Nibban News Media Pvt.Ltd.

Nibban News Media Pvt.Ltd. Media is the fourth estate in democracy and is of utmost importance for Ambedkarite movement. Media is powerful medium of communication and opinion making. Ltd.

There is a lack of media house in Ambedkarite movement. There is an urgency to create the fourth estate of the movement and create a space of Ambedkarite Philosophy which will help in shaping the eco-socio-political environment of Indian Social Fabric by changing the thought process of the millions of oppressed, suppressed and depressed Indians. We have created the Nibban News Media Pvt. This is a

company which will create a media house under which many media products will be published in due course of time.

आग्रहाचे निमंत्रण!
05/10/2023

आग्रहाचे निमंत्रण!

25/09/2023

#चंद्रशेखर_बावनकुळे_तुमचा_चहा_आणि_चहावाला_दोघांना_घरी_बसविण्याची_ताकद_आहे_या_मिडीयामध्ये

मुंबई: सत्ता पिपासू भाजपला यंदा सत्ता आपल्या हातून जाणार यांची परिपूर्ण कल्पना आल्याने, त्यांचा सर्वच ठिकाणी तोल जाऊ लागला आहे. आपल्या चूकिच्या एका ही कृती बद्दल कोणी ब्र देखील काढू नये यासाठी हे कोणत्याही थराला जाऊ लागल्याचे एक नवीन उदाहरण आपल्या समोर आले आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट प्रामाणिक पत्रकारांना जाहीर धमकी दिल्याची माहिती समोर आली असून, यांना सत्तेचा किती माज चढलाय याचा अनुभव जनतेला आता नक्कीच आला असेल.

रविवार दिनांक २४ सप्टेंबर २०२३ रोजी अहमदनगर शहरातील सावेडी येथील माऊली सभागृहात महाविजय २०२४ विधानसभा पदाधिकारी संवाद बैठकिचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात “पत्रकारांनी २०२४ पर्यंत आपल्याविरोधात एकही बातमी छापू नये, यासाठी त्यांना (पोर्टलवाले, प्रिंट आणि इलेक्टॉनिक्स मिडीयावाले) चहा प्यायला घेऊन जा. त्यांना चहा प्यायला बोलवायचे म्हणजे तुम्हाला समजलेच असेल? तसेच त्यांना ढाब्यावरही घेऊन जा. जर त्यात काही कमी जास्त झालेच तर सुजय विखे आहेतच. असा आदेश त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दिला.

पुढे त्यांना म्हटले की, जे पदाधिकारी बुथ साभाळणार आहेत, ते जेथे काम करतील त्याठिकाणी मिडीयावाले कोण आहेत, पोर्टलवाले कोण आहेत हे पाहावे. आपण एवढे चांगले काम करतोय, पण हे असे काही टाकतात की, जणू गावात बॉम्बच फुटलाय. यासाठी बुथवर जे चार, पाच पत्रकार आहेत त्यांची यादी तयार करा. व यात जे कोणी एक-दोन पोर्टलवाले, प्रिंट आणि इलेक्टॉनिक्सवाले असतील, त्यांना चहा प्यायला बोलवा. चहा प्यायला बोलवाा म्हणजे तुम्हाला समजलेच असेल काय ते?

थोडक्यात बावनकुळे यांनी आपल्या भाजपाई कार्यकर्त्यांना जाहीररित्या प्रामाणिम काम करणाऱ्या पत्रकारांना, मिडीयावाल्यांना मारण्याचे/विकत घेण्याचे आदेशच दिले आहेत. कारण आज अन्यायाविरोधात जर कोणती मिडीया प्रामाणिकपणे काम करत असेल तर ती केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या विचारांवर चालणारी मिडीया आहे.

आज ज्यांना प्रस्थापित मिडीयाचा दर्जा दिला गेला आहे, ती सर्वच सत्ताधाऱ्यांच्या दावणीला बाधली गेली आहेत. त्यामुळे त्यांच्या कडून जनतेने आता अपेक्षा करणे सोडून दिले पाहिजे. व आपल्या न्याय, हक्कासाठी लढणारा आंबेडकरी मिडीया अधिक पटीने मोठा केला पाहिजे.

तेसच चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या निषेधार्थ वक्तव्याबद्दल संबंधित समस्त पत्रकारांची जाहीर माफी मागावी. तसेच ही मिडीया आणि समजूतदार जनता तुम्हाला, तुमच्या चहाला व चहावाल्याला यंदा धाब्यावर बसविणार यात तिळमात्र शंका नाही.

एक मिडीयावाला…
सुमेध वंदना मधुकर सोनावणे
9967162063

07/07/2023

#बुद्ध_संपत_नसतो

बुद्धा तुझा प्रॉब्लेम काय आहे माहीते का?
तू काही केल्या संपत नाहीस
त्यांच्या असंख्य कुरघोड्या नंतरही
कधी कंपत नाहीस

म्हणूनच तर तुला 'नववा अवतार' घोषित करून तेहत्तीसकोटीने आधीच गडगंज असलेल्या गरिबांच्या झोळीत टाकलंय
आणि त्यांनी ही तुला पद्धतशीरपणे वाळीत टाकलंय

तू कधीच त्यांच्या 'श्रद्धेत' पण नसतोस
आणि 'श्राद्धात' पण नसतोस
तरी ही तुला नववा अवतार संबोधण्यास त्यांच्या डोक्यात मात्र कायम असतोस

काहींनी तुला हॉल मध्ये, तर काहींनी शोकेस मध्ये बसवून परिसर नटवलाय
तर काहींनी तुला शेंदूर फासून
लुगडं नेसवून मंदिरात बसवलाय
तरी ही तू संपत नाहीस...

कारण
तू दिलेला लोककल्याणकारी मार्ग अवलंबण्यास
कोणत्याही कर्मकांडाची गरज भासत नाही
आणि तुझे पंचशील अन् अष्टांगिक मार्ग
स्वर्ग नरकाकडे जाण्यासारखे ही दिसत नाही

त्यामुळे भक्तांना नवस बळी वाघ्या मुरळी उपास तापास चमत्कार यांचा आस्वाद घेता येत नाही
म्हणूनच तुला दैवी, काल्पनिकतेचा दर्जा ही देता येत नाही
तू इकडे पण त्यांची गोची केलीस...

असो...
तुला लाइटली घेणं त्यांना फार महागात पडलंय...
तुझ्या तत्त्वज्ञानाची व्यापकता ते तीन पावलांमध्ये काबीज करण्यास निघाले खरे
मात्र आयुष्याची पंचेचाळीस वर्षे लोकहितासाठी पायी चालणारा बुद्ध ते आजही गाठू शकले नाहीत

तू केवळ मूर्त्यांमध्येच असतास ना तर कदाचित संपला ही असतास
पण तू तर मानवाच्या कल्याणकारी विचारांमध्ये आहेस
त्यामुळे संपण्याच्या प्रश्नच येत नाही...

प्रश्न येतो तर तो हाच की, काय कर्मकांडातून मुक्त होऊन तुम्ही बुद्धाची शिकवण अंगिकारली आहे?

चिंता 'नाही' म्हणणाऱ्यांची वाटते...
कारण
ते आता केवळ कर्मकांडात गुतवायला नाही, तर माणसाला माणसावर मुतवायला ही यशस्वी झालेत...

म्हणून बुद्धाला आता अवतारातून काढून आचरणात आणायची आज नितांत आवश्यकता आहे...

त्यानेच समाजात प्रेम मैत्री करुणा बंधुभाव रुजणार आहे...
जे तुझ्या माझ्या आणि समाजाच्या हिताचे असणार आहे...

सुमेध वंदना मधुकर सोनावणे
9967162063

22/07/2022

#निब्बाण_न्युज_मिडिया

आवाहन

जयभीम!

निब्बाण न्युज मिडिया प्रा. लि. ही कंपनी माध्यम क्षेत्रात पदार्पण करीत आहे. लवकरच मराठी दैनिक प्रकाशित करण्यासाठी नियोजन सुरु आहे.

आंबेडकरी चळवळ ही एक अव्याहत चालणारी प्रक्रिया आहे. बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकिय अशा अनेक अंगांनी प्रवाही असणारी अशी ही चळवळ आहे.

डाॅ बाबासाहेब आ़बेडकर यांनी या देशाच्या व्यवस्थेची चिरफाड करुन तीचे निदान केले आहे. हा देश आणि देशातील व्यक्ती व समाज ब्राम्हणी धर्म संस्कृतीने गांजलेला आहे. ही एक शोषण व्यवस्था आहे. जाती व्यवस्था हे इथल्या समाज रचनेचे व्यवच्छेदक लक्षण आहे. अस्पृश्यता हा या ब्राम्हणी धर्म संस्कृतीचा अमानुष असा परिपाक आहे. या व्यवस्थेने इथल्या कोट्यवधी लोकांना न्याय, स्वातत्र्य, समता व बंधुता नाकारली आहे; मुलभूत हक्क नाकारले आहेत. धर्म, जात, वंश, पंथ, प्रांत, भाषा, लिंग अशा अनेक मुद्दयांवरुन माणसामाणसात भेदाभेद निर्मिले आहेत. त्यामुळे या देशाच्या एकता व एकात्मतेला नेहमीच धोका निर्माण झालेला आहे!

या सर्व समस्यांची सर्वांगाने चिकित्सा करुन त्या समस्यांचा बिमोड करुन एका नव राष्ट्राच्या निर्मिती साठीचे परिपूर्ण असे क्रांती रसायन बाबासाहेबांनी दिलेले आहे. या क्रांती रसायनाचे शिक्षण, प्रशिक्षण व उपयोजन करणे आज अत्यावश्यक झाले आहे. हे एक मिशन आहे. त्यासाठी समर्पित नेतृत्व, कार्यकर्ते व अनुयायांची फौज उभी करणे व या देशाला डाॅ बाबासाहेब आंबेडकर प्रणित न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुत्व या पायावर नव राष्ट्राची निर्मिती करण्यासाठी या देशातील कोट्यवधी लोकांचे संचलन करणे हा मध्मम मार्ग आहे.

राष्ट्र निर्माणासाठी बाबासाहेबांनी स्टेट ॲण्ड मायनाॅरिटिज, भारतीय संविधान, सांसदिय लोकशाही, लोकशाहीच्या यशस्वितेसाठीच्या पुर्व अटी, रिपब्लिकन विचारधारा, बुद्ध आणि त्यांचा धम्म, बावीस प्रतिज्ञा असे परिपूर्ण क्रांती रसायन दिले आहे. या कृती कार्यक्रमांवर उभे राहणारे ते आंबेडकरी राष्ट्र होय. या देशाचे नाव नव्हे तर चारित्र्य बदलण्याची गरज आहे. आज ब्राम्हणी विचारधारेवर हा देश संचलित होत आहे. बाबासाहेबांच्या परिपूर्ण विचार धारेवर चालणा-या *आंबेडकरी राष्ट्राची*
निर्मिती करणे हेच खरे मिशन होय!

या कामी वृत्तपत्रांची भूमिका महत्वाची राहणार आहे. वृत्तपत्र हे माणसामाणसाला जोडण्याचे, संवाद साधण्याचे व एकाच वेळी सर्वांना एका विशिष्ट दिशेने नेण्याचे काम करते. मत घडविणे व मत परिवर्तन करणे हे वर्तमानपत्र व एकूणच सर्व माध्यमांचे कार्य आहे. समाजाचे सामुहिक वर्तन उच्च दर्जाचे असावे; प्रज्ञा, शील, करुणा या जीवन मुल्यांना आदर्श मानून चालणारे असावे. धर्म, धर्मग्रंथ, आत्मा, परमात्मा, पुनर्जन्म, पुर्वजन्म, नशीब, उपास तापास, नवस सायास, पुजा अर्चा, अंधश्रद्धा यांत बुडालेल्या समाजाला या दुष्टचक्रातून बाहेर काढून विवेकशील व शीलवान व्यक्ती, समाज व राष्ट्राची निर्मिति करण्याची ऐतिहासिक जबाबदारी बाबासाहेबांनी आपल्या खांद्यावर दिली आहे. हे क्रांतीकारी मिशन पूर्ण करण्यासाठी वृत्तपत्रांचे योगदान फार मोठे राहणार आहे.

"ज्या चळवळीला स्वत:चे वृत्तपत्र नसते ती चळवळ पंख तुटलेल्या पक्षासारखी असते," असं बाबासाहेब म्हणतात. वृत्तपत्रांचे महत्व व सामर्थ्य बाबासाहेब जाणून होते. म्हणूनच त्यांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, प्रबुद्ध भारत अशी विविध वृत्तपत्रे चालविली. ज्या काळात बहुतांश अस्पृश्य समाज निरक्षर होता, त्या काळात बाबासाहेबांनी चालविलेल्या या नियतकालिकांनी बाबासाहेबांचे विचार व संघर्ष लोकांपर्यंत नेण्याचे व त्यांच्यात जागृती निर्माण करण्याचे बहुमोल कार्य केले.

आधुनिक जगात विकसित झालेल्या डिजिटल मिडिया, ईलेक्ट्राॅनिक मिडिया या क्षेत्रांकडेही आपल्याला वळावे लागेल. निब्बाण न्युज मिडिया प्रा. लि. या सर्व क्षेत्रात नजिकच्या काळात समर्थपणे पर्याय निर्माण करील यात शंका नाही!

आपल्याला आम्ही विनंती करीत आहोत की निब्बाण न्युज मिडियाने सुरु केलेल्या या भव्य अशा माध्यम क्रांतीमध्ये आर्थिक, बौद्धिक आणि शक्य त्या प्रकारे सहाय्य करुन सामिल व्हा! निब्बाण न्युज मिडिया प्रा. लि. मध्ये आर्थिक गु़ंतवणूक करुन आकर्षक परतावा मिळवा!

'आंबेडकरी राष्ट्र' निर्माणाच्या या महत्वाकांक्षी मिशनमध्ये आपले स्वागत आहे!

- प्रेमरत्न चौकेकर
निब्बाण न्यूज मिडिया प्रा. लि.

23/06/2022

Address

NIBBAN NEWS MEDIA HOUSE, Office NO. 56, 4th Floor, Bismillha Building, Ranade Road, Dadar West, Mumbai
Mahim
400028

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nibban News Media Pvt.Ltd. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Nibban News Media Pvt.Ltd.:

Share