Mhasla Live

Mhasla Live ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स

Mhasla Live हि नव्याने सुरु झालेली वेब वाहिनी आहे, त्याच बरोबर ब्लॉग आहे. या द्वारे म्हसळा, श्रीवर्धन, गोरेगाव, रायगड मधील ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती, विविध योजना यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा चांगला वापर करून २४/७ वेबसाईट्च्या आणि YouTube चॅनेलच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'म्हसळा live' चा मानस आहे.
तुमची सोबतही तितकीच महत्वाची.

वायुसेनेचं विमान कोसळलं! पायलटसह 5 जवानांचा दुर्दैवी मृत्यू; AN-32 अपघाताने देश हादरलाआसाममधील जोरहाट येथील भारतीय वायुस...
13/06/2026

वायुसेनेचं विमान कोसळलं! पायलटसह 5 जवानांचा दुर्दैवी मृत्यू; AN-32 अपघाताने देश हादरला

आसाममधील जोरहाट येथील भारतीय वायुसेनेच्या रोरिया एअरबेसवर शनिवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली. लँडिंगदरम्यान भारतीय वायुसेनेचे AN-32 मालवाहू विमान कोसळल्याने पायलटसह पाच जवानांचा मृत्यू झाला.
या अपघातात को-पायलटलाही गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास हे विमान उड्डाण पूर्ण करून एअरबेसवर उतरण्याचा प्रयत्न करत होते. मात्र लँडिंगच्या अंतिम टप्प्यात अचानक विमानाचा अपघात झाला. अपघातानंतर विमानाला भीषण आग लागली आणि काही क्षणांतच ते दोन तुकड्यांमध्ये विभागले गेले.

या दुर्घटनेत स्क्वाड्रन लीडर प्रशांत सिंह, फ्लाइट लेफ्टनंट शुभम कुमार, सार्जंट जितेंद्र शर्मा, अग्निवीरवायु खेमाराम कुमावत आणि अग्निवीरवायु दानिश आलम यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे देशात हळहळ व्यक्त केली जात आहे.

भारतीय वायुसेनेकडून जाहीर करण्यात आलेल्या निवेदनात सांगण्यात आले की, हे AN-32 विमान नियमित उड्डाणावर होते. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे कोणतेही अंदाज किंवा अफवा पसरवू नयेत, असे आवाहन वायुसेनेकडून करण्यात आले आहे.

दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी 'कोर्ट ऑफ इन्क्वायरी'चे आदेश देण्यात आले आहेत. तांत्रिक बिघाड, हवामान किंवा इतर कोणते कारण या दुर्घटनेमागे आहे का, याचा तपास केला जाणार आहे.

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंच्या घातपाताची शक्यता? अजितदादांप्रमाणेच.., नेत्याच्या वक्तव्याने मोठी खळबळराष्ट्रवादी शरद पवार ...
13/06/2026

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंच्या घातपाताची शक्यता? अजितदादांप्रमाणेच.., नेत्याच्या वक्तव्याने मोठी खळबळ

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांंचं शेतकरी कर्जमाफीमधील अट सरकारने रद्द करावी, या मागणीसाठी पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. आज त्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे.

दरम्यान आतापर्यंत अनेक नेत्यांनी पंढरपूरमध्ये येऊन रोहित पवार यांची भेट घेतली आहे, त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दरम्यान त्यानंतर आता एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे पंढरपूरमध्ये रोहित पवार यांचं आंदोलन सुरू आहे, या आंदोलनाला शिवसेना शिंदे गटाचे पंचायत समितीचे सभापती दत्तात्रय मगर यांनी भेट दिली आहे, त्यांनी रोहित पवार यांची भेट घेऊन या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचं म्हटलं आहे. मात्र यावेळी बोलताना त्यांनी मोठं विधान केलं आहे. यामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे.

पंढरपूरमध्ये सुरू असलेल्या रोहित पवार यांच्या आंदोलनाला शिवसेना शिंदे गटाचे पंचायत समितीचे सभापती दत्तात्रय मगर यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदे साहेबांचा घात होऊ शकतो, असं खळबळजनक वक्तव्य मगर यांनी केलं आहे. मी सरकारमधला आहे, पण अजितदादांसोबत काय झाले ते सगळ्यांना माहिती आहे. मी शिवसेना शिंदे गटाचा पदाधिकारी आणि माळशिरस तालुका पंचायत समिती सभापती आहे. शेतकऱ्याचा एक कैवारी अजित पवार आपल्यामधून कसे हिरावले गेले, हे सर्वांना माहीत आहे. आता आपल्याला या दुसऱ्या कैवाऱ्याला (रोहित पवार) जपायचे आहे, असं मगर यांनी म्हटलं आहे.

मला खंत वाटते ती म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांची, त्यांचाही असाच घातपात होऊ शकतो. एकनाथ शिंदे साहेबांचा घात होण्याची शक्यता वाटते, अजितदादा कसे गेले हे सर्वांना माहिती आहे. असंही यावेळी मगर यांनी म्हटलं आहे.

12/06/2026

भाजपला रोखण्यासाठी देशात 'महिला पंतप्रधान' चेहरा जाहीर करा. भास्कर जाधव

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, शरद पवारांकडून राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा प्रस्तावराष्ट्रवादी काँग्रेस ...
12/06/2026

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, शरद पवारांकडून राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामे काँग्रेस पक्षाला विलीनीकरणाचा प्रस्ताव दिल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत आणि ठाकरेंचे खासदार संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर या चर्चेला अधिकच वेग आला आहे.

त्यातच सुप्रिया सुळे यांच्याकडूनही सकारात्मक प्रतिक्रिया आल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यात आज नाना पटोले यांनीही विलीनीकरणाच्या प्रस्तावावर भाष्य केलेय.

राष्ट्रवादीला काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचा प्रस्ताव आधीच दिला होता. पण काही कारणांनी त्याला उशीर झाला. देश विकला जातोय, संविधान व्यवस्था संपत चाललेली आहे, अशा वेळी मतांचा विभाजन थांबविण्यासाठी, धर्मनिरपेक्ष विचारांच्या सर्व पक्षांनी एकत्रित यावं अशा पद्धतीची प्रक्रिया देशपातळीवर सुरू आहे. त्याच प्रक्रियेचा भाग म्हणून तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट यांना सोबत घ्यायचं सुरू असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. ते नागपूरमध्ये साम टीव्हीसोबत बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस विलीनीकरण हा प्रस्ताव आज नाही, खूप आधी देण्यात आला होता. त्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. राहुल गांधी, सोनिया गांधी, खरगे यांनी याबाबतीत कामाला सुरुवात केली आहे. मोदी सरकारला सत्तेतून बाहेर काढणं हा एकमेव अजेंडा देशासमोर आहे आणि त्यासाठी काँग्रेस काम करत आहे, असेही पटोले म्हणाले..

राऊत काय म्हणाले ?

काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या पक्षांनी शरद पवार यांच्या नेतृत्वात एकत्र यावे, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. त्यावर काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी दुजोरा दिला. ते म्हणाले की संजय राऊत बरोबर बोलले आहेत, जे काँग्रेसमधून वेगळे झाले होते, त्यांनी आता एकत्र यायला हवं. राहुल गांधी यांना इंडिया आघाडीचे नेते मानले पाहिजे. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, संजय राऊत यांनी मांडलेले मत हे वैयक्तिक आहे. विलीनीकरणावर काय होतेय, हे भविष्य ठरवेल.

12/06/2026

अनिकेत तटकरेंचे स्वागत करू, पण सुनील तटकरेंच्या कृत्याला विरोधच!

अवघ्या दोन आठवड्यांत 5 Million Views! 🎉रायगड जिल्ह्यासह संपूर्ण कोकणातील वाचकांनी म्हसळा Live वर दाखवलेल्या प्रेमामुळे आ...
12/06/2026

अवघ्या दोन आठवड्यांत 5 Million Views! 🎉

रायगड जिल्ह्यासह संपूर्ण कोकणातील वाचकांनी म्हसळा Live वर दाखवलेल्या प्रेमामुळे आणि विश्वासामुळे आम्ही 5M Views चा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. 🙏

म्हसळा Live (Official page)

आपला म्हसळा , आपला आवाज • आपली बातमी • आपला विश्वास
आपल्या प्रत्येक Like, Share, Comment आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
आपला विश्वास, आमची ताकद...! अशीच साथ कायम राहू द्या. ❤️

MhaslaLiveFamily

मोठी घडामोड..! ठाकरे गटाचे सात खासदार फुटणार, केंद्रात मंत्रिपद फिक्स? संजय राऊतांच सूचक विधानमहाराष्ट्राच्या राजकारणात ...
10/06/2026

मोठी घडामोड..! ठाकरे गटाचे सात खासदार फुटणार, केंद्रात मंत्रिपद फिक्स? संजय राऊतांच सूचक विधान

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे गटातील काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.

ठाकरे गटाचे तब्बल सात खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याच्या वृत्तांमुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात चर्चांना उधाण आले आहे. (Maharashtra Politicse)

माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार, काही दिवसांपूर्वी दिल्लीत एका गुप्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत पुढील राजकीय रणनीतीवर चर्चा झाल्याचा दावा केला जात आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही काही खासदारांशी संपर्क साधल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (Maharashtra Politicse)

सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटातील नऊ खासदारांपैकी सात खासदार शिंदे गटात जाण्यास इच्छुक असल्याचा दावा करण्यात येत आहे. यातील एका खासदाराला केंद्रात मंत्रिपद मिळू शकते, अशीही चर्चा सुरू आहे. मात्र या वृत्तांना अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. (Maharashtra Politicse)

दरम्यान, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी थेट उत्तर देणे टाळले. “यावर प्रश्न विचारू नका, मौनं सर्वार्थ साधनम्,” असे म्हणत त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्यांच्या या भूमिकेमुळे राजकीय चर्चांना आणखी उधाण आले आहे. (Maharashtra Politicse)

मात्र ठाकरे गटाचे खासदार फुटणार असल्याच्या सर्व चर्चांना पक्षाचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले आहे. माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, ठाकरे गटाचे खासदार भाजप किंवा शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या बातम्या मुद्दाम पसरवल्या जात आहेत. (Maharashtra Politicse)

“९ पैकी १० किंवा ११ खासदार फुटणार अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत. पण यात कोणतेही तथ्य नाही. ज्यांना पक्ष सोडायचा होता ते आधीच गेले आहेत. उर्वरित सर्व खासदार पक्षासोबत ठामपणे उभे आहेत,” असे राऊत यांनी स्पष्ट केले. (Maharashtra Politicse)

यामुळे ठाकरे गटातील कथित फूट आणि खासदारांच्या नाराजीबाबतच्या चर्चांना आणखी रंग चढला असून, आगामी काही दिवसांत या राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

10/06/2026

उदय सामंत-तटकरे आमनेसामने; रायगडच्या पालकमंत्रीपदावरून पुन्हा वाद

कोकण विधान परिषद बिनविरोध झाली, राष्ट्रावीदने दिलेला शब्द पाळावा, शिवसेनेची विनंती

उदय सामंत-तटकरे आमनेसामने; रायगडच्या पालकमंत्रीपदावरून पुन्हा वादरायगड जिल्ह्याचा पालकमंत्री ही शिवसेना आणि राष्ट्रवादी ...
10/06/2026

उदय सामंत-तटकरे आमनेसामने; रायगडच्या पालकमंत्रीपदावरून पुन्हा वाद

रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांची दुखरी नस आहे. जवळपास दीड वर्ष झाले अजून रायगड जिल्ह्याला पालकमंत्री लाभलेला नाही. यातूनच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संबंध कसे आहेत, हे स्पष्ट होते.

रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे आमदार विरुद्ध सुनील तटकरे असा संघर्ष आहे. अशातच विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांना बिनविरोध निवडणूक दिल्यामुळे पालकमंत्रीपदाचा तिढा सुटेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, यावरून अजूनही एकमत होत नसल्याचे चित्र असल्यामुळे पुन्हा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमने-सामने आल्याचे दिसत आहे.

विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार) महायुतीत पुणे आणि कोकण अशा दोन जागा मिळाल्या होता. त्यातील कोकणमधील जागेला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अनिकेत सुनील तटकरे यांनी 1 जून रोजी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, भाजपकडून मंत्री नितेश राणे, शिवसेनेकडून मंत्री उदय सामंत आणि आमदार महेंद्र थोरवे उपस्थित होते. शिवसेनेचे सर्वाधिक मतदार असताना आणि तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस असताना अनिकेत तटकरे यांना उमेदवारी मिळवून दिली. एवढेच नाही तर शिवसेनेचे सर्वोच्च नेते एकनाथ शिंदे यांच्याकडून सहकार्याची हमी मिळवली. यातून तटकरे यांचे दिल्ली कनेक्शन किती तगडे आहे, याची रायगडसह राज्यात चर्चा सुरू झाली.

या पार्श्वभूमीवर रायगडचे पालकमंत्रीपद शिवसेनेला म्हणजे भरत गोगावले यांना मिळावे, अशी मागणी शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. उदय सामंत यांनी ही मागणी केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजून दावा सोडायला तयार नाही, असे चित्र दिसत आहे. उदय सामंत यांनी माध्यमांशी बोलताना, भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री व्हावेत हे स्पष्ट केले. तसेच अनिकेत तटकरे यांची विधान परिषद निवडणुकीत बिनविरोध निवड झाली आहे. शिवाय त्यावेळी झालेल्या चर्चा, दिलेले शब्द लक्षात घेऊन गोगावले यांना पालकमंत्री बनवावे, अशी मागणी केली. सामंत यांच्या या वक्तव्यातून विधान परिषद निवडणुकीत अनिकेत तटकरे यांना पाठिंबा देताना पालकमंत्रीपदाबाबतही चर्चा झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

या संदर्भात माध्यमांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना विचारले असता, दोन दिवस याच प्रश्नांना उत्तर देत असल्याचे त्यांनी त्रासिक चेहऱ्याने सांगितले. तसेच याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाच्या नेत्या सुनेत्रा पवार, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ, असेही स्पष्ट केले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या वक्तव्यातून रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला नसल्याचे स्पष्ट होत आहे. डिसेंबर 2024 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर 18 जानेवारी 2025 रोजी पालकमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यात रायगडमध्ये आदिती तटकरे यांची नियुक्ती झाली होती. मात्र, त्याच रात्री आक्रमक झालेल्या शिवसेना नेते भरत गोगावले समर्थकांनी मुंबई-गोवा महामार्गावर आंदोलन करून महामार्ग रोखला. या उग्र आंदोलनानंतर दुसऱ्याच दिवशी (19 जानेवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगडसह नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदांना स्थगिती दिली. तेव्हापासून या पदाचा निर्णय झालेला नाही आणि रायगडमध्ये अनेकदा शिवसेना आमदार विरुद्ध सुनील तटकरे यांच्यात शाब्दिक चकमक होत असते.

'त्या' भव्य-दिव्य सोहळ्याला एकनाथ शिंदेंना बोलवायला विसरले की डावललं? , राजकारणाच्या नव्या डावाने कोणाची विकेट?महाराष्ट्...
09/06/2026

'त्या' भव्य-दिव्य सोहळ्याला एकनाथ शिंदेंना बोलवायला विसरले की डावललं? , राजकारणाच्या नव्या डावाने कोणाची विकेट?

महाराष्ट्रात महायुतीचे भक्कम सरकार सत्तेत आहे. तब्बल 232 आमदारांच्या पाठिंब्यावर उभे असलेले हे सरकार मोठ्या ताकदीने काम करत असल्याचे वेळोवेळी दिसून येते. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीतही विरोधी पक्षांच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने विरोधकांची ताकद किती कमी झाली आहे, हे स्पष्ट झाले.

त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सर्व काही सुरळीत असून सरकार पूर्णपणे स्थिर आहे, असे वाटत असतानाच एक नवी घटना समोर आली आणि राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले.

सध्या चर्चेत असलेला विषय म्हणजे मान-अपमानाचे राजकारण. या वादाची ठिणगी पडली ती नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य 20 फूट उंच पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यावरून.

शनिवारी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-1 परिसरात हा अनावरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन अदानी समूहाच्या विमानतळ प्राधिकरणाने, सिडकोच्या सहभागाने केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. मात्र, या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रणच देण्यात आले नसल्याची बाब समोर आली आणि त्यानंतर राजकीय चर्चांना सुरुवात झाली.

Address

Raigad
Raigad
402107

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mhasla Live posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mhasla Live:

Share