20/05/2026
संत परंपरेने महाराष्ट्राच्या जडणघडणीत दिलेले योगदान किती मोलाचे आहे. हे स्वतंत्रपणे सांगण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्रातील अनेक थोर विचारवंतांनी यावर आपली मते नोंदवलेली आहेत. वर्तमान मानवी जीवनात भोवताली दिसणारे वास्तव जसे भयचकित करणारे आहे तसेच ते अस्वस्थ करणारे ही आहे. काळाच्या पटलावर वैज्ञानिक व तंत्रदृष्ट्या प्रगत होण्याच्या काळात भौतिक व ऐतिहासिक प्रगती महाराष्ट्र करीत आहे. पण त्याचवेळी नैतिकतेचे अधःपतन आणि मूल्यास या जगण्याशी संबंधित प्रश्नांनाही आपण सामोरे जात आहोत. हे प्रश्न सोडवण्यासाठी अन्य काही मार्ग आहेतच तथापि संत साहित्याने दिलेला विचार नीतिप्रधान व मूल्याधिष्ठित संकल्पनांशी व मानवी जीवन कल्याणाशी निगडित असल्याने तो समाजाच्या उन्नयनासाठी प्रेरक ठरणारा आहे. हे सर्व लक्षात घेऊन संतांचे जीवन व त्यांचे लेखन कार्य याविषयी चिंतन करणाऱ्या लेखांचा लेखसंग्रह डॉ. ज्ञानोबा कदम यांनी इंडियन स्टुडंट कौन्सिलच्या उपक्रमातून प्रत्यक्षात आणला आहे. त्यांचे स्वागतच करायला हवे. असे सातत्यपूर्ण प्रयत्न नव्या काळातील प्रश्नांना भिडण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. याची जाणीव ग्रंथकर्त्यास असल्याने त्यांच्या या प्रयत्नाबद्दल अभिनंदन करायला हवे. हा ग्रंथ वाचकांना व अभ्यासकांना विचारप्रवृत्त करेल अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही. त्यासाठी डॉ. कदम व त्यांच्या सहकाऱ्यांचेही अभिनंदन.
- सतीश बडवे.
संपादक
डॉ. ज्ञानोबा कदम
डॉ. माधवी महाके
प्रतिमा पब्लिकेशन्स पुणे
संपर्क : 097644 87272