चावडी Chawdi

चावडी Chawdi सर्व सरकारी योजनेची संपूर्ण माहिती अ?

भारतीय संविधान हे ' आम्ही भारतीय लोक' यांना अर्पण आहे - मा. संजय आवटे          मॉडर्न एज्युकेशन सोसायटी ,पुणे  संचलित नौ...
12/04/2025

भारतीय संविधान हे ' आम्ही भारतीय लोक' यांना अर्पण आहे - मा. संजय आवटे
मॉडर्न एज्युकेशन सोसायटी ,पुणे संचलित नौरोसजी वाडिया महाविद्यालय, नेस वाडिया महाविद्यालय, नेव्हिल वाडिया महाविद्यालय व कुसरो वाडिया टेक्निकल इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने छ. शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त महोत्सवाचे आयोजन ११ एप्रिल२०२५ ते १४ एप्रिल २०२५ रोजी करण्यात आले आहे. यामध्ये मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या विविध महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व संस्थेचे विश्वस्त सहभागी असणार आहेत.
महात्मा फुले जयंती निमित्ताने ११ एप्रिल २०२५ रोजी प्रख्यात लेखक-वक्ते व दैनिक लोकमत - पुणे चे संपादक मा. संजय आवटे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. आपले मनोगतात मा. संजय आवटे म्हणाले की, " तरुणांपर्यंत आजचे राजकारण पोहोचले पाहिजे. तरुणांना सजग करण्यासाठी छ. शिवाजी महाराज, म.फुले, राजश्री शाहू महाराज- डॉ. बाबासाहेब आंबेडकर- महात्मा गांधी इ .महापुरुषांचा खरा इतिहास महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या माध्यमातून विद्यार्थी व समाजापर्यंत पोहोचायला हवा. याबाबत महाविद्यालये ही मला शेवटची आशा वाटते. भारतातील संविधान हे कोणा एका विशिष्ट व्यक्तीला अर्पण केलं नसून ' we the people of India' ' आम्ही भारतीय लोक' यांना अर्पण केले आहे. आताचा काळ हा महापुरुषांच्या अपहरणाचा काळ आहे. आपल्या मिष्कील शैलीत मा. संजय आवटे म्हणाले की, एकवेळ मला लष्करे तोयबाची भीती वाटत नाही परंतु मला भीती वाटते ती होयबा करणाऱ्या लोकांची. आपल्या मुलांनी किती गुण मिळवले यापेक्षा तो उत्तम माणूस कसा बनेल याकडे समाजाने लक्ष दिले पाहिजे, असे प्रतिपादन दै. लोकमतचे ज्येष्ठ संपादक मा संजय आवटे यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त प्राचार्य डॉ. अशोक चांडक हे होते. आपल्या मनोगतात डॉ. चांडक म्हणाले की," मॉडर्न एज्युकेशन सोसायटी सातत्याने विद्यार्थ्यांमध्ये मानवी मूल्य विकसित करण्याकडे लक्ष पुरवते. संस्थेच्या आणि विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सर्व प्राध्यापकांनी ' मी काय करतो ' याचे आत्मपरीक्षण करावे" असे आवाहन त्यांनी केले.
महाविद्यालयातील मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वसंत बोरकर यांच्या पुढाकाराने संस्थेमध्ये तीस वर्षांपूर्वी संयुक्त जयंती महोत्सवाची सुरुवात झाली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते डॉ.बोरकर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी माजी विद्यार्थिनी भावना बाठिया (लोकमत वार्ताहार) यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे स्वागत नौरोसजी वाडिया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत चाबुकस्वार यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. सुभाष अहिरे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात डॉ. सुभाष अहिरे यांनी मॉडर्न एज्युकेशन सोसायटी या संस्थेमार्फत सामाजिक बांधिलकीतून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना करून दिली. प्रा.तन्वी झुरुंगे यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. सदर कार्यक्रमास मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त प्रा. डॉ. अशोक चांडक आणि विश्वस्त प्रा. सचिन सानप यांचे मार्गदर्शन लाभले. सदर कार्यक्रमास नेस वाडियाचे प्राचार्य डॉ. वृषाली रणधीर, नेव्हिल वाडिया कॉलेजच्या इनचार्ज डायरेक्टर डॉ. अनुराधा डी., डॉ. मनीषा डाले, उपप्राचार्य डॉ. समीना बॉक्सवाला- काळे, उपप्राचार्य डॉ. बी. बी. बहुले, उपप्राचार्य डॉ. प्रकाश चौधरी, प्रबंधक राजेंद्र तागडे, सर्व शाखांचे डीन, सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक आणि प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नम्रता जहागीरदार यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. डॉ. ज्योती अनिरुद्ध, प्रा.जयंत साळवे, प्रा. प्रमोद शिंदे, प्रा. विकास जाधव, प्रा. सोनाली मोरे-मधाळे, प्रा. करूणा जाधव, प्रा. सुहास जाधव व प्रा. सचिन कांबळे यांनी परिश्रम घेतलेत

 #प्रवासी  टाळ्यांचा कडकडाट झाला आणि आपले भाषण संपल्याची जाणीव होऊन ऊमा भानावर आली. आपण काय बोललो हे तिला आठवतच नव्हते. ...
15/09/2024

#प्रवासी

टाळ्यांचा कडकडाट झाला आणि आपले भाषण संपल्याची जाणीव होऊन ऊमा भानावर आली. आपण काय बोललो हे तिला आठवतच नव्हते. मन भरून आले होते. आज तिचा निरोप समारंभ होता. सेवापुर्ती सोहळा! ती आज सकाळपासूनच अस्वस्थ होती एक अनामिक हुरहुर मनात दाटून आलेली होती उद्यापासून ही शाळा, ही धावपळ, आपल्या लाडक्या विद्यार्थिनी, वह्या-पुस्तके.... काहीच अवतीभवती नसणार. गेले पस्तीस वर्ष सवयीच जग आता अंतरणार.उद्यापासून सगळंच निवांत... ना कसली घाई.... ना कोणी सोबत.... सगळंच शांत असेल, असे काहीसे काहूर दाटून येत होते मनात. नोकरीतील कित्येक प्रसंग आठवत होते.राहून राहून डोळे भरुन येत होते. आयुष्यात छोट्या-मोठ्या प्रसंगात धावून आलेला, आजवरच्या प्रत्येक शाळेतील स्टाफ आठवत होता. सहलींमध्ये मुलींसोबत मैत्रिणीं सोबत केलेली धमाल आठवत होती. कामात लक्ष लागत नव्हतं.कसबसं घरंच आवरून उमा शाळेत पोहोचली. मुलींचा गराडा पडला तिच्याभोवती. प्रत्येक मुलीला तिच्याशी बोलायचं होतं, कित्येकींनी तिच्यासाठी छोट्या-छोट्या भेटवस्तू आणल्या होत्या. मुलींचे डोळे पण भरून येत होते. प्रत्येक जण येऊन आशीर्वाद घेत होती. एकंदर वातावरण खूपच भारावलेले होते.
उमा स्टाफ रूम मध्ये थोडा वेळ बसली. थोडंसं तिच्याशी बोलून प्रत्येकजण स्वतःच्या कामाला गेली. कारण उमाचा सेंड ऑफ चा कार्यक्रम स्टाफने थोडा मोठाच करायचा ठरवला होता. लवकरच चीफ गेस्ट येणार होते. कुणी मोठे उद्योगपती चीफ गेस्ट म्हणून येणार एवढे उमाला माहिती होते. बहुतेक ते शाळेला देणगी सुद्धा देतील अशी आशा होती, त्यामुळे शाळेच्या प्रत्येक उपक्रमाकडे उपक्रमाबद्दल जी ती तयारीने, जबाबदारीने वागत होती. उमा मुख्याध्यापिका मॅडमला भेटायला गेली. त्यांनी आदरपूर्वक तिला बसवून घेतले.तिच्याशी अगदीच भावनिक होऊन थोड्याशा गप्पा मारल्या. "तुमची कमी भासेल", असे मनापासून म्हणाल्या. तेवढ्यात चीफ गेस्ट आल्याचा निरोप आला आणि मुख्याध्यापिका लगबगीने उठून गेल्या. उमा पण ऑफिस मधून उठून लायब्ररी कडे गेली.सगळी पुस्तकं डोळेभरुन बघितली. थोडावेळ तिच्या नेहमीच्या खुर्चीवर बसली, तोच शिपाई मावशी तिला शोधत आल्या अन हॉलमध्ये बोलावल्याचे सांगितले.
उमा हॉलमध्ये गेली मुलींनी टाळ्यांच्या कडकडाटात तिचे स्वागत केले. उमा स्थानापन्न झाली, सर्वांना नमस्कार करून. नमस्कार करताना तिने पाहिले चीफ गेस्ट म्हणून अनिल होता. होय अनिलची होता तो! अंगाने किंचित स्थूल झाला होता आणि केसात मधून मधून रुपेरी छटा, याव्यतिरिक्त डोळ्यांवर सोनेरी काड्यांचा चष्मा, एवढाच फक्त बदल झाला होता त्याच्यात.बाकी तसाच होता, उंच, रुबाबदार आणि हसरा! उमाला काहीच समजेना, हा इथे कसा? चीफ गेस्ट कसा? ती चक्रावली. त्याने मात्र हसून उमाला अभिवादन केले. कार्यक्रम पुढे सरकू लागला. मुलींनी भाषणातून उमा मॅडम ची तारीफ केली. त्यांचे गुण सांगितले. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल त्या भाऊक होऊन बोलल्या. स्टाफ मधून मोजकी दोन भाषणे झाली. त्यातून उमाची कर्तव्यनिष्ठा, कामाप्रती असणारी तळमळ, शाळेच्या प्रगतीसाठी तिने घेतलेली मेहनत, मुलींशी तिचे असणारे भावनिक नाते.... याबद्दल खूप छान शब्दात त्यांनी सांगितले. त्यानंतर उमाचा विद्यार्थिनींच्या वतीने,स्टाफ च्या वतीने व संस्थेच्या वतीने सत्कार होऊन तिला भेटवस्तू दिल्या गेल्या. सत्काराला उत्तर देताना उमा जास्त बोलूच शकली नाही. जे बोलली ते पण तिला समजलेच नाही. अनिल ला पाहून चित्त थाऱ्यावरच नव्हते तिचे. मुख्याध्यापिका मॅडमने शाळेच्या वतीने त्याचा सत्कार केला. उद्योगपती अनिल साहेब असा अत्यंत आदरपूर्वक त्याचा उल्लेख केला जात होता....!त्याने सत्काराला उत्तर देताना छान भाषण केले. शाळेसाठी एक लाख रुपयांची देणगी त्यांनी दिली. अल्पोपहारा नंतर निघताना तो सहज उमाला म्हणाला, "मॅडम मी सोडतो तुम्हाला.इफ यु डोन्ट माईंड." नकार द्यायला योग्य दिसले ही नसते आणि तसे काही कारणही नव्हते.
सर्वांना नमस्कार करून उमा त्याच्यासोबत गाडीत बसून निघाली. काय बोलावे हेच तिला सुचत नव्हते. तिने एकदम अनिल कडे पाहिले, त्याने हसून ती नजर पकडत तिला विचारले,"कशी आहेस उमा?"
"मी मजेत आहे, पण तू इथे कसा? उमाने विचारले.
"अगं मी इथेच असतो.तू कधी आलीस या कन्या शाळेत बदलून?" अनिल ने विचारले.
"म्हणजे तू मुंबई सोडलीस?" उमाने उत्तर देण्याऐवजी प्रश्न केला.
"हो त्यानंतर तीनच वर्षांनी. आता इथेच स्थायिक झालोय. बिजनेस मध्ये पण हळूहळू जम बसत गेला. साध्या झेरॉक्स सेंटर पासून सुरुवात केली होती उमा. गावाला कशाची गरज आहे ते शोधत गेलो, त्याप्रमाणे गुंतवणूक करत गेलो, प्रचंड कष्ट केले. आता दोन फॅक्टरीज आहेत. आणि चार दुकानांचा मी मालक आहे.इथे मोठा बंगला आहे. दोनशे लोकांना रोजगार पुरवतो. पंचवीस एकर शेती घेतली आहे. फळबाग केलीय. एक फार्म हाऊस आहे शेतात.मुंबईत एक फ्लॅट आहे.ऑफिस कामानिमित्त कधी गेल्यावर तिथे राहतो. तीन गाड्या आहेत दारात. वैशू सारखी सुविद्य, सुंदर कष्टाळू बायको आहे. कर्तबगार मुलगा आणि सून आहे.चिमुरडी नात आहे. तुझ्याच शाळेत आहे. सहा महिन्यांपूर्वी तिला एकदा सोडवायला आलो होतो, तेव्हा तुला पाहिलं होतं.तुझं नव्हतं लक्ष! थोडक्यात उमा तू सोडून सगळं आहे माझ्याकडं!" अनिल बोलून गेला. उमाने एकदम चमकून त्याच्याकडे पाहिले.
एका मोठ्या हॉटेल समोर त्याने गाडी थांबवली. "चल जरा कॉफी घेऊ या", अनिल म्हणाला. ती दोघे उतरली. हॉटेलचा मॅनेजर अनिलला पाहून धावत आला.वेलकम केले. त्याचा हसून स्वीकार करत दोघे कोपर्‍यातील एका टेबलाशी जाऊन बसले. अनिल ने उमा कडे पाहिले.बऱ्यापैकी स्थूल झाली होती ती. केस सुंदर कापलेले होते, पण मेंदीने रंगवल्या मुळे काळ्या केसात काही लाल बटा दिसत होत्या.सुंदर रिमलेस चष्मा होता. रुंद काठाची, फिक्या गुलाबी रंगाची साडी, मोजके दागिने, नाजूक घड्याळ..... तिच्या उच्च अभिरुचीचे दर्शन घडवत होते.
"उमा, तू कशी आहेस? कसं चाललंय तुझं?" अत्यंत हळवेपणाने अनिल ने विचारले.
"छान आहे सगळं अनिल. मिस्टर एल.आय.सी. मध्ये वरच्या पोस्ट वर होते. नुकतेच ते पण रिटायर झालेत.एक मुलगा एक मुलगी आहे. ती दोघेही डॉक्टर आहेत. सून आणि जावई पण डॉक्टर आहेत. चौघांनी मिळून पुण्यात एक हॉस्पिटल सुरु केलेय. छान जमा बसलाय त्यांचा आता. एकाच बिल्डिंगमध्ये फ्लॅट्स घेतलेत राहायला. मिस्टर पण पुण्यातच असतात.गेली चार वर्षे मी इथे या कन्या शाळेत बदलून आले होते. पण थोड्या दिवसांसाठी संसार कशाला उचला,मांडा? म्हणून मी एकटीच इथे दोन रूम भाड्याने घेऊन रहात होते. शनिवार-रविवारी ते यायचे इथे, किंवा मी जायची पुण्यात.आता दोन दिवसांनी रूम सोडून जाणार आहे कायमची पुण्यात." उमा ने सांगितले.
"पण तू शिक्षिका कशी काय झालीस?" अनिल ने विचारले.
"तुझी आठवण विसरण्यासाठी शिकत गेले आणि भरपूर मार्क मिळवत गेले. या संस्थेची जाहिरात पेपर मध्ये पाहिली, अर्ज केला अन लगेच सिलेक्ट झाले.पण तू मुंबई का सोडलीस?" उमा म्हणाली.
"अगं मामाच्या वैशालीशी लग्न झालं. पण तुझी आठवण खूप छळायची. इथून जवळच माझं मूळ गाव आहे.गावी थोडी शेती होती वडिलांची. मामाला सांगून वैशू आणि नोकरीतून वाचवलेले थोडे पैसे घेऊन इथे आलो. जाम कष्ट केले. वैशू ने पण छान साथ दिली.अन आज इथे आहे."अनिल उत्तरला.
दोघांचीही मने भूतकाळात गेली.
अनिल चे आई वडील तो पाच वर्षांचा असतानाच एका एक्सीडेंट मध्ये गेले.चुलत्यांचा थंड प्रतिसाद पाहून, मामा त्याला आपल्या घरी मुंबईला घेऊन आला. एकुलत्या एक बहिणी ची शेवटची आठवण म्हणून!अन मामाच्या चौकोनी संसाराला नवीन पाचवा कोन तयार झाला. मामी चांगली होती. तिने आपल्या गरिबी च्या संसारात अनिलला मोठ्या मनाने सामावून घेतले. महापालिकेच्या शाळेत शिकताना अनिलला जग समजत गेले. फार लवकर त्याला परिस्थितीची जाणीव झाली. बारावीनंतर रात्रीचे कॉलेज करून तो दिवसा मिळेल त्या नोकर्‍या करू लागला.महागाई आणि खाणारी तोंडे यांचा मेळ घालताना मेटाकुटीला आलेला मामा अनिलच्या येणाऱ्या पैशांना नाही म्हणूच शकला नाही. दोनच वर्षात अनिल एका कारखान्यात कामगार म्हणून लागला. लवकरच परमनंट ही झाला. अजून ग्रॅज्युएशन मात्र पूर्ण व्हायचे होते.
उमा ही त्याच कारखान्यात नुकतीच लागली होती. अनिल सारखीच कामगार म्हणून. वडिलांची मिल बंद पडल्याने त्यांची नोकरी गेली होती, त्याचा धक्का बसून त्यांच्या मनावर परिणाम झाला होता. ते चालता-फिरता पुतळाच जणू बनले होते. भाऊ छोटा होता.आईने घर चालवण्यासाठी चार घरची धुणी-भांडी, स्वयंपाकाची कामे धरली.अन घरातील कामाची जबाबदारी आपसूकच छोट्या उमाने उचलली. घरकाम करत, छोट्या भावाला सांभाळत, कसबसं शिक्षण घेत उमा बारावी झाली. आणि शिक्षणाची गोडी व आवड सोडून देत आईच्या फाटक्या संसाराच्या आभाळाला सावरायला या कारखान्यात लागली कामगार म्हणून!
बरेचदा अनिल आणि उमा एकाच बसने यायचे जायचे. क्वचित शेअर रिक्षाने सुद्धा. हळू हळू बोलता बोलता कधी मैत्री झाली कळलेही नाही. घरगुती प्रॉब्लेम्स परस्परांना शेअर होऊ लागले. जमेल तशी एकमेकांना मदत केली जाऊ लागली. कधी मनानं दोघेही एकमेकात गुंतून गेले दोघांनाही कळलंच नाही. आता एकमेकांना भेटल्याशिवाय चैन पडत नव्हती. गिफ्ट वगैरे देण्याजोगी दोघांची ही परिस्थिती नव्हती. क्वचित कधीतरी उडप्या कडे जाऊन एक डोसा दोघात आणि एक कॉफी दोघात म्हणजे चैन होती. तिची शिक्षणाची आवड लक्षात घेऊन तिला बाहेरून कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी अनिलने तिच्याबरोबर धावपळ केली होती.
असंच एके दिवशी अनिल तिला बळेबळे चौपाटीवर घेऊन गेला.खूप टेन्शनमध्ये होता तो. थोडा वेळ बसल्यावर तो तिचा हात हातात घेऊन म्हणाला," उमा आपण पळून जाऊन लग्न करूयात".
उमा एकदम दचकलीच. तिने विचारले, " का बरं? काय झालं अचानक? "
"अगं मामा माझ्या मागे लागलाय, आता परमनंट झालास वैशूशी लग्न कर म्हणून! त्याला बहुतेक कळलंय आपल्याबद्दल." अनिल उद्विग्न होऊन म्हणाला.
त्याचा हात हातात घेऊन लांब कुठेतरी खूप वेळ शून्यात बघत बसलेली उमा म्हणाली, "अनिल तू करून टाक वैशू शी लग्न!"
"उमा अगं पण आपलं प्रेम आहे एकमेकांवर मग असं कसं बोलू शकतेस तू?" अनिल चिडून म्हणाला.
"शांतपणे विचार कर अनिल. चुलत्यांनी नाकारली तशी मामाने ही तुझी जबाबदारी नाकारली असती तर? त्याने तसं केलं असतं तर आज तू असा दिसला असतास का? कदाचीत कुठेतरी भीक मागावी लागली असती तुला. आणि मामी ही चांगलं वागली रे तुझ्याशी! त्यांच्या अर्ध्या घासात त्यांनी तुला वाटेकरी केलेय. त्यामुळे निदान तुझ्या डोक्यावर आधाराचे छप्पर तरी राहिलेय. त्या बदल्यात त्यांनी तुझ्याकडे ही अपेक्षा व्यक्त केली तर चुकले कुठे? आणि त्यांना तरी त्यांच्या मुलीची चिंता असेलच ना? परक्या कुणाला तरी मुलगी देण्यापेक्षा, जो आपल्याचकडे लहानाचा मोठा झालाय त्याच्याकडे ती नक्कीच खूप सुरक्षित राहील, असा व्यवहारी विचार त्यांनी केला तर त्यात चूक काय? माझं खरोखर खूप प्रेम आहे रे तुझ्यावर! पण आपण परिस्थितीने बांधलेले आहोत. माझा भाऊ कमवायला लागेपर्यंत मी तुझ्याशी काय कोणाशीच स्वप्नात पण लग्न नाही करू शकत रे! अजून किमान पाच वर्षे तरी मला लग्नाचा साधा विचार सुद्धा नाही करता यायचा. माझी कष्टकरी आई, आजारी वडील,शिकत असलेला भाऊ.....यांचे आयुष्य अंधारात लोटून माझ्या आयुष्याचा दिवा मी कसा पेटवू अनिल? तू कदाचित थांबशीलसुद्धा माझ्यासाठी! पण तू कृतघ्न ठरशील मामा-मामी यांच्या नजरेत त्याचे काय? आणि लग्न करता आलं नाही एकमेकांशी म्हणून आपलं प्रेम कमकुवत आहे,असं मुळीच नाही. कर्तव्य करण्याचं भान देतं तेच खरं प्रेम अनिल!" बोलता-बोलता उमा हमसून हमसून रडू लागली.
बराच वेळ विचार करता करता,तिला थोपटून शांत करीत अनिल म्हणाला, "किती मोठ्या मनाची आहेस उमा तू!आपण पळून जाऊन लग्न करु शकतो, पण त्यामुळे कदाचित आपण दोघंच सुखी होऊ. पण दोन परिवारांची वाताहत होईल हे खरं! डोळ्यातील पाणी त्याने खूप निग्रहाने परतवले.
"अनिल, समांतर रस्त्यांवरून चालणं नशीबात आहे रे आपल्या", उमा अजून रडतच होती.
खूप वेळ तिथे बसून दोघे उठली. घरी निघाली त्यानंतर उमाने ती नोकरी सोडली आणि अनिलच्या ओळखीनेच एका कापड दुकानात तिने नोकरी मिळवली.
त्यानंतर थेट आज भेट झाली होती दोघांची!
"उमा डोसा खाऊ यात?" अनिल हसून तिच्याकडे बघत म्हणाला. त्याने एक डोसा आणि एक कॉफी मागवली. अर्धा अर्धा डोसा खाताना आणि अर्धी अर्धी कॉफी पिताना पुन्हा दोघांनाही जुने दिवस आठवले. उमाच्या डोळ्यात पाणी आले.
तिच्या हातांवर थोपटत अनिल म्हणाला, " उमा त्यावेळी भावनांमध्ये वाहावत न जाता आपण योग्य निर्णय घेतला. शेवटी आयुष्य म्हणजे तडजोडच गं! आपलं लग्न झालं असतं, तरी परिवाराशी ताटातूट होऊन तडजोडीत जगावं लागलं असतं.तुला मी कधीच विसरलो नाही उमा! तूच माझी शक्ती आणि स्फूर्ती होतीस या सगळ्या कष्टांत!! बाय द वे, तुझे आई-बाबा, भाऊ कुठे आहेत? कसे आहेत आता? "
"बाबा मागेच गेले. ते बरे झालेच नाहीत. भाऊ आयटीआय होऊन एका कारखान्यात लागला. जिद्दीने आणि फार कष्टाने पुढे शिकला. मेकॅनिकल इंजिनिअर होऊन महींद्रा मध्ये चांगल्या पगारावर आहे आता. वहिनी पण इंजिनीअर असून चांगल्या कंपनीत आहे. तो महिंद्रा मध्ये लागल्यावर मी लग्न केले.दरम्यान मी पण शिक्षिका झाले होते. आई भावाकडे राहतेय, सुखात आहे. तिच्या कष्टांचे चीज झाल्याची भावना आहे तिच्या मनात.तुझे मामा मामी कसे आहेत? " उमा ने विचारले.
"आहेत.छान आहेत. मामाच्या मुलाला शिक्षणात डोकं नव्हतंच!त्याने वडापावच्या गाडी पासून सुरुवात केली, मामा मामीने ही त्याला साथ दिली. आज त्याचे दोन हॉटेल्स आहेत. मोठा फ्लॅट आहे. दोन चार चाकी गाड्या आहेत. सुंदर गुणी बायको आणि एक मुलगा आहे.मामा-मामी सुखात आहेत.सगळं सगळं छान आहे!! सगळं क्रेडिट तुला याचं उमा." खुप भावनिक होऊन अनिल म्हणाला.
"मला एकटीलाच नाही अनिल, आपल्या दोघांनाही!आपल्या त्यागावर या इमारती उभ्या राहिल्यात." गाडीत बसता बसता उमा म्हणाली.
उमाला तिच्या घरासमोर सोडून अनिल निघाला.
"घरात नाही येणार?" तिने विचारले.
"नको उमा, समांतर रस्त्यावरचे प्रवासी आपण! नशिबाने भेट झाली, खुशाली कळली, छान वाटले!निघतो आता, चल बाय.....!"असे म्हणून मोठ्या जड मनाने अनिल ने गाडी स्टार्ट केली.
त्याला बाय करून पाणावले डोळे अन जडावले पाय घेऊन उमा घराकडे वळली.
दूर कुठेतरी गाणे वाजत होते.........
हर खुशी हो वहाँ.....
तू जहाँ भी रहे......!

नीतू (सुनिता दरे)

*माझी कथा शेअर करायची झाल्यास माझ्या नावासह तिच्यात कसलाही बदल न करता शेअर बटन वापरूनच करावी. अन्यथा करू नये

महाराष्ट्रात कुठे ही रसवंती गृहात ऊसाचा रस पिण्यासाठी थांबल्यावर तुम्हाला असा प्रश्न कधी पडलाय का...??? की या बहुतांश रस...
14/09/2024

महाराष्ट्रात कुठे ही रसवंती गृहात ऊसाचा रस पिण्यासाठी थांबल्यावर तुम्हाला असा प्रश्न कधी पडलाय का...??? की या बहुतांश रसवंती गृहांची नावे ' नवनाथ किंवा कानिफनाथ ' का असतात...????*_

अमृततुल्यवर होणाऱ्या चाय पे चर्चावाल्या गरम चर्चाचे फड नवनाथ रसवंती गृहावर बसू लागले आहेत. ऊसपट्ट्यातलं कोल्हापूर, जयसिंगपूर, सांगली असो की दुष्काळात रमलेल नांदेड लातूर, देशाची आर्थिक राजधानी मुंबई असो की आडमार्गावरचं जांभूळगाव. *प्रत्येक गावातल्या स्टँडवर आठवडीबाजाराच्या ठिकाणी नवनाथ रसवंतीगृह असतेच, कधी कधी कानिफनाथ रसवंतीगृह असं नाव असतं.*_

_स्वच्छ टापटीप हे या रसवंतीगृहाचं वैशिष्ट्य असते. आत मध्ये नवनाथांचे चित्र लावलेले असते. टिपिकल पांढरी टोपी विजारशर्ट घातलेले काका ऊसाचा रस काढत असतात. घुंगराच्या मधुर सुरातल्या छुमछुम अशा लयीत मशीनचा गोल फिरणारा चरखा, त्यातून आतबाहेर फिरणारा ऊस आणि मग चिपाड बाजूला जाऊन आपल्या हातात येतो मस्त आलं लिंबू टाकलेला थंड उसाचा रस. समोर ठळक अक्षरात लिहिलेलं असत, *“देशबंधूनो विचार करा चहा पेक्षा रस बरा”* चांद्या पासून बांद्यापर्यंत कुठेही जा. पूर्ण महाराष्ट्रभर रसवंतीगृहामध्ये फार पूर्वीपासून हेच चित्र आपल्याला पाहायला मिळतं._

*_🔺घामाने डबडबलेले थकले भागले कष्टकरी असो वा एसी कारमधून फिरणारे मोठया कंपनीचे सीइओ अशा सगळ्यांची क्षुधाशांती या उसाच्या रसानेच होते._*

पण ही एकाच नावाची नवनाथ रसवंतीगृह पाहिल्यावर आताच्या पिढीतल्या कुणाला वाटतं की..... ही सगळी रसवंतीगृह एकाच माणसाच्या मालकीची आहेत की काय...??? तर कुणाला वाटत की मॅकडोनाल्ड, के एफ सी चे जसे फ्रँचाइजी देतात तसे नवनाथ रसवंती गृहाची देखील फ्रँचाइजी असते की काय...???

*🔺नवनाथ रसवंती गृहामागची कथा...*

तर गोष्ट आहे साधारण सत्तर ऐंशी वर्षा पूर्वीची. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका गाव बोपगाव. पश्चिम महाराष्ट्राच्या मानान दुष्काळी पट्टा. पण इथला शेतकरी जिद्दी. जवळ असणाऱ्या थोड्याथोडक्या पाण्यावर शेती जगवत होता. त्याकाळात साखर कारखान्यांच पेव फुटलेलं नव्हत. त्यामुळे शेतात पिकणाऱ्या उसाला हक्काचं मार्केट नव्हत. त्यातून मिळणारा रोजगार नव्हता.

अशातच गावातला कोणीतरी खटपट्या तरुण रोजगार शोधायला मुंबईला गेला. तिथ गेल्यावर त्याला कळाल की इथ आपल्या उसाला इथ भरपूर मागणी आहे. त्याकाळात देशी उस असायचे. लहानमुलाला देखील एका फटक्यात शेंड्यापासून बुडख्यापर्यंत सोलता येईल असा तो ऊस असायचा. या उसाचे छोटे छोटे तुकडे करून बरणीत घालून ते मुंबईला विकले जाऊ लागले. नंतर कोणाच्यातरी लक्षात आलं असं दारोदारी फिरण्यापेक्षा एका जागी दुकान टाकून तिथ हे रस काढून विकावं. पुरंदरच्या गोड उसाच्या रसाने मुंबईत जादू केली. हळूहळू बोपगाव, सासवड, चांबळी, बिव्हरी अशा गावातली बंडी विजार घालणारे शेतकरी रसवंतीच्या बिझनेससाठी पूर्ण राज्यभरात पसरले. जिथ जातील तिथ दुधात साखर विरघळावी तसे तिथल्या माणसांच्यात विरघळून गेले. धंद्यात सचोटी ठेवली. आपल्या रसवंतीला त्यांनी ब्रँड बनवलं.

*🔺मग रसवंतीला नवनाथ हेच नाव का दिल गेल..???

तर बोपगावजवळच्या डोंगरावरच्या गुहेत नाथसंप्रदायाचे नऊ नाथांपैकी एक कानिफनाथस्वामी येथे तपश्चर्येला बसले होते. आजही त्या जागेवर सुंदर मंदिर आहे. अख्खा पुरंदरतालुका या कानिफनाथांचा भक्त आहे. इथली माणस जगभर पसरली पण आपल्या मातीला विसरली नाहीत. त्यांनी आपल्या रसवंतीगृहाचे नाव श्रद्धेनं कुणी नवनाथ तर कुणी काफ़िनाथ ठेवलं.

“ताजा ऊस हा हत्तीला फार आवडतो आणि कानिफनाथांची उत्पत्ती ही हत्तीच्या कानातून झाली आहे ! अशी लोककथा आहे.. त्यामुळे भाव तिथे देव या न्यायाने कनिफनाथाना ऊस , रस , गूळ आवडतो ! इतका सिंपल अर्थ आहे ! दत्तसंप्रदायाची नाथसंप्रदाय ही शाखा आहे ,त्यामुळे नवनाथ रसवंती , कानिफनाथ रसवंती ही नावे ठेवण्याचा प्रघात पडला आणि तो जनमानसात रुळला

कानिफनाथ गड बोपगाव
पूर्वी बैलानी फिरवल्या जाणाऱ्या लाकडी घाण्यावर हे रस काढलं जायचं. पुढे लोखंडी मशीन आले. बैल गेले. पण या बैलानी आपल्याला एकेकाळी जगवलेलं याची आठवण या शेतकऱ्याच्या पोरांनी विसरू दिली नाही. त्यामुळेच बैलाच्या गळ्यातल घुंगरू आजही रस काढणाऱ्या मशीन चरख्यावर छुमछुम आवाज करत आहे. नवनाथ / कानिफनाथ रसवंतीगृहाचं यश बघून इतर रसवंतीगृह वाले सुद्धा तेच नाव वापरू लागले.

_*कोक पेप्सी सारखे कित्येक कोल्ड्रिंक आले तरी उसाचं रसासारख्या पारंपारिक पेयाची लोकप्रियता कमी होत नाही. कावीळ सारख्या रोगावर हमखास गुणकारी कोणत्याही सिझन मध्ये चालणारा आरोग्यदायी उत्साहवर्धक विशेष म्हणजे खिशाला परवडणारा उसाचा रस प्यावाच आणि तो ही नवनाथ रसवंतीगृहाचा हेच गोड सत्य उरते

 #अक्षय_कुमारजन्म. ९ सप्टेंबर १९६७ अक्षय कुमार ह्याचे खरे नाव राजीव हरीओम भाटिया आहे. अमृतसरमधील एका मध्यमवर्गीय पंजाबी ...
10/09/2024

#अक्षय_कुमार
जन्म. ९ सप्टेंबर १९६७
अक्षय कुमार ह्याचे खरे नाव राजीव हरीओम भाटिया आहे. अमृतसरमधील एका मध्यमवर्गीय पंजाबी कुटुंबात अक्षयचा जन्म झाला. वडील सरकारी कर्मचारी होते. अगदी लहान वयातच अक्षयमध्ये एक कलाकार दिसू लागला होता. मुंबईत आपलं नशीब आजमावण्यासाठी येण्याआधी अक्षय दिल्लीतील चाँदनी चौक भागात राहत होता. मुंबईत आल्यानंतर कोळीवाडा भागात राहत असे. त्यानं डॉन बॉस्को विद्यालयात शिक्षण घेतलं आणि त्यानंतर कालसा कॉलेजमध्ये उच्चशिक्षण पूर्ण केलं. अक्षयचा बॉलीवूडमध्ये इथपर्यंत झालेला हा प्रवास त्याच्या निरंतर संघर्षाचे आणि मेहनतीचे फळ आहे. अन्यथा कोणतेही ग्लॅमरस आडनाव न लाभलेला अक्षय बॉलीवूडमध्ये यशस्वी ठरलाच नसता.'शेफ' म्हणून कारकिर्दीची सुरवात करणारा अक्षय आता बॉलीवूडमधला 'सबसे बडा खिलाडी' ठरला आहे. सुरवातीला एक्शनपट करणारा अक्षय आता एक्शन-विनोद-थ्रिलर यांची उत्तम भेळ सादर करणारा कलावंत ठरला आहे. खिलाडी सिरीज, यह दिल्लगी, मोहरा, मै खिलाडी तू अनाडी, दिल तो पागल है, हेरा फेरी, खाकी, मुझसे शादी करोगी, नमस्ते लंडन, हे बेबी, भुल भुलय्या, सिंग इज किंग असे यशस्वी चित्रपट त्याच्या नावावर आहेत. लहान असताना अक्षय अतिशय मस्तिखोर मुलगा म्हणून प्रसिध्द होता. अभ्यासात रस नसलेल्या अक्षयला क्रिकेट आणि व्हॉलिबॉलसारख्या खेळात प्राविण्य होते. वयाच्या आठव्या वर्षी त्याने मार्शल आर्ट शिकण्यास सुरुवात केली. मार्शल आर्ट शिकण्यासाठी तो बँकॉकला गेला होता. तर, थायलंडला जाऊन त्याने मौय थायचे प्रशिक्षण घेतले.तेथे त्याने आचारी आणि वेटरचे कामदेखील केले. अक्षय कुमार हा कराटेचा ब्लॅकबेल्ट चँपियन आहे आणि विशेष म्हणजे एक जगप्रसिद्ध आचारी आहे. जो जिता वही सिकंदर’ चित्रपटातील दीपक तिजोरीच्या भूमिकेसाठी अक्षय कुमारने ऑडिशन दिल्याचे फार कमी लोकांना माहित आहे. परंतु या भूमिकेसाठी त्याला नाकारण्यात आले होते. अक्षय डब्ल्यूडब्ल्यूईचा फार मोठा चाहता आहे. २०१० साली डब्ल्यूडब्ल्यूईचा सुपरस्टार केनला अक्षयने आपल्या घरी आमंत्रित केले होते. त्वायकांडोमध्ये त्याने ब्लॅकबेल्ट मिळवला आहे.‘स्पेशल २६’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करेल याबाबतची अनुपम खेरबरोबरची पैज हरल्यावर अक्षयला टेबलावर नृत्य करावे लागले होते. भारतीय चित्रपटसृष्टीतील अक्षयच्या योगदानासाठी २००८ साली ‘युनिर्व्हसिटी ऑफ विण्डसर’ने त्याला कायद्यातील मानद पदवी देऊन सन्मानित केले. ९ हा आकडा आपल्यासाठी भाग्यवान असल्याचा अक्षय कुमारचा विश्वास आहे. आयुष्यातील अनेक चांगल्या गोष्टीचा संबंध ९ संख्येशी असल्याचे त्याचे मानणे आहे. त्याच्या मुलांचा जन्म नवव्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबर महिन्यातील आहे. नियमित व्यायाम करणारा अक्षय दररोज सकाळी न चुकता मॉर्निंग वॉकला जातो. भारताबाहेर चित्रिकरण करत असताना तो नियमितपणे जिममध्ये जाऊन व्यायाम करतो. केवळ अभिनय क्षेत्रातच अक्षय कुमार प्रसिद्ध नाही. मॉडेलिंग, मार्शल आर्ट्स यांसारख्या क्षेत्रातही अक्षयचं नाव आदराने घेतलं जातं. वेगवेगळ्या क्षेत्रात आपला वेगळा असा ठसा उमटवण्यात अक्षय कुमार यशस्वी झाला आहे. नुकताच स्कॉटलंडमध्ये चित्रीकरण झालेला ‘बेलबॉटम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. अक्षयच्या नावावर एक असा रेकॉर्ड नोंदवला गेला आहे, जो फारच कमी कलाकार बनवू शकतात. हा विक्रम बॅक टू बॅक हिट चित्रपट देण्याचा आहे. अक्षयने तीन वर्षांच्या कालावधीत सलग १२ हिट चित्रपट केले आहेत.हिट चित्रपट देण्याची मालिका २०१६ च्या ‘एयरलिफ्ट’ या चित्रपटाने सुरु झाली होती, ज्याने बॉक्स ऑफिसवर १२९ कोटींचे कलेक्शन करून सुपरहिट रेटिंग मिळवले. त्याच वर्षी आलेल्या ‘हाऊसफुल ३’ ने जवळपास १०८ कोटी कलेक्शन केले आणि यशस्वी झाला. १२७ कोटींपेक्षा जास्त कलेक्शन करणारा ‘रुस्तम’ सुपरहिट ठरला. २०१७ मध्ये ‘जॉली एलएलबी २’ (११७ कोटी) आणि ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ (१३३.६० कोटी) हिट ठरले. २०१८ मध्ये पॅडमॅन (७९ कोटी), गोल्ड (१०८ कोटी) आणि २.० (१८८ कोटी) हिट घोषित करण्यात आले.अक्षयसाठी २०१९ हे वर्ष खूप उत्तम आणि संधी देणारे होते. त्याचे ४ चित्रपट आले आणि चारही हिट ठरले. त्यापैकी काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर द्विशतक केले. त्यात ‘केसरी’ (१५३ कोटी), ‘मिशन मंगल’ (११४ कोटी), ‘हाऊसफुल ४’ (२०६ कोटी) आणि ‘गुड न्यूज’ (२०१ कोटी) या चित्रपटांचा समावेश आहे.
संदर्भ.इंटरनेट

अंबानी कुटुंबाची नवीन सून राधिका, गणपती विसर्जनात अगदी साध्या मुलीप्रमाणे नाचताना दिसली. तिच्यासोबत तिचे पती अनंत अंबानी...
09/09/2024

अंबानी कुटुंबाची नवीन सून राधिका, गणपती विसर्जनात अगदी साध्या मुलीप्रमाणे नाचताना दिसली. तिच्यासोबत तिचे पती अनंत अंबानी देखील होते, जे पत्नीला आनंदाने नाचताना पाहत होते. अंबानी कुटुंबातील सुनेचा हा साधा आणि उत्साही स्वभाव पाहून अनेकांना विश्वास बसत नाही की ती इतक्या मोठ्या घराची सून आहे. तिच्या सादगीची आणि आनंदी स्वभावाची सर्वत्र प्रशंसा होत आहे.

07/07/2024

Marathi

29/11/2023

Address

Pune
411001

Alerts

Be the first to know and let us send you an email when चावडी Chawdi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share