Mhasla Live

Mhasla Live ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स

Mhasla Live हि नव्याने सुरु झालेली वेब वाहिनी आहे, त्याच बरोबर ब्लॉग आहे. या द्वारे म्हसळा, श्रीवर्धन, गोरेगाव, रायगड मधील ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती, विविध योजना यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा चांगला वापर करून २४/७ वेबसाईट्च्या आणि YouTube चॅनेलच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'म्हसळा live' चा मानस आहे.
तुमची सोबतही तितकीच महत्वाची.

शिमगोत्सव : कोकण जिवंत आहे, पण राज्यकर्ते झोपलेतशिमगोत्सव आला की कोकण जिवंत झाल्यासारखं वाटतं.... अस का होत असावं? कदाचि...
05/03/2026

शिमगोत्सव : कोकण जिवंत आहे, पण राज्यकर्ते झोपलेत

शिमगोत्सव आला की कोकण जिवंत झाल्यासारखं वाटतं.... अस का होत असावं? कदाचित गावाच्या ओढीने रेल्वे, बस, रस्ते चाकरमान्यांनी भरून जातात. वर्षभर कुलूपबंद असलेली घरं उघडतात, देवळांत गजबज वाढते, आणि सोशल मीडियावर कोकणच्या लोककलेचा, परंपरेचा महापूर उसळतो.
पण हा उत्साह पाहताना एक अस्वस्थ करणारा प्रश्न उभा राहतो.
जर कोकण इतकं जिवंत आहे, तर उरलेले दहा महिने ते ओस का असावं?

शिमग्यासाठी गावात येणारा चाकरमानी हा कुणी पर्यटक नाही. किंवा तो हौसेने गाव सोडून गेलेला माणूसही नाही; तो रोजगाराअभावी गावाबाहेर ढकलला गेलेला नागरिक आहे. गाव त्याचं आहे, पण पोट शहरात आहे हीच कोकणाची शोकांतिका आहे.

कोकणात निसर्ग आहे, संस्कृती आहे, परंपरा आहे. पण रोजगार नाही. शेती अजूनही निसर्गावर अवलंबून आहे. प्रक्रिया उद्योगांचा अभाव आहे. स्थानिक तरुणांसाठी टिकाऊ संधी निर्माण करण्यात शासन अपयशी ठरलं आहे. त्यामुळे “गावाकडे चला” हे सल्ले भावनिक वाटतात, पण वास्तवात ते पोकळ ठरतात.

आज सोशल मीडियावर कोकणची संस्कृती झळकते, पण प्रत्यक्ष गावात बंद घरं, वृद्ध आई-वडील आणि तरुणांची अनुपस्थिती दिसते. लोककला टिकतेय, पण लोक कोकणात टिकत नाहीत. परंपरा आहेत, पण पुढची पिढी गावात नाही. हे सामाजिक अपयश नाही; हे थेट प्रशासनाचं आणि धोरणात्मक दुर्लक्षाचं अपयश आहे.

याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यासारख्या महत्त्वाच्या जिल्ह्याला आजही पालकमंत्री नसणं ही बाब गंभीर आहे. निवडणूक होऊन वर्ष उलटले, तरीही हा प्रश्न प्रलंबित राहतो, याचा अर्थ स्पष्ट आहे, कोकण विकासाच्या प्राधान्यक्रमात नाही. पालकमंत्री नसणं म्हणजे केवळ एक पद रिकामं असणं नाही; तर रायगड वासीयांच्या प्रश्नांना वाली नसणं, निर्णयांना दिशा नसणं आणि विकासाला ब्रेक लागणं आहे.

मुंबई आणि शहरी महाराष्ट्र उभा राहिला तो कोकणच्या जमिनीवर आणि तुमच्या आमच्या श्रमांवर. पण आज त्याच कोकणातला तरुण रोजगारासाठी बाहेर भटकतो. राज्याला कोकण जमीन म्हणून, पर्यटन म्हणून हवं आहे; पण कोकणचा माणूस धोरणांच्या केंद्रस्थानी नाही हीच खरी विसंगती आहे.

सण गाव भरतात, हे खरं. पण गाव टिकवायचं असेल, तर सण पुरेसे नाहीत. स्थलांतर थांबवायचं असेल, तर स्थानिक रोजगारनिर्मिती, उद्योग, कृषी प्रक्रिया आणि दीर्घकालीन धोरणांची गरज आहे.

शिमगोत्सव आनंद देतो, पण तो प्रश्नही विचारायला लावतो "कोकण फक्त सणापुरतं जिवंत ठेवायचं आहे, की कायमचं?"

या प्रश्नाचं उत्तर केवळ उत्सवात नाही; ते प्रशासनाच्या इच्छाशक्तीत आहे. नाहीतर शिमग्याची आग पेटत राहील, आणि त्या आगीभोवती उभं राहायला हळूहळू कोणी उरणारच नाही.

- भावेश जनार्दन म्हसकर,
खरसई, म्हसळा

रायगड झेडपीत 'दोघांचे भांडण, तिसऱ्याचा लाभ'! सर्वाधिक २१ जागा जिंकूनही शिवसेना विरोधी बाकावर
26/02/2026

रायगड झेडपीत 'दोघांचे भांडण, तिसऱ्याचा लाभ'! सर्वाधिक २१ जागा जिंकूनही शिवसेना विरोधी बाकावर

26/02/2026

🌺 गाव सर्वे, तालुका श्रीवर्धन
🔥 पारंपारिक शिमगा उत्सव 🔥

🙏 !! काळभैरवनाथ देव की जय !! 🙏

🎥 कोकणातील शिमगोत्सवाचे असेच खास, पारंपरिक आणि रंगतदार व्हिडीओ पाहण्यासाठी आपलं पेज आत्ताच Follow करा!

📩 तुमच्या गावातील शिमगोत्सव, नमन, पालखी, नृत्य, होळी असे खास क्षणांचे व्हिडीओ आम्हाला पाठवा
📞 789 789 4207

👉 परंपरा जपूया, कोकण दाखवूया! 🌴🔥

न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज म्हसळा येथे NMMS यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा संपन्न
26/02/2026

न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज म्हसळा येथे NMMS यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा संपन्न

म्हसळ्याच्या सुपुत्राची जागतिक भरारी! सॅनिटरी पॅड रिसायकलिंग क्षेत्रात ‘पॅडकेअर’चा डंका; जगभरातून कौतुकाचा वर्षाव
26/02/2026

म्हसळ्याच्या सुपुत्राची जागतिक भरारी! सॅनिटरी पॅड रिसायकलिंग क्षेत्रात ‘पॅडकेअर’चा डंका; जगभरातून कौतुकाचा वर्षाव

रायगड जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू, मधुकर पाटील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे गटनेतेMhasla Live रायगड जिल्...
13/02/2026

रायगड जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू, मधुकर पाटील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे गटनेते

Mhasla Live

रायगड जिल्हा परिषदेचे निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप आणि अजित पवार गटाने सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. आज भाजप आणि अजित पवार गटाच्या रायगड जिल्हा परिषदेतील निर्वाचित सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर आपापली स्वतंत्र गट नोंदणी केली.

अजित पवार गटाच्या गटनेतेपदी मधुकर पाटील यांची निवड करण्यात आली आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या ५९ गटांसाठी ७ फेब्रुवारी रोजी मतदान तर ९ फेब्रुवारी रोजी मतमोजणी झाली. यामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने ५, काँग्रेसने २, भाजपने १५, अजित पवार गटाने १६ तर शिंदे गटाने २१ जागा जिंकल्या. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी ३० सदस्य संख्या गरजेची आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीपूर्वी सर्व पक्षांच्या सदस्यांची गट नोंदणी बंधनकारक आहे. त्यानुसार भाजप आणि अजित पवार गटाने रायगड जिल्हाधिकारी यांच्यासमोर गट नोंदणी केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी डॉ. रवींद्र शेळके यांच्यासमोर ही प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर, रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आस्वाद पाटील उपस्थित होते. सर्व सदस्यांची ओळख पटवून गट नोंदणी करण्यात आली.

लोकलपाठोपाठ कोकण रेल्वेचं वेळापत्रकही कोलमडलं, तेजस एक्सप्रेस सहा तर मांडवी तीन तास विलंबाने; प्रवाशांचे मोठे हालबुधवारी...
13/02/2026

लोकलपाठोपाठ कोकण रेल्वेचं वेळापत्रकही कोलमडलं, तेजस एक्सप्रेस सहा तर मांडवी तीन तास विलंबाने; प्रवाशांचे मोठे हाल

बुधवारी तेजस सहा तास आणि गुरुवारी मांडवी एक्स्प्रेस पावणेतीन तास विलंबाने धावल्याने प्रवाशांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. एक्स्प्रेस विलंबाने धावत असल्याबाबत प्रवाशांना आगाऊ सूचना मिळत नाही, रेल्वे स्थानकात पोहोचल्यावर विलंबाबाबत सूचना मिळत असल्याने प्रवाशांच्या त्रासात अधिकच भर पडते आहे.

रात्री दहा वाजता गाडी दाखल

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव मांडवी एक्स्प्रेस सीएसएमटीवरून सकाळी ७.१० वाजता सुटणे अपेक्षित होते. परंतु फलाटावर येण्यासाठीच गाडीला उशीर झाला. त्यामुळे पावणे दहा वाजण्याच्या सुमारास गाडी मडगावच्या दिशेने रवाना झाली. गाडीने सीएसएमटी परिसर ओलांडताच मशीद रेल्वे स्थानकात प्रवाशांनी आपत्कालीन साखळी ओढली. त्यामुळे सुमारे १५ मिनिटे गाडी सीएसएमटी ते मशीद दरम्यान खोळंबली. यामुळे एरवी दादर स्थानकात ७.२२ वाजता पोहोचणारी मांडवी एक्स्प्रेस पावणे तीन तास विलंबाने अर्थात सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास दाखल झाली.

दादरमध्ये शेकडो प्रवासी या गाडीच्या प्रतीक्षेत होते. परंतु रेल्वेकडून नक्की किती वाजता ही गाडी निघेल याबद्दल कोणतीच उद्घोषणा करण्यात येत नव्हती. दादरमधील फलाटावर चहा-पाण्यासाठी कोणताही स्टॉल नाही, स्वच्छतागृह नाही. तसेच बसायला आसनव्यवस्थाही उपलब्ध नाही. प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक होईपर्यंत रेल्वे प्रशासन वाट बघत राहणार का, असा प्रश्न मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष, शिरीष देशपांडे यांनी उपस्थित केला.
दादरला गाडी रद्द

मडगाव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस बुधवारी सहा तास विलंबाने धावली. दुपारी ३.३५ ऐवजी ही गाडी रात्री ९.५७ ला रवाना झाली. प्रशासनाने गाडीची वेळ रात्री नऊ वाजताची केली. परंतु त्यानंतरही तासाभराने गाडी मुंबईच्या दिशेने रवाना झाली. परिणामी दादर स्थानकात रात्री ११.३० वाजता पोहोचणारी तेजस दुसऱ्या दिवशी सकाळी १०.१० वाजता पोहोचली. तेजस एक्स्प्रेसमध्ये शयनयान डब्यांची व्यवस्था नसल्याने रात्रभर प्रवाशांना ताटकळत प्रवास करावा लागला. दादर ते सीएसएमटी दरम्यान तेजस एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. यामुळे सीएसएमटीला जाणाऱ्या प्रवाशांना बॅगासह दादरवरून लोकल पकडून सीएसएमटी गाठावे लागले.

नेमकं पाणी कुठे मुरतंय?" तटकरेंवर निशाणा साधताच गोगावलेंची एन्ट्री...!Mhasla Live राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवा...
12/02/2026

नेमकं पाणी कुठे मुरतंय?" तटकरेंवर निशाणा साधताच गोगावलेंची एन्ट्री...!

Mhasla Live

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू विमान अपघातात २८ जानेवारीला झाला. त्यानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर या गोष्टीला आता जवळपास पंधरा दिवस होत येत असून या विमान अपघाताबद्दल शंका उपस्थित केले जात आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केलेले आहेत. तसेच त्यांनी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचे नाव घेत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच हा अपघात नसून घातपात असल्याची शंकाही उपस्थित केली आहे. यावरूनच एकनाथ शिंदे यांच्या मंत्री तथा रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी देखील अशीच शंका उपस्थित केली आहे. यामुळे आता रोहित पवार यांच्या आरोपांना आणि त्यांनी केलेल्या दाव्यांना बळ मिळताना दिसत आहे.

रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत मोठे आरोप केले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना गंभीर आरोप केले. त्यांनी, दादा विलिनीकरणाची घोषणा करणार होते. मात्र आज ते आपल्यात नाहीत. त्यामुळे विलिनीकरणावर बोलणं महत्वाचे नाही. त्यामुळे मी दादांच्या विमान अपघाताबद्दल आवज उठवत आहे. याबाबत मोठ्या नेत्यांची वेळ मागितली.

12/02/2026

रायगड जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता येणार : मंत्री भरत गोगावले यांचे स्पष्ट संकेत.

पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार?

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! भाजपमध्ये दोन गट पडले, पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यानेच सांगितली आतली गोष्टMhasla Live चंद्रप...
12/02/2026

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! भाजपमध्ये दोन गट पडले, पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यानेच सांगितली आतली गोष्ट

Mhasla Live
चंद्रपूर महापालिकेमध्ये सत्ता काबीज करण्यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार धुरंधर ठरले. एकीकडे काँग्रेसमध्ये गटबाजीमुळे वाद सुरू असताना दुसरीकडे भाजप आणि ठाकरे गटाने सत्ता प्रस्थापित करत काँग्रेसचा तोंडाशी आलेला घास हा हिसकावून घेतला.

खरं तर याला काँग्रेसच जबाबदार आहे. हे करत असताना पडद्यामागे काय राजकीय घडामोडी घडल्या याबाबत सुधीर मुनगंटीवार यांनी साम टीव्हीसोबत संवाद साधत अनेक गौप्यस्फोट केले.

ते म्हणाले की, दोन दिवस अगोदर उबाठासोबत चर्चा केली होती. काँग्रेस नेते राहुल पुगलिया यांच्या घरात पहिली बैठक झाली, यामध्ये त्यांनी मदत केली. सुधीर भाऊच विकास करू शकत असल्याने सर्व सोबत आहे. तसेच उपेंद्र कोठेकर, चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्यमंत्री फडणवीस हे देखील चर्चेत होते. पहिला महापौर भाजपचा असावा अशी अट आम्ही दिली.
भाजपात दोन गट आहे हे लपवण्याची गोष्ट नाहीये

पुढे बोलताना मुनगंटीवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला. भारतीय जनता पक्षात अनुशासन प्रिय असताना सुद्धा AB फॉर्म चोरी गेली. एक वार्डात दोन ते तीन फॉर्म वाटले. या गटबाजीमुळे हा प्रकार घडला. त्यामुळे भाजपमध्ये दोन गट आहेच हे काय लपवण्यासारखे नाही हे सगळ्यांनी बघितले असे ते म्हणाले.

वंदे मातरम वेदमंत्रांइतकंच पवित्र; केंद्र सरकारच्या निर्णयाचं स्वागत

हॅलो ऐवजी 'वंदे मातरम' म्हणण्याचा निर्णय मी घेतला होता. वेद हे पवित्र ग्रंथ मानले जातात. एका कवीने वर्णन करताना वेदमंत्रांपेक्षाही 'वंदे मातरम' अधिक पवित्र असल्याची भावना मांडली आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करतो. 'गर्जा महाराष्ट्र' हे स्वागतगीत म्हणून स्वीकारण्यात आले, याचा मला विशेष आनंद आहे. आज महाराष्ट्रातील कोणत्याही शासकीय कार्यक्रमात त्या गीतासाठी उभे राहावे लागते. ही महाराष्ट्राच्या संविधानिक परंपरेची आणि अस्मितेची ओळख आहे. अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

रायगड जि.प.मध्ये भाजपचा स्वतंत्र गट: सत्ता समीकरणांबाबत राजकीय हालचालींना वेगरायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकां...
12/02/2026

रायगड जि.प.मध्ये भाजपचा स्वतंत्र गट: सत्ता समीकरणांबाबत राजकीय हालचालींना वेग

रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भारतीय जनता पक्षाच्या १५ नवनिर्वाचित सदस्यांनी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र गटाची नोंदणी केली आहे.

त्यानंतर अलिबाग येथील भाजप कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत पेण येथील नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य व माजी विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील यांची भाजप गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. याबाबतची माहिती पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली.

भाजपच्या या निर्णयामुळे रायगड जिल्हा परिषदेत सत्तासमीकरणांबाबत नवा राजकीय संकेत मिळत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे निवडणुकीपूर्वी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात युती झाली होती. निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे १६ सदस्य विजयी झाले असले, तरी दोन्ही पक्षांनी संयुक्त गट नोंदणी न करता स्वतंत्र गट नोंदणीची भूमिका घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

वनजमीन हडपली अन् राष्ट्रीय महामार्गासाठी सरकारलाच ४२ कोटींना विकली; भाजपा नेत्याचा प्रतापMhasla Live वनजमिनीचा अवैधरीत्य...
11/02/2026

वनजमीन हडपली अन् राष्ट्रीय महामार्गासाठी सरकारलाच ४२ कोटींना विकली; भाजपा नेत्याचा प्रताप

Mhasla Live

वनजमिनीचा अवैधरीत्या कब्जा करून ती जमीन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला हस्तांतरित करून त्याचा मोबदला घेणे कंत्राटदार जे. एम. म्हात्रेंना महागात पडले आहे. याप्रकरणी 'ईडी'ने त्यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करून १८ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये नवी मुंबईतील उरण आणि उलवे परिसरातील तीन भूखंडांचा समावेश आहे.

प्राप्त माहितीनुसार, या वनजमिनीचा ताबा १९७५मध्ये महाराष्ट्र शासनाने घेतला होता आणि ती वनविभागाकडे वर्ग केली होती. तसेच या जमिनीच्या सातबाऱ्यावर आणि फेरफार नोंदणीतदेखील वनविभागाचे नाव नोंदवण्यात आले होते. मात्र, आरोपी म्हात्रे यांनी त्यात फेरफार करत त्यावर स्वतःचे नाव चढविल्याचा ठपका 'ईडी'ने ठेवला आहे. त्यानंतर ही जमीन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला हस्तांतरित करून त्यातून ४२ कोटी ४० लाख रुपये मिळवले होते.

६९ कोटींच्या संपत्तीवर टाच
वनजमीन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला विकून आलेल्या पैशांतून आरोपी म्हात्रे यांनी आणखी मालमत्ता खरेदी केली. तसेच काही कर्जांचीही परतफेड केल्याचे 'ईडी'च्या तपासात आढळले. दरम्यान, याप्रकरणी आतापर्यंत ६९ कोटी ४७ लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.

कोण आहेत जे. एम. म्हात्रे?
पनवेलचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक जे. एम. म्हात्रे आणि सय्यद महम्मद अब्दुल हमीद कादरी यांच्या विरोधात सप्टेंबर २०२४ मध्ये वनविभागाने पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. वनखात्याची जमीन म्हात्रे आणि कादरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला देऊन भूसंपादनापोटी ५२ कोटी रुपये घेतले होते. भूसंपादनाचे हे पैसे वनखात्याला द्यावेत म्हणून वनविभागाने तगादा लावूनही त्यांनी न जुमानल्याने अखेर उरण तालुक्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी नथुराम कोकरे यांनी तक्रार दाखल केली होती. जे. एम. म्हात्रे पूर्वी शेतकरी कामगार पक्षात होते. आता विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी पुत्र प्रीतम म्हात्रेंसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. प्रीतम यांनी उरण मतदारसंघातून भाजपच्या महेश बालदी यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढविली हाेती.

हजारो कोटींची कंत्राटे
नवी मुंबई, उरण-पनवेलसह राज्यात अनेक जे. एम. म्हात्रे यांच्या कंपनीने सिडको, विमानतळ, नॅशनल हायवे काॅर्पाेरेशनसह एमएसआरडीसी आणि इतर प्राधिकरणांची हजारो कोटींची कंत्राटे घेतलेली आहेत. काही पूर्ण झाली आहेत, तर काही सुरू आहेत. काही कामे भाजप नेत्यांच्या कंपनीसोबत भागीदारीत सुरू आहेत.

Address

Raigad
Raigad
402107

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mhasla Live posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mhasla Live:

Share