bolta Khandesh

bolta Khandesh खान्देशी माटीना नवा विचार !
अहिराणी व मराठी भाषेतून सामाजिक, सांस्कृतिक आणि ग्रामीण माहिती.

नुसत मतदान करू नका. कान्हदेश न एकूण क्षेत्रफळ पैकी कितल टक्का पानी आडायल शे ? जलसिंचन विकास कितला व्हयना येनीपन माहिती ल...
10/06/2026

नुसत मतदान करू नका. कान्हदेश न एकूण क्षेत्रफळ पैकी कितल टक्का पानी आडायल शे ? जलसिंचन विकास कितला व्हयना येनीपन माहिती ल्या.

#जनतेचासवाल #कृषीसंकट #खान्देशी_मातीना_नवा_विचार #खान्देश #बोलता_खान्देश
#तापी_विकास
#जलसिंचन
#शेतकरी_प्रश्न
#पाणी_हक्काचं
#खान्देशचा_विकास
#तापी_नदी
#सिंचन_क्रांती
#शेतकरी_हित
#जनतेचा_सवाल
#विकास_की_राजकारण
#पाणी_कोण_अडवतंय
#खान्देश_बोलतोय





🎙️ बोलता खान्देश | पर्यटन विकास स्पेशलअविकसित कान्हदेशना विकासमा आखो एक अडथळा;कपिलेश्वरना आपुरा निम-मुडावद पूल प्रशासनना...
06/06/2026

🎙️ बोलता खान्देश | पर्यटन विकास स्पेशल

अविकसित कान्हदेशना विकासमा आखो एक अडथळा;

कपिलेश्वरना आपुरा निम-मुडावद पूल प्रशासनना हलगर्जीना जिवंत पुरावा!
(प्रशासन आणि शेतकरी दोघांचेही नुकसान होत असेल तर काय.)

निम-मुडावद गावाजवळील ऐतिहासिक आणि प्रसिद्ध कपिलेश्वर मंदिर परिसरात भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मंजूर करण्यात आलेला पादचारी पूल गेल्या सहा वर्षांपासून अर्धवट अवस्थेत पडून आहे. पर्यटन विकास, धार्मिक स्थळांचा विकास आणि मूलभूत सुविधांच्या घोषणा केल्या जात असताना हा पूल मात्र प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराची साक्ष देत उभा आहे.

सन २०१८-१९ मध्ये पांझरा नदीवर हा पूल उभारण्यास मंजुरी देण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदाराला १२ महिन्यांत काम पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. मात्र, काम सुरू करण्यापूर्वी आवश्यक असलेले जमिनीचे अधिग्रहण आणि शेतकऱ्यांना मोबदला देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली नसल्याचा आरोप आहे. परिणामी, जमीन मालकांच्या आक्षेपानंतर काम ठप्प झाले आणि आजही पूल अर्धवट अवस्थेत उभा आहे.

धक्कादायक बाब म्हणजे या पुलावर सुरक्षा कठडे किंवा संरक्षण जाळी नसल्याने तो भाविकांसाठी धोकादायक ठरत आहे. पावसाळ्यात पांझरा नदीला पूर आल्यास येथे मोठी दुर्घटना घडण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. मंदिराच्या बाजूने पुलावर प्रवेश करता येतो, मात्र मुडावद गावाच्या बाजूचे काम अपूर्ण असल्याने नागरिक आणि भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

जनतेचा सवाल...

पाच कोटी रुपये खर्चूनही सहा वर्षांपासून पूल अर्धवटच का?
काम सुरू करण्यापूर्वी जमिनीचे अधिग्रहण न करणारे अधिकारी, काम अपूर्ण सोडणारा ठेकेदार की याकडे दुर्लक्ष करणारे लोकप्रतिनिधी — जबाबदार नेमके कोण?
विकासाच्या घोषणा मोठ्या, पण वास्तवात कामे ठप्प.
अपघात झाल्यानंतर जबाबदारी ठरवण्यापेक्षा, आजच उत्तरदायित्व निश्चित होणे गरजेचे आहे.
कान्हदेशच्या विकासाच्या वाटेतला हा अडथळा दूर करणार कोण?
बोलता खान्देश
“खान्देशी माटीना नवा विचार..!”

#बोलता_खान्देश #पर्यटन_विकास_स्पेशल #कपिलेश्वर #मुडावद #पांझरा_नदी #जनतेचा_सवाल #खान्देश

अविकसित कान्हदेशना विकासमा पयला अडथळा  – व्यक्तीपूजा की व्यवस्थानी उपेक्षा ?(सामाजिक शे बर  जय कान्हदेश 🚩 )हम है यहा के ...
05/06/2026

अविकसित कान्हदेशना विकासमा पयला अडथळा – व्यक्तीपूजा की व्यवस्थानी उपेक्षा ?

(सामाजिक शे बर जय कान्हदेश 🚩 )

हम है यहा के बादशाह चल हवा येऊ दे . म्हणजे स्वागताच्या बुकेतून सुरू होणारी प्रभाव टाकण्याची संस्कृती थांबली पाहिजे.

लोकशाही व्यवस्थेत सरकारी अधिकारी आणि कर्मचारी हे कोणत्याही राजकीय पक्षाचे, संघटनेचे किंवा गटाचे नसतात. ते संविधान, कायदा आणि जनतेच्या हितासाठी काम करणारे सार्वजनिक सेवक असतात. मात्र आपल्या समाजात एक वेगळीच परंपरा रुजताना दिसते. एखादा नवीन अधिकारी रुजू झाला की विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि स्थानिक गट त्याचा सत्कार करण्यासाठी बुके, शाल, फेटे घेऊन रांगा लावतात.

वरवर पाहता हा सन्मानाचा भाग वाटत असला तरी अनेकदा त्यामागे "ओळख निर्माण करणे", "संबंध जुळवणे" किंवा "आपले काम सोपे व्हावे" अशी मानसिकता दडलेली असते. अधिकारी रुजू झाल्याच्या पहिल्याच दिवशी त्याला कोणाचा प्रभाव जास्त आहे हे दाखवण्याची एक प्रकारची स्पर्धाच सुरू होते.

खरं तर एखाद्या अधिकाऱ्याचे स्वागत त्याच्या कामावरून व्हायला हवे, रुजू झाल्याबरोबर नव्हे. जनतेसाठी पारदर्शक, प्रामाणिक आणि कायद्याच्या चौकटीत राहून काम करणाऱ्या अधिकाऱ्याचा गौरव झाला तर त्याला अर्थ आहे. पण काम सुरू होण्यापूर्वीच बुके, सत्कार आणि फोटोसेशनचा भडीमार करणे ही निरोगी लोकशाहीची लक्षणे नाहीत.

यामुळे समाजातही चुकीचा संदेश जातो. सामान्य नागरिकाला असे वाटू लागते की, ज्यांची राजकीय ओळख मजबूत आहे त्यांच्याच कामांना प्राधान्य मिळते. प्रशासनाबद्दलचा विश्वास कमी होतो आणि निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते.

आज गरज आहे ती स्वागत संस्कृतीपेक्षा उत्तरदायित्वाच्या संस्कृतीची. अधिकारी कोणत्याही पक्षाचा नसून जनतेचा आहे, ही भावना समाजाने जपली पाहिजे. राजकीय पक्ष आणि संघटनांनीही बुके देण्याऐवजी आपल्या भागातील प्रश्न, विकासाच्या गरजा आणि लोकांच्या अपेक्षा अधिकाऱ्यांसमोर मांडाव्यात.

सरकारी अधिकारी मोठा नसतो, त्याचे काम मोठे असते.
आणि लोकशाहीत कोणत्याही अधिकाऱ्याला आपल्या बाजूने वळवण्यापेक्षा त्याला निष्पक्ष राहू देणे हेच समाजाच्या हिताचे आहे.

– तुषार रवंदळे पाटील
बोलता खान्देश 🎙️

▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱
*आमनां युट्यूब चॅनेलले आतेच जॉइन व्हा!..*
https://youtube.com/?si=AVUQgIQ8qomK_a1t

*इंस्टाग्राम पेजले जॉइन व्हा!..*
https://www.instagram.com/boltakhandeshofficial?igsh=eXd6azgyaDgyazRt

*फेसबुक पानले जॉइन व्हा!..*
https://www.facebook.com/share/1ArPJuhVmS/
▰▱▰▱▰▱▰▱▰
◆◇◆◇👑 *जय कान्हदेश* 🚩◇◆◇◆
#सरकारी_अधिकारी_की_पक्षांचे_कार्यकर्ते
#बोलता_खान्देश
#जनतेचा_अधिकारी
#निष्पक्ष_प्रशासन
#लोकशाही_मजबूत_करा
#सुशासन
#विकसित_खान्देश
#सामाजिक_जागरूकता
#उत्तरदायित्वाची_संस्कृती
#खान्देश_बदलेल

वारसाहक्काच्या राजकारणापेक्षा वारसाहक्काची उद्योजकता द्या; खान्देशचा खरा विकास तिथेच आहे!🎙️ बोलता खान्देश | विशेष लेखखान...
31/05/2026

वारसाहक्काच्या राजकारणापेक्षा वारसाहक्काची उद्योजकता द्या; खान्देशचा खरा विकास तिथेच आहे!

🎙️ बोलता खान्देश | विशेष लेख

खान्देशातील अनेक नेते आपल्या मुला-मुलींना राजकारणात आणण्यासाठी जीवापाड प्रयत्न करतात. पदं, पक्ष आणि सत्ता यांचा वारसा पुढच्या पिढीकडे सोपवण्याची परंपरा आजही सुरू आहे. पण एक प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे — या वारसाहक्काच्या राजकारणातून खान्देशातील बेरोजगार तरुणांना नेमकं काय मिळालं?

पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र उभारणाऱ्या नेत्यांकडे पाहिलं तर त्यांनी केवळ राजकीय साम्राज्य उभं केलं नाही, तर साखर कारखाने, दूध संघ, बँका, उद्योग आणि रोजगाराच्या संधी निर्माण केल्या. त्यामुळे हजारो कुटुंबांच्या घरात आर्थिक स्थैर्य आलं.

खान्देशातही जर नेत्यांनी आपल्या पुढच्या पिढीला केवळ निवडणुकीचे तिकीट देण्याऐवजी उद्योग, प्रक्रिया उद्योग, कृषी आधारित व्यवसाय, सहकारी संस्था आणि रोजगार निर्मितीच्या क्षेत्रात उतरवलं, तर त्याचा फायदा संपूर्ण समाजाला होईल.

एक उद्योजक उभा राहिला तर किमान १०० तरुणांना रोजगार मिळू शकतो. त्या १०० तरुणांच्या कुटुंबातील सुमारे ५०० लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकतो. पण एकच राजकीय वारसदार तयार झाला तर त्याचा फायदा मोजक्याच लोकांपर्यंत मर्यादित राहतो.

▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱
*आमनां युट्यूब चॅनेलले आतेच जॉइन व्हा!..*
https://youtube.com/?si=AVUQgIQ8qomK_a1t

*इंस्टाग्राम पेजले जॉइन व्हा!..*
https://www.instagram.com/boltakhandeshofficial?igsh=eXd6azgyaDgyazRt

*फेसबुक पानले जॉइन व्हा!..*
https://www.facebook.com/share/1ArPJuhVmS/
▰▱▰▱▰▱▰▱▰
◆◇◆◇👑 *जय कान्हदेश*🚩◇◆◇◆

आज खान्देशसमोर सर्वात मोठं आव्हान आहे ते बेरोजगारीचं, स्थलांतराचं आणि उद्योगांच्या अभावाचं. त्यामुळे समाजाला आता फक्त नवे नेते नाहीत, तर नवे उद्योजक, नवे सहकारी प्रकल्प आणि नवे रोजगार निर्माते हवे आहेत.

खान्देशातील नेतृत्वाने पश्चिम महाराष्ट्रातील सहकार चळवळीच्या यशाचा हेवा करण्यापेक्षा त्यातून प्रेरणा घेण्याची गरज आहे. कारण भविष्यात मतांच्या राजकारणापेक्षा रोजगाराचं राजकारण जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.

राजकीय वारसदार एक नेता घडवतो; पण उद्योजकीय वारसदार शेकडो कुटुंबांचं भविष्य घडवतो.

तुषार रवंदळे पाटील

#बोलता_खान्देश #रोजगार #उद्योजकता #सहकार #खान्देश_विकास #युवा_रोजगार #कृषीउद्योग #जनतेचासवाल

🎙️ बोलता खान्देश | जळगाव जिल्हा विशेष“शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरला डिझेल नाही…पण वाळू माफियांच्या बोटींना हजारो लिटरचा साठा!...
28/05/2026

🎙️ बोलता खान्देश | जळगाव जिल्हा विशेष

“शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरला डिझेल नाही…

पण वाळू माफियांच्या बोटींना हजारो लिटरचा साठा!”

सावखेडा येथे प्रशासनाचा धडक छापा

१५२० लिटर बेकायदेशीर डिझेल जप्त; ठेकेदाराला पावणेदोन कोटींची नोटीस

अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथे तापी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननावर प्रशासनाने मोठी कारवाई करत तब्बल १५२० लिटर बेकायदेशीर डिझेल साठा जप्त केला. पण या कारवाईने फक्त डिझेलच नाही, तर संपूर्ण व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभं केलं आहे.

एकीकडे शेतकरी काही लिटर डिझेलसाठी पेट्रोल पंपावर उन्हात तासन्तास रांगेत उभा… तर दुसरीकडे वाळू माफियांच्या ठिकाणी हजारो लिटर डिझेल खुलेआम साठवलं जातं!

ही व्यवस्था नेमकी कुणासाठी चालते? शेतकऱ्यांसाठी की माफियांसाठी?

तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या नेतृत्वाखाली महसूल, पोलीस आणि प्रशासनाच्या पथकाने तापी नदीपात्रात छापा टाकत २०० लिटर क्षमतेचे डिझेल कॅन जप्त केले. यासोबत १२ बोटी, १० पोकलेन, ६ डंपर आणि ४८ ब्रास वाळू असा मोठा मुद्देमालही जप्त करण्यात आला.

प्रशासनाने संबंधित ठेकेदाराला जवळपास पावणेदोन कोटी रुपयांची कारणे दाखवा नोटीस बजावली असली, तरी जनतेच्या मनात एकच प्रश्न घुमतोय —

“इतका मोठा डिझेल साठा इतके दिवस प्रशासनाला दिसला नाही का?”

शेतकरी डिझेल मागायला गेला तर नियम… पण वाळू माफियांना हजारो लिटरचा साठा करताना कुणाची भीती नाही?

बोलता खान्देशचे थेट सवाल :

🔴 जिल्ह्यात डिझेल टंचाई असताना हा साठा कुठून आला?

🔴 एवढ्या मोठ्या प्रमाणात डिझेल साठवण्याचं धाडस कोणाच्या आशीर्वादाने?

🔴 नदीपात्रात सुरू असलेला काळाबाजार प्रशासनाला आधी दिसला नाही का?

🔴 कायद्याचा धाक फक्त सामान्य शेतकऱ्यांसाठीच आहे का?

🔴 वाळू माफियांना राजकीय संरक्षण आहे का?

आज सावखेडा उघडलं… उद्या अजून किती ठिकाणी असेच काळे साठे सापडणार?

बोलता खान्देशचा इशारा :

“खान्देशची माती शांत आहे… पण अन्याय पाहून गप्प बसणारी नाही!”

जनतेच्या प्रश्नांना उत्तर मिळालंच पाहिजे. कारण — शेतकरी रांगेत उभा असताना, माफियांच्या टाक्या भरलेल्या असतील… तर संताप उसळणारच!

#बोलता_खान्देश



#वाळूमाफिया
#शेतकरी_संकट
#डिझेलटंचाई
#खान्देश
#तापीनदी



#शेतकरीराजा
#काळाबाजार



#जनतेचासवाल


#मराठी_न्यूज


#बेकायदेशीर_साठा
#शेतकरी_विरुद्ध_माफिया
#तिखट_सवाल
#ग्राउंडरिपोर्ट


28/05/2026

मना शेतकरी राजा भोया… याना कोनीबी कापस गया!

भाषणात शेतकरी “राजा” म्हणवला जातो, पण वास्तवात व्यापारी, अधिकारी आणि पुढाऱ्यांच्या फसवणुकीतच त्याचं आयुष्य अडकलेलं आहे. कापसाला भाव नाही, शेतीमालाला न्याय नाही, आणि सरकारी व्यवस्थेत फक्त कागदांची धावपळ — मेहनत मात्र शेतकऱ्याचीच.

आज परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की पेरणीची कामं थांबली आहेत, ट्रॅक्टर शेतात उभे आहेत आणि शेतकरी डिझेलसाठी पेट्रोल पंपावर दुमडे, कुप्पे, ड्रम घेऊन भर उन्हात रांगेत उभा आहे. नावाला “शेतकरी राजा”, पण प्रत्यक्षात प्रत्येक स्तरावर सर्वाधिक हाल मात्र त्याच्याच वाट्याला येत आहेत.

#शेतकरी_राजा

Address

Amalner
Amalner
425401

Alerts

Be the first to know and let us send you an email when bolta Khandesh posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share