MediaBharat

MediaBharat It's News Service for perfect information, fact check & analysis....

https://youtube.com/channel/UC

05/01/2026

आमचा संघर्ष आम्हीच करायचा. आमची हक्काची लढाई आम्हीच लढायची. शासन - प्रशासन त्यांची जबाबदारी पार पाडण्यापासून उदासीन आहे. लोकप्रतिनिधींचा आमच्या आयुष्यात काहीच रोल नसेल आणि आम्ही मताधिकार बजावायचा तरी कशासाठी आणि कोणासाठी ? कल्याण पूर्वेतील सहजीवन सोसायटीतील रहिवाशांनी हे प्रश्न उपस्थित केले आहेत.

05/01/2026

पप्पू कालानीची ताकद असती तर ते स्वतंत्र लढले असते, पण कालानीचं राजकारण संपलेलं आहे, म्हणूनच सत्तेतल्या कोणा ना कोणाचा हात ते धरत असतात. सगळे पक्ष बदलून झाले. फक्त शिवसेना उरली होती ! या शब्दात आमदार कुमार आयलानी यांनी पप्पू कालानीच्या राजकारणाची खिल्ली उडवली.

04/01/2026

उल्हासनगरच्या विकासात कोणाचं मोठं योगदान ; खासदारांचं की आमदारांचं ? पप्पू कालानीचा किती प्रभाव उरलाय ? कालानी - शिवसेना एकत्र येण्याने भाजपाला काय फरक पडेल ? भाजपा कोणत्या मुद्यांवर मतं मागणार आहे ? आमदार कुमार आयलानी यांची 'मीडियाभारत' चे संपादक राज असरोंडकर यांनी घेतलेली एक बिनधास्त मुलाखत !

04/01/2026

निवडणुकीत उमेदवाराच्या अर्जावर प्रतिस्पर्धी उमेदवार हरकती नोंदवतात ; पण उमेदवार नसलेले नागरिक अशी हरकत का घेऊ शकत नाहीत, असा धोरणात्मक मुद्दा ॲड. वनिता ओवळेकर यांनी उपस्थित केला आहे.

03/01/2026

जेव्हा आमदार कुमार आयलानी पप्पू कालानीची खिल्ली उडवतात ! .... सविस्तर मुलाखत लवकरच

03/01/2026

पाणी, उद्यान, व्यसनमुक्ती, रोजगाराच्या मुद्यावर उल्हासनगरातील प्रभाग १८ ची निवडणूक लढणार पीआरपी | अ. लता निकम, ब. अक्षता टाले, क. ॲड. जय गायकवाड आणि ड. प्रमोद टाले असं बनवलंय पीआरपीने पॅनल !!

02/01/2026

शिवसेनेच्या रमेश चव्हाण यांच्या उमेदवारीविरोधात अद्यापही कारवाईची टांगती तलवार ! राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व प्रतिस्पर्धी उमेदवार भारत राजवानी न्यायालयात जाणार ! निवडणुकीपूर्वीच रमेश चव्हाण यांना घाबरलात का, या प्रश्नावर काय म्हणाले भारत राजवानी ?

निवडणुकीत खोटी किंवा चुकीची माहिती देणाऱ्या उमेदवारांविरोधात यथोचित न्यायालयात तक्रार दाखल करण्याची जबाबदारी निवडणूक निर...
02/01/2026

निवडणुकीत खोटी किंवा चुकीची माहिती देणाऱ्या उमेदवारांविरोधात यथोचित न्यायालयात तक्रार दाखल करण्याची जबाबदारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर 'नेहमी विचारले जाणारे प्रश्न' ( FAQ ) या ठिकाणी वाचायला मिळते.

शपथपत्रात चुकीची माहिती दिली म्हणून नामनिर्देशन पत्र फेटाळलं जाऊ शकतं का, या प्रश्नावर आयोगाने #नाही असं उत्तर दिलंय.

वास्तविक, उमेदवाराने शपथपत्रात नमूद केलेला मजकूर विहित नमून्यात सादर केलाय का, हे पाहणं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचं काम आहे. मजकुराची सत्यता तपासण्याचा अधिकार त्यांना नाही.

शिवाय, शपथपत्रात माहिती दडवल्याबद्दल किंवा खोटी माहिती दिल्याबद्दल उमेदवाराचं नामनिर्देशन पत्र फेटाळता येत नाही.

प्रत्येक उमेदवाराने सादर केलेल्या नामनिर्देशन पत्रांच्या प्रती तसेच नामनिर्देशनासोबत जोडलेल्या शपथपत्राच्या प्रती, नामनिर्देशन सादर केल्या जाणाऱ्या दिवशी रिटर्निंग ऑफिसर (RO) च्या कार्यालयातील नोटीस बोर्डवर प्रदर्शित केल्या पाहिजेत.

जर कोणी नामनिर्देशन फॉर्म किंवा शपथपत्रातील विधानांचा विरोध करणारी कोणतीही माहिती योग्य शपथ घेऊन शपथपत्राद्वारे सादर करत असेल, तर अशा शपथपत्रांच्या प्रतीही नोटीस बोर्डवर प्रदर्शित केल्या पाहिजेत.

जर रिटर्निंग ऑफिसरचं समाधान झालं की उमेदवाराने शपथपत्रात दिलेली माहिती चुकीची आहे, तर त्याने कलम १२५अ च्या जनप्रतिनिधित्व कायदा, १९५१ आणि कलम १७७ भारतीय दंड संहिता (कलम २०० सीआरपीसी सोबत वाचावा) अंतर्गत योग्य न्यायालयात औपचारिक तक्रार दाखल करणे आवश्यक आहे.

कलम १२५A (RP Act १९५१) अंतर्गत खोट्या शपथपत्रासाठी ६ महिने कैद किंवा दंड अशी शिक्षा आहे. मात्र, कर्नाटक उच्च न्यायालयाच्या एका निकालानुसार, खाजगी व्यक्ती थेट कोर्टात तक्रार दाखल करू शकत नाही, फक्त निवडणूक आयोगालाच तक्रार दाखल करण्याचा अधिकार आहे.

सामान्य नागरिक शपथपत्र ऑनलाइन पाहून तपासणी करू शकतात, ईसीआयकडे तक्रार करू शकतात किंवा निवडणूक याचिका दाखल करू शकतात.

02/01/2026

अनधिकृत बांधकामं करणाऱ्यांना पालिका सदस्य होण्यास अपात्र ठरवणारी स्पष्ट तरतूद महानगरपालिका अधिनियमात असतानाही निवडणूक आयोगाने सरळ हात वर करत विरोधात सबळ पुरावे असतानाही संबंधित उमेदवारांची नामनिर्देशन पत्रं मान्य केली.

01/01/2026

आणीबाणीच्या काळात 'आहुती'कार त्रिवेदी कुटुंबियांवर जेलमध्ये जायची वेळ येऊन ठेपली असती ! काय घडलं होतं असं ? संपादक गिरीश त्रिवेदी यांच्या मुलाखतीचा भाग १

31/12/2025

प्रभागात आजवर केलेला विकास हेच माझं शहरासाठीचं विकास माॅडेल ! कायदेशीर मार्ग हीच माझी ताकद !! भारत राजवानी यांचं प्रतिपादन

मुंबई महानगरपालिकेत (BMC) भारतीय जनता पार्टी (BJP) चा प्रभाव १९९० च्या दशकापासून हळूहळू वाढत गेला आहे. सुरुवातीचं राजकार...
31/12/2025

मुंबई महानगरपालिकेत (BMC) भारतीय जनता पार्टी (BJP) चा प्रभाव १९९० च्या दशकापासून हळूहळू वाढत गेला आहे. सुरुवातीचं राजकारण शिवसेनेवर अवलंबून असलेल्या भाजपाने २०१४ च्या मोदी लाटेनंतर मुंबईत आपली ताकद लक्षणीय वाढवली. २०१७ च्या निवडणुकीत भाजपाने एकट्याने लढून ८२ जागा जिंकल्या, ज्यामुळे तो शिवसेनेइतकाच मोठा पक्ष बनला.

२०१७ नंतर BMC निवडणुका झाल्या नाहीत (प्रशासकीय राजवट आहे), पण विधानसभा आणि इतर निवडणुकांवरून भाजपाचा प्रभाव वाढत असल्याचं दिसतं. २०२२ च्या शिवसेना फुटीत भाजपाने एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा देऊन महाराष्ट्रात सत्ता मिळवली, आणि आता २०२६ च्या BMC निवडणुकीत भाजपा महायुतीत (BJP + शिंदे सेना) प्रमुख भूमिका बजावत आहे.

१९८९ मध्ये शिवसेनेशी युती केल्यानंतर भाजपाने मुंबईत पाय रोवले. हिंदुत्व आणि शिवसेनेच्या स्थानिक पकडीचा फायदा घेऊन भाजपाने जागा वाढवल्या. १९९२ मध्ये भाजपाने फक्त १४ जागा जिंकल्या होत्या. १९९७ मध्ये त्या २६ झाल्या. २००२ मध्ये भाजपा ३५ वर पोचली. पण २००७ (२८) आणि २०१२ (३१) मध्ये भाजपाची घसरण झाली. १९९२ ते २०१२ पर्यंतच्या या २० वर्षात युतीत शिवसेना हाच प्रमुख पक्ष राहिला.

२०१४ लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर शिवसेना भाजपा युती तुटली. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपाने मोदी लाटेच्या जोरावर एकट्याने लढून ८२ जागा जिंकल्या, ज्या २०१२ च्या तुलनेत दुप्पटीहून जास्त होत्या. त्यावेळी शिवसेनेची सदस्य संख्या होती ८४ !

२०१९ मध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपाशी फारकत घेऊन MVA (उद्धव सेना + काँग्रेस + शरद NCP) सरकार बनवलं, पण २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून भाजपाने शिवसेनेत फूट घडवून आणली आणि महायुतीचं (BJP + शिंदे सेना + अजित NCP) सरकार स्थापन केलं. यामुळे पर्यायाने मुंबईतही भाजपाची स्थिती मजबूत झाली. पण ज्या शिवसेनेच्या जोरावर भाजपाने मुंबईतलं राजकारण केलं, वाढवलं, ती शिवसेना मात्र भाजपाने पद्धतशीरपणे कमकुवत केली.

ज्यावेळी भाजपाने महाराष्ट्रात पाय रोवले, तेव्हा शिवसेनेच्या गळी हिंदुत्वाचा मुद्दा उतरवला आणि शिवसेनेचा मराठी अस्मितेचा मुद्दा बोथट केला. हिंदुत्वाने भाजपाला बळकटी दिली, पण शिवसेनेला उतरती कळा लागली. मुंबईतला भाजपाचा आधार प्रामुख्याने उत्तर भारतीय, गुजराती, जैन आहेत, तर मराठी माणूस शिवसेनेसोबतच राहिला. ते पाहून एकनाथ शिंदेंना हाताशी धरून भाजपाने शिवसेनेवर उघड घाव घातला. परिणाम समोर आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या जागावाटपात १३७ जागा भाजपाकडे आहेत, तर अवघ्या ९० जागा शिंदे शिवसेनेच्या वाट्याला आल्यात.

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when MediaBharat posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to MediaBharat:

Share