India's next generation

India's next generation India's next generation is Comprehensive Magazine is Becoming widely popular among students For Upda

01/01/2017
15/01/2016

लातुरात जवळपास २५० खाजगी टँकर
शहर व परिसरात जवळपास २०० ते २५० खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. या टँकरद्वारे पुरवठा होणारे पाणी कितपत शुध्द आहे हा एक प्रश्नच आहे. याविषयी आता गंभीर होण्याची वेळ आली आहे. हे टँकरवाले कोणत्या स्रोतातून पाणी आणत आहेत? ते आणत असलेल्या पाण्याची शुध्दता कितपत योग्य आहे ? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होऊ लागल्या आहेत. टंचाईच्या स्थितीमुळे नागरिकांना पंधरा ते वीस दिवसांनी एक वेळा पाणी मिळू लागले आहे. नागरिक उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करू लागले आहेत. अधिकच्या काटकसरीमुळे तसेच टँकरच्या पाण्यामुळे पाण्याची शुध्दता गोैण ठरू लागल्यामुळे आरोग्याच्या प्रश्नावर उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत नागरिकांसह प्रशासनाकडून दक्षता घेणे आवश्यक झाले आहे.

मकरसंक्रातीचा मुहुर्तावर आपणही आयुष्यात सुर्याच्या संक्रमाणबरोबर यशाच्या उत्संतूंग  यशाच्या संक्रमणाकडे वळावे ! लातूर मि...
15/01/2016

मकरसंक्रातीचा मुहुर्तावर आपणही आयुष्यात सुर्याच्या संक्रमाणबरोबर यशाच्या उत्संतूंग यशाच्या संक्रमणाकडे वळावे ! लातूर मिडीयाकडून मकरसंक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा !

Happy New year....
01/01/2016

Happy New year....

06/12/2015

Good night..sweat dreams for peace@all.

29/11/2015

Good Morning!

27/04/2015

नेपाळला या संकटामध्ये मदत करण्यासाठी भारताने आपला मदतीचा हात पुढे केला आहे. परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन बचावकार्याची माहिती दिली. भारताने आतापर्यंत १०५० भारतीयांना हवाई मार्गे नेपाळमधून सुखरूप परत आणले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीयांना सोडविण्यासाठी २५ बसचीही सोय केल्याचे सांगून या बस उत्तर प्रदेशातील सुनाऊनी व बिहारमधील राक्साउलपर्यंत येतील, असे त्यांनी सांगितले.सरकारने भूकंपात बळी पडलेल्या बळींच्या नातेवाइकांना देण्यात येणाऱ्या रकमेतही वाढ करण्याचा आज निर्णय घेतला. भूकंपामध्ये मरण पावलेल्याभारतीय व्यक्तींच्या कुटुंबीयांना ६ लाख

रुपयांची मदत भारत सरकार देईल, असे स्पष्ट करून जयशंकर पुढे म्हणाले, सध्या सहा सी-१७ विमाने कार्यरत असून, लष्कराची आणखी तेरा विमाने काठमांडूच्या दिशेने रवाना होतील. भारतातील भूकंपाची माहिती देताना गृहसचिव एल.सी. गोयल यांनी भारतामध्ये आतापर्यंत ६२ जणांनी प्राण गमावले असून, २५९ व्यक्ती जखमी झाल्याचे सांगितले.

21/03/2015

Good morning.....
विदेशात अवैध संपत्ती जमा करणाऱ्यांना १० वर्षांच्या सश्रम कारावासाच्या शिक्षेसोबतच अघोषित संपत्ती जाहीर करणाऱ्यांना एक मार्ग प्रदान करण्याची तरतूद असलेले काळ्या पैशाबाबतचे एक विधेयक केंद्र सरकारने शुक्रवारी लोकसभेत सादर केले.
=====================
अलिकडेच रिझर्व बँक ऑफ इंडियाने व्याज दर कपात केली असून त्याचे फायदे ग्राहकांपर्यंत पोहोचावेत, अशी अपेक्षा या बँकेने व्यक्त केली आहे. रिझर्व बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एस.एस. मुंद्रा यांनी सांगितले, की रिझर्व बँकेने लागोपाठ दोनदा रेपो दरात कपात केली आहे. रिझर्व बँकेने अतिशय कमी काळात दोनदा रेपो दरात कपात केली. त्याचे फायदे ग्राहकांना दिले पाहिजे.
========================
अभिमत विद्यापीठातून व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणाऱ्या सामाजिक आणि आर्थिकदृष्टय़ा मागास विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल देत उच्च न्यायालयाने शुक्रवारी हजारो विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे.
====================
नोबेल पारितोषिक विजेत्यांची नावे आपल्याला कळते, मात्र तामीळ, मल्याळम सारख्या प्रादेशिक भाषांमध्ये लेखन करणाऱ्या साहित्यिकांविषयी माहिती होत नाही ही खेदाची बाब आहे. भारतीय साहित्यावर जागतिकीकरणाचा मोठा प्रभाव पडत आहे. यामुळे भाषा आणि संस्कृतीच्या नाते संबंधात दरी निर्माण झाल्याची खंत ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार अरूण साधू यांनी व्यक्त केली.
=============================
येमेनची राजधानी साना आज तीन आत्मघाती बॉंबस्फोटांनी हादरली. या स्फोटात 137 जण ठार आणि 345 जण जखमी झाल्याचे दूरचित्रवाणी वाहिन्यांचे वृत्त आहे.
===================
पावसाळ्यात दरवर्षी लाखाच्या पटीत झाडे लावण्याची घोषणा करणाऱ्या वनविभागाला त्या झाडांचा हिशेब ठेवावा लागणार आहे. दरवर्षी एकाच खड्ड्यात रोपटी लावून वृक्षारोपणाचा सोपस्कार पार पाडण्याच्या प्रकारांवर "ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम‘ (जीपीएस) ही उपग्रहाद्वारे नियंत्रित होणारी यंत्रणा लक्ष ठेवणार आहे.
==========================
भारताचे "वॉटर मॅन‘ म्हणून ओळखले जाणारे जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांना प्रतिष्ठेचा "स्टॉकहोम वॉटर प्राइज लॉरेट‘ हा पुरस्कार मिळाला आहे. पाणी जतन करण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांसाठी दिला जाणारा हा सर्वोच्च पुरस्कार आहे.
=====================
हवेतून हवेत मारा करणाऱ्या दृष्टीपल्याडचा वेग असलेल्या "अस्त्र‘ या पहिल्या भारतीय बनावटीच्या क्षेपणास्त्राच्या यशस्वितेमुळे हिंदुस्तान एरोनॉटिक्‍स लिमिटेडच्या (एचएएल) शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. "एचएएल‘च्या सहभागातून तयार झालेल्या "अस्त्र‘ या क्षेपणास्त्राची काल (ता. 19) ओडिशातील चंडीपूर येथे सुखोई 30 या लढाऊ विमानातून यशस्वीपणे चाचणी घेण्यात आली.
===========================
युरोपियन युनियनने भारतीय हापूसवरील बंदी मागे घेतल्यानंतर "अपेडा‘ने आंबा निर्यातीसाठी कंबर कसली आहे. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त आंबा निर्यात होण्यासाठी मॅंगोनेट या ऑनलाइन कार्यप्रणालीद्वारे निर्यातक्षम आंबा बागांच्या नोंदणीचा उपक्रम कृषी विभागाने हाती घेतला आहे.
=====================
आयएएस अधिकारी डी.के. रवी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी तासभर अगोदर आपल्या सहकारी महिला आयएएस अधिकाऱ्यासमवेत तब्बल ४४ वेळा संपर्क साधल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली असून त्यामुळे या प्रकरणास वेगळे वळण लागण्याची दाट चिन्हे आहेत. ही महिला रवी यांच्यासमवेतच आयएएसचे प्रशिक्षण घेत होती, असेही सांगण्यात येते.
===================
लष्करी वेषात आलेल्या दहशतवाद्यांच्या एका आत्मघाती पथकाने शुक्रवारी भल्या पहाटे जम्मू-काश्‍मीरच्या कथुआ जिल्ह्यातील एका पोलिस स्टेशनमध्ये घुसून हल्ला केला. यामध्ये तीन सुरक्षा जवान हुतात्मा झाले, तर पोलिस उपअधीक्षकांसह 11 अन्य जखमी झाले. दरम्यान, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत घुसखोरी केलेल्या आत्मघाती पथकातील दोन्ही दहशतवादी मारले गेले.
=======================

पाकिस्तानमधील खैबर पख्तुनवा प्रांत हा दहशतवाद्यांचा बालेकिल्ला असून, दहशतवाद हेच पाकचे राष्ट्रीय धोरण बनल्याने आपापसांतील शांततापूर्ण संबंधांमध्ये व्यत्यय निर्माण झाला असल्याचे भारताने म्हटले आहे. संरक्षण मंत्रालयाचा 2014-15चा वार्षिक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला असून, यामुळे पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा चव्हाट्यावर आला आहे. पाकिस्तानच्या दहशतवाद समर्थक धोरणाची पाळेमुळे ही लष्करी संस्थांमध्ये रुजली असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
================================
वादग्रस्त खाण व खनिज उत्खनन सुधारणा (विशेष तरतुदी) विधेयक-2015 राज्यसभेत कॉंग्रेसच्या गुप्त-सुप्त सहकार्याने मंजूर करवून घेण्यात सरकारला अखेर आज दुपारी यश आले. या मुद्द्यावर संयुक्त जनता दलाने (जेडीयू) सभात्याग केला, तर कॉंग्रेसने ऐन वेळी साथ सोडल्याने डावे पक्ष एकाकी पडले. राज्यांचे अधिकार डावलल्याने हे विधेयक घटनात्मक तरतुदींनुसार निवड समितीकडे पुन्हा पाठविण्याची पी. राजीव (माकप) यांची दुरुस्ती बहुमताने फेटाळली गेल्यावर विधेयकाचा मार्ग आणखी प्रशस्त झाला.
======================
विधान परिषद सभापतींची निवड बिनविरोध करण्याची परंपरा कायम ठेवत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रामराजे नाईक-निंबाळकर यांची शुक्रवारी सभागृहाने एकमताने सभापतिपदी निवड केली. निवडणुकीच्या रिंगणातील शरद रणपिसे (कॉंग्रेस) आणि डॉ. नीलम गोऱ्हे (शिवसेना) या उमेदवारांच्या नावांचे प्रस्ताव मागे घेण्यात येत असल्याचे प्रस्तावाच्या सूचक-अनुमोदकांनी जाहीर केले
===================

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! हे वर्ष आपल्याला निरोगी , प्रगतीचे तसेच आनंदी जावो.!
21/03/2015

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! हे वर्ष आपल्याला निरोगी , प्रगतीचे तसेच आनंदी जावो.!

20/03/2015

Good mornig......
इंटरनेटचा वाढता वापर आणि ऑनलाइन माध्यमातून वाढत्या शॉपिंगच्या (खरेदी) आवडीमुळे ‘डिजिटल कॉमर्स’ बाजारपेठ (मार्केट) 2015 मध्ये 1 लाख कोटी रुपयांपोक्षा जास्त होण्याची शक्यत आहे. याबाबतची माहिती आयएमएआय आणि आयएमआरबी यांच्या अहवालात सांगण्यात आलेली आहे.
==========
ओबीसी चळवळीतले ज्येष्ठ नेते, सत्यशोधक ओबीसी परिषदेचे संस्थापक हनुमंत बाबूराव उपरे (वय 63) यांचे गुरुवारी (ता. 19) सकाळी मुंबई येथे उपचारादरम्यान निधन झाले. मेंदूत रक्तस्राव झाल्याने त्यांच्यावर सुरवातीला औरंगाबाद येथे व नंतर मुंबईतील ब्रीच कॅण्डी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.
============
पेट्रोलियम आणि ऊर्जा मंत्रालयातील गोपनीय कागदपत्रे उघड करण्यात रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे उपाध्यक्ष (अर्थ) के. व्ही. मोहनन आणि मुंबईतील कायदेविषयक एका फर्मचे प्रमुख राजेंद्र चितळे यांचा समावेश असल्याचा संशय केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दिल्ली न्यायालयात व्यक्‍त केला आहे.
============================
आपल्या संगणकात मायक्रोसॉफ्ट ऑपरेटिंग सिस्टिम वापरत असलेल्या ग्राहकांना, तसेच पायरेटेड व्हर्जन वापरत असलेल्या ग्राहकांनाही मायक्रोसॉफ्ट विंडोज टेनचे अपडेट्‌स विनामूल्य उपलब्ध करून देणार आहे.
==========================
मुंबईतील मरीन लाईन्स येथील एलईडी दिव्यांच्या मुद्द्यावरून शिवसेना-भाजपमध्ये रंगलेला कलगीतुऱ्याचा सामना आता टिपेला पोहचला आहे. या प्रकरणात केंद्र सरकारने गैरव्यवहार केल्याचा सनसनाटी आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे
=======================
आर्थिक संकटाच्या गर्तेतून रशियन अर्थव्यवस्था सावरू लागली असून ती आता स्थिर होत असल्याचे रशियाचे
अर्थमंत्री अँटोन सिलूआनोव यांनी सांगितले. युक्रेनमधील संघर्षानंतर पाश्‍चात्त्य देशांनी लादलेले निर्बंध आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील खनिज तेलाच्या किमतीमध्ये घसरण झाल्याने रशियाच्या अर्थव्यवस्थेची कोंडी झाली होती.
=================
स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) रद्द केल्यावर अतिरिक्त 'व्हॅट' वसूल करून महानगरपालिकांना आर्थिक उत्पन्न मिळवून देण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव असला तरी त्यातून महापालिकांच्या स्वायत्ततेवर बंधने येतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
======================
विधान परिषदेच्या सभापतीपदावरून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने एकमेकांविरोधात दंड थोपटले असतानाच, काँग्रेसने गुरुवारी आघाडी सरकारच्या काळात वीज घोटाळा झाल्याचा आरोप करत तत्कालिन ऊर्जामंत्री अजित पवार यांनाच थेट लक्ष्य केले. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या शेवटच्या आठ वर्षांच्या कालखंडात सरकारी वीज कंपन्यांमध्ये झालेल्या घोटाळ्यावर राज्य सरकारने श्वेतपत्रिका काढावी, तसेच या भ्रष्टाचाराची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी मागणी करून काँग्रेसने विधानसभेत खळबळ उडवून दिली.
=====================
भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी लवकरच दोन नवीन योजना सुरु करण्याच्या तयारीत आहे. पहिल्या योजनेनुसार, ई-तिकीट असलेल्या प्रवाशांचा विमा करण्यात येणार आहे. यामुळे प्रवासादरम्यान वैयक्तिक अपघात, हॉस्पिटल खर्च आणि सामान हरवल्यास प्रवाशांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. या योजनेनुसार, प्रवाशांनी तिकीट घेतेवेळी एक रुपयापासून 25 रुपयापर्यंतची रक्कम भरल्यानंतर 2.05 पासून 10.50 लाख रुपयांचा विमा करू शकतात.
========================
माहिती औद्योगिक क्षेत्रातील नावाजलेली असणारी ‘मायक्रोसॉफ्ट’ कंपनी पुण्यात डाटा सेंटर स्थापन करणार आहे. या डाटा सेंटरच्या माध्यमातून कंपनीचा देशातील कारभार वाढविण्यास मदत होणार असल्याचे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक भास्कर प्रमाणिक यांनी सांगितले
=======================
पिपावाव शिपयार्ड’ मध्ये हिस्सेदारी खरेदी केल्यानंतर अनिल अंबानी देशाच्या संरक्षण क्षेत्रात पाऊल ठेवण्यास उत्सुक आहेत. अंबानी ग्रुपची प्रमुख कंपनी ‘रिलायन्स इंफ्रास्ट्रक्चर’ची एक अनुदानित कंपनीने 18000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या दोन मोठय़ा ‘मिलिट्री हेलिकॉप्टर’च्या कराराबाबत बोली लावली आहे
=====================
येत्या काही वर्षांत भारतीय रेल्वेचा ‘कायाकल्प’ घडवून आणण्याचा रेल्वे अंदाजपत्रकात जाहीर केलेला संकल्प तडीस नेण्याच्या दिशेने पुढचे पाऊल टाकत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ‘कायाकल्प परिषद’ स्थापन करण्याची व तिची धुरा ख्यातनाम उद्योगपती रतन टाटा यांच्या हाती सोपविण्याची घोषणा केली.
=================
लवकरच औषधे स्वस्त होण्याची शक्यता आहे. औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाने (एनपीपीए) कमी उत्पादन शुल्काचा फायदा ग्राहकांकडे हस्तांतरित करण्याचे आदेश औषध कंपन्यांना दिले आहेत. केंद्राने शैक्षणिक अधिभार, माध्यमिक व उच्च शिक्षण अधिभारातून औषधे वगळली आहे.
=================
श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे चीन मोठ्या प्रकल्पासाठी पुढाकार घेणार आहे. लंकेचे राष्ट्राध्यक्ष मैथरीपाला सिरिसेना लवकरच चीन दौ-यावर जाणार आहेत. चीनच्या प्रकल्पाला यापूर्वीच लंकेने मंजूरी दिल्याचे घोषित केले आहे. सिरिसेना सत्तेत आल्यानंतर भ्रष्टाचाराच्या कारणास्तव त्यांनी हा प्रकल्प रद्द केला होता. त्याचबरोबर पर्यावरणाची कारणेही सांगण्यात आली होती.

Address

Behind Malang Complex, Ambajogai Road
Latur
413512

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when India's next generation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to India's next generation:

Share