Mr Sachin Bade

Mr Sachin Bade श्री स्वामी समर्थ
(1)

06/05/2025

©जिजी
#कथाविश्व

" ते काही नाही, आपण दुसरीकडे राहायला जायचे." मनोज बेडरूमचे दार लावल्यावर म्हणाला.
" अरे पण बाबांचा काय त्रास आहे तुला? अक्षता त्याची समजूत काढत म्हणाली.
" तू बघतेस ना, मला प्रत्येक गोष्टीवरून बोलत असतात. आता मी काही लहान आहे का?" मनोज अजून वैतागलेलाच होता.
" तुला काय वाटते, माझी आई मला काही बोलत नाही? तिचा रोज फोन असतो मला. हे कर. असं कर ,तसं कर. कसं आहे ना मनोज, आपल्या आई वडीलांना जोपर्यंत आपण आई वडील होऊन एका आईबापाची काळजी काय असते ती आपल्याला कळत नाही तोपर्यंत ते आपल्याशी असच वागतात." अक्षता म्हणाली.
" असं काही नसतं, म्हणजे आपल्याला मुलं झाली कि ते बोलणार नाहीत का आपल्याला?" मनोज चेहरा उडवत म्हणाला.
" खरं तर ते वावगं असं काहीच वागत नाही आहेत. फक्त तू समजून घ्यायला कमी पडतोयस."
" ये, हे जास्त होतयं हा, म्हणजे मला काहीच कळत नाही. तुम्हालाच सगळं कळतं."
" असं नाही तू बाप झाल्यावर तुला कळेल."
" हं " मनोजने तुच्छतापूर्वक हूंकार भरला.
अक्षताला कळून चुकले कि आता मनोजला जास्त बोलून काही उपयोग नाही.
ती कुस बदलून झोपेची आराधना करू लागली.

तिला झोप काही येत नव्हती. मनोजचे बाबांच्या स्वभावाचे दर्शन तिला लग्नाच्या दिवशीच आले होते. त्याच दिवशी तिने त्यांना आपले बाबा मानले होते. तो प्रसंग आजही जशाचा तसा तिला आठवत होता.
लग्न लागून गेले होते. अक्षता रिसेप्शनसाठी तयार होत होती. थोड्यावेळाने ती बाहेर येणार होती इतक्यात तिचे बाबा तिला बोलवायला आले. तिला एका बाजूला घेतले.
" अगं अक्षू , तू तूझं एटीएम कार्ड आणलयं का?"
" हो, आहे माझ्या पर्समध्ये. का ? काय झालं?"
" बेटा लग्नात माणसे वाढल्यामुळे जेवनाचे बजेट वाढले आहे, त्यामुळे जास्तीचे पैसे लागणार आहेत."
" पण बाबा माझ्या खात्यात जेमतेम दोन हजार असतील ओ."
" हो काय. बघतो कायतरी. " असं बोलून ते घाईघाईत तिथून निघाले. बाबांच्या चेहऱ्यावरील काळजीचे तिने सावट तिने जवळून पाहिले.
ती हतबल झाली होती. ती आपल्या खोलीकडे परतली. काही तयारी बाकी होती.
थोड्यावेळाने तिचे सासरे -जिजी तिला भेटायला आले. त्यांनी ती स्टेजवर जाण्यासाठी बाहेर पडत असतानाच तिच्या हातात एक लिफाफा ठेवला.
" बाबा काय आहे हे."
" काही पैसे आहेत, ते तुझ्या बाबांना दे."
" नाही बाबा, मी नाही घेऊ शकत हे पैसे."
" बेटा तूच घेऊ शकते, तुझे मानी बाबा ते कधीच घेणार नाहीत म्हणून तुझ्याकडे देतोय. मघाशी मी त्यांना म्हणखलो देखील कि हॉलचे जादा लागलेले पैसे मी भरतो, पण ते ऐकले नाहीत म्हणून तुझ्याकडे देतोय"
" पण बाबा?"
" बेटा मी तुमचे बोलणे ऐकलेय. एका बापाची काळजी मी समजू शकतो. नाही म्हणू नकोस. हवंतर मैत्रिणी कडून घेतले असे बोल." असे बोलून जिजी तिथून निघून आले.

सासूबाई लग्नापूर्वीच सोडून गेल्यामुळे आता साऱ्या घराची जबाबदारी अक्षतावर पडली होती. कुटुंब जरी लहान असले तरी सगळ्या जबाबदाऱ्या अक्षतालाच पार पाडाव्या लागत होत्या. जिजी मनोजच्या काहीश्या मनमानी स्वभावामुळे काळजीत असायचे.
आता लग्न होऊन जेमतेम चार वर्षे झाली होती आणि मनोज स्वतंत्र राहायचे म्हणत होता. अक्षताचे मन याचा विचारही करू शकत नव्हते. अशी गोष्ट मनोज करत होता.

अशातच एक सुंदर गोष्ट मनोज आणि अक्षताच्या जीवनात आली. अक्षताला दिवस गेले होते. सगळ्यांनाच आनंद झाला. सासरे तर अक्षताला जपायला लागले. अक्षताला वाटायचे ते आईच्या मायेने सासूबाईंचीच भूमिका पार पाडत आहेत. पण हे सारे मनोजला उमगत नव्हते. त्याला बाबांचा हस्तक्षेप नको होता. एक दिवस तर त्याने कहरच केला.
" तुम्ही आमच्यामध्ये नाक खूपसू नका, तिला माहीत आहे मूल कसं वाढवायचं ते." मनोज असं म्हणाल्यावर बाबा काही न बोलताच तिथून निघून गेले.
अक्षताला खूप वाईट वाटले. मनोजचा खूप राग आला. अक्षता बाबांच्या खोलीत आली तेव्हा जिजी बॅग भरताना दिसले. तिच्या काळजात धस्स झाले.
" बाबा, काय करताय हे."
" काही नाही पोरी. आक्काकडे चार दिवस राहून येतो. तिथून आपल्या गावच्या घरी पण जातो, मला तेवढाच बदल आणि तुम्हालाही."
" बाबा, आम्हाला काहीच अडचण नाहीये, तुम्ही हवे आहात आम्हाला."
" अक्षू, मला ना आता खूप जगलोय असं वाटू लागलंय. आता फक्त नातीचे तोंड पाहीले कि मरायला मोकळा"
" बाबा, काय बोलताय हे? " असे बोलून त्यांच्या तोंडावर हात ठेवला.
" देशील मला नात?"
" हो , पण नातच का? नातू का नको?"
" मनोजला म्हातारपणी कोण पाहील गं? नातू मनोजसारखा वागला तर? मला आज वाटतंय, आम्हाला एक मुलगी हवी होती. "
" मग मी कोण आहे? किती विचार करता बाबा. मी समजावते मनोजला. तो जे आज वागला ते चूकीचे आहे."
" नको समजावू, त्याचे म्हणणे बरोबर आहे. त्याला फक्त माझे बोलणे नकोय. तुला माहीत आहे, हाच मनोज लहाणपणी मी गोष्ट सांगितल्या शिवाय अजिबात झोपत नसायचा. माझा आवाज, माझी बडबड त्याला कायम हवी असायची. खूप हळवा होता तो. नंतर इंजिनिअरिंगसाठी बाहेर राहीला तो पूर्ण बदलूनच गेला. घरी आल्यावर घुम्यासारखा असायचा. आम्हाला उलट उत्तरे द्यायचा. त्याची आई हार्ट पेशंट त्यात याचे हे वागणे, यामुळे तिचे दुखणे बळावत गेले. तिने तसं बोलूनही दाखवलं. आपला मनोज बदललाय. मी त्याला समजावून सांगायचो. तो तेवढ्या पूरते ऐकायचा. याच्या अशा वागण्याचा धसका घेऊन कि काय.. तिने राम म्हटला. तो त्यावेळी पुण्यात होता. नंतर त्याचे लग्न करताना वाटले तुला आम्ही फसवत तर नाहीये ना?
अक्षू एक विचारू? "
" हा बाबा , विचारा."
" तुझ्याशी तरी नीट वागतो का?"
" हो." तिच्या अस्पष्ट हो ने जिजी काय समजायचे ते समजले. इतक्यात अक्षताचा मोबाईल वाजला. मनोजचाच फोन होता. बाबांना इलेक्ट्रीसिटीचे बिल भरायला सांगण्यासाठी कॉल केला होता.

'तुझ्याशी तरी नीट वागतो का? ' हे सासऱ्यांचे वाक्य तिच्या कानात दिवसभर घुमत राहीले.

जिजी दुसऱ्या दिवशीच आक्का (त्यांची बहीण ) कडे निघून गेले. अक्षताला मनोजमधला फरक जाणवला. तो खूश होता. अक्षता मात्र अपराधी भावनेत होरपळत होती. अक्षता आपले मन आपल्या आईकडे मोकळे करायची. या सगळ्या प्रकारात तिला खूपच त्रास झाला होता. मनोज विरोधात ती एक ही शब्द काढू शकत नव्हती. शिवाय समजावण्याचा पलीकडे त्याचे वागणे गेले होते. तिची आई समजूत काढायची. शिवाय पोटात एक जीव वाढत होता. त्यासाठी तरी तिला खूश राहायचे होते.

एक मनोज ऑफिसमध्ये गेला असताना जिजींचा फोन आला. अक्षताला खूप बरे वाटले. ते गावी गेल्यापासून काहीच खूशाली समजली नव्हती.
" बाबा कसे आहात."
" मी मस्त मजेत आहे. मनोज कसा आहे?" मनोजचे त्यांच्याविषयी वागणे माहीत असूनही त्यांनी मनोजची विचारणा केल्यावर परत एकदा अक्षताला जिजींविषयी आदर वाढला.
" तो बरा आहे?"
" तू? आणि आमची छकूली कसे आहात?" ते लाडात येऊन म्हणाले. मुलामुळे गावी जाऊन राहावे लागले याबद्दल त्यांच्या मनात तीळमात्रही तक्रार दिसत नव्हती.
" मी बरी आहे आणि छकुलीची हालचाल वाढलीय."
" अरे वा, मजा आहे एका माणसाची."
" कसली मजा बाबा? तुमची खूप आठवण येतय ."
" पोरी माझी कसली आठवण काढतेस? माझ्या नातीला जप. मी तुझ्या आईला यायला सांगितलंय."
" कुठे?"
" तुमच्या घरी. तुझी काळजी घ्यायला."
" बाबा." तिचा कंठ दाटून आला होता. जिजीनी स्वतःच्या मालकीचे घरही मनोमन दोघांना देऊन टाकले होते. नेहमीप्रमाणे त्यांनी विषय बदलून अक्षताला हसायला भाग पाडले. अशा त्यांच्या मनोज नसताना तासनतास गप्पा चालायच्या. अक्षतासाठी जिजी हे आई, बाबा, मित्र सारं काही तेच होते. चार दिवसांनी अक्षताची आई तिच्याकडे राहायला आली. दिवसांमागून दिवस गेले. अक्षताच्या ओटीभरण कार्यक्रमासाठी जिजी आले. तिला खूप आनंद झाला. ती माहेरी जायला बाहेर पडली तसे तेही गावी जायला निघाले. मनोजने एका शब्दाने त्यांना अडवले नाही. फक्त जाण्यापूर्वी तो एक मात्र बोलून गेला.
" बाबांना एकटे राहायचा सराव होतोय ते बरंच आहे" अक्षताच्या जवळ पूटपुटलेले वाक्य जिजींनी ऐकले होते. ते काहीच बोलले नाही. मनोजने मागच्या महिन्यातच घर बुक केले होते ते अक्षता आणि त्यांना दोन दिवसापूर्वी कळाले होते. अक्षता आतून तुटून गेली होती. तिला वेगळे राहायचे नव्हते. जिजींनी त्यांच्या नातीसोबत काही क्षण घालवावेत असे वाटत होते. जिजींना नवीन घरात घेऊन जाण्याविषयी मनोजकडे बोलायला ती घाबरत होती. मागे एकदा असचं तिने विषय काढला होता तेव्हा मनोज तिला खूप बोलला होता.

काही दिवसांनी अक्षताच्या उदरी एक सुंदर मुलगी जन्माला आली. सर्वप्रथम तिने जिजींना कळविले. जिजी धावत मुंबईला आले. तिला, इवलासा जीव उचलून घेतलेले जिजींचे हात थरथर कापताना दिसले. जिजींची तब्येत खालावली होती. ते खूपच थकले होते. बोलताना धाप लागत होती.
" बाबा, तुम्हाला बरं नाहीये का?"
" अगं, जरा खोकला झालायं." खोकल्याची उबळ आली तसे बाजूला झाले..
बारसा अक्षताच्या माहेरी झाला. बारश्यापर्यंत थांबून जिजी गावी निघून गेले.
थोड्या दिवसानी अक्षता घरी आली. ती उर्वीच्या बाललीलांमध्ये रंगून गेली. जिजींशी फोनवरील बोलणे कमी होऊ लागले. एक दिवस जिजींचा फोन आला पण लाईनवर जिजी नव्हते तर जिजींच्या गेल्याची बातमी होती. अक्षता जाग्यावरच कोसळली. तिने स्वतःला सावरून मनोजला कॉल केला. लगेचच सगळे गावी जायला निघाले.

सर्व अंत्यविधी सोपस्कार आटपून मनोज घरी आला. आंघोळ करून झाल्यावर शेजारच्या माईंनी लाल मिरचीची चटनी आणि उकडीचा करडा भात खायला दिला. सारे काही शांत होते. फक्त माईंची तेवढी जिजींच्या चांगुलपणाविषयी बडबड चालू होती. कधी नव्हे ती छोटी उर्वी खूप रडत होती. अक्षता तिलाच थोपवत होती. इतक्यात मनोजने जोरात हंबरडा फोडला. ताटातील भात मिरचीच्या चटनीसोबत बकाबका खात तो रडू लागला. त्याला त्याच्या वागण्याचा पश्चाताप झाला होता. माई त्याला पोटाशी धरून सांत्वन करू लागली.
" अक्षता ,आपल्या अगोदर बाबाच आपल्याला सोडून वेगळे राहायला गेले गं."
असे बोलून ओक्साबोक्शी रडणारा मनोज अक्षताला वेगळाच भासला. अक्षता मनोजजवळ येऊन त्याला धीर देऊ लागली. बापाचा आवाज ऐकून की काय छोटी उर्वी रडायची थांबली होती. तिने नकळत मनोजचे एक बोट पकडले. त्याने चमकून छोट्या जीवाकडे पाहिले. आपणही असे जिजींचे बोट पकडून बालपण मिरवले असेल आणि त्याबदल्यात त्यांना काय दिले? एकाकीपण ? त्याला परत एकदा हूंदका आवरेणासा झाला.
" अक्षू मला बाबा हवे आहेत गं , मी त्यांना कधी समजूच शकलो नाही." एका मुलीचा बाप एखाद्या लहान मुलासारखा रडू लागला. त्यांना इकडेतिकडे शोधू लागला. जिजी मात्र केव्हाच स्वतंत्र राहायला गेले होते

**नितीन दशरथ राणे

कथाविश्व - गोड कथांचे अनोखे विश्व 🎉

05/05/2025

#कहानी_पूरी_फिल्मी_हैं ©®विवेक चंद्रकांत....
#कथाविश्व
सेकंडलास्ट लेक्चर संपल.शेवटचे लेक्चर खेमकर सरांचं.लई बोअर करतो बाबा.सोडलं. कॉलेजच्या बाहेर आलो.टपरीवरून गोल्ड फ्लॕक घेतली.मस्त धूर छातीत भरून घेतला.खरेतर एक माणीकचंद तोंडात ठेवायची होती.पण एकदा तोंडात ठेऊन घरी गेलो आणि मातोश्रींनी खाडकन् कानाखाली वाजवली. तेव्हापासून सोडली.नाही आपण थोडेफार वाया गेलो आहे एकुलते एक म्हणून पण इतकेही नाही.आईबापाच्या कष्टाची किंमत आहे आपल्याला. पण तरी वाटते की या वयात नाही करणार तर केव्हा करणार मज्जा. आणि पैसा आहे ना? नसताच तर काय कोणाचे उपटून पैसे मिळवले असते का? जाऊ द्या . पुन्हा एक कश मारला

तेवढ्यात मोबाईल वाजला. ओळखीचा नंबर नव्हता ." हॕलो?"

"हॕलो मी माधवी बोलतेय"

च्यायला कोण ही माधवी.काही आठवेना. तरीही समोर लेडीज आवाज म्हणून जरा सभ्य आणि मऊ आवाजात बोललो"कोण माधवी?"

"तू चेतन ना? मी ...म्हणजे प्रसादची मैत्रीण.प्रसाद तुझा मित्र बारावीतला "

डोक्यात प्रकाश पडला,प्रसाद आपला जिगरी फ्रेन्ड.त्याला माधवी जाम आवडायची. दिसायला गोडचं होती.मग आपणच त्यांचे सेटींग करून दिले. त्यालाही आता तीन एक वर्ष झाली असतील.नंतर तो दुसऱ्या कॉलेजात गेला.मी दुसऱ्या .त्यामुळे फारसा संबंध नाही.आता त्याच काय?

"बरं मग?"

"आजकाल प्रसाद माझ्याशी धड बोलत नाही. सारखा मला टाळतो. माझे फोन घेत नाही. मेसेजचे रिप्लाय नाही. फार टेन्शन झालेय रे.एकतर आमचे दोघांचे अफेअर अख्ख्या कॉलेजला माहित. आता त्याने सोडले तर माझी किती बदनामी ? प्लीज तू बोलतोस का त्याच्याशी ?"

खरेतर मी कधी प्रेम बीम या भानगडीत पडलोच नाही. तसं एकदोन पोरींनी सांगितले क्रश आहे म्हणून.पण आपण नाही म्हणून मोकळे झालो.तिची मर्जी सांभाळा.महागड्या गिफ्ट द्या . त्याना CCD त न्या. आपल्या बापाकडनं पण होणार नाही. अगदी तोंडावर आले की बाई तू तुझं बघ.मी फक्त तुमच जमवून दिले.मी काही मध्यस्थ आहे का लग्नातला.तुमची जबाबदारी घ्यायला. पण पोरगी इतकी विनवतेय तिला तोडणे जमेना. म्हटले "ठिक आहे. बोलतो त्याच्याशी"

"थैंक्यू.मला माहीत आहे तू नक्की मदत करशील मला.दोनतीन जण बोलले मला,चेतनशी बोल म्हणून .प्लीज....."पुढे काही बोलताच येईना तिला.बहूदा कंठ दाटून आला वै.म्हणतात ना तसं झालं असावे. सालं असे काही झालं की मला फार इमोशनल व्हायला होतं. सिग्रेटचा चटका बोटाला बसला आणि भानावर आलो. मोबाईलमधून प्रसादचा नंबर काढला आणि फोन लावणार तेवढ्यात म्हटले नको.पहिले याचं काही दुसरे लफडे होते का ते बघू.त्याच कॉलेजला अविनाश ंअसतो.त्याला विचारू.मग प्रसादला बघू. अविला फोन केला.

"हॕलो.अव्या?चेतन बोलतोय.."

"माहिती आहे.आज गरीबाची कशीकाय आठवण झाली?सुर्य पश्चिमेला उगवला का बघतो .थांब"

"ए अव्या .भंकंस नको.प्रसादला ओळखतो ना?"

"हो.चांगलाच.माझा बॕचमेटच आहे. काही लफड झाले?"

" नाही रे,आजकाल तो माधवी म्हणून त्याची जीएफ् आहे.तिच्याशी नीट वागत नाही. तीचा फोन आला होता मला. त्याने काही दुसरे लफडे सुरू केले का हिला सोडून ?"

"चेत्या,भडव्या तू आता हेही सुरू केल का? कॉलेजच्या निवडणूकीत उभं राहायचयं का?"अव्या खिदळला.

"बी सिरीयस यार. कोणी पोरगीबिरगी रडायला लागली की आपल्याला राहवत नाही"

"बरं .राहीलं,पण तस काही वाटत नाही,आता आत्तापर्यंत तर फिरत होता तिच्याबरोबर.पण प्रसाद अभ्यासू पोरगा आहे रे.नेहमी पहिला येतो वर्गात .बोलू का त्याच्याशी?"

"नको.मी बघतो."

प्रसादला फोन लावला.

"बोल चेतन.बरेच दिवसात आठवण झाली."

"प्रसाद.ते बाकी मरू दे सर्व .मला फक्त एकच सांग,माधवीशी संबंध का तोडले?"

"अच्छा .म्हणजे तक्रार तुझ्यापर्यंत गेली तर."

"खरे आहे तर हे"

"हो .शंभर टक्के खरे. अरे फार डोके खायची.सारखे चॕट.दिवसातून दोनदा भेटणे कंपल्सरी.आठवड्यातून एकदा हॉटेल. एक रिप्लाय नाही दिला तरी फोन.वैतागून गेलो अगदी.रात्री दोन दोन वाजेपर्यंत चॕटींग.माझ्या प्रॕक्टीकल्सच्या नोटस् अनकंप्लीट,दिलेला प्रोजेक्ट अनकंप्लीट. मागच्या सेमीस्टरला मार्कही कमी पडले.चेत्या तुला माहीती आहे.मी हुशार आहे .कॕम्पस् मध्ये माझे सिलेक्शन होऊ शकते. माधवी चांगली आहे.खूप प्रेम करते माझ्यावर .पण अतिरेक होतोय रे. माझ्या करियरचा प्रश्न आहे रे"

" तिच्यामागे कोण लागल होतं?"

"कबुल आहे.पण मला चांगली नौकरी मिळाली तर आमच दोघांचही भलंच होईल ना?"

"म्हणजे तू तिच्याबाबत सिरीयस आहेस."

"अॉफकोर्स यार.पण आमच्या दोघांच्याही भविष्याच्या दृष्टीने काही दिवस तरी.....फायनल एक्झाम जवळ आलीय "

" माठ्या ...हे माझ्याशी बोलण्यापेक्षा तिच्याशी बोलला असता ना?ओके.मी बोलतो तिच्याशी.पण तिला सोडले तर बघ हं?"

"प्रश्नच येत नाही"

च्यायला बरे झाले आपण पोरीच्या लफड्यात नाही पडलो.दरवर्षी अॉल क्लिअर होत आहे,तेही नसतो झालो.माधवीला फोन लावला म्हटलं बघ पुढचे दोन महीने त्याच्याशी बोलायचे नाही त्याला मेसेज करायाचा नाही.त्याला भेटायच पण नाही.ते एक दुजे के लीए पिक्चरमध्ये आहे ना तस! तिथे एक वर्ष होतं इथे दोनच महिने आहेत.कबुल असेल तर सांग.गॕरेन्टी माझी.
थोडी खळखळ केली तिने पण मान्य केलं.

©®विवेक चंद्रकांत...

हे सर्व आपण विसरूनच गेलो होतो. चार एक महिने तरी झाले असतील .टपरीवर गोल्डफ्लॕक शिलागावली तर माधवीचा फोन.मनात म्हटले मेलो आपण .नको त्या भानगडीत पडलो होतो ना?

"चेतन.... अरे प्रसादचे कॕम्पस सिलेक्शन झाले.आज रात्री आम्ही दोघे हॉटेलमध्ये जेवायला जाणार आहोत.तू पण ये.खरेतर ही पार्टी माझ्याकडून आहे तुला."

मी म्हटलं "नको गं. उगाच कशाला कबाबमे हड्डी.तुम्ही एंजोय करा"

"नाही.तुला यावचं लागेल.आणि तू जे केल तर त्याबद्दल पुन्हा थॕंक्यू. तुझी अगदी भावासारखी मदत झाली. आणखी एक काम करशील तुझ्या या बहिणीसाठी?"

"बोल..."

"सिगारेट ओढणे सोडशील?"

"पण तुला कोणी सांगितले ..."

"ते जाउदे.सोडशील ना प्लीज?" तिचा आवाज कातर झालेला.

"हो..." माझा आवाज मलाच ओळखू आला नाही.गळ्यात आवंढा आला म्हणतात ना ते काय असतं हे समजलं. हातातील गोल्डफ्लॕक फेकली. सालं हे फार कठीण प्रकरण आहे.इमोशनल ब्लॅकमेलींग. पण का कोण जाणे खरचं खूप छान वाटतयं. संध्याकाळी जरा दाढीबीढी करून छान ड्रेस करून जावं लागेल . बहीणीबरोबर जेवायला जायचय ना? आणि सालं आपल्या डोळ्यात सारखं पाणी का येतय? आनंदाने की सिगरेट सोडल्याच्या दुःखाने?....

तीने परिस्थितीशी तडजोड करून आपल्या सावळ्या रंगालाच स्वतःची कमजोरी मानलं होतं.आणि त्याची भरपाई सगळ्यांची गुलामी करून तीने...
04/05/2025

तीने परिस्थितीशी तडजोड करून आपल्या सावळ्या रंगालाच स्वतःची कमजोरी मानलं होतं.आणि त्याची भरपाई सगळ्यांची गुलामी करून तीने केली होती. एकमेव सासरे होते जे तिच्या गुणांची कदर करून प्रशंसा करत,पण त्यांच्या मृत्यूने मायेचा वाहणारा अखंड झराही आटला..आता तर सासुबाई पण जिवंत नाहीत पण तरी दोन्ही नणंदा येता जाता तिला सावळेपणाची जाणीवकरून द्यायच्या....अस्मिता आपल्या विचारात अशी हरवली कि तिला कळलेच नाही कि अविनाश तिच्याजवळ उभा आहे ते. लवकर नाश्ता दे..मला आॅफीसला जायचे आहे..ती काहीन बोलता उठली..टेबलवर नाश्ता ठेवला..अविनाश नाश्ता झाल्यावर म्हटले,"अस्मिता, मी रूपा ताई,सोना आणिश्वेता ला बोलावले आहे. संध्याकाळपर्यंतसगळे येतील. रात्रीच्या जेवणात सगळ्यांच्या आवडीचे पदार्थ बनव. तुला तर सगळ्यांचीच आवड माहित आहे" अविनाश आदेश सोडुन निघुन गेले...अस्मिता मनातल्या मनात विचार करू लागली. आजपर्यंत दुसर्यांच्याच आवडीनिवडी जपत आलीय ती. तिच्या आवडी तर एवढ्या दिवसात ती विसरूनच गेली. जाऊदे मरूदे..आज ती आपला मुड अजिबात खराब करणार नाही..सध्या ती आपला मुलगा श्लोक साठी स्वतः नाश्ता बनवणार होती...दोन वर्ष विदेशात राहुन आलाय श्लोक. मुंबई मध्ये बीटेक झाल्यावर लंडनमध्ये त्याला एमबीए करण्याची संधी मिळाली. अस्मिता ने काळजावर दगड ठेवुन त्याला जाण्याची परवानगी दिली होती. मनात नेहमी विचार येत"काय माहित मुलगा घरी येइनच म्हणून..तिथेच सेटल होऊन एखाद्या विदेशी मुलीबरोबर त्याने लग्न केले तर..?"ती नेहमी मुलगा घरी येण्यासाठी देवाला प्रार्थना करायची..तिची प्रार्थना फळाला आली. श्लोक परत आला आणि त्याला मुंबईत चांगल्यापगाराची नोकरी मिळाली. त्याला येऊन दोनच महिने झाले होते पण मुलीच्याबापांनी त्यांच्या घराचा उंबरठा झिजवला होता. एकापेक्षा एक वरचढ,सुंदर मुलींचे फोटो आणि बायोडाटा घरात पडले होते. लग्न तर त्याच करायचंच होत पण कुणाशी हा मोठा कठीण निर्णय होता. त्यामुळेच तर अविनाशने आपल्या दोन बहिणी आणि मुलीला बोलावले होते...आज शनिवार..श्लोक ला सुट्टी..त्यादिवशी तो उशीरा उठतो..अस्मिता हळुच त्याच्या खोलीत शिरली. आणि मुलींचे फोटो मोठ्या कौतुकाने पाहु लागली..तिला माहित होतं त्याबद्दल घरात तिचा निर्णय कुणीही ऐकला नसताआणि नणंदा आल्यावर तिला फोटोही बघायला नसते मिळाले..आपली सासु आणि नणंदाकडुन होणारी हेटाळणी ती पहिल्या दिवसापासून सहन करत आली होती. हा एक निव्वळ योगायोग होता कि तिच्या सासऱ्याने आपल्या एकुलत्या एक मुलासाठी आपल्या जिवलग मित्राची सावळी मुलगी पसंत केली होती..पण त्यांनी तिच्या रंगाला नाही तर गुणांना पाहिले होते. पण तिचा सावळा रंग तिच्या गुणांवरही भारी पडला..अविनाश आपल्या आई आणि बहिणीसारखाच सुंदर होता. पण गोऱ्या मुलाची सावळी बायको मात्र त्यांच्या पचनी पडत नव्हती..हे खरं आहे कि अविनाशने तिच्या रंगाकडे दुर्लक्ष केलं.पण त्याच्या बहिणी आणि आईने अस्मिता च्या मनावर केलेल्या जखमांना तो फुंकर घालु शकला नाही. अस्मितेचं नशिब चांगल कि तिचे दोन्ही मुलं गोरी झाली. पहिला मुलगा झाला तेव्हा ती त्याला प्रेमळ नजरेने पाहतच होती कि सोना चा आवाज तिच्या कानात शिरला.. "थँक्स गाॅड,हा दादावरच गेला ते,नाहीतर आमचं खानदानंच काळं झाल असतं.."अस्मिता च्या हदयाचं पाणी पाणी झालं..पुन्हा मुलीच्या जन्माच्या वेळी ही हेच ऐकायला मिळालं..पण ह्या वेळेस टोचुन बोलणारी रूपाताई होती."बरं झालं बाई,मुलगी आमच्यासारखी झाली..अस्मितासारखी झाली असती तर लग्न जमवताना नाकीनऊ आले असते.." अस्मिता ने विषाचा तो घोटही पचवलाआणि मुलांच्या देखभालीत गुंग झाली....चार वाजता दोन्ही नणंदा,त्यांचे यजमान मुले आणि श्वेता व तिचा नवरा आले..हाॅलमध्ये श्लोक च्या लग्नाविषयी त्यांची चर्चा सुरू झाली..ह्याचर्चेत फक्त अस्मिता सहभागी नव्हती. फोटो पहाताच रूपा बोलु लागली.."अवि,तु एक मात्र चांगले केले कि आपल्या बाबांसारखी अशी तशी मुलगी तुझ्या मुलाला पसंत केली नाही ते..""नाही तर काय..दादा बाबा वहिनीला तुझ्या माथी मारून मोकळे झाले..पण खरचं तुझी शिफारस म्हणावी कि तु अशी बायको नांदवलीस.."सोनाम्हटली..अस्मिताह्या बोलण्यातुन सावरणार तोच तिची मुलगी श्वेता बोलली.."बाबा,मला वहिनी आईसारखी नको..अगदी अप्सरेसारखी हवी.." स्वतःच्या मुलीचे बोलणे ऐकुन अस्मिता सुन्न झाली..श्वेता ने आपल्या आईचे मन कधीच जाणले नाही..उलट तिचा अपमानच केला..."श्लोक तुच सांग तुला कुठली मुलगी पसंत आहे ते.."रूपा म्हटली..."मला यातील एकही मुलगी पसंत नाही" श्लोक निर्विकारपणे बोलला..."दादा,तुला कुणी मुलगी पसंत आहे का.."श्वेता ने विचारले.."नाही...""मग कशी मुलगी हवीये तुला..?" श्वेताने विचारले.."सांगु..?" श्लोक उठला आणि अस्मिता च्या गळ्यात हात टाकुन म्हटला..."मला अगदी माझ्या आईसारखीच बायको हवी..""काय वेडबिड लागलय काय तुला श्लोक..मूर्खा सारखं बोलु नकोस" सोना ओरडली..."नाही आत्या,मी पुर्ण शुद्धीत बोलतोय..मला माझ्या आईसारखीच मुलगी हवी...ती जी मुलगी पसंत करेन त्याच मुलीशी मी लग्न करेन.."श्लोक निर्धाराने म्हटला...सुंदरतेचा अभिमान असलेल्या रूपा,सोना,श्वेता पाहतच राहिल्या..त्यांचे सुंदर चेहरे काळवंडले...आणि अस्मिता.......तिला एका क्षणात तिच्या मुलाने आभाळाएवढ्या उंचीवर बसवले..आयुष्यभरअपमान सहन करणाऱ्या अस्मिताला तो एक क्षण अपार मानसन्मान देऊन गेला..तिचा सावळा चेहरा आनंदाने उजळून निघाला...आणि डोळ्यातून आनंदाश्रू वाहु लागले...ह्या आनंदाश्रूत तिने आयुष्यभर सहन केलेली उपेक्षाही वाहुन गेली....

अशक्य ही शक्य

जो पुरुष अपनी यौन इच्छाओं पर नियंत्रण रख सकता है, वही लंबे समय तक इस धरती पर सुख-शांति से जी सकता है।पुरुषों को ये समझना...
02/05/2025

जो पुरुष अपनी यौन इच्छाओं पर नियंत्रण रख सकता है, वही लंबे समय तक इस धरती पर सुख-शांति से जी सकता है।

पुरुषों को ये समझना चाहिए कि उनकी कई परेशानियों और पतनों की जड़ कई बार कई गर्लफ्रेंड्स होती हैं।

हर लड़की की आत्मा अच्छी नहीं होती।

कुछ राक्षसी स्वभाव की होती हैं, कुछ में ज़हर छिपा होता है, और कुछ औरतें किसी की किस्मत को बर्बाद करने वाली होती हैं। जैसा की अभी हाल में आप सब देख चुके हैं...!!

इसलिए सावधान रहें।

---

1. हर बार अपने इरेक्शन (लिंगोत्थान) की बात मत मानो।
अधिकतर बार यह तुम्हें गलत दिशा में ले जाता है।
अगर आप अपने इरेक्शन पर नियंत्रण नहीं रख पाए, तो ज़िंदगी छोटी और गरीबी से भरी हो सकती है।

2. किसी लड़की के कर्व्स, बॉडी और फिगर को देखकर रिलेशनशिप मत बनाओ।
ये सब धोखा है, खासकर सोशल मीडिया पर। असली सुंदरता और मूल्य इससे कहीं ज्यादा होता है।

3. हर स्कर्ट के नीचे जो है, उसे हासिल करने की कोशिश मत करो।
कुछ स्कर्ट के नीचे सांप होते हैं, जो काटकर चैन छीन लेते हैं। संयम और अब्स्टिनेंस (संयमित जीवन) अक्सर सबसे अच्छा फल देता है।

4. कई गर्लफ्रेंड्स रखना मर्दानगी नहीं है।
ये सिर्फ आपको औरतबाज़, धोखेबाज़, और बच्चा बनाता है — असली मर्द नहीं।

5. सिर्फ बेड में अच्छे होने से मर्द नहीं बनते।
असली मर्द वह है जो अपनी जिम्मेदारियों से भागता नहीं, उन्हें पूरा करता है।

6. उस लड़की का सम्मान करो जो तुमसे सच्चा प्यार करती है।
किसी लड़की का प्यार और सपोर्ट मिलना आसान नहीं होता। यह उसकी भावनात्मक ताकत और ईमानदारी का सबूत है।

7. दुनिया उन्हीं पुरुषों को सम्मान देती है जो कामयाब होते हैं।
तुम्हारे पास अगर बहुत सारी गर्लफ्रेंड्स हैं, तो कोई तुम्हारी तारीफ नहीं करेगा।
ये सिर्फ समय, ऊर्जा, पैसा और वीर्य की बर्बादी है।

---

याद रखो:
ईमानदार, वफादार और ज़िम्मेदार पुरुष ही असली मर्द कहलाते हैं।
संयम ही सफलता की कुंजी है।

भुतांची यात्रा - प्रस्तुत कथा व्हिडिओ पाहून लिहिलेली आहे त्यामुळे थोडे मागे पुढे होऊ शकते सो प्लिज समजून घ्या.राकेश चा ज...
02/05/2025

भुतांची यात्रा -

प्रस्तुत कथा व्हिडिओ पाहून लिहिलेली आहे त्यामुळे थोडे मागे पुढे होऊ शकते सो प्लिज समजून घ्या.

राकेश चा जन्म एका छोट्याश्या खेडेगावातला त्यामुळे त्याच्या आई वडिलांची प्रबळ इच्छा होती की त्याने पुढे जाऊन चांगले शिक्षण घ्यावे आणि मोठे डॉक्टर बनावे,तसा मुळातच तो खूप हुशार होता, गावातील शाळेत ही तो नेहमी पहिला यायचा आणि दहावीला असताना तर तो जिल्ह्यातून पहिला आला म्हणून त्याचा आणि त्याच्या आई वडिलांचा गावात मोठा सत्कार करण्यात आला.

पुढे त्याने विज्ञान शाखेत प्रवेश घेतला आणि बारावीला ही त्याला चांगले गुण मिळवले त्यामुळे एम बी बी एस ला त्याचा नंबर लागला, त्यात त्याच्या आई वडिलांची आता स्वप्न पूर्ती होत होती पण अभ्यासाच्या ताणामुळे त्याला काही वर्ष आपल्या गावात यायला जमलेच नाही त्यामुळे तो नाराज व्हायचा, त्यात अधून मधून त्याचे आई वडील त्याला शहरात भेटायला यायचे पण गाव ते गाव असते म्हणून शेवटी त्याने काही दिवस सुट्टी घेऊन गावाला जायचा निर्णय घेतला.

जवळपास चार वर्षांनी आता तो गावात आला पण गावात आल्यावर त्याला भरपूर बदल झालेले दिसले, गावातली लोक आधी सारखी एकमेकांसोबत मिळून मिसळून राहत नव्हती, अनेका चे आपआपसात वाद होत होते हे पाहून थोडा निराश झाला, पुढे तो आपल्या आजी आजोबांना येऊन भेटला.

तसे ते ही आपल्या लाडक्या नातवाला इतक्या वर्षानंतर भेटून खूप खुश झाले, त्याला घरी आलेलं पाहून दोघांच्या ही डोळ्या त एकदम पाणी तराळल, पुढे त्याने त्यांच्या सोबत बऱ्याच गप्पा मारल्या आणि मग बोलता बोलता त्याच्या जिगरी मित्रा चा धन्याचा विषय निघाला तसा तो त्याला भेटायला त्याच्या घरी गेला, तसा धन्या तेव्हा म्हशी धुत होता पण अचानक राकेश ला समोर बघून धन्याला विश्र्वासच बसला नाही.

हातातले काम तसेच टाकून त्याने राकेश ला कडकडून मिठी मारली कारण दोघे अनेक वर्षांनी एकमेकांना भेटले होते, पुढे ते दोघं जण नंतर गावात एक फेरफटका मारायला बाहेर पडले पण राकेश ला गावातल्या लोकांच्या वागण्यात फरक दिसत होता, कोणीच एकमेकांसोबत प्रेमाने वागत नव्हतं. जिथे पाहू तिथे भांडण,ओरडणे, मारामाऱ्या चालू होत्या हे पाहून राकेश ने न राहवून धन्याला विचारले त्यावर तो म्हणाला.

“ जाऊ दे रे हे सगळे गावातल्या राजकारणामुळे, सरपंचाच्या मुलीने तालुक्यातल्या एका छपरी मुलाबरोबर पळून जाऊन लग्न केले, तेव्हा पासून विरोधक त्याला बोलतात आणि मग त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नेहमी मारामाऱ्या होत असतात, तू लक्ष नको देऊस, सोड चल आपण शेतात जाऊ..”

हे ऐकून राकेश ने ही तो विषय तिथेच सोडून दिला, पुढे ते दोघे मस्त शेतात गेले, बैलगाडी वर शेतात एक चक्कर मारून आले त्यामुळे मजा मस्ती करण्यात त्यांना वेळेचं थोडे ही भान राहिले नाही,पुढे आता दिवे लागायची वेळ झाली होती त्यामुळे आजी आजोबा काळजी करतील म्हणून राकेश ही लगबगीने घरी जायला निघाला तसा त्याचा मित्र ही त्याच्या घरी निघून गेला.

पुढे जेवण झाले आणि आजोबांनी राकेश चे अंथरूण केले हे पाहून तो म्हणाला की आपण सगळे आज गच्ची वर झोपायला जाऊ तसे हे ऐकून आजी आजोबा म्हणाले.

“ बाळा आम्हाला थंड वातावरण काही सहन होत नाही, उगाच वर झोपलो तर आजारी पडू त्यामुळे आम्ही खालीच झोपू..” हे ऐकून यावर राकेश म्हणाला.

“ बर तुम्ही झोपा घरात, मी एकटा गच्चीवर जाऊन झोपतो..” असे बोलून राकेश आपले अंथरूण घेऊन गच्चीवर गेला, त्यात आकाशातल्या चांदण्याकडे आज तो एकटक बघत होता, भर म्हणून मस्त थंडगार हवा सुटली होती, त्यात रातकिड्यांचा मंद मंद आवाज आणि मध्येच कुठून तरी दोन तीन काजवे नजरे समोर यायचे त्यामुळे तो खूप खुश झाला कारण खूप वर्षांनंतर तो अश्या सुंदर वातावरणात झोपला होता त्यामुळे त्याने आपल्या मैत्रिणीला म्हणजे पूजा ला फोन केला आणि तिच्या शी गप्पा मारू लागला.

त्यात आज दिवसभरात केलेल्या धमाल गोष्टींबद्दल तो तिला तो सांगत होता, पुढे दिड दोन तास गप्पा मारून झाल्यावर त्याने मोबाईल वर वेळ बघीतली तर साडे बारा वाजले होते त्यामुळे पूजाला ही झोप आली होती म्हणून त्याने ही मोबाइल ठेवून दिला आणि थोड्या वेळात त्याला ही झोप लागली पण, तासाभराने त्याला जाग आली, त्यात त्याच्या घशाला कोरड पडली होती म्हणून तो पाणी पिण्यासाठी उठला तर त्याच आकाशाकडे एकदम लक्ष गेलं.

तसा चंद्र ढगाआड गेला होता, चांदण्याही दिसत नव्हत्या त्यामुळे आधी पेक्षा गडद अंधार पसरला होता,रातकिंड्याचा आवाज देखील येत नव्हता त्यामुळे वातावरणात एक भयाण शांतता पसरली होती यामुळे राकेश जरा विचारात पडला, थोड्या वेळापूर्वी इतकं सुंदर वातावरण होत ते अचानक काही वेळात इतकं भकास का वाटू लागलंय तो असा विचार करत असताना च एक विचित्र आवाज त्याच्या कानावर पडू लागला तो म्हणजे वाद्य वाजवन्याचा आवाज आणि तो आवाज ऐकण्याचा प्रयत्न करू लागला पण तसे पुढे हळु हळू वाद्यांचा आवाज स्पष्ट होत गेला त्यामुळे तो उठून कठड्याजवळ येऊन उभा राहिला.

त्याला दुर काही अंतरावर मशाली दिसू लागल्या आणि त्याच्याच घराच्या दिशेने त्या येत होत्या पण इतक्या रात्री हे कोण आहेत हे तो पाहू लागला, तसे काही वेळात वीस पंचवीस जण हातात मशाली घेऊन अर्धनग्न अवस्थेत एक वेगळाच आवाज करत येत होते, ते ओरडत, रडत येत होते.

त्यातले काही जण आपल्या शरीरावर चाबकाचे फटके मारत होते त्याचा आवाज ही परिसरात घुमत होता तर काही जण वाद्य वाजवत होते, त्याचाही आवाज खूप भीतीदायक वाटत होता, खर तर असा आवाज राकेश ने या आधी कधीच ऐकला नव्हता, पुढे ते हळु हळु त्याच्या घराजवळ येऊ लागले, तर त्या लोकांत काही स्त्रिया देखील असल्याचे राकेशच्याच लक्षात आले, त्यात त्या स्त्रियांनी आपले केस मोकळे सोडले होते, इतकेच नव्हे तर हिरव्या रंगाची साडी सुद्धा नेसली होती आणि त्या वेगळ्याच आवाजात ओरडत होत्या आणि आपली मान गरागरा फिरवत होत्या हे सगळे भयाण दृश्य बघून राकेशच्या तोंडचे पाणीच पळाले, त्याला दरदरून घाम फुटला आणि तो हे सगळे दृश्य धडधडत्या काळजाने लपून पाहत होता, पुढे बघता बघता ते राकेशच्याच अगदी घराजवळ आले आणि त्यांचे ओरडणे, रडणे, वाद्य वाजवणे एकाएकी थांबले.

त्यामुळे परिसरात पुन्हा एकदा जीवघेणी शांतता पसरली त्यामुळे त्याने आवंढा गिळला पण त्या जीवघेण्या शांततेत तो आवाज ही स्पष्ट ऐकू आला यामुळे आता पुढे काय होतंय ते तो पाहू लागला तितक्यात तो घामाने अगदी ओलाचिंब झाला होता आणि मग खाली वाकून बघत असताना राकेशच्या कपाळा वरून एक घामाचा थेंब टपकन खाली पडला आणि जे व्हायला नको होत ते झालं.

त्यातल्या काही बायकांना राकेश ची चाहूल लागली आणि त्याने झटकन वर पाहिलं आणि त्यांची नजरानजर झाली, त्यात त्यांचे विस्कटलेले केस, लालभडक डोळे पाहून राकेश पुरता घाबरला आणि त्यामुळेच त्याच्या हाता पायातला त्राणच निघून गेला, तशी त्याची इच्छा असताना ही तो तिथून हलू शकत नव्हता, उलट कोणीतरी फक्त नजरेने जखडून ठेवल्या सारखे त्याला झाले होते, त्यात या बायक्या त्याच्या कडे पाहत विक्षिप्त पणे हसू लागल्या आणि तितक्यात नकळतपणे तो वरून खाली त्यांच्या पुढ्यात येऊन पडला, त्याला जागेवरून हलता येत नसले तरी तो भयाण प्रकार बघायला नको म्हणून त्याने डोळे बंद केले पण जसे त्याने डोळे मिटले तसे सगळे काही एकदम शांत झाले, पुढे बराच वेळ तो तसाच पडून राहिले पण काही वेळाने त्याने हिम्मत करून डोळे उघडले आणि त्याला धक्काच बसला.

त्या बायका त्याच्या समोर मांडी घालून बसल्या होत्या आणि काही तरी खात होत्या हे पाहून त्याने डोळे नीट उघडुन पाहण्याचा आणि काय चालले आहे समजून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा कळले की त्या बायका एका जिवंत मांजरीला ओरबाडून खात आहेत. ती मांजर असहाय्य होऊन त्यांच्या तावडीतून सुटण्याचा निष्फळ प्रयत्न करत होती पण तो मात्र केविलवाण्या नजरेने त्या मांजरीच्या डोळ्यात बघत होता.

तितक्यात अचानक एकीने मांजरीच्या मानेचा चावा घेतला आणि माने पासून पोटापर्यंतचा भाग टर्रकन फाडला त्यामुळे अवयवांचा एक लगदा बाहेर आला आणि त्या सोबतच रक्ताची एक धार राकेशच्या चेहऱ्यावर उडाली,आता मात्र त्याला कसलीच शुद्ध राहिली नव्हती, तो फक्त विस्फारलेल्या डोळ्यां नी समोर घडत असलेला नकोस किळसवाणा आणि तितकाच भयानक प्रकार पाहत होता.

पुढे हळु हळु त्या बायका त्याच्या दिशेने सरकत येऊ लागल्या आणि त्यांनी राकेशचा गळा धरला पण तो मात्र अर्धमेल्या सारखा निपचित पडून होता, त्यांना प्रतिकार करण्याची देखील त्याच्यात शक्ती उरली नव्हती,पुढे हळु हळु त्याच्या डोळ्यां समोर अंधारी येऊ लागली आणि तो एकदम बेशुद्ध झाला.

काही वेळानंतर नकळत त्याचे डोळे उघडले आणि त्याने समोर पाहीले तर ते सगळे जण त्याचीच वाट पाहत होते, पुढे त्याच्या हातात एक मशाल दिली गेली आणि त्याने त्या मशालीच्या प्रकाशात स्वतःकडे पाहिले तर तो ही आता अर्धनग्न अवस्थेत होता हे पाहून त्याच्या लक्षात येत नव्हते की हे काय चालू आहे, तसे त्याने मागे वळून पाहिले आणि त्यांच्या सर्वांगातून विजेची एक तीव्र लहर गेली आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली कारण मागे त्याचे प्रेत तसेच पडले होते आणि तो, तो आता या मानवी जगात नव्हताच.

त्या बायका त्याला पुन्हा त्या वीस पंचवीस जणांमध्ये घेऊन गेल्या आणि मग परत त्या भयावह वाद्यांचा आवाज सुरू झाला आणि त्या सगळ्यांनी पुन्हा रडत, ओरडत ती यात्रा सुरू केली,तसा आता राकेश ही रडत ओरडत हातात मशाल घेऊन चालू लागला.

खर तर राकेश आता या जगात राहिला नव्हता त्यामुळे त्याच्या मृत्यूची बातमी दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्या गावात हा हा करता पसरली, त्यात सगळ्यांना वाटले की तो घराच्या छता वरून पडल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे पण खरे कारण काही वेगळेच होते.

त्यात त्याच्या शहरात राहणाऱ्या मित्र मैत्रिणींना त्याच्या मृत्यूची बातमी त्याच्या फोन वरून कळवली गेली त्यामुळे त्याच्या अकस्मात जाण्याने त्या सगळ्यांना खूप मोठा धक्का बसला, पुढे काही वेळात सगळे जण राकेश च्या गावी आले तर त्या सर्व मित्र मैत्रिणी मध्ये त्याची खास मैत्रीण पूजा देखील होती, खरंतर पूजा आणि राकेश दोघे एकमेकांवर खूप प्रेम करत होते पण त्यांनी त्यांचे प्रेम कधीही एकमेकांसमोर व्यक्त केलेले नव्हते.

पण राकेश आता या जगात नाही हे ऐकल्यानंतर पूजा पूर्णपणे तुटली होती कारण असं काही होईल यावर तिला विश्वास च बसत नव्हता कारण तो जाण्याच्या आदल्या रात्री कितीतरी वेळ ते एकमेकांसोबत फोन वर गप्पा मारत होते तेव्हा तर राकेश अगदी आनंदात होता आणि आज पहाटे अशी बातमी यावी यामुळे ती खूप दुखी झाली होती.

त्यात राकेश चे प्रेत बघताच क्षणी पूजा ने एकदम जोराचा टाहो फोडला आणि सगळ्यांसमोर तिने तिच्या राकेश वर असलेल्या प्रेमाची कबुली दिली पण यामुळे तिला आता खूप यातना होत होत्या तू मला असं कसं सोडून जाऊ शकतोस, मी माझं पूर्ण आयुष्य तुझ्या सोबत घालवायचे स्वप्न बघत होते,मी योग्य वेळ बघून तुला लग्नासाठी मागणी घालणार होते पण तू त्या आधी च मला सोडून गेलास अस म्हणत ती जोर जोरात रडत होती.

हे पाहून तिला तिचे मित्र मैत्रिणी सावरत थोडे बाजूला घेऊन आले, पुढे काही वेळात राकेश चे सगळे नातेवाईक गावामध्ये जमा झाले आणि त्यांनी त्याचे अंतिम विधी संध्याकाळ पर्यंत करायचे ठरवले कारण काही लांबचे नातेवाईक अजूनही यायचे बाकी होते, त्यात पुढे सगळे ते तयारी मध्ये व्यस्त झाले.

पण काही वेळानंतर त्यांच्या मित्रा मधील कोणाच्या तरी लक्षात आले की पूजा कुठे दिसत नाही म्हणून सगळी मुलं मुली तिला शोधू लागले इतकेच नाही तर तिला शोधत काही जण गावाच्या वेशीपर्यंत आले तेव्हा त्यांना दिसले की पूजा गावाच्या वेशी जवळ एकटीच जाऊन बसली आहे आणि कोणाशी तरी एकटीच बोलत आहे पण ती कोणा सोबत बोलत आहे हे कोणालाच कळेना कारण तिच्या आजुबाजुला कोणीही दिसत नव्हते.

ती स्वतःशीच बोलत होती हे पाहून सगळ्यांना वाटले की राकेश असा अचानक सोडून गेल्यामुळे तिला मानसिक झटका बसला असावा हे पाहून काही जण तिच्याकडे अवाक होऊन बघत होते तर इतरांना तिची कीव वाटत होती तेवढ्यात पूजा अचानक उभी राहिली आणि तेवढ्यात तिच्या चेहऱ्यावरचे हाव भाव बदलले, तिचा चेहरा पांढरा पडला,डोळे विस्फारले आणि तिच्या तोंडून एकदम एक वाक्य बाहेर पडले

“ राकेश, अरे राकेश थांब ना, कुठे चालला आहेस, राकेश मला पण येऊ दे ना तुझ्या सोबत..” अस म्हणत ती अतिशय वेगाने पळत सुटली.

हे पाहून काही जण तिला सावरायला तिच्या मागे गेले तर काही घाबरून तिथेच थांबले कारण ती अतिशय जोरात धावत गेली आणि पुढे एकाएक झाडी झुडपात गायब झाली, त्यात मागे पळणाऱ्या ना कळलेच नाही की काही क्षणात ती कुठे निघून गेली म्हणून त्यांच्या ग्रुप मधल्या काही मुलांनी त्यांच्या बाईकस् काढल्या आणि ते पूजा ला शोधायला निघाले.

इथे पूजा आता एक नदीच्या किनाऱ्यावर आली होती पण इतका वेळ पूजाला ती काय करत होती याचं काहीच भान नव्हत पण आता अचानक तिला शुद्ध आली, तिचे हावभाव पूर्ववत झाले होते हे पाहून तिने आजूबाजूला पाहिले आणि जरा गोंधळली च आणि मग एकदम विचारात पडली.

" मी इथे कशी आले,मी तर गावाच्या वेशीवर बसले होते मग आता इथे कशी.." असा विचार तिचे लक्ष एकदम तिच्या पाया कडे गेले तर तिच्या पायाला अनेक जखमा झाल्या होत्या कारण ती अनवाणी किती तरी वेळ पळत होती तिला कसलेही भान नव्हते त्यामुळे काटेरी झुडपातून पळत असताना तिला बरेच लागले होते.

पळून पळून तिचे पाय दुखायला लागले होते, एव्हाना आता संध्याकाळ झाली होती आणि हळु हळू अंधार पडायला सुरुवात झाली होती तितक्यात दूर कुठे तरी पूजाला काही मशाली दिसू लागल्या हे पाहून अचानक वातावरणात गारवा जाणवू लागला.

आजूबाजूला एकदम दाठ धुकं पसरल हे पाहून पूजा पुरती घाबरली होती पण आता काय करावं तिला काहीच समजत नव्हतं, त्यात आजू बाजूला कोणीही दिसत नव्हतं, पण तेवढ्यात तिला हळु हळु तिला त्या भयानक वाद्यांचा आवाज येऊ लागला आणि कोणी तरी स्वतःच्या अंगावर चाबकाचे फटके मारत ओरडतय, रडतंय अस तिला वाटू लागले.

तो जीवघेणा आवाज ऐकून मात्र आता ती घाबरली आणि बेंबीच्या देठापासून ओरडत पळत सुटली पण ती कुठे जाते आहे तिला काहीच समजत नव्हत पण कोणी तरी होत जे तिच्या पाठीमागे पळत असल्याचा तिला भास सारखा होत होता त्यामुळे ती जीवाच्या आकांताने ती पळत सुटली.

पायाखाली येणारे दगड,धोंडे आणि काटे तिला तळपायात टोचत आणि घुसत होते,त्यात या आधीच्या जखमा देखील दुःखत होत्या पन त्या वेदनांकडे दुर्लक्ष करत ती जिवाच्या आकांताने ती पळत होती,आपल्या मागे कोण आहे हे बघायची देखील तिची हिम्मत होत नव्हती, पुढे पळता पळता तिच्या पायाला जोरात ठेच लागली आणि ती पडली तोच तिला मागून एकदम आवाज आला.

“ पूजा,तुला लागलं तर नाही ना, दूर का पळतेस तू, अग मी तुझ्यासाठीच इथवर आलो आहे..“ हे ऐकल्यावर पूजाच्या हृदयात अगदी चरर झालं करण तो आवाज राकेशचा होता त्यामुळे तिने झटकन मागे पाहिले तर राकेश अर्धनग्न अवस्थेत तिच्या समोर उभा होता आणि त्याच्या एक हातात चाबूक तर दुसऱ्या हातात मशाल होती आणि सर्व अंगावर भस्म लावलेले होते आणि इतकेच नव्हे तर त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाली होती.

त्यात राकेशला अचानक समोर पाहून ती घाबरली पण दुसऱ्या च क्षणी तिनी राकेशच्या डोळ्यात बघितले आणि तिचे अश्रू अनावर झाले कारण राकेशच्या देखील डोळ्यात पाणी आलं होतं म्हणून ती त्याच्या जवळ आली आणि त्याच्या डोक्याच्या जखमेवर हात फिरवण्यासाठी हात पुढे नेला असता तो हात राकेशच्या आर पार गेला,खर तर ती राकेशला जरी पाहू शकत असली तरी त्याला स्पर्श करू शकत नव्हती हे पाहून तेव्हा राकेश म्हणाला.

” मी तुझ्या पासून आता खूप दूर गेलो आहे पूजा आणि माझ्या जवळ जास्त वेळ देखील नाही, माझ्या शरीराचे एकदा अंत्य संस्कार झाले की मला मुक्ती मिळेल..“

" तू इथपर्यंत आलीस कारण मी तुला इथं घेऊन आलो आहे आणि माझ्यासोबत जे घडलं आहे ते पुन्हा कोणासोबत पण घडू नये म्हणून मी तुला इथे बोलावले आहे..“ हे ऐकून तिला काही कळेनासे झाले म्हणून त्याने त्याच्या सोबत घडलेली सर्व हकीकत पूजा ला सांगितली.

त्या रात्रीची ती भयानक गोष्ट ऐकताना पूजाला दुःख आवरलं नाही आणि ती हुंदके देत आपले अश्रू पुसत होती, खर तर तिच्या मनात असंख्य प्रश्न होते, पुढे राकेश चे बोलणे संपल्या वर तिने त्याला विचारले.

” पण ते लोक आणि त्या बायका कोण आहेत,ते का लोकांना मारत आहेत आणि जशी तुझ्या शरीराच्या अंतिम संस्कारा नंतर तुला मुक्ती मिळणार म्हणतोयस तशी त्यांना अजून मुक्ती का नाही मिळाली..? “ हे ऐकून त्यावर राकेश म्हणाला.

" हे ते लोक आहेत ज्यांच्या शरीरावर अंत्यसंस्कार झालेलेच नाहीत, गेली कित्येक वर्षे ते असेच भटकत आहेत,यातील कोणाचा खून झाला आहे तर कोणाचा अपघात आणि पोलीस यांच्या घरच्या लोकांना शोधण्यात अपयशी ठरल्यामुळे यांच्या शरीरावर योग्यरीत्या अंत्य संस्कार झाले नाहीत आणि यांना अजूनही मुक्ती मिळाली नाही.."

“ त्यांना मुक्ती मिळत नसल्याने त्यांनी त्यांचा राग माझ्या सारख्या वर काढला पण जेव्हा मला हे समजलं तेव्हा मी त्यांना मुक्ती मिळवून देईल अशी हमी दिली..”

“ अरे पण तू कसकाय त्यांना मुक्ती देशील..? ” पूजा ने त्याला विचारले त्यावर राकेश म्हणाला.

“ गावाच्या वेशीपाशी तुला एक मोठं पिंपळाचे झाड दिसेल त्या झाडाच्या खोडाला एक छोटंसं छिद्र आहे आणि त्या छिद्रात एक पुडी ठेवली आहे, त्या पुडी मध्ये त्या सर्व अतृप्त आत्म्याच्या शरीरा वरचे थोडे थोडे भस्म आणि त्या बायकांच्या कपाळाची हळद काही प्रमाणात बांधून ठेवली आहे..“

“ त्यात त्यांचा काही प्रमाणात अंश देखील आहे,ती घेऊन जा आणि माझ्या शरीराच्या बाजूला ठेऊन दे, म्हणजेच माझ्या शरीरा सोबत त्यांच्या अंशाचा देखील अंत्य संस्कार होईल आणि त्यांना देखील मुक्ती मिळेल.." इतके ऐकल्यावर पूजा ने त्याला परत विचारले.

“ तू यासाठी माझीच निवड का केलीस, तू या कामासाठी दुसऱ्या कोणालाही निवडू शकला असतास,खासकरून तुझ्या मित्रांना किंव्हा तुझ्या जवळच्या नातेवाईकांना.." त्यावर राकेश ने उत्तर दिले.

" हा जो विधी तू करणार आहेस तो विधी करण्यासाठी मला अश्या व्यक्तीची गरज होती की त्या व्यक्तीसोबत माझं जन्मतः कोणतं ही नातं नसावं पण माझं त्या व्यक्तीवर आणि त्याच प्रमाणे त्या व्यक्तीच माझ्यावर अगदी मनापासून खरं प्रेम असायला हवं तरच त्या व्यक्तीला मी माझ्या मृत्यूनंतरही दिसू शकेन आणि आणि त्याच्या सोबत मी संवाद साधू शकेन..“

" मी किती तरी मित्रांना हा का दिल्या पण कोणीही माझा आवाज ऐकू शकले नाही,कोणी मला बघू देखील शकले नाही. पण गावाच्या वेशीवर तू मला बघितलं आणि माझ्यासोबत बोलायला म्हणून आलीस.."

“ इतरांना तू बोलतांना दिसत होतीस पण मी दिसत नव्हतो, तुझ्या मनावर परिणाम झाला असा विचार करून लोक तुला वेडी समजतील म्हणून मी तुला गावापासून दूर घेऊन आलो.."

" पूजा माझं तुझ्यावर खूपखूप प्रेम आहे ग पण मला हे तुला सांगायला खुप उशीर झाला.." त्यावर पूजा म्हणाली

" माझं पण,मला तर तुझ्यासोबत लग्न करायची इच्छा होती, मी शिक्षण पूर्ण होताच तुला लग्नासाठी मागणी घालणार होते पण मध्ये हे झालं.." हे ऐकून दोघांच्याही डोळ्यात टचकन पाणी तरळल तसा राकेश परत म्हणाला.

" तू मला बघू शकलीस आणि बोलू शकलीस यातच मला समजलं आपलं प्रेम किती निरागस आणि खरं आहे,माझं आयुष्य छोटं होतं पण मला त्या आयुष्यात माझ्यावर खरं प्रेम करणारी व्यक्ती मिळाली यातच मी माझं भाग्य समजतो.." हे बोलून परत एकदा दोघांच्या डोळ्यात पाणी आले पण आपल्या मनातली गोष्ट शेवटच्या भेटेला का होईना सांगता आली याचं त्यांना समाधान होतं.

आता राकेशला त्याच्यामध्ये काही तरी फरक जाणवू लागला हे पाहून त्याने पूजा ला सांगितले बहुतेक माझ्या अंत्यविधी सुरू झाला आहे, तू पटकन ती पिंपळाच्या झाडातली पुडी माझ्या प्रेताजवळ नेऊन ठेव नाहीतर या अतृप्त आत्म्यांना मुक्ती मिळायला अजून किती वर्षे लागतील काही सांगता येणार नाही आणि ते अजून किती निरपराध लोकांचे प्राण घेतील हे देखील सांगता येणार नाही.

आपण या जन्मात तर एकमेकांना जास्त वेळ देऊ शकलो नाही पण पुढच्या जन्मी आपण पुन्हा भेटू आणि नक्कीच एकत्र येऊ, असे बोलून दोघांनी एकमेकांना शेवटचं स्मित हास्य करून निरोप दिला आणि पूजा पळत वेशी जवळच्या पिंपळाच्या झाडापाशी गेली.

झाडाच्या त्या खोडा मधल्या छिद्रातून पुडी काढली आणि गावात आली, राकेशच्या पार्थिवाला सगळे लोक शेवटचा नमस्कार करत होते हे पाहून पूजा ने देखील नमस्कार करता करता अलगत पुडी राकेशच्या पायाच्या खाली ठेवली.

आता सगळे पुरुष मंडळी पार्थिवाजवळ आली आणि त्यांनी पार्थिव उचलले आणि त्यांची पावले स्मशानभूमी कडे निघाली हे पाहून, सगळ्या बायकांनी टाहो फोडला, पूजाला देखील अतिशय दुःख झाले होते पण आपल्या राकेशने त्या अतृप्त आत्म्यांना मुक्ती देत अनेक लोकांचे जीव वाचवले याचं समाधान तिच्या चेहऱ्यावर होतं.

ती पळतच परत नदीकिनारी गेली तर तिथे राकेश तिचीच वाट बघत उभा होता,आता त्या दोघांनी परत एकमेकांकडे पाहिले आणि परत एकदा दोघांच्या डोळ्यात अश्रू आले पण चेहऱ्यावर एक स्मित हास्य देखील होते.

खर तर त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते पण त्यांची नजर एकमेकांशी खूप काही बोलतं होती, त्यांना ठाऊक होत या नंतर ते परत एकमेकांना भेटू शकणार नाहीत पण आज त्या शेवटच्या क्षणामध्ये ते सारं काही साठवून घेण्याचा प्रयत्न करत होते.

पुढे जसा राकेशच्या चीतेला अग्नी देण्यात आला तसा राकेश हळू हळू दिसेनासा होऊ लागला, जाता जाता त्यांनी एक मेकांना पुढच्या जन्मी एकत्र येण्याचे वचन दिले आणि आणि शेवटची आपल्या प्रेमाची कबुली दिली.

पुढे हळू हळू राकेश पूजाच्या नजरेपासून दूर होत पूर्णतः दिसेनासा झाला आणि त्या सगळ्या अतृप्त आत्म्यांना एकदाची कायमची मुक्ती मिळाली..

समाप्त
#मराठी #मायमराठी #कथा #लेखक

Address

Pune
Pathardi
414102

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mr Sachin Bade posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share