Vallari Media Solutions

Vallari Media Solutions Vallari Media is a digital consultancy providing social media consultancy and services.

वल्लरी मीडिया-वल्लरी प्रकाशन यांचे फेसबुक पेज. आम्ही प्रेम, प्रामाणिकपणा आणि विश्वास या तीन तत्वावर उभे आहोत. मराठी साहित्य सृष्टीतील नवे लेखक, साहित्यिक यांच्यासाठी एक भव्य व्यासपीठ उपलब्ध करून देऊन आम्ही अल्पावधीत विक्रमी काम उभे केले आहे. Vallari Prakashan, the parent company of Vallari Media, specializes in book production, publishing, and providing a platform for writers and poets.

28/07/2026

वल्लरी प्रकाशनतर्फे ‘कृष्णकमळ’ हा तेविसावा प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा भारत इतिहास संशोधन मंडळाच्या वि. का. राजवाडे सभागृहात शनिवार, दि. १६ मे २०२६ रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ कवी चंद्रकांत दादा वानखेडे, कवयित्री नीलिमा फाटक, समर्थ फाऊंडेशनचे अध्यक्ष किरण इनामदार, यशदाचे अधिकारी व्यंकटेश कल्याणकर उपस्थित होते.

वल्लरी प्रकाशनाच्या मुख्य संपादिका प्रज्ञा कल्याणकर यांनी संपादित केलेल्या ‘कृष्णकमळ’मध्ये स्वप्नगंधा आंबेतकर, हर्षिता बेंद्रे, अनुराधा चव्हाण, चंद्रप्रकाश शिंदे, मनिषा ढगे, संध्या देशपांडे, अश्विनी जाधव, भरत जगताप, समृद्धी मुंगसे अशा नऊ कवी-कवयित्रींचा समावेश होता. यावेळी सहभागी कवी-कवयित्रींचा सहभाग असलेला काव्यमहोत्सव संपन्न झाला.

यावेळी बोलताना वानखेडे यांनी बहारदार कवितांचे सादरीकरण करत कवींना मार्गदर्शन केले. तर नीलिमा फाटक यांनी ‘कृष्णकमळ’ संग्रहावर रसग्रहणात्मक आस्वादात्मक भाष्य केले. समारंभाचे सूत्रसंचालन वल्लरी प्रकाशनाच्या संपादकीय सल्लागार मानसी चिटणीस यांनी केले. तर आभार प्रदर्शन न्यूज अँकर आरती परळकर यांनी केले.

या समारंभातील वानखेडे सर यांच्या संशोधनातील अंश -

03/05/2026

गुलबक्षी प्रकाशन समारंभातील एक क्षण -

आंबा विक्रेत्यांसाठी
02/05/2026

आंबा विक्रेत्यांसाठी

वल्लरी मीडियाद्वारे प्रस्तुत आणि वल्लरी प्रकाशनाद्वारे प्रकाशित ‘गुलबक्षी’ या बाविसाव्या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे समार...
17/04/2026

वल्लरी मीडियाद्वारे प्रस्तुत आणि वल्लरी प्रकाशनाद्वारे प्रकाशित ‘गुलबक्षी’ या बाविसाव्या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे समारंभपूर्वक प्रकाशन रविवार, दि. १२ एप्रिल २०२६ रोजी संपन्न झाले. पुणे येथील भारत इतिहास संशोधक मंडळाच्या वि.का.राजवाडे सभागृहात संपन्न झालेल्या या समारंभासाठी संग्रहात सहभागी महाराष्ट्रातील विविध शहरातून कवी-कवयित्री उपस्थित राहिले होते. यामध्ये सुरेखा मिसाळ (पुणे), रत्नाकर खरोटे (जळगाव), माधवराव देशमुख (नांदेड), प्रितम गाडगीळ (मुंबई), तुषार देशमुख (ठाणे), रेखा बारी (धुळे), पूजा बोटे (कोल्हापूर), अर्चना पाटील (अलिबाग), डॉ. चैताली भिडे (मुंबई), पौर्णिमा चिकणे (मुंबई), निर्मला गिरासे (धुळे) अशा अकरा कवी-कवयित्रींचा समावेश होता. यावेळी सह्याद्री नॅशनल स्कूलचे विद्यार्थी आर्या जगदाळे, गणेश कळसे आणि माया कल्याणकर यांनीही कवितांचे सादरीकरण केले. समारंभाचे सूत्रसंचालन प्रज्ञा कल्याणकर यांनी केले.

समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ गझलकार म.भा.चव्हाण होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह स्वाती महाळंक, कवयित्री कांचन सावंत, वल्लरीच्या संपादकीय सल्लागार मानसी चिटणीस आणि यशदाचे अधिकारी व्यंकटेश कल्याणकर होते.

यावेळी बोलताना महाळंक म्हणाल्या, ‘‘मनात दाटलेले कागदावर उमटते तेव्हा रिते वाटते, हे रितेपण समाधान घेऊन येते, ही अनुभूती कविता लिहिल्यावर येते. उत्तम काव्याची निर्मिती होण्यासाठी परिश्रम घ्यायला हवेत, मनाची चांगली मशागत व्हायला हवी.’’

महाळंक पुढे म्हणाल्या, ‘‘कविता हे व्रत आहे. कवीच्या अंतरंगात, मनात उमटणारा भावनांचा उत्स्फूर्त, सशक्त अविष्कार म्हणजे कविता होय. गेल्या काही वर्षात कवींचे पीक आले आहे, असे सातत्याने म्हटले जाते, पण या कवींमध्ये किती कस आहे हे तपासून पाहायला हवे. येत्या काळात स्वत:ला कवी म्हणवणाऱ्या प्रत्येकाने अंतर्मुख होण्याची आवश्यकता आहे.’’

कांचन सावंत म्हणाल्या, ‘‘स्वत:चे भावविश्व रसिकांसमोर उलगडणे म्हणजे कविता सादर करण्याची प्रक्रिया होय. कविता लिहिणाऱ्यांनी शब्दांच्या पलिकडचे वाचायला शिकले पाहिजे. यमकाचा अभ्यास, छंद, शब्द, लय यांचे भान कवीला असायला हवे. रियाजाने कविता चांगली होत जाते, त्यामुळे कवितेचा रियाज आवर्जून करायला हवा.’’

मानसी चिटणीस यांनी कविता संग्रहाची प्रक्रिया सांगून कवितांचा आढावा घेतला. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन संपादिका प्रज्ञा कल्याणकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरती परळकर, प्रीती पोथरकर यांनी परिश्रम घेतले.

10/04/2026

गुलबक्षी मुखपृष्ठ अनावरण -

08/04/2026

कवी चंद्रकांत वानखेडे कण्हेर प्रकाशन समारंभात बोलताना -

ही पोस्ट लिहिताना आमचं अंत:करण अपार आनंदाने भरून वाहत आहे. ही फक्त पोस्ट नाही; तर कवितेच्या प्रेमापोटी केलेल्या यत्नाची ...
08/04/2026

ही पोस्ट लिहिताना आमचं अंत:करण अपार आनंदाने भरून वाहत आहे. ही फक्त पोस्ट नाही; तर कवितेच्या प्रेमापोटी केलेल्या यत्नाची साक्ष आहे. वल्लरी मीडिया प्रस्तूत वल्लरी प्रकाशनाद्वारे प्रकाशित ‘गुलबक्षी’ हा बाविसावा प्रातिनिधिक काव्यसंग्रह आहे. ‘मोगरा’पासून सुरू झालेला हा प्रवास आज ‘गुलबक्षी’पर्यंत येऊन पोहोचला आहे आणि अविरतपणे असाच पुढे सुरू राहणार आहे. ‘गुलबक्षी’नंतर आपण एप्रिल महिन्यातच ‘कृष्णकमळ’ हा तेविसावा प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशित करत आहोत.

इथपर्यंतचा प्रवास अजिबातच सोपा नव्हता. पण आम्ही चिकटी, जिद्द आणि अपार परिश्रम घेतले; हा शब्दयज्ञात खंड पडू दिला नाही. आमच्या कवी-कवयित्रींच्या डोळ्यातील तेज आणि मनातील भावना आमच्या जगण्याचं सार्थक आहेत.

जरुर या. या रविवारी, १२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता भारत इतिहास संशोधक मंडळाच्या वि.का.राजवाडे सभागृहात.

मनापासून सस्नेह निमंत्रण!

- टीम वल्लरी मीडिया
सदाशिव पेठ, पुणे

वल्लरी प्रकाशनाचा बाविसावा प्रातिनिधिक काव्यसंग्रह. सहभाग खुला झाला आहे.
26/03/2026

वल्लरी प्रकाशनाचा बाविसावा प्रातिनिधिक काव्यसंग्रह. सहभाग खुला झाला आहे.

वल्लरी प्रकाशनाचा अवघ्या तीन वर्षांहून कमी काळातील ‘कण्हेर’ हा एकविसावा प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचा प्रकाशन समारंभ रविवार...
26/03/2026

वल्लरी प्रकाशनाचा अवघ्या तीन वर्षांहून कमी काळातील ‘कण्हेर’ हा एकविसावा प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचा प्रकाशन समारंभ रविवार, दि. १५ मार्च २०२६ रोजी भारत इतिहास संशोधन मंडळाच्या वि.का.राजवाडे सभागृहात समारंभपूर्वक संपन्न झाला.

प्रज्ञा कल्याणकर यांनी संपादित केलेल्या ‘कण्हेर’मध्ये एकूण दहा कवी-कवयित्रींचा समावेश आहे. त्यामध्ये हर्षल कापुरे (धुळे), महेंद्र आखाडे (धुळे), मदन मोदी (मुंबई), अश्विनी भागवत (नागपूर), अर्चना पाटील (अलिबाग), रेवती सोनटक्के (पुणे), सुरेखा निपसे (पुणे), डॉ. मिनल गायकवाड (लातूर), अशोक भवार (पुणे) आणि डॉ. मनोज गिमेकर (नांदेड) यांचा समावेश आहे. प्रकाशनानंतर सहभागी कवी-कवयित्रींचा काव्यमहोत्सव संपन्न झाला.

समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी चंद्रकांत वानखेडे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ गझलकार म.भा.चव्हाण, अभिनेत्री सुप्रिया कुलकर्णी, समर्थ फाउंडेशनचे अध्यक्ष किरण इनामदार, वल्लरी प्रकाशनाच्या सल्लागार मानसी चिटणीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी पुस्तक छपाई व निर्मिती प्रक्रिया करणारे विठ्ठल गवळी यांना ‘श्रमसन्मान’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना वानखेडे म्हणाले, ‘‘हृदयातून निघून हृदयापर्यंत पोहोचलेले शब्द म्हणजे कविता असते. अशी कविता लिहिणाऱ्या प्रतिभावंत कवींना व्यासपीठ उपलब्ध करून देऊन त्यांना प्रोत्साहित करणे आवश्यक आहे आणि हे काम वल्लरी प्रकाशन चोखपणे बजावत आहे.’’

सुप्रिया कुलकर्णी यांनी सहभागी कवी-कवयित्रींचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या. चव्हाण यांनी आपल्या शैलीत गझल सादर केल्या. तर इनामदार यांनी वल्लरी प्रकाशनाच्या ‘स्वर मोगरा’ या म्युझिक अल्बमविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्ञा कल्याणकर तर प्रास्ताविक ज्योती मनोहर यांनी केले. आरती परळकर यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सार्थक थोरवत, व्यंकटेश कल्याणकर, आर्या इनामदार, ज्योती मनोहर यांनी परिश्रम घेतले.

कण्हेर प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशन समारंभाचे वृत्त आज दैनिक सकाळ (पुणे) प्रसिद्ध झाले आहे.
22/03/2026

कण्हेर प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशन समारंभाचे वृत्त आज दैनिक सकाळ (पुणे) प्रसिद्ध झाले आहे.

Address

Pune

Opening Hours

Monday 2pm - 8pm
Tuesday 2pm - 8pm
Wednesday 2pm - 8pm
Thursday 2pm - 8pm
Friday 2pm - 8pm
Saturday 2pm - 8pm

Telephone

+919422442407

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vallari Media Solutions posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vallari Media Solutions:

Shortcuts

Share