Aiklay Ka?

Aiklay Ka? Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Aiklay Ka?, Podcast, Pune.

Narration, Marathi Poadcast, नाविन्यपूर्ण अभिवाचन, कादंबरीचा जन्मसोहळा, कवितेच गाण,गावाकडच्या गप्पा, सकारात्मक विचार, पुस्तक अभिप्राय,बालभारती, मातीतील कलाकार - हे सगळ ऐकलंय का? ऐका-जगा-जोपासा! फॉलवर्स नाही सहप्रवासी बनून याप्रवासात आमच्या सोबत सामील व्हा

'अज्ञातवासी' या टोपण नावाने ऐतिहासिक कविता करणारे कवी म्हणजे दिनकर गंगाधर केळकर, ज्यांनी आपल्या छंदातून सुप्रसिद्ध राजा ...
25/08/2026

'अज्ञातवासी' या टोपण नावाने ऐतिहासिक कविता करणारे कवी म्हणजे दिनकर गंगाधर केळकर, ज्यांनी आपल्या छंदातून सुप्रसिद्ध राजा केळकर वस्तू संग्रहालय उभे केले असा जगावेगळा अवलिया.

बरं हे सगळ आठवण्याचं कारण म्हणजे कालच यास्मिन शेख आपल्या सोडून गेल्या आणि त्याचं नाव वाचून बालभारती मध्ये त्यांनी लिहिलेला कोणता तरी धडा होता हे आठवल.

थोडी शोधा शोध केल्यावर आम्हाला पाचवी मध्ये असलेला ‘ छंद हेच जीवन ‘ धडा सापडला, आणि आज त्याच पुन्हा नव्याने वाचन केल्यावर , आपली मराठी पुस्तके, लेखक कसे आपल्यावर योग्य संस्कार करायचे ते जाणवले.

यास्मिनबाईंनी केळकरांची मुलखात घेऊन हा पाठ लिहला होता.
पाठाची सुरुवात, कुणाला तिकीट जमवण्याचा, कुणाला रंगीबेरंगी दगडगोटे जमवण्याचा छंद असतो यापासून होतो, आणि नकळत आपल्यालाही छंद असावा अस वाटत, लहानपणीच अगदी असच वाटायचं, त्यामुळेच यास्मिन शेख आणि राजा केळकर संग्रहालय कधीच विसरलं जाणार नाही.

केळकरांनी वस्तुसंग्रहालयाच्या छंदाला इतक वाहून घेतलं होत की त्याच काळात त्यांचं घराकडे, त्यांच्या चष्म्याच्या धंद्याकडे दुर्लक्ष होत होत आणि त्याच दरम्यान त्यांचा मुलगा ‘ राजा ‘ घर सोडून निघून जातो, आणि म्हणून त्या संग्रहालयाच नाव ‘ राजा केळकर वस्तूसंग्रहालय ‘

पाठाच्या शेवटी, सत्तरीतील केळकर त्यांच्या पत्नीच्या स्मृतिप्रीत्यर्थ दुसर एक संग्रहालय उभारणीच्या कामाला वाहून घेतात असा उल्लेख आहे, पण ते नेमकं कोणत हे आज आपल्याला माहित नाही, आज याच उत्तर यास्मिनबाई नक्की देऊ शकल्या असत्या.

ऐकलंय का? च्या कामासाठी,रिसर्चमुळे अशा मोठ-मोठ्या थोर व्यक्तिमत्वाची माहिती जमवताना ,बालपण सुद्धा डोकावून जाते आपला महाराष्ट्र, आपली भाषा किती महान आहे याची प्रचिती पुनःपुन्हा येत राहते.

यास्मिन बाईं पक्क्या महाराष्ट्रीयन होत्या, जन्म महाराष्ट्रातील, शिक्षणाचा काहीं काळ पंढरपुरात आणि मराठी भाषेची सेवा, किती प्रगल्भ , निःस्वार्थ कारकिर्द.त्यांचा लिखित एकचं पाठ , योग्य वयात हाती पडला आणि आयुष्भर मनावर कोरला गेला.

यास्मिनबाई आणि त्यांच्यामुळे बालवयात ओळख झालेल्या ‘अज्ञातवासी’ केळकरांना आमचे शतशः नमन.

तुम्हाला आठवतोय का हा धडा?
तुम्ही पहिल आहे हे संग्रहालय?

© ऐकलंय का?

#यास्मिनशेख #मराठीभाषा #मराठी #व्याकरण #बालभारती #राजाकेळकरवस्तुसंग्रहालय

23/08/2026

आई गेली की माहेर संपतं का?
प्रेमस्वरूप आई: भाग अंतिम

#ऐकलंयका


[मराठी, मराठीसाहित्य, कथा, अभिवाचन, इमोशनलस्टोरी, story ]

19/08/2026

आई हे फक्त एक नाव नसतं, तर आख्ख माहेर या दोन अक्षरांत समावलेलं असतं..
कथा: प्रेमस्वरूप आई (भाग-1)
लेखिका: हेमा पाटील




#मराठीपॉडकास्ट
#ट्रेंडिंगपोस्ट

[कथा, मराठीकथा, माहेर, आई, मराठी, मराठीसाहित्य]

   #ऐकलंयका  #श्रावणआठवणी    #स्वरचित  #मराठीकविता  #कविता
18/08/2026

#ऐकलंयका #श्रावणआठवणी #स्वरचित #मराठीकविता #कविता

"अंगणी तापितं दूध, दुधापिवळी सायी..लेकी गौरबाई, एवढं जेवूनी जायी.."श्रावण आला की असाच ऊनपावसाचा खेळ सुरु व्हायचा... सणां...
17/08/2026

"अंगणी तापितं दूध, दुधापिवळी सायी..
लेकी गौरबाई, एवढं जेवूनी जायी.."

श्रावण आला की असाच ऊनपावसाचा खेळ सुरु व्हायचा... सणांची आणि उपवासाची रेलचेल... झाडाझाडातून, पानापानांवरून निथळणारं पाणी.. जिकडेतीकडे गर्द हिरव्या रंगाच्या पसरलेल्या छटा.. श्रावणी सोमवार.. बेल.. फुलं..
आणि या सगळ्या समृद्ध ऋतूतला पहिला मोठा सण यायचा..नागपंचमी.

आजही आपण नागपंचमी साजरी करतोच,
पण ​पूर्वी पंचमी जवळ आली की मुली दोन दिवसांसाठी का होईना हक्काने माहेरी यायच्या. अंगणात नातवंडांचा किलबिलाट सुरु व्हायचा, नवीन साड्या घेतल्या जायच्या, हातावरच्या मेहंदीचा सुगंधा आणि नुकत्याच भरलेल्या हिरव्या बांगड्यांचा किणकिणाट... उत्साहाला अगदी उधाण यायचं!

​पंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास. त्यामागे 'सत्येश्वरी आणि सत्येश्वर' या भावा-बहिणीच्या प्रेमाची ती भावूक कथा. भावाच्या विरहात अन्नत्याग करणाऱ्या सत्येश्वरीला नागाच्या रूपात भाऊ दिसला, सत्येश्वरीचे भावावरील प्रेम बघून नागदेवता प्रसन्न झाली आणि तिच्या निस्सीम प्रेमाला प्रसन्न होऊन भावाच्या रक्षणाचे वचन दिले... म्हणूनच हा उपवास अन् श्रद्धेचा सोहळा.

​बाकीच्या ठिकाणी खिचडी किंवा वरई खाऊन केला जाणारा उपवास, पण आमच्या भागात मात्र गरमागरम धपाटे, हरभऱ्याची उसळ आणि चमचमीत मसालेभात खाऊन हा उपास करण्याची वेगळीच गमतीशीर पद्धत होती! लाह्या सोडल्या तर पांढरं काहीच खायचं नाही, अगदी प्रत्येक पदार्थात हळद पेरायची की झाला उपवासाचा मेनू तयार!

​पंचमीच्या दिवशी सकाळी सकाळी वारुळाला जाऊन किंवा घरीच सुबक मातीच्या नागाची पूजा केली जायची. पांढऱ्या दोऱ्याला हळद लावून तयार केलेले दोन पदरी 'पौतं' सगळ्यांनी गळ्यात घालायचे. नैवेद्य म्हणून ज्वारीच्या लाह्या, दूध आणि वाफाळलेल्या पुरणाचे दिंडे/ कानवले. या गरमागराम दिंड्यावर साजूक तुपाची धार सोडून खाण्यातली मजा..ती चव आजही जिभेवर रेंगाळते आहे!

​दारातल्या मोठ्या झाडाला दणकट दोराने उंच झोका बांधलेला असायचा ... वाऱ्याची झुळूक अंगावर झेलत, मैत्रिणींसोबत उंच झोके घेत गाणी गाताना त्या माहेरवाशिणींच्या सगळ्या काळज्या क्षणात उडून जायच्या.

​दुपारी गावातील मानाच्या घरी शिरळोबा किंवा गौर आणायची लगबग सुरु व्हायची! गावातल्या सगळ्या स्त्रिया नटून-थटून वाड्यावर जमायच्या. वाजंत्री बोलावले जायचे. मग पंचमीची गाणी गात हा सगळा घोळका कुंभाराच्या घरी जायचा... गौर आणायला.
आणलेली गौर खपल्या, करडे आणि वेळूने सजवली जायची. तिची सांग्रसंगीत पूजा व्हायची

​“काळ्या काळ्या रानी कारल्याचा वेल... तिथं उतरला दामाजी सोनार...”

​सोनाराने घडवलेले दागिने, शंकर-पार्वती, राधा-कृष्ण, रुक्मिणी आणि सत्यभामेधली ती छोटी छोटी भांडणं.. अशी अनेक पारंपरिक गाणी गायली जायची.. प्रत्येक गाण्यातून एक वेगळीच कथा उलगडायची.. मग भोंडल्यासारखाच फुगड्यांचा फेर धरला जायचा ...त्या हसण्या-खिदळण्याने अख्खा परिसर दुमदुमून जायचा. सायंकाळी गलबललेल्या मनाने गौरीचे विसर्जन व्हायचे.

आजही आपण आपल्या धावपळीतून वेळ काढून पंचमी साजरी करतोच, पण जुन्या आठवणी कुठेतरी हलकेच जाग्या होतात..

​तुम्हाला ही लहानपणीच्या नागपंचमीच्या अशा काही आठवणी आठवतात का? तुमच्याकडे नागपंचमी कशी साजरी व्हायची किंवा होते, कमेंट करून नक्की सांगा!👇


#ऐकलंयका

#मराठीपॉडकास्ट
​ #नागपंचमी #श्रावणआठवणी
#माहेरपण #महाराष्ट्रीयनसंस्कृती #संस्कृतीआणिपरंपरा

16/08/2026

वडील मोठे उद्योजक, आईची वडिलांना सावलीसारखी साथ, आई च मुलावर जीवापाड प्रेम, त्यामुळे आईची आणि मुलाची जमलेली केमिस्ट्री,

वडील कठोर, मुलगा मोठा होऊनही अजूनही त्याची लगाम आपल्याच हातात असली पाहिजे अस वाटल्यामुळे, वेळोवेळी मुलासाठी *फॅमिली मॅटर्स* म्हणत घेतलेले निर्णय.

आनंद इंगळे सर फक्त करण चे नुसते बाप नाहीत तर अभिनयाच्या क्षेत्रातील बाप माणूस का आहेत हे नाटक बसताना कळत...कठोर बाप...प्रेमळ नवरा, जिद्दी businessman, कोणत्याही परिस्थितीत उभा राहणारा मित्र...एक घटनेमुळे कोसळले ले आभाळ एकट्याने पेलू पाहणारा कुटुंबप्रमुख..

#ऐकलंयका #मराठीनाटक
[Natak, anand Ingale, Dr. vivek Bele, Shreeram rag awakash, Teenagers, GenZ, Parenting, family Matters]

🎭 पॉपकॉर्न: Family Matters - अस्वस्थ करणारा, अंतर्मुख करणारा अनुभव!​सुरवातीला एखादे हलके-फुलके विनोदी नाटक असावे या भावन...
14/08/2026

🎭 पॉपकॉर्न: Family Matters - अस्वस्थ करणारा, अंतर्मुख करणारा अनुभव!

​सुरवातीला एखादे हलके-फुलके विनोदी नाटक असावे या भावनेने आपण नाट्यगृहात प्रवेश करतो; पण जसजशी नाटकाची घडी उलगडत जाते, तसा नाटकाचा खरा विषय समोर येतो आणि पहिला मानसिक धक्का बसतो. त्यानंतर लागोपाठ बसणाऱ्या धक्क्यांची मालिकाच सुरू होते!

​'ये जो पब्लिक है' या यशस्वी नाटकानंतर Jyoti Nandan Manohar ताई आणि नंदन मनोहर सरांनी पुन्हा एकदा 'पॉपकॉर्न' या अत्यंत अप्रतिम आणि विचार करायला लावणाऱ्या नाटकासाठी आम्हाला आमंत्रित केले आणि त्यांच्यामुळेच सहकुटुंब हे नाटक अनुभवता आले, त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार! 🙏

महाराष्ट्र कल्चर सेंटर प्रस्तुत आणि
​डॉ. विवेक बेळे लिखित आणि दिग्दर्शित हे दोन अंकी नाटक.

​वडील एक मोठे उद्योजक; आईची वडिलांना सावलीसारखी साथ आणि मुलावर जीवापाड प्रेम. आई आणि मुलामध्ये असलेली एक छान केमिस्ट्री! दुसरीकडे, 'मुलगा मोठा झाला तरी त्याची लगाम आपल्याच हातात हवी' या विचारांचे कठोर वडील, जे वेळोवेळी मुलासाठी 'फॅमिली मॅटर्स' म्हणत निर्णय घेत असतात.

उच्चभ्रू, पण पाय जमिनीवर असलेले हे कुटुंब. या घरात मुलाची गर्लफ्रेंडसुद्धा सहजासहजी जाऊन-येऊन आहे... सगळं कसं अगदी छान, सुरळीत सुरू असतं! पण कुठेतरी काहीतरी चुकलेलं असतं.

​कदाचित वडिलांना मुलाची भाषा कळत नाहीये? सुसंवाद सोडाच, पण साधा संवादही दुर्मिळ होतोय? सतत मुलाच्या डोळ्यात प्रेम शोधणाऱ्या एका कठोर बापाला जेव्हा कधीही न पचणारे सत्य समजते, तेव्हा त्याची काय अवस्था होत असेल?

​समाजात ज्या नाजूक, अस्वस्थ करणाऱ्या आणि 'वर्ज्य' मानल्या जाणाऱ्या विषयांवर उघडपणे बोलणे नेहमी टाळले जाते, असाच एक अत्यंत धाडसी व गंभीर विषय डॉ. विवेक बेळे यांनी निवडला आहे. इतका नाजूक विषय त्यांनी इतक्या खुमासदार आणि संयत पद्धतीने हाताळला आहे की, 'पॉपकॉर्न'मधील 'प' आणि 'कॉ' कधी सायलेंट झाले, हे आपल्याला कळतही नाही.

​"एखाद्या विषयावर आपण गप्प राहिलो म्हणजे ती गोष्ट घडायची थांबत नाही!" मान उंचावून चालल्याने रस्त्यावरचे खड्डे बुजत नाहीत; उलट डोळे झाक केली तर आपणचं त्यात पडू.

​बऱ्याच गोष्टीकडे आपण डोळेझाक केली तरी,
​इंटरनेटमुळे उपलब्ध झालेल्या 'या' गोष्टी आपण आता Undo किंवा Delete करू शकत नाही. उलट हा भस्मासूर दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. अशा वेळी त्याचे दुष्परिणाम समजून घेऊन त्यातून मार्ग कसा काढायचा?

​'संवाद' हाच या संपूर्ण नाटकाचा गाभा आहे.

​आनंद इंगळे हे नाटकातील करणचेचं नाही तर अभिनयातील ही बाप माणूस आहेत. कठोर बाप...प्रेमळ नवरा, जिद्दी businessman, कोणत्याही परिस्थितीत उभा राहणारा मित्र...एक घटनेमुळे कोसळले ले आभाळ एकट्याने पेलू पाहणारा कुटुंबप्रमुख.

नितीश घारे याने साकारलेला करण हा Gen-Z आपल्याला एवढा रिलेट होतो की त्याचा हा रंगभूमीवरील पहिलाच वावर आहे यावर विश्वास बसत नाही.

प्रेमळ आणि संवेदनशील आई साकारणाऱ्या गायत्री देशपांडे आणि होऊ घातलेल्या समजूतदार सुनेची भूमिका साकारणाऱ्या गौरी देशपांडे या दोघींचाही अभिनय ही अतिशय सहज आणि सुंदर.

श्रीकर पित्रे याने आपल्या विनोदी शैलीने या नाटकात एक वेगळीच रंगत आणली आहे.

या सर्वच कलाकारांनी आपापल्या भूमिकांमध्ये अगदी जीव ओतला आहे. सर्वांचाच अभिनय इतके जिवंत आहे की आपण नाटक न पाहता स्वतः सत्य परिस्थिती अनुभवत आहोत असं वाटतं रहात.

​हे नाटक केवळ मनोरंजनाचे साधन न राहता, ते प्रेक्षकांना अस्वस्थ करते आणि केवळ 'चूक की बरोबर' याच्या पलीकडे जाऊन, या विषयाच्या विविध बाजू व कंगोरे तपासायला भाग पाडते.

​आपल्या टीनएजर्स बरोबर आवर्जून पाहावे असे नाटक..

#ऐकलंयका
#मराठीनाटक

Address

Pune
411057

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aiklay Ka? posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share