Marathi Media

  • Home
  • Marathi Media

Marathi Media Marathi movie celebrate dasing webserver
(1)

"कर्जमाफी योजनेत अनेक अटी अडचणीच्या आहेत. लोकशाहीमध्ये सुसंवाद साधून त्यात दुरुस्ती करणे आवश्यक आहे, त्याकडे लक्ष दिले प...
08/06/2026

"कर्जमाफी योजनेत अनेक अटी अडचणीच्या आहेत. लोकशाहीमध्ये सुसंवाद साधून त्यात दुरुस्ती करणे आवश्यक आहे, त्याकडे लक्ष दिले पाहिजे", असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महायुती सरकारला दिला. शरद पवार बारामती येथे माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी इतरही मुद्द्यावर भाष्य केले.

बारामतीमध्ये बोलताना शरद पवार म्हणाले की, "कर्जमाफी योजनेमध्ये अनेक अटी आहेत, त्या अडचणीच्या आहेत. त्यात दुरुस्ती करणे आवश्यक आहे. मुख्यमंत्र्यांनी केंद्रातील संबंधित लोकांशी बोलावे आणि कर्जमाफीचा जो निर्णय घेतला आहे, त्यातील अटी कशा दुरुस्त करता येतील आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी मिळेल, याकडे लक्ष दिले पाहिजे", अशी भूमिका त्यांनी मांडली.

यंदाचा उन्हाळा हा महाराष्ट्रासाठी त्रासदायक ठरला आहे. त्यात लांबलेला मान्सून यामुळे महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट आहे. अ...
08/06/2026

यंदाचा उन्हाळा हा महाराष्ट्रासाठी त्रासदायक ठरला आहे. त्यात लांबलेला मान्सून यामुळे महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट आहे. अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी आणि मान्सूनचे संकट या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न आणि राज्यासमोरील विविध समस्यांवर सर्वसमावेशक चर्चा होणे आवश्यक असल्याचेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे.

यावेळी विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारने घोषित केलेल्या कर्जमाफीच्या निर्णयावरही टीका केली आहे. महायुती सरकारने जाहीर केलेले शेतकरी कर्जमाफी ही फसवी आहे. ही सरसकट कर्जमाफी नसून अनेक जाचक अटी-शर्तीनी युक्त योजना आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.

कोपरगावकरांच्या भल्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी केलेला प्रामाणिक पाठपुरावा कधीच वाया जात नाही, हे पुन्ह...
08/06/2026

कोपरगावकरांच्या भल्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी केलेला प्रामाणिक पाठपुरावा कधीच वाया जात नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी तब्बल ४१ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करून आणत कर्तव्यतत्पर आमदार मा. आशुतोषदादा काळे यांनी नेहमीप्रमाणेच विकासाला आणि शेतकरी कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.

उद्योग क्षेत्रात ८.८% ची मजबूत वाढ आणि सेवा क्षेत्राची ९.३% ची साथ, यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला एक नवी ऊर्जा मिळाली आहे...
08/06/2026

उद्योग क्षेत्रात ८.८% ची मजबूत वाढ आणि सेवा क्षेत्राची ९.३% ची साथ, यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला एक नवी ऊर्जा मिळाली आहे. आर्थिक सुधारणा आणि योग्य धोरणांमुळेच आज आपला देश जागतिक स्तरावर चमकत आहे. हाच तर आहे आपला विकसित भारत!

डीएमके अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी तमिळनाडूतील राजकारणावर मोठं भाष्य केलंय. एका कार्यक्रमात बोलता...
08/06/2026

डीएमके अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी तमिळनाडूतील राजकारणावर मोठं भाष्य केलंय. एका कार्यक्रमात बोलताना एम.के. स्टॅलिन म्हणाले की, विजय यांचे सरकार तीन महिने सुद्धा टिकणार नाही.

पेट्रोल आणि डिझेलची साठेबाजी, काळाबाजार आणि अवैध विक्रीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक मोठे आणि निर्णायक पाऊल उ...
08/06/2026

पेट्रोल आणि डिझेलची साठेबाजी, काळाबाजार आणि अवैध विक्रीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक मोठे आणि निर्णायक पाऊल उचलले आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी देण्यात आली...
08/06/2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही घोषणा केलीय.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा खालावल्याने मुंबईकरांची चिंता आता वाढली आहे. सध्या धरणांमध्ये केवळ ४० दिव...
07/06/2026

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा खालावल्याने मुंबईकरांची चिंता आता वाढली आहे. सध्या धरणांमध्ये केवळ ४० दिवसांचा पाणीपुरवठा शिल्लक राहिल्याने मुंबई महानगरपालिकेने मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये १० टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला. या पाणी कपातीपाठोपाठ मुंबईकरांची चिंता वाढवणारी आणखी एक आकडेवारी समोर आली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, मुंबईतील धरणांमध्ये केवळ १३.५५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. दुसरीकडे मुंबईत मान्सूनचे आगमन ११ जून रोजी होत असले, तरी सध्याची हवामानाची स्थिती पाहता पावसाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून सीमा सुरक्षा दलात दाखल झालेल्या सातारा जिल्ह्यातील काशीळ येथील अस्मिता दीपक जाधव हिच्या वा...
07/06/2026

देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून सीमा सुरक्षा दलात दाखल झालेल्या सातारा जिल्ह्यातील काशीळ येथील अस्मिता दीपक जाधव हिच्या वाट्याला नुकताच एक अविस्मरणीय आणि अभिमानास्पद क्षण आला

समाजमाध्यमे आज ‘डीपफेक’चाही भाग झाली आहेत. अनेक देशांमध्ये सैन्य, क्षेपणास्त्रे डागण्यापेक्षा तेथील समाजमाध्यमांचा वापर ...
07/06/2026

समाजमाध्यमे आज ‘डीपफेक’चाही भाग झाली आहेत. अनेक देशांमध्ये सैन्य, क्षेपणास्त्रे डागण्यापेक्षा तेथील समाजमाध्यमांचा वापर सत्ता उलथविण्यासाठी केला जातो, अशी अनेक उदाहरणे आहेत. अशा नकारात्मक जगातही सकारात्मकतेने राहता येते, हा विचार देणारे ‘टाइमलाइन’ हे पुस्तक आहे. समाजातील व आपल्यातील बदल अनेक उदाहरणांमधून मांडताना समाजमाध्यमांच्या संक्रमण कालावधीतील जाणिवा टिपणारे लेखन या पुस्तकात आहे. नकारात्मकतेत सकारात्मकता सांगायची, याला निश्चितपणे वेगळे मन लागते, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे काढले.

‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी लिहिलेल्या ‘टाइमलाइन’ पुस्तकाचे प्रकाशन फडणवीस यांच्या हस्ते रवींद्र नाट्यमंदिरात शनिवारी झाले. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर आणि सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ‘लोकमत’ एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार डॉ. विजय दर्डा, पद्मश्री डॉ तात्याराव लहाने, डॉ. अमित मायदेव, चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर, ज्येष्ठ गायिका पद्मजा फेणाणी-जाेगळेकर, सुलेखनकार अच्युत पालव हे व्यासपीठावर उपस्थित होते.

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Marathi Media posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your business to be the top-listed Media Company?

Share