India Darpan Live

  • Home
  • India Darpan Live

India Darpan Live दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवा देणारे भारतातील अग्रेसर मराठी वेब न्यूज पोर्टल

रोहित पवार यांच्यावर पक्षाची मोठी जबाबदारी…खा. सुप्रिया सुळे यांनी केली ही पोस्ट इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कराष्ट्रवादी का...
16/07/2025

रोहित पवार यांच्यावर पक्षाची मोठी जबाबदारी…खा. सुप्रिया सुळे यांनी केली ही पोस्ट

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तसेच सर्व फ्रंटल आणि सेलच्या प्रभारीपदी आमदार रोहित पवार यांची निवड करण्यात आली.

या निवडीनंतर खा. सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यात म्हटले आहे की, रोहित यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची संघटनात्मक बांधणी आणखी मजबूत होईल याची खात्री आहे. स्व. यशवंतराव चव्हाण साहेब आणि आदरणीय पवार साहेब यांच्या विचारांचा वस्तुपाठ डोळ्यांसमोर ठेवून ते काम करीत आहेत. नूतन प्रांताध्यक्ष शशिकांत जी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्याची शिव फुले शाहू आंबेडकर ही वैचारिक चौकट अधिक भक्कम करण्यासाठी ते सदैव कार्यरत राहतील हा विश्वास आहे. त्यांचे या नवीन जबाबदारीबद्दल हार्दिक अभिनंदन तसेच पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.

काल राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची निवड झाल्यानंतर रोहित पवार यांच्यावरही मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तसेच सर्व फ्रंटल आणि सेलच्या प्रभारीपदी आमदार रोहित पवार यांची निवड करण्यात आली. रोहित यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची संघटनात्मक बांधणी आणखी मजबूत होईल याची खात्री आहे. स्व. यशवंतराव चव्हाण साहेब आणि… pic.twitter.com/RbNsYoAyoY
— Supriya Sule () July 16, 2025

The post रोहित पवार यांच्यावर पक्षाची मोठी जबाबदारी…खा. सुप्रिया सुळे यांनी केली ही पोस्ट appeared first on India Darpan Live.

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कराष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तसेच सर्व फ.....

सीसीटीव्हीचे फुटेज बाहेर जाऊ नये, यासाठी लवकरच आदर्श कार्यप्रणाली…. मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यात महत्त्वाच्या...
16/07/2025

सीसीटीव्हीचे फुटेज बाहेर जाऊ नये, यासाठी लवकरच आदर्श कार्यप्रणाली….

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यात महत्त्वाच्या ठिकाणी विविध विभागांमार्फत सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातात. विशेषतः गृह आणि आपत्ती निवारण विभागाला याची अधिक आवश्यकता भासते. तथापि, सीसीटीव्हीचे फुटेज कुणाला उपलब्ध करुन द्यावे, याबाबतची आदर्श कार्यप्रणाली तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागाला दिले असल्याची माहिती गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य सतेज उर्फ बंटी पाटील यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. तर सदस्य अशोक उर्फ भाई जगताप यांनी या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सहभाग घेतला.

राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले, खासगी आस्थापनांमधील सीसीटीव्हीचे फुटेज बाहेर दिले जाऊ नये, याबाबत पुढील अधिवेशनापूर्वी धोरण तयार केले जाईल. त्याचप्रमाणे शासकीय आस्थापनांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यानंतर त्याची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

The post सीसीटीव्हीचे फुटेज बाहेर जाऊ नये, यासाठी लवकरच आदर्श कार्यप्रणाली…. appeared first on India Darpan Live.

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यात महत्त्वाच्या ठिकाणी विविध विभागांमार्फत सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातात. ....

महाराष्ट्रातील औद्योगिक वीजदर अन्य राज्यांपेक्षा स्वस्त होणार….मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा...
16/07/2025

महाराष्ट्रातील औद्योगिक वीजदर अन्य राज्यांपेक्षा स्वस्त होणार….मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– महाराष्ट्रात औद्योगिक वीजदर अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वात कमी होणार आहेत. नवीन टॅरिफनुसार सध्या महाराष्ट्राचा दर ₹८.३२ आहे, जो पुढील टप्प्यात ₹७.३८ रुपयांवर येणार आहे. तुलनेत, तमिळनाडूचा दर ₹९.०४, गुजरात ₹८.९८ आणि कर्नाटक ₹७.७५ रुपये इतका आहे. पुढील काही वर्षांत महाराष्ट्रात औद्योगिक वीजदर कमी राहील. तसेच टॅरिफ ट्रू-अप प्रक्रियेमुळे दर वाढणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केले.

सदस्य अभिजीत वंजारी यांनी राज्यातील वीज दरवाढ कमी करण्यासंदर्भात करत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती विचारली. यावेळी सदस्य शशिकांत शिंदे, सतेज उर्फ बंटी पाटील आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपप्रश्न विचारले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विद्युत खरेदी आता ‘मेरीट ऑर्डर डिस्पॅच’ पद्धतीने केली जाणार आहे. त्यामुळे खासगी कंपन्यांकडून स्वस्त दरात वीज खरेदी केली जाते. तसेच सोलर, विंड आणि बॅटरी स्टोरेजच्या वापरामुळे विजेच्या खरेदीची किंमत मोठ्या प्रमाणात घटली आहे. हे दीर्घकालीन (२५ वर्षांचे) करार असल्यामुळे विजेचे दर स्थिर राहतील, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आधीच्या टॅरिफ पिटिशनमध्ये रहिवासी ग्राहकांवर भार टाकून इंडस्ट्रियल आणि कमर्शियल दर कमी केले गेले. परंतु यावरील आक्षेपांमुळे आता सगळ्याच कॅटेगरीमध्ये दर कमी झाले आहेत. ७० टक्के ग्राहक १०० युनिटखाली विजेचा वापर करणारे असून त्यांना २६ टक्के दरकपात मिळणार आहे. त्याचबरोबर, १०० युनिटच्या वर वापरावरही दरकपात होणार आहे.

शेतकऱ्यांसाठी सोलर पंप योजनांमध्येही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असून बूस्टर पंपासाठी नवीन योजना आणली आहे. सिंगल पोल योजनेचा खर्च फक्त ₹१५,००० रुपये आहे. शेतकऱ्यांना गरजेनुसार १० एचपी हॉर्स पॉवरचे सोलर पंप देण्याची तयारी आहे. याबाबतची काही तक्रार असल्यास सोलर युनिफाईड पोर्टलवर समाधान करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

कृषी क्षेत्रात स्मार्ट मीटर आणि वीज वापरावर नियंत्रण असावे यासाठी स्मार्ट मीटर लावले जाणार आहे. यामुळे शेतीसाठी नेमकी किती वीज वापरली जाते, हे समजणे शक्य होणार आहे. यामुळे कृषी क्षेत्रातील अचूक वीज वापर मोजता येणार असून भविष्यकालीन धोरण आखण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.

लिफ्ट इरिगेशनसाठी स्वतंत्र सोलरायझेशन प्रपोजल तयार करण्यात आले आहे. डार्क झोन्समध्ये कन्व्हेन्शनल पद्धतीने वीज देण्याचा विचारही केला जाणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

The post महाराष्ट्रातील औद्योगिक वीजदर अन्य राज्यांपेक्षा स्वस्त होणार….मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस appeared first on India Darpan Live.

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्रात औद्योगिक वीजदर अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वात कमी होणार आहेत. नवीन .....

Wego Library Foundation ने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचे खा. राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते प्रकाशन इंडिया दर्पण ऑनलाईन डेस...
16/07/2025

Wego Library Foundation ने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचे खा. राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते प्रकाशन

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
Wego Library Foundation ने प्रकाशित केलेल्या “Top 16 Secrets of Wealth Creation by Patents” या पुस्तकाचे प्रकाशन लोकप्रिय खासदार राजाभाऊ वाजे यांच्या शुभ हस्ते झाले. या कार्यक्रमाचे आयोजन अशोका बिजनेस स्कूल, नाशिक येथे करण्यात आले होते.

पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात Wego Library Foundation चे संस्थापक डॉ. निलेश पावसकर यांनी पुस्तका बद्दल माहिती देताना फौंडेशन च्या कार्याची सखोल माहिती दिली. अशोका एज्युकेशन फाउंडेशनचे सचिव श्रीकांत शुक्ल यांनी सांगितले की, नजीकच्या काळात या विषयाची निकड ओळखून विद्यार्थ्यांना पेटंट्स आणि संपत्ती निर्मितीचे महत्त्व शिकवले जाणे गरजेचे आहे. यासाठी संस्था ठोस पाऊले उचलत आहे. लवकरच, अशोका एज्युकेशन फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांना इयत्ता ७ वी पासूनच पेटंट्स आणि संपत्ती निर्माण विषयावर पाठ्यक्रम दिला जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

प्रकाशन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी लोकप्रिय खासदार राजाभाऊ वाजे यांनी पेटंट्सच्या महत्वावर भर दिला. ते म्हणाले, “Foundation ने सुरु केलेली ही चळवळ अत्यंत स्तुत्य असून GDP वाढवायचं असेल तर पेटंट्स वाढवली पाहिजेत. सामान्य लोकांना पेटंट्सची ओळख असणे आवश्यक आहे. Wego Library Foundation च्या कार्यामुळे या क्षेत्रात नवा उत्साह निर्माण होईल. म्हणूनच या फ़ाउंडेशनचे कार्य आशादायक, आणि कौतुकास्पद असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. या प्रसंगी त्यांनी पुस्तकाच्या सर्व लेखकांना पुढील लेखनासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाला उद्योजक श्रीकांत जोशी, डॉ. उदय वाड, डॉ रावसाहेब घेगड़े, महेंद्र पांगरकर, संजय खानजोड़े, ओमप्रकाश रावत, निनाद कुलकर्णी,पराग खेड़कर , डॉ. एस. जी. मोरे, स्मिता शिंदे आदी उपस्थित होते. सूत्रसंचलन Wego Foundation चे प्रोजेक्ट डायरेक्टर डॉ. डी. एम. गुजराथी यांनी केले.

The post Wego Library Foundation ने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचे खा. राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते प्रकाशन appeared first on India Darpan Live.

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कWego Library Foundation ने प्रकाशित केलेल्या "Top 16 Secrets of Wealth Creation by Patents" या पुस्तकाचे प्रकाशन लोकप्रिय खासदार

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परदेशात अभ्यास दौऱ्याची संधी….या तारखेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)-...
16/07/2025

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परदेशात अभ्यास दौऱ्याची संधी….या तारखेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परदेश अभ्यास दौऱ्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी २३ जुलै २०२५ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अभिमन्यू काशीद यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध प्रगत देशातील विकसित आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी तसेच शेतमालाची निर्यात, कृषी मालाचे पणन व बाजारपेठेतील मागणी, कृषी माल प्रक्रिया याबरोबरच त्या देशांमध्ये उपयोगात येत असलेले अद्ययावत तंत्रज्ञान अवगत करून त्याचा वापर शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात करण्यासाठी सहाय करणे, विविध देशांनी विकसित केलेले शेती तंत्रज्ञान व अनुषंगिक बाबी यांची माहिती त्या देशातील शेतकऱ्‍यांशी प्रत्यक्ष चर्चा करून तसेच क्षेत्रीय भेटी, संबंधित संस्थांना भेटी आदींद्वारे शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता उंचावण्यासाठी १६ जून २०२५ च्या शासन निर्णयान्वये राज्य शासनाच्या कृषी विभागांतर्गत शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे राबविण्यात येत आहे.

या अभ्यास दौऱ्यासाठी निवड केलेले संभाव्य देश असे : युरोप- जर्मनी, फ्रान्स, स्वित्झर्लंड, १२ दिवस, फलोत्पादन, सेंद्रीय शेती आणि दुग्धोत्पादन. इस्त्राईल, ९ दिवस, आधुनिक कृषी तंत्रज्ञान, पाणी व्यवस्थापन, कृषी यांत्रिकीकरण. जपान, १० दिवस, सेंद्रीय शेती व आधुनिक कृषी तंत्रज्ञान. मलेशिया, व्हिएतनाम व फिलीपाइन्स, १२ दिवस, फळे, भाजीपाला पिकांचे काढणी पश्चात तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन प्रणाली. चीन, ८ दिवस, विविध कृषी तंत्रज्ञान, पीक उत्पादकता वाढविण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान आणि कृषी एक्स्पो. दक्षिण कोरिया, ८ दिवस, आधुनिक कृषी अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान.

अनुदानाचा तपशील : शासनाकडून अभ्यास दौऱ्यासाठी सर्व घटकांतील (संवर्गातील) शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या ५० टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त १ लाख यापैकी कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणून देय राहील.

अभ्यास दौऱ्यासाठी पात्रता : अभ्यास दौऱ्याकरीता जाणारा लाभार्थी हा स्वत: शेतकरी असावा, स्वत:च्या नावे चालू कालावधीचा सातबारा व ८- अ उतारा असणे आवश्यक आहे, शेतकऱ्याचे उत्पन्नाचे मुख्य साधन शेती असावे व त्याने स्वयंघोषणापत्रात नमूद करणे आवश्यक राहील, शेतकऱ्याचे ॲग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी असणे आवश्यक आहे, शेतकरी कुटुंबामधून फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. कुटुंबातील इतर सदस्यास सोबत नेण्याची परवानगी राहणार नाही, आधार प्रमाणपत्र आवश्यक, शेतकऱ्याचे वय सहलीला निघण्याच्या दिवशी २५ वर्षे पूर्ण असावे, कमाल वयाची अट नाही, शेतकऱ्याने प्रस्तावासोबत शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र (किमान एमबीएमबीएस डॉक्टरचे) जोडणे आवश्यक राहील.

शेतकरी वैध पारपत्रधारक (पासपोर्ट) असावा, पारपत्राची वैध मुदत दौरा निघण्यापूर्वी किमान तीन महिन्यांपेक्षा जास्त असावी. शेतकरी शासकीय, निमशासकीय, सहकारी, खासगी संस्थेत नोकरीस नसावा, वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, वकील, सीए, अभियंता आणि कंत्राटदार नसावा. शेतकऱ्याने यापूर्वी शासकीय (केंद्र, राज्य शासनाच्या कोणत्याही विभागामार्फत, कृषी ‍विद्यापीठ, स्थानिक स्वराज्य संस्थामार्फत) अर्थसाहाय्याने विदेश दौरा केलेला नसावा. शेतकऱ्याची अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाल्याचे पत्र कृषी विभागाकडून मिळाल्यानंतर संबंधित शेतकऱ्याने परदेश दौऱ्यासाठी शारीरिक तंदुरुस्त असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. तसेच कोरोना विषयक तपासणी करणे बंधनकारक राहील.
शेतकऱ्याने अर्जासमवेत जोडावयाची कागदपत्रे : विहित नमुन्यातील अर्ज, प्रपत्र १, स्वयंघोषणापत्र, वैध पारपत्राची छायांकित प्रत, सातबारा उतारा, ८-अची मूळ प्रत (कालावधी मागील सहा महिने), शिधापत्रिकेची झेरॉक्स प्रत, वैद्यकीय अधिकाऱ्याचे मूळ स्वास्थ्य प्रमाणपत्र.

तालुकास्तरावरून विहित कालावधीमध्ये प्राप्त पात्र प्रस्तावांची अभ्यास दौऱ्याच्या निवडीकरीता जिल्हास्तरावर सोडत काढून ज्येष्ठता क्रमवारी निश्चित करण्यात येईल. ज्येष्ठता क्रमवारीनुसार जिल्ह्यास प्राप्त लक्ष्यांकानुसार एक महिला शेतकरी, एक केंद्र, राज्य पुरस्कार प्राप्त तसेच पीक स्पर्धा विजेते शेतकरी यांची प्राधान्याने निवड करण्यात येईल. या योजनेंतर्गत इच्छुक शेतकऱ्यांनी २३ जुलै २०२५ पर्यंत जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावा. तसेच अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

The post जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परदेशात अभ्यास दौऱ्याची संधी….या तारखेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन appeared first on India Darpan Live.

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परदेश अभ्यास दौऱ्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी पात्र शे...

हरसुल येथे १५ लाख ३० हजाराचा बनावट खताचा साठा जप्त, गुन्हा दाखल नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- त्र्यंबकेश्वर तालुक्याती...
16/07/2025

हरसुल येथे १५ लाख ३० हजाराचा बनावट खताचा साठा जप्त, गुन्हा दाखल

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसुल येथे १५ लाख ३० हजार रुपये किमतीच्या बनावट १०.२६.२६ खताच्या २४० बॅगांचा साठा कृषी विभागाच्या भरारी पथकाने जप्त केला आहे. या प्रकरणी हरसुल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील भरारी पथकाला १५ जुलै रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पथकप्रमुख संजय शेवाळे (कृषी विकास अधिकारी), जगन सूर्यवंशी (जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक), कल्याण पाटील (विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक), रामा दिघे (कृषी अधिकारी), आणि पोलिस उपनिरीक्षक मोहित मोरे यांच्या सहाय्याने आयशर कंपनीच्या संशयित वाहनाची (क्रमांक MH15 FV7717) तपासणी केली. यात पॅरादिप फॉस्फेट लिमिटेडच्या नावाने बनावट खताच्या बॅगा आढळल्या.

जप्त केलेल्या खताचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, हरसुल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईसाठी विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर आणि जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अभिमन्यु काशिद यांचे मार्गदर्शन लाभले.

शेतकऱ्यांना बनावट आणि दुय्यम दर्जाची खते विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांनी घरपोहोच खते खरेदी करू नये, सिलबंद बॅगांवरील माहिती कायद्यानुसार तपासावी आणि अधिकृत विक्रेत्यांकडून पक्क्या बिलासह खरेदी करावी, असे आवाहन सुभाष काटकर यांनी केले आहे.

The post हरसुल येथे १५ लाख ३० हजाराचा बनावट खताचा साठा जप्त, गुन्हा दाखल appeared first on India Darpan Live.

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसुल येथे १५ लाख ३० हजार रुपये किमतीच्या बनावट १०.२६.२....

शिवसेना शिंदे गटाची आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेबरोबर युती इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कयुती विचारांची, विश्वासाची...
16/07/2025

शिवसेना शिंदे गटाची आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेबरोबर युती

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
युती विचारांची, विश्वासाची, विकासाची म्हणत शिवसेना शिंदे गटाने – डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेबरोबर युती केल्याची घोषणा केली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी शिवशक्ती आणि भीमशक्ती पुन्हा एकत्र आल्याचे सांगितले. यावेळी दोन्ही नेत्यांनी हातात हात घेत सर्वांना अभिवादन केले.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाने दलित, मराठी मतांसाठी गणिताची जुळवाजुळव केली असून त्यादृष्टीने हे पहिले पाऊल टाकले आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी दोन्ही पक्ष महापालिका आणि झेडपीच्या निवडणुका एकत्र लढणार असल्याचेही जाहीर केले.

यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रक्ताचा वारसा असलेले आनंदराज आंबेडकर आहेत. दलित, पीडित, शोषितांसाठी ते काम करत आहेत. विचारांची, विश्वासाची आणि विकासाची ही युती असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. बाळासाहेब ठाकरेंनी देखील शिवशक्ती – भीमशक्ती अशी युती केली होती असेही त्यांनी यावेळी सांगितले.

The post शिवसेना शिंदे गटाची आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेबरोबर युती appeared first on India Darpan Live.

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कयुती विचारांची, विश्वासाची, विकासाची म्हणत शिवसेना शिंदे गटाने - डॅा. बाबासाहेब आंबेडकर...

देवेंद्र फडणवीसांनी उध्दव ठाकरे यांना सत्तेत येण्यासाठी दिली ही जाहीर ऑफर…. इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कविधानपरिषदेत मुख्यम...
16/07/2025

देवेंद्र फडणवीसांनी उध्दव ठाकरे यांना सत्तेत येण्यासाठी दिली ही जाहीर ऑफर….

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विधानपरिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट उध्दव ठाकरे यांना दिलेल्या थेट जाहीर ऑफरची चर्चा सध्या राजकीय वर्तूळात जोरदार चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आम्हाला विरोधी पक्षात जाण्याचा स्कोप २०२९ पर्यंत नाही, मात्र तुम्हाला मात्र इकडे येण्याचा स्कोप असल्याचे सांगीतले. या वक्तव्यामुळे आता तर्कवितर्क लढवले जात आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या आमदारकीचा आज शेवटचा दिवस होतो. त्यांच्या निरोप समारंभानिमित्ताने बोलतांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही ऑफर दिली. त्या आधी या दोन्ही नेत्यांची सभागृहाबाहेरही भेट झाली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले उध्दवजी आता २०२९ पर्यंत काही करायचं नाही. आम्हाला विरोधी पक्षात जाण्याचा स्कोप २०२९ पर्यंत नाही, मात्र तुम्हाला मात्र इकडे येण्याचा स्कोप आहे. त्यावर वेगळ्या पध्दतीने विचार करता येईल आपण वेगळ्या पध्दतीने बोलू असेही त्यांनी सांगितले.

The post देवेंद्र फडणवीसांनी उध्दव ठाकरे यांना सत्तेत येण्यासाठी दिली ही जाहीर ऑफर…. appeared first on India Darpan Live.

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कविधानपरिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट उध्दव ठाकरे यांना दिलेल्या थेट जा....

राज्यात हनीट्रॅपमध्ये आयएएस अधिकारी आणि मंत्र्यांचाही समावेश….नाना पटोले यांनी केली ही मागणी इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्करा...
16/07/2025

राज्यात हनीट्रॅपमध्ये आयएएस अधिकारी आणि मंत्र्यांचाही समावेश….नाना पटोले यांनी केली ही मागणी

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्यातील प्रशासनासाठी अत्यंत धोकादायक अशी घटना समोर येत आहे. हनीट्रॅपच्या माध्यमातून राज्यातील गोपनीय दस्तऐवज गुप्तचर यंत्रणांच्या आणि असामाजिक प्रवृत्तींच्या हाती पोहोचत आहेत. या गंभीर प्रकरणात काही वरिष्ठ अधिकारी, आयएएस अधिकारी आणि मंत्र्यांचाही समावेश असल्याची माहिती उघड झाली असल्याचे सांगत काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी या विषयांकडे विधानसभेत लक्ष वेधले.

ते म्हणाले की, हनीट्रॅपच्या माध्यमातून जर राज्याच्या सुरक्षेशी निगडित संवेदनशील कागदपत्रे परकीय किंवा राष्ट्रविरोधी शक्तींच्या हाती गेली, राज्याची सुरक्षितता, धोरणात्मक निर्णय प्रक्रियेवर या गळतीचा थेट परिणाम होऊ शकतो, त्यामुळे या गंभीर घटनेची तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी त्यांनी केली.

नेमकं काय आहे प्रकरण
राज्यातील ७२ वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि आजी- माजी मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचा खळबळजनक दावा नाशिक दौ-यावर असलेल्या एका मोठ्या राजकीय नेत्याने दोन दिवसापूर्वी पत्रकारांशी बोलतांना अनौपचारिक गप्पा मारताना केला होता. या सर्वांचे वादग्रस्त आणि संवेदनशील व्हिडिओ तयार करण्यात आले आहेत. हे सर्व जण हनीट्रॅपमध्ये अडकल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला, यात नाशिकमधील एका बड्या अधिका-याचाही समावेश आहे. यासबंधीच्या व्हिडिओबद्दलही या नेत्याने भाष्य केल्यामुळे त्याबाबत आता चर्चा रंगू लागली. नाशिकसह मुंबई, पुणे येथील बड्या अधिका-यांचा आणि नेत्यांचा या हनीट्रॅप प्रकरणात सहभाग असल्याची माहिती आहे. हा व्हिडिओ बाहेर आल्यास अनेक बड्या व्यक्ती अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. याच प्रकरणावर विधानसभेत आज नाना पटोले यांनी लक्ष वेधले.

The post राज्यात हनीट्रॅपमध्ये आयएएस अधिकारी आणि मंत्र्यांचाही समावेश….नाना पटोले यांनी केली ही मागणी appeared first on India Darpan Live.

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कराज्यातील प्रशासनासाठी अत्यंत धोकादायक अशी घटना समोर येत आहे. हनीट्रॅपच्या माध्यमातू....

जाण्या येण्यास अडथळा व्हावा म्हणून रातोरात कंपाऊंड उभारले…गुन्हा दाखल नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जाण्या येण्यास अडथ...
16/07/2025

जाण्या येण्यास अडथळा व्हावा म्हणून रातोरात कंपाऊंड उभारले…गुन्हा दाखल

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जाण्या येण्यास अडथळा व्हावा या उद्देशाने टोळक्याने रातोरात कंपाऊंड उभारल्याचा प्रकार मखमलाबाद नाका भागात घडला. जेसीबीच्या सहाय्याने पत्र्याचे शेड पाडून हे कृत्य करण्यात आले असून शेडमधील साहित्य टोळक्याने चोरून नेल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रमेश भास्कर, रामदार भास्कर, कृष्णा भास्कर शंभु भास्कर, अनिल भंडारी, एमएच १५ केसी ९४५८ या जेसीबी वरील चालक व अन्य ५ ते ६ जण अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत संजय दत्तात्रेय थोरवे (राजपाल कॉलनी. हेमकुंज रोड मखमलाबादनाका ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. थोरवे लाकडी वखारीचे मालक असून त्यांच्या कब्जा वहिवाटीतील सर्व्हे नं. ९१ – ३ – २ या ठिकाणी हा प्रकार घडला.

या भूखंडावर जयभोलेनाथ बुडन बॉक्स नावाने त्यांनी पत्र्याचा शेड उभारलेला होता. संशयितांनी शनिवारी (दि.१२) पहाटेच्या सुमारास थोरवे यांच्या कब्जातील जागेत बळजबरीने घुसून पत्र्याचे शेड जेसीबीच्या सहाय्याने पाडून नुकसान केले. शेडमधील इलेक्ट्रीक मिटर,मोटार व दोन कटर मशिन, लोखंडी कपाट व पलंग तसेच पत्रे व अँगल संशयितांनी चोरून नेल्याचा आरोप करण्यात आला असून, या ठिकाणी मोठा खड्डा खोदून वहिवाटीवरील जागेत जाण्या येण्यासाठी प्रतिबंध व्हावा म्हणुन कंपाऊड उभारूण अडथळा निर्माण करण्यात आल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक पंकज सोनवणे करीत आहेत.

The post जाण्या येण्यास अडथळा व्हावा म्हणून रातोरात कंपाऊंड उभारले…गुन्हा दाखल appeared first on India Darpan Live.

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जाण्या येण्यास अडथळा व्हावा या उद्देशाने टोळक्याने रातोरात कंपाऊंड उभारल्याचा प....

घरफोडीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या दोन घरफोडींमध्ये सव्वा दोन लाखाच्या ऐवजावर डल्ला नाशिक (इंडिया दर्पण वृत्तस...
16/07/2025

घरफोडीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या दोन घरफोडींमध्ये सव्वा दोन लाखाच्या ऐवजावर डल्ला

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात घरफोडीचे सत्र सुरूच असून वेगवेगळया भागात झालेल्या दोन घरफोडींमध्ये चोरट्यांनी सव्वा दोन लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे व लॅपटॉपटचा समावेश आहे. याप्रकरणी म्हसरूळ व अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या घरफोडी प्रकरणी नंदिनी लखन चव्हाण (रा. कस्तूरी गंध सोसा. वाढणे कॉलनी म्हसरूळ ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. चव्हाण कुटुंबिय सोमवारी (दि.१४) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली ४५ हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे १ लाख ५७ हजाराचा ऐवज चोरून नेला. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक पटारे करीत आहेत.

दुसरी घरफोडी सिडकोतील नेहरू चौकात झाली. याबाबत किरण रामचंद्र चव्हाण (रा.राजमाता जिजाऊ गार्डन शेजारी,नेहरू चौक ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. चव्हाण कुटुंबिय ११ ते १४ जुलै दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून किचनमधील अलमारीत ठेवलेली २५ हजाराची रोकड सोन्याचांदीचे दागिणे व मुलाचा लॅपटॉप असा सुमारे ५३ हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार आवारे करीत आहेत.

The post घरफोडीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या दोन घरफोडींमध्ये सव्वा दोन लाखाच्या ऐवजावर डल्ला appeared first on India Darpan Live.

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात घरफोडीचे सत्र सुरूच असून वेगवेगळया भागात झालेल्या दोन घरफोडींमध्ये चोरट्य....

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने रेल्वेच्या अभियंत्यासह पाच जणांना केली अटक… इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्ककेंद्रीय अन्वेषण ब्युरो (...
16/07/2025

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने रेल्वेच्या अभियंत्यासह पाच जणांना केली अटक…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने लाचखोरी प्रकरणात उत्तर रेल्वे लखनऊच्या गति शक्ती युनिटचे उपमुख्य अभियंता, एसएसई (ड्रॉइंग्स); ओएस, एनआर, लखनऊ आणि एका खाजगी कंपनीचे दोन कर्मचारी, या पाच जणांना अटक केली आहे.

सीबीआयने १४ जुलै रोजी आरोपी गति शक्ती युनिट, उत्तर रेल्वे, वरिष्ठ डीईएन (समन्वय), एनईआर, वाराणसी; कार्यालय अधीक्षक, डीआरएम, एनईआर, वाराणसी यांचे कार्यालय; एसएसई (वर्क्स), एनईआर, वाराणसी, अकाउंट्स सेक्शन ऑफिसर, एनईआर, वाराणसी, एक खाजगी कंपनी, खाजगी कंपनीचे दोन कर्मचारी आणि अज्ञात इतरांविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल केला आहे.

या तपासादरम्यान, खाजगी कंपनी ही एक रेल्वे कंत्राटदार आहे ज्याला भाधोई, वाराणसी येथील गति शक्ती प्रकल्पांतर्गत काम/निविदा देण्यात आली आहे. हे काम आरोपी उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गति शक्ती उत्तर रेल्वे, लखनऊ यांच्या देखरेखीखाली होते. आरोपी खाजगी व्यक्ती, आरोपी खाजगी कंपनीचा कर्मचारी, याला अटक करण्यात आली आणि त्याच्या ताब्यातून गुन्हेगारी साहित्य जप्त करण्यात आले, ज्यामुळे १४ जुलै रोजी त्याने खाजगी कंपनीच्या वतीने आरोपी उपमुख्य अभियंता, उत्तर रेल्वे, लखनऊ, ओएस, एनआर, लखनऊ, एसएसई (रेखाचित्रे) आणि सहाय्यक एक्सईएन, एनआर यांना अनुचित फायदा पोहोचवला आहे हे सिद्ध झाले.

त्यानंतर, आरोपी उपमुख्य अभियंता यांना त्यांच्या कार्यालयातून अटक करण्यात आली आणि आरोपी खाजगी व्यक्तीकडून घेतलेला २.५० लाख रुपयांचा अनुचित फायदा त्यांच्या ताब्यातून जप्त करण्यात आला. आरोपी खाजगी व्यक्तीने आरोपी ओएस, एनआर, लखनऊ यांना दिलेली ८९ हजार रुपयांची लाच ताब्यातून जप्त करण्यात आली. या पैशांमध्ये आरोपी, एसएसई (रेखाचित्रे) यांनी आरोपी ओएस, एनआर, लखनऊ मार्फत घेतलेली लाच समाविष्ट आहे.
लखनऊ येथे ४ ठिकाणी, वाराणसी येथे ६ ठिकाणी आणि गाझियाबाद येथे १ ठिकाणी छापे टाकण्यात आले. या छाप्यांमध्ये गुन्हेगारी कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

आरोपी उपमुख्य अभियंता, गति शक्ती युनिट, उत्तर रेल्वे, एसएसई (ड्रॉइंग्ज); ओएस, एनआर, लखनऊ आणि आरोपी खाजगी कंपनीचे दोन खाजगी कर्मचारी-कर्मचारी यांना अटक करण्यात आली आहे. आरोपी खाजगी व्यक्तीकडून २.७५ लाख रुपये घेतल्याचा आरोप असलेला आणखी एक आरोपी सहाय्यक एक्सईएन, एनआर फरार आहे. त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अटक करण्यात आलेल्या ५ आरोपींना १५ जुलै रोजी सीबीआय, लखनऊ येथील लेफ्टनंट स्पेशल न्यायाधीश (पश्चिम) यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले आणि त्या सर्वांना २८ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.

The post लाचखोरी प्रकरणात सीबीआयने रेल्वेच्या अभियंत्यासह पाच जणांना केली अटक… appeared first on India Darpan Live.

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्ककेंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने लाचखोरी प्रकरणात उत्तर रेल्वे लखनऊच्या गति शक्ती य....

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when India Darpan Live posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share