दत्त माझा । मी दत्ताचा ।।

  • Home
  • India
  • Pune
  • दत्त माझा । मी दत्ताचा ।।

दत्त माझा । मी दत्ताचा ।। || श्र्वासे श्र्वासे दत्तनाम स्मरात्मन् ||
(638)

 #श्रीदत्तमालामंत्र*हा एक अत्यंत चमत्कारी मंत्र आहे.श्रीदत्तात्रेयोपनिषदातील दत्तमाला मंत्र हा जवळपास सर्व दत्तभक्तांना ...
04/08/2025

#श्रीदत्तमालामंत्र
*हा एक अत्यंत चमत्कारी मंत्र आहे.श्रीदत्तात्रेयोपनिषदातील दत्तमाला मंत्र हा जवळपास सर्व दत्तभक्तांना अतिशय प्रिय व सुपरिचित आहे.* *काही गुढ बीजमंत्र व शब्द यांची अतिशय उत्तम सांगड घालून हा मंत्र बनविलेला असुन, तो स्तोत्रासारखा दिसत असला तरी एक सबंध मंत्र आहे. म्हणजे यातील* *"ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय....पासुन सुरुवात करुन...ॐ नमो महासिध्दाय स्वाहा।" हा एक पूर्ण मंत्र आहे. संपूर्ण दत्तमाला मंत्राची आवर्तने करुन दत्तपादुकांवर अभिषेक करण्याची परंपरा दत्तसंप्रदायात आहे. श्रीदत्तात्रेय हे दैवत वरवर पहाता वैराग्यदर्शक, नि:संग व अलिप्त असले तरी सामान्य संसारी जनांना व्यवहारिक अडिअडचणी, विवंचना, अनारोग्य, तणाव व नकारात्मकता यांचे परिणाम कमी होण्यासाठी *"श्रीदत्तमाला मंत्र"* *अतिशय उपयुक्त व प्रभावी ठरतो....व्यक्तिश: मला स्वत:ला व मी ज्योतिष मार्गदर्शनाच्या माध्यमातून ज्यांना ज्यांना उपासना करण्यासाठी हा मंत्र देतो त्यांना या मंत्राचे खुप फायदे व्यवहारिक पातळीवर व आधिदैविक स्तरावरही झालेले आहेत.*

*"श्रीदत्तमाला मंत्र"* *हा सर्वप्रथम एखाद्या शुभवारी किंवा गुरुवारी, स्नानोपरांत शुचिर्भुतपणे, पूर्वाभिमुख बसुन सलग १०८ पाठ करुन सिध्द करावा लागतो. हा अवधी तुमच्या वाचनाच्या वेगानुसार किमान तासभर ते कमाल दोनेक तास असु शकतो. लक्षात असु द्या की हे संपूर्ण स्तोत्र म्हणजेच एक (१) मंत्र असुन याची १०८ वेळा आवर्तने करावयाची आहेत म्हणजे १०८ वेळा हा मंत्र वाचावयाचा आहे. हे वाचन सुरु असताना मध्येच उठणे, बोलणे, खाणाखूणा करणे, फोन घेणे वगैरे गोष्टी टाळाव्यात. वाचन एकसलग करावे. मध्येच थांबून पाणी वगैरे पिऊ शकता,* *बसण्याअगोदरच आंघोळीपुर्वी लघुशंका वगैरे गोष्टी आटॊपुन बसावे. असे १०८ पाठ पूर्ण झाल्यावर स्तोत्र सिध्द होईल. त्यानंतर मग दररोज किमान एक ते कमाल २१ असे कितीही पाठ वाचायला हरकत नाही.* *आपल्यासमोरील समस्या जर अतिशय अवघड असतील तर रोज किमान २१ पाठ वाचावेच लागतील. श्रीदत्तमाला म्ंत्र हा प्रामुख्याने आर्थिक समस्या, विरोध, अनारोग्य यांच्या निवारणासाठी अत्यंत प्रभावी असा उपचार आहे. समस्या निवारणासाठी व्यवहारिक प्रयत्न आवश्यक आहेतच पण त्याजोडीने हा दैवी उपाय अवश्य करुन पहावा.*

*श्रीदत्तमाला मंत्र सिध्द झाल्यानंतर काही बंधने आयुष्यभर कटाक्षाने पाळावीच लागतात ती अशी की...वर्षभरातील प्रत्येक गुरुवार, प्रत्येक पौर्णिमा (मग वार कोणताही असो),* *दत्तजयंती, गुरुपौर्णिमा, चैत्र व अश्विन नवरात्रातील प्रत्येकी ९ दिवस कोणत्याही स्वरुपात मांसाहार, मद्यपान करणे सदैव वर्ज्य करावेच लागते. जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा गोरगरिबांना, प्राणीपक्ष्यांना तुमच्या आर्थिक क्षमतेनुसार "अन्नदान" करावे. वर्षातून कोणत्याही एका दिवशी (तुमचा किंवा घरातील एखाद्याचा वाढदिवस) गरिबांना वस्त्रदान करावे, एकंदरीत सत्पात्री दाने करत रहावीत. शक्य असेल तर प्रत्येक गुरुवारी दत्तदर्शन किंवा कोणत्याही गुरुंचे दर्शन घेणे आवश्यक आहे.* *.... पुढे दत्तमाला मंत्र देत आहे, तो शुध्द स्वरुपातील आहे. उच्चार नीट करावा, उच्चार कठीण वाटले तर युट्युबवर लिंक शोधुन उच्चार शिकावेत, किंवा तुमच्या गुरुजींना विचारुन घ्यावे....पण श्रीदत्तमाला मंत्र आत्मसात करुन आयुष्यात सकारात्मक बदल अनुभवावा ही विनंती आहे.....*

*॥ श्रीदत्तमाला मन्त्र ॥*

*ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय, स्मरणमात्रसन्तुष्टाय,*
*महाभयनिवारणाय महाज्ञानप्रदाय, चिदानन्दात्मने*
*बालोन्मत्तपिशाचवेषाय, महायोगिने अवधूताय,*
*अनसूयानन्दवर्धनाय* *अत्रिपुत्राय, ॐ भवबन्धविमोचनाय,*
*आं असाध्यसाधनाय, ह्रीं सर्वविभूतिदाय,*
*क्रौं असाध्याकर्षणाय, ऐं वाक्प्रदाय, क्लीं* *जगत्रयवशीकरणाय,*
*सौः सर्वमनःक्षोभणाय, श्रीं महासम्पत्प्रदाय,*
*ग्लौं भूमण्डलाधिपत्यप्रदाय, द्रां चिरंजीविने,*
*वषट्वशीकुरु वशीकुरु, वौषट् आकर्षय आकर्षय,*
*हुं विद्वेषय विद्वेषय, फट् उच्चाटय उच्चाटय,*
*ठः ठः स्तम्भय स्तम्भय, खें खें मारय मारय,*
*नमः सम्पन्नय सम्पन्नय, स्वाहा पोषय पोषय,*
*परमन्त्रपरयन्त्रपरतन्त्राणि छिन्धि छिन्धि,*
*ग्रहान्निवारय निवारय, व्याधीन् विनाशय विनाशय,*
*दुःखं हर हर, दारिद्र्यं विद्रावय विद्रावय,*
*देहं पोषय पोषय, चित्तं तोषय तोषय,*
*सर्वमन्त्रस्वरूपाय,* *सर्वयन्त्रस्वरूपाय,*
*सर्वतन्त्रस्वरूपाय,* *सर्वपल्लवस्वरूपाय,*
*ॐ नमो महासिद्धाय स्वाहा.*
🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹.

देव मोठा की गुरु ??एक शिष्यांने त्यांना प्रश्न केला, स्वामीजी, देव श्रेष्ठ की गुरु श्रेष्ठ ?  ते म्हणाले गुरु श्रेष्ठ !!...
04/08/2025

देव मोठा की गुरु ??

एक शिष्यांने त्यांना प्रश्न केला, स्वामीजी, देव श्रेष्ठ की गुरु श्रेष्ठ ?
ते म्हणाले गुरु श्रेष्ठ !!! कसे म्हणताय ???
असं समजा एका वाळवंटातून एक वाटसरू चाललाय.ऊन आग ओकतय.. प्रचंड तहान लागली आहे. जवळचं पाणी कधीच संपलय !! आता थरथर सुरु झाली शरीरात !!! पाय कधीही कोसळून पडतील अशी स्थिती आहे. आणि अचानक त्याला समोर एक विहीर दिसते !! बाजूला थोडी हिरवळ पण आहे. म्हणजे नक्की तिथे पाणी आहे !! .....
तो बळ एकवटून पाय उचलतो, पण ... दोन पावलांवरच तो कोसळते !!! ताकद संपते पायातली.
पाणी तर समोरच दिसतंय पण पाण्यापर्यंत पोचता येत नाहीये!!! अशावेळी एक व्यक्ती तिथे येते, विहिरीतून पाणी शेंदते, लोटाभर पाणी घेऊन येते आणि त्या व्यक्तीला पाजते !!! त्याचा जीव वाचतो.

आता प्रश्न असा आहे की त्या पांथस्थाचा जीव कोणी वाचवला ? पाण्याने की पाणी पाजणाऱ्या त्या व्यक्तीने
तर उत्तर फार अवघड नाहीये !!! ती व्यक्ती महत्वाची !!
पाणी तर होतेच ना विहीरीत !!
तसेच". परमात्मा आपल्या जवळंच आहे हो, पण आपणच दूर आहे त्याच्यापासून !!!
षड्रीपूंच्या वाळवंटातून चालताना पार थकून जातो आपला जीव !!! अशावेळी मोठ्या प्रेमाने आपल्याला जवळ घेऊन जो मदत करतो. भगवंतापर्यत घेऊन जातो
तो गुरुच श्रेष्ठ !!!

॥सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त॥श्रीदत्तावतार अन्य अवतारांप्रमाणे दुष्टांचा नाश करून विसर्जीत होणारा नाही. लोकोद्धाराकरिता च...
04/08/2025

॥सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त॥

श्रीदत्तावतार अन्य अवतारांप्रमाणे दुष्टांचा नाश करून विसर्जीत होणारा नाही. लोकोद्धाराकरिता चिरंजीव राहिलेला हा अवतार आहे. याशिवाय एक महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे, या देवतेमध्ये ब्रह्मा, विष्णू व महेश या तीन प्रमुख देवता व त्यांच्या परंपरेचे ऐक्य आहे. सृष्टीची उभारणी, जोपासना आणि संहार यासाठी कार्यरत असलेल्या या तीन देवांचे एकरूपत्व म्हणजेच श्रीदत्तात्रेयाचा अवतार असे मानले जाते.
लोकोद्धाराकरिता चिरंजीव राहिलेला हा अवतार आहे. तो अयोनिसंभव आहे असेही सांगितले जाते. दत्तावताराचे एक महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे, या देवतेमध्ये ब्रह्मा, विष्णू व महेश या तीन प्रमुख देवता व त्यांच्या परंपरेचे ऐक्य आहे. सृष्टीची उभारणी, जोपासना आणि संहार यासाठी कार्यरत असलेल्या या तीन देवांचे एकरूपत्व म्हणजेच श्रीदत्तात्रेयाचा अवतार असे मानले जाते. दशावतारातील प्रसिद्ध असे श्रीरामकृष्णादी अवतार क्षत्रियकुलात तर दत्तात्रेयावतार ब्रह्मकुलात जन्म घेता झाला. अवधूतावस्थेत सर्वत्र संचार करून वैराग्याचा पुरस्कार करणाऱ्या श्रीदत्तात्रेयांनी भक्तांना त्यांच्या श्रद्धेनुसार विविध वेषांत आणि रूपांत दर्शन दिल्याचे सांगितले जाते. दत्तावतार हा प्रामुख्याने वर्णाश्रम पद्धतीची पुनस्र्थापना करणारा व मुख्यत: ब्राह्मणधर्माचा पुरस्कार करणारा असला, तरी इतर जातीजमातींना दत्तोपासनेसाठी प्रतिबंध नाही. श्रीदत्तात्रेय तसेच दत्तसंप्रदायाचा नाथ, महानुभाव, वारकरी, रामदासी, सकलमत व देवी आदी उपासनापंथांशीही संपर्क असल्याचे दिसून येते. दत्तप्रभूंच्या उपासनेत योगमार्गाला महत्त्वाचे स्थान असून शाक्त व तांत्रिक यांनीही दत्तात्रेयांना आपले दैवत मानले आहे. दत्त हे दैवत अविनाशी आहे, भक्तांवर अनुग्रह करण्यासाठी संचारी आहे. सर्व भूतमात्रांचा अंतरात्मा म्हणजे विष्णूचा हा ‘दत्तात्रेय’ नामे प्रसिद्ध अवतार आहे. हा अवतार क्षमेने युक्त असून त्याने वेदांना प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, यज्ञसंस्थेचे पुनरुज्जीवन केले, चातुर्वण्र्यातील शिथिलता दूर केली, आणि अधर्म व असत्याचा नाश करून क्षीण होऊ घातलेल्या जनमानसात सामथ्र्य निर्माण केल्याचे मानले जाते.

🌹श्री गुरुदेव दत्त 🌹

दत्तावताराची प्रमुख वैशिष्ट्ये१) साधुंचे संरक्षण, दुर्जनांचे निर्दालन व धर्मसंस्थापनेसाठी सध्दमाचे आचरण हे दत्तावताराचे ...
04/08/2025

दत्तावताराची प्रमुख वैशिष्ट्ये
१) साधुंचे संरक्षण, दुर्जनांचे निर्दालन व धर्मसंस्थापनेसाठी सध्दमाचे आचरण हे दत्तावताराचे प्रमुख वैशिष्ठ होय! इतर अवतारांप्रमाणे हेतू सफल होताच निजधामास जाणारा हा अवतार नसून तो जगाच्या अंतापर्यँत असाच चालू राहणार आहे.
२) ब्रम्हदेवाचा पुत्र अत्रि व त्याच्या कठोर तपश्र्चर्येचे फळ म्हणून दत्ताचा अवतार झाला आणि म्हणूनच तो अयोनीसंभव मानला जातो.
३) या अवतारात ब्रम्हा, विष्णू व महेश या तीन प्रमुख देवांचे व त्यांच्या परंपराचे ऐक्य आहे. सृष्टीची उत्पत्ती, स्थिती व लय यासाठी प्रसिध्द असलेल्या या तीन देवांचे एकरुपत्व म्हणजे हा दत्तप्रभूंचा अवतार होय.
४) दत्तावतार हा ब्राम्हण कुलातील असून सती अनसूयेच्या पातिव्रत्याच्या प्रभावाने या अवतारास महत्व आहे.

श्री दत्तात्रेयांचे भ्रमण
श्री दत्तगुरूंचे भ्रमण
५) राम, कृष्ण इ.अवतार हे गृहस्थाश्रमी होते तर दत्तावतार हा फारच अल्पकाळ गृहस्थाश्रमात राहून नंतर अवधूत अवस्थेतच भ्रमण करणारा आहे.
६) हा अवतार म्हणजे साक्षात परब्रम्हमूर्ती श्रीसद्गुरुंचाच अवतार होय आणि म्हणूनच साधक "श्री गुरुदेव दत्त"असायांच्या नावाचा जयघोष करतात.
७) श्रीदत्त हे केवळ गुरुदेव नसून ते "अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त"या स्वरुपात आहेत।
८) श्री दत्तात्रेयांनी आपल्या भक्तांना विविध वेषात व स्वरुपात म्हणजेच अवधूत, फकीर, मलंग, वाघ इ. दर्शने दिली आहेत.
९) दत्तावतार हा प्रामुख्याने वर्णाश्रम पध्दतीचा पुरस्कार करणारा असला तरी इतर जाती जमातींना त्याच्या उपासनेस कोणताच प्रतिबंध नाही.
१०) दत्त व दत्त संप्रदायाचा नाथ, महानुभाव, वारकरी, रामदासी इ. उपासना पंथांशी घनिष्ट संबंध आहे. उदा. गोरक्षनाथ हे दत्तात्रेयांचे शिष्य, महानुभाव पंथात एकमुखी दत्ताची पुजा होते. समर्थ रामदासांना श्री दत्तात्रेयांचे साक्षात दर्शन झाले होते आणि विशेष म्हणजे स्वत: दत्तात्रेय हे निस्सिम देवीभक्त होते.
११) औदुंबरतळी वस्ती,जवळ धेनु व श्र्वानाचे सान्निध्य हे दत्तावताराचे आणखी एक प्रमुख वैशिष्ट्य.
१२) "त्रिमुखी" किंवा "एकमुखी" दत्तात्रेयांच्या मूर्तीप्रमाणेच "दत्तपादुका"ची ही पूजाअर्चा अनेक दत्तस्थानांवर केली जाते.
१३) "गुरुवार" हा दत्तांचा वार. याच दिवशी घराघरांतून व दत्तस्थानांतून दत्तात्रेयांचे भजन-पूजन भक्तिभावाने केले जाते. मार्गशीर्ष प्रौर्णिमा ही "दत्तजयंती" म्हणून महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते.
१४) श्री दत्तात्रेयांचे १६ प्रमुख अवतार आहेत.
१५) श्रीदत्त उपासनेत योगाला अनन्य साधारण महत्व आहे. शाक्त व तांत्रिकांनीही श्री दत्तात्रेयांना आपले आराध्य दैवत मानले आहे.
१६) श्री दत्तात्रेय हे शरणगत वत्सल व भक्तांवर अनुकंपा व दया करणारे आहेत आणि म्हणूनच नुसत्या स्मरणानेच ते भक्ताची आर्त हाक ऐकून धाऊन येतात.
१७) धर्म व अध्यात्मात व्यापक व उदार दृष्टीकोन हा दत्तावताराचा आणखी एक विशेष एक विशेष आहे.
१८) दत्त संप्रदायाचेचतत्वज्ञान उदात्त, दिव्य, भव्य, निर्मळ व सोलीव अव्दैत स्वरुप आहे.
१९) भूत-प्रेत-पिशाच्चे दत्तात्रेयांच्या वाऱ्यालाही उभी राहात नाहीत.
२०) दत्तात्रेयांच्या व्यापक व उतार दृष्टीमुळे ही उपासना प्रणाली किंवा संप्रदाय कल्पान्तापर्यँत खचितच पथप्रदर्शन करीत राहील.
२१) जोपर्यँत जगामध्ये मानव हा तापत्रयांनी त्रस्त व पीडित असा राहील तोपर्यँत दत्तात्रेय अज्ञानान्धकारात त्यास सदैव मा र्गदर्शन करीतच राहतील.
🌹।।श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री पाद वल्लभ दिगंबरा

४ ऑगस्ट - वासनेला कसे जिंकता येईल ?कितीही विद्वान पंडित जरी झाला तरी त्याला स्वतःला अनुभव आल्यावाचून ज्ञान सार्थकी लागले...
04/08/2025

४ ऑगस्ट - वासनेला कसे जिंकता येईल ?

कितीही विद्वान पंडित जरी झाला तरी त्याला स्वतःला अनुभव आल्यावाचून ज्ञान सार्थकी लागले असे होत नाही.
पोथी ऐकून ज्याला वैराग्य आले त्यालाच पोथी खरी कळली असे म्हणावे. पोथीत सांगितलेले ऐकून ते जो आचरणात आणतो तोच खरा श्रोता होय. वेदांत हा रोजच्या आचरणात आणला पाहिजे, तर त्याचा उपयोग. म्हणूनच सर्व प्रचीतींमध्ये आत्मप्रचीती ही उत्तम होय.

जो भगवंताला शरण गेला त्याच्यापाशी शब्दज्ञान नसले तरी, त्याला मिळवायचे काहीच उरत नाही.
जो शब्दज्ञानाच्या मागे जातो त्याचा अभिमान बळावतो. जो शब्दज्ञानी नसतो त्याला अभिमान नसेलच असे नाही. अज्ञानी माणसालाही अभिमान असतो, परंतु तो घालविणे सोपे असते.
'सद्गुरूला शरण जा' म्हटले, तर अज्ञानी माणूस मुकाट्याने शरण जाईल, त्याला शंका येणार नाही.

काशीला जाणारे पुष्कळ रस्ते आहेत; पण कोणत्याही रस्त्याने जायचे तरी आपले घर सोडल्याशिवाय जाता येत नाही. हे जसे खरे, तसे कोणत्याही साधनात वासना बाळगून, किंवा ती देवापासून निराळी ठेवून भागणार नाही. ती देवाची करायला, तिला मारायला, देवाचे स्मरण पाहिजे.

भगवंताचे होणे हे माझे या जन्मातले मुख्य काम आहे असे समजावे. मी भगवंताचा कसा होईन याचा सारखा रात्रंदिवस विचार करावा.

मी दुसर्या कोणाचा नाही ही खात्री असली म्हणजे भगवंताचे होता येते. आपले मन वासनेच्या अधीन होऊन तात्पुरत्या सुखाच्या मागे गेल्यामुळे थप्पड खाऊन परत येते. लोक समजतात तितके वासनेला जिंकणे कठीण नाही. आपली वासना कुठे गुंतते ते पाहावे.

आपल्या अंगातले रक्त काढून ते तपासून, आपल्याला कोणता रोग झाला आहे हे डॉक्टर पाहातात, त्याचप्रमाणे आपले चित्त कुठे गुंतले आहे हे आपण पाहावे; तो आपला रोग आहे.
जी गोष्ट आपल्या हातात नाही तिच्याविषयी वासना करणे वेडेपणाचे आहे, हे ध्यानात ठेवावे. म्हणूनच विचार आणि नाम यांनी वासनेला खात्रीने जिंकता येईल. मग आपले कर्तेपण आपोआप मरून जाईल.
हिमालयावर ज्या वेळी आकाशातुन बर्फ पडते त्या वेळी ते अगदी भुसभुशीत असते, पण ते पडल्यावर काही काळाने दगडापेक्षाही घट्ट बनते. त्याचप्रमाणे, वासनाही सूक्ष्म आणि लवचिक आहे, पण आपण तिला देहबुद्धीने अगदी घट्ट बनवून टाकतो. मग ती काढणे फार कठीण जाते.
भगवंताची वासना ही वासना होऊच शकत नाही.
ज्याप्रमाणे कणीक अनेकवेळा चाळून गव्हाचे सत्व काढतात, त्याप्रमाणे विषयाची सर्व वासना नाहीशी झाल्यावर जी उरते, ती भगवंताचि वासना होय.

२१७. वासना मारायला भगवंताचे अधिष्ठान हा एकच उपाय होय.

सोळा सोमवार व्रत :- "सोळा सोमवार" हे श्री शंकराचे शीघ्र फलदायी व्रत आहे.हे श्री शंकराचे व्रत,सौख्य-संपत्ती मिळविण्यासाठी...
04/08/2025

सोळा सोमवार व्रत :-

"सोळा सोमवार" हे श्री शंकराचे शीघ्र फलदायी व्रत आहे.

हे श्री शंकराचे व्रत,सौख्य-संपत्ती मिळविण्यासाठी,दु:ख-दारिद्र्य-रोगराई जाण्यासाठी,मनींची कोणती ही सदिच्छा पूर्ण होण्यासाठी करावयाचे असते.नवस बोलून त्याचे फळ प्राप्त झाल्यावर नवस फेडण्यासाठी,किंवा कोणत्या ही इच्छापूर्तीच्या आनंदासाठी हे व्रत करावे.

हे व्रत केल्याने,दरिद्री धनवान होतो.रोगी रोगमुक्‍त होऊन त्याला आरोग्य प्राप्त होते.दु:खी माणसाला सुख प्राप्त होते.मनींची चिंता नाहीशी होते.दूरदेशी असलेल्या आपल्या माणसांची भेट होते.पुत्र-कन्यांचा लाभ होतो.कुमारिकांना मनपसंत पती मिळतो.व्यापार्‍याला व्यापारांत फायदा होतो. नोकरीत प्रमोशन मिळते,श्रद्धापूर्वक हे व्रत करणाराची मनींची इच्छा परीपूर्ण होते.व्रत करणार्‍या स्त्री अगर पुरुषाने व्रताच्या दिवशी,मनाने व शरीराने शुद्ध व स्वच्छ असावे.

व्रताला सुरवात श्रावणातल्या पहिल्या सोमवारी करावी.१६ सोमवार व्रत करून येणार्‍या १७ व्या सोमवारी व्रताचे उद्यापन करावे.किंवा कोणत्या ही महिन्यातल्या कोणत्या ही सोमवारी व्रताचे उद्यापन करावे.

व्रत करणाराने सकाळी स्नान करून सोवळें किंवा धूत वस्त्र नेसून मनोभावे शंकराची पूजा करावी.साष्टांग नमस्कार घालावा.नित्याप्रमाणे आपल्या नोकरी-धंद्यावर जावे.आपल्या उद्योगाला लागावे.दिवसभर उपास करावा. मनांत शंकराचे स्मरण करावे. [ उपास न झेपणारांनी जरूर तर "गहू,गूळ व तूप" मिळुन तयार केलेले पदार्थ उदा.शिरा,खीर वगैरे पदार्थ खावे. ]

संध्याकाळी आंघोळ करावी.मनोभावे शंकराची [ मूर्ती अगर चित्र,तसबिरीची ] पंचमोपचार पूजा करावी.पूजेत बेलाची पाने अवश्य असावी. देवासमोर बसून "सोळा सोमवार कथा." ( कहाणी ) वाचावी.किंवा "सोळा सोमवार माहात्म्य " ही पोथी वाचावी. "शिवस्तुती" म्हणून नंतर आरती करावी.जमलेल्या व घरांतल्या मंडळीस कणिकेच्या चूर्म्याचा प्रसाद वाटावा व आपण स्वत: घ्यावा. [ चूर्मा-गव्हाच्या पिठाच्या जाडसर खरपूस भाकर्‍या भाजाव्या किंवा मुटके करून तुपात तळावे. ] त्या हातानेकुसकरून चाळणीने चाळाव्या.यांत योग्य प्रमाणात गूळ व तूप घालावे.याचे पेढे किंवा लाडू केले तरी हरकत नाही व्रत करणाराने अर्धाशेर कणिकेचा चूर्मा घेऊन उपास सोडावा.चूर्मा करतांना कणिकेत मीठ घालू नये.तसेच उपासास खावयाच्या पदार्थांत ही मीठ असतां कामानये या दिवशी मीठ वर्ज्य आहे.

ओळीने १६ सोमवार व्रत करून येणार्‍या १७ व्या सोमवारी व्रताचे उद्यापन करावे.उद्यापनाचे दिवशी प्रसादासाठी पांच शेर कणिकेचा (गव्हाचे पिठाचा ) चूर्मा तयार करावा.पूजेचे साहित्य तयार करावे. स्वच्छ पाण्याचा तांब्या भरून घ्यावा.या पूजा साहित्यांत "सोळा" वस्तू असाव्या.(अबीर,गुलाल,शेंदूर,हळद, कुंकू,फुले,चंदनाचे गंध,अक्षता,धूप,दीप,कापूर,सुपारी,देठाची खायची पाने,फळ,बेलाची पाने नैवेद्य.) शंकराचे देवळात जाऊन मनोभावे शंकराची षोडशोपचारे पूजा करावी. १०८ किंवा १ हजार ८ बिल्वपत्रे व्हावी.नैवेद्य दाखवुन आरती करावी.मनांतल्या मनांत आपली इच्छा सांगून इच्छा पूर्ण करण्याविषयी प्रार्थना करावी.साष्टांग नमस्कार घालावा.
चूर्म्याचे तीन भाग करून एक भाग देवाला द्यावा,दुसरा भाग देऊळी ब्राह्मणांना वाटावा किंवा गाईला चारावा,तिसरा भाग घरी आणून कुटंबातल्या सर्व मंडळींनी व स्वत: प्रसाद घ्यावा.

शंकराचे देऊळ जवळपास नसल्यास किंवा देवळात जाणे शक्य नसल्यास घरीच ब्राह्मणास बोलावून श्री शंकराची षोडशोपचार पूजा करावी.देवळात करावयाच्या म्हणून सांगितलेल्या सर्व गोष्टी कराव्या.ब्राह्मणही न मिळाल्यास पोथीवरून पूजा वगैरे सर्व गोष्टी स्वत:च कराव्या.

उद्यापनाच्या दिवशी देवळांत पूजा करून घरी आल्यावर किंवा घरीच उद्यापनाची पूजा केल्यावर मागील १६ सोमवारांप्रमाणे "सोळा सोमवार कथा" व "सोळा सोमवार माहात्म्य" वाचावे. "शिवस्तुती" म्हणून आरती करावी.चूर्म्याचा प्रसाद सर्वांना वाटावा,आपणा घ्यावा.कुटुंबातल्या सर्वांनी,व्रत करणारासह पंचपक्वान्नाचे भोजन करावे.

मनोभावें हे व्रत करणाराची इच्छा श्री शंकर पूर्ण करतात.
🙏🙏🙏🙏

 ्रावणी_सोमवार*रुद्र ही एक वैदिक देवता आहे.*रुद्राचा अविष्कार हा ऋग्वेदापासून आहे,ऋग्वेदात रुद्राचे एकूण ७५ उल्लेख आहे ह...
03/08/2025

्रावणी_सोमवार
*रुद्र ही एक वैदिक देवता आहे.*
रुद्राचा अविष्कार हा ऋग्वेदापासून आहे,ऋग्वेदात रुद्राचे एकूण ७५ उल्लेख आहे ही देवता शंकरात नंतर विकसित झाली. रुद्र हा शब्द रोदीती अथवा रोदयति अर्थातच रडविणारा या शब्दावरून आला आहे.या देवतेचे वेद्पश्चात शंकर ,शिव यांच्याशी एकीकरण झाले आहे ते फार नंतरचे.
*रुद्राचे मूलस्वरूप हे फार भीषण ,हिंसक असे आहे, त्यामुळे भक्त त्याला सतत विनंती करतो की माझ्यावर दया कर ,मला मारू नकोस,प्रसन्न होऊन मला हव्या त्या वस्तू दे.*
*रुद्राचे दुसरे स्वरूप भद्र म्हणजे कल्याण करणारा असेही आहे*

म्हणून रुद्रसूक्त हे त्या भद्र रुपाला प्रसन्न करण्यासाठी आहे. रुद्र हा अग्नी स्वरुप आहे तसेच जल स्वरुप आहे. तो पंच महाभुतांचा अधिपति आहे. रुद्र हा नागर संस्कृतिच्या आधीपासून सनातन धर्मात अस्तित्वात आहे.

रुद्रसूक्त हा यजुर्वेदाच्या तैतेरीय संहितेचा भाग आहे.आपल्या समाजात रुद्र सूक्ताच्या पठाणाची एकादशणी आणि लघुरुद्र ही दोन रूपे जास्त प्रचलित आहेत.याचीच विस्तरीत आवृत्ती म्हणजे महारुद्र आणि अतिरुद्र होत.एकादशणी मध्ये रुद्र्सुक्ताच्या ११ आवृत्या करायची पद्धत आहे आणि पुढील रुपात आवर्तनाची संख्या ११ च्या पटीत वाढत जाते. लघुरुद्र करताना १२१ आवर्तने होणे आवश्यक असते म्हणून ११ पुरोहित असतात. ११ पुरोहित ११ वेळा पाठ करतात . रुद्र्सुक्तात रुद्राची १०० नावे आहेत म्हणून या सुक्ताला शतरुद्रीय असेही म्हणतात.
श्रावणी सोमवार , महाशिवरात्री इत्यादि पवित्र दिवशी लघुरूद्र करण्याची प्रथा आहे. त्याचप्रमाणे काही लोक रोजच्या पूजेत अभिषेकच्या वेळी रुद्र म्हणतात

*रुद्र्सुक्ताचे दोन भाग आहेत :*
१] अकरा नमके ज्यात रुद्राच्या नावामागे वंदन असो याअर्थी " नमः"असे पद येते.नमकात आधी देवतेची स्तुती केली जाते आणि त्या स्तुतीने ते अकरा रुद्र प्रसन्न झाले की मग उत्तरार्ध येतो.

२] अकरा चमके म्हणजे ज्यात "च मे " हे शब्द आहेत ज्याचा अर्थ हे मला हवे अथवा मला हे दे.चमकामध्ये स्तोत्रपठण करणारा किंवा करविणारा मग त्या रुद्रांकडे आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी मागतो.
चमक आणि नमक ही नावे पुराणकाळात रूढ झाली,त्याचा व्याकरणाशी संबंध नाही.

याशिवाय रुद्रसुक्ताचा भाग नसलेला "ओम शान्तिः शान्तिः शान्तिः " हा शांतीमंत्र सुरुवातीला आणि शेवटी म्हणतात. घरात सर्वसाधारणपणे होम करतात आणि होमाला या सूत्राच्या आवर्तनाची जोड दिली जाते. ११ रुद्र असल्याने ११ या संख्येला महत्व आहे असे दिसते .सर्वसाधारणपणे लघुरुद्राला ११ ब्राह्मण असतात
एक ब्राह्मण एक नामक मोठ्याने म्हणतो आणि बाकीचे मनात म्हणतात ,अश्या रीतीने नमकाची ११ आवर्तने झाली असे मानतात . ११ वेळा नमके झाली की एकदा चमकाचा पाठ केलाजातो. आपल्याकडे एक फार चुकीची समजूत आहे की श्लोकाचा अर्थ समजावून घेऊन पठण केले तर फळ कमी मिळते त्यामुळे बरेच याज्ञिकी करणारे अर्थ न समजता नुसताच मौखिक पाठ करतात.

यजुर्वेदकाळातही चोर,डाकू ,दरोडेखोर होते आणि त्यांचे नियंत्रण /त्यांच्यापासून संरक्षण करणे हे काम रुद्राला दिले आहे, फसविणाऱ्या,लबाड लोकांचे ,तलवारी घेऊन हत्या करणाऱ्या चोराचे ,वाटमाऱ्याचे इत्यादीचे पालकत्व रुद्राला दिले आहे. [नमक ३]

तसेच मर्दानी ,घाव घालणाऱ्या स्त्रियांचे,विषयलंपट ,टोळ्या आणि त्यांचे पुढारी , भूत आणि इतर गणांचा अधिपती ज्याचे अक्राळ विक्राळ आणि नानारुपधारी असे अनुयायी आहेत,कुंभार,लोहार,पारधी ,कोळी,शिकारी इ.चा नायक अशीही स्तुती आहे. [नमक ४ ]

सृष्टीवर पूर्ण प्रभुत्व असणारा,वाळवांटात ,बर्फात,धुळीत,खडकात ,जमिनीवर आणि हिरवळीवर असणारा अशी पण स्तुती आहे [नमक ९ ]

त्याचे फार मोठे सैन्य आहे ,आणि आळवणी जी केली जात आहे ती अश्या या सामर्थ्यवान देवाने आपल्याला त्रास देणार्‍या शक्तींपासून आपले रक्षण करावे , कृपा करावी म्हणून हे सुक्त आहे.

आता भक्त ज्या वस्तू त्या काळास अनुसरून मागतो आहे ती यादी बरीच लंबीचौडी आहे आणि एकदा नजरेखालून घालण्यासारखी आहे.त्यात तांदूळ,सातू,मका ,उडीद ,तील,मूग,हरभरे इ.इ. धान्य मागितली जात आहेत.सोने ,लोखंड ,शिसे,बीड,जस्त, कथील हे धातू मागितले जात आहेत .यावरून आपल्या पूर्वजांना हे धातू वेदकाळात माहिती होते हे सिद्ध होते .पूजेचे सामान,यज्ञाचे सामान मागतो आहे. सुक्तपठनकर्ता दूध ,तूप ,मध इ.मागतो आहे.दीर्घायुष्य ,औषधे,सुंदर कांती,धनसंपदा,शेती हे पण मागतो आहे. तसेच आयुष्य ,प्राण,अपान,चक्षु ,कान,मन वाणी,आत्मा इत्यादींची पुष्टी मागतो आहे.

तसेच विषम संख्याची भाजणी ,चारच्या पाढ्याची भाजणी हे मांडून याच्या पटीत सौख्य मागतो आहे. त्यावरून त्याकाळचे गणिताचे ज्ञान दिसते.

रुद्र्सुक्तात मागितलेल्या सर्व गोष्टी या ऐहिक जीवनात उपयोगी पडणाऱ्या आहेत,पारमार्थिक नाही.सुक्तकार हा धनधान्य ,घरदार,बायकामुले,गुरेढोरे ,शेती इ. सगळ्या गोष्टी मागतो आहे ,द्युतासारखी क्रीडाही मागतो आहे.सुक्तकाराच्या पारलौकिक मागण्या या स्वर्गापर्यंत सीमित आहेत.रुद्राचे भयंकर सामर्थ्य आणि सैन्य हे आपल्या शत्रूवर वापरले जावे ही इच्छा तो व्यक्त करत आहे.

हा एक रुद्राचा साधासुधा भक्त आहे ज्याला जनावरे , रान, शत्रू ,चोर,दरोडेखोर आणि रुद्रासारखे भीषण दैवत यांची भीती आहे. हे सुक्त हे रुद्राशी बोलणे आहे ,ज्यात सुक्तकार आधी स्तुती ,आळवणी करून मग आपल्याला काय पाहिजे त्याची यादी देत आहे.हा रुद्र्सुक्तातला लपवालपवी न करणारा साधेपणा फार लोभस आहे. रुद्रसुक्ताचे पठण हा एक अनुभव आहे जेंव्हा उपस्थित ब्रह्मवृंद जर तयारीचा असेल आणि त्यांनी सूर बरोबर लावला असेल तर घनगंभीर आवाजात हे सूत्र जरी बव्हंशी गद्य असले तरी कोसळत येते. त्यात होम ,सोवळे आणि इतर वातवरण निर्मिती जर व्यवस्थित असली तर त्यानंतर कुठेतरी दैवी अनुभव येतो .

या सूक्ताचे पठन करण्याच्या विशिष्ट पद्धती आहेत, त्यामध्ये एकादशीनी , लघुरूद्र ,महारुद्र ,अतिरुद्र इत्यादि प्रयोग आहेत . श्रावणी सोमवार , महाशिवरात्री इत्यादि पवित्र दिवशी लघुरूद्र करण्याची प्रथा आहे. त्याचप्रमाणे काही लोक रोजच्या पूजेत अभिषेकच्या वेळी रुद्र म्हणतात

निवृत्तीचे वेध लागले आणि मनात मी रोज आखणी करू लागलो . अनेक गोष्टी मनात होत्या . खेरीज अनेक ग्रंथ केवळ घेऊन ठेवले होते ,त...
03/08/2025

निवृत्तीचे वेध लागले आणि मनात मी रोज आखणी करू लागलो . अनेक गोष्टी मनात होत्या . खेरीज अनेक ग्रंथ केवळ घेऊन ठेवले होते ,त्याचे वाचन करायचे होते . एक दिवस नृसिंहवाडीला जाणे झाले तेव्हा निवृत्तीचा मनोदय नानांना सांगितला . म्हणाले ,अहो आचार्य रोज काही ना काही सेवा घडू द्यात . नामस्मरण होऊ द्यात . प्रत्यक्षात निवृत्तीचा तो दिवस आला आणि मनात म्हणालो ,मस्त वाटतंय ,आजपासून त्या धकाधकीच्या आयुष्याला रामराम !!

उद्यापासून काही सुरु करू असे म्हणून आराम करण्यात तो दिवस गेला ,परत दुसरा दिवस देखील तसाच गेला . हे उद्याचे संकल्प कधी थांबणार असे मनात येई पण आता उद्यापासून हे फायनल असे नेहेमी मी म्हणत असे . थोडक्यात उद्यापासून हा संकल्प कायम होता . एक दिवस काहीतरी होऊ द्यात या नानांच्या सांगण्यावरून दत्त माहात्म्य हाती घेतले आणि पहिल्या पानावर पहिली जांभई आली . डोळे जड झाले . चित्रपट पाहताना थोड्या वेळापूर्वी झोप येत नव्हती ती नेमकी आताच का यावी ? म्हटलं असू द्यात ,आपण जप करू . माळ हाती घेऊन थोडा वेळ झाला आणि हातून माळ गळून पडून मी केव्हा डोळे मिटले कळले देखील नाही . जाग येताच मनात म्हणालो ,अस का होतंय ?

मग मात्र चंग बांधला आणि कथारूपी काही वाचन सुरु केले . अनेकांना महाराजांच्या लीलांवर प्रश्न विचारीत त्यांना बोलावयास उद्युक्त करत असे आणि श्रवण भक्ती घडे . नामस्मरण मात्र नित्य होत नव्हते . यावर नाना उपाय योजू लागलो . एकदा नामस्मरण या विचारात असताना दारावरची बेल वाजली आणि सहज मनात आले ,कि या बेलचा आवाज हा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असता तर काय छान झाले असते . या विचाराने प्रेरित होत मी हा मनोदय आमच्या काही दत्त भक्त मित्रांना सांगितला . त्यांच्यापैकी धनंजयराव हे काम करत आहेत . लवकरच अशी बेल तयार होत असून एकदा बटन दाबले असता तीनदा दिगंबराचे नामस्मरण होईल अशी व्यवस्था आहे . आजच धनंजयराव हि माहिती देत होते . अगदी आतुरतेने या बेलची वाट पाहत आहे .

अतिथी येताच त्याच्या येण्याने होणारे स्मरण मात्र प्रेरणादायी असेल यात शंका नाही . श्रीगुरुदेव दत्त !!!---अभय आचार्य

परब्रम्ह म्हणजे काय गं आई???५/६ वर्षाची असताना आईला विचारलं होतं ..क्षणभर ती चमकली होती या अनपेक्षित प्रश्नानं ..पण नेहे...
03/08/2025

परब्रम्ह म्हणजे काय गं आई???
५/६ वर्षाची असताना आईला विचारलं होतं ..
क्षणभर ती चमकली होती या अनपेक्षित प्रश्नानं ..पण नेहेमीप्रमाणे जरी माझ्या आकलनापलीकडे असले तरी मला समजणाऱ्या भाषेत तिने समजावले होते..
म्हणाली डोळे मीट आणि मला देव दिसतोय असा विचार कर. काही दिसले??
नाही गं आई ...काहीच नाही.....
मग आता दत्तगुरु दिसताहेत असा विचार कर....
ब्रम्हा विष्णू महेशाची सगुण साकार देवघरातली दत्तगुरुंची मूर्ती आली मनःचक्षूपुढे ..अगदी त्यांच्या चार श्वान आणि गाईसकट...
मग म्हणाली आता श्रीकृष्ण आहे समज..काही दिसतय??

अधरावर बासरी घेतलेला , शिरी मोरपीस धारण केलेला सुंदर शामल कृष्ण दिसला ..रांगणारा बाळकृष्ण दिसला नि अर्जुनाला गीता सांगणारा त्याच्या रथाचा सारथी श्रीकृष्ण दिसला..

रोज अठरा अध्याय मुखोद्गत म्हणणाऱ्या
आजोबांनी भगवद्गीतेवरच्या श्रीकृष्णाची ओळख फार लवकर करुन दिल्याने ते रुप फार जवळचं नि ओळखीचं होतं.

मग म्हणाली ,आता पुन्हा प्रयत्न कर परब्रम्ह पहाण्याचा...अन् काय आश्चर्य ...
कधी दत्तगुरु कधी कृष्ण येत राहिले डोळ्यापुढे...
आतून खोलवर काही गवसल्याचा आनंद...
म्हटल आई परब्रम्ह म्हणजे देव का गं?
म्हणाली , परब्रम्ह म्हणजे श्रद्धास्थान...ते कोणत्या रुपात आपण पहातो तसे दिसते.मूर्तीकडून अमूर्ताकडचा प्रवास ...
मोठी झालीस की कळेल हळूहळू सारं ...पण त्याच्या शोधात रहा...

८/९ वर्षांच्या अर्धवट वयात स्वामी स्वरूपानंदांच्या प्राणशिष्याने ,वासुदेवानंद सरस्वतींनी लावलेली समाधी पाहिली होती .कुंडलिनी जागृत करतात म्हणे..दोन भुवयांच्या मधोमध पडलेला खड्डा दिसला होता मला.अत्यंत तेजःपुंज अशी त्याची छबी आजही स्पष्ट आठवतेय. दोन तास पूर्ण समाधिस्त अवस्था ...मग बाहेर येताना कोणी मालकंस गा रे म्हटल्यावर मालकंस शोधण्यासाठी झालेली यजमानांची धावपळ ...एक वेगळीच अनुभूती ...
काय जाणवले ते सांगता येत नाही .पण फार छान वाटले होते.शांत वाटले होते.आजही त्याचे स्पष्टीकरण देता येणार नाही पण त्या क्षणी गवसलं होतं ते परब्रम्ह होतं का?

९वीत असताना स्वामी पुरुषोत्तमानंद सरस्वतींच्या तोंडून गीतेच्या १५ व्या अध्यायाचे निरुपण ऐकले होते तेव्हाही असंच शांत आणि काही गवसल्याचं समाधान होतं ...ते परब्रम्ह होतं का??,
माझ्या उदरातून जन्म घेतलेल्या पिल्लांनी पहिल्यांदा आई म्हणून संबोधलं तेव्हा उचंबळून आलेल्या मनाला परब्रम्ह भेटलं होतं का???

वडीलांनी मृत्यूचे भय नं बाळगता अत्यंत समाधानाने अखेरचा श्वास घेतला तेव्हा त्यांना परब्रम्ह भेटलं होतं का?

मृत्यूच्या दाढेतून ओढून काढलेला एखादा पेशंट आपल्या पायांनी घरी चालत जातो तेव्हा मिळालेला आनंद म्हणजे परब्रम्ह भेटीचा आनंद का?

आज काहीसं वाटतय ..
अत्युच्च आनंदाची परिसीमा गाठणारी , परमेश्वराच्या जवळ नेणारी ,अद्भूत शांती देणारी मनाची अवस्था म्हणजेच परब्रम्ह असावं ...
त्याच्या शोधात जंगलात जाऊन अथवा हिमालयाच्या टोकावर समाधी लावून बसल्यावरच ते सापडेल असे नाही....
दैनंदिन जीवनातही परब्रम्ह भेटण्याचे अनंत प्रसंग येतात ..
फक्त ते शोधण्याचं कसब अंगी बाणवलं की परब्रम्हाशी भेट फार दूर रहाणार नाही ....

डॉ संगीता गोडबोले

मित्रत्वाच्या अनेक व्याख्या आहेत ,जीवाला जीव देणारा ,संकटात धावून येणारा ,कायम स्मरणात राहणारा ,पडत्या काळी नित्य साथ दे...
03/08/2025

मित्रत्वाच्या अनेक व्याख्या आहेत ,जीवाला जीव देणारा ,संकटात धावून येणारा ,कायम स्मरणात राहणारा ,पडत्या काळी नित्य साथ देणारा . असे जरी असले तरी नेहेमी मित्रांचा येणारा अनुभव हा नित्य असाच असतो असे नाही . एखाद्या वेळी एखादा मित्र संकटात धावून आला म्हणजे तो नित्य तसाच धावून येईल असेहि नाही .

दत्त माहात्म्यात सख्य भक्तीचे वर्णन करताना थोरले महाराज म्हणत आहेत ,सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्ट ll अहो दत्त महाराजांची मैत्री किंवा सख्यत्व कसे आहे ? तर कायम हृदयात स्थान असलेला असा तो --- परमात्मा ,नित्य संकट काळी धावणारा ,स्मरण करताच नित्य हजर असणारा असा आहे .

मनुष्य लोकातील मैत्री हि मृत्यूपर्यंतच असली तरी दत्त महाराजांचे सख्य हे अनेक देहात आपला जन्म झाला तरी देखील कायम असते . आपल्या मित्राना तो कोणत्याही जन्मात विसरत नाही .कल्पाचे कल्प अर्थात अनेक युगे जावोत ,अनेक जन्म प्राप्त होवोत तरीही दत्त महाराज हे आपली नित्य काळजी घेत असतात . मैत्रीला जागणारे असे ते आहेत .

मनुष्य लोकातील मैत्री हि सहसा आपल्या वर्गाला साजेशी असते . वर्गातील याचा अर्थ धनिक /निर्धन ,विद्यासंपन्न / अक्षरशत्रू इतपत नसून अन्य अनेक पातळीवर तो आहे . उदा . रोगी /निरोगी . असाध्य रोग झालेला असताना निरोगी असा मित्र परिवार हा कितपत साथ देतो ?

दत्त महाराजांच्या मैत्रीची कथा अशी कि त्यांच्या या सख्य भक्तीत निष्णात वैद्याचे काम दत्त महाराज करतात .रोग हा कापरासारखा जळून जातो . उपचार करणारा मित्र कुठे मिळेल ?? कोणत्याही वर्गातील मैत्रीला स्वीकारणारे ,आपला मानणारे दत्त महाराज जगाचे राजे असताना आपली मैत्री कबुल करतात, स्वीकारतात यातच सर्व काही आले .

सध्या प्रचलित मित्र दिन पाळताना हातात चित्रविचित्र पट्टे बांधण्यापेक्षा दत्त नामाची माळ गळ्यात अवश्य घाला . सर्वच बाबतीत ते उपकारक आहे . श्री गुरुदेव दत्त !!!---अभय आचार्य

आज मित्र दिन किंवा मैत्री दिन . पाश्चिमात्य किंवा आंग्ल पद्धतीत रोज काही ना काही नाव देऊन दिवसाचे वैशिष्ठ्य साजरे करण्या...
03/08/2025

आज मित्र दिन किंवा मैत्री दिन . पाश्चिमात्य किंवा आंग्ल पद्धतीत रोज काही ना काही नाव देऊन दिवसाचे वैशिष्ठ्य साजरे करण्याची प्रथा आहे . या दिन वैशिष्ठ्याला काही इतिहास असेलच असे नाही . परंपरा असेल असेही नाही . मनुष्याची उत्सव प्रियता यातून डोकावते एव्हढच. काही ना काही निमित्ताने सर्व समाजाशी रोज संवाद साधला जावा हि इच्छा देखील यामागे आहे . काही काही वेळा समाज प्रबोधनाचा हेतू देखील त्यात असतो .

दत्त सांप्रदायाचा आवाका किंवा विस्तार इतका मोठा आहे कि रोज दत्त महाराजांशी निगडित दिनवैशिष्ठ्य अवश्य असते .आपण याबाबतीत विचार करीत नाही इतकच . खरतर हि दिनविशेष परंपरा आपण देखील दत्त संप्रदायाशी निगडित चालवू शकतो ,यामुळे अनेक गोष्टी साध्य होतील . एक तर अनेक थोर दत्त भक्तांची ओळख मिळेल .त्यांची गुरुपरंपरा आणि शिष्य परिवाराची माहिती मिळेल .त्यांच्या जीवनकाळात घडलेल्या काही लीला समजतील ,त्यावेळचा इतिहास समजून येईल .

दत्त महाराजांचे सोळा अवतार किंवा सोळा दर्शने (त्यांच्या तिथी ) आजही सर्वाना तिथीनुसार ज्ञात नाहीत .दत्त माहात्म्य किंवा गुरुचरित्र ,दत्त प्रबोध आदी ग्रंथांचे वाचन होत असले तरी त्यातील प्रसंग विशेष हे तिथीने लक्षात राहत नाहीत . एखाद्याला एखादे थोर भक्त ठाऊक असतील किंवा ती व्यक्ती त्यांच्या गुरु शिष्य परंपरेशी निगडित असेल तर त्यांनी या थोर दत्त भक्तांचा जन्म दिन किंवा लीला कथन केल्यास याचे ज्ञान आम्हा सर्वाना मिळू शकेल .

दत्त महाराज हे सख्य भक्तीने आमच्याबरोबर आहेतच यात संशय नाही .नवविधेच्या प्रत्येक पूजन रूपाचा स्वीकार करीत ते आमच्या सन्निध आहेत .मात्र दिनविशेषाने त्यांचे स्मरण आणखी प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही . दत्त महाराजांना आपल्या भक्तांचे उत्सव देखील आपल्या पूजनाइतकेच प्रिय असतात तेव्हा ह्या दिनविशेष प्रसंगाने त्यांना निश्चितच आनंद होईल . विचार करा आणि अवश्य ह्या दिनविशेष प्रकाराचा दत्त संप्रदायात प्रसार करा . बऱ्याचदा दत्त भक्त माहीत असले तरी या विषयावर काय लिहावे हे सुचत नाही तेव्हा अशा प्रसंगी केवळ दोन ओळी जरी या प्रसार माध्यमात लिहिल्या तरी अनेक दत्त भक्त या विषयावर लिहिण्यास पुढे येतील यात संशय नाही . श्री गुरुदेव दत्त !!!--- अभय आचार्य

Address

Pune

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

9503209484

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when दत्त माझा । मी दत्ताचा ।। posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to दत्त माझा । मी दत्ताचा ।।:

Share