08/01/2025
खाली पुस्तकांचा सारांश व पुस्तक बाय लिंक व बुकिंग नंबर आहे
ऑर्डर साठी कॉल किवा whatsapp करा या नंबर वर
+919284793579
Whatsapp Link
https://wa.me/message/WKLO4FY2WFGGI1
Amazon:
https://amzn.in/d/2yE150R
श्रीमद्भगबतगीतेचा आधार भारतीय मनाला केवढा आहे, हे का सांगायला हबे? भगवद्गीतेतील जीवनदर्शनातून-अनुभवातून माणसे जाणती आणि जागे होण्याच्या बिंदूवर येतात. मग मूलगामी परिवर्तनाच्या दिशेने आपण वाटचाल करायला लागतो. आपली वाट उजळून आपल्या जाणिवा विस्तारतात, पूर्णपणे बदलतात. श्रीमद्भगवद्गीतेतील शिकवण परिपू्ण असून, ती हिंद हृदयालाच नव्हे, तर मानवी अस्तित्त्वालाच व्यापून उरते.
विशेषतः दुसनया अध्यायाच्या आस्वाद-अनुभवातून करुणा, चेतना आणि तेज यांचा एक पवित्र अनुभव आपल्याला मिळत जातो. दुसऱ्या अध्यायातील जीवनवैभवाचे समग्र रूप, जीवनार्थ तसेच त्यातील (मोजक्याच) श्लोकांचे आस्वादन शब्दात पकडण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे. भगवद्गीतेतील दुसरा अध्याय हा अवर्णनीय, अस्फुट आणि विशुध्द, दैनंदिन मानवी (चरितार्थाच्या) जीवनगतीत वाट्याला येणाऱ्या नैराश्य-घालमेल- तडफड यांच्या पार पलीकडे आपल्याला घेऊन जातो. दुसन्या अध्यायात एक खुलेपणा आहे, पारंदर्शकता आहे. तसेच जीवनाच्या सातत्याचे म्हणजे आत्म्याच्या अमरत्त्वाचे, कर्मयोगाचे तसेच कर्मकौशल्याचे दिग्दर्शन आहे. स्थिरबुध्दी-स्थितप्रज्ञ माणसाची श्रीकृष्णाने कथन केलेली लक्षणे अवर्णनीय व अफलातून आहेत. इतकेच नाही तर, ही दिव्यत्वाची अनुभूती आपल्याला एका निवृत्तिशील विरागी मनाकडे घेऊन जाते.
माणसाच्या जाणिवेत मूलभूत परिवर्तन जोवर होत नाही, तोवर मानसिक ताणतणाव, संधर्ष आणि दुःख यांचे सावट मानवी जीवनावरन दूर होणार नाही. अपुन्या इच्छा-कामनेतून क्रोधाकडे, क्रोधाकडून मूढता-अविचाराकडे तसेच मूढतेकडून बुध्दीच्या म्हणजे ज्ञानशक्तीच्या नाशाकडे पर्यायाने अधःपतनाकडे आपण जाऊ लागतो. म्हणूनच इच्छा संयमित करुन-कामना तसेच आसक्ती, ममत्त्त आणि अहंकार यांचा जर आपण मोठ्या सजगतेने त्यांग केला, तरच अनंतमयी शंततेच्या जीवनदृष्टीचा आपल्याला लाभ होऊ शकेल, असा भगवान श्रीकृष्णाचा सांगावा आहे.