08/06/2026
"कर्जमाफी योजनेत अनेक अटी अडचणीच्या आहेत. लोकशाहीमध्ये सुसंवाद साधून त्यात दुरुस्ती करणे आवश्यक आहे, त्याकडे लक्ष दिले पाहिजे", असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महायुती सरकारला दिला. शरद पवार बारामती येथे माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी इतरही मुद्द्यावर भाष्य केले.
बारामतीमध्ये बोलताना शरद पवार म्हणाले की, "कर्जमाफी योजनेमध्ये अनेक अटी आहेत, त्या अडचणीच्या आहेत. त्यात दुरुस्ती करणे आवश्यक आहे. मुख्यमंत्र्यांनी केंद्रातील संबंधित लोकांशी बोलावे आणि कर्जमाफीचा जो निर्णय घेतला आहे, त्यातील अटी कशा दुरुस्त करता येतील आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी मिळेल, याकडे लक्ष दिले पाहिजे", अशी भूमिका त्यांनी मांडली.