15/02/2024
*जगद्गूरू संत सेवालाल महाराज*
श्री संत सेवालाल महाराज हे जगातील प्रत्येक बंजारा समाजातील लोकांचे आराध्यदैवत आहेत.तर त्यांनी बंजारा समाजामध्ये असलेल्या प्रत्येकाला जगण्याचा मार्ग दाखविला.जगण्यासाठी वणवण भटकंती करणाऱ्या व विमुक्त जाती भटक्या जमाती या प्रवर्गात असणाऱ्या बंजारा समाजाला जगण्याचा मार्ग दाखविला प्रगतीशील देशासोबत कसे चालता येईल हे ही सांगितले एवढेच नाही तर त्यांनी त्या काळात सांगितलेल्या गोष्टी ह्या काळात सुद्धा लागू पडत आहेत.
बंजारा समाजातील व्यक्ती हा कधीही दुसर्यावर विसंबला नाही त्याचे कारण हेच कि त्यांचा पाठीमागे साक्षात श्री संत सद्गुरू सेवालाल महाराज हे उभे होते,मद्यपान करून पत्नीवर अत्याचार करणारे , हुंड्यासाठी बायकोला माहेरी पाठवणारे, कार्यक्रम असल्यावर प्राणिजाती ची हत्या करणारे अश्या अनेक लोकांना सेवालाल महाराज यांनी जगण्याचा मार्ग दाखविला.
*कौटुंबिक माहिती व बालपण*
सेवालाल महाराज यांचे वडील रामजी नायक यांचा मुलगा भीमा नायक एक मोठा व्यापारी होता. त्याला जवळजवळ सर्व भारतीय भाषांचे ज्ञान होते. त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये ४००० ते ५००० गायी आणि बैल आहेत. कोण धान्याच्या वाहतुकीसाठी वापरला जात असे आणि ५२ तांड्यांचा नायक होता. त्यांना नायकडा (एक गावचा नायक आणि खेड्यांचा नायक) असे म्हटले जाते. एका गावात (तांडे यांचे) लोकसंख्या सुमारे ५०० होते. प्रत्येक तांड्यासाठी, एक माणूस आणि एक स्त्री गोर उपदेशक म्हणून काम करीत असे, त्यांना जवळ (५२) भेरू (माणूस) आणि ६४ जोगानी (स्त्री) असे संबोधत. या ५२ भेरू आणि ६४ जोगानींचे एकत्रिकरण होते. आणि त्यांची स्थापना मुख्य नाईक अंतर्गत झाली. म्हणूनच संत सेवालाल आजोबांना रामशहा नायक म्हटले गेले. (५२ तांड्यांचा संघप्रमुख) भीम नायक हेही ४१ तांड्यांचे संघप्रमुख होते. ऐतिहासिक कागदपत्रांवरून असे दिसून आले आहे की भीमा नायक यांची इंग्रजांकडे किंमत २ लाख आहे. मर्चंट करार केला होता
*धर्मणीयाडी(आई* )
सेवालालच्या आईचे नाव धरमणी होते, ती जयराम बदाटिया (सुवर्णा कप्पा, कर्नाटक) यांची मुलगी होती. भीमा नायक यांच्या लग्नानंतर त्यांना जवळजवळ १२ वर्षे मूलबाळ नव्हते, पुढे जगदंबा मातेची पूजा व कृपेमुळे धर्मनी व भीमा नाईक यांना सेवालाल महाराज यांचा जन्म झाला अशी बंजारा समाजात एक श्रद्धा आहे
*पत्नी*
श्री संत सेवालाल महाराज यांची लग्नाची कथा जरा वेगळीच आहे.त्यांना खुपदा सर्वांकडून लग्न करावे अशी इच्छा जाहीर केली मात्र सेवालाल महाराज यांनी कधीही त्यांच्या बोलण्यावर लग्न केले नाही त्यासाठी सुद्धा एक कारण असे होते कि.त्याचीच एक कथा एकदा आई जगदंबा सेवालाल महाराज यांना लग्नासाठी विनवणी करत होती कि सेवालाल तू आता लग्न करून घे मात्र सेवालाल महाराज हे त्यांच्या बोलण्याला टाळण्याचा प्रयत्न करत होते.गोरबंजारा जमातीमध्ये संत सेवालाल महाराज हे माेठे संत हाेऊन गेले. संत सेवालाल महाराजांचा जन्म माघ कृष्ण पक्ष साेमवार, दि. १५ फेब्रुवारी १७३९ राेजी बंजारा कुटुंबामध्ये गुलाल डाेडी तांडा, ता. गुत्ती, जि. अानंदपूर (अांध्र प्रदेश) येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भीमा नाईक व अाईचे नाव धरमणी हाेते. बंजारा समाजाचा प्रमुख व्यवसाय बैलांच्या पाठीवर धान्याची गाेणी वाहण्याचा हाेता. भीमा नाईकांना चार पुत्र हाेते. सेवालाल (सेवाभाया), बद्दू, हप्पा, भाणा यांच्यापैकी सेवालाल ज्येष्ठ हाेते. सुरुवातीपासून ते विरक्त स्वभावाचे हाेते. त्या काळी बंजारा समाज निरक्षर हाेता. त्या समाजात अाजही निरक्षरतेचे प्रमाण माेठ्या प्रमाणात अाहे. त्यामुळे सेवालाल महाराजांनी अाजन्म अविवाहित राहून समाज सुधारण्याचे कार्य हाती घेतले. माल वाहतुकीसाठी जगभर बंजारा समाज भटकत हाेता. जगातील अनेक परंपरा त्यांनी भारतात अाणल्या. याचबराेबर भारतीय संस्कृतीचे दर्शन जगभर घडविले. अाजही बंजारा समाजात एक भाषा व एक पेहराव टिकून अाहे.
लाद चला बंजारा। ले चला अपना संसार ।।
बैल चले गी चले धाट से चले सांडरे ।
सांड की गरजना सुनकर
भाग चले जंगल के शेर ।।
संत सेवालाल महाराजांनी समाजातील कुप्रथा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. दारूबंदी करून स्त्रियांना अधिकार दिले. बंजारा समाज निरक्षर असल्याने महाराजांनी लाेकगीत, भजन लडीच्या माध्यमातून प्रबाेधन केले. त्या काळी समाजाला भजनाची अावड हाेती. हे अाेळखून त्यांनी बंजारा बाेलीभाषेत लडी, भजन रचना करून समाजात धार्मिक व सांस्कृतिक बदल घडवून अाणले. संत सेवालाल हे त्यागी, दूरदर्शिता, बुद्धिप्रामाण्य विचारांचे महान संत व थाेर समाजसुधारक हाेते. संत सेवालाल महाराजांचे क्रांतिकारी बाेल मानवाला वास्तववादी विचार करण्यास भाग पाडतात. या समाजाने बंजारा समाजाचा इतिहास व सेवाभावी शिकवण अापल्या कंठात सुरक्षित ठेवली अाहे.
आणि व्या जयंतीनिमित्त त्यांना काेटी काेटी विनम्र अभिवादन!
https://www.facebook.com/GorBanjaraCalendarSantoshBahiyaPawar?mibextid=ZbWKwL