Rajhans Prakashan Pune

Rajhans Prakashan Pune मराठी पुस्तक विश्वातले अग्रगण्य नाव - राजहंस प्रकाशन
विषयांचं वैविध्य आणि आशयाची समृद्धी!

📢📢सप्ततारांकित लेखकांची सर्व राजहंसी 📚पुस्तके २५ % सवलतीत मिळणार..शिवाय कुरियर चार्जेस नाहीत..रु. २००० पेक्षा जास्त खरेद...
04/11/2025

📢📢सप्ततारांकित लेखकांची सर्व राजहंसी 📚पुस्तके २५ % सवलतीत मिळणार..शिवाय कुरियर चार्जेस नाहीत..
रु. २००० पेक्षा जास्त खरेदीवर आकर्षक भेट.⤵️
📚📚पुस्तकखरेदीसाठी
📞संपर्क 8378836836
खरेदीसाठी..
https://www.rajhansprakashan.com/
वर क्लिक करु शकता..
#मराठीसाहित्य

17/10/2025

तुमची पुस्तकखरेदी झाली?

आदिवासींच्या मते हे अंबर मिळणे शुभ नाही. ज्याला मिळाते तो  आयुष्यातून उठतो.., ☹️कुतूहलाने आम्ही विचारलेच की काय आहे 'अंब...
16/10/2025

आदिवासींच्या मते हे अंबर मिळणे शुभ नाही.
ज्याला मिळाते तो आयुष्यातून उठतो.., ☹️

कुतूहलाने आम्ही विचारलेच की काय आहे 'अंबर'? त्यांना त्याचे फारसे नीट उत्तर देता आले नाही. फक्त, "अंबर असते तर खूप मालामाल झालो असतो" असे बोलले. 'अंबर' म्हणजे तर आकाश ना? मग हे पैशांबद्दल काय म्हणत असतील? 'थंडी संपत आली की अंबर सापडते कधीकधी' असे म्हणाले. 'खूप वास असतो त्याला', इतकेच काय ते त्यांनी सांगितले. एक-दोघांना विचारले पण कोणी स्पष्टपणे सांगू शकले नाही.
#भारतात #निकोबार बेटांवर समुद्राच्या लाटांबरोबर वाहत येणारा सर्वात किमती आणि मौल्यवान असा हा पदार्थ🫣. त दीर्घकाळ टिकणारा #सुगंध हा याचा महत्त्वाचा गुणधर्म. सुगंधी अत्तर बनवण्यासाठी कामी येणारा.
याचा शोध #अरब लोकांनी लावला. ते अरबी लोक आदिवासींकडून खूप कमी मोबदल्यात अंबर घेऊन जायचे आणि त्याच्यापासून बनवलेले अत्तर विक्री करून प्रचंड संपत्ती गोळा करायचे. वर्षानुवर्षे त्यांचा हा व्यवसाय सुरू होता.
जेव्हा हे अंबर लाटांबरोबर किनाऱ्याला लागते, तेव्हा फिकट पिवळसर तपकिरी रंगाचा ओबडधोबड गोळा असते. मेणासारखे थोडेसे तेलकट आणि हलके असल्याने पाण्यावर तरंगत येते. दूरवर पसरत जाणारा सुगंध आपल्याला त्याच्याकडे खेचून घेतो.

कसे बनत असेल अंबरग्रीस ? त्याची एक छानशी कहाणी आहे. स्पर्म #व्हेल हा सर्वात मोठ्या आकाराचा मासा. या माशाचे सर्वात आवडते खाद्य म्हणजे स्क्विड नावाचा साधारणपणे ऑक्टोपससारखा दिसणारा जलचर. स्पर्म व्हेल जेव्हा एखाद्या स्क्विडला गिळतो तेव्हा त्याच्या टोकदार नखांसारख्या अवयवाने माशाला आतून जखमा होऊ नयेत म्हणून गिळलेल्या स्क्विडभोवती नैसर्गिकरित्या एक आवरण/वेष्टण तयार केले जाते. हे आवरण आतड्यातील पाचक स्त्रावांपासून तयार होते. खाल्लेल्या भक्षाचे पचन झाले की मग व्हेल मासा ते तेलकट स्रावमिश्रित वेष्टण उलटीवाटे बाहेर काढतो. जात्याच तेलकट असलेला स्राव पाण्यावर तरंगत असतो. त्यावर पडलेल्या सूर्यकिरणांमुळे आणि उष्णतेमुळे स्राव हळूहळू घट्ट होत जातो. लाटांच्या हालचालीमुळे त्याचा गोळा होत जाऊन तो गोळा किनाऱ्यावर येतो. एकावेळी अर्धा किलो ते पन्नास किलो पर्यंत किंवा त्याहूनही जास्त वजनाचे अंबरग्रीस मासा उलटीद्वारे बाहेर टाकतो. कमीत कमी दीड - दोन लाख रुपये किलो किंवा त्याहूनही जास्त किमतीने #अंबरग्रीस विकले जाते.
सुगंधी बाजारात त्याची मागणी पाहून बऱ्याचदा स्पर्म व्हेलची शिकार केली जाते. त्यामुळे त्याचे अस्तित्वच धोक्यात येऊ लागले आहे. जगभरातून त्याच्या शिकारीवर नियंत्रण आणणे सुरू आहे. हे मासे उन्हाळ्यात अंटार्क्टिकामध्ये तर हिवाळ्यात हिंद महासागरामध्ये स्थलांतर करतात. त्यामुळे अंबर भारतात विशेषतः #अंदमान-निकोबार बेटांवर सापडते.
अजून एक गोष्ट कळली ती म्हणजे, काही आदिवासींच्या मते हे अंबर मिळणे शुभ नाही. ज्याला मिळाले तो माणूस आयुष्यातून उठतो, असे म्हणतात. त्याचे कारण असे की, अंबर विक्रीतून अचानक लॉटरी लागल्याप्रमाणे भरपूर पैसा मिळतो. पण त्या मिळालेल्या अमाप पैशांचे करायचे काय, हे जर त्याला समजले नाही तर तो व्यसनाधीन होऊ शकतो किंवा त्याला चैनीची चटक लागते, जी पैसे संपले तरी संपत नाही. त्याच्या घरच्यांपासून तो दूर होऊ लागतो. एखादा शिकलेला आणि त्या पैशांचा विचारपूर्वक वापर करणारा असेल तर तो खूप प्रगती करतो. पण असे क्वचितच घडते.

काही आदिवासीच्या मते अंबर म्हणजे देवमाशासारख्या सस्तन प्राण्याच्या पोटातील 'बाळ बाहेर आल्यावर निघालेले नाळयुक्त वार/गर्भवेष्टण' किंवा कधीकधी अकस्मात जन्मापूर्वीच जे अर्भक गर्भवेष्टणासहित अकाली / वेळेपूर्वी बाहेर पडते, तेसुद्धा अंबरमध्ये असते. त्यामुळेच ते पैसे म्हणजे, एका मृत अर्भकाचे, त्याच्या आईचे दुःखी मन,त्यात अडकलेले असते..
कोणाला दुखावणे त्याच्या संस्कारात बसत नाही...
किती निरागस विश्व आहे ना त्यांचे.. 😊

राजेश्वरी किशोर लिखित 'निकोबार ची नवलाई' या राजहंसी पुस्तकातून )

मी देखील एकदिवस आकाशात अशीच  #झेप घेईन...रामनाथपुरममधल्या 'श्वार्झ' माध्यमिक शाळेत मी हळूहळू रमलो आणि माझ्यामधला पंधरा व...
15/10/2025

मी देखील एकदिवस आकाशात अशीच #झेप घेईन...

रामनाथपुरममधल्या 'श्वार्झ' माध्यमिक शाळेत मी हळूहळू रमलो आणि माझ्यामधला पंधरा वर्षांचा उत्साही मुलगा पुन्हा उठून उभा राहिला. या शाळेत शिकवणारे एक मास्तर श्री. इयादराई सालोमन एक आदर्श #गुरु होते. माझ्या तरुण, उत्साही मनाला समोर फुटणाऱ्या असंख्य वाटा मोहन टाकत. त्यातली कुठली निवडावी, असा संभ्रम पडला होता. त्यांनी मला योग्य दिशा दाखवली.
#विद्यार्थी त्यांच्या सहवासात निश्चित, आश्वस्त असत. त्यांच्या कुठल्याही प्रश्नांचे मास्तर खुल्या मनाने स्वागत करत. ते नेहमी म्हणत, "चांगला विद्यार्थी सामान्य गुरूंकडून जे मिळवू शकतो; ते सामान्य विद्यार्थी निष्णात गुरूकडून मिळवेल, त्यापेक्षा अधिक असते."

माझ्या रामनाथपुरम येथील वास्तव्यात त्यांचे माझे संबंध गुरुशिष्यापेक्षा कितीतरी गहिरे होते. त्यांच्याकडून मी एक महत्त्वाची गोष्ट शिकलो. ती म्हणजे, आपल्या हातून घडणाऱ्या कृती, आपले विचार आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांवर एक प्रकारचा ताबा ठेवू शकतात. ते नेहमी म्हणायचे, "आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तीन महत्त्वाच्या गोष्टी आपण समजून घ्यायला हव्यात. पहिली म्हणजे माणसाला इच्छा हवी, महत्त्वाकांक्षा हवी, दुसरी, तिचा ध्यास घ्यायला हवा, आणि तिसरी म्हणजे ती पूर्ण होईल असा दृढविश्वास हवा." पुढे ते रेव्हरंड झाले.

माझ्या स्वतःच्या आयुष्यात मला पुढे त्यांच्या बोलण्याची प्रचिती आली. माझ्या बालपणापासून मला पक्ष्यांचे उडणे अतिशय रम्य, गूढ असे वाटायचे. सीगल पक्षी आणि बगळे पंख पसरून आकाशात झेपावताना मी आसुसून पाहत राहत असे. माझ्या कोवळ्या मनात त्या वेळी त्यांच्यासारखा आपणही आकाशात विहार करावा अशी इच्छा सरसरून जागी व्हायची. मी मनाशी म्हणत असे, एक दिवस मी देखील आकाशात अशी झेप घेईन..

( #अग्निपंख या राजहंसी पुस्तकातून साभार )

भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस.. विनम्र अभिवादन 🙏🙏

जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर, वीणा गवाणकर आणि राजहंस प्रकाशन यांचं नातं अद्वैत आहे. वीणाताईंच्या अभ्यासू लेखणीतनं साकारलेल्य...
14/10/2025

जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर, वीणा गवाणकर आणि राजहंस प्रकाशन यांचं नातं अद्वैत आहे. वीणाताईंच्या अभ्यासू लेखणीतनं साकारलेल्या एक होता कार्व्हर या चरित्रानं मराठी साहित्यात इतिहास रचला. वीणाताईंचं कार्व्हर वाचलं नाही असा रसिक वाचक मिळणं अवघड. १९८१ साली प्रकाशित झालेल्या पहिल्या आवृत्तीपासून प्रत्येक पिढीवर कार्व्हरचं गारूड कायम आहे. ज्यांनी कार्व्हर पूर्वीच वाचलंय त्यांच्यासाठी आणि कार्व्हर लवकरच हाती घेणार आहेत अशा नवीन पिढीसाठीही एक होता कार्व्हरमधला निवडक भाग ऑडिओ रूपात राजहंसी मोहोर पॉडकास्टमध्ये नुकताच प्रसारित करण्यात आला आहे. अपर्णा जोग यांनी त्याचं वाचन केलंय. एपिसोड नक्की ऐका!
(एपिसोडची लिंक कमेंटमध्ये)

. 'भारत' म्हटले की, जपानी लोकांच्या डोळ्यांसमोर येते  'इन्दो कारे' (   )जपानबद्दल तर बरंच काही उलटसुलट ऐकलंय. तिकडचे अनु...
14/10/2025

. 'भारत' म्हटले की, जपानी लोकांच्या डोळ्यांसमोर येते 'इन्दो कारे' ( )

जपानबद्दल तर बरंच काही उलटसुलट ऐकलंय. तिकडचे अनुभव कसे असतील? जपानी लोकांशी मी कसं वागायला हवं? ते लोक माझ्याकडे कशा नजरेनं बघतील ? तिथे मला कच्चे मासे आणि बेचव पदार्थ खाऊन दिवस काढावे लागतील का?' असे अनेक प्रश्न.

थांबा, आता तुम्ही एकटे नाहीत. तुमच्या सोबतीला असेल आधार देणारं, तिथल्या संस्कृतीतले बारकावे उलगडणारं . 'कल्चर शॉक : #जपान'. हे पुस्तक वाचायला हवं..
-========

"तामिळ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता #रजनीकांत जपानमध्येही चांगलाच लोकप्रिय आहे. त्याच्या बहुतेक सिनेमांच्या डीव्हीडी जपानी सबटायटल्ससह जपानमध्ये उपलब्ध आहेत. त्याच्या जपानी चाहत्यामध्ये तो 'ओदोरू महाराजा' (नाचणारा महाराजा) या नावाने लोकप्रिय आहे.

जपानमध्येही आहे. भारतीय खाद्यसंस्कृतीही जपानमध्ये अर्थातच पोचली आहे. ' #भारत' म्हटले की, जपानी लोकांच्या डोळ्यांसमोर सर्वप्रथम येते ती 'इन्दो कारे' (Indian curry). #टोकिओ आणि ओसाकासारख्या बहुतेक सर्व मोठ्या शहरांमध्ये अनेक भारतीय हॉटेल्स आहेत. 'कारे-राईस' (curry Rice) चा आस्वाद घेण्यासाठी जपानी लोक या हॉटेलांकडे वळतात. अर्थात तिखट खाण्याची अजिबात सवय नसलेल्या जपानी लोकांना 'रुचेल' आणि 'पचेल' अशा बेताने बनवलेली 'करी' आपल्याला मिळमिळीत वाटते. नान, तंदुरी चिकन आणि इतर पंजाबी पदार्थ जपानमध्ये चांगलेच ठाऊक आहेत. त्या मानाने इडली, डोसा व तत्सम दाक्षिणात्य पदार्थ फारसे परिचित नाहीत. जपानमध्ये गेलेल्या भारतीयांना 'तुम्ही रोज नान खाता का?', 'भारतातली 'करी' याहून खूप तिखट असेल ना?' वगैरे प्रश्न हमखास विचारले जातात.

शतकानुशतके जगाशी संबंध न आलेल्या, एकच भाषा आणि संस्कृती असलेल्या जपानसारख्या देशातल्या लोकांना भारतासारखा सर्वार्थाने वैविध्यपूर्ण देश 'समजून घेणे' फारच अवघड जाते. 'सर्वच #भारतीय #फेटे बांधत नाहीत' असे सांगितल्यावर ते चक्रावून जातात. भारतात वर्षभर उष्ण हवामान असते अशी पक्की समजूत असल्यामुळे 'आमच्या देशात काही ठिकाणी बर्फ पडतो आणि तापमान शून्याखाली जाते' असे सांगितल्यावर त्यांचा विश्वासच बसत नाही. विशेषतः जपानी भाषेव्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेत कधीही व्यवहार न केलेल्या जपानी लोकांना, 'भारतात बावीस अधिकृत भाषा आहेत आणि दुसऱ्या प्रांतात गेल्यावर आम्हांला कधीकधी भाषिक अडचणी येऊ शकतात', असे सांगितल्यावर आश्चर्याचा मोठा धक्का बसतो. दोन भिन्न प्रांतीय भारतीयांना इंग्रजीत बोलताना पाहून त्यांना गंमत वाटते आणि 'तुम्ही एकमेकांशी इंग्रजीत का बोलता?' असेही ते विचारतात. 'भारतीय लोकांना चांगले इंग्रजी येते', अशीही बहुतेकांची समजूत असल्यामुळे 'खेड्यापाड्यांतील बहुसंख्य भारतीयांना इंग्रजी कळत नाही' हे सांगितल्यावर त्यांचे डोळे विस्फारतात"🫣
(निसीम बेडेकर लिखित ' कल्चर शॉक #जपान' पुस्तकातून साभार )

तिनं मला खूप सोबत केली.. कायम... 🥰अ..आ.. आई, म... म..मका, तसं माझ्यासाठी स.. सा  #सायकल आहे. हे काय अद्वैत आहे माझं सायक...
13/10/2025

तिनं मला खूप सोबत केली.. कायम... 🥰

अ..आ.. आई, म... म..मका, तसं माझ्यासाठी स.. सा #सायकल आहे. हे काय अद्वैत आहे माझं सायकलीशी, कोण जाणे. पण सायकल फार आपली वाटते मला.
साधारण आठव्या वर्षी शिकले मी सायकल. आधी बरंच कंपल्सरी हॉपिंग करावं लागलं. मग कुणीतरी आपल्या सायकलचं कॅरियर धरायचं आणि आपण 'करी डळमळ भू-मंडळ' अशा भीतीनं कसाबसा दुसरा पाय टाकायचा. हे करताना भरपूर धडपड, पडझड झाली. गुडघ्यावर कायम बँडएड चिकटलेले आणि पायावर हमखास पडून झाल्याच्या खुणा. अखेर मला सायकल शिकवण्यात संदेशला यश आलं. सहावी-सातवीपासून सायकलनं शाळेत जायला लागले मी. घरातल्या हातपंपांनी हवा भरायची, पडलेली चेन लावायची, तिरकं झालेलं हँडल सरळ करायचं. थोडक्यात पंक्चर सोडून बाकी सगळी #मेकॅनिकगिरी मी करू शकायचे. संदीपदादासाठी घेतलेली पिवळी सायकल मग संदेशनं आणि त्याच्यानंतर मी वापरली. खेळ, शालेय स्पर्धा, नातेवाईक, सुट्टीतले उद्योग. सगळीकडे ती माझ्याबरोबर आली. स्वतः चालवण्याआधी लिंबू-टिंबू म्हणून मी डबलसीट असायचे. काडेपेटीचा एक छाप शोधायला कॉलनीतल्या इतर काही लहान मुलांसोबत संदेश मला डबलसीट घेऊन सारसबागेपर्यंत गेला होता. आम्ही चुलत-आत्ते भावंडं एका सुट्टीत तळपत्या उन्हात शिंद्यांची छत्री बघायला- वानवडीला सायकली ताणत गेलो होतो. सायकलनं मी अख्खं पुणं पालथं घातलं आहे. सिंहगडाच्या पायथ्यापर्यंतसुद्धा काही वेळेला सायकलनं गेलो आहोत.

मी नववीत होते तेव्हाची गोष्ट. संदीपदादा आयआयटी कानपूरला जाणार होता, त्याच दिवशी नेमकी पोलीस ग्राऊंडला आमची एसआरपीची परेड होती. निघण्यापूर्वी दादाला अच्छा करायलापण मिळणार नाही, पुढे वर्षभर तो भेटणार नाही, या कल्पनेनं मी फार व्याकूळ झाले होते. मनात एक धाडसी मोहीम
आखली. परेड संपताक्षणी सायकल काढली आणि पणे रेल्वे स्थानकाचा पत्ता विचारीत सुसाट निघाले. पोहोचल्यावर तिथे स्टँडवर सायकल लावली आणि फलाटाकडे धावत सटले. अचानक मला तिथे पाहिल्यावर घरच्यांच्या, विशेषतः दादाच्या आनंदाश्चर्याला पारावार उरला नाही. तू एकटी सायकलनं आलीस? असं सगळ्यांनी कौतुकानं विचारलं, तेव्हा ती शाबासकी मी माझ्या सायकलला पोहोचवली होती. तिनं मला खूप सोबत केली आहे कायम. मुख्य म्हणजे मला स्वयंपूर्ण केलं आहे. खर्च फक्त हवेचा. त्या बदल्यात मला सगळीकडे वेळेवर जाता यायचं. भरपूर व्यायाम व्हायचा. शिवाय रस्त्यांची माहिती व्हायची.

पुढे टु व्हीलर, कार वगैरे घेतल्यावर माझं #सायकलिंग कमी झालं, पण संधी मिळेल, तेव्हा मी माझ्या या दुचाकी मैत्रिणीबरोबर वेळ घालवला. हम्पीचं आउटडोअर शूट, पुण्यातलं आमचं रेस्टॉरंटचं शूट, #कुन्नूर, तसंच गोव्यातल्या सायकलच्या रपेटी माझ्या फारफार लक्षात राहिल्यात.


( #सोनालीकुलकर्णी कुलकर्णी लिखित 'सो कुल'.. टेक 2 या पुस्तकातून)

' #अलिबाबाच्या गुहेत प्रवेश केल्यावर डोळे दिपावे, तसं अरबांचं झालं..😊🫣🫣तेल निघेपर्यंत  #बहारिन,  #दुबई, मस्कत ही लहानलहा...
12/10/2025

' #अलिबाबाच्या गुहेत प्रवेश केल्यावर डोळे दिपावे,
तसं अरबांचं झालं..😊🫣🫣

तेल निघेपर्यंत #बहारिन, #दुबई, मस्कत ही लहानलहान गावं होती. समोर अथांग निळं पाणी, त्यावर उठणारे हलके तरंग, तटावर मोती काढणाऱ्यांच्या आणि मासेमारांच्या कळकट होड्यांची गर्दी आणि किनाऱ्यावर लहानसं धूळभरलं गाव. भारतातून व्यापारी जहाज आलं, की ही गावं गजबजायची. भारतीय व्यापारी यांच्याकडचे #मोती घ्यायचे आणि यांना गरजेच्या वस्तू पुरवायचे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला मुंबई हे मोत्याच्या व्यापाराचं केंद्र होतं. आखातातले मोती मुंबईहून लंडन, पॅरिस या शहरांमध्ये पोचायचे. मात्र १८३० पासून आखातातल्या मोत्याच्या पिकाची लकाकी कमी झाली जपानमध्ये कृत्रिम मोत्यांचा शोध लागला आणि त्यात नैसर्गिक मोत्यांचं मूल्य संपलं. या मोत्यांना गिऱ्हाईक उरलं नाही, त्यामुळे हजारो धौ (होडी) बंदरांमध्ये उभ्या राहिल्या. या धक्क्यातून इथला व्यापार सावरणं तसं कठीणच होतं. पण तेवढ्यात इथल्या लोकांचं नशीब फळफळलं.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत सर्व आखाती देश गरीब होते. तोपर्यंत त्यांच्या पायाखाली काय दडलंय, याचा त्यांना गंध नव्हता. पाश्चात्त्य तेलकंपन्यांना या भागातल्या तेलाचा सुगावा लागल्यावर त्यांनी या शेखांकडून तेल शोधण्याची परवानगी मिळवली. सर्वांत प्रथम १९३२ मध्ये बहारिन बेटावर तेल उसळ मारून बाहेर आलं. त्यानंतर दोन वर्षानी सौदी अरेबिया, कुवेत #कतार या देशांमध्ये तेल सापडलं. आता तेल व्यापारातला काही हिस्सा रॉयल्टीच्या रूपानं इथल्या शेखांना
मिळू लागला. तेलामुळे आलेल्या पैशाच्या जोरावर विकास करण्याला सुरुवात झाली. पण इथे शिक्षणाच्या नावानं पाटी कोरी होती. त्यामुळे येणारा पैसा कुठे आणि कसा खर्च करायचा, याचा सल्ला देण्यासाठी पाश्चात्त्यांची नेमणूक झाली. इथे सर्वच मुळापासून सुरुवात करायची होती. गाड्या आणायच्या, तर त्यासाठी आधी रस्ते बांधायला हवे. वीज, पाणी, दवाखाने यांची व्यवस्था झाली. लोकांना शिक्षण द्यायचं, पण त्यामुळे राजकीय, सामाजिक आणि धार्मिक व्यवस्थेला धक्का पोहोचू न देता बेताबेतानं बदल करायचा
असं धोरण आखलं गेलं. कालपरवापर्यंत माहीत नसलेली भौतिक सुख आखाती अरबांच्या पायाशी लोळण घेऊ लागली.

देशोदेशीच्या नवनवीन वस्तू मिळू लागल्या.
जगाच्या कानाकोपऱ्यातल्या वस्तू #अरबांच्या पुढ्यात उभ्या राहिल्या. पूर्वीचं उजाड, ओसाड वाळवंट सुबत्तेनं आणि समृद्धीनं झळाळलं. #अलीबाबा हा #अरबी लोककथांचा नायक. त्यानं 'तिळा, तिळा दार उघड' असं म्हणावं आणि खजिन्यानं लखलखणाऱ्या गुहेत प्रवेश केल्यावर त्याचे डोळे दिपावे, तसंच अरबांचं झालं..😊

(पुस्तकखरेदीसाठी लिंक कमेंटमधे)


(विशाखा पाटील लिखित 'कल्चर शॉक आखाती देश' या पुस्तकातून )

"वाचलीस!" ती  पुटपुटली... आणि एक विचित्र सन्नाटा..कार्यक्रमाला रवींद्र नाट्य मंदिरात गेले. मी त्या कार्यक्रमाचं सूत्रसंच...
11/10/2025

"वाचलीस!" ती पुटपुटली... आणि एक विचित्र सन्नाटा..

कार्यक्रमाला रवींद्र नाट्य मंदिरात गेले. मी त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत होते. कार्यक्रमाआधीच पोचले होते दोन तास. रंगमंचावर दिव्यांची योजना चालू होती. कार्यक्रमासंदर्भात त्याच्या दिग्दर्शिकिला काहीतरी विचारायला म्हणून मी रंगमंचाला जोडून असलेल्या दोन पायऱ्या उतरून होताच माझ्या मागे "दण्!" असा आवाज झाला. डोक्यात भुग्यासारखं काहीसं उडालं. पाहिलं, तर मागे, माझ्या काहीच इंच मागे एक सिमेंटचा तुकडा.... वेडावाकडा... पडलेला. वर पाहिलं तर खूप उंच असलेल्या छताला एक वेडवाकडं भगदाड. समोर पाहिलं तर माझी दिग्दर्शिका मटकन् पायातली शक्ती गेल्यासारखी खाली बसलेली. तिनं भीतीनं डोक्याला हात लावला. "वाचलीस!" ती अस्फुट कसंबसं पुटपुटली. कुणीच काहीच बोललं नाही. एक विचित्र सन्नाटा काहीच क्षण राहिला. मग मीच एकदम विनोद करायला लागले. रवींद्रचे कर्मचारी घाबरून धावत आले, सांगायला लागले, "तो वरती बल्ब लावायला गेला ना कुणीतरी, तर तो सिलिंगचा तुकडाच निसटला!" मी हसत म्हटलं, "अहो याला काय अर्थ आहे? एका नटीला रंगमंचावरच्च...." मला मधेच तोडून तो कर्मचारी म्हणाला, "नाही नाही मॅडम, असं बोलू नका हो!" मीही थांबले. लक्षात आलं, घाबरले आहे. थांबून त्या सिमेंटच्या वेड्यावाकड्या तुकड्याकडं पाहिलं.
मनातल्या मनात त्या तुकड्याला दंडवत घातला.🙏🙏 एक क्षण उशीरा पडल्याबद्दल. इथून पुढच्या प्रत्येक श्वासासाठी मी त्या तुकड्याची आभारी असेन. त्या तुकड्याला वंदन करताना मनात कृतज्ञता आहे, जीवदानाची; पण भीतीही आहे, पुढे असं जीवदान नाही मिळालं तर? याची. आत्ता वाचले..... पुढे काय?
पण या 'पुढे काय'ला घाबरत राहिले तर आयुष्य जरी मिळालं तरी त्याला काही अर्थ नसेल. आयुष्य मला संधी देणार का नाही, मला माहीत नाही. कुणी अदृश्य शक्ती असेल नसेल, तिला माझा तो निरोपक्षण माहीत असेल नसेल... खरंच त्यानं काय फरक पडतो? त्या निरपेक्षपणाच्या आदल्या क्षणापर्यंतच्या प्रत्येक क्षणावर माझा हक्क आहे. त्या आदल्या क्षणापर्यंतचं पूर्ण देणं मी देईन. त्या प्रत्येक क्षणाचं मोल ठेवीन. 🙏🙏 # amrutasubhash # books"वाचलीस!" ती पुटपुटली... आणि एक विचित्र सन्नाटा..

कार्यक्रमाला रवींद्र नाट्य मंदिरात गेले. मी त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत होते. कार्यक्रमाआधीच पोचले होते दोन तास. रंगमंचावर दिव्यांची योजना चालू होती. कार्यक्रमासंदर्भात त्याच्या दिग्दर्शिकिला काहीतरी विचारायला म्हणून मी रंगमंचाला जोडून असलेल्या दोन पायऱ्या उतरून होताच माझ्या मागे "दण्!" असा आवाज झाला. डोक्यात भुग्यासारखं काहीसं उडालं. पाहिलं, तर मागे, माझ्या काहीच इंच मागे एक सिमेंटचा तुकडा.... वेडावाकडा... पडलेला. वर पाहिलं तर खूप उंच असलेल्या छताला एक वेडवाकडं भगदाड. समोर पाहिलं तर माझी दिग्दर्शिका मटकन् पायातली शक्ती गेल्यासारखी खाली बसलेली. तिनं भीतीनं डोक्याला हात लावला. "वाचलीस!" ती अस्फुट कसंबसं पुटपुटली. कुणीच काहीच बोललं नाही. एक विचित्र सन्नाटा काहीच क्षण राहिला. मग मीच एकदम विनोद करायला लागले. रवींद्रचे कर्मचारी घाबरून धावत आले, सांगायला लागले, "तो वरती बल्ब लावायला गेला ना कुणीतरी, तर तो सिलिंगचा तुकडाच निसटला!" मी हसत म्हटलं, "अहो याला काय अर्थ आहे? एका नटीला रंगमंचावरच्च...." मला मधेच तोडून तो कर्मचारी म्हणाला, "नाही नाही मॅडम, असं बोलू नका हो!" मीही थांबले. लक्षात आलं, घाबरले आहे. थांबून त्या सिमेंटच्या वेड्यावाकड्या तुकड्याकडं पाहिलं.
मनातल्या मनात त्या तुकड्याला दंडवत घातला.🙏🙏 एक क्षण उशीरा पडल्याबद्दल. इथून पुढच्या प्रत्येक श्वासासाठी मी त्या तुकड्याची आभारी असेन. त्या तुकड्याला वंदन करताना मनात कृतज्ञता आहे, जीवदानाची; पण भीतीही आहे, पुढे असं जीवदान नाही मिळालं तर? याची. आत्ता वाचले..... पुढे काय?
पण या 'पुढे काय'ला घाबरत राहिले तर आयुष्य जरी मिळालं तरी त्याला काही अर्थ नसेल. आयुष्य मला संधी देणार का नाही, मला माहीत नाही. कुणी अदृश्य शक्ती असेल नसेल, तिला माझा तो निरोपक्षण माहीत असेल नसेल... खरंच त्यानं काय फरक पडतो? त्या निरपेक्षपणाच्या आदल्या क्षणापर्यंतच्या प्रत्येक क्षणावर माझा हक्क आहे. त्या आदल्या क्षणापर्यंतचं पूर्ण देणं मी देईन. त्या प्रत्येक क्षणाचं मोल ठेवीन. 🙏🙏

(अमृता सुभाष लिखित 'एक उलट एक सुलट' या पुस्तकातून)

#मराठीनाटक #अमृतासुभाष

गुरु ने काय करावं आणि काय करू नये... त्यांना छापाचे गणपती तयार करण्यात रस नव्हता. त्या व्यक्तिसापेक्ष शिकवत..गुरू म्हणून...
09/10/2025

गुरु ने काय करावं आणि काय करू नये...

त्यांना छापाचे गणपती तयार करण्यात रस नव्हता. त्या व्यक्तिसापेक्ष शिकवत..

गुरू म्हणून रोहिणीताई छोट्या-मोठ्या गोष्टी न कंटाळता त्या समजावून द्यायच्या. 'शरीराचं वजन कुठल्या बिंदूवर बदलतं, शरीराची रेषा कशी बनते, त्यावेळी मान व वक्ष यांची स्थिती कशी असते, हे सांगतांना त्या प्रात्यक्षिक तर करतच, पण जवळ येऊन हाताला हात लावून दुरुस्त्याही करत. हात, मान यांचे कोन सुधारत. हाताच्या मुव्हमेंटमधून जी रेष निघते, ती हाताच्या लांबीपर्यंतच मर्यादित नसते, तर दूरवर जाऊन पोहोचते; त्यामुळे कितीतरी मोठा परीघ तुम्ही नजरेनं स्पर्श करू शकता, यासारखं शाश्वत तत्त्व त्या बोलता बोलता ओघांत सहज समजावून देत. त्यांना #नृत्य शिकवायला मनापासून आवडायचं. एखादी गोष्ट उलगडून सांगताना त्या रमून जात. तीच तीच गोष्ट पुन्हा पुन्हा समजावतानाही त्या कधी थकत किंवा कंटाळत नसत. पहिल्या इतक्याच ऊर्मीने, ऊर्जेने आणि उत्कटतेने त्या पुन्हा पुन्हा करून दाखवत. अगदी समोरच्या व्यक्तीवर अपेक्षित परिणाम दिसेपर्यंत. एखादी गोष्ट, एखादा क्षेप, किंवा अभिनयाचा एखादा उत्कट क्षण परत परत करून दाखवताना त्या ती गोष्ट त्याच उत्साहाने, त्याच उत्कटपणे आणि त्याच सौंदर्याचा प्रत्यय देत दरवेळी करून दाखवत. '
त्यांना छापाचे गणपती तयार करण्यात रस नव्हता. त्या व्यक्तिसापेक्ष शिकवत असत. प्रत्येकीच्या क्षमतेनुसार जिला तिला शिकवत. एखादीवर कोणती हालचाल शोभेल, ते सांगत. सरसकट एकसारखं करण्याच्या नादात स्वतःचा वेगळेपणा हरवू नका, असं सांगणं असे त्यांचं. प्रत्येकीला 'स्वतः' असायला शिकवलं त्यांनी. मुली गरोदर असतील तरी त्या त्यांना क्लासवर बोलावत. बैठकी भाव शिकवत. रत्ना दासवानी, अरुणा केळकर इत्यादी विद्यार्थिनींना नृत्यशिक्षणात खंड पडला असूनही शिकण्याची इच्छा आहे..म्हटल्यावर त्यांनी पुन्हा प्रवेश दिला. नृत्याशी जोडून ठेवलं.

कलेच्या, विशेषतः नृत्य आणि संगीताच्या क्षेत्रात #गंडाबंधन विधीचं असणारं माहात्म्य आपण जाणतो. रोहिणीताईंनी कधी कोणत्याही गुरूंकडून गंडाबंधन करून घेतलं नाही आणि स्वतःही कोणाला गंडा बांधला नाही. इथे पुन्हा त्यांच्या वडिलांचा विचार-वारसा दिसतो. ते चिकित्सक होते. अंधभक्त नव्हते. रोहिणीताईंनाही कधी 'गुरूबाजी' मान्य नव्हती. ऊठसूठ गुरूंच्या पायांवर डोकं ठेवणं, वगैरे बाह्य उपचार त्यांना फारसे पसंत नव्हते. गुरू-शिष्य दोघांनाही काही बंधनं असतात. गुरूने उदारहस्ते सर्व विद्या शिष्याला देणं, त्याची हरत-हेची जबाबदारी घेणं, त्याचं क्षेम वाहणं आणि शिष्यानं गुरूची विद्या आत्मसात करून ती स्वपराक्रमानं वाढवणं, असं त्या बंधनाचं पावित्र्य उभयपक्षी राखणं अपेक्षित असतं. त्यांनी स्वतः तर अखेरच्या श्वासापर्यंत ते राखलं आणि आपल्या शिष्यांमध्येही ते रुजवलं. गंडाबंधनाचा खरा अर्थ त्यांनी आचरणातून दाखवला. प्रत्यक्ष गंडा न बांधताही त्यांनी आपलं शिष्यत्व जसं कसोशीनं निभावलं, तसं गुरूपणही ! म्हणूनच 'नृत्यभारती' ही केवळ नृत्य शिकण्याची जागा नव्हती, तर जीवनशिक्षण मिळण्याचं तीर्थक्षेत्र होतं, अशी त्यांच्या सर्व शिष्यांची भावना आहे. ते चरितार्थासाठी शिकवणं नव्हतं तर घडवणं होतं.

(वंदना बोकील - कुलकर्णी लिखित
' रोहिणी निरंजनी' पुस्तकातून साभार)

Address

Rajhans Prakashan Pvt Ltd, 1025 Sadashiv Peth, Near Nagnath Par
Pune
411030

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 6:30pm
Wednesday 10am - 6:30pm
Thursday 10am - 6:30pm
Friday 10am - 6:30pm
Saturday 10am - 6:30pm

Telephone

02024465063

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rajhans Prakashan Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Rajhans Prakashan Pune:

Share

Category