India Darpan Live

India Darpan Live दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवा देणारे भारतातील अग्रेसर मराठी वेब न्यूज पोर्टल
(1)

दिंडोरी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा बळी…ग्रामस्थांचा दीड तास रास्ता रोको दिंडोरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– दिंड...
09/08/2025

दिंडोरी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा बळी…ग्रामस्थांचा दीड तास रास्ता रोको

दिंडोरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– दिंडोरी शिवारातील बदादे वस्तीवर बिबट्याच्या हल्ल्यात एका शेतकरी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जनाबाई जगन बदादे वय ६५ मयत शेतकरी महिलेचे नाव आहे.

दरम्यान, दिंडोरी शहर परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात तिसरा बळी गेल्याने तीव्र संताप उसळला असून, मयत महिलेचे नातेवाईक ग्रामस्थांनी वनविभागाच्या कार्यालयासमोर मृतदेह आणत संताप व्यक्त करत नाशिक कळवण रस्त्यावर रास्ता रोको केला. पोलीस आणि नातेवाईक यांच्यात संघर्ष सुरु झाला. पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी नागरिकांची समजूत काढल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला. सुमारे दीड तास रास्ता रोको सुरु असल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली.

याबाबत अधिक माहिती अशी की, जनाबाई जगन बदादे या दुपारी चारच्या सुमारास आपल्या शेतातील घराजवळ शेतात कोथंबीर काढणी करत असताना शेजाराच्या उसाच्या शेतात दडून बसलेल्या बिबट्या ने हल्ला केला व उसात ओढून नेले आजीने हल्ला होताच आरडा ओरड केल्याने त्यांचा मुलगा संजय व इतर नातेवाईकांनी धाव घेत बिबट्याला पिटाळून लावले. मात्र या हल्ल्यात आजी मरण पावल्या. ग्रामीण रुग्णालय परिसरात नातेवाईकांनी मोठा आक्रोश करत संताप व्यक्त केला.

ऐन रक्षाबंधन, जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी झालेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून वनविभागाने बिबट्या शोध मोहीम राबवत पिंजरे लावण्याची मागणी होत आहे.

The post दिंडोरी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा बळी…ग्रामस्थांचा दीड तास रास्ता रोको appeared first on India Darpan Live.

दिंडोरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- दिंडोरी शिवारातील बदादे वस्तीवर बिबट्याच्या हल्ल्यात एका शेतकरी महिलेचा मृत्.....

सिन्नर बसस्थानकाच्या ताफ्यात ५ नवीन बस दाखल… नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा): राज्य परिवहन महामंडळातर्फे सिन्नर बसस्थानका...
09/08/2025

सिन्नर बसस्थानकाच्या ताफ्यात ५ नवीन बस दाखल…

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा): राज्य परिवहन महामंडळातर्फे सिन्नर बसस्थानकास प्राप्त झालेल्या दुसऱ्या टप्प्यातील पाच नवीन बसेसचे लोकार्पण राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री ॲड माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते संपन्न झाले.

यापूर्वी सिन्नर बसस्थानकास पहिल्या टप्प्यात राज्य परिवहन महामंडळाकडून ५ नवीन बस एप्रिल महिन्यात प्राप्त झाल्या आहेत. लोकार्पण प्रसंगी विभाग नियंत्रक श्रावण सोनवणे,आगर व्यवस्थापक हेमंत नेरकर, बस स्थानक प्रमुख सुरेश पवार, वाहतूक निरीक्षक जयवंत चोपडे यांच्यासह बस चालक, वाहक व कर्मचारी आदी उपस्थित होते.

मंत्री ॲड कोकाटे यांनी बसमध्ये आसनस्थ होत बसेसला मार्गस्थ केले.

The post सिन्नर बसस्थानकाच्या ताफ्यात ५ नवीन बस दाखल… appeared first on India Darpan Live.

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा): राज्य परिवहन महामंडळातर्फे सिन्नर बसस्थानकास प्राप्त झालेल्या दुसऱ्या टप्प्यात...

या व्यक्तींनी महत्त्वाची कामे टाळलेली बरी, जाणून घ्या, रविवार, १० ऑगस्टचे राशिभविष्य आजचे राशिभविष्य- रविवार, १० ऑगस्ट २...
09/08/2025

या व्यक्तींनी महत्त्वाची कामे टाळलेली बरी, जाणून घ्या, रविवार, १० ऑगस्टचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य- रविवार, १० ऑगस्ट २०२५
मेष– सामाजिक क्षेत्रात विरोधाचा सामना करावा लागेल
वृषभ- प्रभावक्षेत्रात त्रासदायक घटनांचा दिवस
मिथुन- कलाकार मंडळींना लाभाची शक्यता
कर्क– संसर्गजन्य आजाराची काळजी घ्यावी

ज्योतिष शास्त्री प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक

सिंह– गृहलक्ष्मीच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे लागेल
कन्या– विचारपूर्वक निर्णय घ्या फसवणुकीची शक्यता
तूळ- सरकारी कामे महत्त्वाची कामे आज टाळलेली बरी
वृश्चिक– जुनी येणी वसूल होतील

धनु– कौटुंबिक जीवनामध्ये समारंभाचे योग
मकर– घरातील महिला वर्गाचा विचार घेऊन कार्य करा
कुंभ– वाहने व प्रवास करताना काळजीपूर्वक करा
मीन– पित्त व नेत्र यांची पीडा त्रासदायक ठरू शकते काळजी घ्या
राहू काळ– सायंकाळी चार तीस ते सहा

The post या व्यक्तींनी महत्त्वाची कामे टाळलेली बरी, जाणून घ्या, रविवार, १० ऑगस्टचे राशिभविष्य appeared first on India Darpan Live.

आजचे राशिभविष्य- रविवार, १० ऑगस्ट २०२५मेष- सामाजिक क्षेत्रात विरोधाचा सामना करावा लागेलवृषभ- प्रभावक्षेत्रात त्....

उत्तराखंडमध्ये मंत्री गिरीश महाजन यांना महिला पर्यटकांनी बांधली राखी…बघा, नेमकं काय घडलं हरिद्वार (इंडिया दर्पण वृत्तसेव...
09/08/2025

उत्तराखंडमध्ये मंत्री गिरीश महाजन यांना महिला पर्यटकांनी बांधली राखी…बघा, नेमकं काय घडलं

हरिद्वार (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– रक्षाबंधनाचा घराघरांत भाऊ-बहिणींच्या नात्याची गाठ घट्ट होत असतानाच, उत्तराखंडमध्ये एक वेगळाच सोहळा रंगला. पुणे, मुंबई ,राजगुरुनगर, मंचर ,खेड, नारायणगाव यांसह महाराष्ट्राच्या विविध भागांतील महिला पर्यटक जेव्हा सुरक्षितपणे हरिद्वार येथील बिर्ला गेस्ट हाऊस येथे पोहोचल्या, तेव्हा त्यांनी आज आमचे खरे भाऊ सोबत नसले, तरी गिरीश महाजन आमच्या मदतीला धावून आले, हेच आमच्यासाठी मोठं आहे,” अशा भावना व्यक्त करत त्यांनी मंत्र्यांच्या मनगटावर राखी बांधली. हा क्षण तिथल्या प्रत्येकाच्या मनात कायमचा कोरला गेला.

उत्तराखंडच्या डोंगराळ भागात काही दिवसांपूर्वी अचानक झालेल्या भूस्खलन आणि पुरामुळे प्रवासाला गेलेले महाराष्ट्रातील १७२ पर्यटक भीषण संकटात सापडले. रस्ते बंद, विजेचा पुरवठा खंडित, संवादाचे सर्व मार्ग अडथळ्यांनी भरलेले. महाराष्ट्रातील कुटुंबीयांची चिंता शिगेला पोहोचली. या चिंतेच्या क्षणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावर राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी थेट उत्तराखंडकडे मोर्चा वळवला.

त्यानंतर दोन दिवसांपासून सतत पर्वतीय भागात फिरत, स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधत आणि अडकलेल्या प्रत्येक पर्यटकाशी थेट संवाद साधत, त्यांनी सर्वांना सुरक्षित स्थळी आणण्याची जबाबदारी निभावली. आज सर्व १७२ पर्यटक सुखरूप असून ते महाराष्ट्राकडे परत निघाले आहेत. आजचा दिवस मात्र खास होता, कारण आज रक्षाबंधन! राज्यात अनेक नेते आपल्या कुटुंबासोबत हा सण साजरा करत असताना, मंत्री गिरीश महाजन मात्र आपल्या कुटुंबापासून दूर संकटात सापडलेल्या भगिनींच्या मदतीसाठी हजारो किलोमीटर उत्तराखंडमध्ये होते. ज्या भगिनींचा सखा-भाऊ त्या क्षणी सोबत नव्हता, त्या भगिनींना मंत्री गिरीश महाजन यांना राखी बांधुन हा दिवस साजरा केला. यावेळी त्यांच्या डोळ्यांत पाणी, चेहऱ्यावर आनंद आणि मनात कृतज्ञतेची भावना होती.

The post उत्तराखंडमध्ये मंत्री गिरीश महाजन यांना महिला पर्यटकांनी बांधली राखी…बघा, नेमकं काय घडलं appeared first on India Darpan Live.

हरिद्वार (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- रक्षाबंधनाचा घराघरांत भाऊ-बहिणींच्या नात्याची गाठ घट्ट होत असतानाच, उत्तराखं....

उत्तरकाशीमधून महाराष्ट्रातील ११ पर्यटकांसाठी एअर लिफ्ट…राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती मुंबई (इंडिया दर्पण वृत्तस...
09/08/2025

उत्तरकाशीमधून महाराष्ट्रातील ११ पर्यटकांसाठी एअर लिफ्ट…राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात झालेल्या भीषण भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील विविध भागांतील १७२ पर्यटक या परिसरात अडकले होते. त्यापैकी १७१ पर्यटकांशी संपर्क साधला असून ते सुरक्षित आहेत. एक पर्यटक श्रीमती कृतिका जैन यांचा शोध सुरू असून, त्यासाठी राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, उत्तराखंडला सूचना देण्यात आल्या आहेत. या परिसरात अडकलेल्या १७१ पर्यटकांपैकी १६० पर्यटक (३१ मातली, ६ जॉली ग्रॅन्ट तसेच १२३ उत्तरकाशी) येथे सुखरुप आहेत. सुरक्षित पर्यटकांनी त्याच्या नियोजित कार्यक्रमानुसार पुढील प्रवास सुरु केला आहे. ११ पर्यटक हर्षील येथे सुरक्षित असून संचालक (आपत्ती व्यवस्थापन), उत्तराखंड यांच्या अहवालानुसार, हर्षील येथे थांबलेल्या पर्यटकांना आज सकाळी ६ वाजता हेलिकॉप्टरने हलविण्याचे कार्य सुरू झाले आहे. त्यांना एअर लिफ्ट करुन सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.

राज्य आपत्ती नियंत्रण कक्ष, महाराष्ट्र राज्य आपत्कालीन कार्य केंद्र उत्तराखंड, जिल्हा नियंत्रण कक्ष, उत्तरकाशी तसेच राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद केंद्र (NERC), नवी दिल्ली यांच्याशी सतत संपर्कात आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उत्तरकाशी येथे घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच मुख्य सचिव, महाराष्ट्र यांनी अपर मुख्य सचिव (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग) यांच्यासह आढावा घेतला असून उत्तराखंडचे मुख्य सचिव आनंद बर्धन यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना मदत करण्याची विनंती केली.

उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात झालेल्या भीषण भूस्खलन व पूर परिस्थितीत लष्कर, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि स्थानिक बचाव पथके धराली येथे कार्यरत आहेत. संपर्क यंत्रणा अंशतः सुरू झाल्या असल्या तरी रस्ते अद्याप पूर्ववत नाहीत. पायाभूत सुविधा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. उत्तराखंडमधील आपत्ती बचाव कार्यासाठी जबाबदार अधिकारी पोलीस महानिरीक्षक राजीव स्वरूप यांच्या माध्यमातून उपग्रह फोन तैनात करण्यात आले असून, लष्कराच्या छोट्या उड्डाण मोहिमा सुरू आहेत.

राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, महाराष्ट्र बचाव कार्यासाठी आवश्यक समन्वय, माहिती अद्ययावत करणे आणि संबंधित कुटुंबियांना मदत पुरविण्यासाठी सक्रिय आहे.

संपर्क क्रमांक :
१. राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, महाराष्ट्र – ९३२१५८७१४३ / ०२२-२२०२७९९० / ०२२-२२७९४२२९
२. डॉ. भालचंद्र चव्हाण, संचालक, आपत्ती व्यवस्थापन केंद्र, महाराष्ट्र – ९४०४६९५३५६
३. राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, उत्तराखंड – ०१३५-२७१०३३४ / ८२१८८६७००५
४. प्रशांत आर्य, जिल्हाधिकारी, उत्तरकाशी – ९४१२०७७५०० / ८४७७९५३५००
५. मेहेरबान सिंग (समन्वय अधिकारी) – ९४१२९२५६६६
६. मुक्ता मिश्रा, सहाय्यक जिल्हाधिकारी, उत्तरकाशी – ७५७९४७४७४०
७. जय पनवार, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, उत्तराखंड – ९४५६३२६६४१
८. सचिन कुरवे (समन्वय अधिकारी) – ८४४५६३२३१९

The post उत्तरकाशीमधून महाराष्ट्रातील ११ पर्यटकांसाठी एअर लिफ्ट…राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती appeared first on India Darpan Live.

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात झालेल्या भीषण भूस्खलन .....

भाजीपाला व्यावसायीकास मारहाण करीत लुटणा-या तिघांना पोलीसांनी ठोकल्या बेड्या नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भाजीपाला व्य...
09/08/2025

भाजीपाला व्यावसायीकास मारहाण करीत लुटणा-या तिघांना पोलीसांनी ठोकल्या बेड्या

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भाजीपाला व्यावसायीकास मारहाण करीत लुटणा-या तिघांना पोलीसांनी बेड्या ठोकल्या. या घटनेत सराईत टोळक्याने धारदार शस्त्रांचा धाक दाखवीत व्यावसायीकाच्या गल्यातील ३५०० रूपयांची रोकड हिसकावून घेत परिसरात दहशत माजविली होती. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात विवीध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार वाजीत उर्फ वाज्या जैद शेख (१९ रा. सादीकनगर,वडाळागाव), सोहेल उर्फ बाबू पप्पू अन्सारी (३३) व तौफिक हसन शहा (रा. दोघे भारतनगर वडाळा पाथर्डीरोड) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. संबधीतावर वेगवेगळया पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. याबाबत शकील वसीर अन्सारी (गल्ली नं.११ भारतनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. अन्सारी यांचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय असून ते दिपालीनगर येथील नारायणी हॉस्पिटल भागात हातगाडीवर हा व्यवसाय करतात गुरूवारी (दि.७) रात्री इरर्टीका कार एमएच ३९ जे ३७४३ मधून आलेल्या संशयितांनी व्यवसाय सांभाळणा-या अन्सारी यांच्यासह मुलगा आफताब यास शिवीगाळ करीत दमदाटी केली.

यावेळी संतप्त त्रिकुटाने बापलेकास मारहाण करीत गल्यातील ३ हजार ५०० रूपयांची रोकड बळजबरीने हिसकावून घेतली असून. एवढ्यावरच न थांबता टोळक्याने परिसरात आपली दहशत कायम राहवी यासाठी तलवार व कोयत्याचा धाक दाखवित दहशत माजविली. अधिक तपास उपनिरीक्षक शेख करीत आहेत.

The post भाजीपाला व्यावसायीकास मारहाण करीत लुटणा-या तिघांना पोलीसांनी ठोकल्या बेड्या appeared first on India Darpan Live.

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भाजीपाला व्यावसायीकास मारहाण करीत लुटणा-या तिघांना पोलीसांनी बेड्या ठोकल्या. या .....

पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात रुपाली चाकणकर यांनी पोलिस महासंचालकांना दिले हे पत्र इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कपुण्यातील ...
09/08/2025

पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात रुपाली चाकणकर यांनी पोलिस महासंचालकांना दिले हे पत्र

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात प्राजंल खेवलकर विरुध्द महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी खळबळजनक आरोप केल्यानंतर आता पोलिस महासंचालकांना एक पत्र पाठवले आहे. या पत्रात मानवी तस्करीच्या अनुषंगाने खराडी प्रकरणाची विशेष तपास पथकाकडून चौकशी व्हावी असे सांगितले आहे.

पुण्यात रेव्ह पार्टीवर छापा टाकून पोलिसांनी केलेल्या कारवाई दरम्यान महिलांचा सन्मान, सुरक्षितता आणि हक्कांचे रक्षण करणे हे सामाजिकदृष्ट्या तसेच कायदयानेही आवश्यक असल्याने या पार्श्वभुमीवर विशेष तपास पथकाची स्थापना करुन प्रकरणी न्यायोचित, सखोल चौकशी वेळेत व्हावी असे पोलिस महासंचालकांना लिहिलेल्या पत्रात रूपाली चाकणकर यांनी नमूद केले.

महिला अधिकाऱ्याचा समावेश असलेली एसआयटी स्थापन करून गोपनीयता बाळगून सखोल चौकशी व्हावी. तपासाअंती दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी जेणेकरुन भविष्यात अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध होईल असे कळविण्यात आले आहे.

रेव्ह पार्टीवर छापा टाकून पोलिसांनी केलेल्या कारवाई दरम्यान महिलांचा अश्लिल आणि अनैतिक वापर झाल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. तसेच आरोपी प्रांजल खेवलकर यानी याआधीही वेगवेगळ्या ठिकाणी हॉटेल बुक करून एजंटमार्फत महिलांना आणल्याचे दिसत आहे. पोलिसांच्या मानवी तस्करी प्रतिबंध पथकाकडून (AHTU)महिलांना कशा प्रकारे आणले गेले, फसवणूक, दबाव, इतर कोणतेही माध्यम महिलांचे मूळ गाव, वय, वैद्यकीय अहवाल व ओळख दस्तऐवजांची खातरजमा व्हायला हवी. सदर प्रकरण, केवळ एका पार्टीपुरते मर्यादित नसून मानवी तस्करी हि संघटीत गुन्हेगारी असून अतिशय भयावह व घातक परिस्थिती यामुळे निर्माण झाली आहे. ही घटना महिलांच्या अनैतिक शोषणाचे गंभीर वास्तव दर्शवते असेही म्हटले आहे.

The post पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात रुपाली चाकणकर यांनी पोलिस महासंचालकांना दिले हे पत्र appeared first on India Darpan Live.

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कपुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात प्राजंल खेवलकर विरुध्द महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपा.....

रेल्वेने या पॅकेज अंतर्गत मूळ भाड्यात जाहीर केली २० टक्के सुट नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारतीय रेल्वे गर्दी ...
09/08/2025

रेल्वेने या पॅकेज अंतर्गत मूळ भाड्यात जाहीर केली २० टक्के सुट

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारतीय रेल्वे गर्दी टाळण्यासाठी, आरक्षण प्रक्रिया सुलभ करण्यासाठी, प्रवाशांची सुविधा वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. सणासुदीच्या काळातील वाढलेली गर्दी नियंत्रणात ठेवण्याच्या तसेच, विशेष गाड्यांसह दोन्ही बाजूंच्या प्रवासासाठी गाड्यांचा योग्य वापर खात्रीशीर करण्याच्या उद्देशाने, “सणासुदीच्या गर्दीसाठी फेस्टिव्हल रश राउंड ट्रिप पॅकेज” या नावाने एक प्रायोगिक योजना सादर करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. या योजनेअंतर्गत प्रवाशांना सूट दिलेल्या दरात फेरी प्रवासाची संधी मिळणार आहे. ही योजना अशा प्रवाशांसाठी लागू असेल जे खाली नमूद केलेल्या कालावधीत परतीचा प्रवास निवडतील:

ही सवलत केवळ तेव्हाच लागू होईल जेव्हा जाण्या येण्याचे (दोन्ही बाजूंचे) तिकीट एकाच प्रवाशाच्या नावाने आरक्षित केले जाईल. परतीच्या प्रवासाचे प्रवाशाचे तपशील जाण्याच्या प्रवासासारखेच असतील. १४ ऑगस्ट २०२५ पासून आरक्षण सुरू होईल. सर्वप्रथम जाण्याचे तिकीट १३ ऑक्टोबर २०२५ ते २६ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत असलेल्या प्रवासासाठी आरक्षित करावे लागेल आणि नंतर कनेक्टिंग जर्नी फीचर वापरून १७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२५ या कालावधीत परतीचे तिकीट आरक्षित करता येईल. परतीच्या प्रवासाच्या आरक्षणासाठी आगाऊ आरक्षण कालावधी अट लागू होणार नाही.

वर निर्देशित आरक्षण केवळ जाण्याच्या आणि येण्याच्या कन्फर्म तिकीटासाठीच दिले जाईल. २० टक्के सवलत केवळ परतीच्या प्रवासाच्या मूळ भाड्यावरच मिळेल. या योजनेअंतर्गत आरक्षण जाण्याच्या आणि परतीच्या प्रवासात एकाच वर्गासाठी आणि समान ओ-डी जोडीसाठी असेल. या योजनेअंतर्गत आरक्षित केलेल्या तिकिटांचे भाडे परत केले जाणार नाही. वरील योजना फ्लेक्सी भाडे असलेल्या गाड्या वगळता सर्व वर्गांसाठी आणि विशेष गाड्यांसह सर्व गाड्यांसाठी (मागणीनुसार गाड्या) लागू असेल. दोन्ही प्रवासांच्या तिकिटावर कोणताही बदल करता येणार नाही. परतीच्या प्रवासाच्या तिकिटासाठी इतर कोणत्याही सवलती, रेल्वे प्रवास कूपन, व्हाउचर आधारित बुकिंग, पास किंवा पीटीओ इत्यादी लागू होणार नाहीत. जाण्याच्या आणि परतीच्या प्रवासाची तिकिटे एकाच पद्धतीने आरक्षित केले गेले पाहिजे; इंटरनेट (ऑनलाइन) बुकिंग, किंवा आरक्षण केंद्रातून काउंटर बुकिंग. या पीएनआरसाठी, चार्टिंग दरम्यान कोणत्याही कारणाने भाड्यात वाढ झाल्यास कोणतेही अतिरिक्त भाडे वसूल केले जाणार नाही.

The post रेल्वेने या पॅकेज अंतर्गत मूळ भाड्यात जाहीर केली २० टक्के सुट appeared first on India Darpan Live.

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारतीय रेल्वे गर्दी टाळण्यासाठी, आरक्षण प्रक्रिया सुलभ करण्यासाठी, प्रवाशा...

सोसायटीच्या लाईट बीलाच्या वादातून महिलेस घरात घुसून बेदम मारहाण…पाच महिलांविरोधात गुन्हा दाखल नाशिक (इंडिया दर्पण वृत्तस...
09/08/2025

सोसायटीच्या लाईट बीलाच्या वादातून महिलेस घरात घुसून बेदम मारहाण…पाच महिलांविरोधात गुन्हा दाखल

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सोसायटीच्या लाईट बीलाच्या वादातून एका महिलेस घरात घुसून बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेत लोखंडी पकड डोक्यात मारण्यात आल्याने महिला जखमी झाली असून याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात एकाच इमारतीतील पाच महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुशिला चंद्रे, ममता शेळके, सिमा डोंबरे, वर्षा चंद्रे व अजय चंद्रे अशी महिलेस मारहाण करणा-या संशयितांची नावे आहेत. याबाबत छाया संजय गांगुर्डे (रा.केदार गॅलेक्सी,वृंदावन गार्डन मागे,आयटीआय कॉलनी श्रमिकनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. तक्रारदार गांगुर्डे व संशयित महिला एकाच इमारतीतील रहिवासी असून त्यांच्यात अपार्टर्मेंटच्या लाईट बिलावरून वाद आहे.

गेल्या ३१ जुलै रोजी दुपारच्या सुमारास गांगुर्डे या आपल्या घरात एकट्या असतांना संशयित महिलांनी बेकायदा घरात प्रवेश करून शिवीगाळ करीत मारहाण केली. या घटनेत एकेने डोक्यात लोखंडी पक्कड मारल्याने त्या जखमी झाल्या असून अधिक तपास हवालदार डिंगे करीत आहेत.

The post सोसायटीच्या लाईट बीलाच्या वादातून महिलेस घरात घुसून बेदम मारहाण…पाच महिलांविरोधात गुन्हा दाखल appeared first on India Darpan Live.

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सोसायटीच्या लाईट बीलाच्या वादातून एका महिलेस घरात घुसून बेदम मारहाण करण्यात आली. ....

डिजिटल अ‍ॅरेस्टची धमकी देत सायबर भामट्यांनी नाशिक शहरातील तिघांना घातला एक कोटीला गंडा नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- ड...
09/08/2025

डिजिटल अ‍ॅरेस्टची धमकी देत सायबर भामट्यांनी नाशिक शहरातील तिघांना घातला एक कोटीला गंडा

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- डिजिटल अ‍ॅरेस्टची धमकी देत सायबर भामट्यांनी शहरातील तीघाना एक कोटी रूपयांना चूना लावण्याचा प्रकार समोर आला आहे. गेल्या महिनाभरात वेगवेगळय़ा कारणांनी संपर्क साधत भामट्यांनी हा गंडा घातला असून, फसवणुक झालेल्यांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुक व आयटीअ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितनुसार शहरातील पुरूषाने याबाबत फिर्याद दिली आहे. गेल्या ८ जुलै ते २ ऑगष्ट दरम्यान भामट्यांनी तक्रारदारांशी संपर्क साधला होता. वेगवेगळया मोबाईल क्रमांक धारकांनी वेगवेगळे कारणे सांगून तक्रारदारांना डिजिटल अ‍ॅरेस्ट करण्याची धमकी दिली.

यानंतर धाकदडपशा करीत तक्रारदारांना वेगवेगळया बँक खात्यांमध्ये लाखोंच्या रकमा भरण्यास भाग पाडण्यात आले असून यात तीन जणांना ९६ लाख २९ हजार २४४ रूपयांना गंडा घातला आहे. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक सुभाष ढवळे करीत आहेत.

The post डिजिटल अ‍ॅरेस्टची धमकी देत सायबर भामट्यांनी नाशिक शहरातील तिघांना घातला एक कोटीला गंडा appeared first on India Darpan Live.

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- डिजिटल अ‍ॅरेस्टची धमकी देत सायबर भामट्यांनी शहरातील तीघाना एक कोटी रूपयांना चूना...

विधानसभा निवडणुकीच्या वेळी दोन लोक भेटले, १६६ जिंकून देण्याची गँरंटी दिली…शरद पवार यांचा खळबळजनक दावा इंडिया दर्पण ऑनलाई...
09/08/2025

विधानसभा निवडणुकीच्या वेळी दोन लोक भेटले, १६६ जिंकून देण्याची गँरंटी दिली…शरद पवार यांचा खळबळजनक दावा

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नागपूर येथील पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. या दाव्यात त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी १६६ जिंकून देण्याची गँरंटी देतो म्हणत दोन लोकांनी आपली भेट घेतल्याचे म्हटले आहे. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.

पवार म्हणाले की, दिल्लीत दोन लोकं मला दिल्लीमध्ये भेटायला आले. त्यांची नावे व पत्ते माझ्याकडे नाहीत. दोघांनी मला सांगितले की, महाराष्ट्रात २८८ जागांपैकी १६० जागा जिंकून देण्याची गँरंटी देतो. मला आश्चर्य वाटलं. निवडणूक आयोग या संस्थेबद्दल मला शंका नव्हती. असे लोक भेटत असतात पण, दुर्लक्ष केल.

हे झाल्यावर त्या लोकांनी राहुल गांधी यांच्याशी भेट करुन दिली. त्या लोकांना जे काही म्हणायचं होतं ते राहुल गांधी यांच्या समोर म्हटलं. त्यानंतर या कामात आपण लक्ष देऊ नये असं माझं आणि राहुल गांधी यांचं मत झाली. हा आपला रस्ता नाही, लोकांनी जो काही निर्णय असेल तो स्विकारु असे ठरल्याचे शरद पवार यांनी सांगितले. या दाव्याला आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही दुजोरा दिला आहे.

एकीकडे राहुल गांधी यांनी मतदार यादीवरुन रान उठवलेले असतांना शरद पवार यांनी हा खळबळजनक दावा केल्यामुळे राजकीय वर्तुळात यावर आता प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहे.

The post विधानसभा निवडणुकीच्या वेळी दोन लोक भेटले, १६६ जिंकून देण्याची गँरंटी दिली…शरद पवार यांचा खळबळजनक दावा appeared first on India Darpan Live.

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनागपूर येथील पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी एक खळबळजनक दावा केला आ.....

उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जल सिंचनासाठी महत्वपूर्ण निर्णय…इतका निधी मिळणार मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अमळन...
09/08/2025

उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जल सिंचनासाठी महत्वपूर्ण निर्णय…इतका निधी मिळणार

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अमळनेर तालुक्यातील (जि. जळगाव) पाडळसे (निम्न तापी) सिंचन प्रकल्पाचा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समावेश करण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्याला 859.22 कोटी रुपये मिळणार असल्याची माहिती जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.

जलसंपदा मंत्री श्री.गिरीश महाजन यांनी सांगितले की, जलसंपदा विभागाने पाडळसे (निम्न तापी) सिंचन प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन PMKSY-AIBP (वेगवर्धित सिंचन लाभ योजना) योजनेत समाविष्ट करण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठवला होता. त्यानुसार केंद्र शासनाने महाराष्ट्रातील निम्न तापी, स्टेज-१ प्रकल्पाचा प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना – जलद सिंचन लाभ कार्यक्रम (PMKSY-AIBP) अंतर्गत समावेश केल्याचे आदेश केंद्रीय वित्त मंत्रालयाने निर्गमित केले आहेत. या प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यासाठी एकूण रुपये 2,888.48 कोटी रुपयांची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली होती. त्यानुसार केंद्र शासनाने 859.22 कोटी निधी मंजूर केला आहे.

या प्रकल्पासाठी विविध टप्प्यांतील परवानग्या आवश्यक होत्या. प्रारंभी प्रकल्पाच्या तत्त्वतः मान्यतेसाठी तो PIB (Public Investment Board) कडे पाठवण्यात आला. त्यानुसार अर्थ मंत्रालयाकडून आर्थिक दृष्टीने प्राथमिक मंजुरी मिळाल्यानंतर, संबंधित विभागांकडून त्यांच्या टिप्पणी व ना-हरकत प्रमाणपत्रांची पूर्तता झाल्यावर अर्थ मंत्रालयाचे सचिव (खर्च) वुमलुनमांग वुअलनाम यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रकल्पास तत्त्वतः मान्यता देण्यात आली आणि पुढील प्रक्रियेसाठी प्रकल्प जलशक्ती मंत्रालयाकडे पाठवण्यात आला होता. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडून प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे अंतिम आर्थिक मंजुरीसाठी सादर करण्यात आला. अर्थ मंत्रालयाने पूर्ण तपासणी करून अंतिम मंजुरी दिली व प्रकल्प पुन्हा जलशक्ती मंत्रालयाकडे पाठवला. अखेरीस, जलशक्ती मंत्रालयाने या प्रकल्पाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन(PMKSY-AIBP) योजनेत समावेश अधिकृत घोषित केला आहे.

या प्रक्रियेमध्ये राज्याच्या जलसंपदा विभागाने सातत्यपूर्ण पाठपुरावा करत या प्रकल्पाचे महत्त्व केंद्र शासनापर्यंत पोहोचवले. केंद्र शासनाच्या निर्णयामुळे उत्तर महाराष्ट्राच्या शेती बरोबरच सर्वांगीण विकासाला विकासाला चालना मिळणार आहे. या प्रकल्पासाठी सतत पाठपुरावा सुरू होता. या केंद्र शासनाच्या निर्णयामुळे प्रकल्प पूर्ण होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

या निर्णयासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जलसंपदा मंत्री श्री. महाजन यांनी आभार मानले आहेत. अमळनेरच्या खासदार स्मिताताई वाघ यांनी देखील सातत्याने केंद्राकडे यासंदर्भात मागणी केली होती. अमळनेरचे माजी मंत्री आमदार अनिल पाटील यांच्याकडून याबाबत पाठपुरावा करण्यात येत होता. या सर्वांच्या सामुदायिक प्रयत्नांना यश मिळाले असल्याचे मंत्री श्री. महाजन म्हणाले.

पूर्णत्वाचा मार्ग मोकळा
उत्तर महाराष्ट्र विशेषता जळगाव व धुळे जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या व आर्थिक विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या प्रकल्पाच्या माझ्या जलसंपदा मंत्रीपदाच्या कार्यकाळात पूर्णत्वाचा मार्ग मोकळा होत असल्याने याचे आत्मिक समाधान आहे. केंद्र शासनाचे मी विशेष आभार मानतो
गिरीश महाजन, मंत्री, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन

The post उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जल सिंचनासाठी महत्वपूर्ण निर्णय…इतका निधी मिळणार appeared first on India Darpan Live.

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अमळनेर तालुक्यातील (जि. जळगाव) पाडळसे (निम्न तापी) सिंचन प्रकल्पाचा केंद्र शासनाच्.....

Address

Nashik/pune Road
Nashik
422011

Alerts

Be the first to know and let us send you an email when India Darpan Live posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share