दत्त माझा । मी दत्ताचा ।।

  • Home
  • India
  • Pune
  • दत्त माझा । मी दत्ताचा ।।

दत्त माझा । मी दत्ताचा ।। || श्र्वासे श्र्वासे दत्तनाम स्मरात्मन् ||
(645)

बाविसावा अध्याय म्हणजे वंध्या महिषीला गुरुमहाराजांच्या आशीर्वादाने दुग्धवंती केले तो . या अध्यायात दत्त महाराज भक्त आणि ...
26/10/2025

बाविसावा अध्याय म्हणजे वंध्या महिषीला गुरुमहाराजांच्या आशीर्वादाने दुग्धवंती केले तो . या अध्यायात दत्त महाराज भक्त आणि अभक्त यातील भेद स्पष्ट करीत माझे जाणे कोणाकडे होते हे विशद करत आहेत . एखाद्या घरात काही दोष आहेत ,म्हणजे कोणी दारिद्र्यात ,किंवा कोणी रोगाने गांजलेला पण म्हणून महाराज केवळ दोष पाहून त्याच्या निर्मूलनासाठी जात नाहीत तर सात्विकतेला अनन्य साधारण महत्व महाराजांनी दिले आहे .

याच्या पुष्ट्यर्थ गुरुचरित्रकार विदुर आणि दुर्योधनाचे उदाहरण देताना दिसतात . विदुराच्या भक्तिभावाला जाणत भगवान त्याच्या दारावर गेले पण दुर्योधनाच्या घरी गेले नाहीत .

अभक्तांकडून महाराज सेवा घेत नाहीत . बालकावस्थेत मातेच्या दुधाखेरीज इतर कोणत्याही अभक्ताच्या दुधाचा स्वीकार महाराजांनी केला नाही ,केवळ सव्य कर स्पर्श याकरिता पुरेसा ठरला .अहो शेवटी भक्त म्हणजे काय तर प्रत्येक गोष्टीत दत्त महाराजांचा विचार केला कि झाले ! आता या अध्यायातील विप्र स्त्री पहा . गुरुमहाराज येताच अतिथी सत्काराला अनुसरून स्वागत करून म्हणत आहे ,माझे पती याचक वृत्तीने गेले आहेत ,ते आता उत्कृष्ठ धान्य घेऊन येतील तेव्हा आपण तोवर आसन ग्रहण करावे . माध्यान्हाला स्वतःच्या निर्वाहाची भ्रांत असताना दारी आलेल्या अतिथीचा सत्कार मोठी गोष्ट आहे .

महाराजांच्या शब्दांना ग्राह्य मनात दूध काढणे ,ते घेऊन धावत घरात येणे ,आता या धावत येण्यामागे उद्देश हा कि महाराजांना भिक्षेकरिता उशीर होऊ नये ,ते तापवून महाराजांना देणे या सर्व गोष्टी महाराजांचा विचार करूनच केलेल्या आहेत . सर्व सत्य कथन हा आणखीन एक गुण . केवळ महिषी वांझ व वृद्ध आहे हे न सांगता हि विप्र स्त्री आम्ही या महिषीचा उपयोग मृत्तिका वाहून नेण्यासाठी करतो हे सत्य महाराजांना सांगते . आमच्या निर्वाहाचे ते साधन आहे हे ती लपवत नाही .या महिषीला दुग्धवंती करून महाराजांनी या प्राण्यावर कृपा केली. वृद्धावस्थेत होणारे कष्ट संपवले . ब्राह्मणाच्या परिवारावर कृपा केली पाप आणि दारिद्र्य दोष संपवले . पाप मुक्ती कशी तर वृद्ध मुक्या प्राण्यावर उपजीविका हे पाप आहे ,ते संपवले .

अभक्त ते भक्त हा प्रवास केवळ हाताच्या हालचालीवर संपतो . हात जोडा आणि म्हणा --- श्रीगुरुदेव दत्त !!!---अभय आचार्य

कर्म म्हणजे काय ?  एकदा एक राजा हत्तीवर बसुन आपल्या राज्यात निरीक्षण करण्यास फिरत होता.फिरतफिरत तो एका गावातील दुकानासमो...
26/10/2025

कर्म म्हणजे काय ?

एकदा एक राजा हत्तीवर बसुन आपल्या राज्यात निरीक्षण करण्यास फिरत होता.
फिरतफिरत तो एका गावातील दुकानासमोर थांबला.
प्रधानाला बोलाऊन म्हणाला, कां कोण जाणे मी या दुकानदाराला पूर्वी कधी पाहीले नाही, त्याला ओळखतपण नाही पण मला या दुकानदाराला फाशी द्यावे वाटते आहे.
प्रधान बुचकळ्यात पडला तो कांही बोलण्याच्या अगोदरच राजा तेथून पुढे निघाला.
प्रधान विचारात पडला. त्यान तेे दुकान पाहून ठेवले व तो राजामागे निघाला.
दुस-या दिवशी प्रधान गावातल्या त्या दुकानाशी साध्या वेशात पोहोचला. दुकानात दुकानदारा शिवाय कोणीच नव्हते.
आजुबाजुला चौकशी करता तो चंदनाचा व्यापारी असल्याचे समजले. तो दुकानात गेला. त्याच्याकडे सुवर्णवर्णाचे सुगंधी चंदन होते. मात्र कोणी खरेदीदार नसल्याने मालक वैतागला होता.
चौकशी करता कळले की लोक नुसते येतात वास घेतात आणि साधा दरही न विचारता निघून जातात.
रिकाम्या बसलेल्या दुकानदाराला ब-याचवेळा वाटे की किमान राजा तरी मरावा. तो मेला तर त्या आसमंतात दुसरा कोणी चंदनाचा व्यापारी नसल्याने राजाच्या अंत्य संस्काराला तरी मोठ्या प्रमाणात चंदन खरेदी होईल. माल विकला जाईल. चार पैसे तरी मिळतील.
प्रधानाला मग राजाला या अनोळखी व्यापा-याला फाशी कां द्यावे वाटले याचा उलगडा झाला.
व्यापा-याच्या मनातील राजाविषयीच्या वाईट विचारांच्या तरंगलहरीनी दुषीत वातावरणात राजा आल्यावर राजाच्या मनात दुकानदाराला फाशी देण्याचे विचार उद्भवले होते.
त्याने त्या दुकानदाराकडे थोडी चंदन खरेदी केली. दुकानदाराला ब-याच दिवसांनी गि-हाईक मिळाल्याने आनंद झाला. प्रधान निघाला आणि राज दरबारात राजापुढे ते चंदन ठेवले. राजाने कागद उघडून चंदन पाहिले आणि त्याच्या सुवर्ण वर्णाने आणि सुगंधाने मोहित झाला.
त्याने प्रधानाला विचारले कोठून आणले हे चंदन ? प्रधानाने त्या व्यापा-याचे नांव सांगितले.
राजा म्हणाला, अरे काल उगाच मला त्याला फाशी द्यावे वाटले ! त्या व्यापा-याला कांही सुवर्णमुद्रा देण्याचा आदेश दिला.
राजा अध्ये मध्ये इतरांना अनमोल भेटी देण्यास चंदन खरेदी करु लागला. राजाच्या खरेदीने आनंदित व्यापा-याच्यामनात आता राजा मरावा हे येईनासे झाले.
चांगल्या दर्जाचा चंदन व्यापारी म्हणून राजाचा तो मित्र झाला.
आपल्या मनात इतरां विषयी चांगले विचार, दयाळुपणा आणला तर इतरांच्या मनातुनही चांगले विचार चांगल्या भावना आपल्यापर्यन्त येतील.
व आपला उत्कर्ष होईल.
मग कर्म म्हणजे काय ? अनेकजण म्हणाले, आपले शब्द, आपली कृती, आपली भावना...
पण खरे हेच आहे की, आपल्या मनात येणारे विचार हेच आपले खरे कर्म होय !

ll श्री दत्तात्रय llश्री दत्तात्रय- अनादिकालापासून पुजले गेलेले दैवतश्री दत्तात्रय- अनादिकालापासून पुजले गेलेले दैवतदत्त...
26/10/2025

ll श्री दत्तात्रय ll

श्री दत्तात्रय- अनादिकालापासून पुजले गेलेले दैवत
श्री दत्तात्रय- अनादिकालापासून पुजले गेलेले दैवत
दत्तराज पाहुनी आज तुष्टलो मनी !
औदुंबरी नित्य वसे, भक्‍तकाम पुरवितसे !
कमलनयन श्याम दिसे, धन्य तो जनी !
अनसूया ज्याची माय, दृढ धरिले ज्याचे पाय !
त्याचे चरित वर्णू काय, सकळ तो जनी !
विनायक दास दीन, जळाविणा जैसा मीन !
ब्रम्हा-विष्णु-महेश तीन आठवी मनी !!
!! ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय !!
श्री दत्तावताराचे प्रयोजन
श्री दत्तात्रेय ही देवता कशी आहे, तिचे स्वरुप काय आहे, तिचे कार्य काय आहे, हे देवता स्वरुप कशामुळे हृदयात साकारते, या देवतेच्या प्रसंन्नतेचा प्रसाद म्हणुन काय प्राप्त होते; हे श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराजांनी रचलेल्या श्रीदत्तलीलामृताब्धिसार या ग्रंथातल्या पहिल्या दोन श्लोकात आले आहे. श्रीभगवान दत्तात्रेयांचे वर्णन करतांना श्री वासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराज म्हणतात,

ॐकार ज्याचा वाचक | जगध्देतू धीप्रेरक | तोचि देव सच्चित्सुख | एक दत्त || १ ||
दत्त अज निराकार | स्वेच्छामात्रें हो साकार | अव्ययात्मा भक्ताधार | भक्तिगम्य || २ ||

अर्थ:
आत्मानंदा कडे घेऊन जाणारा ॐकार ज्याच्या बद्दल बोलतो, जो जगाच्या उत्पत्ती-स्थिति-लय या चक्रातून सुटका करून घेण्यासाठी भक्तांच्या बुद्धीला प्रेरक आहे. तोच एकमात्र देव, भक्तांचा सत्च्चिदानंद सुखाशी एकी घडविणारा दत्त आहे. || १ ||
हा जन्म रहित निराकार आहे. भक्तांच्या इच्छामात्रे साकार होतो. हा अखंड निराकार आत्मस्वरुप आहे. भक्तांचा आधार आहे. आणि भक्तिने जाणला जातो. || २ ||

 #श्रीदत्तगुरूंच्या_पादुकांचे_महत्त्वश्रीनृसिंह सरस्वती महाराजांच्या मूळ-पादुका तीन ठिकाणी आहेत. संन्यास घेऊन ते जेव्हा ...
26/10/2025

#श्रीदत्तगुरूंच्या_पादुकांचे_महत्त्व

श्रीनृसिंह सरस्वती महाराजांच्या मूळ-पादुका तीन ठिकाणी आहेत. संन्यास घेऊन ते जेव्हा घराबाहेर पडले, तेव्हा प्रथमत: ते औदुंबर येथे आले. तेथे त्यांनी पहिला चातुर्मास करून अनुष्ठानाला प्रारंभ केला. तेथे त्यांनी आपल्या पादुका ठेवल्या. त्या पादुकांना ‘विमलपादुका’ असे म्हटले जाते. विमल म्हणजे स्वच्छ, निर्मळ, शुद्ध असा भावार्थ होतो. म्हणजेच येथील अनुष्ठानापासूनच त्यांनी आपल्या स्वत:साठी नव्हे, पण आम्हाला-तुम्हाला तेथील अनुष्ठानाचे महत्त्व कळावे यासाठी उपासनेतील शुद्ध, निर्मळ, स्वच्छ अशा अंतर्मनाचे स्वरूप त्यातून सूचित केले असावे. कारण अनुष्ठानासाठी सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट हीच असते. उपासनेची प्रगती ही अशा मनोधारणेतून होत असते. पुढे श्रीनृसिंहसरस्वती महाराज हे नरसोबाची वाडी येथे गेले. तेथे त्यांनी बारा वर्षे तप केले. तेथील पादुकांना ‘मनोहरपादुका’ असे म्हटले गेले आहे. का म्हणाल? तर तपश्चर्येने प्राप्त होणारी प्रसन्नता तिथे अभिप्रेत असावी. जेव्हा तपश्चर्या किंवा अनुष्ठान हे अधिकाधिक काळ होते, तेव्हा ही मनाची किंवा चित्ताची प्रसन्नता मुखावर विलसत असते. दत्तगुरूंचे हे प्रसन्न दर्शन घडून येऊन आपलेही मन प्रसन्न होते. ही प्रसन्नता आनंदस्वरूपही असते. त्याचे आणखीही एक कारण असे की, स्वत: श्रीगुरूंनी सांगितले की,
‘तुम्हासहित औदुंबर । आमुच्या पादुका मनोहर ।
पूजा करिती जे तत्पर । मनकामना पुरती जाणा ॥ (अ. १९ ओवी ८०)
त्यानंतर श्रीनृसिंह सरस्वतीमहाराज गाणगापूर येथे आले. प्रथम त्यांनी संगमावर चोवीस वर्षे अनुष्ठान केले. राजाने त्यांना गावात येण्याची प्रार्थना केली व वाजतगाजत गावात आणले. तेथेच सध्याचा मठ आहे. श्रीशैलपर्वतास जाऊन, पाताळगंगेपलीकडील कर्दळीवनात ते गुप्त झाले. पण त्यापूर्वी त्यांनी त्या मठात आपल्या पादुका ठेवल्या. त्यास ‘निर्गुणपादुका’ असे म्हटले जाते. निर्गुण म्हणजे परब्रह्मस्वरूप, तसेच गुणातीत अवस्थेतील अवतारित, असाही भावार्थ आहे. सत्त्व-रज-तम या त्रिगुणापलीकडे गेलेले हे अवतारी-सत्पुरुष परब्रह्माशीच एकरूप झालेले असतात. त्यांच्या निर्गुणपादुकांची पूजा-आराधना केल्यास निर्गुण-सगुण असे दर्शन होते.

सायंदेवांकडील ‘करुणा-पादुका’

श्रीनृसिंहसरस्वतीमहाराज यांचे चार पट्टशिष्य होते. ते म्हणजे सायंदेव, नंदिनामा, नरहरी, सिद्धमुनी- हे होत.सिद्धमुनी हे सतत महाराजांच्या बरोबरच वावरत असल्याने त्यांना अनेक हकिकती ठाऊक होत्या. त्या त्यांनी आपले शिष्य नामधारक यांना सांगितल्या. त्यामुळे सिद्धमुनी-नामधारक संवाद डोळयापुढे ठेवूनच सरस्वती गंगाधर यांनी श्रीगुरुचरित्रग्रंथ लिहिला. “महाराजांनी आपल्या पादुका सायंदेव यांना पूजेसाठी दिल्या होत्या. सायंदेव त्यांची नित्य पूजा करीत असत. त्यामुळे त्या पादुका त्यांच्या कडगंची येथील घरातच ठेवलेल्या होत्या. पुढे म्हणजे तसे अलिकडे १९५५ मध्ये प. पू. श्रीगुरुनाथबाबा दंडवते महाराज कडगंचीला आले असताना त्यांच्या वंशजांनी त्यांना या पादुका दाखविल्या. त्यांनी या पादुकांचे नामकरण ‘करुणापादुका’ असे केले. या पादुका सध्या देवस्थानातील श्रीदत्तात्रेयांच्या मूर्तीजवळच ठेवलेल्या आहेत.” अशी माहिती श्री. शिवशरणप्पा मादगुंडी यांनी दिली. श्री. शिवशरणप्पा यांची बहुथोर पुण्याई अशी की, त्यांनी सायंदेवाच्या घराचे पुनरुज्जीवन करून तेथेच सध्याचे श्रीसायंदेव दत्तक्षेत्र संस्थान झाले आहे.
कडगंची येथील श्रीदत्तात्रेय

श्री शिवशरणप्पांचे कार्य

श्री शिवशरणप्पांनी देवस्थानचा जीर्णोद्धार करताना अपार कष्ट घेतले आहेत. त्यांना (स्व) दादामहाराज जोशी यांची मार्गदर्शनही लाभले होते. पुष्कळ भ्रमंती केली आहे. ‘श्रीगुरुदेव दत्त” एवढ्याच नामघोषाने ते आवाहन करतात. त्यांची कानडी आणि हिंदी भाषा अत्यंत मधुर आहे. कारण त्यात कमालीची विनम्रता व सेवाभावीवृत्ती दडलेली आहे. तिचे प्रकटीकरण होताना जणू ‘भक्तिसंवाद’ घडत असल्याची अनुभूती येते. त्यांचे बोलणे हेही प्रवचन म्हणावे इतके भक्तीने होत असल्याने त्यांना सर्वांकडून सर्वतोपरी साहाय्य मिळत आहे. याची ग्वाही त्यांच्या कार्यानेच मिळते. खरे तर कोणत्याही कार्याचे श्रेय ते स्वत:कडे कधीच घेत नाहीत. नेहमी ‘श्रीनृसिंह सरस्वतीजीकी कृपा’ एवढेच वचन ते उच्चारतात. हीच त्यांच्या मोठेपणाची ओळख आहे. दत्तगुरूंची त्यांच्यावर अपारकृपा आहे, याची ग्वाही त्यांच्या मंदिर उभारणीतून दिसून येते. श्रीदत्तगुरूंची अत्यंत सुंदर अशी मूर्ती इथे विराजमान झाली.
सायंदेवाचे घर म्हणजेच सध्याचे कडगंची होय. याठिकाणी साधकांना सर्व सोयी उपलब्ध आहेत. येथील दत्तमूर्ती इतरत्र कोठेही नाही. कडगंचीस बरेच जिर्णोद्धाराचे व नवीन बांधकामही चालू आहे.
श्री गुरूंचा पट्ट शिष्य श्री सायंदेव

श्री क्षेत्र कडगंची विशेष

औदुंबर, नृसिंहवाडी, गाणगापूर अशी लोकप्रिय दत्तस्थाने सगळ्यांनाच माहीत असतात, पण त्याशिवायही अशी बरीच दत्तस्थाने आहेत, जी फारशी परिचित नाहीत. देशभरातील अशा दत्तस्थानांचा परिचय..
संपूर्ण देशामध्ये शेकडो श्रीदत्त क्षेत्रे आहेत आणि गावागावांत एखादे दत्त मंदिर असल्याचे आपल्याला आढळते. तरीही काही प्रमुख श्रीदत्त क्षेत्रे प्रसिद्ध आहेत. तेथील स्थानमाहात्म्यामुळे ही दत्तक्षेत्रे नावारूपाला आली आहेत. त्यातील श्रीक्षेत्र माहूर, औदुंबर, नृसिंहवाडी, गाणगापूर, अक्कलकोट, गिरनार, माणिकनगर, गरुडेश्वर इ. क्षेत्रे सर्वाना माहीत आहेत. मात्र काही प्रमुख दत्त क्षेत्रे सर्वसामान्यांना अजूनही अपरिचित आहेत. उदा. कुरवपूर, कडगंची, मुरगोड, कारंजा, पीठापूर, माणगाव, बाळेकुंद्री, बसवकल्याण, नारेश्वर, अमरापूर, कुडुत्री, शंकरमहाराज समाधी मंदिर, पैजारवाडी, लाडचिंचोळी, तिलकवाडा, अनसूया, झिरी, शिरोळ, लातूर, मंथनगुडी, भाटगाव, भालोद इ. या ठिकाणी निवास आणि भोजनाची नि:शुल्क व्यवस्था उपलब्ध आहे. तेथे आपल्याला गुरुचरित्र पारायण, दत्तयाग इ. विधीही करता येतात. प्रत्येक भाविकाने भेट द्यायलाच हवीत अशा काही दत्त क्षेत्रांची माहिती खालीलप्रमाणे –
श्रीनृसिंहसरस्वती महाराजांचे चार पट्टशिष्य होते असे सांगितले जाते. अवतार समाप्तीच्या वेळी श्रीशैल्यम येथे पाताळगंगेजवळही हे चौघे शिष्य होते. स्वामींनी कर्दळीवनामध्ये गुप्त झाल्यावर जी चार शेवंतीची फुले पाठवली ती या चार शिष्यांना मिळाली असे मानले जाते. हे चौघेजण म्हणजे श्रीसायंदेव, श्रीनंदिनामा, श्रीनरहरी आणि श्रीसिद्धमुनी हे होते. यातील श्रीसायंदेव हे कडगंची या गावचे. कडगंची हे गाव कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्य़ातील आळंद या तालुक्यामध्ये आहे. श्री सायंदेव यांचे आडनाव साखरे हे होते. त्यांच्या वंशातील पाचव्या पिढीतील सरस्वती गंगाधर यांनी श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ लिहिला आहे. हा ग्रंथ कडगंची येथे लिहून झाला. श्री सायंदेवाची पुढील वंशावळी अशी आहे, श्रीसायंदेव – श्रीनागनाथ – श्रीदेवराव – श्रीगंगाधर – श्रीसरस्वती. श्रीगुरुचरित्र या दत्तभक्तांसाठी आणि वेदांप्रमाणे पवित्र असणाऱ्या महत्त्वाच्या ग्रंथाचे लिखाण कडगंची या ठिकाणी झाले. त्यामुळे याचे स्थानमाहात्म्य अपरंपार आहे. गुरुचरित्राची मूळ प्रत साखरे घराण्यात होती. गुरुचरित्राची मूळ प्रत येथे आहे आणि त्यामध्ये प्रत्येक अध्यायामध्ये श्रीदत्तात्रेय मंत्रगर्भ स्वरूपात असल्याने हा सर्व परिसर दैवी स्पंदनांनी भरलेला आहे असे मानले जाते. गुरुचरित्र या ग्रंथाचे वाचन केल्याने लाखो व्यक्तींना अनुभूती आलेल्या आहेत अशी श्रद्धा आहे की प्रापंचिक संकटातून, अनेक प्रकारच्या व्याधी, आजार आणि संकटातून त्यांची सुटका झाली आहे. त्यांच्यावर श्रीदत्तात्रेयांची कृपा झालेली आहे. अशा या ग्रंथाची रचना जेथे झाली, ते अत्यंत पवित्र असे ठिकाण म्हणजे श्रीक्षेत्र कडगंची हे आहे. म्हणूनच याला श्रीदत्तगुरूंच्या चिरंतन अस्तित्वाची पुण्यभूमी असेही म्हणता येईल.श्रीनृसिंहसरस्वती स्वामी महाराजांनी श्रीसायंदेवांना आपल्या पादुका दिल्या होत्या. त्यांची ते नित्यनियमाने पूजा करीत असत. त्याच या करुणा पादुका. ज्या ठिकाणी श्रीगुरुचरित्र लिहिले गेले त्या ठिकाणी या करुणा पादुका ठेवलेल्या आहेत. या ठिकाणचे दर्शन हा एक अलौकिक अनुभव आहे.
गुरुचरित्राचे लिखाण सिद्धमुनी आणि नामधारक यातील संवाद रूपाने झाले आहे. सिद्धमुनींनी श्रीगुरूंच्या चरित्रातील कथानामधारकाला सांगितल्या आणि त्या डोळ्यांसमोर ठेवून श्रीसरस्वती गंगाधर यांनी श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ लिहिला आहे. तेथे एक अतिशय सुंदर अशा श्रीदत्तमूर्तीची स्थापना केली आहे. या मंदिराशेजारीच एक गुहा असून त्या ठिकाणी गुरुचरित्राचे लिखाण झाले होते. या ठिकाणी नि:शुल्क भक्त निवास आणि भोजन व्यवस्था उपलब्ध आहे. ज्या ठिकाणी श्रीगुरुचरित्राचे लिखाण झाले तिथे त्याचे पारायण करणे हा एक वेगळाच आनंद आहे. गुलबर्गा येथून कडगंचीला येण्यासाठी बसेस उपलब्ध आहेत.

 ांडव_पंचमीपांडव पंचमी म्हणजे पांडवांचा विजय दिवस. श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्याने  युद्ध करून अल्प संख्याबळ ...
26/10/2025

ांडव_पंचमी

पांडव पंचमी म्हणजे पांडवांचा विजय दिवस. श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्याने युद्ध करून अल्प संख्याबळ असूनही बलाढ्य अशा कौरवसेनेचा नायनाट करणार्‍या पांडवांनी जगासमोर मोठा आदर्श उभा केला. त्यांच्यासारखे गुण आपल्यात यावेत, यासाठी हा दिवस साजरा केला जातो
पांडवांसारखे पुत्र घरात जन्माला यावेत आणि पुत्रांत असलेल्या गुणांची वृद्धी व्हावी, यांसाठी पांडवांची पूजा करतात. हे करत असतांना श्रीकृष्णाची शक्ती कार्यरत असते.
या दिवशी गायीच्या शेणापासून पांडव सिद्ध करतात आणि त्यांची पूजा करतात.

२६ ऑक्टोबर - भगवत्कृपेचा लोंढा म्हणजे काय ?कोणतेही बी पेरताना ते अत्यंत शुद्ध असावे; म्हणजे किडलेले किंवा सडलेले नसावे. ...
26/10/2025

२६ ऑक्टोबर - भगवत्कृपेचा लोंढा म्हणजे काय ?

कोणतेही बी पेरताना ते अत्यंत शुद्ध असावे; म्हणजे किडलेले किंवा सडलेले नसावे.
भगवंताशिवाय दुसर्या कोणत्याही फळाच्या हेतूने केलेली भक्ति ही सडलेल्या बीजासारखी आहे. आता, सुरुवातीलाच उत्तम बी पैदा होईल असे नाही, परंतु प्रयत्नाने ते साधता येते.

पुष्कळ वेळा काही तरी ऐहिक सुखाच्या इच्छेने मनुष्य भक्ति करायला लागतो; म्हणजे त्यावेळी तो सडके बीज पेरीत असतो.
प्रारंभी अशा तर्हेचे काही तरी निमित्त होतच असते, परंतु थोड्याशा विचाराने, शुद्ध बीजाची पेरणी होणे जरूर आहे असे चित्ताला पटते. भगवंताची तशी अनन्य भावाने प्रार्थना करावी.
पाऊस पडणे वा न पडणे ही गोष्ट सर्वस्वी भगवंताच्या स्वाधीन आहे, आणि तो यथाकाळ पडतोही. असे पाहा की, एखादे शेत खोलात असले की त्यात पाणी इतके साचते की, ते जर बाहेर काढून लावले नाही तर सबंध पीक कुजून जाते. त्याच अर्थाने भगवंताच्या कृपेचा लोंढा जर जोराचा असला तर बंधारा फोडून तो बाहेर सोडणेच जरूर असते. असे करण्यात दोन्हींकडून फायदा असतो. एक म्हणजे शेतात जास्त झालेले पाणी बाहेर काढून लावल्याने शेतातले पीक न कुजता उत्तम वाढते; आणि दुसरे म्हणजे, हे बाहेर घालविलेले पाणी आजूबाजूच्या शेतात पसरून तिथलेही पीक वाढवायला मदत होते. बंधारा फोडून पाणी बाहेर लावणे याचेच नाव परोपकार.

साधकाची जशी प्रगती होत जाईल त्याप्रमाणे मध्यंतरी सिद्धी प्राप्त होऊन, बोललेले खरे होणे, दुसर्याच्या मनातले समजणे, एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी अदृश्यगतीने जाणे, इत्यादि प्रकार घडू लागतात. अशा वेळी मोहाला बळी न पडता, त्यांचा उपयोग स्वार्थाकडे न होईल अशी खबरदारी घेणे जरूर असते.
उपयोग करायचाच झाला तर दुसर्याचे काम करण्यात, परोपकारांत व्हावा; यालाच बंध फोडून पाणी बाहेर लावणे असे म्हणता येईल.

शहाण्या माणसाने आपले सुख बाहेरच्या वस्तूवर अवलंबून न ठेवण्याचा अभ्यास करावा. बाहेरची वस्तू सुटली तरी मनाला दुसरी वस्तू देणे अवश्य असते. अशी वस्तू म्हणजे भगवंत होय.

भगवंत हा नेहमी राहणारा, स्वयंपूर्ण, आणि आनंदमय असल्यामुळे त्याचे चिंतन करता करता मनामध्ये ते गुण उतरतात. अर्थात् मन भगवंताच्या चिंतनाने आनंदमय बनल्यावर त्या माणसाला जीवन किती रसमय होत असेल याची कल्पना करावी. मी त्याचा आहे आणि हे सर्व त्याचे आहे अशी सारखी जाणीव पाहिजे. किती आनंद आहे त्यात !

३००. शुद्ध अंतःकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल.

येळकोट येळकोट जय मल्हार
25/10/2025

येळकोट येळकोट जय मल्हार

गुरुचरित्रात परान्न दोष सांगितले आहेत ,त्यामुळे होणारे तोटे लक्षात घेऊन आपण परान्न टाळावयास हवे पण सध्या हे बऱ्याचदा शक्...
25/10/2025

गुरुचरित्रात परान्न दोष सांगितले आहेत ,त्यामुळे होणारे तोटे लक्षात घेऊन आपण परान्न टाळावयास हवे पण सध्या हे बऱ्याचदा शक्य होत नाही . ,कोणाकडे अन्नग्रहण करावे आणि कोणाकडे करू नये याचे काटेकोर नियम गुरुचरित्रात सांगितले आहेत . अन्न हे दोष अथवा वासना वहनाचे कार्य करते आणि याची प्रचिती नेहेमी येते . सांप्रत काळात परान्न हा भाग कोणी पाळत नसले तरी त्याचे दूरगामी परिणाम दिसून येतात . का असं सांगितलं असेल ? कोणाकडे केवळ जेवण्याने असा काय तोटा किंवा नुकसान होते ?? कैक उदाहरणे यादाखल देता येतील . नकारात्मक आणि सकारात्मक देखील .

थोरल्या महाराजांच्या चरित्रात एक कथा आहे . ब्रह्मावर्तास आप्पा खाडिलकर नावाचा एक ब्राह्मण होता . त्याला एकदा रक्ताची हगवण सुरु होऊन तो फार अशक्त झाला . त्या वेळी त्याच्या आईला कोणीतरी असा उपाय सांगितला कि तुम्ही पंचपक्वांन्ने तयार करून ते अन्न मुलावरून उतरून कोणास तरी खायला घाला म्हणजे मुलगा बरा होईल . हे ऐकून आप्पाच्या आईने तसे अन्न आपल्या मुलावरून उतरवून व्यंकटराव नावाच्या मनुष्यास बोलावून जेऊ घातले . याने आप्पाला बरे वाटले तर व्यंकटरावला तो आप्पाचा रोग जडला आणि तो दिवसेंदिवस अशक्त होऊ लागला . थोरले महाराज त्यावेळी ब्रह्मावर्तास होते ,त्यांच्याकडे व्यंकटराव आल्यावर ते म्हणाले तू उतारा खाल्ल्यामुळे तुझी हि अवस्था झाली आहे . तू यातून बरा होशील असे दिसत नाही . यानंतर व्यंकटरावाने बरेच औषधोपचार केले पण स्वामी महाराज एकदा जे म्हणाले ते ब्रह्मवाक्य . शेवटी काही दिवसात त्याचे दम्याने देहावसान झाले .हा त्या अन्नाचा नकारात्मक परिणाम .

दत्त माहात्म्यात विष्णुदत्त ब्राह्मणाच्या घरी जडमूढ असा पुत्र जेवला तेव्हा ,सतीचे हाताने मिळता अन्न l तयाचा भ्रम गेला निघोन ll असे म्हटले आहे . हा अन्नाचा सकारात्मक परिणाम .

प्रत्यक्ष दत्त महाराज विष्णुदत्त ब्राह्मणाकडे भोजनाकरीत आले होते ,दत्त महाराजांना आग्रहाने जेऊ वाढल्याचे फळ हे मोक्षस्वरूप होते ,यापेक्षा अधिक कोणते फळ असेल ??? आलेल्या अतिथीला आनंदाने केलेले अन्नदान हे आपल्या पापनिष्कृतिकरिता उपयुक्त ठरते . श्री गुरुदेव दत्त !!! --- अभय आचार्य

माझ्या चेहेऱ्यावरचा चिंतीत भाव पाहून आमचे नाना म्हणाले ,अहो आचार्य ,गुरुचरित्र चिंतन करा ,सर्व चिंता दूर होतील . बरं म्ह...
25/10/2025

माझ्या चेहेऱ्यावरचा चिंतीत भाव पाहून आमचे नाना म्हणाले ,अहो आचार्य ,गुरुचरित्र चिंतन करा ,सर्व चिंता दूर होतील . बरं म्हणालो आणि विचार करू लागलो कि , खरंच हे सर्व नियम पाळून जमेल का ? खेरीज ग्रंथ पाहता मोठा वाटला . म्हटलं आणखी काही मार्ग आहे का पाहूया . एक दत्त भक्त म्हणाले ,अहो नसेल जमत तर ब्राह्मणाकरवी करून घ्या . म्हटलं ,हे ठीक आहे . सर्व काही जमून येईल . पण दुसऱ्या दिवशी हे नानांना सांगताच पुन्हा म्हणाले ,का हो ,तुम्ही स्वतः का करत नाही ? बरं म्हणून पुन्हा विचार करू लागलो . आता कसं करावं ? एक दत्त भक्त म्हणाले ,अहो कसली चिंता आहे ते सांगा ,मग मी सांगतो . मी म्हणालो ,आर्थिक घडी विसकटली आहे . यावर ते म्हणाले अहो अठरावा अध्याय वाचन करा .

मी भलताच खुश झालो ,मनात आले कि अरे वाह ! एक अध्यायात आपले काम होणार तर . पण कसे वाचन करावे ? यावर ते म्हणाले रोज वाचन करा . हे सर्व जाणून घेऊन मी दुकानात जाऊन एक छोटीशी प्रत आणली . हि प्रत घरी आणताच आमचे चिरंजीव म्हणाले ,अहो बाबा ,हे चित्र मी यु ट्यूब वर पाहिले आहे . मी म्हणालो अरे वाह ! दाखव पाहू . त्याने एक व्हिडिओ दाखवला ,गुरुचरित्र प्रसंग आणि अठरावा अध्याय यावर तो आधारित होता . म्हणालो कर डाऊन लोड ,मी पाहीन आणि ऐकेन . मोबाईल मध्ये हा अध्याय घेऊन मी तो रोज पाहावा हा निश्चय केला . पण तितक्यात आमच्या ऑफिसमधल्या एका मनुष्याने मला आणखीन एक कल्पना दिली कि अहो ,पाहण्यापेक्षा केवळ ऐकलेत तरी चालेल ,कन्व्हर्ट करून घ्या ऑडिओ मध्ये .

मी मनात म्हणालो अरे वाह ! हे देखील छान आहे . ऑडिओ मिळताच म्हटले ,चला आजपासून सुरु करूया . पण मनात विचार आला ,गुरुवार हा दत्त महाराजांचा वार आहे तेव्हा करणे अधिक प्रशस्त . दोन दिवसांनी काय फरक पडणार आहे . नेमके बुधवारी आमच्या कुटुंबातील एक जण गेल्याने अशौच आले आणि गुरुचरित्र हा विषय तब्बल दोन आठवडे लांबणीवर पडला . काही दिवसांनी नाना पुन्हा भेटले ,काय आचार्य ,गुरुचरित्र चिंतन सुरु आहे ना ? यावर मी झालेले सर्व कथन केलें . नाना म्हणाले ,अहो मी तुम्हाला चिंतन म्हणालो ,ते तुम्ही सहज करू शकता . केवळ वाचन आणि वाचनाबरोबर चिंतन यात जमीन अस्मानाचा फरक आहे .गुरुमहाराजांचे चरित्र वाचन करून झाल्यावर त्याचे मनात रुंजी घालणे ,ते प्रसंग आठवणे ,त्यावर विचार करणे म्हणजेच चिंतन . आपण अनेकदा एखादा अध्याय घेऊन तितकीच कामना करतो ,पण गुरुचरित्र कामधेनु आहे तेव्हा इह बरोबर पर याचाही विचार होऊ द्यात .

त्यांचे हे सांगणे म्हणजे मला हा दत्त महाराजांनीच निरोप पाठवल्यासारखे वाटले आणि मी सप्तशती गुरुचरित्र वाचन सुरु केले . श्रीगुरुदेव दत्त !!!---अभय आचार्य

फुलाचे अंगी सुवास असे । फूल वाळलिया सुवास नासे ॥१॥मृतिकेचे घट केले नानापरी । नाव ठेविलें रांजण माथण घागरी ॥२॥विराली मृत्...
25/10/2025

फुलाचे अंगी सुवास असे । फूल वाळलिया सुवास नासे ॥१॥

मृतिकेचे घट केले नानापरी । नाव ठेविलें रांजण माथण घागरी ॥२॥

विराली मृत्तिका फुटलें घट । प्राणी कां फुकट शोक करी ॥३॥

चोखा म्हणे ऐसें मृगजळ पाहीं । विवेकी तये ठायीं न गुंतेची ॥

अत्यंत बाल वयामध्ये केवळ प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाची आस हृदयाशी बाळगत एक मुलगा घरदार संपत्ती आई-वडील भावंडे यांचा त्या...
25/10/2025

अत्यंत बाल वयामध्ये केवळ प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाची आस हृदयाशी बाळगत एक मुलगा घरदार संपत्ती आई-वडील भावंडे यांचा त्याग करतो काय आणि पुढे त्याच्या हातुन आसेतुहिमाचल पसरलेल्या शतखंडित भारतवर्षाच्या एकत्रीकरणा मध्ये अतुलनीय योगदान घडते काय.... सारेच रामाच्या इच्छेप्रमाणे.... अगम्य ... अतूल्य ..... अमूल्य ....

Address

Pune

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

9503209484

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when दत्त माझा । मी दत्ताचा ।। posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to दत्त माझा । मी दत्ताचा ।।:

Share