04/11/2025
जुन्नर तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे निर्माण झालेल्या गंभीर मानव-बिबट्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी या विषयावर चर्चा करण्यासाठी थेट वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी मोबाईलवरून संवाद साधला. पकडलेल्या बिबट्यांना जुन्नरच्या हद्दीबाहेर ठाणे जिल्ह्यात सोडले जात असल्याची बाब वनमंत्र्यांनी या संवादादरम्यान कबूल केल्याचे समोर आले आहे. या भागातील बिबट्यांची संख्या १२,००० हून अधिक झाली असून, बिबट्याच्या हल्ल्यांमुळे अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असताना, जुन्नरमधील बिबटे दुसऱ्या जिल्ह्यात सोडले जात असल्याची माहिती वनमंत्र्यांनी दिल्याने या संवेदनशील प्रकरणात एक नवीन मुद्दा उपस्थित झाला आहे.
| | | |