19/10/2025
आर्य आक्रमण सिद्धांत आणि भारतीय राष्ट्रवाद
इतिहास हा असा विषय आहे की त्यात सुप्त सामर्थ्य बरेच आहे. राजकारण बऱ्याचदा त्यावर आधारित असते. जे राष्ट्र इतिहास विसरते किंवा खोटा इतिहास रचते किंवा इतिहासाकडे दुर्लक्ष करते किंवा त्यातून मिळणाऱ्या धड्यांकडे दुर्लक्ष करते, असे राष्ट्र विनाशाकडे वाटचाल करते. याउलट बोलायचे झाले, तर ज्या राष्ट्राला विनाशाकडे वाटचाल करायला लावायची असेल, त्याच्या इतिहासाच्या विकृतीकरणाची किंवा त्याचा खोटा इतिहास लिहिण्याची प्रक्रिया सुरू करणे फायदेशीर ठरेल.
जेव्हापासून डावे विचारविश्व रूढ झाले, तेव्हापासून जो भारतीय 'इतिहास' लिहिला गेला, शिकवला गेला व प्रसृत केला गेला, ती सर्व डाव्या 'बुद्धिवंतां'ची कामगिरी होती. देशाची राष्ट्रीय अस्मिता नष्ट करणे हे डाव्या विचारसरणीच्या मूळ तत्त्वांपैकी एक तत्त्व आहे. त्यामुळे विद्याशाखा म्हणून भारताचा खोटा इतिहास लिहिणे हे काम मोठ्या प्रमाणावर केले गेले असल्यास त्यात आश्चर्य नाही. या सर्वाचे उद्दिष्ट एकच आहे व ते म्हणजे भारताची राष्ट्रीय अस्मिता व भावविश्व मुळापासून उखडणे व नष्ट करणे.
डाव्यांच्या किंवा त्यांच्यासारख्या इतरांच्या दृष्टीने त्याला एक प्रचारमूल्य आहे, तो आहे 'आर्यांचे भारतावरील आक्रमण' व तो कालखंड.
ज्या वंशाला 'आर्य' म्हटले गेले, त्या वंशाच्या लोकांनी इ.स.पू. सुमारे २००० ते १५०० या दरम्यान भारतावर वायव्येकडून आक्रमण केले, असे मानण्यात आले आहे. या आर्यांनी शेकडो वर्षांच्या युद्धानंतर व रक्तपातानंतर उपखंडातील स्थानिक लोकांना नष्ट केले किंवा त्यांना दक्षिणेकडे हाकलून दिले किंवा त्यांना गुलाम केले किंवा खालच्या जातींत म्हणून आल सामावून घेतले आणि नंतर त्यांनी स्वतःच उत्तरेकडील प्रदेश व्यापला.
मूलतः साम्राज्यवादाच्या हिताच्या दृष्टीने युरोपीय विद्वानांनी वरील मांडणी केली व भारी डाव्या मंडळींनी भारतीय राष्ट्रवादाच्या विरोधात वापरावयाचे शस्त्र म्हणून ही मांडणी - सिद्धान - पूर्णत्वाला नेली.
या सिद्धान्ताची दोन अंगे पाहायलाच हवीत. पहिली बाब ही की, हा सिद्धान्त जवळजवळ सर्वत्र व्यापक प्रमाणावर स्वीकारलेला आहे आणि जे हा सिद्धान्तं स्वीकारत नाहीत, त्यांच्यावर त्यांना हा सिद्धान्त स्वीकारायचाच नाही असा आरोप करता येतो. दुसरी बाब ही की, भारतीय राष्ट्रवादाच्या तात्त्विक आधारालाच सुरुंग लावण्याची क्षमता या सिद्धान्तात आहे. विशेषत किमान ज्यांची विचार न करण्याची तयारी असते आणि अर्धवट मांडणी स्वीकारण्याची ज्यांचे तयारी असते, अशांच्या विचारांना हादरा देण्याची वरील सिद्धान्तात क्षमता आहे.
सिद्धान्ताचा सर्वसाधारण स्वीकार
हा सिद्धान्त भारतातील सर्व मुलांना त्यांच्या शाळांत शिकवला जातो. ते जे काही शाळेत शिकलेले असते, ते भारतातील बहुतेक शिकलेले लोक शाळा सोडल्यानंतर दीर्घ काळानंतर बव्हंशी विसरून जातात. पण प्राचीन काळी आर्यांनी भारतावर आक्रमण केल्याचे त्यांचा आठवणीत टिकून असते, मात्र या सर्वांचा अर्थ काय असू शकतो, याची त्यांना जाण नसते..
भारताच्या प्राचीन काळापासून आजपर्यंतच्या इतिहासाच्या पुनर्लेखनासाठी मार्क्सवादी मंडळींनी किती प्रचंड श्रम केले, त्याचा तपशील सांगण्याचे हे स्थळ नव्हे. सोव्हिएत रशिया व त्यांच्या मांडलिक देशांत जो खोटा इतिहास लिहिला गेला, त्याचा अपवाद वगळल्यास मार्क्सवादी मंडळींनी जो दडपादडपीचा इतिहास लिहिला, तो केवळ अतुलनीय आहे. त्याचे परिणाम प्रत्येकाने पाहावेत असे आहेत - म्हणजे आजवर जे शुभ्र होते, ते काळ्या रंगात रंगवले गेलेय व जे काळे-कृष्णवर्णीय होते ते शुभ्र बनलेय. जे नायक होते, ते खलनायक झालेत व खलनायक होते, ते नायक बनले आहेत. सर्वात धक्कादायक बाब ही आहे की, धादांत असत्याचे हे व्यापारी असा आग्रह धरतात की, त्यांनी सांगितलेला इतिहास हाच भारताचा खरा इतिहास म्हणून स्वीकारला व शिकवला जावा. ब्रिटिश राजवटीत व नंतर १९९२पर्यंत हिंदूंच्या इतिहासाला ग्रहण लागले होते. आता हा इतिहास पुढे येऊ लागला आहे. नेहरूवादी प्रस्थापिताने भारताच्या इतिहासाशी जी छेडछाड केली गेली होती, ढवळाढवळ केली होती, ती नाहीशी करण्यासाठी बरीच वाटचाल करावी लागेल. श्रीकांत तलगेरी. यांचा हा ग्रंथ म्हणजे त्या वाटचालीच्या दिशेने केलेले एक महत्त्वाचे योगदान आहे.
आर्य आक्रमण सिद्धांत आणि भारतीय राष्ट्रवाद
लेखक : श्रीकांत तलगेरी अनुवादक : प्रा. म. मो. पेंडसे
पृष्ठसंख्या : ३८२ मोठा आकार
मूल्य : ५००₹
आर्य आक्रमण सिद्धांत मांडून वैचारिक व सांस्कृतिक क्षेत्रात खळबळ माजवण्याचा काही मंडळी सातत्याने प्रत्यत्न करीत असतात. अशा मंडळींची मांडणी साधार खोडून काढण्यासाठी या महत्त्वपूर्ण पुस्तकाची मदत होणार आहे. भारतीय राष्ट्रवाद आणि या देशातील सांस्कृतिक एकात्मता समजून घेण्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरणार आहे.
आर्य आक्रमण सिद्धांताचा फोलपणा अधोरेखित करून पाश्चात्त्य मंडळींनी तयार केलेला भ्रम दूर करून नव्या पिढीच्या अभ्यासकांना दिशा देण्याचे काम या पुस्तकातून होईल.
तरुण पिढीने वाचावे, समजून घ्यावे असे पुस्तक.
अनुक्रम
प्रस्तावना
विभाग एक : सिद्धान्ताचे उपसिद्धान्त
१. भारत - 'जडणघडण होत असलेले एक राष्ट्र'
२. हिंदू धर्म - 'एक परकीय धर्म'
३. हिंदू धर्म - एक 'आर्य धर्म' व 'आर्य' एक 'परकीय लोक'.
*विभाग दोन : आर्य आक्रमण सिद्धान्त*
४. पारंपरिक इतिहास
५. सिद्धान्ताची पार्श्वभूमी
६. युक्तिवाद व पुरावा
७. पारंपरिक साधनांचा तुलनात्मक अभ्यास ९१
८. सिंधू संस्कृतीचा शोध
९. सिंधू लिपीचे वाचन
*विभाग तीन : आर्य आक्रमण सिद्धान्ताची तपासणी*
१०. आधुनिक भाषांची भौगोलिक विभागणी
११. पश्चिम आशियातील इंडो-युरोपीय लोक
१२. आर्य आक्रमण सिद्धान्त आणि भारतीय राष्ट्रवाद
१२. दक्षिण रशिया व कूर्गन संस्कृती
१३. उरलिक व सेमिटिक भाषांबरोबरील ऐतिहासिक दुवे
१४. इंडो-इरानियन मूलभूमी व इंडो-इरानियन लोकांच्या वाटचालीचा कालक्रम
१५. वैदिक संस्कृतातील मूर्धन्य ध्वनी
१६. संस्कृतमधील ऑस्ट्रिक व द्राविडी शब्द
१७. वैदिक संस्कृत विरुद्ध उत्तरकालीन इंडो-आर्यन भाषा
१८. वांशिक पुरावा
१९. ऋग्वेदातील पुराव्याचा अभाव
२०. पुराणांतील पुराव्याचा अभाव
२१. पुराणांतील सकारात्मक पुरावा
२२. ऋग्वेदातील सकारात्मक पुरावा
२३. सिंधू संस्कृती
💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢
पुस्तके घरपोच मिळवण्यासाठी संपर्क :
पायल बुक्स
शॉप नंबर 35 , यशवंत विहार, गारमाल धायरी,
धायरी रोड, पुणे ४११०४१
मो नं व्हाट्स अप ९९७०९२६५५०
वरील क्रमांकांवर नाव, पत्ता व पुस्तकांची नावे पाठवावे
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
Payment options
PAYAL BOOKS
Google Pay /phone pay
Rakesh kadam 9970926550
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
इतर मराठी पुस्तकांच्या माहितीसाठी
खालील लिंकवर क्लिक करा.
https://www.facebook.com/profile.php?id=100077586492444...
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
हि पोस्ट आपल्याल मित्र मंडळी ना फॉरवर्ड करा व अशा वेगवेगळ्या नवीन पुस्तकाच्या माहितीसाठी आपल्याल पेज ला लाईक व फॉलो करा
टिप्स :
वरील पुस्तकं समरी ही पुस्तकातून घेतलेली आहे याच्याशी पायल बुक्स सहमत असेलच असे नाही.......