Madhushree Publication

Madhushree Publication Marathi Language books publisher

"कोण जाणे? पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर विठोबा उभ्या उभ्याच अठ्ठावीस युगांचा एखादा डुलका घेत असेल तर...?"नवीकोरी कादंबरी....
06/07/2025

"कोण जाणे? पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर विठोबा उभ्या उभ्याच अठ्ठावीस युगांचा एखादा डुलका घेत असेल तर...?"

नवीकोरी कादंबरी... लवकरच!

विठ्ठलाने घेतलेला स्वत:चा शोध...
विठोबा मिसींग इन पंढरपूर...

29/06/2025
गेल्या काही वर्षात भारतात राष्ट्र, राष्ट्रवाद, राष्ट्रभक्ती, राष्ट्रद्रोह या बाबतच्या चर्चा अधिकाधिक जोमाने होताना दिसता...
20/06/2025

गेल्या काही वर्षात भारतात राष्ट्र, राष्ट्रवाद, राष्ट्रभक्ती, राष्ट्रद्रोह या बाबतच्या चर्चा अधिकाधिक जोमाने होताना दिसतात. तसेच त्या चर्चा न राहता, दोन टोकांच्या भूमिकांत असलेल्या वितंडाच्या पातळीवर जाताना दिसतात. उदाहरणार्थ, भारत हे राष्ट्र गेली हजारो वर्षे अस्तित्वात होते अशी एक बाजू आहे तर त्याच्या विरोधात भारत नावाचे राष्ट्र १५ ऑगस्ट १९४७ रोजी अस्तित्वात आले अशी दुसरी बाजू आहे; मानवी जीवनात राष्ट्र ही संकल्पना अत्यंत लाभदायक आहे आणि सर्वांत आदरणीय असली पाहिजे अशी एक बाजू आहे, तर त्याच्या विरोधात राष्ट्र ही संकल्पना, निदान तिच्या आक्रमक आविष्कारात, अत्यंत घातक आणि हिंसक अशी संकल्पना आहे अशी दुसरी बाजू आहे. राष्ट्रवादाचे समर्थन करणाऱ्या उजव्या संघटना पहिली बाजू मांडतात तर रविंद्रनाथ टागोर हे दुसरी बाजू मांडणाऱ्यांच्यातले एक प्रसिद्ध नाव होते.
आधुनिक अर्थाने राष्ट्र ही संकल्पना नक्की काय आहे; ती इतिहासातील विविध टप्प्यांवर धर्म, भूगोल, संस्कृती, राजेशाही इत्यार्दीभोवती संघटित असलेल्या समुदायांपासून वेगळी आहे किंवा कसे? ती वेगळी असेल तर कशा प्रकारे? तिचे या आधीच्या समुदायांशी काही नाते होते किंवा कसे? या बाबतची विविध भूमिकांची धारणा वेगवेगळी आहे हेही वितंड उद्भवण्यामागचे एक महत्त्वाचे कारण आहे.
आधुनिक राष्ट्रवाद या संकल्पनेबद्दल इमॅजिन्ड कम्युनिटिज नावाच्या पुस्तकात बेनेडिक्ट अँडरसन यांनी सर्वप्रथम पथदर्शी मांडणी केली असे जगभरात मानले जाते. या पुस्तकात मांडल्या गेलेल्या मूलभूत विचारांचे महत्त्व आजही सर्वत्र मान्यताप्राप्त आहे.
हे विचार भारतात आजच्या काळात लोकांपर्यंत पोहोचणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यातून या बाबतच्या इथल्या चर्चाविश्वाला काही चौकट प्राप्त होऊन ते अधिक अर्थवाही होईल असा विश्वास वाटतो.

सातत्यपूर्ण यशाची गुरूकिल्लीकणखर व्हा... धैर्यवान व्हा...स्वीकाराची क्षमता वाढवा...सकारात्मकतेच्या दिशेेने चाला...गुणवत्...
10/06/2025

सातत्यपूर्ण यशाची गुरूकिल्ली

कणखर व्हा... धैर्यवान व्हा...
स्वीकाराची क्षमता वाढवा...
सकारात्मकतेच्या दिशेेने चाला...
गुणवत्तेशिवाय पर्याय नाही...
निसर्गनियम समजून घेऊन वागा
रोज नवीन काहीतरी शिका
ध्येयावरील नजर ढळू देऊ नका
मनाला नियंत्रित करा
दृष्टिकोन बदला जीवन बदला
स्वयंप्रकाशित व्हा...
आत्मविश्‍वास वाढवा...
सातत्य आणि संतुलन ठेवा
विश्‍वास ठेवाल तरच मिळेल...

जगायचं कसं, जगायचं कशासाठी, सार्थक कशात या प्रश्‍नांची उत्तरं या लेखांमधून वाचकाला मिळू शकतील. अर्थात त्या प्रश्‍नांची उ...
05/06/2025

जगायचं कसं, जगायचं कशासाठी, सार्थक कशात या प्रश्‍नांची उत्तरं या लेखांमधून वाचकाला मिळू शकतील. अर्थात त्या प्रश्‍नांची उत्तरे दिली आहेत थोर संतांनी, विचारवंतांनी, लेखकांनी, कवींनी. त्यांच्या त्या विचारांच्या आधारानं मीदेखील त्यांचं विश्‍लेषण माझ्या परीनं केलं आहे. संतांचे, विचारवंतांचे विचार हे अत्यंत मौलिक. एवढंच नाही तर ते विचार म्हणजे जीवनमूल्येच. ते स्वीकारून माणसानं आचरण केल्यास त्याचं सार्थकच होईल, यात थोडीही शंका वाटत नाही. त्याद्वाराच खरीखुरी शांती, समाधान, आनंद लाभेल हेही निश्‍चितच. हे विचार, त्यांचं चिंतन जीवनाचं पोषण करणारं मला वाटतं.
शिक्षण, समाज, विज्ञान, अध्यात्म, इतिहास, राजकारण, काव्य याही विषयांवरचं हे चिंतन आहे. अर्थात त्याला थोरा-मोठ्यांच्या विचाराचं अधिष्ठान आहे. यातील विचार स्वतंत्रपणे माझे म्हणून आलेच आहेत असे नाही. त्यास त्यांच्या विचारांचा आधार आहे. त्यांचे अमृतासारखे विचारधनही प्रत्यक्ष मी उद्धृत केले आहेत. बहुतांश लेखांत ते वाचकाला आढळून येतील. त्यामुळेच या लेखनाला मौलिक असं भारदस्तपण लाभलं, असं
म्हणणे अतिशयोक्त ठरणार नाही.
प्रा. डॉ. रमाकांत कोलते

भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील पहिला मूक चित्रपट हा ‘राजा हरिश्‍चंद्र’ होय! चित्रपट, नाटके, गीते, कथा, कविता, अभंग,...
31/05/2025

भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील पहिला
मूक चित्रपट हा ‘राजा हरिश्‍चंद्र’ होय! चित्रपट, नाटके, गीते, कथा, कविता, अभंग, पोवाडे, भारूडे, आख्याने अशा अनेक कलाकृतींतून वर्षानुवर्षे ‘सत्यवादी राजा हरिश्‍चंद्र’ या व्यक्तिरेखेने मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. मराठी साहित्याला समृद्ध केले.

तर रसिक वाचकांच्या भेटीसाठी घेऊन येत आहोत, पौराणिक कथेतील फॅन्टसी (कल्पनाविलास) टाळून ऋषी विश्‍वामित्र, तारामती आणि हरिश्‍चंद्र यांच्या स्वगतातून साकारलेली, ‘राजा हरिश्‍चंद्र’ या विषयावरील पहिली मराठी कादंबरी!

राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज साहित्य सेवा पुरस्काराने सन्मानित कादंबरी

मानवी शरीर समजून घेण्यासाठीचे हे पुस्तक समाज माध्यमांवरील एका लोकप्रिय सर्जनने लिहिले आहे. यात एक मजेदार आणि तथ्य तपासणा...
31/05/2025

मानवी शरीर समजून घेण्यासाठीचे हे पुस्तक समाज माध्यमांवरील एका लोकप्रिय सर्जनने लिहिले आहे. यात एक मजेदार आणि तथ्य तपासणारे जगण्याचे मार्गदर्शक तत्त्व आहे. हे पुस्तक साचलेल्या विविध मिथकांना दूर करते आणि आपले शरीर कसे कार्य करते याबद्दल खरी, आश्‍चर्यकारक माहिती सामायिक करते.
अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले तरी, मानवी शरीराची तग धरून राहण्याची क्षमता असामान्य आहे.
डॉ. करण राजन यांनी रुग्णालयात अनेक वर्षे काम करून कष्टाने शिकलेले मौल्यवान धडे आणि आरोग्यविषयक युक्त्यांनी हे पुस्तक भरलेले आहे. यामध्ये मानवाच्या अद्भुत शरीराचा गुणगौरव आहे. हे पुस्तक तुम्हाला तणाव कमी करण्यास तसेच निरोगी आणि दीर्घ आयुष्य जगण्यास मदत करेल.
या पुस्तकात, डॉ. करण राजन आपल्या शरीराच्या कार्य करण्याच्या विचित्र आणि अद्भुत पद्धती स्पष्ट करतात आणि समस्यांना तोंड देण्यासाठी व्यावहारिक युक्त्या सांगतात. त्यांनी समाविष्ट केलेल्या काही गोष्टींमध्ये, नाकाचे केस उपटण्याचे धोके, ताण कमी करण्यासाठी तुमच्यातील सुप्त, नैसर्गिक प्रतिक्षिप्त क्रिया, वेदना कमी करण्यात मदत करण्यासाठीच्या सोप्या मानसिक युक्त्या, तुम्ही कधीही पाद रोखून का धरू नये? आणि यासारख्या इतर बऱ्याच काही गोष्टींचा समावेश आहे.

Address

703, Bhagwant Krupa Building, First Floor, Opposite Sakal Press, Budhvar Peth
Pune
411002

Alerts

Be the first to know and let us send you an email when Madhushree Publication posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Madhushree Publication:

Share

Category