Akshay Khandve

Akshay Khandve आपले स्वागत आहे नवीन अपडेट साठी आपल्या पेजला फॉलो करा...

"महाराष्ट्रातील 40 आमदारांनी किमान प्रत्येकी 10 हजार झाडे लावावीत, अशी माझी अपेक्षा आहे. लोकप्रतिनिधींनी जर पर्यावरण संव...
29/05/2026

"महाराष्ट्रातील 40 आमदारांनी किमान प्रत्येकी 10 हजार झाडे लावावीत, अशी माझी अपेक्षा आहे. लोकप्रतिनिधींनी जर पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वतःहून स्वीकारली, तर समाजालाही त्यातून प्रेरणा मिळेल. आज वाढते प्रदूषण, तापमानवाढ आणि निसर्गाचा होत असलेला ऱ्हास ही चिंतेची बाब आहे. अशा वेळी वृक्षलागवड ही केवळ मोहीम नसून भविष्यातील पिढ्यांसाठीची एक महत्त्वाची गुंतवणूक आहे.
40 आमदारांनी प्रत्येकी 10 हजार झाडे लावली तर राज्यात तब्बल 4 लाख झाडांची भर पडेल. मात्र, फक्त झाडे लावणे पुरेसे नाही, तर त्यांचे संगोपन आणि संवर्धनही तितकेच महत्त्वाचे आहे. प्रत्येक लोकप्रतिनिधीने आपल्या मतदारसंघात वृक्षलागवडीची लोकचळवळ उभी केली, तर महाराष्ट्र अधिक हिरवागार आणि पर्यावरणपूरक होऊ शकतो. निसर्गाचे रक्षण करणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे."
— Sayaji Shinde 🌳💚
#वृक्षलागवड #हरितमहाराष्ट्र #पर्यावरणसंवर्धन

🏏 १५ व्या वर्षी कोट्यधीश! 😱 कोण आहे हा षटकारांचा बादशाह वैभव सूर्यवंशी? आणि किती आहे याची श्रीमंती? 👇अवघ्या १५ व्या वर्ष...
28/05/2026

🏏 १५ व्या वर्षी कोट्यधीश! 😱 कोण आहे हा षटकारांचा बादशाह वैभव सूर्यवंशी? आणि किती आहे याची श्रीमंती? 👇
अवघ्या १५ व्या वर्षी जिथे मुलं १० वीच्या परीक्षेचा विचार करत असतात, तिथे बिहारच्या एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलाने मैदानावर षटकारांचा पाऊस पाडत करोडोंची कमाई केलीये! आपण बोलतोय भारतीय क्रिकेटचा नवा 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशी बद्दल! 🌟
आयपीएल २०२६ मधील राजस्थान रॉयल्सकडून खेळताना अवघ्या २९ बॉलमध्ये ९७ धावा कुटून खळबळ माजवणाऱ्या वैभवची एकूण संपत्ती ऐकून तुमचेही डोळे पांढरे होतील!
💰 वैभव सूर्यवंशीची कमाई आणि संपत्ती (Net Worth):
सध्या वैभवची एकूण संपत्ती अंदाजे ३ कोटी ते १० कोटी रुपयांच्या घरात आहे. वयाच्या १५ व्या वर्षी भारताचा सर्वात तरुण कोट्यधीश क्रिकेटपटू बनण्याचा मान त्याने मिळवला आहे.
🚀 कमाईचे मुख्य स्त्रोत आणि मालमत्ता:

* आयपीएल सॅलरी: आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये राजस्थान रॉयल्सने वैभवला तब्बल १.१ कोटी रुपयांना खरेदी केले!
* ब्रँड एन्डोर्समेंट: त्याची तुफान लोकप्रियता पाहून अनेक मोठ्या ब्रँड्सनी त्याला साईन केले आहे, नुकतीच त्याने 'Complan' ब्रँडसोबत मोठी डील केलीये.
* मुंबईत हक्काचं घर: अवघ्या १५ व्या वर्षी वैभवने मुंबईत स्वतःचं आलिशान घर घेतलं असून त्याची किंमत सुमारे २.५ ते ३ कोटी रुपये आहे!
* कार कलेक्शन: आयपीएलमधील धमाकेदार कामगिरीसाठी त्याला Tata Curvv EV कार मिळाली, तसेच मर्सिडीज कार मिळाल्याचीही चर्चा आहे.
* सरकारी बक्षीस: बिहार सरकारने त्याच्या कामगिरीचे कौतुक करत त्याला ५० लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले आहे.

एका छोट्या गावातून येऊन स्वबळावर कोट्यवधी लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या १५ वर्षांच्या मराठी-भारतीय वाघासाठी एक लाईक तर बनतोच! 🚩🔥
👇 तुम्हाला काय वाटतं, वैभव सूर्यवंशी भविष्यात टीम इंडियाचा पुढचा 'सूर्या' (सूर्यकुमार यादव) बनणार का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही माहिती मित्रांना शेअर करा! 👇

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच राज्यभर भेसळखोरांविरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे.📍 पुणे – रसायनांनी पिकवले...
28/05/2026

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच राज्यभर भेसळखोरांविरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे.
📍 पुणे – रसायनांनी पिकवलेले ८०० किलो आंबे जप्त
📍 छत्रपती संभाजीनगर – निकृष्ट दर्जाचे तूप जप्त
📍 धाराशिव – २१५ किलो निकृष्ट खवा जप्त
“जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही माफी नाही!” — तुकाराम मुंढे
भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधातील ही मोहीम जनतेसाठी मोठा दिलासा ठरत आहे.
तुमचे मत काय? अशा कारवाया आणखी कठोर व्हायला हव्यात का? 👇
#अन्नभेसळ #तुकाराम_मुंढे #धाराशिव #पुणे #छत्रपती_संभाजीनगर #महाराष्ट्र_न्यूज

28/05/2026

Devendra Fadnavis | 'एकही महिला व्होट देणार नाही' कॉकरोच जनता पार्टीबद्दल मुख्यमंत्री काय म्हणाले?

28/05/2026

देशाला सर्वाधिक कोणी लुटले?
1)ब्रिटिश २)मुघल
3)काँग्रेस 4)भाजप 🙏कृपया तुमचे उत्तर कमेंट्समध्ये लिहा!🫵

अवघ्या २२ व्या वर्षी दापोडे गावच्या अभिजीत पाटील यांची आयपीएसपदी निवड; भिवंडीच्या शिरपेचात मानाचा तुराभिवंडी तालुक्यातील...
27/05/2026

अवघ्या २२ व्या वर्षी दापोडे गावच्या अभिजीत पाटील यांची आयपीएसपदी निवड; भिवंडीच्या शिरपेचात मानाचा तुरा

भिवंडी तालुक्यातील दापोडे गावचे सुपुत्र अभिजीत पाटील यांनी अवघ्या २२ व्या वर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. अखिल भारतीय स्तरावर ४७० वी रँक मिळवत त्यांची राजस्थान केडरमध्ये आयपीएस अधिकारी म्हणून निवड झाली आहे.

अभिजीत यांच्या या यशामुळे भिवंडी तालुक्यासह संपूर्ण ठाणे जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून आगरी समाजाच्या शिरपेचातही मानाचा तुरा रोवला गेला आहे. अत्यंत कठोर परिश्रम, जिद्द आणि योग्य नियोजनाच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवले आहे.

विशेष म्हणजे, पहिल्याच प्रयत्नात UPSC सारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण करून अभिजीत यांनी अनेक तरुणांसमोर आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या प्रवासातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही मोठी प्रेरणा मिळणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

अभिजीत पाटील यांच्या यशाबद्दल विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

"पॅरालिसिसचा झटका आलेला असतानाही त्यांनी..." दिग्दर्शक प्रविण तरडेंनी उघड केला मोहन जोशींचा 'तो' थक्क करणारा थरार!दिग्दर...
27/05/2026

"पॅरालिसिसचा झटका आलेला असतानाही त्यांनी..." दिग्दर्शक प्रविण तरडेंनी उघड केला मोहन जोशींचा 'तो' थक्क करणारा थरार!

दिग्दर्शक प्रविण तरडे यांचा 'देऊळ बंद २' हा चित्रपट सध्या चित्रपटगृहात धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटात स्वामी समर्थांच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना थक्क केले आहे. दरम्यान, 'लोकसत्ता'ला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत प्रविण तरडेंनी मोहन जोशी यांच्याबद्दल एक असा धक्कादायक आणि डोळ्यात पाणी आणणारा खुलासा केला आहे, जो ऐकून संपूर्ण सिनेसृष्टी या ज्येष्ठ नटाच्या जिद्दीला सलाम करत आहे.

प्रविण तरडेंनी सांगितले की, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मोहन जोशी यांना 'पॅरालिसिसचा' (अर्धांगवायू) सौम्य झटका आला होता. त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक होती आणि डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला होता. चित्रपटाचे शूटिंग थांबण्याची आणि लांबणीवर पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. मात्र, अशा गंभीर परिस्थितीतही मोहन जोशी यांनी कमालीचे धाडस आणि कामाप्रती असलेली निष्ठा दाखवली.

​"त्यांच्या शरीराची एक बाजू व्यवस्थित काम करत नव्हती, बोलताना त्रास होत होता, तरीही त्यांनी 'शूटिंग थांबवायचं नाही' असा निर्णय घेतला आणि कॅमेऱ्याला सामोरे गेले," असे तरडेंनी भावूक होत सांगितले. आजारपणावर मात करत त्यांनी स्वामी समर्थांचे कठीण सीन अत्यंत ताकदीने पूर्ण केले. एका खऱ्या कलाकाराची कलेप्रती असलेली ही भक्ती आणि जिद्द सध्या सोशल मीडियावर कमालीची व्हायरल होत असून नेटकरी मोहन जोशी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

देेऊळबंद 2” — फक्त चित्रपट नाही, तर ग्रामीण वास्तवाचा आरसा?“देऊळबंद 2” चा ट्रेलर पाहिल्यावर हे स्पष्ट जाणवतं की हा सिनेम...
27/05/2026

देेऊळबंद 2” — फक्त चित्रपट नाही, तर ग्रामीण वास्तवाचा आरसा?

“देऊळबंद 2” चा ट्रेलर पाहिल्यावर हे स्पष्ट जाणवतं की हा सिनेमा केवळ मनोरंजनासाठी बनवलेला नाही. हा चित्रपट थेट समाजव्यवस्था, ग्रामीण राजकारण, भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यांच्या वेदनांवर प्रहार करणारा दिसतो. मराठी सिनेमात marathi movie क्वचितच इतक्या थेट आणि निर्भीड पद्धतीने वास्तव मांडलं जातं.

ट्रेलरची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यातील वास्तववादी वातावरण.

गावाकडचं राजकारण, सामान्य माणसाचा संघर्ष, पैशासाठी बदललेली व्यवस्था आणि शेतकऱ्यांची हतबलता — हे सर्व अतिशय प्रभावीपणे दाखवलं गेलं आहे.

प्रविण तरडे pravin tarde यांची स्क्रीन प्रेझेन्स screen पुन्हा एकदा जबरदस्त वाटते.
त्यांच्या डोळ्यातील आक्रमकता आणि संवादफेकीतला रोष हा ट्रेलरला वेगळ्याच उंचीवर घेऊन जातो.
तर अनुभवी अभिनेते मोहन जोशी यांची उपस्थिती कथेला गंभीर वजन देते.

आजच्या काळात जेव्हा बहुतांश चित्रपट फक्त मनोरंजनापुरते मर्यादित राहतात, तेव्हा “देऊळबंद 2” सारखा सिनेमा वास्तव मांडण्याचं धाडस करताना दिसतो.

ट्रेलरनंतर सोशल मीडियावर चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अनेकांना हा सिनेमा “मुळ मुद्द्यांवर बोलणारा” आणि “मनाला भिडणारा” वाटत आहे.
प्रवीण तरडे यांनी आतापर्यंतचे चार-पाच सिनेमे बनवले आहेत सर्व हिट झाले आहेत त्यामुळे पर्यंत यांच्याकडून प्रेक्षकांना मोठे अपेक्षा असते आणि त्या अपेक्षा भंग त्यांनी केला नाही तर त्या अपेक्षेच्या पूर्ततेवर ते उतरले आहेत असे म्हटले तर वाघे ठरणार नाही

जर पूर्ण चित्रपट ट्रेलरसारखाच प्रभावी निघाला…
तर “देऊळबंद 2” हा फक्त सिनेमा राहणार नाही,
तर तो एक आवाज ठरू शकतो!

आपण प्रवीण तरडे यांचा देऊळ बंद हा चित्रपट पाहिला का
#देऊळबंद2 #मराठीसिनेमा #शेतकरी #ग्रामीणवास्तव

कमेंट्समध्ये व्यक्त व्हा !
27/05/2026

कमेंट्समध्ये व्यक्त व्हा !

"सध्याच्या घडीला असे एका नेत्याचे नाव सांगा ज्याने कधीही भ्रष्टाचार केला नाही"
23/05/2026

"सध्याच्या घडीला असे एका नेत्याचे नाव सांगा ज्याने कधीही भ्रष्टाचार केला नाही"

देशाला एका नव्या पार्टीची गरज आहे .असे तुम्हाला वाटते का?”
23/05/2026

देशाला एका नव्या पार्टीची गरज आहे .असे तुम्हाला वाटते का?”

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Akshay Khandve posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share