाला. त्यात महाराष्ट्रातील मेंढपाळ समाजाचा बिरदेव ढोणे आणि मुस्लीम समाजातील एका रिक्षाचालकाची मुलगी आदीबा अनाम, हे उल्लेखनीय यशामुळे प्रकाशझोतात आले. इतर यशस्वी परीक्षार्थी उमेदवारांचेही कौतुक झाले, पण आपले समाजमन अजूनही अपयशी उमेदवारांचा संघर्ष, त्यांच्यासमोरील पुढील पर्याय आणि इतर सुसंगत बाबींवर का चर्चा करत नाही?

वर्षानुवर्षे यूपीएससी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत नाही, तर दिवसेंदिवस वाढतच आहे. परीक्षेचा अति ताण, वाढती बेरोजगारी, स्पर्धा परीक्षेत यशाने दिलेल्या हुलकावणीमुळे लांबलेले लग्न, पर्यायी रोजगार-उद्योग कौशल्ये नसणे आणि आपल्या बरोबरच्या मित्र-मैत्रिणी करिअरच्या वाटेत पुढे गेल्याने आलेला न्यूनगंड या सर्वांमुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी Depression HotSpot आणि Demographic Disaster बनले आहेत.

पुण्यातील एका खाजगी कोचिंग क्लासच्या सत्कार कार्यक्रमात आदीबा अनाम यांनी धाडसी मांडणी केली. तिचे भाषण राज्य वा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे निकाल जेव्हा लागतात, तेव्हा कसा विचार करावा, हे प्रसारमाध्यमे, कोचिंग क्लासेसवाले, जाहिरातदार, आणि भविष्यातील सोनेरी आयुष्याची खात्री पटल्याने आश्वस्त झालेले नातेवाईक, अशा सर्वांच्या डोळ्यात अंजन घालणारे होते.

गेली काही वर्षे नेमका हाच धागा पकडून मतपरिवर्तन करण्यासाठी बरेच जण बरेच जण झगडत आहेत. याच विषयावर डॉ. ज्ञानेश्वर प्रकाश जाधवर यांनी लिहिलेले ‘मी अधिकारी - स्पर्धा परीक्षा : वास्तव, भवितव्य आणि दिशा’ हे संशोधनात्मक पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. शीर्षकातूनच या पुस्तकामागची भूमिका स्पष्टपणे दिसते. हे पुस्तक स्पर्धा परीक्षेच्या कृष्णविवरावर प्रकाशझोत टाकून त्यातून बाहेर पडण्याचे दृष्टीकोन बदलाचे गुरुत्वाकर्षण बल वाढवण्याचे काम करते.

मुळात हा एक संशोधन प्रकल्प आहे. जे स्पर्धा परीक्षेत अपयशी ठरले, अशांच्या आयुष्यात आशा, प्रगतीचा शुभ्र प्रकाश कोणी आणला, त्या न मळलेल्या वाटांना समजून घेण्यासाठी हा प्रचंड मेहनतीने केलेला प्रयत्न आहे. अपयशामुळे सर्वांच्या उपेक्षेचे धनी झालेल्यांच्या निराशेवर फुंकर घालण्याचा हा कौतुकास्पद प्रयत्न आहे.

‘यशदा’चे अधिकारी बबन जोगदंड या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेत म्हणतात, “आतापर्यंत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कसा करावा? स्पर्धा परीक्षेचे स्वरूप, यशस्वी अधिकाऱ्यांच्या मुलाखती, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप यावरच पुस्तके प्रकाशित झाली आहेत; परंतु या पुस्तकांमध्ये स्पर्धा परीक्षेची वास्तविकता, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना घ्यावयाची काळजी, संघर्षातून यश मिळवलेल्या अधिकाऱ्यांच्या यशोगाथा, वाढती बेरोजगारी आणि पालकांची ढासळत चाललेली आर्थिक परिस्थिती, तरुणांचे मानसिक स्वास्थ्य, शारिरीक आजार, शासनयंत्रणेची भूमिका, स्पर्धा परीक्षेतील विविध नोकरीच्या संधी, वास्तवतेच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील दिशा, त्याचबरोबर परीक्षेचे स्वरूप, पद्धती, स्पर्धा परीक्षेचा इतिहास, प्रशासकीय यंत्रणेचा इतिहास असे अनेक पैलू या ग्रंथामध्ये संशोधनात्मक पद्धतीने मांडले आहेत.”

या ग्रंथाची मांडणी तीन भागांत केली आहे. पहिल्या भागात बऱ्यापैकी वस्तुनिष्ठ माहिती आहे. स्पर्धा परीक्षेची प्रक्रिया, जाहिरात, परीक्षा स्वरूप, अभ्यासक्रम, पदांची रचना, त्यातील आकडेवारी, त्यातील धोरणात्मक बदल-उत्क्रांती, संबंधित प्रशासकीय यंत्रणा, अशा बाबींची चर्चा आहे. याच अंगाने स्पर्धा परीक्षेतून भरल्या जाणाऱ्या पदांची आरक्षण व्यवस्था कशी आहे, याबद्दल विश्लेषण आहे. भाग दोनमध्ये स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांचे मानसिक स्वास्थ्य व वाढते शारिरीक आजार, पालकांची ढासळती आर्थिक परिस्थिती या विषयांचा ऊहापोह आहे. भाग तीनमध्ये बारावी आणि पदवीनंतरची शिक्षण व्यवस्था, रोजगार निर्मिती यंत्रणा, आर्थिक जगातील घडामोडी यांची चर्चा आहे.

या पुस्तकाची एक उल्लेखनीय बाजू म्हणजे या सगळ्या मुद्द्यांशी संबंधित धोरणे, आकडेवारी, व्यावहारिक मर्यादा यांची तार्किक दृष्टीकोनातून मांडणी केली आहे. पण जमेची बाजू म्हणजे स्पर्धा परीक्षेत अपयशी झाल्यानंतर खचून न जाता आपल्या आवडीच्या क्षेत्रात यशस्वी करियर करणाऱ्यांच्या यशोगाथा यात आहेत. ही कहाणी आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या, अपघातातून बरे होऊन नवीन वाट शोधलेल्या, अत्यंत गरिबीतून-उपासमारीतून-दारिद्रयातून बाहेर येऊन विजिगीषू जिद्दीने निराशेवर मात करून पुढे आलेल्या आणि आपला स्वतंत्र मार्ग शोधणाऱ्या लढवय्यांची आहे.

या पुस्तकाने प्रशासकीय अधिकारी पदांच्या पलीकडे जाऊन ‘अधिकारी’ या संकल्पनेला आव्हान दिले आहे. हे आव्हान ‘अधिकारी’ या शब्दाच्या लोकप्रिय अशा सत्ता-शक्ती संदर्भ असलेल्या आयामालासुद्धा आहे. लेखक ज्ञानेश्वर जाधवर म्हणतात, “ ‘अधिकारी’ ही संकल्पना शासनातील पद किंवा अधिकारांपुरती मर्यादित नाही. ती व्यक्तीच्या कर्तृत्वावर, योगदानावर आणि जिद्दीवर आधारित आहे. ती व्यक्ती कुठल्याही क्षेत्रांत कर्तृत्वाने समाजात आपली छाप निर्माण करणारा असतो. एखाद्या क्षेत्रात अधिकारी होण्यासाठी केवळ पदवी किंवा सरकारी मान्यता नव्हे तर आत्मविश्वास, चिकाटी आणि समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी योगदान महत्त्वाचे आहे.”

असे योगदान दिलेल्या काहींचे अल्प-चरित्र या पुस्तकात आहेत. संगीता जाधव या तरुणीने सेंद्रिय शेतीमध्ये केलेले काम, रमेश गुरव यांनी ग्रामीण भागात डिजिटल शिक्षणाचे केलेले काम, सिताफळाच्या विविध जातींचा विकास करणारे डॉ. कस्पटे, शेती पूरक उद्योजक बनलेले श्रीकांत घोरपडे, ग्रामीण भागातील लोककलेला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणाऱ्या नेहा कुलकर्णी, मनोरंजन क्षेत्रातील यूट्यूबर जीवन आघाव, मीडिया मॅनेजमेंट क्षेत्रात यश मिळवलेले नयन गुरव, ग्रंथालय सुरू करणारे प्रेरित कोठारी, रंगभूमी हेच करिअर बनवलेल्या पलाश शरद हसे, ग्रामीण भागात मोठे मॉल उभे करणारे विक्रांत पवार, शेअर बाजारात यशस्वी करिअर करणारे संकेत कदम व अक्षय भिसे, फॅशन डिझाईनमध्ये यश मिळवलेल्या कविता माळी, उद्योजगता कौशल्य केंद्र सुरू करणाऱ्या मेघा पवार, ग्रीनहाऊस शेतीमध्ये यश मिळवलेले मनोहर पाटील, कृषि उद्योजक बनलेले सचिन गायकवाड, सुरक्षा सेवा पुरवणारी मोठी कंपनी चालवणारे रणजित पाटील, स्पर्धा परीक्षेच्या मुलांच्या प्रश्नांसाठी काम करणारे महेश बडे आणि याच विषयावर ‘वास्तव कट्टा’ हे यू-ट्युब चॅनेल चालवणारे किरण निंभोरे, या तरुणांच्या यशोगाथा या पुस्तकात आहेत.

या सर्वांनी वेळोवेळी स्पर्धा परीक्षा दिलेली आहे, पण अपयशाने खचून न जाता त्यांनी मोठ्या जिद्दीने आपल्या आवडीच्या क्षेत्रात उडी घेऊन तिथे जम बसवला. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना मिळवलेले ज्ञान, दृष्टीकोन व कौशल्ये यांचा व्यावसायिक क्षेत्रात यश मिळवण्यासाठी प्रचंड उपयोग झाला, हे अभिमानाने सांगायला ते विसरत नाहीत.

दुसऱ्या बाजूला संघर्ष करून स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांची लघुचरित्रे या पुस्तकात आली आहेत. तेजस्वी सातपुते, रमेश घोलप, ओंकार पवार, तृप्ती धोडमिसे, अभयसिंह मोहिते, सोनूल कोतवाल, गंगाधर हावळे, राजेंद्र कचरे, प्रमोद चौगुले, सुरेखा भणगे, पीयूष चिवंडे, डॉ. आर. बी. पवार अशा अधिकाऱ्यांचा परिचय आहे. हे सर्व अधिकारी गरीब परिस्थितीतून आलेले आहेत. त्यांचे म्हणणे असे आहे की, फक्त लाल दिवा आणि पैसा, पद, प्रतिष्ठा यासाठी तुम्ही या क्षेत्रांत येऊ नका. तुम्हाला या क्षेत्रातील कामाची आव्हाने खुणावत असतील आणि या कामाच्या माध्यमातून जर तुम्ही समाजासाठी काही करू इच्छित असाल, तर नक्की या.

स्पर्धा परीक्षेतल्या अपयशानंतर पॅरा-ऑलिम्पिकमध्ये यश मिळवलेल्या सचिन खिलारीचे उदाहरण खूपच समर्पक आहे. सचिनचा जन्म पश्चिम महाराष्ट्रातला दुष्काळी भाग आटपाडीत झाला. खडतर परिस्थितीत त्याने इंजिनियरिंगची पदवी मिळवली. एका अपघातात सायकलवरून पडल्याने तो गंभीर जखमी झाला आणि त्याला एक पाय गमवावा लागला. त्यानंतर त्याने अनेक वेळा स्पर्धा परीक्षा दिल्या, परंतु त्याला यश मिळाले नाही. मधल्या काळात त्याने शिकवणी घेण्याचे कामसुद्धा केले. मग त्याने हळूहळू आपल्या खेळाच्या आवडीला जोपासत वेगवेगळ्या स्पर्धांतून सहभाग घेतला आणि अनेक अडचणींवर मात करत आपले करिअर घडवले. तो म्हणतो, “संघर्ष हाच यशाचा पाया आहे. तरुणांनी स्वत:ला विचारलं पाहिजे की, आपण काहीतरी करत आहोत का? जर एक क्षेत्र जमत नसेल तर दुसऱ्या क्षेत्रांत स्वत:ला सिद्ध करा.”

सुशील काटकर या तरुणाने स्पर्धा परीक्षेमधील प्रयत्नानंतर पुण्यात ‘होय मी एमपीएससीकर काटकर बंधू’ या नावाने पोह्याचे दुकान टाकले. उमेश घाडगे या तरुणाने हॉस्टेल व्यवसायात यशस्वी जम बसवला. अभिषेक पर्वतेने मेन्स पार्लर सुरू केले. प्रेरित कोठारीने ‘ग्लोबल स्टडी रूम’ नावाच्या अभ्यासिका सुरू केल्या. नेहा पाटीलने महाराष्ट्रियन, पंजाबी, चायनीज आणि इटालियन खाद्यपदार्थ बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. प्रवीण कदमने आरोग्य व्यवस्थापन क्षेत्राचे आधुनिक ज्ञान-कौशल्य घेऊन गावात आरोग्य सेवा व मार्गदर्शन देणारे आधुनिक केंद्र सुरू केले. अंजली जाधवने तिच्या गावी महिलांना संघटित करून बचत गट व इतर उपक्रमाद्वारे महिलांच्या स्वावलंबनासाठी कौशल्य विकास मार्गदर्शन केंद्र सुरू केले.

अमोल अवचिते बातमीदार बनला. विशाल ठाकरे यशस्वी वकील व माहिती अधिकाराचा यशस्वी वापर करणारा सामाजिक कार्यकर्ता बनला. नेहा जोशीने अत्यंत अवघड असे सांख्यिकी विश्लेषण अभ्यासक्रम पूर्ण करून विदा विश्लेषक (डेटा सायंटिस्ट) म्हणून मोठी झेप घेतली. पांडुरंग शिंदे आणि बालाजी गाडे यांनी आश्वासक राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. दुर्गम भागात मेंढपाळ कुटुंबात वाढलेल्या सौरभ हाटकर याने यू.के.च्या स्कॉटलंड येथील एडिनबर्ग विद्यापीठ मध्ये पीएच.डी. संशोधन करण्यापर्यंत मोठी मजल मारली आणि ज्ञानाच्या क्षेत्रात आपले नाव मोठे केले. हे करण्याच्या प्रवासात त्याने धनगर समाजाच्या आर्थिक व सामाजिक प्रगती व हक्कांसाठी मोठे योगदान दिले.

या सर्वांचे एकच कळकळीचे सांगणे आहे की, स्पर्धा परीक्षेतील असू दे किंवा कोणत्याही क्षेत्रातील अपयश असू दे, ही एक संधी असते आणि या संधीतूनच पुढच्या वाटा खुल्या होत असतात.

स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रे, नोकरी-उद्योगजगत, यांबद्दल युवक-युवतींचा व्यावसायिक कल घेऊन मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्ती, नेतृत्त्व व व्यक्तिमत्त्व विकास, यावर काम करणारे प्रशिक्षक, अशा अनेकांशी चर्चा करून आजकालचे विद्यार्थी कोणत्या दिशेने वाटचाल करत आहेत, यावरही लेखकाने प्रकाश टाकला आहे.

स्पर्धा परीक्षा सोडून इतर कोणत्याकोणत्या व्यवसायात करिअर घडवून आयुष्य जगू शकतो, याची भरगच्च माहिती, ही या पुस्तकाची महत्त्वाची ओळख आहे.

#पुस्तक #अभिप्राय

🔰 पुस्तक परिचय📙  अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट - आनंद विंगकर◼️◼️बारावीनंतर यशवंताचं शिक्षण सुटलं, तो शेतीत गुंतला, त्...
17/05/2025

🔰 पुस्तक परिचय

📙 अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट

- आनंद विंगकर

◼️◼️

बारावीनंतर यशवंताचं शिक्षण सुटलं, तो शेतीत गुंतला, त्याचं लग्नही झालं. त्याला मुलाची हौस. वंशाला दिवा हवा. त्याचं दुसरं अपत्य मुलगा होतं पण ते जगलं नाही. तीन मुली मात्र जगल्या. मुलासाठी त्याने बायकोची तीन ॲबाॅर्शनं केली. "पोरापायी बायकोचा जीव घेशीन" असं कुणीतरी सांगितल्याने यशवंताने नाईलाजाने फॅक्टरी बंद केली.

तीन पोरींचं लेंढार कसं वाढवायचं? त्यांची लग्न कशी करायची? एवढं सगळं करता करता मी खड्ड्यात जाणार! त्यापेक्षा पोरींना घेऊन बायकोनं तोंड काळं केलेलं बरं! यशवंता बायकोला हाकलून देतो. जबाबदारीपासून पळण्याची वृत्ती त्याच्यात निपजू लागते. दोन महिने उलटतात. भाकर-तुकडा घालायला कुणी नसल्याने तो बायकोला परत आणतो.

शेतीला हक्काचं पाणी मिळावं त्याने वगळाला बोअर मारला. तिथून दुसऱ्या वावरापर्यंत पाईपलाईन नेली. त्यासाठी पतसंस्थेचं, बँकेचं, सावकाराचं कर्ज केलं. पुढे शेजारच्या शेतकऱ्यांनीही वगळाला बोअर मारल्या. आता पाणी कुणाच्या आणि किती वाट्याला येणार?

शेती यशवंताच्या अंगावर येऊ लागली. उरावरचं कर्ज वाढू लागलं.

यशवंताचा धाकटा भाऊ विश्वास. यशवंताच्या त्यागामुळे तो शिकला, शहरात गेला, नोकरीला लागला. लग्नानंतर एकाच मुलावर ऑपरेशन करून विश्वास टाकटुकीत संसार करू लागला.

दोन भावांच्या जगण्यातला हा मूलभूत फरक.

काळ पुढे सरकतो. यशवंतांच्या मुली मोठ्या होतात. पण त्याची परिस्थिती सुधारत नाही. यशवंतासारखा शेतकरी स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतो आणि परिस्थितीला दोष देतो.

या वेळी यशवंताला सुगी लाभली. शाळवाची कणसं टम्म फुगली. गव्हाला चांगली झड लागली. धान्याचा बाजारही जोरात होता. धान्य आणि कडबा विकून वीस-पंचवीस हजार उभे करायचे आणि सावकाराचा पहिला खटका मिटवायचा.

यशवंताकडं तीनच जनावरं. म्हैस, शेरडी आणि बोकड. त्यातला बोकड विकून बायकोसाठी हजार-पंधराशे उभे करायचे होते. त्या दिवशी शाळू काढून वावरात टाकला. दुसऱ्या दिवशी कणसं खुडायला सुरुवात करायची होती.

अचानक कुठून आलेल्या बांड्या कुत्र्याने यशवंताच्या बोकडाची मान धरून त्याला ओढत नेलं. त्यात बोकडाचा जीव गेला. संतापलेल्या यशवंताने कुत्र्याच्या पेकटात दगड घातला. मार खाल्लेला कुत्रा केकाटत निघून गेला. पण यशवंता त्या कुत्र्याला इतक्या सहज सोडणार नव्हता.

यशवंताने मेलेला बोकड आडवा-तिडवा चिरला. जखमांत कापसावर टाकायचं कीटकनाशक भरलं. आता हा बोकड वगळीत नेऊन टाकला की बांड्याच काय, गावातली सगळी कुत्री बोकडाला तोंड लावून उलथणार!

उषा यशवंताची थोरली मुलगी. ती शेतातली, घरातली इतकी कामं उपसायची की यशवंता तिला 'पोरगा' म्हणायचा. बारावीनंतर उषाचा डीएडला नंबर लागला नाही म्हणून तिला घरी बसवलं गेलं. उषाच्या जागी मुलगा असता तर यशवंताने जमीन विकून पोराला शिकवलं असतं!

खूप वर्षांपूर्वी कर्नाटकातून एक गरीब कानडी कुटुंब गावात राहायला आलं. यशवंताने त्या बाईला 'काढून आणून' तिच्या कुटुंबाची त्याच्याच गोठ्यावर राहायची सोय केली. कानड्यांचा पोरगा सुभाष उषाबरोबर मोठा झाला. तो तिच्यापेक्षा चार वर्षांनी मोठा. सुभाष-उषाचं एकमेकांवर प्रेम बसलं. वयात आलेल्या मुलीकडे 'समवयस्क मुलाला देण्यासारखं जे काही असतं' ते सर्व उषाने सुभाषला देऊन टाकलं. त्यानेही ते हक्काने घेतलं.

कॉलेज संपवून सुभाष मिलिटरीत भरती झाला. उषाच्या घरचे लग्नाला परवानगी देणार नाही म्हणून तो सुट्टीला आल्यावर दोघांनी पळून जाऊन लग्न करायचं ठरवलं.

सया यशवंताचा शेजारी आणि दोस्तही. एखाद्या देखण्या पोरीचं त्याच्याकडं बघून हसणं किंवा एखाद्या तरूण विधवेने 'त्या आशेने' त्याच्या रानात राबायला येणं या गोष्टी सयाच्या आकलणापलीकडे असतात. अंगावर आलेली बाई सयाला समजत नाही असं नाही. पण त्याला एड्सची भीती वाटते. त्याला उष्टावळही नको असते. लग्न करून जिवंत झरा मिळाल्यानंतरच तो शारीरिक सुखाचा आनंद लुटणार असतो.

सयाचं लग्न होऊन दोन-तीन दिवस होतात. लग्नानंतरची पूजाही होते. आज रात्री त्याची पोरगेली बायको शेजारी झोपणार असते. कधी एकदा रात्र होतेय असं सयाला होतं.

त्या रात्री आकाश काळ्याकुट्ट ढगांनी भरून येतं. सुगीच्या दिवसात कसला पाऊस पडतोय? कुठून तरी वारं येईल आणि ढगांना घेऊन जाईल! पण वारं येत नाही आणि ढगही जात नाहीत. रात्री अंधाऱ्या आकाशात विजा कडाडतात आणि धोधो पावसाला सुरुवात होते.

अवकाळी पावसाच्या त्या रात्री यशवंताला झोप येत नाही. गावातल्या कुत्र्यांना मारून टाकण्यासाठी आपण बोकडाच्या शरीरात कीटकनाशक भरून ठेवल्यामुळे तर हा पाऊस पडत नाही? आजच्या पावसाने यशवंताच्या शाळवाच्या कणसांना कोंब फुटणार असतात. सावकाराचं कर्ज फेडण्याच्या त्याच्या पहिल्या प्रयत्नावर पाणी पडणार असतं.

त्या रात्री सया अंथरुणात त्याच्या अल्पवयीन बायकोशेजारी पडतो. सयाने 'आंड कापून लैंगिक भावना संपवलेला' त्याचा काळा कुत्रा रातभर ओरडतो. पहिल्या रात्रीच्या भीतीने घाबरून दोन्ही पायांना आढी घालून कोपऱ्यात पडलेली बायको सयाला जवळ येऊ देत नाही.

आपली मोठी बहिण उषा सकाळी सुभाषबरोबर पळून जाणार हे यशवंताच्या धाकटीला समजतं.

दुसरा दिवस उजाडतो. रात्रीच्या अवकाळी पावसाने झालेल्या शेतीच्या नुकसानाचा विचार कुणीच करत नाही. कारण त्यांच्यासमोर दुसरेच प्रश्न उभे राहतात. गावात जिकडं पहावं तिकडं कुत्री आणि कावळे मरून पडलेले. बैलगाड्या भरून ते सगळं ओढ्याला नेऊन टाकलं नाही तर गावात असह्य दुर्गंधी पसरणार असते.

निष्पाप कुत्र्या-कावळ्यांचा जीव घेणाऱ्या यशवंताला काय शिक्षा मिळेल? यशवंताचा सातबारा घेऊन गावात फिरणारा शंकर सावकार त्याची जमीन बळकावेल का? उषा सुभाषच्या लग्नाचं काय? सयाची कमी वयाची बायको दहावीची परीक्षा देईल का? प्रश्न अनेक आहेत आणि त्यांच्या उत्तरासाठी 'अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट' वाचायला हवी.

पुस्तक परिचय - विजय निंबाळकर
लोहगाव, पुणे ४१००४७

◼️◼️

🌻
29/04/2025

🌻

जे वाचन करत असतात ते भेटले की एकमेकांना विचारतात, "मग सध्या काय वाचतोयस? नवीन काही वेगळं किंवा चांगलं वाचनात आलंय का?" म...
23/04/2025

जे वाचन करत असतात ते भेटले की एकमेकांना विचारतात, "मग सध्या काय वाचतोयस? नवीन काही वेगळं किंवा चांगलं वाचनात आलंय का?" मग त्यांच्या पुस्तक-गप्पा रंगत जातात!

जो काहीच वाचत नसतो तो नेहमी कुरकुर करतो की, "आजकाल लोक काहीच वाचत नाहीत!"
त्याच्या अवती भवती तसेच वाचनद्वेष्टे वा वाचनाची गोडी नसलेले गोळा झालेले असतात! अशी माणसं भेटली की ते कधीच वाचनाविषयी पुस्तकाविषयी चकार शब्द काढत नाहीत. कारण त्यांच्या लेखी कुणी म्हणजे कुणीच काहीच वाचत नसतं!

एखादा पुस्तक वाचत बसलेला असतो, इतक्यात कुणीतरी त्याला हाक मारतो नि काम सांगतो. तो हालत नाही. पुन्हा तिकडून आवाज येतो, "नुसताच रिकामा बसून आहेस, एक काम करशील तर झिजशील का?"
वाचणाऱ्याला लोक खूप हलक्यात घेतात कारण कित्येकांना वाचनाचे मूल्य ठाऊक नसते!

मग ते येतात जे म्हणतात की, "आम्ही पुस्तक वाचत नाही, माणसं वाचतो! आम्हाला पुस्तकं वाचण्याची गरजच काय!"

मात्र काही असेही असतात की, ज्यांच्या पोटाची भ्रांत इतकी दाहक असते की पुस्तक वाचन ही त्यांच्यासाठी चैन ठरावी! काम नसलेले उपाशी पोटीचे विवंचनाग्रस्त हात पुस्तकं कसे काय हाती धरतील हा मुद्दा काही अंशी पटतो. त्यासाठी काहीतरी भरीव करायला हवं! असो!

जागतिक ग्रंथ दिवसाच्या शुभेच्छा!

- समीर गायकवाड

#मराठी #पुस्तक

☕❣️
19/04/2025

☕❣️

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त...बाबासाहेब,तुमच्या आयुष्याचा हिशोब मला लागत नाही.... (हेरंबकुलकर्णी)उणेपूरे मिळालेले...
14/04/2025

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त...
बाबासाहेब,तुमच्या आयुष्याचा हिशोब मला लागत नाही.... (हेरंबकुलकर्णी)

उणेपूरे मिळालेले ६५ वर्षांचे आयुष्य
त्यात ३० वर्षे शिक्षणात
आणि १९४६ नंतरचा काळ,
दिल्लीत व्यस्त राहीलेला...

अवघी २५ वर्षे मिळाली बाबासाहेबाना
चळवळ आणि लेखनाला...
त्यात तब्येतीची अजिबात साथ नाही.
इतक्या थोड्या काळात हा माणूस
नियतकालिके चालवतो,
२३ ग्रंथ लिहितो,
शेकडो लेख लिहून
भाषणे करत राहतो...

मनुस्मृती दहन,
चवदार तळे,
काळाराम मंदिर आंदोलन,
शिक्षणसंस्था स्थापना,
राजकीय पक्ष स्थापन करून निवडणुका,
गोलमेज परिषद
आणि हजारो मैलांचा प्रवास...
वाचन लेखनावरची पकड सुटू न देता...

हे सारे सारे तुम्ही ,कसे जमवले असेल ,बाबासाहेब ?
याचा हिशोब मला लागत नाही...

आजच्या नेत्यांसारखे विमान,हेलिकॉप्टर हाताशी नाही
मिडिया,इलेक्ट्रॉनिक मिडियामधून पोहोचणे नाही,
अनुयायांना संदेश द्यायला Whatsapp नाही
की बोलायला फोन नाही...

खडबडीत रस्ते आणि रेल्वेतून
गावकुसाबाहेरच्या
त्या नॉट रिचेबल वस्त्यावस्त्यावर
कसे वेगाने पोहोचले असतील बाबासाहेब ?

कसे पोहोचत असतील त्यांचे संदेश आंदोलनाचे,
खेडी सोडण्याचे
आणि पोरांना शिकवण्याचे...
पुन्हा ज्यांच्याशी संवाद करायचा,
ती सारी माणसे
टेक्नोसॅव्ही नसणारी...
फाटकी,निरक्षर,अन्यायाने पिचलेली, भेदरलेली...

त्यांना समजेल अशा भाषेत हा पदवी घेतलेला कायदेपंडित कोणत्या
सुगम भाषेत बोलला असेल...?
की
ज्या शब्दांनी गावच्या पाटलासमोर नजर वर न करणारी माणसे
थेट व्यवस्थेची गचांडी पकडू शकली.....

न बघितलेल्या या माणसावर कशी श्रद्धा निर्माण झाली असेल ?
त्या खेड्यापाड्यातील माणसांची....?

नुसत्या टाइम मॅनेजमेंट साठी तुमचा अभ्यास करायला हवा बाबासाहेब,
आणि माणसांपर्यंत पोहोण्यासाठी वापरलेल्या तुमच्या पद्धती समजून घ्यायला
हव्यात
कारण आज सगळी साधने हाताशी असूनही
आम्ही गावकुसाबाहेरच्या माणसांपासून अनरिचेबल आहोत...
कोसो दूर....

हेरंब कुलकर्णी
__________________________

( हेरंब कुलकर्णी यांच्या 'अस्वस्थ क्षणांच्या नोंदी' या कवितासंग्रहातली ही कविता.)

Address

सातारा
सातारा

Telephone

+918767638724

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when PustakNaka posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to PustakNaka:

Share