25/08/2026
'अज्ञातवासी' या टोपण नावाने ऐतिहासिक कविता करणारे कवी म्हणजे दिनकर गंगाधर केळकर, ज्यांनी आपल्या छंदातून सुप्रसिद्ध राजा केळकर वस्तू संग्रहालय उभे केले असा जगावेगळा अवलिया.
बरं हे सगळ आठवण्याचं कारण म्हणजे कालच यास्मिन शेख आपल्या सोडून गेल्या आणि त्याचं नाव वाचून बालभारती मध्ये त्यांनी लिहिलेला कोणता तरी धडा होता हे आठवल.
थोडी शोधा शोध केल्यावर आम्हाला पाचवी मध्ये असलेला ‘ छंद हेच जीवन ‘ धडा सापडला, आणि आज त्याच पुन्हा नव्याने वाचन केल्यावर , आपली मराठी पुस्तके, लेखक कसे आपल्यावर योग्य संस्कार करायचे ते जाणवले.
यास्मिनबाईंनी केळकरांची मुलखात घेऊन हा पाठ लिहला होता.
पाठाची सुरुवात, कुणाला तिकीट जमवण्याचा, कुणाला रंगीबेरंगी दगडगोटे जमवण्याचा छंद असतो यापासून होतो, आणि नकळत आपल्यालाही छंद असावा अस वाटत, लहानपणीच अगदी असच वाटायचं, त्यामुळेच यास्मिन शेख आणि राजा केळकर संग्रहालय कधीच विसरलं जाणार नाही.
केळकरांनी वस्तुसंग्रहालयाच्या छंदाला इतक वाहून घेतलं होत की त्याच काळात त्यांचं घराकडे, त्यांच्या चष्म्याच्या धंद्याकडे दुर्लक्ष होत होत आणि त्याच दरम्यान त्यांचा मुलगा ‘ राजा ‘ घर सोडून निघून जातो, आणि म्हणून त्या संग्रहालयाच नाव ‘ राजा केळकर वस्तूसंग्रहालय ‘
पाठाच्या शेवटी, सत्तरीतील केळकर त्यांच्या पत्नीच्या स्मृतिप्रीत्यर्थ दुसर एक संग्रहालय उभारणीच्या कामाला वाहून घेतात असा उल्लेख आहे, पण ते नेमकं कोणत हे आज आपल्याला माहित नाही, आज याच उत्तर यास्मिनबाई नक्की देऊ शकल्या असत्या.
ऐकलंय का? च्या कामासाठी,रिसर्चमुळे अशा मोठ-मोठ्या थोर व्यक्तिमत्वाची माहिती जमवताना ,बालपण सुद्धा डोकावून जाते आपला महाराष्ट्र, आपली भाषा किती महान आहे याची प्रचिती पुनःपुन्हा येत राहते.
यास्मिन बाईं पक्क्या महाराष्ट्रीयन होत्या, जन्म महाराष्ट्रातील, शिक्षणाचा काहीं काळ पंढरपुरात आणि मराठी भाषेची सेवा, किती प्रगल्भ , निःस्वार्थ कारकिर्द.त्यांचा लिखित एकचं पाठ , योग्य वयात हाती पडला आणि आयुष्भर मनावर कोरला गेला.
यास्मिनबाई आणि त्यांच्यामुळे बालवयात ओळख झालेल्या ‘अज्ञातवासी’ केळकरांना आमचे शतशः नमन.
तुम्हाला आठवतोय का हा धडा?
तुम्ही पहिल आहे हे संग्रहालय?
© ऐकलंय का?
#यास्मिनशेख #मराठीभाषा #मराठी #व्याकरण #बालभारती #राजाकेळकरवस्तुसंग्रहालय