Shrikant Joshi

  • Home
  • Shrikant Joshi

Shrikant Joshi EX MLC Marathwada Vidhanparishad. (BJP)
DM for paid promotion, advertisement etc. politican Hello,
I am Shrikant A. Due to this, people's mood deteriorates.
(2)

Joshi, a former MLA from Marathwada Graduate Constituency. I have created this page to connect with people through knowledge and information. My intention is to do some constructive work through all this. Nowadays, along with social media, almost all the media, we only get to read and see blatant and negative news and incidents. The purpose behind the creation of this page is to prevent this from happening and to make people fun.

“चंद्राच्या दक्षिण ध्रुवापासून अंतराळाच्या नव्या क्षितिजापर्यंत… भारताची अवकाशभरारी!”२३ ऑगस्ट २०२३ हा दिवस भारतीय अंतराळ...
23/08/2026

“चंद्राच्या दक्षिण ध्रुवापासून अंतराळाच्या नव्या क्षितिजापर्यंत… भारताची अवकाशभरारी!”
२३ ऑगस्ट २०२३ हा दिवस भारतीय अंतराळ संशोधनाच्या इतिहासातील सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला. याच दिवशी चांद्रयान-३च्या विक्रम लँडरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशाजवळ यशस्वी सॉफ्ट लँडिंग केले. या ऐतिहासिक कामगिरीमुळे भारत चंद्रावर यशस्वीपणे उतरणारा चौथा देश आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशाजवळ पोहोचणारा पहिला देश ठरला. या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ २३ ऑगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय अंतराळ दिवस’ म्हणून घोषित करण्यात आला.

२०२४ मध्ये पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस साजरा झाला, तर त्यानंतर दरवर्षी हा दिवस भारताच्या अंतराळ क्षेत्रातील यश, वैज्ञानिकांची मेहनत, नवकल्पना आणि देशातील तरुणांमध्ये विज्ञानाबद्दलची उत्सुकता वाढवण्यासाठी साजरा केला जात आहे.

आज २०२६ मध्ये राष्ट्रीय अंतराळ दिवस साजरा करताना चांद्रयान-३च्या यशाकडे केवळ एका मोहिमेचे यश म्हणून पाहता येणार नाही. या मोहिमेने भारताच्या अंतराळ संशोधनाची क्षमता जगासमोर अधोरेखित केली आणि पुढील पिढीला विज्ञान, तंत्रज्ञान आणि अंतराळ संशोधनाची स्वप्ने पाहण्याची प्रेरणा दिली.

चांद्रयान-३नंतरही भारताची अंतराळयात्रा थांबलेली नाही. विविध वैज्ञानिक मोहिमा, रोबोटिक्स आणि भविष्यातील मानवी अंतराळ मोहिमांसाठी देश सातत्याने पुढे जात आहे. २०२६ मध्येही विद्यार्थ्यांसाठी आणि तरुण नवकल्पकांसाठी ISROकडून विविध उपक्रम सुरू आहेत; उदाहरणार्थ, ISRO Robotics Challenge–URSC 2026 हा तरुण नवकल्पकांना भविष्यातील अंतराळ संशोधनासाठी तंत्रज्ञान विकसित करण्याची संधी देणारा राष्ट्रीय स्तरावरील उपक्रम आहे.

चंद्रावर पोहोचलेला भारत आता अंतराळाच्या आणखी दूरच्या क्षितिजांकडे झेपावत आहे. आपल्या शास्त्रज्ञांच्या बुद्धिमत्ता, जिद्द आणि अथक परिश्रमांना सलाम करत आपण राष्ट्रीय अंतराळ दिवस साजरा करूया.
राष्ट्रीय अंतराळ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
#राष्ट्रीयअंतराळदिवस #चांद्रयान3 #चंद्रयान3 #भारताचेअंतराळयश #भारतीयअंतराळसंशोधन #इस्रो #अंतराळसंशोधन #अंतराळविज्ञान #भारताचीअवकाशभरारी #चंद्रावरभारत #अवकाशभरारी #विज्ञान #विज्ञानाचीउंचभरारी #भारतीयवैज्ञानिक #अंतराळ

इंग्लिश चॅनल जिंकणारी भारताची पहिली ‘जलपरी’… आरती साहा!(जन्म :२४ सप्टेंबर १९४० – मृत्यू :२३ ऑगस्ट १९९४)आपल्या भारताच्या ...
23/08/2026

इंग्लिश चॅनल जिंकणारी भारताची पहिली ‘जलपरी’… आरती साहा!
(जन्म :२४ सप्टेंबर १९४० – मृत्यू :२३ ऑगस्ट १९९४)
आपल्या भारताच्या क्रीडा क्षेत्रात जसे पुरुषांनी कायम देशाचं परड जड ठेवलं आहे. त्याचप्रमाणे महिलांनीही क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. सायना नेहवाल, मेरी कोम, सानिया मिर्झा, दीपिका पल्लीकल, पी.टी.उषा यांच्या सारख्या खेळाडू देशाचं नाव मोठं करण्यात योगदान देत आहेत. पण फक्त क्रीडा क्षेत्रातच नाही तर अनेक क्षेत्रातही भारतीय महिला हिऱ्यासारख्या चमकत आहेत. जसे आपण भारताची उडती परी म्हणून पी.टी उषा यांना ओळखतो. पण तुम्हाला माहिती आहे का? आपल्या भारताच्या जलपरीबद्दल? त्या आहेत इंग्लिश चॅनल पार करणारी जगातील पहिल्या महिला जलतरणपटू आरती साहा. जलतरणपटूंसाठी आरती एखाद्या प्रेरणास्थानापेक्षा कमी नाही. १९५९ च्या या दिवशी म्हणजेच २९ सप्टेंबरला वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी आरती यांनी असा इतिहास रचला, जो आजही लोकांच्या स्मरणात आहे. आरतीने १६ तास २० मिनिटांत इंग्लिश चॅनल पार करून जलतरणाच्या जगात एक नवा विक्रम रचला होता आणि यासोबतच त्या पोहून इंग्लिश चॅनल पार करणाऱ्या पहिल्या आशियाई महिला म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. त्यांनी ऑलिम्पिक स्पर्धेत पदार्पण केले तेव्हा त्या केवळ ११वर्षांच्या होत्या. १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी पदार्पण केले. त्याचबरोबर हा आरती साहाचा असा विक्रम आहे जो अद्याप कोणत्याही खेळाडूने मोडलेला नाही आणि यासोबतच भविष्यात हा विक्रम क्वचितच कोणी मोडू शकेल. आरती साहाचा जन्म २४ सप्टेंबर १९४० रोजी कलकत्ता येथे झाला. जिथे त्यांनी वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी पोहण्यात रस घेण्यास सुरुवात केली आणि वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी त्यांनी पहिल्या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. १९४६ मध्ये शैलेंद्र मेमोरियल जलतरण स्पर्धेत आरतीने पहिले सुवर्णपदक जिंकले. सचिन नाग यांच्या मार्गदर्शनाखाली आरतीने त्यांचे प्रशिक्षण सुरू केले. सचिन नाग हे आशियाई गेम्स चॅम्पियन आणि ऑलिम्पियन होते. त्याच वेळी, आरती साहा त्यांच्या नेतृत्वाखाली भारतातील सर्वोत्तम तरुण जलतरणपटूंपैकी म्हणून उदयास आल्या. यानंतर त्या सतत जिंकत राहिल्या आणि अनेक विक्रम आपल्या नावावर केले. आरतीने १९५१ साली १०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये राष्ट्रीय विक्रम केला. १९५१ पर्यंत त्यांनी २२ पदके आपल्या नावावर केली होती. १९५२ मध्ये, जेव्हा त्यांनी फिनलंडची राजधानी हेलसिंगी येथे ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला तेव्हा त्या फक्त १२ वर्षांच्या होत्या. आरती ह्या बांगलादेशी जलतरणपटू ब्रोजेन दास यांच्याकडून प्रेरित होत्या, जे १९५८ मध्ये इंग्लिश चॅनेल ओलांडणारे पहिले आशियाई खेळाडू होते. त्यानंतर आरती साहा यांनी या कोर्सकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आणि त्यासाठी मेहनत करायला सुरुवात केली. त्याचवेळी इंग्लिश चॅनल ओलांडणारे पहिले भारतीय ॲथलीट मिहिर सेन यांनी त्यांना खूप साथ दिली. इंग्लिश चॅनेल ओलांडण्याचा त्यांचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाला. कारण हवामानात बदल, समुद्राच्या मजबूत लाटा. ६ तासांच्या प्रयत्नानंतर आरतीला परतावे लागले. आरतीने पराभव स्वीकारला नाही. पुन्हा एकदा प्रयत्न केला आणि यावेळी १६ तास २० मिनिटांत इंग्रजी चॅनल पार केली. अशाप्रकारे २९ सप्टेंबर १९५९ ही तारीख या विक्रमाची साक्षीदार ठरली. इंग्लिश चॅनल ओलांडणे हे कोणत्याही जलतरणपटूसाठी स्वप्नापेक्षा कमी नाही. हा विक्रम त्यांनी केला म्हणून त्यांना जलपरी म्हणून संबोधल जात. इंग्लिश चॅनेल अटलांटिक समुद्राचा एक भाग आहे, जो दक्षिण ब्रिटन आणि उत्तर फ्रान्सला एकमेकांपासून वेगळे करतो. ही जलवाहिनी सुमारे ५५० किलोमीटर लांब आहे, परंतु जलतरणपटूंना ही जलवाहिनी ओलांडण्याचे अंतर ३५ किलोमीटर आहे. आरती यांच्या जीवनातून अनेक महिला व मुलींना प्रेरणा मिळाली. यातून प्रेरणा घेऊन १९९८ मध्ये टपाल तिकीट काढण्यात आले. आरती साहा यांना १९६० मध्ये भारतातील चौथा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री देण्यात आला. २३ ऑगस्ट १९९४ रोजी या दिग्गज भारतीय खेळाडूने जगाचा निरोप घेतला. इंग्लिश चॅनल पार करणारी जगातील पहिल्या महिला जलतरणपटू आरती साहा यांना स्मृतिदिनानिमित विनम्र अभिवादन!
श्रीकांत अ. जोशी (आणि क्रिएटिव्ह टीम)
माजी आमदार
मराठवाडा पदवीधर मतदारसंघ

23/08/2026

🌶️🥔 जागतिक वडा पाव दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🥔🌶️

मुंबईच्या रस्त्यांपासून जगभराच्या ताटापर्यंत पोहोचलेली चव…
वडा पाव म्हणजे फक्त खाद्यपदार्थ नाही, तर महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीची एक खास ओळख! ❤️

गरमागरम वडा, मऊ पाव आणि झणझणीत चटणी…
एक घास आणि मन म्हणतं — “बस्स! हाच तो आपला वडा पाव!” 😋
🍔 वडा पाव खा… आनंद घ्या… आणि आपल्या या लाडक्या पदार्थाचा अभिमान बाळगा!
✨ जागतिक वडा पाव दिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! ✨
#जागतिकवडापावदिवस #वडापाव #मुंबईचावडापाव #महाराष्ट्राचाखाऊ #मराठमोळाखाऊ #महाराष्ट्राचीशान #खवय्ये #खाद्यसंस्कृती #स्ट्रीटफूड #मराठीसंस्कृती #महाराष्ट्रीयनफूड #मुंबईफूड

‘सांगत्ये ऐका’ची अविस्मरणीय नायिका… हंसा वाडकर!(जन्म :२४ जानेवारी १९२३, मृत्यू : २३ ऑगस्ट १९७१)काही चित्रपट रसिकांच्या म...
23/08/2026

‘सांगत्ये ऐका’ची अविस्मरणीय नायिका… हंसा वाडकर!
(जन्म :२४ जानेवारी १९२३, मृत्यू : २३ ऑगस्ट १९७१)
काही चित्रपट रसिकांच्या मनावर एवढं अधिराज्य करतात की काळ किती जरी लोटला तरी त्या चित्रपटांचा विसर लोकांना कधीच पडत नाही. असाच एक चित्रपट म्हणजे 'सांगत्ये ऐका' या चित्रपटाने १३० आठवडे सलग एकच ठिकाणी चालण्याचा उच्चांक निर्माण केला होता. ' सांगत्ये ऐका' हे दोन शब्द कानावर पडले की एकतर सिनेमा आठवतो किंवा अभिनेत्री हंसा वाडकर. चित्रपट अभिनेत्री हंसा वाडकर यांनी एकेकाळी अनेक मराठी आणि हिंदी सिनेमे गाजवले. आज विस्मृतीत गेलेली, पण एकेकाळी मराठी चित्रपट आणि नाटकांमधून आपल्या अभिनयातून रसिकांन लुभावणाऱ्या.
हंसा वाडकर २४ जानेवारी १९२३ रोजी मुंबईत जन्मलेल्या आणि त्यांचे मूळ नाव रतन होते. त्यांची आजी, ज्यांना विस्तारित कुटुंब "जीजी" म्हणून संबोधित होते, रतनच्या आजी बयाबाई साळगावकर या चांगल्या गायिका होत्या. त्यांच्या मृत्यूनंतर मालमत्तेचे विभाजन झाल्यानंतर हे कुटुंब सावंतवाडीला गेले. पण साळगावकरांच्या मद्यपानामुळे ते गरीब झाल्याने त्यांना लवकरच मुंबईला परतावे लागले. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी रतनच्या दोन मोठ्या बहिणींनी चित्रपटात पाऊल ठेवले. त्यांना मराठी माध्यमाच्या शाळेत पाठवण्यात आले आणि त्यानंतर इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दोन वर्षे राहिलया पण त्यांचे शिक्षण कमी झाले कारण कुटुंबाचा विश्वास होता की त्यांचा धाकटा भाऊ, एकुलता एक मुलगा, शालेय शिक्षणास अधिक पात्र आहे. रतनने स्वत: संगीत आणि नृत्याचे प्रशिक्षण घेतले होते आणि त्या अतिशय आकर्षक होत्या, ज्यामुळे त्यांना भारतातील नवोदित सिनेमा उद्योगात पाऊल टाकणे अपरिहार्य होते. मराठी- हिंदीबरोबरच इंग्रजी भाषेवरही त्यांनी प्रभुत्व मिळवलं. काही काळातच रतन तयार झाली आणि वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी तिला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी त्यांचं लग्न झालं आणि इथून त्यांच्या वादळी आयुष्याची सुरुवात झाली. हंसाबाईंना अभिनेत्री म्हणून पहिल्यांदा नाव मिळवून दिलं ते प्रभातच्या संत सखू चित्रपटाने. या चित्रपटामधील संत सखूची अतिशय सोज्ज्वळ भूमिका हंसाबाईनं मोठ्या ताकदीनं साकारली होती. या भूमिकेच्या अगदी विपरीत भूमिका त्यांनी व्ही. शांताराम आणि बाबूराव पेंटर यांचं संयुक्त दिग्दर्शन असलेल्या लोकशाहीर राम जोशी या चित्रपटामध्ये साकारली, या चित्रपटात त्यांनी बया या तमासगिरीणीची व्यक्तिरेखा वठवली होती. सुंदरा मनामंदी भरली... हवेलीत शिरली... जरा नाही ठरली... मोत्याचा भांग.... या रामजोशींच्या काव्यांनी आणि हंसाबाईंच्या ठसक्याने बहार आणली, या दोन्ही भूमिकांमध्ये जमीन-अस्मानाचं अंतर होतं. परंतु आपल्या अदाकारीनं हंसाबाईनं हे अंतर पुसून टाकलं, गौरा वर्ण, सतेज काती, हसरे, टपोरे डोळे, सडसडीत बांधा आणि या जोडीला अभिनयाची लाभलेली देणगी. सात दशकांपूर्वीच्या त्या मराठी चित्रपटसृष्टीतल्या अप्सरा होत्या. त्या यशाच्या शिकरावर चडत होत्या पण त्यांच्या भावाने कौटुंबिक नावाचा “अपमान” टाळण्यासाठी त्यांना नाव बदलण्याचा आग्रह धरला. त्यामुळे त्यां हंसा बनलया आणि एक नवीन मनोरंजन व्यक्तिमत्त्वाचा जन्म झाला. रामजोशी चित्रपट सुपरहिट ठरला आणि हंसाबाईंच्या कारकिर्दीची गाडी धावायला लागली. व्ही. शांताराम, गजानन जागीरदार, राजा परांजपे, राजा ठाकूर, भालजी पेंढारकर यांच्यासारख्या श्रेष्ठ दिग्दर्शकांकडे काम करण्याची संधी त्यांना मिळाली.
या काळात त्यांनी रामशास्त्री, धन्यवाद, पुढचं पाऊल, मी तुळस तुझ्या अंगणी, नायकिणीचा सज्जा, सांगत्ये ऐका यांसारखे मोजकेच चित्रपट केले. त्याला मुख्य कारण ठरले ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामधील संकटं पतीबरोबरील मतभेदांमुळे त्यांनी एका क्षणी घर सोडल आणि पुढे त्यांचं सगळंच आयुष्यच भरकटत गेले. याचा विपरीत परिणाम त्यांच्या कारकिर्दीवर झाला. आपल्या आयुष्यातील वैयक्तिक घडामोडींना कारकिर्दीपासून दूर ठेवण्यात त्यांना अपयश आले. त्यामुळे चांगल्या भूमिका मिळण्याची संधी असूनही तिचा लाभ त्यांना उठवता आला नाही. चित्रपटसृष्टीतील ग्लॅमर जगतामध्ये वाहवत जाण्याची कारणमीमांसा त्यांनी सांगत्ये ऐका या आपल्या आत्मचरित्रात केली आहे. "चित्रपटसृष्टी म्हणजे एक जाळं आहे. या जाळ्यात जो अडकला त्याची सुटका नाही, असा उल्लेख त्यांनी या पुस्तकात केला होता. २३ ऑगस्ट १९७१ साली त्यांचे निधन झाले. हंसाबाईंनी आपल्या कारकिर्दीत मोजकेच चित्रपट केले. परंतु, त्यातील त्यांच्या भूमिका आणि पडद्याबाहेरच्या बेफाम वागण्यानं त्या प्रेक्षकांच्या सदैव लक्षात राहिल्या. हंसाबाईंचं आयुष्य एवढे जबरदस्त होतं की श्याम बेनेगलांच्या विख्यात दिग्दर्शकाला त्यांच्यावर भूमिकासारखा चित्रपट बनविण्याची इच्छा झाली.
अभिनेत्री हंसा वाडकर यांना पुण्यतिथी निमित विनम्र अभिवादन!
श्रीकांत अ. जोशी (आणि क्रिएटिव्ह टीम)
माजी आमदार
मराठवाडा पदवीधर मतदारसंघ
#हंसावाडकर #मराठीचित्रपटअभिनेत्री

23/08/2026

“देणाऱ्याने देत जावे…” — मराठी मनावर अधिराज्य गाजवणारे विंदा!
(जन्मः २३ ऑगस्ट १९१८ - मृत्यूः १४ मार्च २०१०)
“देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे
हिरव्या पिवळ्या माळावरुनी
सह्याद्रीच्या कड्यावरुनी छातीसाठी ढाल घ्यावी”
ही कविता जी जगणे सुसह्य करते आणि जीवनातले नवे अर्थ नव्या संदर्भाने समोर मांडते. आजही ती वाचकांना इतकी भावते की जेव्हा पण कवितेतल्या ओळी वाचल्या जातात तेव्हा एक वेगळी ऊर्जा मनात संचारते. अशांसारख्या एकाहून एक सरस कविता लिहिणारे काव्य जगातले जादूगार म्हणजे कविवर्य विंदा करंदीकर यांची आज जयंती विंदा करंदीकर म्हणजे आपलेसे वाटणारे कवी त्यांच्या कवितेचे एक वैशिष्ट्य होते. प्रामाणिकपणा होता ,ज्यात बेगडी संस्कृती, अनावश्यक औपचारिकता, ओढूनताणून जोडलेले कोणतेही राजकीय, धार्मिक, जातीचे संदर्भ नव्हते. सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या विंदांच्या उत्तमोत्तम कविता आहेत, पण त्या सुद्धा एका संदर्भाशी अडकलेल्या किंवा कोणत्याही वैयक्तिक असूया, द्वेष, ह्यातून आलेल्या नाहीत.
विंदांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू होते. ते विज्ञाननिष्ठ मार्क्सवादी होते. त्याच वेळी जाणीववादीही होते. दर्शनी विरोध मावळून जावेत, अशीच त्यांची पिंडप्रकृती होती. त्यामुळेच कवी आणि समीक्षक या दोन्ही रूपांत प्राप्त झालेली प्रतिभा आणि प्रज्ञा त्यांच्याकडे नांदू शकली. विंदांच्या काव्यामध्ये मुक्तशैलीतील कविता, सुनीते, गझल, तालचित्रे, मुक्तसुनीते, विरूपिका अशा विविध रचनाप्रकारांचा समावेश आहे. साम्यवादाच्या लढ्यातही विंदा सक्रिय होते. मनुष्य, त्याचे व्यक्तीमत्व, त्याच्या वृत्ती आणि त्याचा विकास याच्या आजुबाजूस फिरणारे विंदांचे चिंतन होते. त्याच्या प्रकटीकरणासाठी त्यांनी प्रतिमांचे अनेक पैलू हाताळले. परंपरावाद न मानणारे, स्वायत्त, स्वयंभूत्वावर श्रद्धा असणारे, मनाच्या कोतेपणास अव्हेरणारे असे त्यांचे काव्य आहे. पूर्वजांच्या पुण्याईचे भांडवल न करता, स्वकर्तृत्वाने जीवन जगावे असे शिकवणाऱ्या कविता त्यांनी लिहिल्या. विंदांच्या प्रेम कवितेत तितकाच रांगडेपणा आहे. निःसंकोच, बेदरकारपणे केलेला.
देहिक प्रेमाची आसक्ती त्यांनी कधीही नाकारली नाही. स्री शरीर आणि त्याचे सौंदर्य याचे वर्णन त्यांच्या काव्यात आढळते. मात्र त्यात अनादर कुठेही नाही. शारीरिक आसक्ती हा देखील प्रेमाचाच पवित्र रंग असल्याची भावना रुजवणारे काव्य आहे.
विंदांनी मराठी काव्यमंजूषेत विविध घाटाच्या रंजक व वैचारिक काव्यलेखनाची भर घातली, त्यांनी मराठी बालकवितेची मुहूर्तमेढ रोवली. विंदाचे पहिले काव्यवाचन आचार्य भागवत यांच्याकडे झाले होते. इ.स. १९४९ साली पुण्यात भरलेल्या मराठी साहित्य संमेलनातील पहिल्या जाहीर काव्यवाचनाने त्यांचा मराठी भाषकांना परिचय झाला. हैदराबाद मुक्ती संग्रामात त्यांनी भाग घेतला आणि त्यासाठी तुरुंगवासही भोगला. त्यांनी स्वातंत्र्य सैनिकांना मिळणारे वेतनपण कधी स्वीकारले नाही.
आयुष्याच्या वास्तवाकडे इतक्या डोळसपणे आणि तरीही त्रयस्थपणे बघणाऱ्या विंदांनी बालकविता लिहिताना सुद्धा त्यांचं वेगळेपण जपलं. १९९९ मध्ये ` स्वप्नांत पहिली राणीची बाग सारख्या कविताही त्यांनी लिहिल्या. विंदांच्या बालकविता हा त्यांचा एक वेगळाच पैलू आहे. एकदा काय झाले, सशाचे कान, एटू लोकांचा देश, परी ग परी, अजबखाना, सर्कसवाला, पिशीमावशी आणि तिची भुतावळ, अडम् तडम्, टॉप, सात एके सात, बागुलबोवा. हे त्यांचे बाल काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. या बालकविता अत्यंत वेगळ्या अशा आहेत. नाविन्यपूर्ण कल्पना आणि विनोदाची छानशी फोडणी ही त्यांची वैशिष्ट्ये होती. मराठीतल्या मोजक्याच ज्ञानपीठ विजेत्यांपैकी असलेल्या विंदा करंदीकर यांचे साहित्यिक कर्तृत्व मोठे आहे. अमृतानुभवापासून ते नवकवितेपर्यंत त्यांची प्रतिभा आणि लेखणी लीलया फिरली आहे. या सगळ्या लेखनाच्या जोरावर त्यांना देशाच्या साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च असणारा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना भेटला. वि.स.खांडेकर आणि कुसुमाग्रज यांच्यानंतर हा पुरस्कार मिळणारी ते तिसरे मानकरी होते. याशिवाय करंदीकरांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, कबीर सन्मान, जनस्थान पुरस्कार सारखे अनेक सन्मान व पुरस्कार देण्यात आले.
त्यांच्या काव्य असो वा लेखन कधीही जुन्या होणार नाही आणि असे आपले विंदा त्यांच्या काव्यातून नेहमी आपल्यात राहतील.
कविवर्य विंदा करंदीकर यांना जयंती निमित विनम्र अभिवादन!
श्रीकांत अ. जोशी(आणि क्रिएटिव्ह टीम)
माजी आमदार
मराठवाडा पदवीधर मतदारसंघ
#कविवर्यविंदाकरंदीकर #विंदाकरंदीकर
#मराठीतीलकवी #लेखक #अनुवादक #समीक्षक

सूर्यदेवाची कृपादृष्टी सदैव आपल्या सर्वांवर राहो,आपल्या जीवनात आरोग्य, आयुष्य, यश, सुख आणि समृद्धीचा प्रकाश सदैव नांदो. ...
23/08/2026

सूर्यदेवाची कृपादृष्टी सदैव आपल्या सर्वांवर राहो,
आपल्या जीवनात आरोग्य, आयुष्य, यश, सुख आणि समृद्धीचा प्रकाश सदैव नांदो.
सर्वांना आदित्य पूजनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
#आदित्यपूजन #सूर्यपूजन #सूर्यदेव #सूर्यनारायण #आदित्य #ॐसूर्यायनमः #सूर्यउपासना #सूर्यमंत्र #आध्यात्मिक #सनातनधर्म #हिंदूसंस्कृती #भारतीयसंस्कृती #धार्मिक #भक्ती #भक्तिमार्ग #शुभेच्छा #सूर्यदेवाचीआराधना #आरोग्य #आयुष्य #समृद्धी

जयघोष चाले चंद्रभागेच्या तीरी, वारीच्या धुंदीत संत मंडळी सारी, रंगला किर्तन सोहळा भारी, बोला विठ्ठल विठ्ठल..!पुत्रदा एका...
23/08/2026

जयघोष चाले चंद्रभागेच्या तीरी,
वारीच्या धुंदीत संत मंडळी सारी,
रंगला किर्तन सोहळा भारी,
बोला विठ्ठल विठ्ठल..!
पुत्रदा एकादशी निमित्त
हार्दिक शुभेच्छा..!
#पुत्रदा_एकादशी #पुत्रदाएकादशीव्रत #एकादशी #पंढरीचावारकरी #किर्तनसोहळा #बोलाविठ्ठलविठ्ठल

विचारांना शब्द आणि शब्दांना सामर्थ्य देणारा साहित्यिक – यू. आर. अनंतमूर्ती!(जन्म: २१ डिसेंबर १९३२ – मृत्यू: २२ ऑगस्ट २०१...
22/08/2026

विचारांना शब्द आणि शब्दांना सामर्थ्य देणारा साहित्यिक – यू. आर. अनंतमूर्ती!
(जन्म: २१ डिसेंबर १९३२ – मृत्यू: २२ ऑगस्ट २०१४)
भारतीय साहित्यविश्वात एक अमूल्य रत्न म्हणून ओळखले जाणारे नाव म्हणजे यू. आर. अनंतमूर्ती. कन्नड साहित्याला जागतिक स्तरावर विशेष स्थान मिळवून देणाऱ्या अनंतमूर्तींनी आपल्या लेखणीच्या जोरावर समाजातील समस्यांना आणि मानवी जीवनाच्या गुंतागुंतींना अचूक शब्दांत पकडले. त्यांचे लेखन केवळ कथा नसून, विचार, तत्त्वज्ञान, आणि सामाजिक प्रश्नांवर आधारित गहन चिंतन आहेत. त्यांचे पूर्ण नाव उडुपी राजगोपालाचार्य अनंतमूर्ती होते. त्यांच्या जन्म २१ डिसेंबर १९३२ रोजी कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यात झाला. अनंतमूर्तींच्या लेखनाची खरी ताकद त्यांचं वास्तववादी दृष्टिकोन आणि मानवी भावनांचं सूक्ष्म वर्णन होतं. त्यांच्या कादंबऱ्या आणि कथांनी कन्नड साहित्याला नवा आयाम दिला.
त्यांनी आपल्या शिक्षणाची सुरूवात दूरवासपुरा मधील एका संस्कृत विद्यालयातून केली होती. त्यानंतर त्यांनी इंग्रजी आणि तुलनात्मक साहित्य या संबंधातील शिक्षण म्हैसूर आणि बर्मिंघम (इंग्लंड) येथून घेतले. १९६६ मध्ये त्यांनी बर्मिंघम विश्वविद्यालयातून ‘राजकारण आणि साहित्य’ या विषयावर शोधप्रबंध सादर करून पी. एच. डी. ही पदवी प्राप्त केली होती. शिक्षण पूर्ण केल्यानंतर, अनंतमूर्ती यांनी म्हैसूर विद्यापीठात इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून आपली कारकीर्द सुरू केली तसेच ते केरळमधील महात्मा गांधी विद्यापीठाचे कुलगुरूही राहिले होते. त्यांचा पहिला कथासंग्रह ‘एन्देन्दु मुगियद कथे’ प्रकाशित झाला. समकालीन स्थितीवर आपल्या बहुआयामी अभिजात दृष्टीने, तसेच सूक्ष्म अध्यात्मिक चेतनेच्या माध्यमातून अनंतमूर्ती यांनी आधुनिक जीवनातील अंतर्विरोध आणि तणाव यावर मौलिक चिंतन आणि संशोधन केले आहे. अनंतमूर्ती यांनी ‘एन्देन्दु मुगियद कथे’, ‘प्रश्ने’, ‘मौनी’ , ‘आकाश मट्टू बेक्कू’ , ‘एरडु दशकदा कथेगळु’ ,‘संस्कार’ , ‘भारतीपुरा’, ‘अवस्थे’ , ‘भव’, ‘मिथुन’,‘सन्निवेश’, ‘प्रज्ञे मत्तु परिसर’, ‘पूर्वापार’ इत्यादी पुस्तके लिहिली.
ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे अनंतमूर्ती हे कन्नडमधील सहावे व्यक्ती आहेत. ज्ञानपीठ हा देशातील अत्यंत प्रतिष्ठित साहित्य पुरस्कार आहे. ते १९९२ मध्ये नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष झाले तसेच १९९३ मध्ये साहित्य अकादमीचे अध्यक्ष बनले व जेएनयूसह अनेक प्रसिद्ध संस्थांमध्ये ते व्हिजिटिंग प्रोफेसर झाले.
अनंतमूर्ती यांना अनेक पुरस्कारांनी, सन्मानांनी गौरविण्यात आले. त्यात पद्मभूषण आणि ज्ञानपीठ पुरस्कार यांचा समावेश आहे. २२ ऑगस्ट २०१४ रोजी त्यांचे निधन झाले.
यू. आर. अनंतमूर्ती हे केवळ साहित्यिक नव्हते, तर एक विचारमूर्ती होते, ज्यांनी शब्दांच्या माध्यमातून समाजाला आरसा दाखवला. त्यांची लेखणी आणि विचार नेहमीच प्रेरणादायी राहतील.
यू. आर. अनंतमूर्ती यांना पुण्यतिथि निमित विनम्र अभिवादन!
श्रीकांत अ. जोशी (आणि क्रिएटिव्ह टीम)
माजी आमदार
मराठवाडा पदवीधर मतदारसंघ

गानमहर्षी पं. कृष्णराव शंकर पंडित : ग्वाल्हेर घराण्याचा अमूल्य वारसा! जन्म :२६ जुलै १८९४ , मृत्यू : २२ ऑगस्ट १९८९)भारतीय...
22/08/2026

गानमहर्षी पं. कृष्णराव शंकर पंडित : ग्वाल्हेर घराण्याचा अमूल्य वारसा!
जन्म :२६ जुलै १८९४ , मृत्यू : २२ ऑगस्ट १९८९)
भारतीय शास्त्रीय संगीतात "ग्वाल्हेर घराणे" ही एक पुरातन आणि प्रतिष्ठित परंपरा मानली जाते. या घराण्याच्या लौकिकात भर घालणारे, त्याला आधुनिक शिक्षणाचा आणि नवसर्जनशीलतेचा स्पर्श देणारे ज्येष्ठ गायक, संगीतसाधक आणि विचारवंत म्हणजे गानमहर्षी पं. कृष्णराव शंकर पंडित.
२६ जुलै १८९३ रोजी मध्य प्रदेशातील संगीतसंपन्न ग्वाल्हेर येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील शंकरराव पंडित हेही एक नामवंत गायक होते. लहानपणापासूनच कृष्णरावजींना घरातूनच संगीताचे बाळकडू मिळाले. पुढे नथू खान आणि निस्सार हुसेन खान या उस्ताद बाप-लेकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ख्याल, टप्पा, तराणा आणि लयकारी या गायनशैलींचे बारकावे आत्मसात केले.
केवळ ११व्या वर्षी त्यांनी रंगमंचावर पहिले गायन सादर केले, आणि १४व्या वर्षी त्यांनी ग्वाल्हेर दरबारात तरुण संगीतकार म्हणून एकल कारकीर्द सुरू केली ही त्यांच्या प्रतिभेची साक्ष होती.
फक्त गायक म्हणून नव्हे, तर एक दूरदृष्टीचा शिक्षणतज्ज्ञ म्हणूनही पं. कृष्णराव पंडित यांनी मोठे योगदान दिले. वयाच्या केवळ १८व्या वर्षी म्हणजेच १९१४ साली त्यांनी शंकर गंधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. ही संस्था आजही देशातील एक अग्रगण्य संगीत शिक्षण संस्था म्हणून मानली जाते.
संगीत केवळ गाण्यातच नाही, तर लेखनातही त्यांनी तितक्याच समरसतेने साधले. त्यांनी गायन आणि वाद्य संगीतासाठी विशेष अभ्यासक्रम तयार करून आठ पाठ्यपुस्तके आणि अनेक संगीतविषयक लेख लिहिले. त्यांच्या विचारशीलतेमुळे भारतीय संगीत शिक्षण अधिक पद्धतशीर आणि अभ्यासपूर्ण बनले.
त्यांनी आपल्या दोन पुत्र – लक्ष्मण कृष्णराव पंडित आणि चंद्रकांत पंडित तसेच नात डॉ. मीता पंडित यांच्यासह अनेक शिष्य घडवले. याशिवाय पं. शरतचंद्र आरोलकर हेही त्यांचे प्रसिद्ध शिष्य होत.
त्यांच्या संगीत साधनेचा गौरव राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर विविध पुरस्कारांनी झाला.
१९५९ – संगीत नाटक अकादमी पुरस्कार
१९७३ – भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार
१९७३ – मध्यप्रदेश शासनाचा शिखर सन्मान
१९८० – तानसेन पुरस्कार
याशिवाय आकाशवाणी पुरस्कार, सुरसिंगार संसद, जगतगुरु शंकराचार्य पीठ, संगीत भीष्माचार्य, संगीत सौरभ पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले.
पं. कृष्णराव पंडित हे ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शन या माध्यमांशी निर्माता म्हणूनही कार्यरत होते. त्यांनी अनेक मैफिली सतत सुरू ठेवत रसिकांसमोर आपली कला सादर केली. त्यांच्या अनेक सादरीकरणांचे ध्वनिमुद्रण आजही उपलब्ध आहे – एक अमूल्य ठेवा!
त्यांच्या जीवनावर आधारित साहित्यही उपलब्ध आहे. नीला भागवत यांनी लिहिलेल्या ‘ख्यालचे गुरू – पं. कृष्णराव शंकर पंडित’ या चरित्रात त्यांचे जीवन साकारले आहे. तसेच एम. चेरी यांनी लिहिलेल्या पुस्तकातही त्यांचे कार्य सविस्तर मांडले आहे. विशेष म्हणजे त्यांच्या नात मीता पंडित यांनी २०१८ मध्ये ‘India's Heritage of Gharana Music: The Pandits of Gwalior’ हे पुस्तक प्रकाशित केले.
२२ ऑगस्ट १९८९ रोजी वयाच्या ९६व्या वर्षी पं. कृष्णराव शंकर पंडित यांचे निधन झाले. त्यांनी भारतीय संगीताला दिलेले योगदान ही केवळ घराण्याची नाही, तर संपूर्ण देशाची सांगीतिक परंपरा जपणारी एक अमूल्य ठेव आहे. त्यांच्या नावासमोर लावले जाणारे "गानमहर्षी" हे विशेषण म्हणजे त्यांच्या कर्तृत्वाला दिलेला सर्वोत्कृष्ट मानच आहे.
ग्वाल्हेर घराण्याचे गौरवशाली नाव जगभर पोहोचवणारे, शंकर गंधर्व महाविद्यालयाच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांना घडवणारे, संगीताचा शास्त्रीय पाया अधिक मजबूत करणारे गानमहर्षी पं. कृष्णराव शंकर पंडित हे नाव भारतीय संगीताच्या इतिहासात सोन्याच्या अक्षरांनी कोरले गेले आहे.
त्यांच्या स्मृतीला शतशः प्रणाम!
श्रीकांत अ. जोशी (आणि क्रिएटिव्ह टीम)
माजी आमदार
मराठवाडा पदवीधर मतदार संघ
#

Address

A-7, Vedant Grahkul, New Shreyanagar, Chatrapati Sambhajinagar

431005

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shrikant Joshi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shrikant Joshi:

Shortcuts

  • Want your business to be the top-listed Media Company?

Share