Madhushree Publication

Madhushree Publication Marathi Language books publisher

बालविवाह विषय काढला, की अनेकांना ती समस्या मागच्या शतकातील होती असे वाटते. ‘आता कुठे होतात बालविवाह?‌’ असे अनेकजण विचारत...
29/07/2025

बालविवाह विषय काढला, की अनेकांना ती समस्या मागच्या शतकातील होती असे वाटते. ‘आता कुठे होतात बालविवाह?‌’
असे अनेकजण विचारतात.
पण आजही भारतात आणि सुधारणेचा वारसा सांगणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रात बालविवाह मोठ्या संख्येने होतात. महाराष्ट्रात दर
5 लग्नामागील एक लग्न हा बालविवाह असतो. या बालविवाह होणाऱ्या मुलींचेे सरासरी वय 14 ते 16 असते. खेळण्या-बागडण्याच्या वयात त्यांच्यावर मातृत्व लादले जाते. इतक्या लवकर लग्न झालेल्या मुलींचे शिक्षण होत नाही की करिअर. आरोग्याचे गंभीर प्रश्‍न निर्माण होतात. मुले आणि ती दोघेही कुपोषित राहतात.
या विषयावर जाणीवजागृती व्हावी म्हणून राजस्थान, बिहार, तेलंगणा आणि महाराष्ट्रातील बहुसंख्य जिल्ह्यांत फिरून बालविवाहांचे जमिनी वास्तव मांडणारा हेरंब कुलकर्णी यांचा हा लेखाजोखा... बालविवाहाचे वास्तव, परिणाम आणि उपाययोजना सांगणारा.
शिक्षण आरोग्य आणि स्त्री सक्षमीकरणाचे 100 टक्के उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, बालविवाह थांबविणे ही पूर्वअट आहे. एकीकडे महिला सक्षमीकरणाचे ढोल वाजत असताना, दुसरीकडे लाखो मुलींचे आयुष्य करपून जाताना सरकार आणि समाज म्हणून आपण
काय करणार आहोत?
बालविवाहाच्या चरकात सापडलेल्या या बालिकांना
मानवी जगण्याची संधी मिळायला हवी.

या विलक्षण पकड घेणाऱ्या चरित्रात, अभिषेक चौधरी हे दाखवण्याचा प्रयत्न करतात, की भारताला हिंदुराष्ट्र करण्याच्या मोहिमेत व...
28/07/2025

या विलक्षण पकड घेणाऱ्या चरित्रात, अभिषेक चौधरी हे दाखवण्याचा प्रयत्न करतात, की भारताला हिंदुराष्ट्र करण्याच्या मोहिमेत वाजपेयीजींचे योगदान बहुतेक लोकांना वाटते त्यापेक्षा अधिक महत्त्वपूर्ण होते. लेखक स्पष्ट करतात, की वाजपेयींचे बालपण आणि तारुण्य याबद्दल आपल्याला फारशी माहिती नाही. पण ते राजकारणात जसे वागले, तसे का वागले हे समजून घेण्यासाठी ती सुरुवातीची वर्षे खूप महत्त्वाची आहेत. मूलत: पुराणमतवादी असूनही ते अत्यंत जिज्ञासू आणि मनमिळाऊ, अलिप्त आणि तरीही मनोमन महत्त्वाकांक्षी असल्याचे दिसून येते.
नवीन कागदपत्रे आणि मुलाखतींचा वापर करून चौधरींनी वाजपेयींच्या चरित्राचे सुस्पष्ट चित्र उभे केले आहे. त्यात गांधीहत्येच्या पार्श्वभूमीवर वाजपेयींनी गुप्तपणे केलेले कार्य, त्यांचा परराष्ट्र धोरणाबद्दल असलेला विलक्षण ध्यास, आई-वडिलांच्या एकापाठोपाठ झालेल्या अकाली मृत्यूंचा आघात, त्यांचे गुंतागुंतीचे खासगी आयुष्य, संयुक्त विधायक दल आकाराला येण्यातील महत्त्वाची भूमिका, संघ परिवाराची संसदेत केलेली
पाठराखण ह्या सगळ्यांचा ऊहापोह केला आहे.
असे करताना, हे उल्लेखनीय पुस्तक भारतीय राजकारणाबद्दल वारंवार सांगितल्या जाणाऱ्या अनेक दंतकथा आणि खोट्या कल्पनांना आव्हान देते. काँग्रेसमधील पुराणमतवादी आणि आरएसएसला पाठिंबा देणारे
हिंदी विचारवंत, पटेलांची विस्तारित संदिग्धता, आज ना उद्या पूर्व पाकिस्तान भारतात विलीन होईल ही नेहरूंची जन्मजात आशा, जनसंघाची आर्थिक स्थिती आणि निवडणूक जिंकण्याची शक्यता यांवर
इंदिरा गांधींनी निष्काळजीपणाने केलेला हल्ला, जयप्रकाश नारायणांची समग्र क्रांतीविषयीची अवास्तव स्वप्ने आणि संघ परिवाराची आणीबाणीतील संदिग्ध निर्भयता ह्याबद्दलचा आढावाही ह्या चरित्रात घेतल्याने भारतीय लोकशाहीतील गुंतागुंतीवर प्रकाश पडतो.

शेवटचा महान मौर्य सम्राट अशोक ही भारतीय इतिहासातील एक महान विभूती आहे. त्याच्या राज्यकाळात (इ.स.पू. 268 ते 232) मौर्य सा...
28/07/2025

शेवटचा महान मौर्य सम्राट अशोक ही भारतीय इतिहासातील एक महान विभूती आहे. त्याच्या राज्यकाळात (इ.स.पू. 268 ते 232) मौर्य साम्राज्य जवळजवळ संपूर्ण भारतीय उपखंडात पसरलेले होते. त्याने आपल्या राज्याचा कारभार अतिशय प्रभावीपणे केलाच पण त्याचबरोबर युद्धाचा त्याग केला, धर्माची संकल्पना विकसित केली, बौद्ध धर्माला पाठिंबा दिला आणि धार्मिक एकोपा वाढावा म्हणून प्रयत्न केले आणि यासाठीच तो सुप्रसिद्ध आहे.
मागील कित्येक शतकांपासून मूळ अशोक कसा असावा म्हणून बऱ्याच कल्पना रचल्या गेल्या आणि त्या कल्पनांच्या आधारावर पुनर्कल्पनाही रचल्या गेल्या. असे म्हणतात की निदान दोन अशोक तरी होतेच. त्यातला एक आहे ऐतिहासिक अशोक (ज्याला आपण मुख्यत्वेकरून त्याच्या शिलालेखांमधून समजून घेतो.) आणि दुसरा आहे तो विभूती रूपातील अशोक. लोकांच्या कल्पनाशक्तीतून हा दुसरा अशोक निर्माण झाला आहे. प्रख्यात विद्वान पॅट्रिक ऑलिवेल यांच्या या नव्या पुस्तकात या सम्राटाच्या जगात, त्याच्या अंतरंगात डोकावण्याचा प्रयत्न केला असला तरी ते करताना या दोन्ही अशोकचे मिश्रण करण्याचा मोह टाळला आहे. खरे तर, या मोहाला आत्तापर्यंत बरेच लेखक बळी पडलेले आहेत. मुख्यत्वेकरून शिलालेखांवर आधारित (म्हणजे ज्यात स्वतः अशोकच बोलला आहे त्यावर आधारित) असे हे पुस्तक आहे. माहितीचे स्रोत कितीही हुलकावण्या देणारे आणि तुकड्या-तुकड्यात उपलब्ध असले तरीही ऑलिवेल यांनी भारताच्या या पहिल्या महान राज्यकर्त्याचे एक मनमोहक असे व्यक्तिचित्रण अतिशय जिवंतपणे रेखाटले आहे या गोष्टीस दाद द्यायलाच हवी.
‌‘भारतीय जीवनचरित्रे‌’ या ग्रंथ मालिकेतील हे पहिलेच पुस्तक रामचंद्र गुहा यांनी संपादित करून वाचकांसमोर सादर केले आहे.

नवीन पुस्तक बालविवाह हेरंब कुलकर्णी बालविवाह विषय काढला, की अनेकांना ती समस्या मागच्या शतकातील होती असे वाटते. 'आता कुठे...
24/07/2025

नवीन पुस्तक
बालविवाह
हेरंब कुलकर्णी

बालविवाह विषय काढला, की अनेकांना ती समस्या मागच्या शतकातील होती असे वाटते. 'आता कुठे होतात बालविवाह ?' असे अनेकजण विचारतात.

पण आजही भारतात आणि सुधारणेचा वारसा सांगणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रात बालविवाह मोठ्या संख्येने होतात. महाराष्ट्रात दर ५ लग्नामागील एक लग्न हा बालविवाह असतो. या बालविवाह होणाऱ्या मुलींचे सरासरी वय १४ ते १६ असते. खेळण्या-बागडण्याच्या वयात त्यांच्यावर मातृत्व लादले जाते. इतक्या लवकर लग्न झालेल्या मुलींचे शिक्षण होत नाही की करिअर. आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होतात. मुले आणि ती दोघेही कुपोषित राहतात.

या विषयावर जाणीवजागृती व्हावी म्हणून राजस्थान, बिहार, तेलंगणा आणि महाराष्ट्रातील बहुसंख्य जिल्ह्यांत फिरून बालविवाहांचे जमिनी . बालविवाहाचे
वास्तव मांडणारा हेरंब कुलकर्णी यांचा हा लेखाजोखा... वास्तव, परिणाम आणि उपाययोजना सांगणारा.

शिक्षण आरोग्य आणि स्त्री सक्षमीकरणाचे १०० टक्के उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, बालविवाह थांबविणे ही पूर्वअट आहे. एकीकडे महिला सक्षमीकरणाचे ढोल वाजत असताना, दुसरीकडे लाखो मुलींचे आयुष्य करपून जाताना सरकार आणि समाज म्हणून आपण काय करणार आहोत ?

बालविवाहाच्या चरकात सापडलेल्या या बालिकांना मानवी जगण्याची संधी मिळायला हवी.
मुखपृष्ठ : अन्वर हुसेन

आनंद म्हणजे काय? यशाचं खरं मोजमाप कोणतं? रागावर नियंत्रण कसं ठेवलं पाहिजे? अर्थपूर्णतेचा शोध कसा घ्यायचा? दुःखावर विजय क...
20/07/2025

आनंद म्हणजे काय? यशाचं खरं मोजमाप कोणतं? रागावर नियंत्रण कसं ठेवलं पाहिजे? अर्थपूर्णतेचा शोध कसा घ्यायचा? दुःखावर विजय कसा मिळवायचा?
दैनंदिन जीवनात पडणारे हे सारे प्रश्‍न हा स्टॉइक तत्त्वज्ञानाचा गाभा आहे. मानवी अनुभवांच्या प्रयोगशाळेमध्ये दोन शतकांतून अधिक काळ तावून सुलाखून निघालेलं हे तत्त्वज्ञान कालातीत आहे आणि आजच्या आधुनिक युगातही ते आपल्याला दिशादर्शन करतं. त्याचा आधार घेऊन चांगलं जीवन कसं जगावं याबद्दलचं हे पुस्तक - द डेली स्टॉइक.
सम्राट मार्कस ऑरेलियस, नाटककार सेनेका आणि पूर्वाश्रमीचा गुलाम, तत्त्वज्ञ एपिक्टेटस तसंच झेनो, म्यूसोनियस रूफस यांसारख्या तत्त्वज्ञांची उद्धृतं आणि त्यांचे अर्थ, सोबत विचारप्रवृत्त करणारा एखादा प्रसंग-घटना किंवा
एखादी गोष्ट...
365 दिवस - रोज एक पान... रोज नवा प्रेरक विचार...
म्हणून द डेली स्टॉइक!

मुंबई कुणाची? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे यावर काय म्हणणे होते? भाषावार प्रांतरचना समितीपुढे डॉ. आंबेडकरांनी केलेली अत्यंत...
09/07/2025

मुंबई कुणाची?
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे यावर काय म्हणणे होते?

भाषावार प्रांतरचना समितीपुढे डॉ. आंबेडकरांनी केलेली अत्यंत तर्कसंगत व अभ्यासपूर्ण मांडणी.

फक्त ५१ पानांचे हे पुस्तक प्रत्येक मराठी माणसाने नक्की वाचलेच पाहिजे.

मुंबई ही महाराष्ट्राचीच!
डॉ. बी. आर. आंबेडकर
पाने : ५१
किंमत : ₹ ६०
संपर्क : 084211 88872

"कोण जाणे? पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर विठोबा उभ्या उभ्याच अठ्ठावीस युगांचा एखादा डुलका घेत असेल तर...?"नवीकोरी कादंबरी....
06/07/2025

"कोण जाणे? पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर विठोबा उभ्या उभ्याच अठ्ठावीस युगांचा एखादा डुलका घेत असेल तर...?"

नवीकोरी कादंबरी... लवकरच!

विठ्ठलाने घेतलेला स्वत:चा शोध...
विठोबा मिसींग इन पंढरपूर...

29/06/2025
गेल्या काही वर्षात भारतात राष्ट्र, राष्ट्रवाद, राष्ट्रभक्ती, राष्ट्रद्रोह या बाबतच्या चर्चा अधिकाधिक जोमाने होताना दिसता...
20/06/2025

गेल्या काही वर्षात भारतात राष्ट्र, राष्ट्रवाद, राष्ट्रभक्ती, राष्ट्रद्रोह या बाबतच्या चर्चा अधिकाधिक जोमाने होताना दिसतात. तसेच त्या चर्चा न राहता, दोन टोकांच्या भूमिकांत असलेल्या वितंडाच्या पातळीवर जाताना दिसतात. उदाहरणार्थ, भारत हे राष्ट्र गेली हजारो वर्षे अस्तित्वात होते अशी एक बाजू आहे तर त्याच्या विरोधात भारत नावाचे राष्ट्र १५ ऑगस्ट १९४७ रोजी अस्तित्वात आले अशी दुसरी बाजू आहे; मानवी जीवनात राष्ट्र ही संकल्पना अत्यंत लाभदायक आहे आणि सर्वांत आदरणीय असली पाहिजे अशी एक बाजू आहे, तर त्याच्या विरोधात राष्ट्र ही संकल्पना, निदान तिच्या आक्रमक आविष्कारात, अत्यंत घातक आणि हिंसक अशी संकल्पना आहे अशी दुसरी बाजू आहे. राष्ट्रवादाचे समर्थन करणाऱ्या उजव्या संघटना पहिली बाजू मांडतात तर रविंद्रनाथ टागोर हे दुसरी बाजू मांडणाऱ्यांच्यातले एक प्रसिद्ध नाव होते.
आधुनिक अर्थाने राष्ट्र ही संकल्पना नक्की काय आहे; ती इतिहासातील विविध टप्प्यांवर धर्म, भूगोल, संस्कृती, राजेशाही इत्यार्दीभोवती संघटित असलेल्या समुदायांपासून वेगळी आहे किंवा कसे? ती वेगळी असेल तर कशा प्रकारे? तिचे या आधीच्या समुदायांशी काही नाते होते किंवा कसे? या बाबतची विविध भूमिकांची धारणा वेगवेगळी आहे हेही वितंड उद्भवण्यामागचे एक महत्त्वाचे कारण आहे.
आधुनिक राष्ट्रवाद या संकल्पनेबद्दल इमॅजिन्ड कम्युनिटिज नावाच्या पुस्तकात बेनेडिक्ट अँडरसन यांनी सर्वप्रथम पथदर्शी मांडणी केली असे जगभरात मानले जाते. या पुस्तकात मांडल्या गेलेल्या मूलभूत विचारांचे महत्त्व आजही सर्वत्र मान्यताप्राप्त आहे.
हे विचार भारतात आजच्या काळात लोकांपर्यंत पोहोचणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यातून या बाबतच्या इथल्या चर्चाविश्वाला काही चौकट प्राप्त होऊन ते अधिक अर्थवाही होईल असा विश्वास वाटतो.

Address

703, Bhagwant Krupa Building, First Floor, Opposite Sakal Press, Budhvar Peth
Pune
411002

Alerts

Be the first to know and let us send you an email when Madhushree Publication posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Madhushree Publication:

Share

Category