AiEntertainment

AiEntertainment Join Us

08/03/2026

मराठ्यांचा इतिहास, मराठ्यांचा अभिमान -जाणून घ्या आपल्या स्वराज्याची सुवर्णगाथा

18/02/2026

शिवजयंती उत्सव २०२६

#छत्रपती_शिवाजी_महाराज

श्री जय पवार यांच्या हस्ते स्व. अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचे प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर विधीवत विसर्जन.उत्तरप...
08/02/2026

श्री जय पवार यांच्या हस्ते स्व. अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचे प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर विधीवत विसर्जन.

उत्तरप्रदेशातील पावन प्रयागराज येथे गंगा–यमुना–सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमावर राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या पवित्र अस्थींचे परंपरेनुसार विधीवत व आदरपूर्वक विसर्जन करण्यात आले. या पवित्र भूमीत आत्मिक शांती, श्रद्धा व मोक्षाची अनुभूती उपस्थित कुटुंबीय व पदाधिकाऱ्यांनी घेतली

या प्रसंगी राष्ट्रवादी परिवारातर्फे काश्मीर ते कन्याकुमारी अशी काढण्यात आलेली स्व. अजितदादा पवार यांची देशव्यापी ‘अस्थि-कलश यात्रा’ विधीवतरीत्या पूर्णत्वास गेली. हरिद्वार येथून प्रारंभ झालेल्या या राष्ट्रव्यापी यात्रेचा समारोप प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावर अत्यंत भावनिक वातावरणात पार पडला.

या भावूक प्रसंगी स्वर्गीय अजितदादा पवार यांचे धाकटे चिरंजीव, युवानेते श्री. जय पवार हे कुटुंबीयांसह प्रयागराज येथे उपस्थित होते. पुरोहितांच्या सान्निध्यात अस्थि-कलशाचे पूजन करण्यात आल्यानंतर संगमाच्या व्हीआयपी घाटावर श्रद्धेने पवित्र अस्थी संगमात प्रवाहित करण्यात आल्या.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. धीरज शर्मा यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी परिवाराच्या वतीने पार पडलेल्या या समारोप सोहळ्यावेळी संगम घाटावर उपस्थित असलेल्या नागरिकांच्या डोळ्यांतून स्वर्गीय अजितदादा पवार यांच्याविषयीचे अपार प्रेम, आदर व सन्मान व्यक्त करण्यात आला.

याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. धीरज शर्मा, राष्ट्रीय सचिव श्री. धनंजय शर्मा, उत्तरप्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री. हरिश्चंद्र सिंग, उत्तरप्रदेशातील भाजपचे प्रमुख नेते, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“मोरया हॉस्पिटलच्या उभारणीत मामनचंद आगरवाल यांचे योगदान इतके मूलभूत आहे की, ते नसते तर आज मोरया हॉस्पिटलची इमारत उभी राह...
08/02/2026

“मोरया हॉस्पिटलच्या उभारणीत मामनचंद आगरवाल यांचे योगदान इतके मूलभूत आहे की, ते नसते तर आज मोरया हॉस्पिटलची इमारत उभी राहिलीच नसती,” असे ठाम आणि भावनिक विधान मोरया हॉस्पिटलचे कार्यकारी विश्वस्त डॉ. अविनाश वाचासुंदर यांनी केले. मामनचंद आगरवाल यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त निगडी प्राधिकरण येथील त्यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष, पिंपरी-चिंचवडचे माजी नगरसेवक, सद्गुरु जंगली महाराज बँकेचे संस्थापक अध्यक्ष तसेच नामवंत उद्योजक असलेल्या मामनचंद आगरवाल यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त कोणतेही धार्मिक कर्मकांड व विधी टाळून सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. त्यांच्या प्रगतिशील विचारांनुसार मोरया हॉस्पिटलला आर्थिक मदत देत सेवा आणि माणुसकीच्या माध्यमातून त्यांना आगळीवेगळी आदरांजली वाहण्यात आली.

या कार्यक्रमास मोरया हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. अरविंद पंडित, कार्यकारी विश्वस्त डॉ. अविनाश वाचासुंदर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश बोराडे, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. मुकुंद डोग्गीकर, पॅथॉलॉजिस्ट डॉ. ज्योती कोराडे, कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. नीलिमा अमृते, आयुर्वेद विभागप्रमुख डॉ. वेंकटेश धर्माधिकारी, आयुर्वेदाचार्य डॉ. उदय जोशी, ओरल सर्जन डॉ. अमित नेमाने उपस्थित होते. यासह सामाजिक कार्यकर्ते संजय कुलकर्णी, कामगार प्रतिनिधी व विश्वस्त भगवान तांबे तसेच मोरया हॉस्पिटलच्या व्यवस्थापिका सारिका मोरे यांचीही उपस्थिती होती.

यावेळी अध्यात्मिक गुरु सूरजभान, तसेच मामनचंद आगरवाल यांच्या पत्नी गंगादेवी एम. आगरवाल, भाऊ चंद्रभान सी. आगरवाल (गर्ग), भावजय निर्मला चंद्रभान आगरवाल गर्ग, लता रामकुमार आगरवाल, पुत्र सुरेश मामनचंद आगरवाल, राजेश मामनचंद आगरवाल, कन्या उषा मोहन गुप्ता, पुष्पा जितेंद्र आगरवाल, मीना सोमेश गुप्ता यांच्यासह संपूर्ण आगरवाल परिवार उपस्थित होता.

डॉ. अविनाश वाचासुंदर पुढे म्हणाले, “१९८२ पासून मामनचंद आगरवाल यांचा मोरया हॉस्पिटलशी अतूट संबंध होता. आम्ही सर्व डॉक्टर सेवाभावी वृत्तीने काम करत होतो, या एकाच विश्वासावर त्यांनी जंगली महाराज बँकेच्या माध्यमातून हॉस्पिटलसाठी कर्ज उपलब्ध करून दिले. कोणताही मान-सन्मान किंवा पदाची अपेक्षा न ठेवता त्यांनी संस्थेच्या प्रत्येक टप्प्यावर आम्हाला आधार दिला.”

मामनचंद आगरवाल यांचे कार्य केवळ सामाजिक व आरोग्य क्षेत्रापुरते मर्यादित नव्हते. ते सत्संग भवन जिंदराम गुरु का रहानी आश्रमाचे संस्थापकही होते. या आश्रमाच्या माध्यमातून अध्यात्म, सद्विचार आणि जीवनमूल्यांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी आपले तन, मन आणि धन अर्पण केले. समाजातील सर्वसामान्य माणसाला सत्संगाचे महत्त्व समजावे, आत्मचिंतनाची जाणीव निर्माण व्हावी यासाठी ते आयुष्यभर प्रयत्नशील राहिले.

कार्यक्रमात मोरया हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला आणि हॉस्पिटलसाठी आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी अध्यात्मिक गुरु सूरजभान यांच्या मार्गदर्शनाखाली भजन व सत्संग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

मोरया हॉस्पिटलच्या उभारणीस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीपती शास्त्री व ज्येष्ठ प्रचारक तात्या बापट यांच्याकडून प्रेरणा मिळाल्याचा उल्लेख यावेळी करण्यात आला. त्यांच्या विचारांनी सेवाभावी रुग्णालय उभारण्याचा संकल्प अधिक बळकट झाल्याचे उपस्थितांनी सांगितले.

मामनचंद आगरवाल यांचे विचार अत्यंत प्रगतिशील होते. कर्मकांड व अंधश्रद्धांना त्यांनी कधीही थारा दिला नाही. आयुष्यभर अंधश्रद्धांविरोधात काम करत त्यांनी माणुसकी, विवेक आणि समाजहित यांना सर्वोच्च स्थान दिले. त्यामुळेच त्यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त कोणतेही धार्मिक विधी न करता सामाजिक उपक्रम राबवण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला.

राजकीय, सामाजिक, अध्यात्मिक आणि आर्थिक क्षेत्रात ठसा उमटवणारे मामनचंद आगरवाल हे केवळ यशस्वी उद्योजक नव्हते, तर विचारांनी आणि कृतीने समाज घडवणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या जीवनकार्याचा वारसा पुढे नेणारा हा प्रथम स्मृतीदिन कार्यक्रम उपस्थितांच्या मनाला भावून गेला.

मामनचंद आगरवाल नसते तर मोरया हॉस्पिटल उभे राहिले नसते – डॉ. अविनाश वाचासुंदर



दोनशे रुपयांची उधारी देण्यासाठी केनियाचा खासदार तीस वर्षांनी छ .संभाजीनगर ला येतो...!!एकीकडे कोट्यवधी रुपये बुडवून परदेश...
19/12/2025

दोनशे रुपयांची उधारी देण्यासाठी केनियाचा खासदार तीस वर्षांनी छ .संभाजीनगर ला येतो...!!

एकीकडे कोट्यवधी रुपये बुडवून परदेशात पळून गेलेल्या उद्योगपतींची उदाहरणं समोर असताना, परदेशात स्थायिक असलेली व्यक्ती तीस वर्षापूर्वीची अवघ्या काहीशे रुपयांची उधारी फेडायला भारतात येऊ शकतो का?
या प्रश्नाचं उत्तर कोणीही नकारार्थी देईल.

मात्र छ .संभाजी नगरातील काशिनाथ गवळी यांची दोनशे रुपयांची उधारी फेडण्यासाठी केनियाचा रहिवासी तब्बल तीस वर्षांनी भारतात आला. ही गोष्ट आहे केनियाचा खासदार रिचर्ड टोंगी याची..

सध्या केनियाचा रहिवासी असलेला रिचर्ड शिक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर मध्ये ( औरंगाबादेत) होता. त्यावेळी परिस्थिती जेमतेम. खायची अडचण असताना एका माणसानं मदत केली. त्याची त्यावेळची दोनशे रुपयांची उधारी फेडण्यासाठी रिचर्ड तब्बल 30 वर्षांनी परत आला. तब्बल तीस वर्षानंतर झालेली ही भेट या परदेशी पाहुण्यासाठी आणि छ .संभाजी नगरातील काशिनाथ गवळी यांच्यासाठी फारच आगळीवेगळी होती. अगदी सगळ्यांच्याच डोळ्यात या भेटीने अश्रू तरळले आणि प्रामाणिकपणाची एक वेगळी जाणीव या भेटीतून छ. संभाजी नगरच्या गवळी कुटुंबीयांना झाली. खासदार रिचर्ड टोंगी आता केनियाच्या संरक्षण परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या समितीचे उपाध्यक्षही आहेत. रिचर्ड यांचं शिक्षण छ .संभाजी नगरात झालं होतं. मौलाना आझाद कॉलेजमधून त्यांनी व्यवस्थापनाची पदवी घेतली. त्यावेळी ते छ .संभाजी नगरात एकटे रहायचे. खाण्याची-राहण्याची सगळीच अडचण. कॉलेजच्या बाजूलाच असलेल्या वानखेडेनगरमध्ये काशिनाथ गवळी यांचं किराणाचं दुकानं होतं. अनेक परदेशी मुलं त्यावेळी तिथं यायचीय रिचर्डही त्यापैकीच एक. रिचर्डला काशिनाथ काकांनी मदत केली आणि त्याला रहायला घर मिळालं. इतकंच नाही, तर खाण्यापिण्याच्या वस्तूही तो काशिनाथ काकांच्या दुकानातूनच घ्यायचा. 1989 मध्ये त्याने छ .संभाजी नगर सोडलं त्यावेळी काशिनाथ काकांकडे 200 रुपयांची उधारी बाकी राहिली होती.रिचर्ड मायदेशी परतला. तिकडे राजकारणात जाऊन त्याने मोठं पदही मिळवलं, मात्र भारताची आठवण त्याला कायम यायची. त्यात खास करुन काशिनाथ काका यांनी केलेली मदत आणि त्यांच्या 200 रुपये उधारीची जाणीव त्याला होती. गेली 30 वर्ष त्याला भारतात यायला जमलं नाही,

मात्र काही दिवसांपूर्वी केनिया सरकारच्या एका शिष्टमंडळासोबत रिचर्ड भारतात आला.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर त्याची पावलं आपसूकच छ.संभाजी नगरकडे वळली आणि त्यानं शोध घेतला तो काशिनाथ काकांचा. तब्बल दोन दिवस त्याने काकांना शोधलं आणि अखेर त्यांची भेट झाली. ही भेट रिचर्डसाठी जणू डोळ्यात पाणी आणणारी ठरली. काकांना पाहून तो रडायला लागला. खर तरं काकांच्या नीटसं लक्षातही नव्हतं. मात्र रिचर्डने ओळख दिली आणि काकांना सगळं आठवलं.ही भेट म्हणजे अनेक वर्षांची प्रतीक्षा फळाला आल्याचं रिचर्डने सांगितलं. आणि पैसै परत करण्याचा प्रामाणिकपणा सुद्धा भारतानेच शिकवला असल्याचंही तो आवर्जून सांगतो.काकांनी त्यावेळी मदत केली, त्यांचे फार उपकार माझ्यावर आहेत, अनेक वर्ष त्यांच्या कर्जाची परतफेड कशी करु, हे सुचत नव्हतं, मात्र यावेळी भारतात आलो आणि थेट त्यांचं घरचं गाठलं. त्यांना भेटून आनंद झाला, पैसे परत करणं हा प्रामाणिकपणा आहे, असं लोक म्हणतात, मात्र हे मी या देशातच शिकलोय याचा अभिमान आहे, अशा शब्दात रिचर्डने आपल्या भावना व्यक्त केल्या.अनेक वर्ष रिचर्ड गवळी कुटुंबाबद्दल सांगत होता, मात्र भेट काही शक्य होत नव्हती. अखेर यावेळी ती झाली, याचा रिचर्डला आनंद आहेच मात्र मलाही अभिमान असल्याचं रिचर्डची पत्नी मिशेल टोंगी यांनी सांगितलं. काशिनाथ काकांचा उल्लेख त्याने बरेच वेळा केला होत, मात्र आज भेट झाल्याचा आनंद वाटला. नवऱ्याच्या प्रामाणिकपणाचा निश्चितच अभिमान असल्याचं मिशेल म्हणतात.

काशिनाथ गवळी यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या आनंदात टोंगी दाम्पत्याचं स्वागत केलं. मराठमोठ्या पद्धतीनं टॉवेल-टोपी आणि साडी देऊन त्यांनी दोघांचा सत्कार केला. रिचर्डने त्यांच्या घरी जेवणही केलं. अजूनही काशिनाथरावांचं प्रेम कायम असल्याची भावना रिचर्डने व्यक्त केली. त्याने काशिनाथकाकांना केनियाला येण्याचं आमंत्रणही दिलं आहे.

प्रामाणिकपणा कोणी कोणाला शिकवू शकत नाही, तो रक्तातच असावा लागतो.
लेखक : अज्ञात

४० हजार कोटी रुपयांच्या व्यवसायाचा मालक आणि ३२०० कोटी रुपयांच्या देणी.......***************************************घराला...
16/12/2025

४० हजार कोटी रुपयांच्या व्यवसायाचा मालक आणि ३२०० कोटी रुपयांच्या देणी.......

***************************************
घराला ‘घरपण’ देणारा माणूस म्हणून ज्यांची ओळख होती, ते DSK कुलकर्णी साहेब म्हणजे आत्मविश्वास, जिद्द आणि सकारात्मकतेचा जिवंत नमुना आहेत. आत्मविश्वास म्हणजे काय आणि तो किती महत्त्वाचा असतो, हे त्यांच्या आयुष्याकडे पाहून शिकायला मिळतं.

एक काळ असा होता की हजारो कुटुंबांच्या स्वप्नांना आकार देणारा हा माणूस सुमारे ४० हजार कोटी रुपयांच्या व्यवसायाचा मालक होता. मात्र केवळ सुमारे ३२०० कोटी रुपयांच्या देणी परत करण्याच्या प्रक्रियेमुळे नियतीने—किंवा काळाने—त्यांच्यावर मोठा आघात केला. परिस्थिती इतकी कठीण होती की अनेक जण खचून गेले असते; पण हा माणूस मात्र खचला नाही.

“मला कोणाचाही एक रुपया बुडवायचा नाही,” या ठाम विश्वासावर त्यांनी पुन्हा उभं राहण्याचा निर्णय घेतला. आत्मविश्वास, संयम आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन ते पुन्हा एकदा व्यवसायाच्या रंगणात उतरले आहेत. हजारो कोटींचे नवे प्रकल्प उभे करण्यासाठी ते आजही तितक्याच जिद्दीने काम करत आहेत, हे त्यांच्या बोलण्यातून स्पष्टपणे जाणवतं.

त्यांच्या शब्दांत एक ठाम विश्वास आहे—“माझी अडचण आज आहे, उद्या असेल; पण परवा नक्कीच नसेल.” कारण शेवटी माणसाच्या आयुष्यात कर्म आणि नीतिमत्ताच खरी फळं देतात, हा त्यांचा दृढ विश्वास आहे. त्यांच्या मते, गेली ४० वर्षे त्यांनी गुंतवणूकदारांना नफा दिला; त्या काळात कोणी प्रश्न विचारला नाही. मात्र एकाच वेळी सर्व गुंतवणूकदारांनी पैसे परत मागितले, तर ते तात्काळ देणं कोणालाही शक्य नसतं—ही वस्तुस्थिती आहे.

ते स्पष्टपणे सांगतात की काही लोकांनी जाणीवपूर्वक अडचणी वाढवल्या; मात्र त्यांच्याबद्दलही ते कटुता बाळगत नाहीत. “मी शून्यातून विश्व निर्माण केलं आहे, आणि ते सहज संपणार नाही,” हा त्यांचा आत्मविश्वास प्रेरणादायी आहे.

त्यांच्या बोलण्यातला प्रामाणिकपणा हा त्यांचा सर्वात मोठा गुण आहे. युट्यूबवर मुलाखती पाहिल्या होत्या; पण काल प्रत्यक्ष भेटण्याचा अनुभव अतिशय समाधान देणारा ठरला. उमेद न हरता, पुन्हा लढण्याची तयारी ठेवणारा हा मराठी माणूस पाहून अभिमान वाटतो—कारण अशा जिद्दी माणसांमुळेच आशा जिवंत राहते.

काल हि, आजही आणि कायम सोबतीला आहोत सर...

#डीएस्के #मराठीमाणुस #जिद्द

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when AiEntertainment posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share