Konkan Times

Konkan Times कोंकणातील सगळ्यात मोठ डिजिटल बातमीपत्र

वंदे भारतमुळे कोकण रेल्वेमार्गावरील 5 गाडया सायडिंगला पडणार, प्रवासाला उशीर?Mumbai Goa Vande Bharat Express : मुंबईहून स...
01/07/2023

वंदे भारतमुळे कोकण रेल्वेमार्गावरील 5 गाडया सायडिंगला पडणार, प्रवासाला उशीर?

Mumbai Goa Vande Bharat Express : मुंबईहून सुटणारी वंदे भारत एक्स्प्रेस सेमी हायस्पीड दर्जाची वातानुकूलित एक्प्रेस आठ तासांत मडगावला पोहोचवण्याचे उद्दिष्ट रेल्वेने ठेवले आहे. त्यामुळे या गाडीला नेहमीच ट्रॅक उपलब्ध करुन द्यावा लागणार आहे. त्याचा फटका सर्वसामान्यांसाठी याच मार्गावर धावणाऱ्या पाच लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसना बसणार आहे.

Mumbai Goa Vande Bharat Express : कोकण रेल्वे मार्गावर मोठा गाजावाजा करत वंदे भारत एक्स्प्रेस सुरु झाली आहे. सुपरफास्ट रेल्वे म्हणून तिला सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, वंदे भारत एक्प्रेसमुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या महत्त्वाच्या 5 गाडया सायडिंगला पडणार आहेत. त्यामुळे या गाड्यांतून प्रवास करणाऱ्यांना काहीसा उशीर होणार आहे.

मुंबईहून सुटणारी वंदे भारत एक्स्प्रेस सेमी हायस्पीड दर्जाची वातानुकूलित एक्प्रेस आठ तासांत मडगावला पोहोचवण्याचे उद्दिष्ट रेल्वेने ठेवले आहे. त्यामुळे या गाडीला नेहमीच ट्रॅक उपलब्ध करुन द्यावा लागणार आहे. त्याचा फटका सर्वसामान्यांसाठी याच मार्गावर धावणाऱ्या पाच लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसना बसणार आहे. वंदे भारत बाजू देण्यासाठी या गाड्या सायडिंगला टाकल्या जाणार आहेत. त्यामुळे सामान्य प्रवाशांना ताटकळत राहावे लागणार आहे.

वंदे भारत एक्प्रेस मुंबईतून पहाटे 5.25 वाजता सुटणार असून मान्सून वेळापत्रकाप्रमाणे दुपारी तीनच्या सुमारास तर एरवी दुपारी एक वाजता मडगावला पोहोचणार आहे. त्यामुळे या कालावधीत कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या पाच लांब पल्ल्याच्या गाड्यांना नेहमी सायडिंगला टाकले जाणार आहे. यामध्ये नागपूर-मडगाव, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस, मंगला एक्स्प्रेस या गाड्या थांबवून ठेवण्यात येणार आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव तेजस एक्स्प्रेस या गाडीलाही नेहमीच लेटमार्क लागणार आहे. तसेच दुपारी मडगावहून मुंबईसाठी सुटणारी तेजस एक्स्प्रेसही सायडिंगला पडणार असल्याची माहिती रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने दिली.

वंदे भारत सुरु झाल्यानंतर चांगला प्रतिसाद मिळाला आहे. शुक्रवारचे बुकिंग फुल्ल झाले होते. या पहिल्या फेरीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ट्रेन क्रमांक 22229 सीएसएमटी-मडगाव वंदे भारत या एक्प्रेसचे बुकिंग फुल्ल झाले आहे. सायंकाळपर्यंत चेअर कारच्या 512 पैकी 463 सीट बुक झाल्या होत्या, तर एक्झिक्युटिव्ह कोचमधील सर्व सीट बुक झाल्यात.

या गाड्यांना वंदे भारतचा फटका
वंदे भारत एक्प्रेसला कोकण रेल्वे मार्गावर प्राधान्याने ट्रॅक उपलब्ध करून घ्यावा लागणार असल्याने पाच गाड्यांना फटका बसणार आहे.

ट्रेन क्रमांक - 01139 कल्याण-मडगाव
ट्रेन क्रमांक - 12051 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव
ट्रेन क्रमांक - 12618 हजरत निजामुद्दीन-एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेस
ट्रेन क्रमांक - 22119 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-तेजस एक्स्प्रेस
ट्रेन क्रमांक - 22120 मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तेजस एक्स्प्रेस

वंदे भारत : मुंबई ते मडगांवपर्यंत प्रत्येक ठिकाणचा तिकिट दर पाहा
मुंबई CSMT - मडगाव - एसी चेअर कार -1815 रुपये आणि EC Executive Class साठी 3360 रुपये

मुंबई दादर - मडगाव - एसी चेअर कार -1815 रुपये आणि EC Executive Class साठी 3360 रुपये

मुंबई CSMT - रत्नागिरी - एसी चेअर कार -1120 रुपये आणि EC Executive Class साठी 2125 रुपये

पनवेल - रत्नागिरी - सीसी एसी चेअर कार -1010 रुपये आणि EC Executive Class साठी 1900 रुपये

रत्नागिरी - मडगाव - एसी चेअर कार -1055 रुपये आणि EC Executive Class साठी 1880 रुपये

मुंबई CSMT - कणकवली - एसी चेअर कार -1365 रुपये आणि EC Executive Class साठी 2635 रुपये

पनवेल - कणकवली - सीसी एसी चेअर कार -1270 रुपये आणि EC Executive Class साठी 2450 रुपये

कणकवली - मडगाव - एसी चेअर कार - 790 रुपये आणि EC Executive Class साठी 1355 रुपये

मुंबई CSMT - मडगाव - एसी चेअर कार -1815 रुपये आणि EC Executive Class साठी 3360 रुपये

पनवेल - थिविंम - सीसी एसी चेअर कार -1660 रुपये आणि EC Executive Class 3015 रुपये

कोकणातील घरं प्रचंड पावसातही इतकी मजबूत कशी? मातीची घरे टिकतात कशी?तुम्ही कधी हा विचार केलाय का की, एवढ्या प्रचंड पावसात...
12/06/2023

कोकणातील घरं प्रचंड पावसातही इतकी मजबूत कशी? मातीची घरे टिकतात कशी?

तुम्ही कधी हा विचार केलाय का की, एवढ्या प्रचंड पावसात कोकणातील घरं इतकी मजबूत कशी? कोकणात पावसात मातीची घरे कशी टिकतात? याचं प्रश्नांची उत्तर सांगणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताय.

सह्याद्रीच्या माथ्यावर असलेलं तांबेड नावाचं गवत, खार्वी, बांबू आणि नारळाची झावळी अशा नैसर्गिक वस्तू वापरुन भक्कम भिंती उभ्या करत कोकणातली ही घर उभी केली जातात. निसर्गातील ही रान माणसे आपल्या घरांना मुलांप्रमाणे जपतात. निसर्गाशी एकरुप होऊन त्याचं संगीत गात असतात. निसर्गाचा वापरच निसर्गाचं संवर्धन करायला माणसाला शिकवतो. कोकणात प्रचंड पाऊस असतो अशावेळी, हे पाणी घरांच्या भिंतीमध्ये झिरपु नये यासाठी कोकणात विशिष्ठ रचनेची घरे बांधली जातात. घरांना शेणानं संपूर्ण आतून-बाहेरुन सारवलं जातं.

गणपतीपुळे समुद्रकिनारी पर्यटकांना लाटेचा तडाखागणपतीपुळे : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बिपरजॉय वादळाचा प्रभाव कोकणच्या...
12/06/2023

गणपतीपुळे समुद्रकिनारी पर्यटकांना लाटेचा तडाखा

गणपतीपुळे : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बिपरजॉय वादळाचा प्रभाव कोकणच्या किनारपट्टीवर जाणवत असून, गणपतीपुळे येथे किनार्‍यावर असलेल्या पर्यटकांना लाटांचा दणका बसला. या लाटांमुळे येथील काही स्टॉलमध्येही पाणी शिरून विक्रेत्यांचे नुकसान झाले.
यंदा मान्सून लांबला असला तरी बिपरजॉय वादळामुळे समुद्र खवळला आहे. समुद्रात 10 ते 11 फूट उंचीच्या लाटा उसळत असून, याचा तडाखा किनारपट्टी भागाला बसत आहे.

रविवारी सायंकाळी 4.30 च्या सुमारास उधाणाच्या लाटेचा दणका गणपतीपुळेत आलेल्या पर्यटकांना बसला. येथील कठड्यावर हे पर्यटक बसले होते. अचानक आलेल्या लाटेने ते समुद्राच्या पाण्यात ओढले गेले. तेथे असलेल्या अन्य लोकांनी त्यांना पाण्याबाहेर काढले. या घटनेत पर्यटकांना किरकोळ दुखापत झाली. या लाटेमुळे समुद्राचे पाणी नजीकच्या स्टॉलमध्येही शिरल्याने विक्रेत्यांचेही नुकसान झाले.

कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करताय? तपासून घ्या तुमच्या गाडीची वेळ!कोकण रेल्वे मार्गावर पावसाळी वेळापत्रक लागूरत्नागिरी :...
11/06/2023

कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करताय? तपासून घ्या तुमच्या गाडीची वेळ!

कोकण रेल्वे मार्गावर पावसाळी वेळापत्रक लागू
रत्नागिरी : कोकणात कोसळणारा मुसळधार पाऊस लक्षात घेऊन मागील अनेक वर्षांपासून कोकण रेल्वे मार्गावर पावसाळ्यासाठी स्वतंत्र वेळापत्रक लागू केली जाते. या कालावधीत बिगर पावसाळी वेळापत्रकाच्या तुलनेत अनेक गाड्यांच्या वेळेमध्ये फरक असू शकतो. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी आपल्या गाडीची वेळ तपासून घ्यावी, असे आवाहन रेल्वेकडून वेळोवेळी करण्यात आले आहे.

पावसाळी वेळापत्रकानुसार धावणाऱ्या गाडीने प्रवास करताना प्रवाशांनी आपल्या गाडीची वेळ तपासून घ्यायची आहे. आरक्षणावर तसे नमूदही केलेले असते. मात्र प्रवासी त्याकडे दुर्लक्ष करतात आणि शनिवारसारख्या घटना घडतात.
शनिवारी 10 जून रोजी कोकण रेल्वेच्या मार्गावरील गाड्यांना लागू झाले. खरे तर पावसाळी वेळापत्रक हे कोकण रेल्वेसाठी नवीन नाही. तरीही जेव्हा हा बदल होतो तेव्हा प्रवासाला निघताना गाडीची सुधारित वेळ तपासून न घेतल्याने प्रवाशांचा गोंधळ उडतो. असाच गोंधळ रत्नागिरीत शनिवारी मडगाव ते मुंबई सीएसएमटी दरम्यान धावणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेसच्या बाबतीत उडाला. यामुळे अप जनशताब्दी एक्सप्रेसने मुंबईकडे जाणाऱ्या 50 हून अधिक प्रवाशांची ट्रेन चुकली.

प्रवाशांच्या म्हणण्यानुसार रेल्वे कडून सुधारित वेळेचा एसएमएस येणे अपेक्षित आहे, तो न आल्यामुळे आमची गाडी चुकली. रत्नागिरी स्थानकावर घडलेले या प्रकारामुळे गाडी चुकलेल्या प्रवाशांनी रेल्वे स्थानकातील अधिकाऱ्यांशी उचलत घातली.

पावसाळी वेळापत्रक लागू व्हायच्या आधी जर कुणी कोकण रेल्वे मार्ग देणाऱ्या गाडीचे आरक्षण केले असेल, तर त्यांनी प्रवासाला निघण्यापूर्वी गाडीची सुधारित वेळ तपासून घ्यायची आहे. मात्र अनेक प्रवासी या सूचनेकडे दुर्लक्ष करतात आणि असा गोंधळ उडतो. असा अनुभव याआधी देखील पावसाळी वेळापत्रक लागू झाल्याच्या पहिल्या दिवशी आलेला आहे.
शनिवारी अशाच गोंधळामुळे गाडी चुकलेल्या प्रवाशांचा अनुभव लक्षात घेता, जर कुणी कोकण रेल्वे मार्गे जाणाऱ्या गाडीचे आगाऊ आरक्षण केले असेल तर प्रवासाला निघण्याआधी त्यांनी का आपल्या गाडीची वेळ तपासून घेणे गरजेचे आहे. असे न केल्यास तुमची देखील गाडी चुकू शकते.

‘कोरे’ मार्गाने धावत जाणारी वंदे भारत एक्सप्रेस पाहत बसणे राजापूरवासियांच्या नशिबी!राजापूर : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ...
11/06/2023

‘कोरे’ मार्गाने धावत जाणारी वंदे भारत एक्सप्रेस पाहत बसणे राजापूरवासियांच्या नशिबी!

राजापूर : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कोकणात रेल्वे आणण्यासाठी ज्या तत्कालीन राजापूर लोकसभा मतदारसंघाने अत्यंत महत्त्वाचे भूमिका बजावली त्या राजापूर मतदारसंघातील रेल्वे स्थानक आणि प्रवासी जनतेच्या सोयी सुविधांबाबत रेल्वेला विसर पडला आहे. ओडिशामधील भीषण रेल्वे दुर्घटनेमुळे सेवा लांबणीवर पडलेली वंदे भारत एक्सप्रेस देखील राजापूरवासीय जनतेला केवळ पाहत बसावी लागणार आहे. गाड्यांना थांबे देण्याच्या बाबतीत राजापूरवर अन्याय होत असल्याच्या प्रतिक्रिया या निमित्ताने राजापूरवासीय प्रवासी जनतेने व्यक्त केल्या आहेत.

कोकणात रेल्वे यावी म्हणून तत्कालीन राजापूर लोकसभा मतदारसंघाने संसदेत महत्वाची भूमिका बजावली त्या राजापूरवर मात्र कोकण रेल्वे प्रशासनाने सातत्याने अन्यायच केला आहे. आता वंदे भारत एक्स्प्रेसला राजापुरात थांबा नाकारून तालुकावासीच्या पदरी घोर निराशा पडली आहे. यामुळे ‘कोरे’ मार्गावरुन धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस पहाणे एवढेच तालुकावासीयांच्या नशीबी आले आहे. दरम्यान राजापूर स्थानकात वंदे भारतला थांबा देण्यात यावा, अशी जोरदार मागणी तालुक्यातुन वाढू लागली आहे.

*Crop Insurance: मार्च 2023 मध्ये झालेल्या अवकाळी पावसाची नुकसान भरपाई, या दहा जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मिळणार 15,000 रु...
22/04/2023

*Crop Insurance: मार्च 2023 मध्ये झालेल्या अवकाळी पावसाची नुकसान भरपाई, या दहा जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मिळणार 15,000 रुपये*

अतिवृष्टी नुकसान भरपाई: मागील (मार्च) महिन्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीने नुकसान झालेल्या दहा जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सरसकट 15,000 रुपयांची नुकसान भरपाई घोषित करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासन महसुल व वनविभागातर्फे दिनांक. 21 एप्रिल 2023 रोजी हा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

नवनवीन व्यवसाय कल्पना, सरकारी योजना, शेतीविषयक माहिती, बाजारभाव, ताज्या बातम्या आता डायरेक्ट तुमच्या WhatsApp वर.🗞️

ग्रूप जॉईन लिंक:

https://chat.whatsapp.com/IcRcf2LAZ2wEw6zAnZWYi3

अतिवृष्टी नुकसान भरपाई: मागील (मार्च) महिन्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीने नुकसान झालेल्या दहा जिल्ह्यातील शेतकर्....

Mumbai-Goa highway | राजापूरचा टोलनाका सुरू आणि बंदही झाला!कोंकणातील ताज्या घडामोडी आता मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप वर. आजच ...
14/04/2023

Mumbai-Goa highway | राजापूरचा टोलनाका सुरू आणि बंदही झाला!

कोंकणातील ताज्या घडामोडी आता मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप वर. आजच KonkanTimes ग्रूप जॉईन करा..

ग्रूप जॉईन लिंक 👇👇??

https://chat.whatsapp.com/GzHQyZ1OJC9HtOCcvCCLdF

रत्नागिरी : मुंबई- गोवा महामार्गाचे काम पूर्ण झाल्याशिवाय टोल वसुली केली जाऊ नये अशी स्थानिकांची भूमिका असताना 11 एप्रिल रोजी राजापूर नजीक हातिवले येथील टोल नाक्यावर अचानक पोलीस बंदोबस्तात टोल वसुली सुरू झाली खरी मात्र विरोधाच्या पार्श्वभूमीवर 14 एप्रिल रोजी बैठक होईपर्यंत ती स्थगित देखील करण्यात आली.

मुंबई गोवा महामार्गावर हातिवले येथे उभारण्यात आलेल्या टोल प्लाझावर याआधी दोन वेळा संबंधित ठेकेदार कंपनीकडून टोल वसुलीचा प्रयत्न झाला होता. मात्र वाहनधारक तसेच स्थानिकांच्या प्रखर विरोधामुळे आणि सर्वच राजकीय पक्ष पक्षांनी रस्त्यावर उतरत आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे डिसेंबरपासून राजापूरमधील टोल वसुली बंदच होती.

महामार्गावरील टोल वसुली संदर्भात विरोधाची पार्श्वभूमी असताना 11 एप्रिल रोजी अचानक पोलीस बंदोबस्तात येथील टोल प्लाझावर टोल वसुली सुरू करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर बुधवारी विरोध कर्त्या रहिवाशांनी पालकमंत्री उदय सामंत यांची रत्नागिरी येथे भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी पालकमंत्र्यांनी दिनांक 14 एप्रिल रोजी अधिकाऱ्यांसोबत या संदर्भात बैठक घेण्याचे रहिवाशांना आश्वासन देत तोपर्यंत टोल वसुलीला स्थगिती दिली आहे. त्यामुळे मंगळवारी सुरू झाली टोल वसुली बुधवारपासून स्थगित करण्यात आली आहे.

Mumbai Goa Highway : मुंबई - गोवा महामार्गाचे काम रखडल्याने उच्च न्यायालयाची मोठी टिप्पणीMumbai Goa Highway : मुंबई - गो...
13/04/2023

Mumbai Goa Highway : मुंबई - गोवा महामार्गाचे काम रखडल्याने उच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी

Mumbai Goa Highway : मुंबई - गोवा महामार्गाचे रखडलेले काम आणि वाढते अपघात याबाबत वकील ओवेस पेचकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या महामार्गाचे काम रखडल्याने कामाच्या डेडलाईनबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने मोठी टिप्पणी केली आहे.

Mumbai Goa Highway : मुंबई -गोवा महामार्गाचे काम रखडल्याने कामाच्या डेडलाईनबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने मोठी टिप्पणी केली आहे. पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्यातील काम 31 मेपर्यंत पूर्ण होईल अशी माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे. त्यावर मुंबई-गोवा डेडलाईन पाळली जाते का बघू, अशी टिप्पणी उच्च न्यायालयाने केली आहे.

पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्यातील काम कंपनीला साहित्याचा तुटवडा भासल्याने लांबल्याची माहिती कंत्राटदाराने दिली. या महामार्गाचे रखडलेले काम आणि वाढते अपघात याबाबत वकील ओवेस पेचकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर उत्तर देताना च्च न्यायालयाने टिप्पणी केली आहे. त्यामुळे आता मुंबई-गोवा महामार्गाचा पहिला टप्पा 31 मेपर्यंत सुरु होण्यीची शक्यता आहे.

कोंकणातील ताज्या घडामोडी आता मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप वर. आजच KonkanTimes ग्रूप जॉईन करा..

ग्रूप जॉईन लिंक 👇👇

https://chat.whatsapp.com/GzHQyZ1OJC9HtOCcvCCLdF

KonkanTimes - The Voice of Konkan कोंकणातील सगळयात मोठे डिजिटल वृत्तपत्र 📰कोंकणातील ताज्या घडामोडी आता मिळवा तुमच्या व्ह...
12/04/2023

KonkanTimes - The Voice of Konkan

कोंकणातील सगळयात मोठे डिजिटल वृत्तपत्र 📰

कोंकणातील ताज्या घडामोडी आता मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप वर. आजच KonkanTimes ग्रूप जॉईन करा..

ग्रूप जॉईन लिंक 👇👇https://chat.whatsapp.com/GzHQyZ1OJC9HtOCcvCCLdF

उधना-मंगळूरू समर स्पेशल उद्यापासून धावणार!वसई रोड, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी थांबे घेत मंगळूरूला विसावणाररत्नागिरी : गुजर...
12/04/2023

उधना-मंगळूरू समर स्पेशल उद्यापासून धावणार!

वसई रोड, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी थांबे घेत मंगळूरूला विसावणार

रत्नागिरी : गुजरातमधील उधना ते कोकण रेल्वे मार्गे मंगळुरू दरम्यान धावणाऱ्या समर स्पेशल गाड्या रेल्वेकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. या गाड्या १२ एप्रिलपासून सुरू होणार असून त्या जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालवल्या जाणार आहेत.

गाडी क्र. ०९०५७ उधना जं. – मंगळुरु जं. साप्ताहिक स्पेशल उधना जंक्शन येथून दिनांक 12 एप्रिल ते ७ जून 2023 या कालावधीत रात्री 20:00 वाजता सुटून मंगळुरू जंक्शनला दुसऱ्या दिवशी 19:40 वाजता पोचणार आहे.

गाडी क्र. ०९०५८ मंगळुरु जं. – उधना जं. मंगळुरु जंक्शन येथून साप्ताहिक स्पेशल हेअर गाडी रात्री 21:10 वाजता गुरुवार 13/04/2023, 20/04/2023, 27/04/2023, 04/05/2023, 11/05/2023, 18/05/2023, 25/05/2023, 1 जून 2023 आणि ०८/०६/२०२३ या तारखांना सुटेल. ही ट्रेन उधना जंक्शनला दुसऱ्या दिवशी 21:05 वाजता पोहोचणार आहे.

गाडी क्र. ०९०५८ मंगळुरु जं. – उधना जं. विशेष गाडी वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम येथे थांबेल. , करमाळी, मडगाव जंक्शन, कानाकोना, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमटा, मुर्डेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड बयंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की आणि सुरथकल स्टेशन या स्थानकांवर थांबे घेणार आहे.

मुंबई - गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, आजपासून टोलवसुली सुरु..Mumbai Goa Highway Toll :  मुंबई - गो...
12/04/2023

मुंबई - गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, आजपासून टोलवसुली सुरु..

Mumbai Goa Highway Toll : मुंबई - गोवा महामार्गावर आजपासून टोलसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. कारण मुंबई - गोवा महामार्गावरचा पहिला टोलनाका सुरु झाला आहे. या टोलनाक्याला सर्वपक्षीय विरोध झाला होता. मात्र एनएचएआयने टोलला परवानगी दिल्यामुळे आजपासून टोलवसुली सुरु झाली आहे.

Mumbai Goa Highway Toll Plaza Opened : मुंबई - गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी. मुंबई - गोवा महामार्गावर आजपासून टोलसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. कारण मुंबई - गोवा महामार्गावरचा पहिला टोलनाका सुरु झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात हातिवले इथला टोलनाका हा टोलनाका आहे. या टोलनाक्याला सर्वपक्षीय विरोध झाला होता. मात्र एनएचएआयने टोलला परवानगी दिल्यामुळे आजपासून टोलवसुली सुरु झाली आहे. या टोलनाक्यावर कारसाठी वन वे 90 रुपये भरावे लागतील. तर ट्रक बससाठी 295 रुपये आकारले जात आहेत.

अनेक ठिकाणी महामार्गाचे काम रखडलेले

गेल्या 11 वर्षांपासून मुंबई - गोवा महामार्गाचे काम धीम्यागतीने सुरु आहे. पाचल - रत्नागिरी ते पनवेल दरम्यान, महामार्गावर खड्डेच खड्डे आहेत. अनेक ठिकाणी रस्त्याचे काम रखडलेले आहे. मुंबई गोवा या महामार्गाचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. असे असताना टोल वसूली का करण्यात येत आहे, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. राजापूर तालुक्यातील टोल नाका आजपासून सुरु करण्यात आला आहे. या टप्प्यातील काम पूर्ण झाल्याने हा टोल नाका सुरु करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. कोल्हापूर नॅशनल हायवे अथॉरिटी इंडिया या व्यवस्थापनाखाली राजापूर हातिवले येथील टोल नाका सुरु झालाय.

विरोधानंतरही टोल नाका सुरु

दरम्यान, हा टोला नाका सुरु करण्याचा हा प्रयत्न काही महिन्यांपूर्वी करण्यात आला. मात्र, त्यावेळी सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी आणि नागरिकांनी विरोध केला होता. त्यामुळे हा टोलनाका सुरु करण्यात आला नव्हता. महामार्गाचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल वसुली करुन देणार नाही, अशी भूमिका सर्वपक्षीय राजकीय नेते आणि नागरिकांनी घेतली होती. त्यामुळे त्यावेळी हा टोल सुरु झाला नव्हता. मात्र, आजपासून हा टोल सुरु झाल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या टप्प्यातील जवळपास 98.2 टक्के काम पूर्ण झाल्याने हा टोल नाका सुरg करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

यापूर्वी 22 डिसेंबरला हा टोल नका सुरु करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यावेळी टोल वसुली थांबवा अन्यथा आम्ही येथून हलणार नाही, अशी आक्रमक भूमिका भाजपचे पदाधिकारी नीलेश राणे यांनी घेतली होती. सिंधुदुर्गपासून रायगडपर्यंत कोणताही टोल नाका सुरु होणार नाही. मग हाच हातीवले टोलनाका सुरु का करण्यात येत आहे? असा सवाल करत यासाठी सर्वपक्षीय आंदोलन या ठिकाणी करण्यात आले होते. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर हातीवले येथील टोल सुरु करण्यात आल्याने याला विरोध होणार का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Konkan Times posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share