Nikhil Deore Stories

Nikhil Deore Stories तो आणी ती : आयुष्याच्या वळणावर घडणाऱ्या प्रेमकथा.तसेच मराठी भाषेतील दर्जेदार quotes आणी लेख

अभिमानास्पद! 💐💐
22/09/2024

अभिमानास्पद! 💐💐

Complicated Love (भाग 3)(कथेचे सर्व हक्क लेखकाकडे )भाग 2 वरून पुढे " मॅडम आपला स्मॉल साईझ पिझ्झा आणी हॉट कॉफी " वेटरच्या...
22/09/2024

Complicated Love (भाग 3)(कथेचे सर्व हक्क लेखकाकडे )
भाग 2 वरून पुढे
" मॅडम आपला स्मॉल साईझ पिझ्झा आणी हॉट कॉफी " वेटरच्या आवाजाने अदिती भानावर आली.खरंतर मनात प्रेमरंगाचा मयूरपिसारा फुलला होता. आपल्या केसांशी चाळे करत अजूनही ती त्याला चोरनजरेने न्हाहाळतच होती पण साधी नजरा नजरही न व्हावी केवढं हे दुर्दैव. पोटात असंख्य फुलपाखरांनी अगदी थव्याने उडून मनला खट्याळ गुदगुल्या कराव्या असेच काहीसे तिला भासत होते.मनाच्या लडिवाळ द्वंदात तिने पिझ्झा आणी हॉट कॉफी कधी संपवली हे तिला देखील कळले नाही.
" मॅडम आपले बिल " वेटरने परत एकदा तिच्या मनातल्या पहिल्या प्रेमद्वंदाला भंग केले होते. पैसे देण्यासाठी अदिती आपली पर्स चाचपडू लागली होती पण दुर्दवाने ती पर्स तिच्या रूमवरच विसरली होती .
" अशी कशी मी पर्स विसरू शकते ...आता काय होणार...हे सर्व माझ्यावर लबाड मुलगी या नजरेने तर नाही पाहणार ?" अदितीच्या घायाळ मनाला शंकेच्या इंगळया पोखरू लागल्या होत्या.
" idea ... मेघाला पैसे घेऊन इथेच बोलावते" तिच्या गोबऱ्या गालावर संतुष्टेची एक लकेर उमटली होती. पण कितीही फोन लावले तरी मेघाचा फोन नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर येत होता.
" आज आपलं नशीबच वाईट आहे वाटते " मनाच्या डोहात शंकेचा भोवरा फिरू लागला होता. ती काउंटरवर जाऊन काही वेळातच पैसे आणून देण्यासाठी विनंती करू लागली. बिल काउंटर वाल्यांनीही अगदी सरळ सरळ बजावून सांगितले
" जोपर्यंत पैसे घेऊन येणार नाही तोपर्यंत मोबाईल त्यांच्याकडे ठेवावा लागेल".
अदिती मुंबईत नवीनच होती. मुबंईत ती मेघाशिवाय कुणालाच ओळखत नव्हती शिवाय त्यांची रूमही कॅफेपासून बरीच दूर होती तसेच कुणाही अनोळखी व्यक्तीजवळ आपला मोबाईल देणे तिला योग्य वाटत नव्हते. शंकेच्या विचाराच्या तप्त उन्हात ती होरपळून निघत होती.
" काय प्रॉब्लेम झालंय ?" कुणाच्यातरी प्रेमळ स्वरांनी तिला धीर आला. बिल काउंटर वाल्यांनी सर्व घटना अगदी क्रमाक्रमाने सांगितल्या.
" काही हरकत नाही यांच बिल मी देऊन देतो त्यात काय एवढं " अगदी बारीक नाजूक हास्य देऊन तो तरुण म्हणाला.
" नको नको मी करीन काहीतरी मॅनेज...खरंच नको " नकार देत अदिती म्हणाली.
" मुंबईसारख्या शहरात कुणाहीजवळ आपला खाजगी मोबाईल ठेवणे बरोबर नाही .अहो माझा मघाशी तुम्हाला धक्का लागला ना हवं तर त्याचीच भरपाई समजा " समजूत काढीत तो तरुण म्हणाला.
त्याच्या चेहऱ्याकडे पाहत असतांना अदिती आपले भाग हरपून गेली होती. हे समग्र जग हिमगरासारखं अगदी गोठून स्तब्ध झालंय. या सुंदर जगात निश्चल अशी शांतता पसरलीय आणी त्या निरव जगात अदिती एकटीच उभी राहून त्या तरुणाकडे पाहत रमून गेली होती. वाऱ्याच्या थंडगार झुळकेने तिचे केस भुरुभुरु उडत होते. रात्रीच्या काळोखात किजव्यांनी टिक टिक करीत लुकलुकाव तसें तिचे नेत्र लुकलुकत होते. त्या जगातून कुणीतरी प्रेमगीत छेडावं तसं कॅफेत सुरु असलेलं नवं संगीत तिच्या कानात शिरू लागलं होत.
💞 पाहताक्षणी वाटे कुणी आपुला
हे वेड जे स्वप्नातुनी जपलं
दिसतांना लपत
हसताना रुसत
सरल्यावर उरत ...प्रेम हे
विरलेले धागे
जुळलेले धागे
श्वासांचा बंध ....प्रेम हे 💞
( song credit :- प्रेम हे सिरीयल )
तो तरुण कितीतरी वेळपासून बोलत होता पण अदितीच्या कानात त्याचे कुठलेच शब्द शिरत नव्हते. शेवटी तो तरुण कॅफेच्या बाहेर जायला निघाला. नकळतपणे स्तब्ध झालेली अदितीही त्याच्यामागोमाग पाषाणाच्या पुतळ्याप्रमाने बाहेर जायला निघाली. बाहेरच्या वर्दळीने अदिती या जगप्रवाहात परतली.
" नक्की काय झालं होत मला....कुठल्या विश्वात हरवून गेले होते मी....कुठली भावना असेल ही ..प्रेम तर नसावं ना ? " तिच्या मनाच्या पडद्यावर कितीतरी प्रश्न उमटले होते. या सर्व भावनाचक्रात तिला उमगलं कि तिने त्या तरुणाचे साधे नावही विचारले नाही. दूर जाणाऱ्या तरूणाला ती हाका मारत होती पण त्याने कानात हेडफोन घातले असल्यामुळे त्याला तिचा आवाज ऐकू येणं जरा कठीणच होत.

अदिती रूमवर परतली . कुठल्यातरी भावनाशून्य जगात ती परत रमली होती. त्या भावनाशून्य जगात गुलाबांची गुलाबी सुमने फुलली होती आणी ती सुमनेही केवढी खट्याळ त्या पुष्पांनीही त्याच्याच चेहरा तयार केला होता.
" देवा परत एकदा तो मला भेटू दे निदान धन्यवाद तरी म्हणू दे...किती मूर्ख आहे ना मी त्याच नाव तरी विचारायला हवं होत. या धुंद जगाच्या कुठल्या कोपऱ्यात मी हरवले होते कुणास ठाऊक " अदिती स्वतःशीच हितगुज करीत होती. मनोमन परत त्याच्या भेटीची आस तिला लागली होती.
" काय मॅडम कुठे हरवलात.... एकट्या एकट्याच हसत आहात. प्रेमात पडल्या वाटतंय कुणाच्यातरी" कुचका देत मेघा म्हणाली.
" तुझं आपलं काहीतरीच "
" सांग सांग काय झालंय अदिती काहीतरी नक्कीच आहे. तुझ्या चेहऱ्यावरील छटा सर्व काही सांगून जात आहे " मेघा तिला बालिशपणे चिडवीत होते.
" काही नाही ग " आपल्या भावना लपवून लटका राग दाखवत अदिती म्हणाली.
भावना हा शब्द जरी तीन अक्षरांचा असला तरी किती प्रचंड सामर्थ्य असतं ना त्या शब्दात . एकदा जर कुठलाही मनुष्य भावना या संज्ञेत अडकला तर तो कुठल्या तळाला जाईल हे कुणीच सांगू शकत नाही .अदितीही आकर्षण म्हणावं कि पहिल्या नजरेतल प्रेम म्हणावं या भावनेच्या दलदलीत ती अडकत चालली होती. त्या तरुणाच्या एका भेटीसाठी ती मोरप्रतीक्षा करीत होती.

क्रमश ....
कथेचे भाग वेळेवर मिळवण्यासाठी Page la Like Ani Follow करायला विसरू नका

Complicated Love (भाग 2)भाग  1 वरून पुढे  " सत्यमेव जयते..सत्याचाच नेहमी विजय होवो. सत्यप्रकाशाचे किरण  या समग्र विश्वात...
19/09/2024

Complicated Love (भाग 2)
भाग 1 वरून पुढे
" सत्यमेव जयते..सत्याचाच नेहमी विजय होवो. सत्यप्रकाशाचे किरण या समग्र विश्वात पसरून सर्वत्र शांतता नांदो " प्रतापरावांच्या मनाच्या सप्तद्वारात पडघमांचे कटू सत्य बोल घुमत होते. काळाच्या पाठलागावर असतांना नेहमीच त्यांचा सत्यासाठी प्रदीर्घ असा संघर्ष राहिला होता. पण आता परिस्थिती जरा वेगळी होती.

प्रतापराव देसाई हे रिटायर्ड IPS अधिकारी होते. अतिशय धिप्पाड , उंचपुरे ,दिसायला साधारणतः गहूवर्णीय रंग ,लांबसडक नाक ,वाढलेल्या दाढीमिश्या कुणाचंही लक्ष्य वेधून घेईल असं मजबूत व्यक्तिमत्व .आपल्या नौकरीच्या किंवा जनसेवेच्या कारकिर्दीत प्रतापराव देसाई हे नाव ऐकतांच कितीतरी गुन्हेगाराच्या काळजात धडकी भरत असे. याला कारण म्हणजे कुठेही तडजोड नाही. वारा वाहायला कधीच कुणाच्या परवानगीची आवश्यकता नसते , पाऊसही कधी कुणाची परवानगी घेऊन बरसत नाही. त्याचप्रमाणे प्रतापराव देसाई हेसुद्धा गुन्हेगारांच्या मागावर सुसाट सुटत असे आणी त्यांना समूळ नष्ट करीत असे .भारत सदैव सुख ,शांतमय राहो. तसेच भारतातील स्वकीय असो वा भारताबाहेरील परकीय शत्रुंना चोख आळा बसावं हे त्यांच सदैव ध्येय राहील होत. कुठलंही खोल अंतर्मनात वसलेलं ध्येय मनुष्याला स्वस्थ बसूच देत नाही मग प्रतापराव हे तरी कसे स्वस्थ बसणार होते. सिंह थकला जरी असला तरी डरकाळी फोडायचं कधीच विसरत नाही. आपल धगधगत ध्येय मनात फक्त मृगजळ बनून राहू नये तर त्याला मुर्तिमंत रूप यावं यासाठी प्रतापरावांनी "सत्यप्रकाश" ज्याला इंग्लिश मध्ये lBI नावाची गुप्त अशी संघटना सुरु केली. या संघटनेचा कुठल्याही कागदोपत्री, सोशीअल साईट्स वर कधीच उल्लेख होत नसे. किंबहुना ही संस्था कुणाला ठाऊकच नव्हती. भारत सरकारलाही याबद्दल कुठलीच माहिती नव्हती. एकप्रकारे निरव काळोखात गाडलेली संस्था म्हणजेच IBI. देशात वाढलेला दहशतवाद ,गुन्हेगारी प्रवृत्ती , अवैध ड्रुग्स तस्करी , जंगल तस्करी ,चंदन तस्करी ,अस्त्र शस्त्र तस्करी ,सुवर्ण तस्करी या सर्व बेलगाम काळ्या धंद्यांना लगाम लागावा तसेच देशाला हानिकारक असलेल्या गुन्हेगारांचा आणी विविध गँग्सचा कायमचा खात्मा करणं हे IBI संस्थेच प्रमुख लक्ष्य होत . या संस्थेच्या मराठी आणी इंग्लिशमधील नावात तुम्हाला फार तफावत दिसत असेल पण त्यालाही विशिष्ट असं कारण आहेच . भारतातील काही तरुण ज्यांना देशासाठी काहीतरी परिवर्तनात्मक करण्यासाठी इच्छा आहे. ज्यांची शरीरसृष्टी बलदंड आहे... विशेष म्हणजे ज्यांची देशाप्रती तळमळ आहे अश्याना या संस्थेत निवळून गुप्तपणे घेतलं जात असे. या संस्थेच्या सभासदांच जाळ सर्व भारतभर पसरलं होत. या संस्थेची माहिती कुठेही जाऊ नये यासाठी सर्वजण फार काळजी घेत असे.

या संस्थेचा मुख्य कार्यकारी रणनेता म्हणजे करण अरोरा... काही दिवसापूर्वी झालेल्या झटपटीत तो गंभीर जखमी झाला होता .त्यामुळे अर्जुन सरनाईक हा सध्याचा कार्यकारी रणनेता होता. जो कितीतरी भंयकर गँग्स आणी दहशतवाद्यांना पुरून उरला होता. त्यांची विशेषता म्हणजे तो ही गुन्हेगारांच्या मागे अगदी जीव आटवून सुसाट सुटत असे.

ईगल गँग्स, TRI , वीच गँग्स ,स्क्रोपियन गँग्स ह्या भारतातील ड्रुग्स , चंदन , अवैध सुवर्ण , जंगल तस्करी करणाऱ्या घातकी गँग्स आहे. IBI आणी या सर्व गँग्सचा संघर्ष कायम राहिलेला आहे. ईगल गँग्स ही देश विदेशातून ड्रुग्स आणून भारतात अवैधरित्या स्मगलिंग करणारी सर्वात निच्च्ततम गँग्स राहिली आहे . आता या गँग्सचा प्रमुख वेक्टर हा आहे . मागच्या काही झटपटीत अर्जुनने ईगल गॅंगच्या बऱ्याच लोकांना मृत्यूचा रस्ता दाखविला म्हणून वेक्टरला नाईलाजाने या प्रकरणात लक्ष्य घालावं लागलं. व्हेक्टर म्हणजे साक्षात यमराजाच्याच रूप.

प्रतापराव देसाई यांनी आज सर्व मेंबर्सची IBI ऑफिस मध्ये मीटिंग बोलावली होती. विषय जरा गंभीरच आहे. कसल्यातरी नवीन मिशनची ते आज घोषणा करणार होते. वर्तुळाकार टेबलावर बसलेल्या सर्वांवर नजर फिरवित ते म्हणाले
" मिशन धवल...हे आपलं आता सर्वात महत्वाचं नवीन मिशन असणार आहे ".
सर्वांच्या कपाळावर आठ्यांचं जाळ पसरलं होत. मनावर शंके कुशंकेची चादर पसरली होती.
" मिशन धवल नेमकं निगडित तरी कशाशी आहे ?" अर्जुनने लगेचच प्रश्न विचारला.
" Fentanile ( फेंटानाईल ) शी ...आज जर ड्रुग्सची 1 ते 10 अशी क्रमवारी लावली तर हिरोईनचा दुसरा क्रमांक येईल तर फेंटानाईल हे ड्रुग्स दहाव्या क्रमालाही पार करून एकराव्या क्रमांकावर येईल.एकदम सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास हिरोईन म्हणजे उशीने मारून लागलेला झटका तर फेंटानाईल म्हणजे ट्रेन सोबत झालेली जबरदस्त टक्कर. अफगाणिस्तानातून मोठ्या प्रमाणात फेंटानाईल भारतात आणून त्याची अवैधरित्या तस्करी करण्याच नियोजन ईगल गँग्सच आहे. बुद्धीच्या पलीकडे त्यांच्या तस्करीची पद्धत आहे .कुणी विचारही करू शकणार नाही अश्या ते रिकाम्या सुतळी पोत्यातून ते फेंटानाईल भारतात आणणार. अगदी सविस्तरपणे सांगायचं झाल्यास सुतळी किंवा ज्यूटचे पोते यांना हिरोईन या रसायनात कितीतरी दिवस बुडवून ठेवले जातात. त्यामुळे त्या पोत्याला हिरोईन आपोआपच चिकटली जाते. नंतर काही दिवस दिवस ते पोते सुकवले जातात. त्यानंतर त्या पोत्यात जिरं भरून भारतात पाठवली जातात. भारतात फक्त जिऱ्याची अवैधरित्या तस्करी होत आहे कि नाही याचीच फक्त
खात्री केली जाते .त्या पोत्यावर साधं कुणाचं लक्ष्यही जात नाही .त्यानंतर त्या पोत्यांना दिल्लीच्या अवैध कारखान्यात घेऊन त्यावर विविध रासायनीक प्रक्रिया केल्या जातात. शेवटी त्या पोत्याला जेवढ्या प्रमाणात हिरोईन चिकटला असतो तेवढ्याच प्रमाणातला फेंटानाईल मिळवला जातो. साधारणतः एका पोत्यापासून 1 किलो फेंटानाईल मिळवला जातो. ज्याची किमंत करोडो रुपयात आहे. या फेंटानाईलमुळे भारताची तरुण पिढी देशोधळीला लागेल. फेंटानाईलची अवैध्य तस्करी भारतात थांबवण्याच मिशन म्हणजेच.... मिशन धवल". सर्वांच्या चेहऱ्यावर प्रश्नांची वलये गरगर फिरू लागली होती.
" मग यासाठी कुठली योजना आखली आहे आपण ?" अजींक्यने प्रश्न विचारला.
" आपण हे कार्य दोन गटात विभागल आहे. भारतात चेक पॉईंटवर या जिऱ्याच्या पोत्याची तपासणी झाल्यावर त्यातला जिरा हा वेगळा करून मसाल्यांच्या दुकानात नेला जाईल तर ते हिरोईन चिकटलेले ज्यूटचे किंवा सुतळीचे पोते डोंगरांच्या शांत रस्त्याने दिल्लीतल्या अवैध कारखान्यात आणले जाईल. आपला एक गट ज्यात प्रमुख समीर ,अर्णव आणी बरेच जण असेल ते सर्व त्या कारखान्याला उध्वस्त करेल तसेच त्या कारखान्यात वापरले जाणारे रसायनही आपल्या ताब्यात घेईल. त्या रसायनावरून नक्की कुठल्या रासायनिक क्रिया त्या कारखान्यात होतात हे समजण्यास हातभार लागेल . दुसरा गट ज्यात अजिक्य आणी अर्जुन असेल तो गट डोंगरांच्या रस्त्याने येणाऱ्या गाडीला संपवून ते ज्यूटचे किंवा सुतळीचे पोते आपल्या ताब्यात घेतील .त्यामुळे अश्या प्रकारची तस्करी भारतात किती खोलवर रुतली आहे याचा छडान छडा लागू शकेल. उद्या "मिशन धवलला" पूर्ण करण्याचा शिवधनुष्य या दोन गटांना पेलावा लागेल. या मिशनला पूर्ण करणे एवढं सोपही नसेल कारण ईगल गँग्सचा सर्वाधिक क्रूर , भयंकर असा गंगस्स्टर वेक्टर हा या मिशनला पूर्ण करण्यात सर्वात मोठा अडथळा असेल". प्रतापराव आता शांत झाले होते . त्याच्या किलकिल्या नेत्रात उद्या होणाऱ्या मिशन धवलच्या चिंताछटा स्पष्ट दिसत होत्या. हे मिशन पूर्णतः फत्ते होईल यांची त्यांना शाश्वतीही होतीच कारण अर्जुन त्यांच्यासोबत होता.

निळ्या नभाच्या आकाशाला दूर सारून सूर्यांच्या पिवळसर किरणांनी धरतीवर आपले पाऊल ठेवले होते. दिवस उजाळला होता. मिशन धवलच्या योजनेनुसार दोन्ही गटांनी आपापल्या मार्गाकडे कुच करायला सुरवात केली होती. एक गट ज्यात समीर आणी अर्णव होते ते वाऱ्याच्या वेगाने दिल्लीच्या अवैध कारखान्याकडे मार्गक्रमण करीत होते. अजिक्य आणी अर्जुन हे डोंगरात लपून ज्यूटच्या पोत्याची गाडी येण्याची वाट पाहत होते. अर्जुनचा मेंदू आणी मन दोन्हीही दोन वेगळ्या दिशेला धावत होते. ज्याप्रमाणे समुद्राला ओहोटी येते आणी पाणी मागे मागे सरू लागते त्याचप्रमाणे त्याचे विचारही त्याच्या अस्तित्वाबद्दल मागे मागे सरू लागले होते. मनाच्या खोल गाभाऱ्यापर्यंत जिथे भावनेचा उगम आहे अश्या जागी त्याचे विचार आठवणींचा शिरोबिंदू शोधत होते ..पण नक्की कुठल्या आठवणी. जणू दोन अर्जुन ...मनाच्या कोपऱ्यात दडलेला एक अर्जुन तर जगासमोर वावरणारा एक अर्जुन या दोघांमध्ये जणू एक शीतयुद्धच सुरु होते. दोघांचं स्वरूपही कमालीच भिन्न होत. दूरवरून अस्पष्ट दिसणाऱ्या गाडीला पाहून अर्जुन सावध झाला. हातातली बंदूक घेऊन तो रस्त्याच्या मधोमध उभा राहिला. गाडीचा वेगही कमी झाला होता. आपल्या हातातील बंदुकेतील एक गोळी त्याने समोरच्या गाडीवर चालवली .
ताडकन समोरच्या गाडीवरची काच फुटली. तशीच त्याच्या आडव्या दिशेने येणाऱ्या म्हणजेच डाव्या हाताकडून येणाऱ्या गाडीने त्याला धाडकन उडविले. टक्कर एवढी भीषण होती कि अर्जुन कितीतरी दूर फेकल्या गेला होता. त्या गाडीतून एक उंचपुरा पुरुष बाहेर आला. चेहऱ्यावर त्याने काळा मास्क मंकी टोपी घातली होती. अर्जुन जवळ जाऊन त्याने आपल्या हातातील बंदूक अर्जुनवर रोखली.
" हा नक्की कोण आहे ? हा वेक्टर तर निश्चितपणे नाहीच ...मग नक्की हा आहे तरी कोण . कुठल्या दुसऱ्या गॅंगचा तर सदस्य असेल का .कि आणखी काहीतरी वेगळंच रहस्य आहे " त्या क्षणिक काळात अजिंक्यच्या मनाला बरेच प्रश्न सतावत होते .
-------------------------------------------------------------------

हॉस्पटिलमध्ये अदितीचे डोळे उघडले. अदिती दिसायला ही साधारणतः गोरी पण चेहऱ्यावर लख्ख पिवळसर तेज , लांबसडक काळे केस , मासळीसारखे डोळे, गुलाबाच्या पाकळ्यासारखे ओठ, कमनीय बांधा , पिटुकलंस नाक एकंदरीत काय तर अदिती दिसण्यात सुंदर आहे . गोळी लागल्यामुळे तीच सर्व शरीर वेदनेनं जखडलं होत. हाताला लागलेल्या सलाईनमुळे कुठलीही हालचाल करण्यास ती असमर्थ होती. ओठावर हलकंसं हास्य फुललं होत पण क्षणातच ते हास्य कुठेतरी हरवून गेल. तिच्या मनाच्या सुंदर चित्रात कितीतरी रंग उधळले होते पण त्या सर्व रंगात प्रेमाच्या गुलाबी रंगाची फारच कमतरता होती. शिवाय विरह रंग अधिकच गडद होत चालला होता. समोरच्या काचावर दिसणाऱ्या दोन सावल्या ऐकमेकांपासून पार दूर चालल्या होत्या . त्या सवाल्यांना पाहून ती भूतकाळात कुठेतरी हरवून गेली होती.

एका वर्षाच्यापूर्वीचीही गोष्ट. अदिती मुंबईत नवीनच होती. या धाकधुकीच्या मुबंईत काही नव्या गोष्टी Enjoy कराव्या म्हणून आज पहिल्यांदाच ती मुबंईतल्या कसबा कॅफेत एकटीच बसली होती. तिने दिलेल्या स्मॉल साईझ पिझ्झा आणी हॉट कॉफीच्या ऑर्डरची प्रतीक्षा करण्यात ती मग्न होतीच कि एवढ्यात कुणीतरी फोनवर बोलता बोलता कॅफेत प्रवेश केला. ती त्याला मागे वळून पाहणारच एवढ्यात त्यांच्याच जोरदार धक्का तिला लागला .खरंतर अदितीला फार राग आला होता पण त्याला पाहताच तिचा राग कुठेतरी विरून गेला. त्यानेही हलकंस स्मितहास्य देऊन सॉरी म्हटलं. अदितीनेही त्या स्मितहास्याला स्मितहास्यानेच प्रतिसाद दिला . तो थोडा दूर समोरच्या टेबलावर बसला होता .आपल्या खिशातली बारीकशी डायरी काढून त्यावर काहीतरी लिहण्यात तो गुंग झाला होता.
तो दिसायला कमालीचा आकर्षक होता..सहा फूट उंचीचा ,देखणा ,रुबाबदार , अंगात आकाशी शर्ट आणी त्यावर काळ्या रंगाचा पॅन्ट .त्याला पाहताच अदितीच्या मनात प्रेम कृष्णकमळ कळ्यांनी गुंजराव केला. पहिल्या नजरेतील प्रेम असेच त्याला म्हणावे लागेल. कॅफेमधील हलक हलक संगीत तिच्या कानाला तृप्त करीत होत .
💕💕 प्यार का दर्द है , मिठा मिठा ,प्यारा प्यारा
प्यार का दर्द है ,मिठा मिठा ,प्यारा प्यारा
ये हसी दर्द ही दो दिलो का है सहारा 💞💞

क्रमश ....

कथेचे पुढील भाग मिळवण्यासाठी Page ला Follow करा!

हॉस्टेलमध्ये असतांना घरी फोन लावण्यासाठी या 1 रुपयाच्या कॉइन बॉक्सवर लांबच्या लांब रांग लागलेली असायची! ❤️ गेले ते दिवस ...
09/09/2024

हॉस्टेलमध्ये असतांना घरी फोन लावण्यासाठी या 1 रुपयाच्या कॉइन बॉक्सवर लांबच्या लांब रांग लागलेली असायची!
❤️ गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी ❤️

कुणा कुणाला आठवण झाली Cmnt करून सांगा
अश्याच नवनवीन Update साठी Page ला Follow करा!

Complicated Love  ( भाग 1) कथेचे सर्वं हक्क लेखकाकडे सुरक्षित आहे. रेल्वेच्या खिडकीतून तो बाहेरचा परिसर न्हाहाळत होता. र...
08/09/2024

Complicated Love ( भाग 1)
कथेचे सर्वं हक्क लेखकाकडे सुरक्षित आहे.
रेल्वेच्या खिडकीतून तो बाहेरचा परिसर न्हाहाळत होता. रक्ताने माखलेल्या ग्लोव्हसवर त्याने एक कटाक्ष टाकला. मनात कितीतरी प्रश्न झिंज्या पसरून नाचत होते. विचारचक्रांच्या जाळ्यात तो घेरला होता. विचारचक्रही अधिकच क्लिष्ठ बनत चालले होते. उलट - सुलट विचारांचा अग्नी भडकू लागला होता. रक्ताने माखलेल्या ग्लोव्हसची योग्य विल्हेवाट लावून त्याने चेहऱ्यावर थंडगार पाणी मारलं. तो दिसायला सहा फूट उंचीचा, देखणा, रुबाबदार, अतिशय गोरापान चेहरा, लांब वाढलेल्या दाढी मिश्या, अंगात पांढर टी -शर्ट आणि काळा पॅन्ट. त्यावर असलेली काळ्या रंगाची हुडी त्याच्या व्यक्तिमत्वाला अधिकच आकर्षण बनवत होती. सुटलेल्या बुटाची लेस बांधून तो रेल्वेच्या बाहेर पडला. रेल्वे स्टेशनवर लोकांची बरीच गर्दी होती. आपल्या हुडीची टोपी डोक्यावर घेऊन तो त्या गर्दीतून वायुवेगाने मार्गक्रमण करू लागला. विचाराच्या क्लिष्ठ गुंतेत तो परत अडकत चालला होता. इतक्यात एका तरुणीचा त्याला धक्का लागला.
" माफ करा " एका तिरकस नजरेने पाहून तो म्हणाला.
" तू.... कसा आहेस? आणि काय हा अवतार करून ठेवलाय स्वतःचा".
तिच्या त्या मर्मभेदी शब्दांनी त्याच्या हृदयाची प्रेमळ नाजूक अशी एक तार छेडली.
" मी.... तुमचा नक्कीच काहीतरी गैरसमज होतोय. मी तर तुम्हाला ओळखतही नाही ".
" माझी कुठलीच गैरसमजूत नाही झालीय.... म्हणजे तू विसरालाही मला " खिन्न होऊन हताश स्वरात ती तरुणी म्हणाली.
जोरदार सुटलेल्या वाऱ्यामुळे त्याच्या डोक्यावरची टोपी उडून खांद्यावर आली. त्याचे लांबसडक केसही अस्तव्यस्त झाले होते . चेहऱ्यावरील क्रूर भाव क्षणार्धांतच कुठेतरी विरून गेले होते.
एवढ्यात दूरवर त्याला काही संशयास्पद हालचाली जाणवल्या. त्याचा मनाच्या आकाशात शंकेचे काळे ढग आरपार जमले. विस्फारलेली त्याची तीक्ष्ण भेदक नजर समोर उभ्या असलेल्या त्या व्यक्तीवर घिरट्या घालू लागली. त्याच्या भुवया उंचावल्या. तो काही हालचाल करणार एवढ्यात त्या व्यक्तीच्या बंदुकेतून धाडकन..... एक गोळी सुटली. नेम चुकला होता. ती गोळी त्या तरुणीच्या खांद्याला लागली.
" आई ग...... " तिच्या वेदनामय स्वरांनी संपूर्ण स्टेशनच वातावरणच बदलून गेल. सर्वांच्या नजरा आता त्या व्यक्तीवर स्थिरावल्या. तो व्यक्तीही कशालाही न जुमानता सर्वशक्तीनिशी स्टेशनवरून बाहेर धावत होता. काही बलदंड तरुण त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करीत होते. पण त्याने हवेत चालवलेल्या गोळ्यामुळे त्यांचे पायही जागीच थांबले. रेल्वे स्टेशनवरच्या पोलिसांचा फौजफाटाहि आता त्या तरुणाच्या मागावर होता.

ती तरुणी तिथेच वेदनामयी स्वरात कन्हाळत होती. तिच्या खांद्यातून रक्तही भळाभळा ओघळू लागलं होत. त्याने तिला बाहूपाशात घेऊन हॉस्पिटलकडे धाव घेतली. तिला बाहूपाशात घेताच त्याला काहीतरी वेगळंच जाणवलं जणू काही त्याच्या पाषाण हृदयात प्रेम लहरी गुंजराव करीत आहे . सर्व जग जणू एकाच जागी थांबलय असच त्याला भासत होत. कोमल आणि प्रेमाच्या तुषारांनी त्याच पाषाण मन तृप्त झालं होत. परंतु हि भावना फार काळ टिकली नाही. पुढच्याच क्षणी तो भानावर आला. आपल्या जीवनात घेतलेल्या ध्येयरुपी प्रतिज्ञामुळे त्याच्या मनात उमललेल ईवलस प्रेमांकुर क्षणार्धांतच सुकून गेल. धापा टाकत तो हॉस्पिटलमध्ये पोहचला. हॉस्पिटलमध्ये हि एकच गर्दी उसळली होती. डॉक्टरांनी एक कटाक्ष त्याच्याकडे फेकला आणि विचारलं
" काय झालंय हिला? "
" गोळी लागली आहे? " थरथरत्या स्वरात तो म्हणाला.
" म्हणजे हि पोलीस केस आहे... जोपर्यंत पोलीस इथे येऊन योग्य ती माहित नमूद करणार करेल तेव्हाच तिच्यावर योग्य ते उपचार सुरु होईल " डॉक्टरांनी त्याला ठणकावून सांगितल.
डॉक्टरांचे ते शब्द ऐकुन त्याच्या चेहऱ्यावर क्रोधाच वलय निर्माण झालं. खिशातून आपला मोबाईल काढून त्याने एक कॉल लावला. आधी काही वेळ तो फोनवर बोलला आणि मग फोन डॉक्टरांकडे देण्यात आले. फोनवर बोलताच डॉक्टरांच्या चेहऱ्यावरील भाव शीतल झाले. त्यांनी त्या तरुणीला I.C.U मध्ये भरती करण्यास सांगितले. लगेचच तिच्यावर योग्य ते उपचार सुरु झाले.
---------------------------------------------------------------------------------------

ट्रिंग..... ट्रिंग..... ट्रिंग
" हॅलो "
" तो अजूनही जिवंतच आहे. त्याने आणखी एकाचा खूण केलाय ".
"काय? "
" हो... खरं तेच सांगतोय पण तुम्ही काळजी नका करू या वेळेस मी त्याचा पुरता बंदोबस्त करतो ".
" अरे कसा करणार त्याचा बंदोबस्त त्याची कुठलीही ठोस माहिती आपल्याकडे नाही. ज्याप्रमाणे आकाशात कडाडणारी प्रत्येक वीज फक्त आपलं प्रकाशमय अस्तित्व दर्शविण्यासाठी नसते. तर त्यातली एखादी वीज रौंद्र रूप धारण करून सर्वांना भस्म करण्यासाठी कडाडली असते. त्याचप्रमाणे तो हि आपल्यावर रौंद्र रूप धारण करून भस्म करण्यासाठी सज्ज झाला आहे. एखाद्या यमराजाप्रमाणे तो सर्वांना नरकाचे द्वार दाखवत आहे ".
" त्याची काही विशेष माहिती आहे तुमच्या जवळ? "
" विशेष माहिती तर नाही फक्त धूसर झालेले काही स्केच आहे ".
" यावेळेस मी त्याचा पुरता बंदोबस्त करतोच कारण या कुरुक्षेत्रात आता मी स्वतः शस्त्र घेऊन उतरणार आहे ".
" वाह ! आता या युद्धात खरी चुरस निर्माण होईल "
-------------------------------------------------------------------------------

" सर एक वाईट बातमी.... अर्जुनवर पुन्हा एकदा जीवघेणा हल्ला झालंय. मला वाटत आपण त्याच संरक्षण आणखी वाढवायला हवं ".
" त्याची काही गरज नाही. कुठल्याही रोपट्याला चांगल मजबूत विकसित होण्यासाठी पाऊसाबरोबर ऊन्हाचीही गरज असतेच ना ".
" पण सर आपण जे करतोय ते बरोबर आहे? "
" या लढाईत काय चूक आहे आणि काय बरोबर आहे हे न विचारलेलंच बर. या लढाईत सत्याचा विजय करण्यासाठी कितीतरी असत्याची मदत आपल्याला घ्यावी लागेल ".
" बरोबर आहे सर पण काही गोष्टी...."
" काही गोष्टी गुपित असलेल्याच बऱ्या.... सध्यातरी तोच आपल्यासाठी आशेचा किरण आहे ".
------------------------------------------------------------------------------------------

काचेतून तो तिला मृदू नजरेनी पाहत होता. तिला लागलेले सलाईन आणि ऑक्सिजनमुळे त्याचा जीव वरखाली होत होता. पहिल्यांदा कुणाचीतरी अशी अवस्था पाहून त्याच कठोर हृदय पाझरल होत. या सर्व परिस्तिथितीत तो कमालीचा शांत झाला होता.
" खरंतर आठवणी कश्या असतात..... अगदी निखळ खळखळपणे वाहणाऱ्या झऱ्यासारख्या. मनाच्या गाभाऱ्यात कुठेतरी प्रेम, वात्सल्य, सुख, दुःखाच्या रूपात निखळपणे वाहत असतात. तर कधी वाटत आठवणी ह्या गुलाबाच्या सुमानासारखे असतात सदैव सुंगंधरूपी गारवा देत असतात. पण यापेक्षाही प्रमाणबद्ध उत्तर आहे माझ्याकडे. आठवणी ह्या तीक्ष्ण धारदार बाणासारख्या असतात एकापाठोपाठ एक काळजात नेहमी टोचत असतात. पण आता तर माझ्या सर्व आठवणी धूसर व्हायला लागल्या आहेत " तो स्वतःशीच म्हणाला.
दूर निपचित पडून असलेल्या त्या तरुणीला पाहून त्याच्या मनाची घालमेल होत होती.
" काय विशेष असेल हिच्यात ज्यामुळे माझे पावले अजूनही इथेच थांबले आहे " त्याने परत स्वतःशीच एक प्रश्न विचारला.
आपल्या जड पावलांनी तो हॉस्पटिलच्या बाहेर जाऊ लागला तशी विरहाची एक लहर त्याच्या हृदयात दाटून आली.

क्रमश...

हा भाग आणि हि कथा कशी वाटत आहे he अभिप्रायाने कळवा

पुढील भाग वाचण्यासाठी Page ला Follow करा

पैसे जरा नीट तपासून घेत चला रे काल पुण्यात एकाने चुना लावला 😂😂
08/09/2024

पैसे जरा नीट तपासून घेत चला रे
काल पुण्यात एकाने चुना लावला 😂😂

❤️❤️शहराच्या वर्दळीतील मॉलपेक्षा गावगाड्यातील शेतकऱ्यांचा हा माॉल कितीतरी पटीने सरस आहे ❤️❤️
07/09/2024

❤️❤️शहराच्या वर्दळीतील मॉलपेक्षा
गावगाड्यातील शेतकऱ्यांचा हा माॉल
कितीतरी पटीने सरस आहे ❤️❤️

पोळा सणाच्या आसपास येणाऱ्या या शेंगांची बातच काही न्यारी आहे 👌🏽❤️❤️
07/09/2024

पोळा सणाच्या आसपास येणाऱ्या या शेंगांची बातच काही न्यारी आहे 👌🏽❤️❤️

*अज्ञात वाटेवर --लघूभयकथा (दोन भागाची ) आकाशातून पावसाचा एक टपोरा थेंब डोक्यावर पडला तेव्हा जाणवलं की  आकाशातली निळ्या र...
29/07/2024

*अज्ञात वाटेवर --लघूभयकथा (दोन भागाची ) आकाशातून पावसाचा एक टपोरा थेंब डोक्यावर पडला तेव्हा जाणवलं की आकाशातली निळ्या रंगाची पताका दूर सरून काळ्या रंगाच्या मेघांची गर्दी जमली आहे. खरंतर असं वेळी- अवेळी पावसाने अलवार स्पर्श करणं मला फार सुखद आणी हवंहवंस वाटतं. मग मध्येच कुठून तरी "हा असा सांज गारवा वाटे मनाला हवा.. हवा " हे गीत कुठूनतरी कानावर पडतं आणि एकदम कॉलेजमध्ये असल्यासारखा फील येतो. पाऊस, कॉलेज सुरू व्हायचे दिवस, मित्र-मैत्रिणींच्या गप्पा आणि चहा हा आयुष्यातला सर्वात आल्हाददायी काळ ......*

प्रतिलिपि अ‍ॅपवर कथा वाचा
*_अज्ञात वाटेवर --लघुभयकथा_*
922 वाचकांना ही कथा आवडली आहे

https://pratilipi.page.link/6qYM9Aw1hmgtfQc6A
☝ ☝ ☝
*कथा वाचण्यासाठी क्लिक करावे*

*अज्ञात वाटेवर --लघूभयकथा आकाशातून पावसाचा एक टपोरा थेंब डोक्यावर पडला तेव्हा जाणवलं की  आकाशातली निळ्या रंगाची पताका दू...
05/07/2024

*अज्ञात वाटेवर --लघूभयकथा
आकाशातून पावसाचा एक टपोरा थेंब डोक्यावर पडला तेव्हा जाणवलं की आकाशातली निळ्या रंगाची पताका दूर सरून काळ्या रंगाच्या मेघांची गर्दी जमली आहे. खरंतर असं वेळी- अवेळी पावसाने अलवार स्पर्श करणं मला फार सुखद आणी हवंहवंस वाटतं. मग मध्येच कुठून तरी "हा असा सांज गारवा वाटे मनाला हवा.. हवा " हे गीत कुठूनतरी कानावर पडतं आणि एकदम कॉलेजमध्ये असल्यासारखा फील येतो. पाऊस, कॉलेज सुरू व्हायचे दिवस, मित्र-मैत्रिणींच्या गप्पा आणि चहा हा आयुष्यातला सर्वात आल्हाददायी काळ ......*

प्रतिलिपि अ‍ॅपवर कथा वाचा
*_अज्ञात वाटेवर --लघुभयकथा (दोन भागाची )_*
4 वाचकांना ही कथा आवडली आहे

https://pratilipi.page.link/FzQJWN1YfoJuCAJt7
☝ ☝ ☝
*कथा वाचण्यासाठी क्लिक करावे*

अज्ञात वाटेवर --लघूभयकथा (दोन भागाची ) आकाशातून पावसाचा एक टपोरा थेंब डोक्यावर पडला तेव्हा जाणवलं की आकाशातली निळ्...

ही आहे महाभारत काळातील अस्त्र आणी शस्त्र मित्रांनो अस्त्र आणी शस्त्र यांचा वेदात फार पूर्वीपासून उल्लेख आढळतो. महाभारत क...
10/06/2024

ही आहे महाभारत काळातील अस्त्र आणी शस्त्र

मित्रांनो अस्त्र आणी शस्त्र यांचा वेदात फार पूर्वीपासून उल्लेख आढळतो. महाभारत काळात बरीच अस्त्र आणी शस्त्र योद्धे धारण करीत होते. ज्यांच साध्या सोप्या सरळ भाषेत वर्णन करायचं झाल्यास नुसता विध्वंस असं जरी म्हटलं तरी फार काही चुकीच ठरणार नाही. महाभारताच्या 18 दिवसाच्या युद्धातही बरीच विनाशकारी अस्त्र, शस्त्र वापरल्या गेली होती. तसेच संपूर्ण महाभारत काळात विविध अस्त्र अनेक योद्धांजवळ होती. ते अस्त्र आजच्या अणूबॉम्ब, hydrogen बॉम्ब पेक्षाही महाभयंकर होते. सर्वात प्रथम अस्त्र आणी शस्त्र यातला फरक काय आहे हे समजून घेऊ.
>शस्त्र म्हणजे काय?
शस्त्र हे आपल्या हातातील शक्तीने योग्य वापर करत वापरण्याचे यंत्र होय..शत्रुंचा नायनाट करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शस्त्राचे दोन प्रकार आहे..एक हस्त शस्त्र तर दुसरे यंत्र शस्त्र होय. हस्त शस्त्रात ऋषी, गदा, चक्र, वज्र, त्रिशूल तर यंत्र शस्त्रात शक्ती, तोमर, पाश, बाण यांचा समावेश होतो.

आता अस्त्र म्हणजे काय हे पाहू?
अस्त्र हे एखाद्या विशिष्ठ विषयातील देव किंवा देवतेकडून मंत्रयोग जोडलेले असतं. हे अस्त्र देवतेला आव्हान करून शस्त्रावर आरुढ करावे लागत असे. अस्त्र साध्य करण्याकरीता खडतर साधना करून गुरूंकडून मंत्र घ्यावा लागत असे. त्यासाठी गुरुकडे सेवा तपसाधना करून त्यांची मर्जी संपादन करावी लागत असे. चला तर मग या Video मध्ये महाभारत काळातील महाविनाशकारी अस्त्र पाहू..

अस्त्र क्रमवारीत पहिलं अस्त्र आहे.

1) वायव्याअस्त्र :- प्रचंड घोंगावत वादळ निर्माण करून शत्रूच मनोधैर्य कोसळवण्यासाठी या अस्त्राचा वापर केल्या जात असे. हे अस्त्र प्रगट करताच घो.. घो.. करणारे वारे संपूर्ण रणभूमीत फिरू लागायचे..ज्यामुळे समग्र युद्धभूमिवर हवेवर तरंगणाऱ्या धुलिकणाची चादर पसरून जायची..... त्यामुळे अनेक योद्धे आपल्या शत्रुवर लक्ष्य केंद्रित करण्यास असमर्थ ठरायचे..हे वायू देवतांचे अस्त्र होते. या अस्त्राचा जोर वाढताच पायदळ सैन्य, रथस्वार योद्धे हवेत उडून जायचे. महाभारतात अर्जुनने गुरु द्रोणांवर हे अस्त्र सोडलं होतं.. तर गुरु द्रोणांनी पर्वताअस्त्र सोडून त्याला उत्तर दिलं होतं.

2) आग्नेयाअस्त्र :- ज्याप्रमाणे पावसाळ्यात आकाशातून पावसाचे टपोरे थेंब कोसळू लागतात अगदी त्याचप्रमाणे आग्नेयाअस्त्रामधून आगीचा वर्षाव केला जातो.... धगधगत कोसळणाऱ्या अग्नीज्वाळा युद्धात भीषण संहार करत असे. आग्नेयाअस्त्र सोडणारा योद्धा त्याच्या अग्नी मात्रेलाही नियंत्रित करू शकत होता. हे अस्त्र जवळपास सर्वंच योध्यांजवळ होते कारण हे अस्त्र सिद्ध करायला सोपे होते.

3) सूर्यास्त्र :- या अस्त्राने सूर्याएवढा प्रखर प्रकाश निर्माण करता येत होता. हे अस्त्र भयंकर विनाशक होते. याचा सृष्टीवर सर्वव्यापक हानिकारक परिणाम होत असे म्हणून हे अस्त्र फक्त विशिष्ट परिस्थितीतच वापरता येत होतं.. सूर्यास्त्र म्हणजेच सूर्याएवढं तेज आणी अपरिमित उष्णता. हे अस्त्र नावाप्रमाणेच अफाट उष्णता निर्माण करायचा...ज्यामुळे धरतीवरील पाण्याचे स्रोत आटून दुष्काळ पडायचा.

4) इंद्रास्त्र :- पृथ्वीवर आकाशशक्तीचा देवता म्हणून इंद्राला ओळखलं जात. इंद्रदेवाच मुख्य अस्त्र वज्र आहे म्हणून इंद्रास्त्र आणी वज्रास्त्र यांना एकच समजलं जात परंतु दोन्हीही फार भिन्न आहेत. वज्राला कुठल्यातरी एका विशिष्ट लक्ष्यावर केंद्रित करून प्रहार केला जातो पण इंद्रास्त्रमधून असंख्य अग्नीबाण आकाशातून पावसाच्या थेंबाप्रमाणे कोसळू लागतात. ज्यामुळे संपूर्ण आकाश प्रकाशमान होऊन शत्रूसैन्यात गोंधळ उडून जात होता. या अस्त्राचा मुख्यत उपयोग शत्रूंच्या तुकड्या संपवण्यासाठी केला जात असे.

5) रुद्रास्त्र :- हे अस्त्र नावाप्रमाणेच रौद्ररुपी विनाशक अस्त्र होत. महादेवाला आव्हान करताच हे अस्त्र प्रगट होऊन जायचं.. हे अस्त्र प्रगट होताच यात अकरा रुद्रांचे सामर्थ्य एकवटून जात असे... रुद्रास्त्र भयंकर झंझावत वारा, घो घो करणाऱ्या वावटळी आणी मुसळधार पाऊस यांना मिळून फार बिकट वादळ निर्माण करायचं..हे अस्त्र युद्धभूमीवर सोडताच शत्रूसैन्य सळो की पळो होऊन जात असे...हे अस्त्र एकाचवेळी हजारो शत्रूसैन्याला मृत्यू देत असे.

6) वज्रास्त्र :- इंद्राच मुख्य अस्त्र वज्र आहे. हे सर्वात कठीण अस्त्र म्हणून ओळखलं जात. या अस्त्राचा निर्माण ऋषी दिधीची यांचा हाडापासून केला होता. इंद्राने याच वज्रास्त्राचा वापर करूनच अनेक असुरांचा नाश केलाय. वज्रास्त्राला एका विशिष्ट लक्ष्यावर केंद्रित करून प्रहार केला जात असे. हे अस्त्र अतीभयंकर प्रमाणात विद्युत प्रवाह निर्माण असे.. ज्यामुळे समोर उभ्या शत्रूच्या हृदयाची स्पंदने तात्काळ शांत होऊन जायची.

7) नारायणअस्त्र :- या अस्त्राचा निर्माण स्वतः विष्णूजींनी सतीयुगात केला होता. या अस्त्राच आव्हान करताच आकाशात सर्व अकरा रुद्र, चक्र, गदा, अग्नीबाण, त्रिशूल सारखे महाभयंकर अस्त्र प्रगट होऊन जायचे.. परिमाण म्हणून या अस्त्राला संपवन अशक्य होतं. हे अस्त्र एकाचवेळी कित्येकतरी बलशाली योध्यांना संपण्याच सामर्थ्य ठेवत होतं. या अस्त्रापासून वाचण्याचा एकच उपाय होता तो म्हणजे या अस्त्राला संपूर्ण मनाने शरण जाने..हे अस्त्र सक्रीय असतांना या अस्त्राचा मनातून जरी विरोध केला तरी हे अस्त्र अधिक उग्र होऊन दुप्पट वेगाने सक्रीय होऊन जायचं.

8) अमोघशक्ती अस्त्र :- या अस्त्राला वसावी शक्ती म्हणूनही ओळखले जाते. महाभारताच्या युद्धात एक क्षण असा आला होता जेव्हा कौरवांना वाटल होतं की ते आता सहज युद्ध जिंकू शकतील त्याच कारण म्हणजे अमोघशक्ती अस्त्र.. महारथी कर्णाकडून इंद्राने कवच कुंडल दान म्हणून मागितले होते.. कर्णाने आपल्या दानवीर स्वभावानुसार कवच कुंडलाच दान दिलंही होतं...यामुळे पुढे इंद्रादेवानेच कर्णाला अमोघशक्तीअस्त्र भाला दिला आणी हे अस्त्र कर्ण एकदाच वापरू शकतील असं सांगितल होत... हे अस्त्र अजेय होतं..समोरचा योद्धा कितीही युद्धकलेत, अस्त्रश्रेणीत निपुण असला तरीही या अस्त्राला तोडण शक्य नव्हतं..महारथी कर्ण या अस्त्राचा उपयोग अर्जुनाविरुद्ध करणार होते पण ऐनवेळी श्रीकृष्णाने भीमपुत्र घटोत्घच याला कुरुक्षेत्राच्या रणभूमीत उतरवले म्हणून मग कर्णाला हे अस्त्र घटोत्घचावर चालवण भाग पडलं.

9) ब्रह्मशीरा अस्त्र :- हे अस्त्र ब्रह्मस्त्रच परिष्कृत प्रगत रूप होय .पण हे अस्त्र ब्राह्मस्त्रापेक्षाही फार अधिक विध्वंसक होत.. या अस्त्राची विशेषता म्हणजे हे अस्त्र कोणत्याही भौतिक पदार्थात उत्पन्न करता येत होतं.. अगदी लहानश्या गवताच्या तुकड्यातही त्यानंतर ते भीषण अस्त्र होऊन जायचं.. ब्रम्हास्त्रमध्ये ब्रह्माजिचे एक मुख असतात तर ब्रह्मशीरा अस्त्रामध्ये ब्रम्हाजिचे चार मुख असतात म्हणून ब्रम्हशीरा अस्त्र ब्रम्हास्त्रपेक्षा चार पटीने अधिक विध्वंसक होत. ब्रह्मशीर अस्त्राला आव्हान करताच आकाशात विजा कडाडू लागायच्या.. उल्काचा टकराव व्हायचा... आकाशातून धरणीवर आगीचा वर्षाव होऊ लागायचा .. घनघोर कर्णकर्शश्य ध्वनी व्हायची. या अस्त्रामध्ये देवांसुद्धा समाप्त करण्याच सामर्थ्य होत.

10) ब्रह्माण्ड अस्त्र:- हे अस्त्रसुद्धा ब्रम्हास्त्रच परिष्कृत प्रगत रूप होय.. हे अस्त्र ब्रह्मशीरा अस्त्रापेक्षा उच्च स्तराच अस्त्र होत.. याला अधिक स्पष्ट सांगायच झाल्यास ब्रम्हास्त्रमध्ये ब्रम्हाजिच एक मुख असतं..ब्रम्हशीरा अस्त्रामध्ये ब्रह्माजिचे चार मुख असतात तर ब्रह्माण्ड अस्त्रामध्ये ब्रह्माजिचे पाचही मुख असतात..ब्रह्मस्त्र, ब्रह्मशीरा अस्त्र आणी ब्रह्माण्ड अस्त्रामध्ये सर्वात महाशक्तीशाली अस्त्र म्हणजे ब्रह्माण्ड अस्त्र होय. हे रक्षात्मक अस्त्र होतं म्हणून या अस्त्राचा उपयोग रक्षात्मक हेतूसाठी केला जायचा.. हे अस्त्र कोणत्याही अस्त्राला मागे ढकलायच..या कारणानेच या अस्त्राला रक्षात्मक अस्त्र म्हणतात..या अस्त्राच्या सामर्थ्यबद्दल विशालरुपी सांगायच झाल्यास हे अस्त्र फक्त पृथ्वीच नव्हे तर समग्र ब्रम्हांडाला उध्वस्त करू शकत होतं. हे अस्त्र प्रगट करताच संपूर्ण धरतीवर प्रलय येऊन जायचा.

11) पाशुपतास्त्र :- पाशुपतास्त्र हे एक असं विलक्षण अस्त्र होत जे फक्त धनुष्यानेच नाही तर नेत्राच्या निर्देशाने, शब्दांच्या निर्देशाने इतकंच नव्हे तर मनातल्या विचारानेही चालवल्या जाऊ शकत होतं परंतु महाभारत काळात हे अस्त्र बाण स्वरूपातच उपलब्ध होतं आणी फक्त महाशक्तीशाली धनुष्यानेच सोडल्या जात होतं. या अस्त्राने केलेला विनाश कसल्याही प्रकारे पून्हा ठीक केल्या जाऊ शकत नव्हता. अशी मान्यता आहे की महादेव याच अस्त्राने दैत्यांचा संहार करतील..आणी याच अस्त्राने युगाच्या शेवटी सृष्टीचा अंत करतील. त्रिशूलला तीन शुल असतात तर पाशुपतास्त्राला चार शुल असतात.. कारण यात महादेवांच वाहन नंदीचीही अपार महाशक्ती सामावलेली आहे.

याशिवाय महाभारतात आणखी काही अस्त्र होती ती म्हणजे
- वैष्णवाअस्त्र
-महेंद्र अस्त्र
- भार्गव अस्त्र
- गरुड अस्त्र
- एकाग्नी अस्त्र
- सम्मोहन अस्त्र
- नागास्त्र

अश्याच नवनवीन माहितीसाठी Page ला Follow करा

Address

Pravin Nagar , Amravati
Amravati
444604

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nikhil Deore Stories posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Nikhil Deore Stories:

Share