PustakNaka

PustakNaka असा नाका जिथं असतं ट्रॅफिक पुस्तकं आणि वाचकांचं...

वाचनाने घडलेली माणसं – आणि आपल्यासाठी एक प्रेरणादायी संग्राहअनेक क्षेत्रांतील मान्यवरांनी – लेखक, अधिकारी, राजकारणी, अभि...
17/08/2025

वाचनाने घडलेली माणसं – आणि आपल्यासाठी एक प्रेरणादायी संग्राह

अनेक क्षेत्रांतील मान्यवरांनी – लेखक, अधिकारी, राजकारणी, अभिनेते, समाजसुधारक, उद्योजक – आपल्या आयुष्यात वाचनाने कसे क्रांतिकारी बदल घडवले, हे त्यांनी आपल्या लेखनातून अधोरेखित केले आहे. त्यांच्या अनुभवांतून एक गोष्ट ठळकपणे समोर येते – वाचन ही एक सवय नसून, एक transformative शक्ती आहे.

सचिन नामदेव म्हसे यांनी संकलित केलेले "आम्ही घडलो वाचनाने" हे पुस्तक म्हणजे अशा प्रेरणादायी लेखांचा अमूल्य संग्रह आहे. प्रत्येक लेख वेगळा, प्रत्येक अनुभव हटके – पण सर्वांचा केंद्रबिंदू एकच: वाचन.

हे पुस्तक वाचताना तुम्ही अनेक गोष्टी शिकाल, अनुभवाल, आणि सर्वात महत्त्वाचं – अंतर्मुख व्हाल. या पुस्तकाच्या सुरुवातीला तुमचा दृष्टिकोन काही असेल, तरी अखेरीस तुम्ही अधिक सजग, समजूतदार आणि वाचनासाठी प्रेरित झालेला एक नवा व्यक्ती असाल, याची खात्री बाळगा.

मानवाच्या इतिहासातील पुस्तकाचा शोध हा एक मूलभूत टप्पा आहे. जोवर माणसाला जाणून घेण्याची, शिकण्याची आणि समृद्ध होण्याची आस आहे, तोवर पुस्तकाचं अस्तित्व अमर आहे. पण या अमरतेचा प्रत्यक्ष लाभ घ्यायचा असेल, तर कुठूनतरी सुरुवात करावीच लागेल – आणि ती सुरुवात हे पुस्तक होऊ शकतं.

आपलंही आयुष्य वाचनाने बदलावं, आपल्यालाही असेच प्रेरणादायी अनुभव गाठीशी असावेत, यासाठी "आम्ही घडलो वाचनाने" हे पुस्तक एकदा तरी अवश्य वाचा.

-- निलाक्षी काळे - सालके
संस्थापिका, मातृगंध पुणे

#पुस्तकांवरचीपुस्तके

किताबे पढने वाले लडके... ✨   #बुक्स
13/08/2025

किताबे पढने वाले लडके... ✨


#बुक्स

रिंगण!❤️संतांच्या कार्याचा मागोवा घेणारा, आपली मुळं शोधणारा, तरुणाईची भाषा बोलणारा, वाचायलाच पाहिजे असा विशेषांक.Art - A...
02/08/2025

रिंगण!❤️

संतांच्या कार्याचा मागोवा घेणारा, आपली मुळं शोधणारा, तरुणाईची भाषा बोलणारा, वाचायलाच पाहिजे असा विशेषांक.

Art - Anagha Pandit

#रिंगण #संत , , #वाचन

विक्रीसाठी उपलब्ध!PustakNaka
01/08/2025

विक्रीसाठी उपलब्ध!

PustakNaka

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे का महत्वाचे आहेत..? अण्णाभाऊ साठे मला खूप महत्वाचे वाटतात कारण -१) चारभिंतीच्या शाळेत न जाताही सम...
01/08/2025

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे का महत्वाचे आहेत..?

अण्णाभाऊ साठे मला खूप महत्वाचे वाटतात कारण -
१) चारभिंतीच्या शाळेत न जाताही समाजाच्या शाळेतील शिक्षण किती प्रभावी असते हा आत्मविश्वास त्यांनी दिला.

२) सामाजिक चळवळीत फक्त बौद्धिक काथ्याकूट व तात्विक चर्चा न करता तोच आशय, प्रश्न कलेच्या माध्यमातून सामान्य माणसासमोर मांडून त्यांना चळवळीशी जोडता येते हे प्रारूप कार्यकर्त्याना त्यांनी शिकवले.

३) एखादे आंदोलन प्रभावी व्हायचे असेल तर त्या आंदोलनासाठी साहित्य निर्माण व्हावे लागते त्यातून ते आंदोलन अधिक सघन होते. अण्णाभाऊ च्या मांडणीतून आंदोलनांना टोक यायला मदत झाली.

४) मध्यमवर्गीय जगाला खरेच खेड्यापाड्यातले दलित, वंचित कसे जगतात ? हे माहीत नसणे स्वाभाविक असते.अण्णाभाऊंनी केवळ आकडेवारी न मांडता त्या वंचित माणसांची व्यक्तिचित्र आणि जीवनसंघर्ष मांडला.कोणतीही शेरेबाजी न करता त्यांनी दाहक जगणं मांडलं त्यातून मध्यमवर्गात व बोलक्या वर्गात जागृती निर्माण झाली.

५) लेखकांनी समाजभान कसे जपले पाहिजे याचे अण्णाभाऊ वस्तुपाठ ठरले. दलितांच्या उपेक्षितांच्या वेदनेवर लेखन करत पुरस्कारांचे पीक काढणारे लेखक खूप झाले पण ते लिहून थांबतात पण अण्णाभाऊ लिहिता लिहिता काम करत होते आणि काम करता करता लिहीत होते..लेखकांसाठी बांधिलकी म्हणजे काय ? हे त्यांनी जगण्यातून दाखवून दिले...

६) तमाशा,वगनाट्य,कलापथक,लोकगीते या पारंपरिक कलाप्रकारांना अण्णाभाऊ यांनी डाव्या चळवळीचा आशय दिला...त्यांना मनोरंजन मूल्यापलीकडे दाहक जीवनआशय देत प्रबोधनाचे साधन म्हणून पुन्हा पुन्हा अधोरेखित केले...

७) मध्यमवर्गीय साहित्याच्या आत्ममग्नतेवर केवळ टीका न करता साहित्यात दाहक जगण्याचे वास्तव मांडून त्यांनी पारंपरिक साहित्याला त्याचे बनचुके अनुभवविश्र्व लक्षात आणून दिले..मुंबईतील मध्यमवर्गीय कथा कविता लिहिल्या जाताना एकटी 'मुंबईची लावणी ' आणि ' माझी मैना ' लिहून मुंबईतील दुसरे जग दाखवून साहित्याने काय मांडले पाहिजे हे लेखक कवींना दाखवून दिले...

यासाठी अण्णाभाऊ महत्वाचे आहेत.
आज चळवळीत मोर्चे निघतात.आंदोलने होतात. पण हा सांस्कृतिक व कलेचा आशय काहीसा कमी झालाय.तो वाढला तर चळवळींशी सामान्य माणूस अधिक वेगाने जोडला जाईल हाच अण्णाभाउंचा सांगावा आहे..

हेरंब कुलकर्णी

#अण्णाभाऊ

01/08/2025
शहीद नागाचे मनोगत...सारं बालपण आणि तारुण्यातील सुरवातीचा काळ ग्रामीण भागात गेला.डोंगरदर्‍यात,शेतमळ्यात,गावखेड्यात आम्ही ...
29/07/2025

शहीद नागाचे मनोगत...

सारं बालपण आणि तारुण्यातील सुरवातीचा काळ ग्रामीण भागात गेला.डोंगरदर्‍यात,शेतमळ्यात,गावखेड्यात आम्ही मोकळेपणानं भटकलो. साप,नाग,धामण,फुरसा ,मांडुळ हे सगळे प्रकार खुप जवळुन पाहिले.पण हे आपले शत्रुच आहेत हे सगळ्यांनी बिंबवलं.हे आपले मित्र आहेत असं सांगणारा नागपंचमीचा सण आमच्या मनावर नागातील मित्र ही संकल्पना नाही बिंबऊ शकला.

पुढे आयुष्याच्या एका वळाणावर चारुता सागर यांचा नागीण कथासंग्रह वाचला.मारुती चित्तमपल्लींच्या नावेगावबांध मधील सापाच्या आठवणी वाचल्या.या सगळ्यातुन समोर विचार आला एखाद्या नागाने मनोगत व्यक्त केले तर ते काय असेल...?

शब्दाने शब्द..
ओळीने ओळ..
जुळत गेली.
आणि २०१६ मध्ये शहीद नागाचे मनोगत ही रचना आकाराला आली.
अक्षरपेरणीचे संपादक बाळासाहेबांना ही रचना इतकी आवडली त्यांनी व्हाॅट्सअप,फेसबुक सगळ्या माध्यमातुन रचना डिलीट करायला लावली.
अक्षरपेरणी मासिकात २०१७ मध्ये ही रचना पहिल्यांदा छापली.डाॅ राजेंद्र थोरात यांच्या प्रेमाखातर साहित्यिक कलावंत संमेलनात ही रचना मी पहिल्यांदा सादर केली.

दरवर्षी नागचंचमी येते आणि ही रचनाच नाही तर सारं बालपण आठवतं.रानावनात भेटलेले साप,नाग,धामन,मांडुळ डोळ्यासमोर येतात.त्यातल्या एखादा नाग माणसांसारखा बोलला असता तर...?त्या नागाचे मनोगत

शहीद नागाचे मनोगत....


आमचं जगणं बांधावर,रानावनात,जंगलात ,वारुळात,ऊसाच्या फडात,गवताच्या गंजीत,भुस्कटात, कोंड्यात,पडक्या घरात,विहरीत, दगडधोंड्यात.

मानसापासुन राहतो आम्ही नेहमी दुर.
जगण्याचा शोधत असतो आम्ही आमचाच सुर.

आम्ही नुसते नजरेस जरी पडलो तरी तुम्ही ओराडता ,किंचाळता.
सारा गाव गोळा करता.
हजार हांतानी हजार डोळ्यांनी
आमचा माग काढता.

वारुळ ऊकरता,बीळं खोदता,
पलीदे जाळता,टायर पेटवता,
शिंगाडाचा धुर करता,काठ्या
कुराडींचा फौजफाटा ऊभा करता.

खरं सांगतो आम्ही स्वताःहुन कोनालाच लावत नाही दात.
तुम्ही मात्र पदोपदी
करता आमचा घात.
आमच्यावर ऊठतात तुमचे
काठ्या कुराडींचे हात.

काठ्या कुराडींच्या हातांना
एकच सांगण आहे
खरच तुम्ही शुर असाल तर
मोकळ्या रानात एकटं भेटुन दाखवा..

पायाखालची जमीन काय
डोक्यावरचं आभाळ सुध्दा
तुम्हाला तुमचं वाटणार नाय..
फणा काढुन मागं लागलो तर
कमरेचं कमरेला राहणार नाय..

पण तुम्ही नामर्द
हजार हातांनी
आम्हा एका एकाला ठेचता.

लक्षात ठेवा
तुम्हा हाजारांच्या विरोधात
आम्हा एकट्याचा तो लढा असतो
एकटा असलो तरी गर्दी मध्ये
फणा काढुनच ऊभा असतो.

अरे हरलो तरी
तुमच्या काळजाचं पाणी केल्याचा
इतिहास मात्र खरा असतो....

सर्व शहीद नागांना अर्पण

@पांडुरंग कंद

पांडुरंग केशव कंद

#निसर्ग #नागपंचमी

...हा दिसणारा निसर्ग माझ्या सगळ्या दुखण्यांवर औषध आहे फक्त या निसर्गाकडे निसर्गातूनच पाहिले पाहिजे. म्हणजे आपण या निसर्ग...
22/07/2025

...हा दिसणारा निसर्ग माझ्या सगळ्या दुखण्यांवर औषध आहे फक्त या निसर्गाकडे निसर्गातूनच पाहिले पाहिजे. म्हणजे आपण या निसर्गाचा भाग आहोत हे लक्षात घेऊन निसर्गाकडे पाहिले पाहिजे. ज्या प्रमाणे मोकळ्या रानावरील गवताच्या पात्यावरील निळे फूल आकाशाकडे पाहते, त्याच अनुभूतीने मी निसर्गाकडे पाहतो. मग ज्याप्रमाणे फांद्यांना पालवी फुटते त्याच प्रमाणे माझ्या विचारांनाही पालवी फुटेल. इतरांची पावले सूर्यास्ताला घराकडे वळतात पण माझी डोंगर माथ्याकडे सूर्यास्त पाहण्यासाठी वळतात. गावातील गडबड गोंधळात मी पार मागे पडलोय, पण मला सूर्यास्त दिसतो आणि माझ्या शांत निवांत आयुष्यासाठी तो रेंगाळू शकतो हेच माझ्यासाठी खूप आहे.

~ थोरो 💚

PC - Anagha Pandit

#निसर्ग #साहित्यप्रेमी

 #जिद्द जगण्याची.पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात राहणारा हा माणूस काही दिवसांपूर्वी आपल्या 15 साथीदारांसह बंग...
15/07/2025

#जिद्द जगण्याची.
पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात राहणारा हा माणूस काही दिवसांपूर्वी आपल्या 15 साथीदारांसह बंगालच्या उपसागरात हल्दिया जवळ मासे पकडण्यासाठी गेला होता. तेव्हा अचानक समुद्राचा मूड बदलला, जोरदार वादळ उठलं, लाटा बेफाम झाल्या आणि पाहता पाहता त्यांचं ट्रॉलर उलटलं.

सर्वजण समुद्राच्या प्रचंड लाटांमध्ये वाहून गेले... रवींद्रनाथही.

पण तो घाबरणारा नव्हता. मच्छीमार असल्याने पाणी त्याचा शत्रू नव्हता, तर साथी होता. त्याने हार मानली नाही.
तो पोहत राहिला... पोहत राहिला... वर फक्त आकाश, खाली अथांग पाणी. तास निघून गेले, दिवस सरले.

5 दिवस रवींद्रनाथ समुद्रात एकटा पोहत राहिला, ना खाणं, ना पिण्याचं पाणी, फक्त जगण्याचा हट्ट. जेव्हा पाऊस पडायचा, तेव्हा तो पावसाचं पाणी पिऊन स्वतःला जिवंत ठेवायचा. प्रत्येक क्षणी मृत्यू जवळ होता, पण त्याची हिम्मत त्यापेक्षा जास्त मजबूत होती.

5व्या दिवशी... सुमारे 600 किलोमीटर दूर, बांगलादेशच्या कुतुबदिया बेटाजवळ, 'एमव्ही जवाद' नावाचं जहाज जात होतं. जहाजाच्या कॅप्टनने दूरवर समुद्रात काही हलताना पाहिलं. नीट पाहिलं... कोणीतरी माणूस पोहत होता!

कॅप्टनने तात्काळ लाइफ जॅकेट फेकलं, पण ते रवींद्रनाथपर्यंत पोहोचलं नाही. तरीही कॅप्टन थांबले नाहीत... त्यांनी सीमा, धर्म, जातीच्या रेषा विसरून फक्त एकच गोष्ट पाहिली --- माणूस.

काही अंतरावर रवींद्रनाथ पुन्हा दिसला, आणि यावेळी कॅप्टनने जहाज वळवलं. लाइफ जॅकेट पुन्हा फेकलं, आणि यावेळी रवींद्रनाथने ते पकडलं.

क्रेनने त्याला वर खेचलं गेलं, थकलेला, अर्धमेला, पण जिवंत. जेव्हा तो जहाजावर चढला, तेव्हा संपूर्ण जहाजावरील खलाशी आनंदाने ओरडले. त्यांनी फक्त एक माणूस पाहिला नाही, तर माणुसकीला जिवंत पाहिलं.

त्या क्षणाचा व्हिडिओ जहाजावरील एका खलाशाने रेकॉर्ड केला, आणि तो देखावा आजही पाहणाऱ्याच्या मनाला हलवून ठेवतो.

❤️ धन्यवाद, त्या जहाजावरील प्रत्येक खलाशाला.

तुम्ही फक्त एक जीव वाचवला नाही, तुम्ही आम्हाला आठवण करून दिली की माणुसकी अजूनही जिवंत आहे.

कधी कधी एका माणसाचा हट्ट आणि दुसऱ्या माणसाची करुणा, संपूर्ण जगाला अधिक चांगलं बनवू शकते.

(

पु.ल. देशपांडे    #पुलदेशपांडे  #वटपौर्णिमा
10/06/2025

पु.ल. देशपांडे

#पुलदेशपांडे #वटपौर्णिमा

नित्शे आणि वेडाचा झटका     मला काही दु:खांचं, वेदनांचं, शोकांतिकांचं आकर्षण नाहीय. अनेकदा माझ्या परिचयातील अनेकांना तसं ...
05/06/2025

नित्शे आणि वेडाचा झटका

मला काही दु:खांचं, वेदनांचं, शोकांतिकांचं आकर्षण नाहीय. अनेकदा माझ्या परिचयातील अनेकांना तसं माझ्याबद्दल वाटत राहतं. म्हणजे, हेमिंग्वेच्या आत्महत्येबद्दल मी कायम सांगत राहतो किंवा त्याच्या घरातल्याच इतर दोन आत्महत्यांबद्दल. किंवा मग सिल्व्हिया प्लाथनं ओव्हनमध्ये डोकं टाकून केलेल्या आत्महत्येबद्दल किंवा व्हर्जिनिया वुल्फनं नदीत हळूहळू सरत जात केलेल्या आत्महत्येबद्दल. किंवा मग आल्बेर काम्यूच्या काहींना विचित्र वाटणाऱ्या स्वभावाबद्दल. हे सगळं मला थोडं क्युरिएसिटीच्या पातळीवरच इंटरेस्टिंग वाटतं. मृत्यूबद्दल दु:ख आहे. आकर्षण नाहीय. हेमिंग्वे असो सिल्व्हिया असो किंवा व्हर्जिनिया असो, किंवा काम्यू असो, हे सगळे इंटेलेक्चुअली आणि क्रिएटिव्हिटीच्या पातळीवर कमाल माणसं होती. पण मग मनावरचे (खरंतर, मेंदूवरचेच. कारण मन नावाचा काही प्रकार नसतो. सगळं ओझं असतं ते मेंदूवरच. आपलीच सोय म्हणून मन नावाचा प्रकार वेगळा काढून, मेंदूच्या ताणाला काहीशी हुलकावणी दिलीय! असो.) हे आघात ही मंडळी का सहन करू शकली नसतील, असं काहीसं वाटून जातं. हेही असो. हाही एक वेगळ्याच चर्चेचा स्वतंत्र विषय आहे. नुकतेच हे पुस्तक वाचलं. हे म्हणजे, नित्शेवरंच. तेही याच कुतुहलातून.

खरं सांगू का, मला अशी पुस्तकं कमालीची आवडतात. मागे विशाखा पाटलांचं 'करून जावे असेही काही' वाचले. ते होते जॉर्ज ऑर्वेलवरचं. तेही असंच होतं. 'असंच' म्हणजे, लेखक किंवा विचारवंत त्यांचं कार्य आणि त्याचं आयुष्य यांचं समांतर नातं कसं राहिलं, हे मांडणारं पुस्तक. विशाखा पाटलांनी ऑर्वेलवरील पुस्तकात किती सुंदररित्या ऑर्वेलचं लेखन आणि त्याचं समांतर चाललेलं खाचखळग्यांचं आयुष्य मांडलंय. विश्वास पाटील या रत्नागिरीस्थित लेखकानं लिहिलेलं फ्रेडरिख नित्शेवरचं हे पुस्तक तसंच आहे. नित्शेचं आयुष्य आणि लेखन याचं समांतर चित्रण. (इथे 'रत्नागिरीस्थित लेखक' असं नमूद करण्याचं कारण, हे काही ते 'पानिपत'वाले विश्वास पाटील नाहीत, हे कळावे यासाठी!)

तर नित्शे माझ्या कुतुहलाच्या यादीतलाच तत्वज्ञ. त्यानं अफलातून मांडणी केलीय. पुढे त्याच्या मांडणीत सर्वच विचारधारांच्या अनुयायांनी आपापल्या विचारांना समर्थनीय काही सापडतं का, ते शोधलं. असला अफलातून नित्शे. म्हणजे, कुणी एक विचारधारा आपल्याला बाजूला त्याला खेचून घेत नाही. पण तो त्याची भूमिका घेऊन ठाम, निश्चित ठिकाणी मात्र उभा आहे.

नित्शेचं वैयक्तिक आयुष्य फार इंटरेस्टिंग होतं.

नित्शे १८४४ साली जन्मून १९०० साली मृत्यू पावला. म्हणजे, मोजून ५४ वर्षे जगला. मरणाआधीची त्याची १० वर्षे भ्रमिष्ट अवस्थेत गेली. १८८९ साली त्याला वेडाचा झटका आला. नित्शेच्या जन्मानंतर काही वर्षांनी त्याच्या वडिलांनाही भ्रमिष्टपणाचा झटका आला आणि त्यातच ते गेले.

नित्शे जेव्हा गेला, तेव्हा त्याच्या शरीराचं शवविच्छेदन झालं. त्याला अनुवांशिक काही आजार होता वगैरे असं काही नाही. पण वडिलांसारखाच त्यालाही वेडाचा झटका आला हे खरं.

नित्शे जेव्हा बोर्डिंग स्कूलमध्ये शिकत होता. तिथं एकदा शिक्षकांनी विद्यार्थ्यांना 'माझा आवडता कवी' यावर निबंध लिहायला सांगितला गेला. नित्शेनं फ्रेडरिख होल्डरलीन या कवीवर निबंध लिहिला. तेव्हा बहुतांश जर्मन लोक होल्डरलीनला ओळखत नव्हते किंवा त्याला मोठा कवी वगैरे मानतही नव्हते. शिक्षकानं काहीसा नकारात्मक शेराच नित्शेच्या या निबंधावर दिला.

पुढे होल्डरलीन हा जर्मनमधला गटेनंतरचा दुसरा सर्वात महान कवी म्हणून नावाजला गेला. विशेष म्हणजे, या होल्डरलीननं आयुष्याची शेवटची काही दशकं वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये घालवली.

नित्शे आणि वेडाचा झटका, असं काहीसं गूढ नातंच जणू होतं की काय, अशी शंका यावी, असं. नित्शे खरंच ट्रॅजिक फिलॉसॉफर होता. त्याच्याबद्दल, त्यानं मांडलेल्या विचारांबद्दल, त्यानं देव-धर्म-परंपरांवर उपस्थित केलेल्या प्रश्नांवरून त्याच्या कामाबद्दल कुतुहल वाटतं, आवाक् व्हायला होतं. जवळपास पाच दशकांचं आयुष्य, त्यातली शेवटची दहा वर्षे भ्रमिष्टावस्थेत, सुरुवातीची एक-दीड दशक अर्थातच बालपण-शिक्षण वगैरे. म्हणजे दोन-अडीच दशकात त्यानं केलेल्या कामाकडे पाहता, तो खऱ्या अर्थानं महान तत्वज्ञ होता!

मला व्यक्तिश: या पुस्तकामुळे नित्शेच्या मांडणीबद्दल अधिक नीट कळू शकलं. विशेषत: त्याचं वैयक्तिक आयुष्य, त्याच्या आयुष्यातील मित्रपरिवार, कुटुंब यांचं महत्त्वं, शाळा-कॉलेज-विद्यापीठं, त्याचं काम - असं सगळंच कळलं. नित्शेबद्दल अधिक वाचण्यासाठी प्रवृत्त करणारं हे पुस्तक आहे.

— नामदेव काटकर

Address

सातारा
सातारा

Telephone

+918767638724

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when PustakNaka posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to PustakNaka:

Share