Vishwa TV marathi

Vishwa TV marathi Vishwa Tv Marathi Digital Media क्षेत्रातील सर्वात अपडेट चॅनल आहे. घडामोडींचा अचूक वेध घेणारे चॅनल आहे

 #विद्यार्थीनीला घेऊन  #प्राध्यापक झाला  #सैराटती अल्पवयीन 17 वर्षाची तरूणी. अजिंठा येथील महाविद्यालयात 12 वीच्या वर्गात...
11/10/2025

#विद्यार्थीनीला घेऊन #प्राध्यापक झाला #सैराट

ती अल्पवयीन 17 वर्षाची तरूणी.
अजिंठा येथील महाविद्यालयात 12 वीच्या वर्गात शिकत हाेती.
त्याच महाविद्यालयात अध्यापनाचे काम करणारा 40 वर्षे वयाचा प्राध्यापक किशाेर तायडे.
छत्रपती #संभाजीनगर जिल्ह्यातील #सिल्लाेड तालुक्यातील एका गावातील ही तरूणी.
महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच या प्राध्यापकाच्या संपर्कात आली.
किशाेर तायडे याने तिला लग्नाचे आमिष दाखविले, तिला नाेकरी लावून देताे, असे सांगितले.
यानंतर मग या दाेघांमध्ये सुरू झाले प्रेमाचे चाळे.
याची कुणकुण अर्थातच महाविद्यालयातील काही प्राध्यापकांना लागली.
पण तरीही याचे प्रेमप्रकरण सुरूच राहिले.
चार दिवसापूर्वीच ही #तरूणी आपल्या घरातून 12 वीचा फॉर्म भरण्यासाठी म्हणून महाविद्यालयात आली. पण रात्री उशीरापर्यंत ती पुन्हा घरी पाेहाेचलीच नाही.
आई-वडीलांनी सगळीकडे शाेध घेतला. नातेवाईकांना फोन लावले,
तिच्या मैत्रिणींना फोन केले, पण कुठेच तिचा पत्ता नव्हता.
शेवटी तिच्या एका मैत्रिणीकडूनच तायडे आणि तिच्यातील सुरू
असलेल्या प्रेमप्रकरणाची माहिती पालकांना मिळाली.
पालकांनी तायडेकडे संपर्क करण्यासाठी त्याचे घर गाठले.
पण ताेही सकाळपासून घरी आलेलाच नव्हता.
त्यामुळे शेवटी त्या तरूणीच्या पालकांनी थेट सिल्लाेड पाेलीस स्टेशन गाठले.
पाेलीसांनी तपास केल्यानंतर ताे प्राध्यापक आणि ती तरूणी दाेघेही पळून गेले
असल्याची माहिती मिळाली.
तायडेला संपर्क करण्याचा प्रयत्न पाेलीसांनी केला, त्याच्या माेबाईलवर त्यांनी त्याला काॅल केला.
यावेळी तायडे याच्याशी त्या तरूणीची आईही बाेलली. यानंतर पाेलीसांनीही त्याला धमकावले.
तायडेने चाैथ्या दिवशी #जळगावरून त्या तरूणीला बसमध्ये बसवून गावी परत पाठविले. पण ताे मात्र फरारच आहे.
गुरू शिष्याच्या नात्यालाच काळीमा ासणाèया या घटनेची संभाजीनगर जिल्ह्यात सध्या जाेरदार चर्चा सुरू आहे.
महाविद्यालय आता त्या शिक्षकावर काय कारवाई करणार, याकडेही सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्नही या निमित्ताने निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे या किशाेर तायडेने यापूर्वी आणखी तीन मुलींना असेच जाळ्यात ओढले हाेते.
त्यांना घेऊन ताे पळूनही गेला हाेता. पण भीतीपाेटी काेणीच पालक समाेर आले नाहीत, तायडेच्याच हातापायापडून त्यांनी
त्याच्या तावडीतून मुलींची सुटका केली हाेती. यामुळेच त्याचे धाडस वाढत गेले हाेते.

11/10/2025

सहकारमंत्री जनतेपुढे नमले…!
#महाराष्ट्र

घोड्यांच्या दुनियेतील आजवरचा सगळ्यात खास Podcast !शनिवार ११ ऑक्टोबर २०२५ रोजी  सकाळी ९ वाजता ! विश्व TV मराठी च्या Bolu ...
10/10/2025

घोड्यांच्या दुनियेतील आजवरचा सगळ्यात खास Podcast !

शनिवार ११ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता !
विश्व TV मराठी च्या Bolu का ? Podcast Show मध्ये नक्की पहा...आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.
________________________________________________________________________________________________

Subscribe करा आणि Notification Bell ऑन करा !
https://youtube.com/?si=8vdabYhMrA4CXCHz

पिकअप नदीपात्रात उलटली #गेवराई शहरातून शहागडच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या चारचाकी पिकअपचे नियंत्रण सुटल्याने ती  पुला...
10/10/2025

पिकअप नदीपात्रात उलटली

#गेवराई शहरातून शहागडच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या चारचाकी पिकअपचे नियंत्रण सुटल्याने ती पुलाचा कठडा तोडून नदीपात्रात उलटली. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सुदैवाने वाहनात अन्य प्रवासी नसल्याने मोठा अनर्थ टळला. अरुंद आणि जीर्ण अवस्थेतील पुलावर वारंवार अपघात घडत असल्याने नागरिकांनी पुलाचे दुरुस्तीकरण करण्याची मागणी केली आहे.


ज्वारीची भाकरी आणि खर्डा खाऊन बैलगाडी आक्रोश मोर्चा #सोलापूर, दि. १० ऑक्टोबर पूरग्रस्त शेतकरी, शेतमजूर आणि श्रमिक जनतेच्...
10/10/2025

ज्वारीची भाकरी आणि खर्डा खाऊन बैलगाडी आक्रोश मोर्चा

#सोलापूर, दि. १० ऑक्टोबर
पूरग्रस्त शेतकरी, शेतमजूर आणि श्रमिक जनतेच्या पुनर्वसनाच्या मागणीसाठी आज सोलापूरमध्ये अखिल भारतीय किसान सभा आणि सीटूच्या वतीने “बैलगाडी आक्रोश मोर्चा” काढण्यात आला. या मोर्चात शेकडो शेतकरी आपल्या बैलगाड्यांसह सहभागी झाले होते. सरकारकडून तातडीने पुनर्वसनाची अंमलबजावणी न झाल्यास शेतकरी मंत्रालयात घुसतील, असा जळजळीत इशारा माजी आमदार कॉ. आडम मास्तर यांनी दिला.

कॉ. # #आडम मास्तर म्हणाले, “शेतकऱ्यांना १०० टक्के भरपाई कुणी देऊ शकत नाही, पण शेतकरी पुन्हा उभा राहायला हवा. सरकारने जाहीर केलेले ३१ हजार ६२८ कोटींचे पॅकेज हा केवळ दिखावा आहे. तब्बल ६८ लाख हेक्टर पिकांचे नुकसान होऊनही दिलासा मिळालेला नाही. सरकारने जाहीर केलेली मदत ही विसंगत आणि शेतकऱ्यांची चेष्टा करणारी आहे.”

ते पुढे म्हणाले, “अब्जावधी रुपयांचे करबुडवे उद्योगपतींना सवलती देणारे हेच सरकार, पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मात्र एक पैसाही खर्च करत नाही. ही लाजिरवाणी बाब आहे.”

सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद पूनम गेट येथून बैलगाड्यांसह मोर्चा निघाला. शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांना तेथेच बांधून सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. पूरामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी ज्वारीची भाकरी आणि खर्डा खाऊन प्रतीकात्मक निषेध व्यक्त केला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला, मात्र पोलिसांनी प्रवेशद्वारावरच अडवले.

सीटूचे राज्य उपाध्यक्ष कॉ. युसुफ शेख (मेजर) यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. यावेळी राज्य महासचिव कॉ. एम.एच. शेख म्हणाले, “सोलापूर जिल्ह्यात गेल्या १०० वर्षांतील सर्वात प्रचंड अतिवृष्टी झाली. भीमा–सीना नदीला आलेल्या पुरामुळे अनेक गावे वाहून गेली. राज्यात सुमारे ८० लाख हेक्टर शेती उद्ध्वस्त झाली असून तब्बल १५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शहरी भागातही जनजीवन विस्कळीत झाले आहे.”

ते पुढे म्हणाले, “शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. या संकटातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी सरकारने किमान दहा वर्षांची पुनर्बांधणी योजना हाती घ्यावी.”

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या :

1. #पूरग्रस्त शेतकऱ्यांना एकरी ₹५०,००० तातडीची मदत द्यावी.
2. शेतमजुरांना ₹२५,००० रोख मदत द्यावी.
3. जमीन, पिके व घरे वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना ‘आलायद’ नुकसानभरपाई मिळावी.
4. बियाणे, खते व औषधे तातडीने उपलब्ध करून द्यावीत.
5. पशुधनासाठी चारा व उपचार मदत द्यावी.
6. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी पुनरुज्जीवन योजना राबवावी.
7. सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी.
8. शहरांतील पुरग्रस्त झोपडपट्ट्यांना भरपाई द्यावी.
9. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना ₹१० लाख मदत व नोकरी द्यावी.
10. घरं वाहून गेलेल्या कुटुंबांना ₹५ लाख आर्थिक सहाय्य द्यावे.
11. पूरग्रस्तांना रोजगार हमी योजनेत काम द्यावे.
12. भूमी अभिलेख कार्यालयातील तांत्रिक अडचणी दूर कराव्यात.
13. खते, बियाणे, शेतीसाठीची सामग्री गावपातळीवर उपलब्ध करावी.
14. शेतीसाहित्याचे दर कमी करून शेतकऱ्यांना परवडणारे बनवावे.
15. FARMER ID सक्ती रद्द करावी.

मोर्चादरम्यान कॉ. नलिनीताई कलबुर्गी, व्यंकटेश कोंगारी, सुनंदाताई बल्ला, शेवंताताई देशमुख, कॉ. विल्यम ससाणे, सुभाष बावकर, सुलेमान शेख, राजेंद्र स्वामी, मल्लिकार्जुन नाव्ही, दयानंद फताटे, उमेश पाटील, सदाशिव साळुंके, विश्वनाथ बसवेश्वर आणि श्रीशैल बुगडे उपस्थित होते.

प्रजा नाट्य मंडळाच्या शाहिरांनी शेतकऱ्यांच्या संघर्षावर आधारित हृदयस्पर्शी गीते सादर करून वातावरण भारावून टाकले.

फक्त एक रुपया मध्ये साडी.... आर्द्रा मॉल घेऊन येत आहे खास सोलापूरकरांसाठी फक्त 12 ऑक्टोंबर ला दिवाळी ऑफर एक हजार दोनशे (...
10/10/2025

फक्त एक रुपया मध्ये साडी....

आर्द्रा मॉल घेऊन येत आहे खास सोलापूरकरांसाठी फक्त 12 ऑक्टोंबर ला दिवाळी ऑफर एक हजार दोनशे (Rs-1200/-) रुपयाच्या खरेदीवर - फक्त एक रुपया मध्ये #साडी, कुर्ती किंवा शर्ट घेता येणार असल्याची माहिती प्रमुख व्यवस्थापक विजय अय्यर यांनी दिली.

सम्राट चौक, नॅशनल हायवे ब्रिजच्या पलीकडे असलेल्या भव्य इमारतीत आर्द्रा मॉल सुरू झाले आहे. काहीच दिवसात सोलापूरकरांच्या पसंतीचे मानबिंदूत झाले आहे. कारण #आर्द्रा #मॉल फॅमिली वन स्टॉप शोरूम असून यामध्ये सर्वच कुटुंबाकरिता लागणाऱ्या कपड्यांची रेलचेल इथे उपलब्ध आहे. जसे की मेन्स, वुमन्स, किड्स अशा विविध विभागातून सुटींग - शर्टिंग इथेनिक वेअर, ब्रॅण्डेड वेअर, इकॉनोमी वेअर अँड इनर वेअर अशा कपड्यांसह किड्स मध्ये रेडिमेड कपडे उपलब्ध आहेत.

तसेच न्यू बॉर्न बेबींच्या कपड्यासह वुमन्स सेक्शन मध्ये देशातील विविध भागातून नावाजलेल्या सिल्क सारीज, इथेनिक वेअर अँड ड्रेस मटेरियल मोठ्या प्रमाणात आर्द्रा मॉलमध्ये उपलब्ध आहे. चला तर मग आजच आर्द्रा मॉल ला संपूर्ण कुटुंबासह खरेदीला जाऊ आणि या संधीचा लाभ घेऊयात असे आवाहन शुभम भुतडा यांनी केले आहे.

10/10/2025

जबाबदारी….धन्यवाद वाचक आणि प्रेक्षक !
10/10/2025

जबाबदारी….धन्यवाद वाचक आणि प्रेक्षक !

 #तळसंदे येथील हॉस्टेल मधील सिनियर विद्यार्थ्यांकडून बेल्ट, बॅट,  #सळईने बेदम  #मारहाण.
10/10/2025

#तळसंदे येथील हॉस्टेल मधील सिनियर विद्यार्थ्यांकडून बेल्ट, बॅट, #सळईने बेदम #मारहाण.

 #लाडकी  #बहीण ; या महिन्याचा हप्ता  कधी मिळणार ? #मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर महिन्याची हप्ता अजून आ...
10/10/2025

#लाडकी #बहीण ; या महिन्याचा हप्ता कधी मिळणार ?

#मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर महिन्याची हप्ता अजून आला नसून महिला या हप्ताची वाट पाहत आहे. याच पार्श्वभूमीवर आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी असून सप्टेंबर महिन्याचे 1500 हप्ता लवकरच मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 410 कोटी रुपये वर्ग करण्यासंदर्भात #शासन निर्णय सामाजिक न्याय विभागाकडून जारी करण्यात आला असून सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता आदिती तटकरे यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे.

आदिती #तटकरे म्हणाल्या की, 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती !मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्या पासून म्हणजेच ११ ऑक्टोबर २०२५ पासून सुरुवात होत आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे.'

10/10/2025

Address

Barsi

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vishwa TV marathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vishwa TV marathi:

Share