05/03/2026
मध्य-पूर्वेतील इराण–इस्रायल युद्धामुळे महाराष्ट्रातील द्राक्ष, केळी आणि कांदा निर्यातीवर काही ठिकाणी परिणाम झाल्याची चर्चा आहे. मुंबईतील JNPT बंदरावर काही कंटेनर अडकल्याने शेतकरी व व्यापाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र द्राक्ष निर्यातीवर मोठा नकारात्मक परिणाम झालेला नसल्याची माहिती द्राक्ष निर्यातदार संघाने दिली आहे.