Mr Sachin Bade

Mr Sachin Bade श्री स्वामी समर्थ
(1)

अनोखा रिश्ता  असं म्हणतात की लग्न ही एक ॲडजस्टमेंट असते. पैश्यांपासून भावनांपर्यंत सर्व गोष्टीत व्यक्त किंवा मूक तडजोड अ...
11/07/2025

अनोखा रिश्ता

असं म्हणतात की लग्न ही एक ॲडजस्टमेंट असते. पैश्यांपासून भावनांपर्यंत सर्व गोष्टीत व्यक्त किंवा मूक तडजोड असते.
पण तिचं आणि त्याचं लग्न ही ॲडजस्टमेंट, व्यावहार, अलिखित करार सर्व काही होतं.
तो एका अपघातामुळे अपूर्ण होता. त्याची मर्यादा तिची शरीराची तहान भागवू शकत नव्हती हे त्याला माहीत होतं.
शिवाय तिचा एक्स बॉयफ्रेंड होता.
काही गोष्टी समाजात आणि घरी माणूस स्पष्टपणे व्यक्त करू शकत नाही आणि तडजोड स्वीकारतो.
त्याला आणि घरच्यांना त्याच्या कमतरतेची जाणीव होती. तरीही सततचा “लग्न कर” ह्या दबाव असायचा.
तो घरच्यांच्या ह्या दबावाला बळी पडला.
आणि ती
मनात असून सुद्धा एक्स बरोबर लग्न करण्यास घरच्यांचा विरोध आणि त्यांच्या निर्णयामुळे ती जाऊ शकत नव्हती. पण ती त्या एक्सला सोडूही शकत नव्हती. ती एक्स साठी पॅशनेट होती

एक अपूर्ण आणि एक निरिच्छ
अनेक दबाव, आणाभाका आणि धमक्या ह्याच्या समोर मान तुकवून एकत्र आले.
त्याने तिच्याबरोबर डिस्कस करून एक निर्णय घेतला.
“आज पासून आपलं लग्न हे एक ओपन मॅरेज असेल…” तो म्हणाला.
तिने देखील मान्य केलं.
“अट… तो कोण आहे ते मला कळलं पाहिजे आणि माझ्या बरोबर असताना ती वृत्तीने व्हर्जिन असली पाहिजे”

भारतीय समाजात ओपन मॅरेज ही कल्पना फारशी माहितीही नाही. मग ती लोकांनी स्विकारणे हा खूप लांबचा प्रश्न होता.
त्याच्या ह्या खूप वेगळ्या आणि अनोख्या जेस्चरमुळे ती खूप इम्प्रेस झाली. तिने आत्तापर्यंत एव्हढा लिबरल माणूस कुणीच बघितला नव्हता.
त्याने विचार केला होता
“जी गोष्ट माझ्याकडे नाही, जी गोष्ट मला काही कारणाने मिळत नाही आणि मी देऊ शकत नाही, ती गोष्ट तिला का मिळू नये? तिने का विन्मुख राहायचं? तिला सुखी असायचा पूर्ण अधिकार आहे. माझ्या मर्यादांच्या जात्यात ती का भरडली जावी?”
त्याचे हे विचार ऐकून ती खूप सुखावली.
तिने त्याला एक्स बद्दल सगळं सांगितलं.
तो तिच्या सर्व सुख दुःखांची काळजी घ्यायचा. आणि ती देखील मानसिक आणि भावनिक दृष्ट्या त्याच्यात खूप गुंतली होती. एक शारीरिक सोडले तर दोघेजण एकमेकांना भरपूर प्रेम देत होते.

काही महिने आणि मागून वर्षे अशीच गेली. त्याची अपेक्षा फार मोठी नव्हती. त्याला मानसिक आणि भावनिक सुख हवे होते आणि ती देत होती. तिला बाकीचे सुख एक्स देत होता. एका समोर दुसर्‍याचा विषय कधीच निघत नव्हता. दोघांनाही जे हवं होतं ते मिळत होतं. त्यामुळे सगळेच सुखी होते.
किमान दाखवत तरी होते

एके दिवशी सकाळी तीच्या डोक्यात एक्सचं आदल्या दिवशीचं बोलणं घुमत होतं
"उद्या सकाळी दहा वाजता तू आणि मी आउटिंगला जाऊ. चार वाचेपर्यंत परत येऊ"
ती त्याच तंद्रीत आवरत होती.
निघताना तो तिला म्हणाला
"आज घरीच थांबशील? आय ॲम फिलिंग लोनली"
"ओह! नो रे! आज मला जायलाच हवं. परत आले की सगळा वेळ फक्त तुझा असेल" असे सांगून ती निघाली
"इट्स ओके. नो प्रॉब्लेम" तो म्हणाला
तिने निघताना त्याच्याकडे पाहिलं तर त्याच्या चेहर्‍यावर स्मितहास्य होतं. तिला त्यात एक उदासीनता जाणवली. त्यात असहाय्यता आणि अगतिकतेचं वैषम्य होतं. तिला प्रथमच हृदयात चर्र झालं.

काही दिवसांनी ती त्याला म्हणाली
"इतका शांत आणि संयमी कसा तू? तुला राग नाही येत? तुला त्रास नाही होत?"
"कशाचा आणि कुणाचा?" त्याने विचारलं
"माझा आणि एक्सचा" ती उत्तरली
तो दोन मिनिटं खिडकीबाहेर बघत शांत बसला आणि एकदम म्हणाला
"नाही! कारण प्रेत जाळले म्हणुन अग्नी अपवित्र होत नाही. अग्नि यज्ञात सुद्धा वापरतात. तसंच प्रेमाचं सुद्धा आहे. प्रेम ही भावना आहे. ती कुठल्यातरी एका कारणाने अपवित्र होत नसते. भावनिक आणि मानसिक पातळीवरचं प्रेम मोठं की शारीरिक प्रेम मोठं हा ज्याच्या त्याच्या दृष्टिकोन आहे"
त्याच्या उत्तराने रात्रभर ती अस्वस्थ होती.
दुसर्‍या दिवशी तिने एक्सला मेसेज केला
“मी पुढचे काही दिवस भेटणार नाही”

चार दिवसांनी तिला एक्सचा कॉल आला
"मला तुला आज कुठल्याही परिस्थितीत भेटायचं आहे"
"मी नाही येणार" ती उत्तरली
"का?" तिच्या नकाराने एक्स जरा चिडला होता.
"मी तुला कारण सांगायला बांधील नाही. आजपर्यंत ह्याने सुद्धा असं कधी संशयाने आणि रागाने विचारलं नाही. सो यू बेटर बी इन युवर लिमिट" तिच्या आवाजात डिटरमिनेशन होतं.
"यू स्टूपिड स्लट" एक्स खूपच चिडला कारण बहुतेक तो नकार पचवू शकला नाही "अ‍ॅण्ड डोन्ट टॉक अबाउट दॅट लेम इडियट ह्युमन. तू मला आणि त्या इनकॉम्पीटंट माणसाला कंपेअर कशी करतेस? तो तुला काही देऊ शकत नाही. तुझं त्याच्याबरोबर झालेलं लग्न हे फक्त सोसायटीला दाखवायला आहे. तुला खरा आनंद फक्त मी देतोय"
त्याचे हे बोलणे ऐकून ती खूप संतापली
"माइंड युवर टंग. अणि ह्यापुढे मला कधीच भेटू नकोस" असे बोलून तिने फोन कट केला.
तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. तिच्या मनात विचारांचं काहूर माजलं.
“इतके वर्ष मी एक्स बरोबर आहे. त्याला मी नेहमीच प्रत्येक गोष्टीला हो म्हंटले. प्रसंगी काही ठिकाणी दुर्लक्ष केलं. आणि त्याच्या बदल्यात आज त्याने मला वेश्या म्हणावं? आणि दुसर्‍या बाजूला हा. कायम माझं मन सांभाळलं. कायम माझ्या पाठीशी राहिला. आणि मी? का मी माझी किंमत एका बाजारू स्त्री सारखी करून घेतली? रादर त्या स्वाभिमानी तरी असतात आणि आज एक्सने… शीट”

तिला स्वतःचा राग आला. आपलीच घृणा वाटायला लागली. तिचे मन अपराधीपणाच्या झोक्यावर वेगाने आंदोलने घेवू लागलं.
त्याच अवस्थेत ती बाथरूम मधे गेली. अंगावरचे सगळे कपडे काढून शॉवर सोडला आणि अर्धा तास शॉवर खाली उभी राहिली. सगळ्या स्पर्शखुणा आणि आठवणी तिला धुवून टाकायच्या होत्या.
गार पाण्याने संतापाचा दाह कमी झाल्यावर ती बाहेर आली.
बाहेर येवून तिने भरजरी साडी, त्याला आवडतो तसा केसांचा हलका अंबाडा, खूप हलका मेक अप आणि लग्नानंतर प्रथमच ठसठशीत कुंकू लावलं.
आरशात स्वतःला पाहताना तिचं तिलाच लाजायला झालं.
ती त्याच्या समोर जाऊन उभी राहिली.
"आज काही विशेष आहे का?" त्याने आश्चर्याने विचारलं
"मी इतके दिवस एका नशेत वागत होते. आज माझी ती नशा उतरली" ती उत्तरली
"म्हणजे?” त्याला कळलंच नाही
"काही नाही. एक विनंती करू?"
"बोल ना"
"प्लीज गिव्ह मी अ बिग हग" तिच्या स्वरात आज खूप आर्तता होती

त्याने तिला जवळ घेतले आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवले. ती त्याला घट्ट बिलगली होती.
"आय ॲम सॉरी… आय ॲम रिअली व्हेरी सॉरी…" एव्हढंच त्याला ऐकू येत होतं.

** अंततः हमे केवल उन्हें चुनना है जिनकी कहानी के मुख्य पात्र हम हों **

✍️ विक्रम इंगळे
२८ जून २०२५
#विक्रम_इंगळे

(भारतीय समाजामध्ये ओपन मॅरेज ही कन्सेप्ट नाहीये. खूप जणांनी ती ऐकली नसेल आणि खूप जणांना ती ऐकल्यावर पचणारही नाही.
ओपन मॅरेज ही एक पश्चिमात्य कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये दोन लोक जे भावनिक दृष्ट्या एकमेकात खूप गुंतलेले असतात, ते एकत्र राहतात पण, त्यांचे सेक्शुअल पार्टनर्स वेगवेगळे असतात. आपल्यासारखी पवित्र अशी विवाह संस्था त्यांच्याकडे नाही. त्यामुळे अशा गोष्टी चालतात. प्रश्न हा आहे की मी का लिहिलं ह्याच्यावर?
तर कोणे एकेकाळी लिव्ह-इन रिलेशनशिप, लग्न केलं तरी मूल नको किंवा लग्न न करता तसंच राहायचं ह्या कन्सेप्ट देखील पाश्चिमात्य होत्या आणि आपण विचार करत होतो की आपल्याकडे या कधीच येणार नाहीत.
बहुतेक आता कळलं असेल की मी हे का लिहिलं ते... मॉडर्न ह्या नावाखाली आपल्याकडे यायला वेळ लागणार नाही)
#मराठी #वाचालतरवाचाल #भावनात्मक #जीवनाचेसत्य #वायरल #ब्लॉग Avdhut-अवधूत GreatestHighlights

देशासाठी जीवाची बाजी लावणारा चंदू चव्हाण व्यवस्थेपुढे लाचार... तथाकथित सर्जिकल स्ट्राईक दरम्यान त्वेषाने पाकिस्तानची सीम...
11/07/2025

देशासाठी जीवाची बाजी लावणारा चंदू चव्हाण व्यवस्थेपुढे लाचार...

तथाकथित सर्जिकल स्ट्राईक दरम्यान त्वेषाने पाकिस्तानची सीमा पार करुन पाकिस्तानी सैन्याचा युद्धकैदी बनुन अतोनात छळ सोसलेला व नंतर सैन्यदलाने कोर्टमार्शल कारवाई करुन बडतर्फ केलेला भारतीय सैन्यदलाचा राष्ट्रीय रायफल्सच्या 37व्या तुकडीचा जवान चंदू चव्हाण आपल्या न्याय्य हक्कांसाठी आपल्या गरोदर बायकोला आणि चिमुरड्या मुलाला घेऊन उपाशीतापाशी वणवण करत दाहिदिशा फिरतो आहे. कधी निदर्शने, कधी धरणे तर कधी उपोषण करुन आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जीव तोडुन प्रयत्न करतो आहे. त्याच्या मागण्यांकडे लक्ष देऊन त्याला मदत करण्याऐवजी आपले संवेदनाहीन सरकार व भ्रष्टाचाराने बरबटलेले सुस्त प्रशासन त्याला प्रत्येक ठिकाणी दहशतवाद्यासारखी वागणूक देऊन त्याची भिकाऱ्यासारखी हेटाळणी करत आहे. गेल्या चारपाच वर्षांपासून तो भुकेकंगाल अवस्थेत सरकारदरबारी दारोदार भटकतो आहे. त्याचे निवेदन स्वीकारून त्यावर कार्यवाही करण्याऐवजी कधी त्याचा मोबाईल हिसकावून घेतला जातो, कधी धक्काबुक्की केली जाते तर कधी मारहाण केली जाते. जर चंदू चव्हाण दोषी असेल तर त्यावर प्रशासनाने यथोचित कारवाई करावी. त्याला मोकळं सोडू नये कारण यामुळे शासनाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन दुषित होण्याची शक्यता आहे. काल तर अक्षरशः कहर झाला. धुळ्याच्या महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी या धाडशी सैनिकाला अर्वाच्च शिवीगाळ करुन एखाद्या सडकछाप भुरट्या गुन्हेगाराप्रमाणे मारहाण केली. यावरही या जवानाने आपला संयम सोडला नाही. हे थोडे झाले म्हणून की काय त्याच्या घरासमोरील ड्रेनेजलाईन वर्षभरापासून तुंबलेल्या अवस्थेत असल्याचे नगरपालिकेला कळवून, निवेदन देवून, अर्जविनंत्या करुनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन त्याला छळले जाते आहे. ज्यामुळे त्याचा लहान मुलगा एकवेळ त्या गटारातही पडला होता तसेच दोनवेळा त्याला टायफॉइडमुळे दवाखान्यात भरती करावे लागले होते. असे असताना त्याची दखल नगरपालिकेत घेतली जात नाही तसेच पोलीस चौकीत अनेकवेळा येरझारा घातल्यानंतरही तक्रार नोंदवून घेतली जात नाही.

अक्षरशः मेटाकुटीला आलेला हा तडफदार जवान चहूबाजूंनी अडचणीत आलेला असताना सरकार दरबारी कोणीही त्याची अडचण समजून घ्यायला तयार नाही की कोणताही लोकप्रतिनिधी त्याच्या जवळ जायला तयार नाही. सैन्यदलातून बाहेर पडल्यापासून त्याला पगार नाही की इतर अर्थार्जनाचे साधन नाही. कोर्टमार्शलचा शेरा असल्याने इतर कोणत्या ठिकाणी नोकरीही करु शकत नाही. अक्षरशः लोकांकडे हात पसरून घर चालवण्याची नामुष्की या जवानावर आलेली आहे. अशी परिस्थिती लाखो जवानांवर ओढवलेली आहे परंतू त्याची वाच्यता होत नाही. त्या सर्वांचे प्रतिनिधित्व करण्याच्या उद्देशाने हा चंदु चव्हाण जीवावर उदार होऊन आपल्या अस्तित्वाचा लढा लढत आहे. त्याने आतापर्यंत दिल्लीतील इंडीया गेट, मुंबईतील आझाद मैदान अशा अनेक ठिकाणी निदर्शने केली आहेत. परंतू सरकारची उदासीनता, बेफिकीर अनास्था यामुळे तो विमनस्क अवस्थेत संघर्ष करुन मेटाकुटीला आला आहे.

ज्या प्रस्थापित व्यवस्थेत लाचार गुंडापुंडांवर व सडकछाप पुढाऱ्यांवर करोडो रुपयांची बंडले उधळली जाताहेत त्या भ्रष्ट व्यवस्थेत घरदार सोडून देशासाठी प्राण तळहातावर घेऊन लढणाऱ्या सैन्यदलातील जवानांवर पोटासाठी भिक मागण्याची वेळ येत असेल तर या देशाचे भवितव्य धोक्यात आहे यात कुठलीही शंका नाही. जेथे जेथे न्यायाच्या अपेक्षेने जाईल तेथे तेथे ही उन्मत्त व्यवस्था या जवानाची मानहानी करुन त्याला कायदा हातात घेण्यासाठी मजबूर करत आहे तरीसुद्धा या जवानाचा संयम ढळत नाही त्यामुळे त्याच्या सहनशीलतेला सलामच केला पाहिजे. यदाकदाचित या जवानाचा तोल ढळला आणि त्याच्या हातुन काही विपरीत घडले तर त्याला जबाबदार हे उलट्या काळजाचे निष्ठुर शासनच असेल. सध्याची अवस्था पाहता त्याला बेदखल करुन, त्याच्याकडे दुर्लक्ष करून त्याला मानसिक रुग्ण ठरवण्याचे आटोकाट प्रयत्न चाललेले आहे असे दिसून येते.

या जवानाची अशाप्रकारे चाललेली ससेहोलपट व त्याबरोबरच त्याच्या बायकोपोराची फरफट होताना पाहणे प्रचंड असहनीय होत आहे. राष्ट्रभक्तीचे पिचके ढोल वाजवणाऱ्या राज्यकर्त्यांनी एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लावुन या जवानाला सन्मानाची वागणूक देण्याची अपेक्षा आहे. एकतर या जवानाला सरकारच्या जबाबदार यंत्रणेने समिती स्थापन करून त्याच्यावरील तपास वेळेत पूर्ण करून योग्य, उचित न्याय मिळवून द्यावा अथवा त्याच्याकडून देशद्रोहासारखे काही गंभीर घडले असेल तर त्याच्यावरचा गुन्हा सिद्ध करुन त्याला एकदाची फाशी देऊन त्याच्या जीवाची तगमग, उपासमार व त्या अनुषंगाने होणारी त्याच्या कुटुंबाची फरपट कायमची संपवून टाकावी. यामुळे भारतीय लष्कराची अकारण होणारी बदनामीही टळेल. कारण एका स्वाभिमानी जवानाची न्याय मिळवण्यासाठीची धडपड व त्याचा पदोपदी होणारा अन्यायकारक धिक्कार निर्विकारपणे पाहणे आता असह्य होत आहे. त्याने ठिकठिकाणी सरकारी कार्यालये व पोलीस चौकीमधून केलेले लाईव्ह व्हिडीओज मी शेअर केले आहेत परंतू ते आता गायब झालेले दिसतात, ते व्हिडीओ दिसत नाहीत.

एवढा छळ जर एखाद्या देशासाठी तहानभूक विसरुन, घरदार सोडून, थंडीवाऱ्याची पर्वा न करता जीवाची बाजी लावणाऱ्या सैनिकाचा होत असेल तर या देशात सर्वसामान्य नागरिकाची काय किंमत आहे ते लक्षात आल्याशिवाय रहात नाही...

- बाळासाहेब कदम

🌹🌹🌹

#चंदूचव्हाण #चंदू_चव्हाण #विकृतांचा_सुकाळ #सुमारांची_सद्दी #धंदा_धर्माचा #धर्मांध_विकास #भांडवलशाही_गुलामी #हेच_ते_हिंदूराष्ट्र

पाठवणीच्या वेळी नववधूने लग्नाला दिला नकार!!!(ही गोष्ट तुम्हाला अंतर्मुख करेल)लग्न पार पडलं होतं. आता निरोपाचा क्षण आला ह...
19/06/2025

पाठवणीच्या वेळी नववधूने लग्नाला दिला नकार!!!
(ही गोष्ट तुम्हाला अंतर्मुख करेल)

लग्न पार पडलं होतं. आता निरोपाचा क्षण आला होता.
नेहा आपल्या आईला मिठी मारून रडली, मग ती आपल्या वडिलांच्या कुशीत शिरली.
सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते.
ती आपल्या लहान बहिणीच्या सोबत सजवलेल्या गाडीकडे निघाली होती.

नवरदेव अविनाश आपला मित्र विकाससोबत गप्पा मारत होता.
विकास म्हणाला,
"यार अविनाश, एक काम कर…
घरी पोचताक्षणी 'अमृतबाग' हॉटेलमध्ये जाऊ आणि मस्त जेवण करू…
इथे तुझ्या लग्नात काही मजा आली नाही जेवणात."

तेवढ्यात अविनाशचा धाकटा भाऊ राकेश म्हटला, " पनीरची भाजी पण काही खास नव्हती…आणि रसगुल्ल्यात तर रसच नव्हता. खूपच पांचट जेवण होते रे "
आणि मोठ्याने हसायला लागला.

अविनाशही हसत म्हणाला –
"जाऊ आपण अमृतबागला, जे पाहिजे ते खा…
इथे काही चवच नव्हती… पुऱ्यापण गरम नव्हत्या."

हे सगळं ऐकून,
नेहा तिचं पाऊल गाडीत टाकणारच होती की ती अचानक मागे वळली,
डोईवरचा पदर काढून कंबरेला खोवत तडक वडिलांकडे आली आणि त्यांचा हात हातात घेत म्हणाली,
"मी या लग्नाला नकार देते बाबा…
माझं हे लग्न मला मान्य नाही!"

सगळे थक्क झाले…
नेहाच्या सासरच्यांना तर धक्काच बसला… कोणालाच काही कळेनासे झाले.. सगळे
तिच्याजवळ जमले.

सासरे श्यामराव पुढे आले.
"अगं सुनबाई, असं झालं तरी काय ?
लग्न पार पडलं आहे…
आता अचानक का नाही म्हणतेस?"

अविनाशही धावत आला,
त्याचे मित्र, भावंडं सर्वजण…

नेहा सासऱ्यांना म्हणाली,
"मामंजी, माझ्या आई-वडिलांनी स्वतःच्या इच्छा मारून माझं शिक्षण, माझं भविष्य घडवलं…
वडिलांनी किती रात्रंदिवस जागून
या लग्नासाठी तयारी केली…
आईनं नवीन साडीही घेतली नाही,
दुसऱ्याची साडी घालून लग्नात उभी आहे…
वडील १५० रुपयांचा शर्ट घालून उभे आहेत…
त्या शर्टच्या आत शंभर भोकं असलेलं बनियन आहे!

आणि माझ्या नवऱ्याला पुऱ्या थंड वाटल्या??
त्याच्या मित्राला पनीर आवडलं नाही??
दिराला रसगुल्ला फिक्का वाटला??

ही फक्त अन्नावर टीका नाही,
माझ्या वडिलांच्या त्यागावर, मेहनतीवर आणि इज्जतीवर चिखलफेक आहे…
हे जेवण कॅटररनं बनवलंय.
माझ्या वडिलांनी नाही...
पण त्यांच्या मनानं, मनगटानं, त्यागानं ते अन्न बनलंय…
आणि त्या अन्नाची निंदा करणं म्हणजे माझ्या वडिलांचा अपमान करणं."

वडिल म्हणाले –
"बाळा, एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी…?"

नेहा म्हणाली –
"ही छोटी गोष्ट नाही बाबा…
माझ्या पतीच्या नजरेत जर माझ्या पित्याचा मान नाही,
तर मला असा संसार नको…
माझ्यात तुमचं सर्वस्व आहे,
हे ज्यांना दिसत नाहीत,
त्यांच्याशी माझं नातं मी जोडणार नाही."

इतकं बोलल्यावर सगळे शांत झाले…

अविनाश पुढे आला, हात जोडले सासऱ्यांपुढे,
"माफ करा बाबा… माझी चूक झाली…
मी अज्ञानीपणानं बोललो…"

श्यामराव पुढे आले, डोळ्यात पाणी होतं "बेटा, मी सुन घेऊन जायचो म्हणत होतो,
पण मला मुलगी मिळाली…
माझं नशीब की ईश्वराने तुला माझी कन्या बनवली…
माफ कर मला… मला पूर्ण खात्री आहे की तू माझं घर उजळवशील."

नेहाने त्यांच्या पायाला स्पर्श् केला…
" मामंजी …"
ते म्हणाले – "नाही, आता फक्त 'बाबा' म्हण."
दोघेही भारावून गेले...

शंकरराव अभिमानानं पाहत होते…
आपली कन्या आज खऱ्या अर्थाने मोठी झाली होती...

आता नेहा सासरी रवाना झाली…
मागे राहिलं फक्त तिचं घराभोवतीचं रिकामं झालेलं अंगण,
आई-बाबांचे अश्रूंनी भरलेले डोळे…
आणि एक मोठा संदेश....

"जेव्हा आपण कुणाच्या मुलीच्या लग्नाला जाऊ, तेव्हा भाजी बेचव, पुऱ्या थंड , रसगुल्ला कोरडा वाटल्यासारखी टीका करू नका…

कारण त्या अन्नासाठी एका वडिलांनी स्वतःच्या स्वप्नांचा त्याग केलेला असतो,
त्या जेवणाला बनायला केवळ २ तास लागले असतील,
पण त्या अन्नामागे मुलीच्या पित्याचा अनेक वर्षांचा संघर्ष असतो…

"लेक" ही परकं धन नसते,
ती आई-वडिलांची शान असते.

जर ही कथा मनाला स्पर्शून गेली असेल,
तर इतरांपर्यंत जरूर पोहोचवा…
लेकीचा मान ठेवा...
एका वडिलाच्या स्वप्नांचा आदर ठेवा.💯✍🏼

©️®️

***नक्की वाचा मित्रांनो,खरच खूप छान लिहिलंय.. #कथाविश्व *असाही एक बाप...**ते जाणार हे सहा महिन्यांपूर्वीच माहित झालं होत...
18/06/2025

***नक्की वाचा मित्रांनो,खरच खूप छान लिहिलंय..
#कथाविश्व
*असाही एक बाप...*

*ते जाणार हे सहा महिन्यांपूर्वीच माहित झालं होतं सर्वांना. शेवटच्या स्टेजला असलेल्या आतड्याच्या कर्करोगाचं निदान करायला निष्णात डॉक्टरची देखिल गरज नव्हती. अण्णा आता काही महिन्यांचे सोबती होते. त्याने मुलगा म्हणून जे शक्य उपचार होते ते केले. शेवटचा महिनाभर तर हा स्वतः सबंध वेळ शेजारी बसून होता. बिनपगारी रजा काढून. आम्हा सर्वांनाच आश्चर्य वाटत होतं. तसं करायची काहीच गरज नव्हती. केस लास्ट स्टेजची होती. त्यांच्या जायची वाट पाहायची होती आणि कमीत कमी त्रास होऊन ते जावेत एवढी प्रार्थना करण्यापलीकडे कोणाच्याच हातात काही नव्हते. पण हा ऐकायला तयार नव्हता. शेवटी तो दिवस आला. अण्णा गेले. आम्ही जवळचे मित्र हेच त्याचे नातेवाईक. अण्णांच्या विचित्र स्वभावामुळे मुळातच कमी असलेले नातेवाईक केव्हाच दुरावले होते. इतके की त्यांना दोन वर्षांपूर्वी नानी गेल्या हे देखिल माहित नव्हते. तेव्हापासून अण्णा आणि हा दोघेच घरात. नानी गेल्यावर अण्णांच घरातून बाहेर पडणं कमी झालं. वाचन, टीव्ही कशाचीच विशेष आवड नव्हती त्यांना. BPT मधून निवृत्ती घेतल्यावर घरीच असायचे. मिळालेल्या फंडाची पैनपै फिक्स्ड डीपोझीटला टाकून त्याच्या व्याजावर आणि पेन्शनवर चालले होते त्यांचे. फालतू खर्च करायचा नाही हा अण्णांचा शिरस्ता. “गरज” ह्या पलीकडे केलेला कोणताही खर्च वायफळ वाटे त्यांना. आयुष्यभर १८० फुटाच्या डबल रुममध्ये राहिले. खरं तर ब्लॉक घेणे सहज शक्य होते त्यांना. पण नाही. हा म्हणायचाच “माझा बाप कवडीचुंबक आहे म्हणून साला मी मित्रांची थोटक ओढून आणि बियर शेयर करून मी आनंद घ्यायचा. माझ्या वाढदिवसाला मित्रच पार्टी देणार. माझा बाप पैसे ----------खाली दाबूनच गचकणार!!!”*

*बरं ह्याला लहानपणापासून पोलियो. उजवा पाय पूर्ण लुळा. डाव्या हाताच्या हालचाली देखिल restricted आणि बुद्धी सामान्यच्या खालची. शाळेत आमच्याबरोबर रमला. जेमतेम पास होऊन कॉलेजला आर्टसला गेला. ते काही झेपलं नाही. मग कॉलेज सुटल मधेच केव्हातरी. मग बारीक सारीक नोकऱ्या, उद्योग. वडापावची गाडी, लॉटरीचा स्टोल सगळं करून झालं. आमची शिक्षणं होऊन संसार सुरु झाले. ह्याचं लग्नकार्य काहीच नाही. तो म्हणायचा देखिल “साला आम्ही रोकडा प्यारवाले. आम्हाला तुमच्यासारखं आयतं घरात नाही मिळत. आम्ही कॉंग्रेस हाउस आणि सुखलाजी स्ट्रीटला जाऊन जेवतो” ते बरोबर की चूक ह्यात आम्ही कधीच पडलो नाही किंवा त्याला सांगायला गेलो नाही. कारण तो करतो ते चूक मग बरोबर काय ह्याचे उत्तर निदान त्याच्यापुरते तरी आमच्याकडे नव्हते. त्याने त्याच्यासाठी सोय शोधून ठेवली होती. अण्णांच्या ओळखीतून एका दुकानात मालाची बुकात एंट्री करायची नोकरी लागली. गेली अनेक वर्ष टिकली देखिल. अण्णांच्या आजाराच कळल्यावर आम्ही सगळे मित्र वेळ मिळेल तसे भेटून येत होतो. सर्वांना जाणवलेला एक फरक म्हणजे त्याचं अण्णांशी बदललेल वागणं. अचानक तो अण्णांच्या खूप जवळ गेल्यासारखा वाटला. इतकी वर्ष आपला बाप कद्रूस आणि सणकी आहे म्हणून एक दुरावा ठेवून असलेला तो अण्णांच्या बाबतीत खूप भावूक झालेला जाणवला. मग ते बिनपगारी रजा घेऊन त्यांच्या शेजारी दिवसरात्र बसणं असो, ते गेले तेव्हा “अण्णा गेले रे” असा आम्हाला आलेला फोन असो किंवा त्यांना अम्ब्युलंस मधून नेताना “भटजीला कळवल आहेस ना रे” अस मला विचारणं असो ...हे सगळं आम्हाला नवीन होतं. अम्ब्युलंसमध्ये त्याच्या डोळ्यात एक टिपूस नव्हतं. तो फक्त अण्णांकडे टक लाऊन पहात होता. त्यांचा हात हातात घट्ट धरून स्मशान येई पर्यंत तो बसला होता.*

*सर्व विधी पार पडले. बॉडी उचलून भट्टीजवळ नेली. भट्टीच्या ट्रोलीवर अण्णांचा कॅन्सरने पोखरून कृश झालेला मृतदेह ठेऊन सगळे मागे होऊन उभे राहिले. भट्टीचे लोखंडी दार उघडले. एकदम गरम हवेचा लोळ सर्वांच्या अंगावर आला. ती धग जाणवून सर्वच आणखी दोन पावलं मागे सरकले. तो तसाच उभा होता. शून्यात नजर लाऊन. ट्रोलीकडे पहात. ट्रोली आपोआप पुढे सरकली, लोखंडी दरवाजा ओलांडून आज गेली, आगीच्या अक्राळ विक्राळ ज्वाळांनी पांढऱ्या कपड्यात लपेटलेल्या त्या देहाला विळखा घातला आणि स्वतःमध्ये लपेटून घेतले. लोखंडी दार बंद झाले आणि इतका वेळ त्याने दाबून ठेवेलेला अश्रूंचा बांध सुटला......*

*आम्हाला मिठी मारून तो लहान मुलासारखा ओक्साबोक्शी रडला. बराच वेळ. आवेग ओसरल्यावर बाहेर पडलो. पाऊस नुकताच पडून गेला होता. स्मशानासामोरच्या टपरीवर चहा घ्यायला आम्ही सगळे थांबलो. फुक्यानी बिड्या पेटवल्या. ह्याने देखिल दोन दम मारले. चहाचे दोन घोट घशाखाली गेल्यावर एक मोठ्ठा दम मारून तो बोलू लागला. “अण्णांचा कॅन्सर डीटेक्ट झाला तो डायरेक्ट लास्ट स्टेजला. डॉक्टरनी सहा महिन्याचा टाईम दिला होता. अण्णा खंबीर होते. He was a strong man yaar. अण्णांनी मला एक दिवस लवकर घरी बोलावलं. मी समोर बसलो. आपण शाळेत असताना ते अभ्यास घ्यायचे तेव्हा बसायचो तसा. साला मार्क्स कमी पडायचे, डोक्यात काही शिरायचं नाही तेव्हा पण त्यांनी कधी हात उचलला नाही की रागावले नाही यार. त्या दिवशी त्यांनी एक फाईल माझ्या हातात दिली. त्यात त्यांच्या सगळ्या गुंतवणुकीची माहिती, रिसीट, certificates सगळं होतं. पुण्याच्या फ्ल्याटचं माझ्या नावाचं अग्रीमेंट आणि ११ महिन्याचं अडवान्स भाडे घेतल्याची पावती पण होती. मला म्हणाले “माझ्या नंतर तुला काम करायची गरज नाही. मजेत जग. स्वतःची काळजी घे. जग फिरून ये. खर्च केलेस तर संपणार नाहीत एवढे पैसे मी तुझ्यासाठी ठेवले आहेत. फक्त उडवलेस तर कुबेरपण पुरा पडणार नाही.” मी ती फाईल घेऊन उठलो. अण्णा कॉटवर झोपले. मी रात्री ती फाईल वाचून परत त्यांच्या कपाटात ठेवायला गेलो तेव्हा त्यांची एक डायरी हाताला लागली. सहज उघडली. त्यात एक खूप जुनं पत्र होतं. अण्णांनी कोकणातून नानीला लिहिलेलं. अण्णांनी लिहिल होतं की “आज पाहटे आपल्या घराबाहेर कापडात गुंडाळलेला एक मुलगा मला सापडला. धडका असता तर पोलिसात कळवून अनाथश्रामात पाठवला असता. पण हे खास पिल्लू दिसतं आहे. आपल्याला महाशिवरात्रीला भल्या पहाटे वेळणेश्वराने दिलेला प्रसाद. म्हणून ह्याचं नाव प्रसाद! त्याला मी आपला मानला आहे. तो जसा आहे तसा मला मान्य आहे. आता आणखी अपत्य नको. हाच आपला आहे. जसा आहे तसा. आपल्यानंतर त्याची सोय करणे महत्वाचे आहे. सबब आजपासून स्वतःवरील सर्व खर्च बंद. मी त्याला घेऊन उदया कोकणातून निघत आहे!”*

*आम्ही सगळे सुन्न होऊन ऐकत होतो. प्रसाद बोलत होता. “तो भट्टीचा दरवाजा बंद झाला ना तेव्हा जाणीव झाली की मेल्यानंतर का होईना आपल्याला समोर दिसत असलेला माणूस तो दरवाजा बंद झाला की परत कधीच न दिसण्यासाठी निघून जातो. अण्णा परत कधीच “दिसणार” नाहीत हे जाणवले आणि मला राहवले नाही. जाम रडायला आलं. साला आयुष्यभर कद्रूसपणा करणारा माझा बाप माझा बाप नव्हताच रे. तो माझ्या उद्यासाठी स्वतःच्या आजचं बलिदान देत असलेला एक देव होता ज्याचं देवत्व मला त्याचा अवतार संपायच्या जरा आधी लक्षात आलं. मला सत्य समजू नये म्हणून त्याने नातेवाईक तोडले. आणि मी? श्या!!! साला माझी लायकीच नाही यार त्यांचा मुलगा म्हणवून घ्यायची!!”*

*डोळ्यातून ओघळणारे अश्रू पुसण्याचा प्रयत्न न करता प्रसाद त्यांना वाहून देत होता....मोकळा होत होता. थोडा थांबून तो म्हणाला “मी अण्णांना कळू दिलं नाही की मला सत्य माहिती झालं आहे. पण जमेल तेवढी त्यांची सेवा करून आयुष्यात त्यांना त्यांच्यामागे दिलेल्या शिव्यांच प्रायश्चित्त करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला यार!!!”*

*आम्ही ऐकत होतो. प्रसाद फुटून रडत होता. पाऊस जोरात सुरु झाला होता. अण्णांचा प्राण पंचत्वात विलीन झाला होता. प्रसादच्या झोळीत आनंदाचे दान टाकून एक अवतार संपला होता! पाऊस कोसळू लागला होता!!!! असेही एक वडिल.*

कथाविश्व - गोड कथांचे अनोखे विश्व 🎉

आईची कहाणीशनिवार होता आज. आठवडा संपायला काहीच तास शिल्लक होते. उद्या सुट्टी. लेकाला, खरेदीला आणि बाहेर जेवायला न्यायचं क...
14/06/2025

आईची कहाणी

शनिवार होता आज. आठवडा संपायला काहीच तास शिल्लक होते. उद्या सुट्टी.

लेकाला, खरेदीला आणि बाहेर जेवायला न्यायचं कबूल केलं होतं मी.

वाट बघत होता तो याची, बऱ्याच दिवसांपासून. बेत ठरले होते आमचे, धमाल करायचे. एक दिन बेटेके नाम !

तेवढ्यात पडद्यावर ईमेल झळकला. उद्या काही महत्वाच्या कामांसाठी सगळ्यांना ऑफिसला बोलावण्याची दवंडी होती.

मेल येताच माझं अवसानच गळालं, लेकाचा हिरमुसलेला चेहरा नजरेसमोर दिसायला लागला मला. किती आनंदात होता तो, आईसोबत संपूर्ण दिवस मिळणार, कधी नव्हे तो, म्हणून.

नवरा गेल्यानंतर त्याला सांभाळताना, आई आणि बाप अशा दोन्ही जबाबदऱ्या पार पाडत होते मी. लेकाचं आणि माझं एक नवीनच नातं आकाराला आलं होतं या काळात, अगदी लोभस असं.

दुसऱ्या लग्नाचे आईबाबांकडून येणारे इशारे आणि सूचना धुडकावून लावत त्याच्याच विश्वात रममाण झाले होते मी, स्वतःला विसरून.

उद्याचा मनमोकळा रविवार आवश्यक होता दोघांनाही आम्हाला, पण पाणी फिरलं होतं सगळ्याच मनोरथांवर.

सुस्कारा सोडला आणि त्याला हे कसं सांगावं हे या विवंचनेत गुरफटले. या रविवारच्या बदल्यात दुसरं काहीतरी द्यायलाच लागणार होतं त्याला. काय करावं याचा विचार करत होते.

सुचली एकदाची युक्ती आणि गेले साहेबांकडे. म्हणाले, सर पुढच्या म्हणजे दुसऱ्या शनिवार रविवार ला जोडून एक सुट्टी घ्यायचा विचार आहे, चालेल का? कामं संपतायत तोवर सगळी.

दिलदार साहेब आमचे ! म्हणाले अवश्य घ्या, पण जायच्या आधी तेवढे रिपोर्टस् संपवून जा.

क्या बात! पिसासारखी तरंगत केबिन मधून बाहेर पडले. उद्या रविवारी ऑफिसला यायचा मानसिक शीण मागे पडला आणि मन उत्फुल्ल झालं.

पटापट Make My Trip app उघडलं आणि महाबळेश्वरच्या एका मस्त रिसॉर्टचं पॅकेज घेऊन टाकलं, दोन रात्री तीन दिवसांचं. होऊ दे खर्च.

लाडक्या लेकासाठी काय पण.

पुणे महाबळेश्वर बसचं तिकीट पण काढून घेतलं लगोलग Red Bus वर. सगळं अगदी क्लिक क्लिक करत, फटाफट.

अगदी आनंदात, आवरून घरी जायला निघाले. लेकाचा चेहरा दिसत होता मला नजरेसमोर. उद्याच्या एका दिवसाच्या बदल्यात तीन दिवसांचा धमाका कळल्यावर आनंदलेला.

महाबळेश्वर मला नेहमीच आवडतं. तिथलं वातावरण, बाजार आणि एकूणच निसर्ग भावतो मला खूप. शनिवार रविवार असते गर्दी पण ठीक आहे, त्रास नाही करून घेतला मनाला की सगळं सुरळीत होतं.

मी गावापासून थोडं लांबचं हॉटेल घेतलं होतं, गर्दीपासून थोडीशी सुटका मिळवण्यासाठी.

Engineering च्या पहिल्या वर्षाला असलेला लेक माझा. कॉलेज, प्रात्यक्षिकं, submissions या मध्ये अखंड बुडालेला. त्याला पण छान वाटेल हे surprise, अशी खात्री होती अगदी माझी.

होता थोडासा आईवेडा तो अजूनही. त्याच्या वयाच्या खंडीभर मैत्रिणी होत्या त्याला, पण माझं स्थान अजूनही थोडंसं वर होतं त्यांच्या, हे आपलं माझं मत.

बदलत जाणार होतं हे हळुहळू, म्हणूनच त्याच्या माझ्या नात्यातले हे लोभस क्षण समरसून जगण्याचा हा माझा अट्टाहास होता.

घरी गेल्यावर, बराच वेळ दार वाजवूनही ते काही उघडलं नाही गेलं, मग मी माझ्याकडच्या किल्लीनं दार उघडलं, तर बच्चमजी भले थोरले हेडफोन्स कानाला लावून थिरकत होते, बेभान.

मला बघताच Thumbs up चं चिन्ह दाखवलं मला आणि थिरकणं सुरूच राहिलं तसंच, अखंड.

तब्बल दहा मिनिटं वाट बघितली मी त्याचा नाच थांबण्याची, पण तो काही थांबेना. शेवटी मीच त्याच्या दंडाला धरून थांबवलं.

काय कटकट आहे असे भाव झळकले त्याच्या चेहेऱ्यावर, काढले हेडफोन्स आणि खेकसला.. काय आहे? जणू त्याचा बापच बोलतोय असा भास झाला मला. वाण नाही पण..

अरे ऐक ना.. उद्या मला ऑफिसला जायचंय.

सगळ्यांनाच बोलावलंय, महत्वाचं काम आहे.

त्याचा चेहरा कोरा. जा की मग. मी बघेन जेवायचं काय करायचं ते. नको काळजी करूस.

मला जसं वाटलं होतं तसं काहीच घडलं नव्हतं. मी आपली उगाचच, त्याला किती वाईट वाटेल बेत फिस्कटला म्हणून याचा विचार करत बसले होते, पण त्याच्या बोलण्यावरून एक कळलं, आई फक्त जेवणापुरती. बाकी तिचा उपयोग शून्य.

तरीही हार न खाता, चिकाटीनं मी त्याला म्हणाले, अरे ऐक ना..

पुढच्या शनिवार रविवारला जोडून मी सुट्टी घेतलीये सोमवारी. आपल्या दोघांचं महाबळेश्वरचं बुकिंग केलंय दोन दिवसांचं. मस्त मजा करू आपण. उद्याच्या रविवारची भरपाई म्हणून.

काय गं आई ! मला विचारायचं तरी हे उपद्व्याप करताना. आम्ही ट्रेक ला जाणार आहोत पुढच्या शनिवार रविवारी. एक ग्रुप आहे आमचा, मस्त जमलेला. मला नाही जमणार महाबळेश्वर !

त्यातूनही, आता तुझ्याबरोबर महाबळेश्वरला वगैरे गेलो तर सगळे हसतील मला, बोळयाने दूध पितोय अजून म्हणून ! लहान आहे का मी आता?

टचकन पाणी तरळलं माझ्या डोळ्यात. खरोखर, त्याला न विचारता परस्पर सगळं ठरवण्याचा अगोचरपणा केला होता मी, नक्कीच.

त्याचं स्वतःचं एक विश्व असेल स्वतंत्र, याचा विचार आलाच नव्हता मनात माझ्या.

लेक मोठा झालाय आता, ही जाणीवच नाही झाली मला. बोट धरून नाचणारा, बागडणारा, प्रत्येक गोष्टीत आईचा सल्ला घेणारा, अगदी दहावीच्या निकालानंतर, पहिल्यांदा मलाच वाकून नमस्कार करणारा आणि पेढा भरवणारा लेकच मला नजरेसमोर दिसत होता.

सुस्कारा सोडला मी. माझी सगळी मनोरथं धुळीला मिळाली होती. हतबल आणि अगतिक होऊन मी आवरायला गेले.

उद्या हॉटेल आणि बस ची आरक्षणं रद्द करावी लागणार होती. आर्थिक नुकसान तर होणार होतंच, त्या पेक्षा जास्त भावनिक नुकसान सोसावं लागणार होतं मला.

हातपाय तोंड धुवून, कपडे बदलून, चहाचा कप घेऊन मी बसले निवांत. बसलेला धक्का जरा बोथट झाला होता.

मनाशी विचार केला, हे आज ना उद्या होणार होतंच की, एवढं काय दु:ख वाटून घ्यायचं त्यात.

तेवढ्यात लेकाच्या खोलीतून त्याच्या बोलण्याचा आवाज कानी पडला.

अरे, मला नाही जमणारे पुढच्या शनिवारी ट्रेकला यायला.

आईबरोबर बाहेर जायचंय जरा. तुम्ही जा सगळे, नाहीतर आपण त्याच्या पुढच्या शनिवारी जाऊ. सॉरी !

मी बाहेर बसलेय आणि ऐकतेय, हे त्याच्या गावीही नव्हतं, पण त्याचे ते शब्द ऐकून फार बरं वाटलं मला.

ते भाव चेहेऱ्यावर दिसू न देता, मी आपला चहा घेत राहिले, घोट घोट ! जणू मी त्या गावचीच नाही.

चहा झाल्यावर मी माझा फोन उचलला आणि MMT ला खोटा खोटा फोन लावला.

हो हो, रद्द करायचं आहे बुकिंग. किती, पंचवीस टक्के जातील ना, ठीक आहे. करा रद्द.

आवाज मुद्दामच मोठा काढला होता मी, लेकाला ऐकू जावं म्हणून !

ते ऐकून तो धावतच त्याच्या खोलीतून बाहेर आला आणि हातवारे करत मला थांबायला सांगू लागला.

मी हळूच फोन बंद केला आणि बघितलं त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने.

आई, आमचा ट्रेक रद्द झालाय ! आत्ताच मेसेज आलाय ग्रुपवर.

आपण जाऊ महाबळेश्वरला. धमाल करू दोन दिवस !

मी हसले दिलखुलास ! यह हुवी ना बात !

मला समजून घेण्याच्या त्याच्या त्या एकाच कृतीतून मूठभर मांस चढलं माझ्या अंगावर आणि मी भरून पावले.

एक खूणगाठ मात्र बांधली मनाशी. लेक खरंच मोठा झालाय. यापुढे एकतर्फी निर्णय नको, तर परस्पर संमतीची गरज भासणार आहे.

मोठाच धडा शिकले या प्रसंगातून मी आमच्या पुढच्या वाटचालीसाठी, पण त्याचा समंजसपणा मात्र सुखावून गेला मला, नक्कीच.

पराग गोडबोले

घरच्यांचा विरोध आहे म्हणून पळून जाऊन लग्न केलं. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा  तालुक्यातील इंजिनियर तरुणाचं त्याच्या नात्...
09/06/2025

घरच्यांचा विरोध आहे म्हणून पळून जाऊन लग्न केलं. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील इंजिनियर तरुणाचं त्याच्या नात्यातीलच एका इंजिनिअर मुलीबरोबर प्रेम झालं. पण लग्नाला या दोघांना दोघांच्याही घरून प्रखर विरोध होत होता. शेवटी दोघांनी पळून जाऊन लग्न केलं. मुंबईमध्ये जाऊन एका नामांकित कंपनीमध्ये दोघेही चांगल्या पगाराच्या नोकरींवर रुजू झाले होते. दोघांचा राजा राणीचा संसार सुरू होता. दोघांनी ठरवलं होतं आता आपण आपलं बाळ घेऊनच घरी जायचं. बाळ पाहिलं की म्हणजे आपलं नातवंड पाहिलं की दोन्ही घरातील होणाऱ्या आजीआजोबांचा विरोध आपोआप मावळेल आणि दोन्ही कुटुंब नक्कीच आपल्याला आपलंस करतील. दोघांचे जॉब आणि संसार तर व्यवस्थित चालला होता पण लग्न होऊन वर्ष झालं तरी मुलबाळ होण्याचं काही लक्षण दिसेना. तेव्हा ते दोघे डॉक्टरकडे गेले, वेगवेगळ्या तपासण्या झाल्या आणि उपचार सुरू झाले. दोघेही कंटिन्यू 4 वर्ष उपचार घेत होते. या चार वर्षात त्यांचे 5/6 डॉक्टर बदलून झाले. त्या दोघांनी नोकरी करून कामावलेला सर्व पैसा ट्रीटमेंटवर खर्च केला. इतकं करूनही प्रेग्नेंशी काही होईना. इतक्यात उजाडला आपल्या सर्वांना नको असलेला 2020 सालातील मार्च महिना. कोव्हीडमुळे 2020मार्चच्या शेवटच्या आठवड्यात लॉकडाऊन जाहीर झालं.कामावलेलं सर्व पैसे तर हॉस्पिटलवर खर्च झाले होते. या लोकडाऊनमध्ये रूम भाडं दिले नव्हते पोटाला खायचं काय असा प्रश्न होता आणि पहिला लोकडाऊन संपला आणि त्यांच्या नामांकित कंम्पनीने त्यांना सांगितलं की काही दिवसासाठी आपल्या कंपनीने तुम्हा दोघांना ब्रेक दिला आहे. जवळ पैसा नाही, जॉब नाही आता कोव्हीडमुळे नवीन जॉब पण मिळत नाहीत.. आता काय करायचं दोघांच्या समोर मोठा प्रश्न होता, आणि दोघांनी परस्थितीशी हार मानून एक निर्णय घेतला, ""गड्या आपलं गाव बरं!!!म्हणतं महेशने आपल्या गावी म्हणजे घरी जायचा निर्णय घेतला नव्हे ते दोघेही निष्पाप जीव घरी पोहोचले.
ध्येय एकच होतं स्वतःचं बाळ घेऊन घरी जाऊ. पण नियतीला ते मान्य नव्हतं. शेवटी दोघेही म्हणजे महेश आणि पूजा आपल्या गावी मंगळवेढा येते आले. महेशच्या घरच्यांनी त्यांच्या बरोबरच पुजाची सुद्धा खेटरपूजा केली. दोघेही खूप अपमानित झाले होते पण अपमान सहन करण्याशिवाय दोघांसामोरही पर्याय नव्हता. घरी येऊन दोन तीन दिवस झाले होते आणि बोलत बोलत महेशच्या आईने पूजाचा उल्लेख वांझोटी असा केला. वांझोटी हा शब्द पूजाच्या खूप जिव्हारी लागला, इंजिनियर असणारे महेश आणि पूजा दोघेही खूप रडले. शेवटी ठरवलं आता असं लाजिरवाणं जीवन नको, मुलबाळ तर नाहीच, कामावलेले सर्व पैसे डॉक्टरच्या मड्यावर घातले आहेत. आता नोकरी पण नाही, नको आता हे अपमानित जीवन. दोघांनी ठरवलं आता आपण आपलं आयुष्य संपवू. खिशात पैसा असल्यावर माणूस काहीही करू शकतो पण आपण तर आता भिखारी झालोय. शेवटी महेश आणि पूजा दोघांनी आत्महत्या करायचा निर्णय घेतला. लॉकडाऊन नुकताच संपलेला नुकताच जून महिना सुरू झाला होता. पण मारायच्या आगोदर महेशची एकच इच्छा होती की पूजा तुला आणि मला आवडणारी पुरणपोळी आणि आमरस आपण दोघे खाऊ आणि नंतर झोपताना आपण दोघे पण देवाला स्मरून विष खाऊन झोपू 😢.
ठरलं पुरणपोळी आणि आमरस खाऊन आत्महत्या करायची. महेशने गावातील मित्राकडून उसने पैसे घेऊन दाल, गूळ, आंबे आणले. संध्याकाळीचे सात वाजले होते. पूजा आमरस आणि पुरणपोळी बनवण्यात गुंतली होती आणि महेश दोघांच्याही मोबाईल मधील पर्सनल मेसेज डिलीट करत होता. दोघांच्याही मोबाईलमध्ये काही पर्सनल गोष्टी होत्या त्या सर्व महेश डिलीट करत होता. कारण या दोघांनी आत्महत्या केल्यावर मोबाईल इथेच राहणार होते. आपल्या काही पर्सनल गोष्टी जगाला कळू नये म्हणून महेश सर्व काही डिलीट करत होता. डिलीट करताकरता त्याला पूजाच्या एका मैत्रिणीने व्हाट्सअपवर पाठवलेला लेख दिसला, लेख येऊन बरेच दिवस झाले होते पण पुजाने तो लेख रीड केला नव्हता. महेशने तो लेख वाचला आणि लेखात आशेचा किरण दिसल्याने महेशने पुरणपोळी लाटणाऱ्या पूजाला तो लेख वाचायला लावला. तो माझा म्हणजे डॉ. वैभवसिंह भोसलेचा मातृत्व बद्दल लेख होता. तोच पुजाच्या मैत्रिणीने तिला सेंड केला होता. शेवटचा चान्स म्हणून दोघांनी मला कॉल करायचं ठरवलं. संध्याकाळीचे आठ वाजत आले होते मी डॉ. भोसले माझ्या कामात बिझी होतो. इतक्यात मला महेश आणि पुजाचा कॉल आला. महेशने मी 🖕वर लिहिलेली सर्व स्टोरी मला सांगितली आणि शेवटी म्हटला की सर आता आमरस पुरणपोळी खाऊन आम्ही आत्महत्या करणार आहोत. मी निशब्द झालो होतो तरी माझ्या बोलण्यात सहजपणा आणत म्हटलं, ठीक आहे जरूर आत्महत्या करा. पण माझ्यासाठी आत्महत्या फक्त 24 तास पोस्टपोन कराल का?? तुम्ही दोघे फक्त 24 तास बोनस जगा!!😑
तुम्हाला उद्या रात्रीची आमरस पोळी माझ्याकडून मिळेल. तुम्ही दोघेही पटकन उद्या सकाळी माझ्याकडे या. बाळ होण्याचं चान्स असतील तर मी हो म्हणून सांगेन नसेल तर तुम्ही काय करायचं ते ठरवलं आहे ते तुम्ही करू शकता. इतक्यात पूजा मला म्हणाली की सर उद्या तुमच्याकडे येण्यासाठी पैसे नाहीत आमच्याकडं आणि आम्ही तुमची फी कुठून देऊ.मी आत्मविश्वासपूर्वक पूजाला सांगितलं की बेटा तु माझ्या लहान बहिणीसारखी आहेस तुमच्याकडून मला फी नको. मला तुम्हा दोघांना हसताना पाहायचं आहे, तूझ्या मांडीवर मला बाळाला पाहायचं आहे. बेटा तु काळजी करू नकोस उद्या तुम्ही दोघे माझ्याकडे येण्यासाठी किती पैसे लागतात ते मी लगेच महेशला फोन पे करतो. ती मुलगी रडत रडत म्हणाली सर 500 बस झाले आणि हाच सर महेशचा फोन पे नंबर आहे. मी लगेच महेशच्या नंबरवर 500 रुपये फोन पे केले. दुसऱ्या दिवशी सकाळी 8वाजताच ते दोघे माझ्या ओपिडीसमोर आले मला कॉल आला सर आम्ही आलोय. मी म्हटलं मी शेतात आहे मला यायला दहा वाजतील.
मी ओपिडीत आलो, ते दोघेही माझ्या समोर बसले होते, दोघांच्याही नजर शून्यात होत्या आणि काही मिनिट मी पण शून्यात नजर ठेऊन विचार करत होतो की या निष्पाप पोरांना रात्री जर माझा लेख किंवा नंबर मिळाला नसता तर आता माझ्या समोर बसलेले हे निष्पाप जीव आता चितेवर असले असते. 😢
वाचकहो मी डॉक्टर असलो तरी माणूस आहे, मला पण भावना आहेत. मला पण कुटुंब आहे. आई, वडील, बहिणी, भाऊ एका कुटुंबवत्सल कुटूंबातील असलेला डॉक्टर,,हजारो विद्यार्थी घडवणाऱ्या सुभाष भोसले गुरुजींचा मुलगा पण आहे.
महेश आणि पूजाचे सर्व जुने रिपोर्ट पाहिले प्रॉब्लेम तर माझ्यादृष्टीने नॉर्मल होता. दोघांनचीही सर्व तपासणी झाली आणि मी शेवटी त्या दोघांना एकच सांगितलं.
(पेशंटचे पूर्ण नाव आणि त्यांचे शारीरिक प्रॉब्लेम येते लिहिता येत नाहीत. 🙏)
अरे येड्यानो आत्महत्याचे विचार पण मनात आणू नका तुम्ही माझ्याकडे 100% आई बाबा बनणार. फक्त तुम्हाला अजून चार व्हिजिट कराव्या लागतील.
पूजा नव्हे पण महेश हिरमुसाला चेहरा करून म्हणाला सर तुमची फी द्यायला आमच्याकडं पैसे नाही. दोघांचे पण जॉब लॉकडाऊन मध्ये गेले आहेत.मी थोडंसं रागातच महेशला म्हटलं, तुझ्याकडे पैसे येतील तेव्हा मला फी दे, नसेल तर माझी फी तुझी बायको पूजाची भाऊबीज ओवाळणी समज, पण माझ्या चार व्हिजिट पूर्ण कर. भरल्या डोळ्याने ते दोघे म्हणजे महेश आणि पूजा माझ्या ओपिडीतून बाहेर पडले. मी ट्रीटमेंट तर सुरु केली होती, त्या दोघांना फक्त चार व्हिजिट करायला सांगितलं होतं! त्या दोघांनी दोन व्हिजिट पूर्ण पण केल्या आणि त्यांचा मला कॉल आला की सर... कंठ दाटून आलेल्या आवाजात दोघे पण रडक्या आणि दाटलेल्या आवाजात इतकेच बोलले की सर पा *ळी चुकली. आम्ही आई बाबा होणार... ते दोघेही आनंदी होते, त्यांना माझी फी मागण्याचे धाडस मला झाले नाही. पुढे मे 2021 मध्ये त्या जोडप्यास मुलगा झाला. लगेच महेशने कॉल करून मला सांगितलं सर आम्हाला मुलगा झाला.. पुढे तो बरेच बोलला की सर तुमचे उपकार वगैरे, वगैरे... वगैरे आणि... वगैरे... सर तुमचे नाव वैभवसिंह, तर आम्ही पण बाळाचं नाव वैभव ठेवलंय.. वगैरे... वगैरे..त्यांच्या आनंदा समोर मी माझी फि विसरून पण गेलो आहे !!
डॉ.वैभवसिंह सुभाष भोसले,सोलापूर
संपर्क:.9011950609

Address

Pune
Pathardi
414102

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mr Sachin Bade posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share