Online Barshi ऑनलाइन बार्शी

Online Barshi ऑनलाइन बार्शी सत्यमेव जयते

09/04/2025

बार्शीतील अनेक महा-ई-सेवा केंद्राचा मनमानी कारभार, नागरिक त्रस्त – जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद नागरिकांची दखल घेणार का ?

Online Barshi ऑनलाइन बार्शी

बार्शी शहरातील अनेक महा-ई-सेवा केंद्रातील मनमानी कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शासनाच्या अधिकृत दरपत्रकानुसार सेवा शुल्क आकारले जाणे अपेक्षित असताना, अनेक केंद्रात नागरिकांकडून जास्त पैसे वसूल केल्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत.

सध्या नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यामुळे उत्पन्न प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, जात प्रमाणपत्र यांसारख्या आवश्यक शासकीय कागदपत्रांची मागणी वाढली आहे. हे कागदपत्र मिळवण्यासाठी पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने महा-ई-सेवा केंद्रात गर्दी करत आहेत. मात्र त्यांच्यावर अतिरिक्त आर्थिक बोजा लादला जात असल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.

नागरिकांनी यासंदर्भात चिंता व्यक्त करत म्हटले की, "या केंद्रातील कारभारावर कुणाचेही नियंत्रण नाही. अधिकृत रेटकार्ड असूनही मनमानी दर आकारले जात आहेत. हे सरळसरळ सर्वसामान्यांची लूट आहे."

यासोबतच एक महत्त्वाचा मुद्दा पुढे येतो तो म्हणजे – बार्शी शहरात नेमकी किती अधिकृत महा-ई-सेवा केंद्रे कार्यरत आहेत? तसेच बार्शी ग्रामीण भागातील अनेक व्यावसायिक शहरात येऊन महा-ई-सेवा व्यवसाय करीत आहेत. त्यामुळे स्थानिकांचे रोजगार संधी हिरावल्या जात आहेत का, हाही प्रश्न उपस्थित होतो.

या सर्व पार्श्वभूमीवर नागरिकांनी बार्शीचे तहसीलदार श्री. एफ. आर. शेख यांनी या प्रश्नांकडे लक्ष द्यावे, तसेच संबंधित केंद्रांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
Devendra Fadnavis
Chandrashekhar Bawankule
Om Rajenimbalkar - ओम राजेनिंबाळकर

 #बार्शी शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ येथे असलेल्या उदय नावाच्या लॉजवर कुंटणखाना चालु असल्याची गोपनीय माहिती सोलापूर ग्राम...
02/04/2025

#बार्शी शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ येथे असलेल्या उदय नावाच्या लॉजवर कुंटणखाना चालु असल्याची गोपनीय माहिती सोलापूर ग्रामीण पोलीस विभागाला मिळाली त्यावर सोलापूर ग्रामीण पोलीस विभागाच्या विशेष टीमने सदर लॉजवर छापा टाकला असता लॉज च्या नावाखाली कुंटणखाना चालू असल्याचे आढळून आले त्यामुळे सदर लॉजचा मालक आनंद माने व लॉज चालक सुनील माने यांच्यासह सहा महिलांवर भारतीय न्याय संहिता कलम १४३(२) १४४(२) ३(५) सह अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा कलम ३,४,५,६ अंतर्गत संबंधितांना अटक करून बार्शी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला

ग्रामदैवत श्री  #भगवंत साखरेच्या हारांनी सजलेले...फोटो - Sachin Pratap Nalawade Online Barshi ऑनलाइन बार्शी
30/03/2025

ग्रामदैवत श्री #भगवंत साखरेच्या हारांनी सजलेले...

फोटो - Sachin Pratap Nalawade

Online Barshi ऑनलाइन बार्शी

बार्शीत सट्टा चालतो का????
25/03/2025

बार्शीत सट्टा चालतो का????

21/03/2025

Online Barshi ऑनलाइन बार्शी

‘जिवंत सातबारा मोहीमे’तून 7/12 उताऱ्यावरील मयतांची नावे कमी होणार अन् वारसांची नावे लागणार..

1 ते 21 एप्रिलपर्यंत या योजनेचा कालावधी असेल.

▪️1 ते 5 एप्रिल दरम्यान ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) त्यांच्या सजाअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये चावडी वाचन करून न्यायप्रविष्ट प्रकरणे सोडून गावनिहाय मयत खातेदारांची यादी तयार करतील.
▪️6 ते 20 एप्रिल दरम्यान वारसासंबंधी आवश्यक कागदपत्रे (मृत्यू दाखला, वारसाबाबत सत्य प्रतिज्ञालेख किंवा स्वयं घोषणापत्र, पोलिस पाटील किंवा सरपंच ग्रामसेवक यांचा दाखला, सर्व वारसांची नावे, वय, पत्ते व दूरध्वनी किंवा भ्रमणध्वनी क्रमांक, रहिवासी पुरावा, अशी कागदपत्रे ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्याकडे सादर करावा लागणार.
▪️ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांनी स्थानिक चौकशी करुन मंडळाधिकाऱ्यांमार्फत वारस ठराव ई- फेरफार प्रणालीमध्ये मंजूर करणार आहेत.
21 एप्रिल ते 10 मे दरम्यान तलाठ्यांनी ई- फेरफार प्रणालीत वारस फेरफार तयार कराचा आहे.
▪️महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून मंडळाअधिकारी संबंधितांच्या वारस फेरफारवर निर्णय घेऊन त्यानुसार 7/12 उताऱ्यावर दुरुस्त करणार आहेत.

यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.

तहसीलदारांपासून विभागीय आयुक्तांपर्यंत या योजनेत सर्व स्तरावरील अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे.
online Barshi

बार्शी तहसीलदार कार्यालयाच्या निष्काळजीपणामुळे बेकायदेशीर खडीक्रशर सुरूच; जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून कायदे...
18/03/2025

बार्शी तहसीलदार कार्यालयाच्या निष्काळजीपणामुळे बेकायदेशीर खडीक्रशर सुरूच; जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून कायदेशीर कारवाई करावी – तक्रारदाराची मागणी

बार्शी तालुक्यातील मौजे ताडसौंदणे आणि गाताचीवाडी हद्दीतील बेकायदेशीर खडीक्रशर आणि खाणपट्ट्यांविरोधात अर्जदार श्री. बिरमल देविदास शिंदे यांनी वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपात तक्रारी दाखल केल्या. मात्र, या तक्रारींवर कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्यामुळे महसूल प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी अर्जदाराने केली आहे.

मौजे ताडसौंदणे हद्दीतील गट नंबर १८४/ब/१ आणि गाताचीवाडी हद्दीतील गट नंबर १२/१ येथे बेकायदेशीर खडीक्रशर आणि खाणपट्टा सुरू असून, त्यांना आवश्यक त्या कायदेशीर मंजुरी मिळालेली नाही. अर्जदाराने महसूल विभाग, खाण विभाग आणि पर्यावरण विभागाकडे वारंवार तक्रारी दाखल केल्या होत्या. तसेच, तहसीलदारांनी यासंदर्भात पंचनामा करून वास्तविकता निदर्शनास आणली होती. मात्र, त्यानंतरही कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही.

महसूल विभागाचे अधिकारी आणि तहसीलदार यांनी कायदेशीर जबाबदारी पार न पाडता संबंधित प्रकरणात विलंब केला आहे. महसूल प्रशासनाने वेळीच उचित कारवाई केली असती, तर बेकायदेशीर खडीक्रशरचा प्रश्न उद्भवलाच नसता.

प्रमुख मुद्दे:

1. परवान्याशिवाय खडीक्रशर सुरू असल्याचा आरोप: महसूल आणि खाण विभागाची अधिकृत मंजुरी नसतानाही व्यवसाय सुरू आहे.
2. पर्यावरणीय मानदंडांचे उल्लंघन: पर्यावरण विभागाच्या कोणत्याही वैध मंजुरीशिवाय व्यवसाय सुरू आहे.
3. शेती आणि शेतकऱ्यांचे नुकसान: धुळीमुळे फळझाडांचे आणि इतर पिकांचे मोठे नुकसान होत आहे.
4. आरोग्यावर होणारा परिणाम: हवेतून होणाऱ्या प्रदूषणामुळे स्थानिक रहिवाशांना श्वसनाचे विकार होत आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित कारवाई करावी – तक्रारदाराची मागणी

तहसीलदार कार्यालयाच्या निष्काळजीपणामुळे अर्जदाराच्या शेतातील आंबा, रामफळ, सिताफळ आणि इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे अर्जदार श्री. बिरमल देविदास शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पुढील मागण्या केल्या आहेत:

1. बेकायदेशीर खडीक्रशर आणि खाणपट्टा त्वरित बंद करावा.
2. यासंदर्भात महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी.
3. बेकायदेशीर व्यवसाय चालवणाऱ्यांविरोधात संबंधित कायद्यांनुसार कारवाई करावी.
4. शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीसाठी नुकसानभरपाई मिळावी.

या प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडेही अर्जदाराने तक्रार दाखल केली असून, महसूल मंत्री आणि पालकमंत्र्यांनीही यामध्ये लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात तातडीने तपास सुरू करून तहसीलदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर जबाबदारी निश्चित करावी, अशी स्थानिक जनतेची मागणी आहे.

मा.विनोद ननवरे, मुख्य संपादक, माझा न्यूज

01/03/2025

सर्व पालक विद्यार्थी वर्गाला केंद्र सरकारच्या नवीन शिक्षण प्रणाली बद्दल माहिती देण्यात येत आहे - केंद्रीय मंडळाने नवीन शिक्षण प्रणाली धोरणाला मान्यता दिलेली आहे
दहावी बोर्ड संपला M.phil देखील बंद रहणार
आज केंद्रीय मंत्रीमंडळाने भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने प्रस्तावीत केलेल्या नवीन शिक्षण प्रणाली धोरण 2020 ला मान्यता दिली केंद्र सरकारच्या मंत्री मंडळाच्या मंजुरीनंतर 36 वर्षानंतर देशात नवीन शिक्षण प्रणाली धोरण लागू करण्यात आलेली आहे
केंद्रीय मंत्रीमंडळाने नवीन शिक्षण धोरण 2020 ला हिरवा कंदिल दाखविला आहे 34 वर्षानंतर शिक्षण धोरणात मोठा बदल करण्यात आलेला आहे नवीन शिक्षण प्रणाली धोरणाचे मुख्य मुद्दे खालील प्रमाणे आहेत
शिक्षण रचना ( 5 + 3 + 3 + 4 सुत्र )
5 वर्षे . . पायाभुत शिक्षण
1) नर्सरी* 4 वर्षे
2) कनिष्ठ केजी* 5 वर्षे
3 ) वरीष्ठ - केजी - 6 वर्ष
4 ) वर्ग -1 * - 7 वर्ष
5 ) वर्ग 2* 8 वर्ष
3 वर्षे - पूर्वतयारी शिक्षण -
6 ) वर्ग 3 - - > 9 वर्षे
7 ) वर्ग 4 > 10 वर्ष
😎 वर्ग 5 > 11 वर्षे

3 वर्षे - माध्यमिक शिक्षण -
9) वर्गा 6 > 12 वर्ष
10 ) वर्ग 7 > 13 वर्षे
11) वर्गा 8 > 14 वर्षे
4 वर्षे - उच्च माध्यमिक शिक्षण प्रणाली
12 ) वर्ग 9> 15 वर्षे
13 ) वर्ग 10 > ( S . S . C ) 16 वर्ष
14 ) वर्ग 1 1 > ( F Y J C ) > 17 वर्षे
15 इयत्ता 12वी > 18 वर्ष
विशेष वैशिष्ठे - -
🍫 आता फक्त 12 वी मध्ये बोर्ड परीक्षा असेल
🍫 10 वी परिक्षा अनिवार्य रहाणार नाही
🍫 M . Phil रद्द करण्यात येईल
🍫 महाविलयीन पदवी 4 वर्षाची असेल
🍫 आता 5 वी पर्यंतचे अभ्यास मातृभाषा स्थानीक भाषा आणि राष्ट्रीय भाषेत असेल इंग्रजी फक्त एक विषय म्हणून शिकवीली जाईल
🍫 9 ते 12 वी पर्यंत सेमिस्टर पद्धत लागु राहील

🍫 महाविलयीन पदवी आता 3 किंवा 4 वर्षाची राहील
🍫 1 वर्षानंतर प्रमाण पत्र
🍫2 वर्षानंतर डिप्लोमा
🍫 3 वर्षा नंतर पदवी
🍫 4 वर्षाची पदवी करणारे विद्यार्थी 1 वर्षात थेट MA करू शकतील
🍫 M A करणारे विद्यार्थी आता थेट phd करू शकतील
🍫 जर एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यासक्रमाच्या मध्यभागी दुसरा अभ्यासक्रम करायचा असेल तर ; त्याला काही काळ विश्रांती घेऊन ते करण्याची परवानगी दिली जाईल
🍫 2035 पर्यंत उच्च शिक्षणात प्रवेश ( GER ) 50% पर्यंत वाढविण्याच लक्ष
🍫 उच्च शिक्षणात अनेक सुधारणा केल्या जातील ज्यामध्ये शैक्षणीक प्रशासकीय आणि आर्थिक स्वायंतता समाविष्ठ असेल
🍫 प्रादेशिक भाषेमध्ये ई - कोर्सेस सुरु - केली जातील
🍫 व्हर्चुअल लॅब विकसीत केल्या जातील
🍫 राष्ट्रीय शैक्षणीक तंत्रज्ञान मंच ( NEFT ) स्थापन केला जाईल
🍫 देशभरातील सरकारी ' खाजगी आणि मानलेल्या संस्थासाठी एक समान नियम लागू असतील
# NeweduactionPolicy

सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, पण बार्शीत अजूनही प्लास्टिक कपांचा सुळसुळाट – प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या आर...
01/03/2025

सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, पण बार्शीत अजूनही प्लास्टिक कपांचा सुळसुळाट – प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका

बार्शीत अजूनही मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक लेपनयुक्त चहाच्या कागदी कपांचा वापर सुरू असून, प्रशासन मात्र केवळ वरवरची कारवाई करून जबाबदारी झटकत आहे. सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी या कपांवर बंदी घालण्याचा आदेश दिला असला, तरी बार्शी नगरपरिषद आणि आरोग्य विभागाने अद्याप ठोस अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे हा आदेश फक्त कागदावरच राहणार का? प्रशासन हातावर हात ठेवून बसणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

बार्शी न्यायालय परिसरासह शहरातील प्रत्येक चहा कॅन्टीनमध्ये हे कप सर्रास वापरले जात आहेत. बार्शी न्यायालयाच्या बाहेर 81 नंबर कॅन्टीनसह, अनेक चहा टपऱ्या आणि हॉटेल्समध्ये अजूनही हे कप मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. असे असताना, मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांनी यापूर्वी कारवाई केल्याचा दावा केला आहे. जर खरोखरच कारवाई झाली असती, तर अजूनही या कपांचा वापर शहरभर सुरू कसा आहे?

वैज्ञानिक संशोधनानुसार, या कपांच्या आतील बाजूस असलेल्या प्लास्टिक लेपमध्ये ‘बीपीए’ (Bisphenol A) आणि मायक्रोप्लास्टिकचे अंश असतात. गरम चहा किंवा इतर पेय कपात टाकल्यानंतर हे विषारी घटक द्रवात मिसळतात व शरीरात प्रवेश करतात, ज्यामुळे कॅन्सर, हृदयविकार, मधुमेह आणि संप्रेरकासंबंधित विकारांचा धोका वाढतो.

सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या उत्पादनांवर कारवाई करणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम, 2016 आणि अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 यांच्या अंतर्गत अशा घातक उत्पादनांवर बंदी आणि कारवाई करण्याचा अधिकार स्थानिक प्रशासन व अन्न व औषध प्रशासनाला (FDA) आहे. तसेच, भारतीय दंड संहिता (IPC) कलम 269 आणि 270 नुसार जनतेच्या आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या कोणत्याही कृतीसाठी जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.

मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांनी यापूर्वी कारवाई केल्याचे सांगितले असले, तरी प्रत्यक्षात बार्शीतील चहा कॅन्टीन, हॉटेल्स आणि टपऱ्यांमध्ये अजूनही हे कप मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहेत. त्यामुळे नागरिकांना प्रश्न पडतो –

१)जर कारवाई झाली असेल, तर हे कप अजूनही बाजारात का आहेत?
२)नगरपरिषद आणि आरोग्य विभाग कारवाई करण्यास टाळाटाळ का करत आहेत?
३)अधिकाऱ्यांना यामध्ये काही आर्थिक हितसंबंध आहेत का?

सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाची बार्शीत त्वरित अंमलबजावणी झाली पाहिजे. या प्लास्टिक लेपनयुक्त कपांच्या विक्री आणि वापरावर संपूर्ण बंदी आणण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची गरज आहे.

सध्या प्रशासनाने जर तातडीने कारवाई केली नाही, तर नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या हालचाली सुरू होऊ शकतात. “प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जनतेच्या आरोग्याशी खेळ केला जात असेल, तर संबंधित अधिकाऱ्यांवर IPC 269 आणि 270 अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी केली जाईल,” असा इशारा काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.

सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश फक्त कागदावरच राहणार की बार्शीत खऱ्या अर्थाने अंमलबजावणी होणार? बंद करण्यात आलेले कप खुलेआम विकले जात असताना प्रशासन डोळेझाक करणार की कठोर कारवाई करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. जनतेच्या आरोग्यासाठी प्रशासनाने आता त्वरित निर्णय घेत कठोर कारवाई करावी, अन्यथा कायदेशीर मार्गांचा अवलंब करावा लागेल.

RTO सध्या किती कलेक्शन्स करत आहे तो आकडा आणी ह्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट्स आल्या नंतरच कलेक्शन्स ह्याचे आकडे गगनाला भ...
01/03/2025

RTO सध्या किती कलेक्शन्स करत आहे तो आकडा आणी ह्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट्स आल्या नंतरच कलेक्शन्स ह्याचे आकडे गगनाला भिडणार आहेत ..

नुसतं फाईन ...

21/02/2025

जगातील सर्वोत्कृष्ट 200 शिक्षण संस्था एकही भारतीय संस्था नाही

न्यूयॉर्क -ताज्या टाइम्स हायर एज्युकेशन (टीएचई) ने जगभरातील उत्कृष्ट संस्थांची क्रमवारी 2025 जाहीर केली आहे आणि यात जगातील 200 सर्वोत्कृष्ट संख्यामध्ये एकाही भारतीय शिक्षण संस्थेला स्थान मिळालेले नाही .

हार्वर्ड विद्यापीठाने नेहमी अव्वल स्थान कायम राखले, ऑक्सफर्ड आणि एमआयटी दुसऱ्या स्थानावर आहे .

भारतीय चार विद्यापीठांनी या यादीत स्थान मिळवले आहे. मात्र, या सर्वांची क्रमवारी 201 ते 300 दरम्यान आहे . पहिल्या 200 मध्ये एक ही भारतीय शिक्षण संस्था नाही .ग

बंगळुरूमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc), जे 2023 मध्ये 101-125 क्रमांकावर होते, आता 201-300 च्या बँडवर घसरले आहे. आय. आय. टी. दिल्ली आणि आय. आय. टी. मद्रास एकाच श्रेणीत आय. आय. एस. सी. मध्ये सामील होत आहेत, जे दोन्ही गेल्या वर्षी उच्च स्थानावर होते. दरम्यान, 2023 मध्ये 151-175 क्रमांकावर असलेली आयआयटी मुंबई या यादीतून पूर्णपणे बाहेर पडली आहे

शिक्षा ‘ओ’ अनुसंधान या भारतीय संस्थेला यावर्षी प्रथमच 201-300 बँडमध्ये स्थान मिळाले आहे. एस. ओ. ए. हे भुवनेश्वर, ओडिशा येथे स्थित एक खाजगी, मानित विद्यापीठ आहे. याची स्थापना 1996 मध्ये झाली आणि त्यात पदवी देणाऱ्या नऊ शाळा आणि संस्थांचा समावेश आहे.

जागतिक प्रतिष्ठा क्रमवारी 2025 मध्ये भारतीय संस्थांनी कशी कामगिरी केली ते येथे आहेः

आयआयएससी बंगळुरूः 2023 मध्ये 101-125 वरून 2025 मध्ये 201-300 पर्यंत घसरले

आयआयटी दिल्ली 151-175 वरून 201-300 वर

आयआयटी मद्रास 176-200 वरून 201-300 पर्यंत खाली

शिक्षा ‘ओ’ अनुसंधानः 201-300 बँडमध्ये नवीन प्रवेश

आयआयटी बॉम्बेः आता यादीत नाही (2023 मध्ये 151-175 क्रमांकावर होते)

 #बार्शी वकील  #संघाच्या  #अध्यक्षपदी अ‍ॅड.रणजीत गुंड...बार्शी: येथील बार्शी वकील संघाच्या सन 2025-26 च्या निवडणुकीत वकी...
20/02/2025

#बार्शी वकील #संघाच्या #अध्यक्षपदी अ‍ॅड.रणजीत गुंड...

बार्शी: येथील बार्शी वकील संघाच्या सन 2025-26 च्या निवडणुकीत वकील संघाचे अध्यक्ष म्हणून अ‍ॅड.रणजीत नेताजी गुंड यांचा विक्रमी मतांनी विजय झाला.
यावेळी बार्शी वकील संघाचे झालेल्या अटितटीच्या लढतीमध्ये एकूण 335 मतदानापैकी 316 मतदान झाले.यामध्ये अ‍ॅड.गुंड यांना 195 मतदान झाले तर अ‍ॅड.संजय साखरे यांना 117 मतदान झाले.यात अ‍ॅड.रणजीत गुंड यांचा 78 मतांनी विजय झाला.उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीतही अटीतटीची लढतीत अ‍ॅड.विशाल गोणेकर यांनी बाजी मारली .लायब्ररी चेअरमन पदासाठी अ‍ॅड.अमोल अलाट बारच्या सचिव पदासाठी अ‍ॅड.अक्षय पाटील तर खजिनदार म्हणून अ‍ॅड. सूरज जामदार निवडून आले.

यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून अ‍ॅड.सुनील कुलकर्णी,अ‍ॅड.हर्षवर्धन बोधले,अ‍ॅड.ज्योतिर्लिंग नवले यांनी कामकाज पाहिले.

17/02/2025

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा सोलापूर जिल्हा दौरा….
Online Barshi ऑनलाइन बार्शी
सोलापूर दि.17 (जिमाका):- राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
बुधवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.00 वाजता मुंबई विमानतळ येथून सोलापूरकडे प्रयाण व दुपारी 12 वाजता सोलापूर विमानतळ येथे आगमन. दुपारी 12.15 वाजता सोलापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे पदाधिकारी यांच्या समवेत चर्चा. दुपारी 2.00 वाजता शासकीय विश्रामगृह येथून हॉटेल बालाजी सरोवर येथे आगमन. दुपारी 2.00 ते 4.00 वाजता बालाजी सरोवर येथे राखीव. सायंकाळी 4.00 वाजता हॉटेल बालाजी सरोवर येथून सोलापूर बस आगार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळकडे प्रयाण. सायंकाळी 4.15 ते 5.00 बस आगार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ येथे पहाणी. सायंकाळी 5.00 वाजता बस आगार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ येथून एस.टी. ने जिल्हा धाराशिव कडे प्रयाण. रात्रौ 8.45 वाजता बस आगार येथून सेालापूरकडे प्रयाण. रात्री 10.30 वाजता हॉटेल बालाजी सरोवर येथे आगमन व मुक्काम. गुरूवार दि. 20 फेब्रुवारी 2025 रोजी हॉटेल बालाजी सरोवर सेालापूर येथून तुळजापूर कडे प्रयाण करतील.

Address

Barshi
413411

Telephone

+917588797271

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Online Barshi ऑनलाइन बार्शी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share