09/12/2025
#साेपलांचा मार्केट कमिटीत धुव्वा , #राऊतांचा एक हाती विजय
आता पालिकेत काय हाेणार?
झेडपीत काेण काेणाला देणार धाेबीपछाड
#बार्शी तालुक्याची लाईफलाईन म्हणून उल्लेख करण्यात येत असलेल्या आणि राजकारणात आमदार दिलीप साेपल आणि माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी अतिशय प्रतिष्ठेच्या केलेल्या निवडणुकीत साेपल गटाचा पार धुव्वा झाला आहे. 18 संचालकांसाठी झालेल्या या निवडणुकीची मतमाेजणी दिनांक 8 डिसेंबरला झाली. या निवडणुकीत सर्वच्या सर्व म्हणजे 18 जागांवर राऊत गटाच्या बळीराजा पॅनलचे उमेदवार माेठ्या मताधिक्याने विजयी झाले. साेपलांना या निवडणुकीत माेठा धक्का बसला असल्याचे मानले जात आहे. एकही जागा त्यांना राखता आली तर नाहीच, पण त्यांच्या उमेदवारांना मिळालेली मते आणि विजयी उमेदवाराला मिळालेली मते, यामध्येही माेठा फरक असल्याने मतदारांनी साेपल यांना मार्केट कमिटीत साफ नाकारले असल्याचेच स्पष्ट झाले आहे.
मार्केट कमिटी ही बार्शीच्या राजकारणात नेहमीच केंद्रबिंदू राहिली आहे. ज्यांच्याकडे मार्केट कमिटीची सत्ता, त्यांचा बार्शीच्या राजकारणात दबदबा राहिलेला आहे. साेपल गटाचे प्राबल्य असलेली आणि अनेकवर्षे त्यांच्या ताब्यात असलेली मार्केट कमिटीची सत्ता नऊ वर्षापूर्वी राऊत यांनी खेचून आपल्या गटाकडे आणली. राऊत यांचे सुपुत्रब रणवीर राऊत यांच्याकडे मार्केट कमिटीची सूत्र्े साेपविण्यात आली. चेअरमन म्हणून #रणवीर #राऊत यांनी चमकदार कामगिरी केली. तरूण आणि कल्पक नेतृत्व म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. मार्केट कमिटीच्या कारभारात अनेक सुधारणा केल्या. व्यापारी, शेतकरी यांच्या समस्या प्राधान्याने साेडविल्या. मार्केट कमिटीला मिळणाèया सेस त्यांच्या काळात चांगलाच वाढला. यापूर्वी मार्केट कमिटीला सेसमधून 2 काेटी रूपयेही मिळणे अवघड असयाचे, हेच उत्पन्न त्यांनी 12 काेटी रूपयांपर्यंत नेऊन कमिटीची आर्थिक घडीही बसविली. पाच वर्षाचा त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर निवडणुकांना या ना त्या कारणाने स्थगिती येत गेली आणि जवळपास चार वर्षे मार्केट कमिटीवर प्रशासक राज राहिले. प्रशासक म्हणून राऊत यांचे बंधू विजय राऊत यांनी काम पाहिले. त्यांनीही कारभारात पारदर्शकता ठेवत, कमिटीचा कारभार केला.
या निवडणुकीत दिलीप साेपल आणि राजेंद्र राऊत यांच्यातच पारंपारिक लढत झाली. मार्केट कमिटीची निवडणूक चुरशीची आहे, घासून हाेईल, असे वाटत हाेते. पण तसे प्रत्यक्षात काही घडले नाही. मुळात या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतरच पहिला धक्का साेपल गटाला बसला हाेता. व्यापारी मतदारसंघातून दाेन सदस्य निवडून द्यायचे हाेते. उमेदवारी अर्ज छाननीच्यावेळी साेपल गटाचा एक अर्ज बाद झाला तर अगदी ऐनवेळी साेपल गटाचे दुसरे उमेदवार महेश दहिटणकर यांनी आपली उमेदवारी मागे घेतली हाेती. त्यानंतर व्यापारी मतदारसंघात एकूण चार अर्ज राहिले हाेते. हे चारही अर्ज राजेंद्र राऊत यांच्याच गटाचे हाेते. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महेश करळे आणि कांतिलाल मर्दा या दाेघांनी आपली उमेदवारी मागे घेतल्यानंतर या मतदारसंघातून भरतेश गांधी आणि प्रवीण गायकवाड यांची बिनविराेध निवड झाली.
18 पैकी दाेन जागा राऊत गटाला बिनविराेध िंमळाल्यानंतर 16 जागांसाठी निवडणूक लागली हाेती. 16 जागांसाठी 36 उमेदवार मैदानात हाेते. माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या बळीराजा विकास आघाडीचे उमेदवार
सुरेश गुंड, बाबा गायकवाड, विजय गरड, अभिजित कापसे, प्रभाकर डमरे, रविकांत साळुंखे आणि यशवंत माने , राखीव मनीषा ताकभाते, सुमन पाटील, संजयकुमार माळी , रामेश्वर पाटील , : नेताजी घायतिडक, अजित बारंगुळे सतीश हनुमंते, सचिन बुरगुटे गजेंद्र मुकटे, हे भरघाेस मतांनी विजयी झाले आहेत तर दिलीप साेपल यांच्या परिवर्तन पॅनलचे युवराज काटे, संपतराव चव्हाण, नंदकुमार काशीद, राजकुमार पुजारी, धर्मराज गाडे, संपत अंधारे, अशाेक काशीद. , सुषमा पाटील, ज्याेती पवार , भास्कर काशीद, सुभाष शेळके , आबासाहेब जगताप, साैदागर संकपाळ , बाळासाहेब पिसाळ , विनाेद वाघमारे, प्रेम बगाडे, या उमेदवारांचा पराभव झाला आहे.
आता या निवडणुकीच्या निकालानंतर सर्वांचे लक्ष लागले आहे ते बार्शी नगरपालिकेच्या निवडणूक निकालाकडे. राऊत गटाला एकहाती विजय मिळाल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढलेला आहे. यात आता पालिका निवडणुकीत नेमके काय हाेते, सत्ता राखण्यात पुन्हा राऊत यशस्वी हाेतात की परिवर्तन करण्यात साेपल यशस्वी हाेतात, याची चर्चा राजकीय वतुर्ळात हाेताना दिसत आहे. त्यानंतर लगेचच झेडपीची निवडणूक लागणार आहे. यानिवडणुकीत विजयाचे टार्गेट साेपल गटासमाेर असणार आहे. झेडपी निवडणुकीत पुन्हा साेपल-राऊत आमने सामने येणार आहेत. मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखल्या जाणाèया साेपल यांच्या झेडपीच्या रणनितीकडेही सर्वांचे लक्ष आहे.