Adiware Times

Adiware Times सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक

https://adiwaretimes.com/angnewadi-yatra-sindhudurg/
04/02/2023

https://adiwaretimes.com/angnewadi-yatra-sindhudurg/

श्रद्धेला मूर्तरूप असते का हा प्रश्न कोकण प्रांतात पावलापावलावर बदलत जातो. कधी पाषाणात, कधी वारुळात, कधी झाडात तर ...

ज्ञानेश्वर म्हात्रे कसे जिंकले?भाजपकडून सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र पाटील यांनी ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचारा...
02/02/2023

ज्ञानेश्वर म्हात्रे कसे जिंकले?

भाजपकडून सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र पाटील यांनी ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचाराची धुरा संभाळली, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांनी विशेष मेहनत घेतली. उद्योगमंत्री उदय सामंत आणि शिक्षण मंत्री दिपक केसरकरही ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यासाठी प्रचारात उतरले होते. म्हात्रे यांना बाळासाहेबांची शिवसेना, रिपब्लिकन पक्षाने पाठींबा जाहीर केला आहे. त्याच बरोबर शिक्षक परिषदेची मदतही त्यांच्या पथ्यावर पडणार आहे.
या निवडणुकीत पसंतीक्रम असल्याने त्याचा निकाल कोटा पद्धतीने ठरवला जातो. त्यानुसार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी पहिल्याच फेरीत पहिल्या पसंतीचा कोटा मिळविल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आलं आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीचे बाळाराम पाटील आणि महायुतीचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यात थेट लढत होती. यावेळी ही निवडणूक अत्यंत चुरशीची होईल असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र, मतदारांनी ज्ञानेश्वर म्हात्रेंना भरभरून मतदान केल्याने त्यांचा पहिल्या फेरीतच एकतर्फी विजय झाला.

कशामुळे हा विजय तुम्हाला मिळाला असेल तुम्हाला वाटतं? तुमचं स्वतःचं प्राथमिक निरीक्षण काय आहे?

महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर सातत्याने जनसामन्यांच्या हिताच्या दृष्टीकोनातून निर्णय घेतले जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील पूर्ण वातावरण युतीच्या दिशेने जाण्यास सुरुवात झाली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत हेच चित्र पाहायला मिळालं. त्यामुळे याही निवडणुकीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे भारतीय जनता पार्टी, शिवसेनेचे कार्यकर्ते आणि त्याचबरोबर 31 शिक्षकांच्या संघटना या सर्वांनी एकत्र येऊन या सगळ्या निवडणुकीमध्ये काम केलं आणि त्यामुळे हा विजय सहजपणे शक्य झाला.

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जास्त आमदार असलेल्या कोकणात ज्ञानेश्वर म्हात्रेंना भाजपमधून उभं करण्यामागे काय रणनीती?

एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, हा मतदारसंघ शिक्षक परिषदेचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. गेल्यावेळची निवडणूक सोडली तर या मतदारसंघात सातत्याने शिक्षक परिषदेचा उमेदवार निवडूण येत आहे. शिक्षक परिषदेला शिवसेना-भाजप युतीचे कार्यकर्ते मदत करायचे त्यामुळे इथून शिक्षक परिषदेचा उमेदवार निवडून येत होते.

गेल्या निवडणुकीत शिक्षक परिषेदेचे तीन जण रिंगणात होते. त्यामुळे मतांचं विभाजन झालं. त्यामुळे गेल्या निवडणुकीत ही जागा गमवावी लागली. यावेळी असा प्रकार झाला नाही. त्यामुळे सर्व ३१ संघटनासोबत आल्या. ज्ञानेश्वर म्हात्रे हे पूर्वीपासून शिक्षक परिषदेचे काम करायचे. त्यामुळे शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांनी काम केलं. दिवसरात्र मेहनत केली आणि हे देदिप्यमान यश खेचून आणलं

कोकणात बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपनं समन्वय कसा ठेवला की भाजपनेच पूर्ण निवडणूक हातात घेतली होती त्यामुळे हे यश मिळालं?

कोकणचा मतदार हा पूर्ण हिंदुत्ववादी विचारांचा मतदार आहे. त्याचबरोबर विकासाचाही पगडा आहे. त्यामुळे युतीला मानणारा मतदारसंघ आहे. शिंदे-फडणवीस सरकारही हिंदुत्ववादी विचारांना धरुन चालतं आहे, विकासाचे निर्णय घेतले गेले. शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यात सरकारला यश आलं. आम्ही सर्व नेतेमंडळींनी अतिशय चांगल्याप्रकारे समन्वय ठेवून, कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली. त्यामुळे हे यश मिळालं आहे.

जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न आणि सीबीएससी शाळांचा प्रश्नांचा काय परिणाम जाणवला का?

एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, शिंदे-फडणवीस या दोघांनीही जुन्या पेन्शन योजनेबद्दल नकार दर्शविला नव्हता. पण सध्याची राज्याची परिस्थिती आहे, ती त्यांनी सभागृहात मांडली होती. पुढे राज्याची परिस्थिती जेव्हा चांगली होईल, तेव्हा त्याबद्दल विचार करु असं आश्वासन दिलं होतं. पण प्रचार करत असताना विरोधक काही नां काही मुद्दे हातात घेत असतात. त्यामुळेच हा मुद्दा त्यांनी हातात घेतला होता. मात्र कोकणातील मतदारांना वस्तुस्थिती माहित आहे.

सरकार म्हणून आपल्याला माहीत आहे विनाअनुदानित शाळांसंदर्भात २०-४०-६० चा निर्णय झाला होता. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना २० चं अनुदान देण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर महाविकास आघाडीने काहीच केलं नाही. शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर ११०० कोटी रुपयांच्या अनुदानाच वाटप झालं होतं. हे सरकार काम करणारं आहे हे मतदारांनाही माहीत आहे.

सौजन्य : मुंबई तक

आडिवरे हायस्कूल... तुझ्यात जीव रंगलारौप्यमहोत्सवी अविस्मरणीय स्नेहमेळावाएसएससी बॅच १९९७-९८               आपली शाळाश्री म...
01/02/2023

आडिवरे हायस्कूल... तुझ्यात जीव रंगला

रौप्यमहोत्सवी अविस्मरणीय स्नेहमेळावा

एसएससी बॅच १९९७-९८

आपली शाळा

श्री महाकाली इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, नवेदर - आडिवरे

आपली शाळा... जिने आपल्या जीवनाचा पाया भक्कम केला; सुजाण बनविणारा ज्ञानबोध दिला.. जीवलग मित्रपरिवार दिला...समाजात वावरण्याची समज दिली.. उज्ज्वल भविष्याची मुहुर्तमेढ रोवली, ती आपली शाळा .. आपले विद्या मंदिर.
बघता बघता 25 वर्ष लोटली..आणि आपण एकत्र यायलाच हवे याची आस लागून राहिली.. पुन्हा वर्ग भरायला हवा.. आठवणी जागवायला हव्या.. हास्यविनोदांची कारंजी पुन्हा उडायला हवी. उत्साहाला उधाण यायला हवे.... प्रौढपणी शैशव जपणारे क्षण जगायलाच हवे...

म्हणूनच एसएससी बॅच (१९९७-९८) च्या विद्यार्थ्यांचा रौप्यमहत्सवी स्नेहमेळावा २८ जानेवारी २०२३ रोजी पार पडला. या अविस्मरणीय क्षणी, शाळेचे माजी विद्यार्थी, माजी मुख्याध्यापक, माजी शिक्षक, माजी शिक्षकेतर कर्मचारी तसेच शाळेचे आजी मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि संस्था पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते.

एसएससी बॅच - ९८, तर्फे मान्यवरांचे सत्कार, शाळेसाठी भेटवस्तू, विद्यार्थ्यांना स्नेहभोजन आणि भेटवस्तू देण्यात आल्या. मान्यवरांची आणि आजी माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती, यामुळे हा सोहळा खूपच अविस्मरणीय ठरला.

९८ बॅचच्या ५४ विद्यार्थ्यांचा सहभाग आणि सहकार्य खरोखरच प्रशंसनीय होते. भविष्यात शाळेसाठी असेच सर्व एकत्र राहू असा निर्धार सर्वांनी व्यक्त केला.

यावेळी सर्वाँना माजी मुख्याध्यापक चव्हाण सर, शेवडे सर, भिडे सर, मुख्याध्यापक गावित सर, भिडे गुरुजी, रघुनाथ तात्या आडिवरेकर आणि विलास तात्या आडिवरेकर यांचे मार्गदर्शन लाभले.

18/01/2023

“मी उद्या मुंबईत असेन. 38,000 कोटी रु. खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी यावेळी केली जाणार आहे. यामध्ये मेट्....

राजापूर हादरले; जमिनीच्या वादातून निष्पाप युवतीचा गेला बळीJanuary 18, 2023हल्लेखोराला काही तासात अटकएक युवतीवर उपचार सुर...
18/01/2023

राजापूर हादरले; जमिनीच्या वादातून निष्पाप युवतीचा गेला बळी
January 18, 2023

हल्लेखोराला काही तासात अटक
एक युवतीवर उपचार सुरु
नाटे | किरण टिळेकर : गावातील जमीन जुमल्याचे, भावकीतील वादात २२ वर्षीय तरुणीचा बळी गेला. ही घटना राजापूर तालुक्यातील भालवली येथे बुधवारी दुपारी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. यातील हल्लेखोराला नाटे सागरी पोलिसांनी ताब्यात घेतले असून यातील हल्ला झालेली दुसरी तरुणीला जिल्हा ग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सिद्धी संजय गुरव (वय 22) आणि साक्षी मुकूंद गुरव (वय २१ ) या दोघी भालवली वरची गुरव वाडी येथील रहिवासी असून भालावली सिनियर काॅलेज धारतळे येथे शिकत होत्या. महाविद्यालय सुटल्यानंतर ११ वाजता नेहमीप्रमाणे दोघी नेहमीच्याच पण आडवाटेने घरी निघाल्या होत्या. याच वाटेवर विनायक शंकर गुरव (५५, रा. वरची गुरववाडी) हा दबा धरून बसला होता. त्याने समोरून सिद्धीला येताना पाहिले आणि तिच्यावर दांडक्याने हल्ला केला. यात घाबरून गेलेल्या सिद्धीला वाचवण्यासाठी साक्षी पुढे आली. साक्षी मध्ये आल्यानंतर विनायकने आपला मोर्चा साक्षीकडे वळवला आणि तिच्यावर दांडक्याने हल्ला केला. तिचा गळा आवळला.

याच दरम्यान सिद्धीने तिथूनच मोबाईलवरून घरी संपर्क केला आणि झालेली घटना सांगितली. तोपर्यंत विनायक तिथून पळून गेला होता. हल्ल्याची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबीयांनी नाटे पोलिसांनी माहिती दिली आणि घटना स्थळी धाव घेतली. हा हल्ल्यात साक्षी जागीच गतप्राण झाली होती. तर सिधी गंभीर जखमी झाली होती. तिला तत्काळ धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तोथून अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात रत्नागिरी येथे हलवण्यात आले. तिच्यावर उपचार सुरु आहेत.

दरम्यान सिद्धीने माहिती दिल्यानंतर नाटे पोलिसांनी विनायकचा पाठलाग करत त्याला तत्काळ ताब्यात घेतले. मात्र या मोठ्यांच्या वादात एका निष्पाप युवतीचा हकनाक बळी गेल्याबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी हे घटना स्थळी दाखल झाले आहेत .

सौजन्य: प्रहार

16/01/2023
16/01/2023
16/01/2023
16/01/2023
16/01/2023
कुणबी युवा प्रतिष्ठानकडूनशालेय विद्यार्थांना उपयोगी वस्तूंचे वाटपकुणबी युवा प्रतिष्ठान(रजि.) ही संस्था ही नेहमीच सामाजिक...
15/01/2023

कुणबी युवा प्रतिष्ठानकडून
शालेय विद्यार्थांना उपयोगी वस्तूंचे वाटप

कुणबी युवा प्रतिष्ठान(रजि.) ही संस्था ही नेहमीच सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय उपक्रम घेऊन समाजाप्रती असणारी बांधिलकी जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असते.
आपल्या याच लौकिकाला जागत २०२३च्या सुरुवातीलाच दापोली तालुक्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषद पूर्वप्राथमिक मराठी माध्यम शाळा, हातिप, पूर्वप्राथमिक इंग्रजी माध्यम शाळा, हातिप, जिल्हा परिषद प्राथमिक मराठी माध्यम शाळा, ताडील सायटेवाडी मराठी माध्यम,आंगणवाडी मराठी माध्यम शाळा, किन्हळ,जिल्हा परिषद मराठी माध्यम, करजगांव या शाळांमध्ये गरजू विद्यार्थ्यांना संस्थेकडून शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.

कुणबी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयकुमार गौरत, सचिव प्रमोद सुभाष खेराडे, खजिनदार अनुज विष्णू चव्हाण, सभासद चेतन नामोळे, संतोष पांढरे, सचिन चिपटे, निलेश जनार्दन पानकर, जयकुमार गौरत, सागर मांजरेकर, दत्ताराम रेमजे, यतिन पानकर, अंकुश शिंदे या शिलेदारांच्या साथीने कुणबी युवा प्रतिष्ठानचे सल्लागार दशरथ पाटील, संदीप राजपुरे आणि रवींद्र मटकर यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार, दि. १३ जानेवारी, २०२३ रोजी वस्तूंचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमामध्ये सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, सर्व कर्मचारी, प्रत्येक गावाचे विद्यमान सरपंच, ग्रामीण सदस्य, पालकवर्ग मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाले होते. या उपक्रमासाठी कुणबी युवा प्रतिष्ठानचे सल्लागार, उद्योजक विजय नायनाक आणि कुणबी समोजन्नती संघ महिला अध्यक्षा सुवर्णा पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

तसेच ज्या ज्या शाळेमध्ये कुणबी युवा प्रतिष्ठानने भेट दिली त्या शाळेतील शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना भविष्यातही काही आवश्यकता भासल्यास सढळहस्ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. प्रत्येक शाळेतील भेटीमध्ये कुणबी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयकुमार गौरत, सचिव प्रमोद खेराडे, खजिनदार अनुज चव्हाण तसेच इतर पदाधिकार्‍यांनी कुणबी युवा प्रतिष्ठानबद्दल माहिती देत प्रतिष्ठानच्या ध्येय आणि उद्दिष्टे यांच्याबाबत माहिती दिली.

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adiware Times posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Adiware Times:

Share