Ritam Marathi

Ritam Marathi Ritam Digital Media Foundation

Ritam App | ऋतम्
डिजिटल युगात भारताची ऐतिहासिक ओळख आणि पूर्ववैभव पुनरुज्जीवित करणे आमचा उद्देश आहे.आम्ही भारताच्या इतिहासात अपरिचित राहिलेल्या आणि मुद्दाम दडपल्या गेलेल्या शौर्यकथांची नव्याने ओळख करून देऊ इच्छितो.

07/06/2026

छत्रपती शिवरायांनी शत्रू मुल्ला अहमद याच्या सुनेला 'माते'चा दर्जा देत सन्मानाने स्वगृही पाठवले होते !
छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात जेव्हा शत्रू मुल्ला अहमदच्या सुनेला 'भेट' म्हणून आणले गेले, तेव्हा महाराजांनी स्त्रियांच्या सन्मानाला सर्वोच्च प्राधान्य देत आदेश दिला - "तिला पूर्ण आदरासह तिच्या सासरी परत पाठवा." ही घटना १६६७ सालातील आहे. मराठा सैन्याने विजापूरचा सुभेदार मुल्ला अहमद याच्या ताब्यातील कल्याण किल्ल्यावर आक्रमण केले होते.
छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांनी हे सिद्ध करून दाखवले की खरी शौर्यगाथा फक्त शत्रूचा पराभव करण्यात नसते… तर शत्रूच्या आई-बहिणींचा मान सन्मान जपण्यातही असते.
#

06/06/2026

Opearation Blue Star | ऑपरेशन ब्लू स्टारचे नेतृत्व करणारे शीख जनरल | कुलदीप सिंग ब्रार...

ऑपरेशन ब्लू स्टार हा भारतीय लष्कराचा असा एक महत्त्वपूर्ण अध्याय आहे, जिथे देशाच्या एकात्मतेसाठी एका शीख जनरलला कठीण निर्णय घ्यावा लागला. तो काळ १९८४ सालच्या जून महिन्याचा होता आणि सशस्त्र अतिरेक्यांपासून श्री हरमंदिर साहिब मुक्त करण्यासाठी मेजर जनरल कुलदीप सिंग ब्रार (बुलबुल) यांची निवड करण्यात आली होती.

05/06/2026

नेहरूंनी गांधींच्या हत्येचा राजकीय फायदा घेत संघावर (RSS) बंदी घातली होती | Goalwalkar Guruji
गांधींच्या हत्येचा सर्वाधिक राजकीय फायदा जवाहरलाल नेहरू यांनी घेतला. सर्वप्रथम, नेहरूंनी संपूर्ण सत्ता आपल्या हाती घेतली आणि त्यानंतर संघाला (RSS) आपल्या सत्तेसाठी घातक मानून त्यावर बंदी घातली. इतकेच नव्हे, तर नेहरूंनी संघातील हजारो स्वयंसेवकांना अटकही करवली.ज्यामध्ये संघाचे दुसरे सरसंघचालक, माधव सदाशिव गोळवलकर यांचाही समावेश होता. मात्र तुरुंगातही गुरुजी डगमगले नाहीत; उलट, त्यांनी या कठीण काळाचे एका चळवळीत रूपांतर केले.
गांधीजींच्या हत्येनंतर, काँग्रेसला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संपवायचा होता. परंतु गुरुजींनी त्याच हल्ल्याचे रूपांतर एका अधिक मजबूत, शिस्तबद्ध आणि देशव्यापी संघ परिवाराच्या पायाभरणीत केले.

04/06/2026

बाबरी मशीद पाडल्यानंतर संघावर तिसरी बंदी घालण्यात आली, मात्र ती टिकवण्यात कॉंग्रेस अपयशी ठरले
भारताच्या स्वातंत्र्यापासूनच, काँग्रेस सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर वर वारंवार बंदी लादण्यासाठी आपल्या सत्तेच्या परिघातील सर्व काही प्रयत्न केले. ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील वादग्रस्त वास्तू पाडण्यात आली. आणि अवघ्या चार दिवसांनंतर, १० डिसेंबर १९९२ रोजी, पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) वर बंदी लादली.पण हाही कॉंग्रेस सरकारचा प्रयत्न पुन्हा एकदा अपयशी ठरला.

03/06/2026

Krishnaraja Wadiyar | ज्यांनी कृष्णराज सागर धरण या योजनेतून म्हैसूरचे भवितव्य कायमचे बदलून टाकले
१८७६-७८ चा महादुष्काळ हा भारतीय इतिहासातील सर्वात विनाशकारी दुष्काळांपैकी एक होता. दक्षिण भारतातील लक्षावधी लोकांना उपासमार, रोगराई आणि स्थलांतराचा सामना करावा लागला. या शोकांतिकेतून म्हैसूरही सुटू शकले नाही.

परंतु या वेदनादायी कालखंडानंतर, एक अशी दूरदृष्टी उदयास आली जिने संपूर्ण प्रदेशाचे भवितव्यच पालटून टाकले. महाराजा कृष्णराज वाडियार आणि महान अभियंता एम. विश्वेश्वरैया यांनी कावेरी नदीवर एक विशाल धरण उभारण्याची योजना आखली. ब्रिटिशांचा विरोध, आर्थिक अडचणी आणि तांत्रिक आव्हाने असूनही, हे स्वप्न साकार झाले.
आज हे धरण लक्षावधी लोकांना पाणीपुरवठा, सिंचन सुविधा आणि वीज उपलब्ध करून देते; तसेच दक्षिण भारताच्या विकासाचा एक अत्यंत महत्त्वाचा आधारस्तंभ मानले जाते.

ही कथा केवळ एका धरणाविषयीची नाही, तर दूरदृष्टी, संघर्ष आणि लोककल्याणासाठी केलेल्या असाधारण प्रयत्नांची गाथा आहे.

02/06/2026

एक आलिशान रेल्वेसाठी २४,००० भारतीय मजुरांनी प्राण गमावले होते | Deccan Queen चे भीषण सत्य
आज लाखो लोक मुंबई आणि पुणे दरम्यान धावणारी 'डेक्कन क्वीन' रेल्वे आणि त्यातून दिसणारे घाटाचे निसर्गसौंदर्य अनुभवतात; परंतु फारच कमी लोकांना हे ठाऊक आहे की, या रेल्वे मार्गाच्या उभारणीत हजारो भारतीय मजुरांना आपले प्राण गमवावे लागले होते.

१९ व्या शतकात, आपला व्यापार आणि साम्राज्य बळकट करण्याच्या उद्देशाने ब्रिटिशांनी 'भोर घाट रेल्वे' मार्गाचे बांधकाम सुरू केले. दुर्गम डोंगररांगा, धोकादायक बोगदे, सततचा पाऊस, मलेरिया, कॉलरा आणि अमानवीय कामाच्या परिस्थितीमुळे हजारो मजुरांना आपले प्राण गमवावे लागले. या प्रकल्पादरम्यान सुमारे २४,००० भारतीय मजुरांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तवला जातो.

हा व्हिडिओ 'डेक्कन क्वीन' आणि त्या अज्ञात भारतीय मजुरांची कहाणी सांगतो; ज्यांच्या बलिदानामुळेच हा ऐतिहासिक रेल्वे मार्ग आजही दिमाखाने उभा आहे.

01/06/2026

Royal Indian Navy mutiny | ब्रिटिशांनी एका तरुण नौसैनिकाला केलेली अटक मोठ्या उठावाची ठिणगी ठरली होती.
जून १९४६ मध्ये, जेव्हा ब्रिटन 'रॉयल ​​इंडियन नेव्ही'च्या उठावातील सहभागींना शिक्षा देण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा एका तरुण नौसैनिकाने माघार घेण्यास ठामपणे नकार दिला. त्याचे नाव होते बी.सी. दत्त.त्यानंतर 'HMIS तलवार' या जहाजावर झालेली त्याची अटक ही एका प्रचंड नौदल उठावाची ठिणगी ठरली होती; हा उठाव मुंबईपासून कराचीपर्यंत पसरला होता.
ज्यामुळे ब्रिटिशांनी शेकडो नौसैनिकांना सेवेतून बडतर्फ केले, बी.सी. दत्त आणि हजारो नौसैनिकांनी दाखवलेले शौर्य ही ब्रिटिश साम्राज्यासाठीची अशी एक अंतिम चेतावणी ठरली, जिची उपेक्षा करणे त्यांना अशक्य होते. त्यांच्या योगदानाने भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या अखेरच्या पर्वाला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

01/06/2026

एक वकिल ज्यांनी इंग्रजांना कायद्याच्या चौकटीत पराभूत करत त्यांच्याविरोधात कायदेशीर बंड उभे केले
ही कथा आहे वकील चित्तरंजन दास यांची, ज्यांनी क्रांतिकारक अरविंद घोष यांचा जीव वाचवला आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यात एक वेगळा आदर्श उभा केला.

1908 मध्ये भारतात स्वातंत्र्याची ज्वाला वेगाने पेट घेत होती... क्रांतिकारकांचा प्रभाव वाढत चालला होता आणि त्यावेळी सर्वात चर्चेत होतं अलीपूर बॉम्ब प्रकरण. हे प्रकरण तेव्हा सुरू झालं, जेव्हा क्रांतिकारक खुदीराम बोस आणि प्रफुल्ल चाकी यांनी ब्रिटिश चीफ मॅजिस्ट्रेट डग्लस किंग्सफोर्ड याच्यावर बॉम्ब टाकला होता.

31/05/2026

Dalai Lama's Great escape | जेव्हा चीन दलाई लामांच्या जीवावर उठला होता, तेव्हा भारताने त्यांना आश्रय दिला
१९५० च्या दशकात चीनने तिबेटवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले होते. त्यानंतर तिबेटी संस्कृती आणि तेथील लोकांवर अनन्वित अत्याचार सुरू झाले.तिथले आध्यात्मिक गुरु दलाई लामांचा जीव धोक्यात आला होता. तिबेटमधील वाढत्या अशांततेमुळे आणि स्वतःच्या जीवाच्या रक्षणासाठी दलाई लामा यांनी मार्च १९५९ मध्ये ल्हासा सोडले.अनेक दिवस पायी अत्यंत खडतर प्रवास करत, जीव धोक्यात घालून त्यांनी ३१ मार्च १९५९ रोजी भारतीय हद्दीत प्रवेश केला. त्यानंतर स्थानिक लोकांनी केवळ एक निर्वासित म्हणूनच नव्हे, तर एक महान आध्यात्मिक गुरूंची जागा त्यांना बहाल केली.

30/05/2026

Punyashlok Ahilyabai Holkar | इस्लामी आक्रमणानंतर सनातन संस्कृती, मंदिरांचे भव्य पुनरुज्जीवन केले
इस्लामी आक्रमक आणि औरंगजेबासारख्या क्रूर शासकांकडून काशी, मथुरा आणि उज्जैन यांसारख्या अनेक प्रमुख तीर्थक्षेत्रांना वारंवार लक्ष्य केले गेले. मंदिरे पाडण्यात आली, परंपरा मोडण्याचे प्रयत्न झाले, लोकांवरील अत्याचार वाढले... असे वाटत होते की आता भारताची ओळखच संपून जाईल. पण… 1767 ते 1795 या काळात इतिहासाने एक वेगळं वळण घेतलं…एक अशी महाराणी उभी राहिली… जिने केवळ तुटलेली मंदिरं पुन्हा उभी केली नाहीत…तर नवीन मंदिरांची उभारणी करून संपूर्ण देशात श्रद्धेचा दिवा पुन्हा पेटवला ! त्या होत्या, पुण्श्लोक देवी अहिल्याबाई होळकर.

Address

Shukravar Peth
Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ritam Marathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ritam Marathi:

Share