महाराष्ट्राचा भिडू बच्चू कडू

  • Home
  • India
  • Amravati
  • महाराष्ट्राचा भिडू बच्चू कडू

महाराष्ट्राचा भिडू बच्चू कडू शेतकऱ्यांची कर्जमाफी होईपर्यंत शांत बसणार नाही :- बच्चू कडू #शेतकरीकैवारीबच्चूभाऊ

14/10/2025
रोज शेतकरी आपलं जीवन संपवून घेत असताना ज्याला घरात बसवेल तो शिवरायांचा मावळा कसा असू शकतो?कोकणातील एका गावातून या ७५ वर्...
13/10/2025

रोज शेतकरी आपलं जीवन संपवून घेत असताना ज्याला घरात बसवेल तो शिवरायांचा मावळा कसा असू शकतो?

कोकणातील एका गावातून या ७५ वर्षांच्या आजीबाई रत्नागिरीत शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मेंढपाळ, मच्छीमार यांच्यासाठी बच्चूभाऊंनी काढलेल्या हक्कयात्रेला आल्या होत्या. एकच पाय असणाऱ्या आणि काठीचा आधार घेत चालणाऱ्या या आजीबाई एवढं अंतर चालत, जीवाला त्रास करून घेत कशासाठी आल्या असतील असा प्रश्न पाहणाऱ्याला पडेल. मात्र राज्यात रोज शेतकरी आपलं जीवन संपवून घेत असताना ज्याला घरात बसवेल तो शिवरायांचा मावळा कसा असू शकतो असं म्हणत या आजीबाई खास बच्चूभाऊंना भेटायला आल्या.

दिवसरात्र शेतात राबून रक्ताचं पाणी करून शेतमाल पिकवणाऱ्या शेतकऱ्याला हमीभाव मिळत नसल्याने तो कर्जबाजारी होतोय..कर्जाचा डोंगर वाढून झाडाला लटकून मरण्याशिवाय त्याच्या हातात काही राहत नाही. तेव्हा बळीराजाला वाचवायचं असेल तर आता त्याच्यासाठी रस्त्यावर उतरून लढावं लागेल हे या आजीबाईंनी जाणलंय. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा कायम शेतकरी भिमुख धोरण राबवत बळीराजाच्या कष्टाची जाण ठेवली होती. आज मात्र या सरकारला महाराजांच्या रयत भिमुख धोरणांचा विसर पडलेला आहे. अशात रायगडाच्या पायथ्याला राहणाऱ्या या आज्जी मी महाएल्गार आंदोलनाला नागपूरला येणारंच असं बच्चूभाऊंना म्हणाल्या तेव्हा क्षणभर असं वाटलं कि छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळाच बोलतोय.

४३ दिवसापासून बच्चूभाऊ कडू महाराष्ट्रभर फिरले. ३३ जिल्हे पालथे घालून ९० पेक्षा जास्त सभा घेतल्या. कोणासाठी? कशासाठी? तर ...
13/10/2025

४३ दिवसापासून बच्चूभाऊ कडू महाराष्ट्रभर फिरले. ३३ जिल्हे पालथे घालून ९० पेक्षा जास्त सभा घेतल्या. कोणासाठी? कशासाठी? तर आपल्या शेतकऱ्यांसाठी, त्यांच्या कर्जमाफीसाठी. आज महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत आहे, खिशात एक तर पैसा नाही, आणि अस्मानी संकटांनी काळजावर घाव घातलाय. सरकार शेतकऱ्यांकडे बघायला तयार नाही. जाती- धर्मात भांडणे लावून, शेतकऱ्याकडे दुर्लक्ष्य करून उद्योगपतींची घरे भरली जातायत. शेतकऱ्याच्या बाजूने बोलायला साधं कोणी तयार करताना बच्चू कडू नावाचा आवाज सध्या महाराष्ट्रभर घुमतोय. शेतकऱ्यांवरील अन्यायाविरोधात आवाज उठवतोय. शेतकऱ्यांचाही मोठा पाठिंबा भाऊंना मिळाला आणि तब्बल १४ लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी भाऊंच्या हक्कयात्रेत सहभाग नोंदवला. आत्तापर्यंत खूप अन्याय सहन केला. आता वेळ आली आहे शेतकऱ्यांची ताकद दाखवण्याची, आपल्या एकजुटीने सरकारला घाम फोडण्याची. म्हणूनच जात पात धर्म सोडा आणि शेतकरी म्हणून आपल्या न्यायहक्कासाठी आणि कर्जमाफीच्या लढ्यासाठी पेटून उठा हाच संदेश देत बच्चूभाऊनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. येत्या २८ ऑक्टोबरला आपली आरपारची लढाई आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी थेट मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात जाऊन शेतकऱ्यांचा महाएल्गार करूया. निर्दयी सरकारला आपला दणका देऊन कर्जमाफी मिळवूया. कर्जमाफी घेतल्याशिवाय थांबायचं नाही. #कर्जमाफीद्या #७/१२कोराकोराकोरा

13/10/2025

सत्तेत असतांनाही बच्चूभाऊ एवढेच रोखठोक बोलत होते आणि आताही शेतकऱ्यांसाठी रोखठोक बोलत आहेत!!!

गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त झालेल्या शेतकरी सत्रात राजू शेट्टी, अजित नवले आणि...
12/10/2025

गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त झालेल्या शेतकरी सत्रात राजू शेट्टी, अजित नवले आणि बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जोरदार भूमिका मांडली.

ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाल्याचे नमूद करत —
• बच्चू कडू यांनी तत्काळ कर्जवसुली थांबवून सर्वसमावेशक कर्जमाफी व हमीभावाची मागणी केली.
• अजित नवले यांनी सरकारने मोठ्या योजना न राबवता शेतकऱ्यांना थेट आधार द्यावा, असे सांगितले.
• राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांनी जाती-पंथाच्या पलीकडे एकत्र येऊन संघर्षाची ‘वज्रमुठ’ तयार करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमात राष्ट्रसंतांच्या ओव्यांमधून शेतकऱ्यांच्या व्यथा अधोरेखित करण्यात आल्या आणि 28 ऑक्टोबर नागपूर आंदोलनात सर्वांनी हजेरी लावण्याचे आवाहन करण्यात आले.

तडजोड संपली, चलो नागपुर रणांगणं…
11/10/2025

तडजोड संपली, चलो नागपुर रणांगणं…

मोझरी जि. अमरावती येथे राष्ट्रसंत श्री. तुकडोजी महाराज यांच्या ५७ व्या स्मृतीदिनानिम्मीत्त ग्रामगीता तत्वज्ञान व आचरण या...
11/10/2025

मोझरी जि. अमरावती येथे राष्ट्रसंत श्री. तुकडोजी महाराज यांच्या ५७ व्या स्मृतीदिनानिम्मीत्त ग्रामगीता तत्वज्ञान व आचरण यांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी शेतीविषयक अनेक कार्ये केली याचा उलघडा करत ज्यामध्ये त्यांनी 'ग्रामगीता' या ग्रंथातून शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या आणि त्यावर उपाय सुचवले. त्यांनी ग्रामीण विकासाला महत्त्व दिले, ज्यामुळे शेतकऱ्यांचे जीवन सुखी होईल आणि गाव समृद्ध होईल अशी कल्पना त्याकाळी मांडली होती.
या कार्यक्रमास मा. आमदार बच्चू कडू , मा.खासदार राजू शेट्टी, कॅा.डॅा. अजित नवले, सत्यपाल महाराज, संयोजक रवि मानव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

महाएल्गार..
11/10/2025

महाएल्गार..

भव्य शेतकरी सभा शनिवार, दि. ११ ऑक्टोबर २०२५ ठिकाण - गुरुकुंज मोजरी वेळ - सायंकाळी ७ वाजता. प्रमुख उपस्थिती - मा. बच्चू क...
10/10/2025

भव्य शेतकरी सभा
शनिवार, दि. ११ ऑक्टोबर २०२५
ठिकाण - गुरुकुंज मोजरी
वेळ - सायंकाळी ७ वाजता.
प्रमुख उपस्थिती - मा. बच्चू कडू, मा. राजू शेट्टी, डॉ. अजित नवले

Address

Amravati

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when महाराष्ट्राचा भिडू बच्चू कडू posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category