Pratima Publications

Pratima Publications दर्जेदार मराठी पुस्तकांचे माहेरघर

कर्मवीर भाऊराव पाटील हे केवळ एक शिक्षणमहर्षी नव्हते, तर वंचित, उपेक्षित आणि ग्रामीण समाजाच्या जीवनात शिक्षणाच्या माध्यमा...
31/08/2026

कर्मवीर भाऊराव पाटील हे केवळ एक शिक्षणमहर्षी नव्हते, तर वंचित, उपेक्षित आणि ग्रामीण समाजाच्या जीवनात शिक्षणाच्या माध्यमातून परिवर्तन घडवून आणणारे एक युगपुरुष होते. ‘कमवा आणि शिका’ या विचाराला कृतीची जोड देत त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिक्षणाची दारे खुली केली.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास पुढे एका व्यापक शैक्षणिक चळवळीत रूपांतरित झाला. समाजाच्या गरजा ओळखून शिक्षणाची दिशा ठरविणारा, श्रमाला प्रतिष्ठा देणारा आणि सामान्य माणसाच्या जीवनात आत्मविश्वास निर्माण करणारा त्यांचा विचार आजही तितकाच प्रेरणादायी आहे.
‘देवमाणूस : कर्मवीर भाऊराव पाटील’ या चरित्रग्रंथातून लेखक अप्पासाहेब खोत यांनी कर्मवीरांच्या जीवनकार्याचा, संघर्षाचा, विचारांचा आणि समाजपरिवर्तनाच्या ध्यासाचा वेध घेतला आहे. त्यांच्या कार्यामागील माणूस, त्यांच्या विचारांमागील तत्त्वज्ञान आणि त्यांच्या स्वप्नामागील समाजदृष्टी वाचकांसमोर उलगडण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.
कर्मवीरांचे जीवन म्हणजे शिक्षण, श्रम, समता आणि सामाजिक परिवर्तनाचा अखंड प्रवास. त्यांच्या कार्याची ओळख नव्या पिढीला करून देणारा आणि समाजासाठी विधायक कार्य करण्याची प्रेरणा देणारा हा चरित्रग्रंथ निश्चितच वाचनीय ठरेल.

देव माणूस कर्मवीर भाऊराव पाटील / आप्पासाहेब खोत
प्रतिमा पब्लिकेशन्स पुणे
097644 87272
मुखपृष्ठ : संजय साठे
किंमत : 250

साहित्यरत्न कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्य - संस्कृतीच्या विद्रोही परंपरेला अजून पुरेसा न्याय मिळायचा बाकी आहे. ...
26/08/2026

साहित्यरत्न कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्य - संस्कृतीच्या विद्रोही परंपरेला अजून पुरेसा न्याय मिळायचा बाकी आहे.
सुरवातीच्या काळात कादंबरीचा इतिहास लिहिताना त्यांना वगळले गेले, नंतर प्रचारकी साहित्यिक म्हणून हिणवले गेले. परंतु हिरा हा चमकतोच ! क्रांतिकारी शाहीर - साहित्यिकाचे योगदान सिद्ध होत जातेच. सत्यशोधक वृत्तीचे बुद्धीजीवी हे कार्य हाती घेतात आणि अण्णा भाऊंच्या साहित्य - संस्कृतीविषयक कार्याला खरा न्याय देऊ लागतात. या प्रवाहातील एक महत्त्वाचा बुद्धीजीवी म्हणजे प्रा. मारोती कसाब !
अण्णा भाऊंच्या लिखाणाचा नेमका ' शोध ' प्रा. कसाब यांनी घेतला आहे. हा शोध सुरू होतो अण्णा भाऊंच्या कौटुंबिक पार्श्वभूमी कडून. मग टप्पा येतो अण्णा भाऊंच्या सहप्रवासींचा आणि मग हा प्रतिभावंत बुद्धीजीवी अण्णा भाऊंच्या साहित्याच्या अनन्य स्वरूपाच्या महत्त्वाकडे वळला आहे.
जनतेसाठी जगणारा - लिहिणारा, महाराष्ट्र जागराचा बुलंद आवाज असणाऱ्या अण्णा भाऊंच्या लोकनाट्ये, शाहिरी वाङ्ममयाचा नेमका परिचय प्रा. कसाब या पुस्तकातून घेवून आले आहेत. - प्रा. प्रतिमा परदेशी
( राज्याध्यक्ष, विद्रोही सांस्कृतिक चळवळ)

शोध अण्णाभाऊंचा /डॉ. मारोती कसाब
प्रतिमा पब्लिकेशन्स पुणे
097644 87272
मुखपृष्ठ : सरदार जाधव

प्रभाकर साळेगावकर यांच्या संवेदनशील, चिकित्सक आणि सर्जनशील लेखणीतून साकारलेला ‘कविता : सृजन आणि अन्वय’ हा ग्रंथ मराठी कव...
21/08/2026

प्रभाकर साळेगावकर यांच्या संवेदनशील, चिकित्सक आणि सर्जनशील लेखणीतून साकारलेला ‘कविता : सृजन आणि अन्वय’ हा ग्रंथ मराठी कवितेकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी देणारा साहित्यिक दस्तऐवज आहे.
कविता कशी जन्मते? तिच्यामागे कोणते अनुभव, संवेदना आणि विचार कार्यरत असतात? कवीच्या अंतर्मनात रुजलेली एखादी घटना शब्दरूप घेताना तिचा आशय कसा विस्तारतो? आणि त्या कवितेचा समाज, काळ आणि माणसाच्या जगण्याशी नेमका काय संबंध असतो? या प्रश्नांचा शोध घेत साळेगावकर यांनी विविध कवी-कवयित्रींच्या कवितांचा सृजनप्रक्रिया आणि अन्वयार्थ या दोन्ही अंगांनी वेध घेतला आहे.
या ग्रंथात मुक्तछंद, अभंग, कोळीगीत , , गझल, हायकू, लावणी, भीमगीत, सवाल जवाब ,भावगीत, फटका, विडंबन, बालकविता अशा विविध काव्यप्रकारांचा समावेश असून, महाराष्ट्राच्या विविध प्रदेशांतील बोली, लोकजीवन आणि सांस्कृतिक अनुभवांचेही समृद्ध प्रतिबिंब येथे उमटते.
ग्रामीण जीवन, शेतकरी आणि श्रमसंस्कृती, शिक्षण, स्त्रीसंवेदना, सामाजिक विषमता, मानवता, निसर्ग, प्रेम, विद्रोह, परिवर्तन आणि समकालीन वास्तव अशा अनेक विषयांना या ग्रंथातील कविता भिडतात. त्यामुळे हा केवळ कवितांचा आस्वाद घेणारा ग्रंथ न राहता, कविता आणि समाज यांच्यातील जिवंत नात्याचा शोध घेणारा ग्रंथ ठरतो.
प्रत्येक कवितेमागील अनुभव आणि तिच्या निर्मितीची कहाणी खुद्द कवी कवयित्रीच्या शब्दात जाणून घेताना वाचकाला कवीच्या संवेदनशील मनाचा परिचय होतो. त्याचबरोबर कवितेच्या शब्दांपलीकडे दडलेला सामाजिक, सांस्कृतिक आणि मानवी आशयही उलगडत जातो. हाच या ग्रंथाचा विशेष आशय आणि वेगळेपणा आहे.
‘कविता : सृजन आणि अन्वय’ हा मराठी कवितेवर प्रेम करणाऱ्या रसिकांसाठी, नव्या-जुन्या कवींच्या सर्जनविश्वाचा मागोवा घेऊ इच्छिणाऱ्या वाचकांसाठी आणि कवितेच्या निर्मितीप्रक्रियेचा अभ्यास करू पाहणाऱ्या साहित्यप्रेमींसाठी निश्चितच मोलाचा ठरेल.
कविता वाचताना तिच्यामागचा माणूस, त्याचा काळ आणि त्याचे जगणे समजून घेण्याचा एक अर्थपूर्ण प्रवास म्हणजे — ‘कविता : सृजन आणि अन्वय’.
- प्रकाश होळकर (सुप्रसिद्ध कवी / गीतकार)

कविता : सृजन आणि अन्वय / प्रभाकर साळेगावकर
प्रतिमा पब्लिकेशन्स
प्रस्तवाना : डॉ. नरेंद्र पाठक
मुखपृष्ठ : सरदार जाधव
किंमत : 300
संपर्क : 097644 87272

15/08/2026
पुण्यस्मरणलोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!न्याय, समता, लोककल्याण आणि धर्मनिरपे...
13/08/2026

पुण्यस्मरण

लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

न्याय, समता, लोककल्याण आणि धर्मनिरपेक्ष प्रशासनाचा आदर्श आपल्या कार्यातून निर्माण करणाऱ्या राजमाता अहिल्यादेवी होळकर या भारतीय इतिहासातील एक अद्वितीय कर्तृत्ववान महिला शासक होत्या. प्रजेच्या सुखाला स्वतःच्या सुखापेक्षा अधिक महत्त्व देत त्यांनी मंदिरांचे जीर्णोद्धार, घाट-विहिरींची निर्मिती, धर्मशाळा, रस्ते आणि विविध लोककल्याणकारी कामे उभी केली.

कर्तृत्व, करुणा, न्याय आणि लोकसेवेचा आदर्श असलेल्या या महान लोकमातेचे जीवन आजही समाजाला प्रेरणा देते.

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन!

॥ पुण्यस्मरण ॥

#राजमाता_अहिल्यादेवी_होळकर #अहिल्यादेवी_होळकर #पुण्यतिथी #लोकमाता #विनम्र_अभिवादन #अहिल्यादेवी_होळकर_जीवन_आणि_कार्य

संत परंपरेने महाराष्ट्राच्या जडणघडणीत दिलेले योगदान किती मोलाचे आहे. हे स्वतंत्रपणे सांगण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्र...
20/05/2026

संत परंपरेने महाराष्ट्राच्या जडणघडणीत दिलेले योगदान किती मोलाचे आहे. हे स्वतंत्रपणे सांगण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्रातील अनेक थोर विचारवंतांनी यावर आपली मते नोंदवलेली आहेत. वर्तमान मानवी जीवनात भोवताली दिसणारे वास्तव जसे भयचकित करणारे आहे तसेच ते अस्वस्थ करणारे ही आहे. काळाच्या पटलावर वैज्ञानिक व तंत्रदृष्ट्या प्रगत होण्याच्या काळात भौतिक व ऐतिहासिक प्रगती महाराष्ट्र करीत आहे. पण त्याचवेळी नैतिकतेचे अधःपतन आणि मूल्यास या जगण्याशी संबंधित प्रश्नांनाही आपण सामोरे जात आहोत. हे प्रश्न सोडवण्यासाठी अन्य काही मार्ग आहेतच तथापि संत साहित्याने दिलेला विचार नीतिप्रधान व मूल्याधिष्ठित संकल्पनांशी व मानवी जीवन कल्याणाशी निगडित असल्याने तो समाजाच्या उन्नयनासाठी प्रेरक ठरणारा आहे. हे सर्व लक्षात घेऊन संतांचे जीवन व त्यांचे लेखन कार्य याविषयी चिंतन करणाऱ्या लेखांचा लेखसंग्रह डॉ. ज्ञानोबा कदम यांनी इंडियन स्टुडंट कौन्सिलच्या उपक्रमातून प्रत्यक्षात आणला आहे. त्यांचे स्वागतच करायला हवे. असे सातत्यपूर्ण प्रयत्न नव्या काळातील प्रश्नांना भिडण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. याची जाणीव ग्रंथकर्त्यास असल्याने त्यांच्या या प्रयत्नाबद्दल अभिनंदन करायला हवे. हा ग्रंथ वाचकांना व अभ्यासकांना विचारप्रवृत्त करेल अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही. त्यासाठी डॉ. कदम व त्यांच्या सहकाऱ्यांचेही अभिनंदन.

- सतीश बडवे.

संपादक
डॉ. ज्ञानोबा कदम
डॉ. माधवी महाके
प्रतिमा पब्लिकेशन्स पुणे
संपर्क : 097644 87272

मराठी ग्रामीण साहित्यविश्वातील महत्त्वाचे कथाकार  राजेंद्र गहाळ यांचा नवीन कथासंग्रह “सालगडी” लवकरच वाचकांच्या भेटीला ये...
16/05/2026

मराठी ग्रामीण साहित्यविश्वातील महत्त्वाचे कथाकार राजेंद्र गहाळ यांचा नवीन कथासंग्रह “सालगडी” लवकरच वाचकांच्या भेटीला येत आहे.
यापूर्वी “कोंडी”, “दोन एकर” आणि “पोशिंदा” या गाजलेल्या कथासंग्रहांमधून ग्रामीण जीवनाचे वास्तव, शेतकरी समाजाचे प्रश्न, मातीशी जोडलेली माणसं आणि त्यांच्या भावविश्वाचे अत्यंत जिवंत चित्रण त्यांनी वाचकांसमोर मांडले आहे.
ग्रामीण साहित्याची नाळ घट्ट जोडलेली असलेले त्यांचे लेखन हे केवळ कथा नाहीत तर गावाकडच्या जीवनाचा जिवंत दस्तऐवज आहे.
आता “सालगडी” या नव्या कथासंग्रहातूनही ग्रामीण जीवनातील संघर्ष, नाती, वेदना आणि माणुसकीचा नवा पैलू वाचकांना अनुभवायला मिळणार आहे.
💐 कथाकार राजेंद्र गहाळ यांना मनःपूर्वक शुभेच्छा!
“सालगडी” या कथासंग्रहाच्या प्रकाशनासाठी हार्दिक अभिनंदन!

#सलगडी #राजेंद्रगहाळ #ग्रामीणसाहित्य #मराठीकथा #कथासंग्रह #मराठीसाहित्य

🎂💐 प्रकाशक दीपक चांदणे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! 💐🎂साहित्य, विचार आणि समाजप्रबोधन यांची अखंड ज्योत तेवत ठे...
10/05/2026

🎂💐 प्रकाशक दीपक चांदणे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! 💐🎂

साहित्य, विचार आणि समाजप्रबोधन यांची अखंड ज्योत तेवत ठेवणारे, पुस्तकांना केवळ व्यवसाय नव्हे तर सामाजिक परिवर्तनाचे माध्यम मानणारे जिद्दी आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रकाशक दीपक चांदणे!
प्रतिमा पब्लिकेशन्सच्या माध्यमातून त्यांनी असंख्य वैचारिक, ऐतिहासिक, सामाजिक आणि प्रेरणादायी ग्रंथ वाचकांपर्यंत पोहोचवले. नवोदित लेखकांना व्यासपीठ देण्याचे कार्य करताना त्यांनी अनेक विचारांना शब्दरूप दिले आणि साहित्यविश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
पुस्तक हे समाज बदलण्याचे प्रभावी साधन आहे, या विचारावर ठाम विश्वास ठेवून त्यांनी सातत्याने ज्ञानप्रसाराचे कार्य केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे यांसारख्या महामानवांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम अत्यंत प्रेरणादायी आहेत.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील साहित्यिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
त्यांच्या लेखणीला आणि प्रकाशन कार्याला अधिकाधिक यश लाभो, नवीन ग्रंथांच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचे कार्य अखंड सुरू राहो, हीच सदिच्छा!

🌹 वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🌹
📚 प्रतिमा पब्लिकेशन्स परिवार ✨

Address

Flat No. 10, Ajay Apartment, Manikbag, Sinhagad Road
Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pratima Publications posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share