
27/07/2022
रतन टाटा यांची भेट घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मागील सरकारच्या निर्णयांना स्थगिती दिला जात असल्याने अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतल्यासंबंधी विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी “जी कामं अगदी शेवटी, घाईत मंजूर केली त्यांना स्थगिती देण्यात आली आहे. इतर अत्यावश्यक कामांना स्थगिती देण्यात आलेली नाही,” असं सांगत अधिकारी नाराज असल्याचं वृत्त फेटाळलं. सरकार बदललं म्हणून कोणतीही लोकहिताची, अत्यावश्यक, विकासकामं रद्द होणार नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं.