19/08/2026
दूध केंद्रधारकांचा रोजगार धोक्यात? मनपाच्या नव्या धोरणातील अटींवर आक्षेप
महानंद दूध केंद्रधारकांच्या अडचणी वाढल्या?
मिरा-भाईंदर मनपाच्या 13 ऑगस्ट 2026 रोजीच्या महासभेतील दूध केंद्रधारकांच्या धोरणातील काही जाचक अटी रद्द करून फेरविचार करण्याची मागणी करण्यात आली आहे. आकारमान, केंद्रांमधील अंतर, खाद्यपदार्थ विक्री, परवाना हस्तांतरण आणि NOC यांसह विविध मुद्द्यांवर दूध केंद्रधारकांनी आक्षेप नोंदवला आहे. याबाबत विरोधी पक्षनेत्यांनी शिष्टमंडळासोबत तातडीने बैठक घेऊन तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली आहे.