India Darpan Live

India Darpan Live दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवा देणारे भारतातील अग्रेसर मराठी वेब न्यूज पोर्टल
(1)

सावधान… या जिल्ह्यात अवकाशातून उपकरणे पडण्याची शक्यता… प्रशासनाने दिली ही माहिती… सावधान… या जिल्ह्यात अवकाशातून उपकरणे ...
28/10/2025

सावधान… या जिल्ह्यात अवकाशातून उपकरणे पडण्याची शक्यता… प्रशासनाने दिली ही माहिती…

सावधान… या जिल्ह्यात अवकाशातून उपकरणे पडण्याची शक्यता… प्रशासनाने दिली ही माहिती…

जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारत सरकारच्या अणुऊर्जा विभाग आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) यांच्या संयुक्त विद्यमाने २५ ऑक्टोबर २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत हैदाराबाद येथून सुमारे १० उच्च उंचीवरील वैज्ञानिक बलून उड्डाणे करण्यात येणार आहेत. ही उड्डाणे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR), ईसीआयएल, हैद्राराबाद-५०००६२ येथील बलून सुविधा केंद्रातून केली जाणार आहेत.

ही बलून उड्डाणे १९५९ पासून महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने होत असून, यंदाही त्याच परंपरेत प्रयोग पार पडतील. बलून हायड्रोजन वायूने भरलेली असून त्यांचा व्यास ५० ते ८५ मीटर इतका असतो. ही बलून ३० ते ४२ किलोमीटर उंचीवर वैज्ञानिक उपकरणे वाहून नेतात आणि काही तासांच्या प्रयोगानंतर रंगीत पॅराशूटच्या सहाय्याने जमिनीवर उतरतात.

वाऱ्याच्या दिशेनुसार ही उपकरणे हैदराबादपासून २०० ते ३५० किलोमीटर अंतरावर पडू शकतात. त्यामुळे महाराष्ट्रातील औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी, सांगली, सातारा, अहमदनगर, नागपूर, जळगाव, सोलापूर, चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली या जिल्ह्यांत उपकरणे उतरण्याची शक्यता आहे.

नागरिकांना विनंती करण्यात येते की, अशा उपकरणे किंवा पॅराशूट आढळल्यास ती उघडू किंवा हलवू नयेत. उपकरणांशी छेडछाड केल्यास मौल्यवान वैज्ञानिक माहिती नष्ट होऊ शकते. काही उपकरणांवर उच्च विद्युत दाब (हाय व्होल्टेज) असू शकतो, त्यामुळे त्यांना हाताळू नये.

अशा वस्तू आढळल्यास जवळच्या पोलिस ठाणे, पोस्ट ऑफिस किंवा जिल्हा प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधावा, अथवा खालील पत्त्यावर फोन किंवा संदेश पाठवावा, संचालक, बलून सुविधा केंद्र, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, ईसीआयएल, हैदाराबाद. उपकरणांची सुरक्षित परतफेड करणाऱ्या नागरिकांना योग्य बक्षीस व झालेला खर्च परत दिला जाईल. मात्र उपकरणांशी छेडछाड झाल्यास बक्षीस दिले जाणार नाही.

स्थानिक प्रशासनाने ही माहिती गावपातळीपर्यंत पोहोचवावी व स्थानिक भाषेत जनजागृती करावी, असे आवाहन करण्यात आले आहे, पहिले बलून उड्डाण ऑक्टोबरच्या चौथ्या आठवड्यात होणार असून, सर्व आवश्यक तयारी तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, ईसीआयएल, हैदाराबाद यांनी कळविले आहे.

The post सावधान… या जिल्ह्यात अवकाशातून उपकरणे पडण्याची शक्यता… प्रशासनाने दिली ही माहिती… appeared first on India Darpan Live.

सावधान... या जिल्ह्यात अवकाशातून उपकरणे पडण्याची शक्यता... प्रशासनाने दिली ही माहिती...

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या आर्थिक मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा… अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या आर्थि...
28/10/2025

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या आर्थिक मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा…

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या आर्थिक मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा…

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी जवळपास 32 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. यात आतापर्यंत 8 हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय वितरित करण्यात आले असून, याचा लाभ 40 लाख शेतकर्‍यांना होतो आहे.

आणखी 11 हजार कोटी रुपये वितरित करण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. ही मदत पुढच्या 15 दिवसांत शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले, अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. त्यांना सर्वतोपरी मदत केली जात आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत आणखी 11 हजार कोटी रुपये वितरीत करण्यास मान्यता देण्यात आल्याने मदतीसाठी निधीची कुठलीही कमतरता नाही.

पुढील 15 दिवसांत ही मदत अतिवृष्टग्रस्त जिल्ह्यातील किमान 90 टक्के शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वी जशा याद्या मिळाल्या, तसा निधी वितरित करण्यात आला. ज्यांना केवळ दोन हेक्टरसाठी मदत मिळाली आहे, त्यांना पुढील हेक्टरसाठीचे अर्थसहाय्य दिले जाणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, काही शेतकर्‍यांच्या बँक खात्यामध्ये तांत्रिक अडचणी आहेत, तर काहींच्या नोंदींमध्ये त्रुटी आहेत. काही ठिकाणी एकापेक्षा जास्त खाती असल्याचे दिसून आले. या सर्व बाबी तपासून उर्वरित 10 टक्के शेतकर्‍यांपर्यंतही तातडीने मदत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

कुणीही पात्र शेतकरी मदतपासून वंचित राहू नये व अपात्र खातेधारकांच्या खात्यावर निधी जावू नये, यासाठी ई-केवायसी केली जात आहे. अ‍ॅग्रीस्टॅकचा डेटा राज्य शासनाकडे असून यामध्ये ज्या शेतकर्‍यांची माहिती उपलब्ध आहे. त्यांची पुन्हा ई-केवायसी केली जात नसून सहायता निधी थेट त्यांच्या खात्यात जमा केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

शेतमालाच्या विक्रीसाठी नोंदणी करा: मुख्यमंत्री श्री. फडणवीस
शेतमालाच्या खरेदीसाठी राज्यात नोंदणी सुरू केली जात असून यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. अशा नोंदणीमुळे पारदर्शकता आली असून आता शेतकर्‍यांना हमी भाव मिळत आहे. यापूर्वी व्यापारी शेतकर्‍यांकडून कमी दराने माल घेवून शासनाला जास्त दराने विकला जात असे.

नोंदणी करून शासकीय खरेदी केंद्रावर किंवा शासनाने जाहीर केलेला हमी भावाप्रमाणे खरेदी करणार्‍या व्यापार्‍यांनाच मालाची विक्री करण्याचे आवाहनही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले आहे.

The post अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या आर्थिक मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा… appeared first on India Darpan Live.

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या आर्थिक मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा...

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे ७ निर्णय… राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे ७ निर्णय…विकसित मह...
28/10/2025

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे ७ निर्णय…

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे ७ निर्णय…

विकसित महाराष्ट्र – २०४७ व्हिजन डॉक्युमेंटला मान्यता
अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली व्हिजन मॅनेंजमेंट युनिट

राज्यातील नागरिकांकडून विकसित महाराष्ट्र- २०४७ संदर्भात मते, अपेक्षा, अभिप्राय, आकांक्षा व प्राधान्यक्रम जाणून घेण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाच्या मदतीने राज्यव्यापी सर्वेक्षण अभियान राबविण्यात आले होते. या आधारे तयार करण्यात आलेल्या विकसित महाराष्ट्र-२०४७ च्या व्हिजन डॉक्युमेंटला तसेच त्याच्या अंमलबजावणीसाठी व्हिजन मॅनेजमेंट युनिट स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

भारत सरकारने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारताला सन २०४७ पर्यंत “विकसित भारत-भारत @२०४७” करण्याचा संकल्प केला आहे. यामध्ये सन २०२५-२६ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार महाराष्ट्राने २०४७ पर्यंत “विकसित महाराष्ट्र-विकसित भारतासाठी” हे ध्येय निश्चित केले आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षी महाराष्ट्राला फाईव्ह ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था घडवायची आहे.

विकसित महाराष्ट्राची संकल्पना मूर्त स्वरुपात मांडण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार समिती व मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती गठीत करण्यात आली. मुख्यमंत्री महोदयांनी १०० दिवसांच्या कार्यक्रमानंतर १५० दिवसांचा सुधारणा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यामध्ये विकसित महाराष्ट्र-२०४७ (Vision Document) चा समावेश करण्यात आला आहे. हे व्हिजन डॉक्युमेंट २ ऑक्टोबर २०२९ चे अल्पकालीन व्हिजन (वार्षिक लक्ष्यांसह), १ मे २०३५ चे मध्यमकालीन व्हिजन (महाराष्ट्र@७५), आणि १५ ऑगस्ट २०४७ चे दीर्घकालीन व्हिजन (भारत@१००) अशा तीन टप्प्यांत तयार करण्यात आले आहे.

व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा तयार करण्यासाठी कृषि, उद्योग, सेवा, पर्यटन, नगर विकास, ऊर्जा आणि शाश्वत विकास, पाणी, वाहतूक, शिक्षण आणि कौशल्य विकास, आरोग्य, समाज कल्याण, सॉफ्ट पॉवर, शासन, तंत्रज्ञान, सुरक्षा, वित्त असे १६ क्षेत्रीय गट स्थापन करण्यात आले. हे १६ गट प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन या चार प्रकारांमध्ये विभागले आहेत. ज्यामध्ये सुमारे १०० उपक्रमांचा समावेश कऱण्यात आला आहे.

या उपक्रमांसाठी निश्चित कऱण्यात आलेली उद्दिष्टे पुढीलप्रमाणे –

अ) प्रगतीशील (Growth Driven) – कृषि : हवामान बदलाच्या लवचिकतेसह शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे आणि ग्रामीण-शहरी जीवनमानात समानता साध्य करणे. सेवा: नव्या कालखंडात संपूर्ण जगात वित्त, आघाडीचे तंत्रज्ञान, माध्यमे आणि मनोरंजन यामध्ये आघाडीवर राहणे. उद्योग: सर्व जगासाठी महाराष्ट्रात निर्मिती आणि रचना करणे, ज्यायोगे राज्याच्या एकूण स्थूल उत्पन्नापैकी एक तृतीयांशपेक्षा जास्त उत्पन्न उद्योग क्षेत्रातून येईल. पर्यटन: जबाबदार, सुरक्षित आणि कचरामुक्त पर्यटनाद्वारे सरासरी पर्यटकांचा मुक्काम आणि उलाढाल वाढविणे.

ब) शाश्वत (Sustainable): नागरी /शहरी : शहरांत झोपडपट्टी-मुक्त, स्वच्छ, परवडणाऱ्या घरांसह आपत्ती-प्रतिरोधक, पूर्ण रोजगारयुक्त, सोप्या सार्वजनिक वाहतुकीची उपलब्धता आणि वाहतुकीचे जाळे असणारी रचना उभारणे. पाणी : संवर्धन आणि पुनर्वापराद्वारे सर्वांना सुरक्षित पाणी उपलब्ध करणे. ऊर्जा आणि शाश्वतता: राज्याच्या एक तृतीयांशपेक्षा जास्त भूभाग हरित आच्छादनाखाली आणून जागतिक स्तरावर स्पर्धात्मक किमंतीत विश्वासार्ह, हरित आणि स्वच्छ उर्जा उपलब्ध करून देणे. वाहतूक आणि लॉजिस्टिक्स: प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी विश्वसनीय, सुरक्षित आणि अखंड मल्टीमोडल (बहु-पद्धती) कनेक्टिव्हिटी निर्माण करणे.

क) सर्वसमावेशक (Inclusive) : शिक्षण आणि कौशल्य विकास: शिक्षण, नाविन्यपूर्णता आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देणारे असे सर्वसमावेशक, उद्योगांशी संबंधित शिक्षण आणि कौशल्य देणारे जागतिक दर्जाचे प्रतिभा केंद्र तयार करणे. समाज कल्याण: सामाजिक-आर्थिक समता आणि वंचित सामाजिक गटांसाठी समान संधी उपलब्ध करणे. आरोग्य: परवडणाऱ्या आणि दर्जेदार आरोग्यसेवेची सार्वत्रिक उपलब्ध करणे आणि अकाली मृत्युदर एक तृतीयांशाने कमी करणे. सॉफ्ट पॉवर: वारसास्थळे, संस्कृती, चित्रपट, भाषा आणि क्रीडा यांना जागतिक मान्यता मिळवणे.

ड) सुशासन (Good Governance) : प्रशासन: किमान शासन आणि कमाल प्रशासन पद्धती. सुरक्षा: राज्यातील प्रत्येक नागरिकासाठी सुरक्षा, सुरक्षितता आणि आपत्ती प्रतिरोधक परिस्थिती निर्माण करणे. तंत्रज्ञान: प्रभावी प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे. वित्त: विवेकी वित्तीय व्यवस्थापन आणि पर्यायी वित्तपुरवठा मॉडेलद्वारे शाश्वत वित्तीय मार्ग निश्चित करणे.

स्वातंत्र्याच्या १०० वर्षासाठी १०० उपक्रम

विकसित महाराष्ट्र- २०४७ अंतर्गत राज्याचे १०० उपक्रम, १५० पेक्षा जास्त मापदंड (Metrics) व ५०० पेक्षा जास्त टप्पे निश्चित केले आहेत. या व्हिजनच्या अंमलबजावणीसाठी गठीत करण्यात येणाऱ्या व्हिजन मॅनेजमेंट युनिट (व्हीएमयू) मधील अन्य सदस्यांची नियुक्ती मुख्यमंत्री करणार आहेत. या युनिटद्वारे, राज्यातील सर्व गुंतवणूक व विविध धोरणे, व्हिजनच्या ध्येयाशी सुसंगत असेल याची खात्री करण्यात येईल. तसेच दर तीन महिन्यांनी प्रगती आणि मेट्रिक्सचा आढावा घेण्यात येईल.

विभागांशी समन्वय साधून त्यांच्या अडचणी दूर करण्यात येतील. यासाठी संबंधित विभागांना सामाजिक- आर्थिक परिणामांसह तपशीलवार कार्ययोजना तयार कराव्या लागणार आहेत. तसेच व्हिजनमध्ये समाविष्ट metrics मध्ये data tracking करावे लागेल. त्याअनुषंगाने वित्तपुरवठा धोरण, चालू खर्चाची पुनर्रचना करावी लागणार आहे. यातून महसूल वाढीचे आणि पर्यायी भांडवलाचे स्त्रोत निश्चित करता येणार आहेत.

सोलापूर-तुळजापूर-धाराशिव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गाच्या सुधारित खर्चानुसार १ हजार ६४७ कोटी ८७ लाखांच्या अधिकचा निधी देणार

सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या नवीन रेल्वे ब्रॅाडगेज रेल्वे मार्ग प्रकल्पाकरिता ३ हजार २९५.७४ कोटी रुपयांच्या सुधारित अंदाजपत्रकास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

यानुसार या प्रकल्पाच्या खर्चाच्या ५० टक्के हिस्सा म्हणजेच १ हजार ६४७ कोटी ८७ लाख रुपयांचा अधिकचा निधी देण्यास मान्यता देण्यात आली. यामुळे साडे तीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या तुळजापूर शहर शक्तीपीठ रेल्वे मार्गाशी जोडले जाणार आहे. यामुळे विविध राज्यातून येणाऱ्या भाविकांची सोय होणार आहे.

राज्याच्या ग्रामीण भागातील रेल्वे प्रकल्पांना गती मिळावी यासाठी ५० टक्के आर्थिक सहभागाचे धोरण शासनाने स्वीकारले आहे. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथे तुळजा भवानी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. या भाविकांची सोय व्हावी यासाठी सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद हा रेल्वेमार्ग ब्रॉडगेज करण्यात येत आहे. यासाठी एकूण प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के म्हणजे ४५२.४६ कोटी रुपयांच्या आर्थिक सहभागास १० फेब्रुवारी २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे.

मात्र आता विविध कारणामुळे सदर प्रकल्पाच्या खर्चात वाढ झाल्यामुळे रेल्वे प्रशासनाने ३ हजार २९५ कोटी ७४ लाख रुपयांचे सुधारित अंदाजपत्रक सादर केले आहे. यामध्ये १ हजार ६४७ कोटी ८७ लाख रुपयांचा राज्य शासनाचा हिस्सा देण्याची विनंती केली आहे. त्यानुसार सुधारित अंदाजपत्रकास आणि राज्य शासनाच्या हिस्सा देण्यास मान्यता आली. ही रक्कम टप्प्याटप्प्याने केंद्र सरकारला उपलब्ध करुन देण्यात येईल.

राजशिष्टाचार उपविभागाचा विस्तार, तीन नवीन कार्यासने
गुंतवणूक, आंतरराष्ट्रीय संपर्क, परदेशस्थ नागरिकांसाठी सुविधा
सामान्य प्रशासन विभागातील राजशिष्टाचार उपविभागाचा विस्तार करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यानुसार राजशिष्टाचार विभागात परकीय थेट गुंतवणूक, परदेशस्थ नागरिकांचे विषय आणि आंतरराष्ट्रीय संपर्क अशी तीन नवीन कार्यासने निर्माण करण्यासही मान्यता देण्यात आली. यामुळे गुंतवणुकीस प्रोत्साहन आणि परदेशातील मराठी नागरिकांशी संपर्क वाढविणे शक्य होणार आहे.

परकीय गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी तसेच आंतरराष्ट्रीय व्यापार, रोजगार, सांस्कृतिक संबंध, परदेशातील मराठी नागरिकांचे संबंधांचे संवर्धन आणि आंतरराष्ट्रीय पर्यटन या घटकांची राज्यातील व्याप्ती वाढविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी राजशिष्टाचार विभागाचा मनुष्यबळासह विस्तार करणे आवश्यक होते. त्यानुसार सचिव व मुख्य राजशिष्टाचार अधिकारी या पदनामाऐवजी सचिव (राजशिष्टाचार, परकीय थेट गुंतवणूक, परदेशस्थ नागरिकांचे विषय आणि आंतरराष्ट्रीय संपर्क) असा पदनामात बदल करण्यास मान्यता देण्यात आली.

ही कामे पार पाडण्यासाठी परकीय थेट गुंतवणूक (FDI) परदेशस्थ नागरिकांचे विषय (Diaspora Affairs), आंतरराष्ट्रीय संपर्क (Outreach) असे तीन कार्यासने निर्माण करण्यात आली. यामुळे राजशिष्टाचार उपविभागात सध्याचे तीन आणि नवीन तीन अशी सहा कार्यासने कार्यरत असतील. नवीन तीन कार्यासनांसाठी नवीन २३ पदे निर्माण करण्यासही मान्यता देण्यात आली. यामुळे राजशिष्टाचार विभागात एकूण ६२ पदे कार्यरत असतील.

राजशिष्टाचार (परकीय थेट गुंतवणूक, परदेशस्थ नागरिकांचे विषय आणि आंतरराष्ट्रीय संपर्क) या विभागामार्फत पुढील विषय हाताळण्याचे प्रस्तावित आहे. राजशिष्टाचार, परकीय थेट गुंतवणूक, उच्चायुक्त संबंध, परकीय कर्जे/ निधी, वित्त आणि व्यापार, परदेशस्थ महाराष्ट्र नागरिकांची संबंध, सांस्कृतिक संबंध, विद्यापीठ/शैक्षणिक संस्थांशी सहकार्य, परदेशातील रोजगार संधी, पर्यटन प्रोत्साहन, नवीन तंत्रज्ञान सहकार्य आणि प्रसिध्दी इत्यादी.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत उमेदवारांना
जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिन्यांची मुदत मिळणार

राज्यातील महापालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरींसाठी तसेच ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्या सार्वत्रिक किंवा पोट निवडणुकीत राखीव जागांवर निवडून येणाऱ्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत मिळणार आहे. याबाबतच्या अधिनियमात सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

या निर्णयानुसार आता मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९, आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा करण्यात येईल. तसेच तत्पूर्वी त्याबाबतचा अध्यादेश काढण्यात येईल.

तर ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६९ मधील तरतूदीत सुधारणा करण्यात येईल. या अनुषंगानेही महाराष्ट्र जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदत देणे, अध्यादेश २०२५ काढण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. ही दोन्ही अध्यादेश राज्यपाल महोदयांच्या मान्यतेने काढण्यात येणार आहेत.

शिरपूर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयासह दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन करणार

धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

उच्च न्यायालयाच्या धोरणानुसार आवश्यक सर्व निकष पूर्ण होत असल्यामुळे शिरपूर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर यांची स्थापना करण्यास नवीन न्यायालय स्थापना समितीने मंजुरी दिली आहे. यानुसार दोन न्यायालये स्थापन करण्यास आज मंजुरी देण्यात आली.

जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयासाठी २० नियमित पदे मंजूर करण्यात आली आहेत. सहा पदांसाठी मनुष्यबळाच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्यात आली. सरकारी वकील (शासकीय अभियोक्ता) कार्यालयासाठी तीन नियमित पदे व दोन पदांसाठी मनुष्यबळाच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्यात आली. दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तरासाठी २० नियमित पदे आणि चार पदांसाठी मनुष्यबळाच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे मंजुरी देण्यात आली.

वाशिम जिल्ह्यातील सुविदे फाउंडेशनच्या जमीन भाडेपट्टयाच्या नुतनीकरणास मान्यता

वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील मौजे करडा येथील सुविदे फाउंडेशनला देण्यात आलेल्या शासकीय जमिनीच्या भाडेपट्ट्याच्या नुतनीकरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

सुविदे फाउंडेशन कृषि विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणारी ही संस्था असून ती ना नफा ना तोटा या तत्त्वावर चालविण्यात येते. या संस्थेला महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ आणि महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट) नियम १९७१ नुसार २१.८५ हेक्टर आर जमीन बाजारमूल्याच्या प्रचलित दराने वार्षिक भाडेपट्टा आकारुन देण्यास १९९४ मध्ये मंजुरी देण्यात आली होती.

मात्र ही संस्था शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणारी असल्यामुळे सध्या आकारण्यात येणारा भाडेपट्टा कमी करण्यात यावा, अशी विनंती शासनाकडे करण्यात आली होती. त्यानुसार सन २०२२ ते २४ या कालावधीतील थकीत भाडेपट्टयाची रक्कम आणि त्यावरील दंडव्याजाची रक्कम भरून घेऊन, या फाउंडेशनला ही जमीन नाममात्र एक रुपया या दराने ३० वर्षांकरिता अटी व शर्तींच्या अधीन राहून देण्यास मान्यता देण्यात आली.

The post राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे ७ निर्णय… appeared first on India Darpan Live.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे ७ निर्णय...

असा असेल तुमचा बुधवारचा दिवस… जाणून घ्या, २९ ऑक्टोबरचे रशिभविष्य… असा असेल तुमचा बुधवारचा दिवस… जाणून घ्या, २९ ऑक्टोबरचे...
28/10/2025

असा असेल तुमचा बुधवारचा दिवस… जाणून घ्या, २९ ऑक्टोबरचे रशिभविष्य…

असा असेल तुमचा बुधवारचा दिवस…
जाणून घ्या, २९ ऑक्टोबरचे रशिभविष्य…

मेष – सावध भूमिका घ्यावी
ऋषभ – आपले कर्तुत्व सिद्ध करावे लागेल

मिथुन – हितशत्रूंमध्ये वाढ होण्याची शक्यता. सावध पवित्रा ठेवा
कर्क – कोणत्याही गोष्टीमुळे विचलित होऊ नका

ज्योतिष शास्त्री प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक

सिंह – आपल्या प्रकृतीमध्ये अनारोग्य जाणवेल
कन्या – आपली वाचनाची आवड वाढवा. ज्ञान कमवा

तूळ – आपल्यावर मानहानीचे प्रसंग येऊ शकतात. सावध रहा
वृश्चिक – कोणतेही कार्य करण्याअगोदर नियोजन आवश्यक असते, हे लक्षात ठेवा

धनु – विनाकारण बडबड करू नका. आवश्यक तेथेच बोला
मकर – मन शांत ठेवून आपल्या मनातील संभ्रम दूर ठेवा

कुंभ – आपले आर्थिक बजेट कोलमडू नका
मीन – आजचा दिवस थोडा त्रासदायक. नुकसान संभवण्याची शक्यता

आजचा राहू काळ
बारा ते दीड असा आहे
सकाळी नऊ पर्यंत चांगला दिवस

The post असा असेल तुमचा बुधवारचा दिवस… जाणून घ्या, २९ ऑक्टोबरचे रशिभविष्य… appeared first on India Darpan Live.

असा असेल तुमचा बुधवारचा दिवस... जाणून घ्या, २९ ऑक्टोबरचे रशिभविष्य...

रिल बनवला…अपलोड केला… नाशकच्या तरुणाबाबत पुढं एवढं सगळं घडलं… नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सोशल मिडीयावर रिल अपलोड क...
27/10/2025

रिल बनवला…अपलोड केला… नाशकच्या तरुणाबाबत पुढं एवढं सगळं घडलं…

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सोशल मिडीयावर रिल अपलोड करणे एका तरूणास चांगलेच महागात पडले. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला वदवून घेणाºया पोलीसांनी इन्स्टाग्राम वरिल सदर रिल हुडकून काढली असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात दहशत निर्माण केल्याप्रकरणी संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहन नवनाथ पवार (रा.रोकडोबावाडी, देवळाली गाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित रिल बहाद्दराचे नाव आहे. याबाबत अंमलदार गवळी यांनी फिर्याद दिली आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी पोलीसांकडून कारवाईचा धडका सुरू आहे.

सोशल मिडीयावर लक्ष केंद्रीत करीत पोलीसांकडून रिल बहाद्दरांचाही चांगलाच समाचार घेतला जात आहे. भयमुक्त नाशिक या घोषवाक्यास अनुसरून दहशत निर्माण करणाºयाना चाप लावला जात आहे.

याच पार्श्वभूमिवर सायबर शाखेसह पोलीस ठाणे निहाय यंत्रणा कामाला लागली आहे. सोशल मिडीयावरील आक्षेपार्ह आणि दहशत रिल तपासल्या जात आहे. रविवारी (दि.२६) सोशल मिडीयावर व्हायरल झालेली एक रिल पोलीसांच्या नजरेत बसली. संशयिताने समाजात किती दहशत आहे. यासाठी मुले सोबत ठेवून दहशत निर्माण केल्याचा तसेच शांता व सुव्यवस्थेचा भंग केल्याचा आरोप केला आहे.

इन्स्टाग्राम या सोशल साईडवर संशयिताने ओ निर्दोस था फिर भी उसने सजा काटी… मै गुन्हेगार हू फिरभी आझाद घुम रहा हू … अरे एक्झाममे मै कॉपी करनेसे डरता था आज मुझसे जमाना डरता है अशी रिल अपलोड केल्याचे आढळून आले आहे. या घटनेची पोलीसांनी तात्काळ दखल घेत अंमलदार गवळी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला असून अधिक तपास हवालदार लखन करीत आहेत.

सोलर सिस्टीम बसविण्याची ग्वाही देत लाखोंना गंडा

सोलर सिस्टीम बसविण्याची ग्वाही देत एका सोलर विक्रेत्याने डॉक्टरसह अन्य एकास दोन लाख रूपयांना गंडा घातला. दीड वर्षाहून अधिक काळ होवूनही सिस्टीम युनिट अद्यावत करून न दिल्याने तक्रारदाराने पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात फसवणुकीची गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार साहिल सोलर टेक्नॉलॉजीचे संचालक साहिल मनोज शिंदे (रा.स्वामीनगर ग्राऊंडजवळ मखमलाबादरोड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित सोलर विक्री करणाºया व्यावसायीकाचे नाव आहे.

याबाबत डॉ. सागर सुधाकर नरोडे (रा.श्री तिरूमला आकार अपा.नयनतारा सिटी २ सदगुरूनगर) यांनी फिर्याद दिली आहे. डॉ. नरोडे यांना आपल्या राहत्या सदनिकेसाठी सोलर सिस्टीम बसवायची होती. त्यामुळे त्यांनी मार्च २०२४ मध्ये संशयिताची भेट घेतली होती.

संशयिताने इमारतीची पाहणी केली असता या ठिकाणी सोसायटीतील चंद्रदिप रघुवंशी यांनीही त्यांच्या सदनिकेसाठी सोलर सिस्टीम बसविण्याची तयारी दर्शविली. यावेळी दोन्ही फ्लॅटसाठी सोलर सिस्टीम युनिट अद्यावत करण्यासाठी व्यवहार होवून दोन लाख ५ हजार रूपयांचे टोकन देण्यात आले.

मात्र संशयिताने दीड पावणे दोन वर्षांचा कालावधी उलटूनही सोलर सिस्टीम अद्यावत करून दिली नाही. त्यामुळे डॉ.नरोडे आणि रघुवंशी यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक किरण रोंदळे करीत आहेत.

बंटी बबलीचा कारनामा

बलात्काराच्या गुह्यात अडकविण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी देत भाडेकरूंनी घरमालकाकडे दहा लाख रूपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. भेदरलेल्या वृध्द घरमालकाने पोलीसात धाव घेतल्याने हा प्रकार समोर आला असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात बंटी बबली विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिबु अन्थोनी जोसेफ व प्रियंका अतुल सोनवणे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत अशोक केशवराव ढुबे (६३ रा. दोनवाडे पो.विंचूर दळवी ता.जि.नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे.

शेती व्यवसाय करणाºया ढुबे यांचा उपनगर परिसरातील संघमित्रा सोसायटीतील दत्तप्रसाद इमारतीत सदनिका आहे. ही सदनिका संशयित बंटी बबलीस भाडेतत्वावर देण्यात आली होती. करार संपल्याने ढुबे यांनी संशयितांना घर खाली करण्याबाबत सांगितल्याने हा प्रकार घडला.

वेळोवेळी सांगूनही संशयित घर खाली करून देत नसल्याने गेल्या २३ आॅगष्ट रोजी ढुबे यांनी संशयिताची भेट घेतली असता शिबू जोसेफ यांना फ्लॅट बळकविण्याच्या इराद्याने फ्लॅट खाली करून पाहिजे असल्यास दहा लाख रूपयांची खंडणी मागितली.

यावेळी संशयिताने महिलेवर बलात्कार केल्याच्या खोट्या गुह्यात अडकवून जेलमध्ये सडवेल तसेच तिच्या पंटरकडून तुझा गेम करून टाकू अशी धमकी दिल्याने ढुबे यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.

नाशिक शहरात दोघांची आत्महत्या

नाशिक शहर परिसरात आत्महत्येचे सत्र सुरूच असून वेगवेगळ््या भागात राहणाºया दोघांनी रविवारी (दि.२६) गळफास लावून घेत आपले जीवन संपविले. दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत अंबड व नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.

अंबड येथील रविंद्र भिमराव बर्डे (३४ रा.मारूती संकुल, दत्तनगर) या युवकाने रविवारी दुपारच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील पंख्यास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच स्थानिकांनी त्यास तात्काळ बेशुध्द अवस्थेत जिल्हारूग्णालयात दाखल केले.

मात्र वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार झोले करीत आहेत.

दुसरा प्रकार पळसे ता.जि.नाशिक येथे घडला. आप्पा सिताराम सस्ते (५६ रा.कृष्ण मंदिराजवळ, फुलेनगर) यांनी रविवारी अज्ञात कारणातून दारूच्या नशेत आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्यास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता.

मुलगा मयुर सस्ते यांने त्यांना तातडीने बिटको रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत.

The post रिल बनवला…अपलोड केला… नाशकच्या तरुणाबाबत पुढं एवढं सगळं घडलं… appeared first on India Darpan Live.

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - सोशल मिडीयावर रिल अपलोड करणे एका तरूणास चांगलेच महागात पडले. नाशिक जिल्हा कायद्या...

राज्यात प्रथमच लाभार्थी ट्रॅकिंग व घरपोहोच मंजुरी आदेश सेवा… या सरकारी योजनेला नवे डिजिटल रूप… नावीन्यपूर्ण उपक्रमाची रा...
27/10/2025

राज्यात प्रथमच लाभार्थी ट्रॅकिंग व घरपोहोच मंजुरी आदेश सेवा… या सरकारी योजनेला नवे डिजिटल रूप… नावीन्यपूर्ण उपक्रमाची राज्यभर चर्चा…

राज्यात प्रथमच लाभार्थी ट्रॅकिंग व घरपोहोच मंजुरी आदेश सेवा…
या सरकारी योजनेला नवे डिजिटल रूप…
नावीन्यपूर्ण उपक्रमाची राज्यभर चर्चा…

अहिल्यानगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कर्जत तहसील कार्यालयाने विकसित केलेल्या ‘निराधार मित्र’ या मोबाईल ॲपच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना अर्जस्थिती तपासण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. तसेच लाभार्थ्यांना मंजूर आदेश थेट घरपोहोच मिळणार आहेत. त्यामुळे ही सेवा “राज्यातील प्रथम लाभार्थी ट्रॅकिंग व घरपोहोच आदेश सेवा” म्हणून राज्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे.

संजय गांधी निराधार सामाजिक अर्थसाहाय्य योजना ही निराधार व गरजू नागरिकांसाठी जीवनदायी ठरलेली योजना असली तरी अर्ज प्रक्रिया व मंजुरी संदर्भात पूर्वी अनेक अडचणी येत होत्या. अर्ज भरल्यानंतर त्याची स्थिती तपासण्याची सुविधा नसल्याने लाभार्थ्यांना वारंवार कार्यालयात जावे लागत असे. मंजुरी आदेश वेळेवर न मिळाल्याने आर्थिक अडचणी वाढत होत्या.

ही अडचण लक्षात घेऊन तहसीलदार गुरु बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जतचे नायब तहसीलदार डॉ. मोहसिन शेख यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून ‘निराधार मित्र’ हे मोबाईल ॲप विकसित केले आहे.

सेवेची वैशिष्ट्ये

आधार क्रमांकाच्या शेवटच्या ५ अंकांद्वारे अर्जस्थिती तपासता येते.
अर्ज क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक वापरूनही तपासणी शक्य.
अर्ज मंजूर झाल्यास आदेश प्रत मोबाईलवर पाहता व डाउनलोड करता येते.
अर्ज नामंजूर झाल्यास कारण व त्रुटी स्पष्ट दिसतात.
वर्ष व महिन्यानुसार संपूर्ण गावाची मंजूर यादी पाहता येते.
गावातील स्वयंसेवक “निराधार मित्र” लाभार्थ्यांना अर्ज तपासून देतात.

ही सेवा ग्रामीण भागातील लाभार्थ्यांसाठी वेळ व पैसा वाचवणारी तसेच पारदर्शक प्रशासनाची नवी पायरी ठरणार आहे.

स्वयंसेवकांची भूमिका

ग्राम महसूल अधिकारी, पंचायत अधिकारी, महसूल सेवक व इच्छूक स्वयंसेवक तरुणांना ॲपबाबत प्रशिक्षण देऊन संबंधित गावासाठी “निराधार मित्र” म्हणून नेमण्यात येणार आहे. हे स्वयंसेवक अर्ज तपासणे, आदेश मिळवून देणे व त्रुटी समजावून सांगणे अशी सेवा लाभार्थ्यांपर्यंत विनामूल्य पोहोचवतील.

जे अर्जदार वृद्ध व निराधार आहेत, त्यांना चौकशी व मंजुरी आदेश मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयात वारंवार जावे लागणार नाही. तसेच पूर्वीप्रमाणे ग्राम महसूल अधिकारी पात्र लाभार्थ्यांचे मंजुरी आदेश घरपोहोच करतील. या पद्धतीत सुधारणा करून मंजुरी आदेश लवकर मिळावेत, यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.

तहसीलदार गुरु बिराजदार म्हणाले, “या ॲपची निर्मिती करणारे नायब तहसीलदार डॉ. मोहसिन शेख व त्यांच्या शाखेतील सर्व अधिकारी – कर्मचारी अभिनंदनास पात्र आहेत. ही सेवा कर्जत तालुक्यातील अधिकाधिक गावांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून, लाभार्थ्यांच्या अभिप्रायानुसार ॲपमध्ये आवश्यक सुधारणा सातत्याने केली जाणार आहेत.”

डॉ. मोहसिन शेख म्हणाले, “ही सेवा केवळ कर्जतपुरती मर्यादित न राहता राज्यासाठी आदर्श ठरेल. डिजिटल सेवा प्रत्येक गावात पोहोचवून लाभार्थ्यांचा वेळ आणि श्रम वाचवणे हे आमचे उद्दिष्ट आहे.

ही योजना साकारताना तहसीलदार गुरु बिराजदार यांचे मार्गदर्शन लाभले. सहायक महसूल अधिकारी शिवाजी बरबडे, पल्लवी नांगरे, महसूल सहायक रावसाहेब लांडगे, संगणक सहायक विनायक सुरवसे आणि मंडळ अधिकारी कुळधरण धुळाजी केसकर यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.

लाभार्थ्यांचा प्रतिसाद – समाधान आणि दिलासा

चाचणी टप्प्यातील लाभार्थ्यांनी सांगितले –

“आता अर्ज तपासणे आणि आदेश मिळवणे सोपे झाले आहे.”
“कार्यालयात जाण्याची गरज कमी झाली.”
“त्रुटी समजल्याने अर्ज सुधारता येतो.”

ही सेवा लाभार्थ्यांसाठी मोठा दिलासा ठरली असून, प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.

या योजनेच्या यशामुळे राज्यभर सामाजिक अर्थसाहाय्य योजनांमध्ये डिजिटल प्रशासनाचा नवा मानदंड निर्माण होईल.

The post राज्यात प्रथमच लाभार्थी ट्रॅकिंग व घरपोहोच मंजुरी आदेश सेवा… या सरकारी योजनेला नवे डिजिटल रूप… नावीन्यपूर्ण उपक्रमाची राज्यभर चर्चा… appeared first on India Darpan Live.

राज्यात प्रथमच लाभार्थी ट्रॅकिंग व घरपोहोच मंजुरी आदेश सेवा... या सरकारी योजनेला नवे डिजिटल रूप... नावीन्यपूर्ण उप.....

नाशकात रणजी सामन्याचा थरार… बीसीसीआयचे तज्ज्ञ दाखल… या संघांमध्ये रंगणार सामना… नाशकात रणजी सामन्याचा थरार… बीसीसीआयचे त...
27/10/2025

नाशकात रणजी सामन्याचा थरार… बीसीसीआयचे तज्ज्ञ दाखल… या संघांमध्ये रंगणार सामना…

नाशकात रणजी सामन्याचा थरार…
बीसीसीआयचे तज्ज्ञ दाखल…
या संघांमध्ये रंगणार सामना…

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय – तर्फे महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र हा चार दिवसीय रणजी ट्रॉफी सामना हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब, नाशिक येथे होत आहे. नाशिकमध्ये येत्या १ ते ४ नोव्हेंबर् २०२५ दरम्यान होणाऱ्या या सामन्यासाठी बीसीसीआयचे खेळपट्टी तज्ञ – क्यूरेटर – टी मोहनन यांनी भेट दिली.

रणजी सामन्यासाठी उत्कृष्ट खेळपट्टी तयार ठेवण्याच्या दृष्टीने सूचना केल्या व एकंदर तयारी बद्दल समाधान व्यक्त केले. त्यांच्या समवेत खेळपट्टीला अंतिम स्वरूप देण्यासाठी नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे शेखर घोष व पुण्याहून या सामन्यासाठी खास आलेले महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे निलेश गायकवाड व इतर एन डी सी ए चे ग्राउंडसमन देखील आहेत.

नाशिक मध्ये १ ते ४ नोव्हेंबर् २०२५ दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय – तर्फे महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र हा चार दिवसीय रणजी ट्रॉफी सामना हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब नाशिक येथे होत आहे.

मनपा आयुक्तांकडून पाहणी

या निमित्ताने नाशिक म न पा आयुक्त व नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षा मनिषा खत्री यांनी मैदानास खास प्रत्यक्ष भेट देऊन या सामन्याच्या तयारीचा आढावा घेतला. या प्रसंगी माननीय आयुक्तांनी सामन्याची खेळपट्टी, पॅव्हेलियन हॉल, दोन्ही संघांच्या ड्रेसिंग रूम्स व मैदानातील इतर सोयी सुविधांची पाहणी करून समाधान व्यक्त केले आणि रणजी ट्रॉफी सामन्यासाठी नाशिक म न पा चे संपूर्ण सहकार्य मिळेल याची ग्वाही दिली.

याप्रसंगी त्यांनी बीसीसीआयचे खेळपट्टी तज्ञ – क्यूरेटर – टी मोहनन यांची देखील विचारपूस केली.

याप्रसंगी आयुक्तांसमवेत नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन धनपाल ( विनोद ) शहा, सेक्रेटरी समीर रकटे , खजिनदार हेमंत देशपांडे, संघटनेचे कार्यकारिणी सदस्य व इतर पदाधिकारी डॉ अनिरुद्ध भांडारकर, हेतल पटेल, प्रवीण घुले, राजू आहेर, फय्याज गंजीफ्रॉक वाला ,शेखर घोष, रतन कुयटे , निखिल टिपरी आदि उपस्थित होते.

The post नाशकात रणजी सामन्याचा थरार… बीसीसीआयचे तज्ज्ञ दाखल… या संघांमध्ये रंगणार सामना… appeared first on India Darpan Live.

नाशकात रणजी सामन्याचा थरार... बीसीसीआयचे तज्ज्ञ दाखल... या संघांमध्ये रंगणार सामना...

सावधान… चक्रीवादळ येणार… पुढील काही दिवसांसाठी असा आहे हवामानाचा अंदाज… सावधान… चक्रीवादळ येणार… पुढील काही दिवसांसाठी अ...
27/10/2025

सावधान… चक्रीवादळ येणार… पुढील काही दिवसांसाठी असा आहे हवामानाचा अंदाज…

सावधान… चक्रीवादळ येणार… पुढील काही दिवसांसाठी असा आहे हवामानाचा अंदाज…

माणिकराव खुळे, हवामानतज्ज्ञ

बंगालच्या उसागरातील अति तीव्र कमी दाब क्षेत्राचे काल रात्री चक्री वादळात रूपांतर झाले असुन सध्या ते काकीनाडा शहरापासून ५३० किमी. अंतरावर आहे. एम. जे. ओ. च्या त्याचे ‘ मोंथा ‘ असे नामकरण झाले. ‘ मोंथा ‘ चा ‘थाई’ भाषेतील अर्थ म्हणजे ‘ सुवासिक फुल ‘ होय.

उद्या मंगळवार दि. २८ ऑक्टोबर ला रात्री ‘ मोंथा ‘ चक्रीवादळाचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर होवून आंध्रप्रदेशातील ‘काकीनाडा’ शहराजवळील किनारपट्टी वरून भू-भागावर आदळण्याची शक्यता जाणवते. तेथून पुढे उत्तर दिशेने ते प्रथम ओरिसा व नंतर छत्तीसगड कडे सरकेल.

सध्या बं. उपसागराच्या पूर्वेकडे वि्षुववृत्तीय परीक्षेत्रात म्हणजे फेज ४ व ५ मध्ये मॅडन ज्युलियन ऑसिलेशनच्या साखळीची आम्प्लिट्युड २ च्या दरम्यान आहे. ह्या दोलणामुळे ‘ मोंथा ‘वादळाला वाढीव ऊर्जा मिळत असल्यामुळे तत्याच्या तीव्रतेत वाढ होत आहे.

जेंव्हा ‘मोंथा’ छत्तीसगड मध्ये प्रवेशित होईल तेंव्हा संपूर्ण विदर्भात उद्या पासून तीन दिवस म्हणजे गुरुवार दि. ३० ऑक्टोबर पर्यन्त जोरदार पावसाची शक्यता जाणवते. त्याच्या परिणामातून मराठवाड्यातही त्या तीन दिवसात तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता जाणवते.

त्यातही विशेषतः विदर्भातील गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ जिल्ह्यात अति जोरदार पावसाची शक्यता जाणवते.

अरबी समुद्रातील तीव्र कमी दाबाचे क्षेत्र मुंबईच्या नैऋत्येकडे ६६० किमी. अंतरावर असुन त्याची वाटचाल ईशान्य दिशेकडे होत आहे. त्याच्या परिणामातून आजपासुन पुढील तीन दिवस म्हणजे बुधवार दि. २९ ऑक्टोबर पर्यन्त मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगांव नाशिक छ. सं. नगर अहिल्यानगर पुणे सातारा कोल्हापूर व कोकणातील मुंबईसह ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तीन दिवस मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते.

बुधवार दि. ५ नोव्हेंबर पासुन महाराष्ट्रात वातावरण निवळण्याची शक्यता असुन त्यापुढे हळूहळू थंडीची चाहूल घेऊ या!

अनेक जिल्ह्यांना २७ ते २९ ऑक्टोंबर दरम्यान ‘यलो अलर्ट’; नागरिकांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार दिनांक २७ ते २९ ऑक्टोंबर २०२५ या कालावधीत अनेक जिल्ह्यात वीजांचा कडकडाट, जोरदार वारे व हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ‘यलो अलर्ट’जारी करून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

नद्यांच्या विसर्गात वाढ; पूरस्थितीचा धोका
पुणे, नाशिक, अहिल्यानगर,बीड, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार स्वरुपाचे पर्जन्यमान झाल्यास जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांवरील धरणातून सोडलेल्या विसर्गामुळे पाणी पातळीत वाढ होऊ शकते. त्यापार्श्वभूमीवर नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.

सध्या भिमा नदीवर दौंड पूल येथे ४,२३४ क्युसेक, गोदावरी नदीवरील नांदूर मध्यमेश्वर धरणातून ३,१५५ क्युसेक, जायकवाडी धरणातून ९,४३२ क्युसेक, प्रवरा नदीवरील भंडारदरा धारणातून ८२० क्सूसेक, निळवंडे धरणातून ३५० क्यूसेक, मुळा धरणातून ५०० क्युसेक, घोड धरणातून ३०० क्युसेक, विसापूर धरणातून ३४२ क्यूसेक, सीना धरणातून १,०३० क्युसेक, येडगाव धरणातून विसापूर ७५० क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे.

प्रशासनाकडून नागरिकांना सूचना
मेघगर्जनेच्या वेळी, विजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.

गडगडाटीच्या वादळादरम्यान व विजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये, वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा, ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल / सायकल यांचेपासून दूर रहावे.

मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत / दिव्यांचे खांब, धातूचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉन्सफॉर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणाऱ्या / लोंबणाऱ्या केबल्स् पासून दूर रहावे.

जाहिरात फलक (होर्डिंग्ज) कोसळून होणाऱ्या दूर्घटना टाळण्यासाठी दक्षतेची बाब म्हणून जाहिरात फलकांच्या (होर्डिंग्ज) आजूबाजूला थांबू नये व योग्य ती दक्षता घ्यावी,

विजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे, जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा.

धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणा-या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, धरणाचे पाण्यात वा नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरू नये, धोकादायक ठिकाणी सेल्फी (Selfie) काढू नये.

नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रापासुन तसेच ओढे व नाले यापासून दूर रहावे व सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे. नदी, ओढे-नाल्यांवरील पुल व बंधा-यांवरुन पाणी वाहत असल्यास पुल/बंधारे ओलांडू नये.

नागरिकांनी स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे. आपत्कालीन परिस्थिती उद्भवण्यापूर्वीच सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे.

जुनाट/मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये.

अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांनी दक्षता घ्यावी व वेळीच सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे. घाट रस्त्याने प्रवास करणे शक्यतो टाळावे.

जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे

जिल्हा नियंत्रण कक्षाच्या टोल-फ्री क्रमांक १०७७ वर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

The post सावधान… चक्रीवादळ येणार… पुढील काही दिवसांसाठी असा आहे हवामानाचा अंदाज… appeared first on India Darpan Live.

सावधान... चक्रीवादळ येणार... पुढील काही दिवसांसाठी असा आहे हवामानाचा अंदाज...

Address

Nashik/pune Road
Nashik
422011

Alerts

Be the first to know and let us send you an email when India Darpan Live posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share