राजापूरकर

राजापूरकर Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from राजापूरकर, Digital creator, Rajapur.
(2)

प्रिय..
कोकण..😊
पुढचा जन्म भेटलाच तर..
पुन्हा तुझ्याचं कुशीत यायला आवडेल.✅♥️

जन्मभूमी, कर्मभूमी, मायभूमी माझं कोकण 😍♥️

जगात भारी आमची राजापूर नगरी ♥️

#राजापूरकर 🏠🏡🌴🌊🌍🐟🐠⛵🛶🌳💚 कोकण म्हणजे स्वर्ग.....
कोकण म्हणजे निसर्ग सौंदर्याची खाण....
कोकण म्हणजे फळा-फुलांनी नटलेले विश्व.....
कोकण म्हणजे कधीही न विसरता येणाऱ्या आठवणी....
पण हल्ली डिजीटलच्या जमान्यात या आठवणी लोप पावत चालल्या.

धरा’ या आमच्या उपक्रमाअंतर्गत आम्ही पावसाळ्यापूर्वी 'चला गावाकडे' हा एक  कार्यक्रम घेतला. आता शहरातून येणाऱ्या आधुनिक वि...
25/08/2025

धरा’ या आमच्या उपक्रमाअंतर्गत आम्ही पावसाळ्यापूर्वी 'चला गावाकडे' हा एक कार्यक्रम घेतला. आता शहरातून येणाऱ्या आधुनिक विचारांच्या तरुण-तरुणींपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न त्यांना कितपत रुचतो हे तपासण्यासाठी आज हा प्रयोग संक्षिप्तरित्या आम्ही 'रान गुहागर' चालवणारे मोहित आणि त्यांच्याकडे आलेल्या पाहुण्यांसोबत मिळून केला.

ज्या लोकांना कोकणाबद्दल फारशी माहिती नाही, त्यांच्यापर्यंतही कोकणची संस्कृती आणि विचार पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे. इथे येणारी माणसं वेगवेगळ्या विचारांची असतील, आणि आपल्याला त्या सर्वांना सामावून घ्यायचं आहे. त्यांना इथला निसर्ग, संस्कृती, शाश्वत जगणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 'कोकणप्रेम' अनुभवता यावं, हा आमचा प्रयत्न आहे. या अनुभवातून काही जण शहरातही 'स्लो-लिव्हिंग'चा स्वीकार करतील, काहींच्या विचारात बदल घडेल, तर काही जण आपल्या मूळ गावी परतण्याचाही विचार करतील.

आपलं काम फक्त त्यांच्या मनात विचारांचं एक बीज रोवण्याचं आहे. यातून जर गावाला निसर्गाचं भान ठेवून आणि संस्कृती जपून रोजगार मिळाला, तर तोच खरा शाश्वत विकास ठरेल. ह्यातूनच गावातली पुढची पिढी अधिक सक्षमपणे उभी राहील, हे नक्की.

‘धरा’च्या पुढच्या बॅचेस पावसाळ्यानंतर सुरू होतील. विशेष म्हणजे, आता इथे राहण्यासाठी एक स्वतंत्र खोलीदेखील तयार आहे. त्यामुळे, जर तुम्हाला शांत, शाश्वत जगण्याचा अनुभव घ्यायचा असेल, डिजिटल डिटॉक्स करत मोबाईलपासून थोडे दूर राहून आयुष्याचा वेग कमी करायचा असेल, तर तुम्ही इथे नक्की याल अशी आम्हाला खात्री आहे.
-आशुतोष जोशी

हे उभारताना तुमच्यातल्या काही लोकांचीही मदत अपेक्षित आहे. आर्थिक मदत करायची असल्यास या नंबर वर करावी - ८९८३७२६७३७
Ashutosh Joshi

हे मोठाले प्रकल्पवाले खूप जमीन घेऊन ठेवतील.  एकदा बसले कि उठणार नाहीत.विस्तारच करत राहतील.तुम्हाला त्यांचे गुलाम बनून रा...
25/08/2025

हे मोठाले प्रकल्पवाले खूप जमीन घेऊन ठेवतील. एकदा बसले कि उठणार नाहीत.विस्तारच करत राहतील.तुम्हाला त्यांचे गुलाम बनून राहण्याशिवाय पर्याय नसेल. वेळीच सावध व्हा.
जमीन धरून राहा.........
#गावं_वाचवा #राजापूरकर

कोणीही आपले गाव घर खुशीने सोडत नाही आणि त्याला सोडायचे ही नसते.पण घर ,कुटुंबाच्या गरजा पूर्ण करणेसाठी मजबुरी ने त्याला स...
25/08/2025

कोणीही आपले गाव घर खुशीने सोडत नाही आणि त्याला सोडायचे ही नसते.पण घर ,कुटुंबाच्या गरजा पूर्ण करणेसाठी मजबुरी ने त्याला सोडावे लागते.🥺🥲
📸 कोकण सफारी.

🌴
#गावं_वाचवा #राजापूरकर


गणेश चतुर्थी च्या एक दिवशी आधी म्हणजे हरतालीकेच्या दिवशी माटी म्हणजे मंडपी सजवल्या जातात..♥️🙏गणरायाचं आगमन हे निसर्गाच्य...
25/08/2025

गणेश चतुर्थी च्या एक दिवशी आधी म्हणजे हरतालीकेच्या दिवशी माटी म्हणजे मंडपी सजवल्या जातात..♥️🙏
गणरायाचं आगमन हे निसर्गाच्या समृद्ध काळात होते. श्रावणसरी नुकत्याच ओसरून चाललेल्या असतात, रानंवनं हिरवाईने नटलेली असतात अशा समयी भाद्रपद शुक्ल चतुर्दशीला श्री गणेशाचं आगमन होत. या काळात पावसामुळे फळे, फुले, भाज्या यांची सगळीकडे रेलचेल असते . त्यातील पहिले फळ, पहिली भाजी देवालाअर्पण
करण्याच्या हेतूने उदयास आली माटी, गणपतीच्या आसनाच्या बरोबर वरती ही "माटी' बांधली जाते, सुरूवातीला वेताच्या काठ्यांनी,तद्नंतर पोफळीच्या फळ्यांनी आणि त्यानंतर सागा सारख्या उत्तम
प्रतिच्या लागडात कोरीव काम करून तयार केली जाणारी माटी उत्तरोत्तर समृद्ध होत गेली. हिला काही ठिकाणी "माटोळी', "मंडपी'अंबारी "असेही" म्हणतात. स्थळाकाळानुसार नावं जरी बदलली तरी हेतु आणि श्रद्धा तीच.
निसर्गातल्या फलाफुळांनी नटलेली ही माटी गणेशाची आरास अधिकच आकर्षक करते. कोकणात या माटीला रानात मिळणाऱ्या शेरवडं, हरणे, कांगलां, कवंडाळ, कोकणे, वाघाचे पंजे, पोफळीची शिफ्टं, नारळ अशा वनस्पती व रानफळांनी सुशोभित केले जाते. आपल्याला या वस्तु बाजारात सहज उपलब्ध होत असल्या तरी या वस्तू गोळा करणार्या लोकांना त्या गोळा करण्यासाठी मोठी धावपळ करावी लागते. कोकण आणि गोवा येथे माटी बांधण्याचं प्रमाण सर्वाधिक दिसुन येतं. गोव्यामध्ये तर पर्यावरणप्रेमींकडुन माटी सजावटीच्या स्पर्धा घेतल्या जातात. ज्या माटीला सर्वाधिक फळे- भाज्या बांधल्या जातात त्या स्पर्धकास विजयी घोषित केलं जातं.
गोव्याच्या श्री. भूषण भावे यांनी माटोळीवर लिहिलेल्या कोंकणी पुस्तकाला कर्नाटक सरकारचा " सर्वोत्तम कोंकणी पुस्तक पुरस्कार मिळाला आहे.
आजच्या गणेश आरास आणि सजावटीचा विचार करता माटी हा प्रकार दिवसेंदिवस गणेश उत्सवातुन हद्दपार होत चाललाय व त्याची जागा थर्माकोल मखर, डिजिटल बॅनर्स यांनी घेतलेली आपल्याला दिसते, जे पर्यावरणाला पुर्णपणे मारक आहे.आपण जर पर्यावरणप्रेमी असाल तर या वर्षी नक्की माटी द्वारे
गणपतीची आरास करा किंवा माटीचे सामान बाजारपेठेतुन खरेदी करा...

#मंडपी
#माटी
#शेरवड
#शडवाड
#कवंडळ
#तेरडा
#कांगले
#नारळ
#बेडा
#सुपारी
#हरतालिका


#गावं_वाचवा
#राजापूरकर

ढोलकीच्या जीवावर, ढोलकीच्या तालावर... जगणे यांचे अलवर..!गणपतीचे दिवस जसजसे जवळ यायला लागतात, तसतसे गावात बदल जाणवायला ला...
24/08/2025

ढोलकीच्या जीवावर, ढोलकीच्या तालावर...
जगणे यांचे अलवर..!

गणपतीचे दिवस जसजसे जवळ यायला लागतात, तसतसे गावात बदल जाणवायला लागतात. दुकानं सजावटीच्या समानाने सजायला लागतात, गणपतीच्या मूर्ती दुकानात दिसायला लागतात आणि रत्नागिरी एसटी स्टँड समोर ढोलकी विक्रेते दिसायला लागतात.
गेली दोन वर्षं जाता-येता मी या विक्रेत्यांना बघत होते आणि त्यांचे फोटो काढावेत अशी इच्छा होती. पण का कुणास ठाऊक, ते घडत नव्हते. काल शेवटी ठरवलंच की आज काही करून जायचंच... आणि मी आणि ज्ञानेश गेलो फोटो काढायला.
त्यांची रीतसर परवानगी घेऊन आम्ही त्यांच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली.. आणि आमच्यासमोर उलगडला त्यांचा जीवनपट...
काही जण उत्तरप्रदेशातून आलेत, काही कर्नाटकातून, काही दिल्लीहून, काही मुंबईहून तर काही पार नैनितालमधून. दरवर्षी गणपतीच्या आधी 1 महिना हे लोक आपल्याइथे येतात आणि ढोलकी विकायचा व्यवसाय करतात. ढोलकी बनवायचे सगळे समान ट्रान्सपोर्ट मधून घेऊन येतात आणि इथे फक्त ढोलकी बनवून विकतात. अगदी पुठ्ठ्याचा रोल ते आंब्याच्या लकडापासून ढोलकी बनवली जातात. ढोलकी कशापासून बनवली ते त्याचा आकार, आवाज, रूप यावर त्यांची किंमत ठरते. साधारणपणे दीडशे रुपयांपासून ते पाचशे, सहाशे रुपयांपर्यंत किंमत असते. ढोलकी तयार झाली की काही जण ती आपापल्या खांद्यावर घेऊन आजूबाजूच्या गावात विक्री करायला जातात. कुठे आठवडा बाजार असेल तर तिथे त्यांची बऱ्यापैकी विक्री होते. मग दिवसभरात कधी 7, 8 तर कधी 20 पण ढोलकी विकली जातात. उत्तरप्रदेशातून आलेले मोहम्मद शमशाद म्हणाले की, "गेल्यावर्षी पर्यंत चांगली कमाई होत होती. यावर्षी मात्र पावसामुळे, पुरामुळे विक्री खूप कमी होते आहे." एका चाचांनी सांगितलं की त्यांचे आजोबा, बाबा पण यायचे, आता ते येतात आणि मुलं मोठी झाली की ती पण येतील. काही जण गेली 20 वर्षं येत आहेत.
हे लोक रस्त्यावरच तंबू उभे करून आपापली दुकानं मांडतात, तिथेच शेजारी उघड्यावर स्वयंपाक करतात आणि तिथेच अडचणीत झोपतात. हे सर्व पोटासाठी.
गणपती झाले की हे लोकं आपापल्या मार्गाने वेगवेगळ्या ठिकाणी निघून जातील.. पुन्हा पुढच्या वर्षी येण्यासाठी..

(आम्ही फोटो काढत असताना, त्यांना प्रश्न विचारत असताना, त्यांच्या चेहऱ्यावर कुतूहल दिसत होतं. शेवटी एकांनी विचारलाच तो नेहमीचा प्रश्न... "आप किसलीये ये फोटो निकाल रहे हैं..? पेपर में आयेगा क्या?"
मग त्यावर आमचं उत्तर.." अगर पेपर में आया, तो आपके लिये पेपर लेके आएंगे ।" काय चेहरा फुलला त्यांचा.. पेपरमध्ये येईल न येईल.. त्यांना त्यांचे काढलेले फोटो दाखवल्यावर पण त्यांना मनापासून आनंद झाला आणि आम्हाला फोटो काढायला दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानायचे तर त्यांनीच आमचे आभार मानले. कदाचित पहिल्यांदाच कोणीतरी त्यांचे फोटो काढले असतील, कदाचित पहिल्यांदाच त्यांची एवढी विचारपूस केली गेली असेल... त्यांच्यासाठी आपण एवढं तरी नक्कीच करू शकतो, नाही का?)



माहिती साभार ✍🏻/📸 Netra Palkar-Apte

24/08/2025

रत्नागिरीकरांनो...
हातखांबाचा ट्रॅफिक टाळायचा आहे का मग थेट कारबुडे - उक्षी रस्ता वापरा

24/08/2025
अजूनही कोणाला सडे नापीक उजाड वेस्ट वाटत असतील तर....📸 Prateik More  #सडेवाचवा   #गावं_वाचवा    #राजापूरकर Konkani Ranman...
24/08/2025

अजूनही कोणाला सडे नापीक उजाड वेस्ट वाटत असतील तर....

📸 Prateik More

#सडेवाचवा

#गावं_वाचवा

#राजापूरकर
Konkani Ranmanus Ecotourism

कोकणस्थ ब्राह्मणांच्या गौरी  ७ खड्यांच्या का ?(सुधारित पुनर्प्रेषण )गणपती बाप्पा आले, म्हणजे त्यांची आई गौरीही येणार. या...
24/08/2025

कोकणस्थ ब्राह्मणांच्या गौरी ७ खड्यांच्या का ?
(सुधारित पुनर्प्रेषण )

गणपती बाप्पा आले, म्हणजे त्यांची आई गौरीही येणार. या प्रथम पूजनीय गणपतीनंतर त्याच्या आईचा म्हणजे गौरींचा मान ! हा गौरींचा उत्सव तसेच पूजा, विविध नैवेद्य या सर्व गोष्टी या वेगवेगळ्या प्रकारे केल्या जातात. हा सृजनाचा उत्सव असल्याने तो साहजिकच स्त्रियांच्या अधिकारात येतो. विविध ठिकाणी ज्येष्ठा कनिष्ठा गौरी या मुखवटे, उभ्या मूर्ती, भिंतीवरील चित्र, तेरड्याच्या किंवा हळदीच्या रोपट्याला देवीचे चित्र लावून, कलश इत्यादी स्वरूपात पुजल्या जातात.

कोकणस्थ ब्राह्मणांमध्ये मात्र देवीचे प्रतीकात्मक रूप म्हणून ७ खडे आणून पुजले जातात. या संबंधात केले जाणारे विविध विनोदही ऐकायला मिळतात. पण याची थोडी पार्श्वभूमी जाणून घेऊ या. कोकणामध्ये पावसाचे प्रमाण खूप असते. सगळीकडचे जलसाठे तुडुंब भरलेले असतात. हे जलसाठे पावसाळ्यानंतरच्या काळात सर्वाधिक धोकादायक असतात. फोफावलेल्या वनस्पती, वेली, निसरडी जमीन, सर्वत्र चिखल यामुळे अपघात आणि मृत्यूची भीती असते. अपरिचित जलसाठ्यांच्या ठिकाणी, तिन्ही सांजेला उजेड कमी होताना, खूप झाडीच्या ठिकाणी कांहींचा अनपेक्षित अपमृत्यु ओढवतो. अत्यंत पुढारलेल्या अशा आजच्या काळातही पावसाळ्यात नदीत, ओढ्यात, धबधब्यात, समुद्रात बुडून मरण्याचे प्रमाण वाढते. मग यातून भीतीची, दंतकथांची परंपरा सुरु होते. कांही कथा तर खूपच भीतीदायक आहेत. अशा ठिकाणी पूर्वी अपघातात मरण पावलेल्या कांही स्त्रियांची पिशाच्चे येथे वास करतात असे मानले गेल्याने आणखीनच भीतीदायक पार्श्वभूमी लाभते. त्यांच्या कहाण्या, कथा अनेक पिढ्यांपर्यंत सांगितल्या जात राहतात. त्यामुळे विविध प्रकारचे विधी, तोडगे हे भक्तिभावाऐवजी भीतीमुळे केले जातात.

मोक्षदायी अशी सप्त तीर्थे, सप्त मातृका, सात पवित्र नद्या तशी आपल्याकडे सप्त देवतांची कल्पना मांडलेली आणि मानलेली आहे. विहिरी, तळी, सरोवर, पाणवठे अशा ठिकाणी सात देवतांचे वास्तव्य मानलेले आहे. त्यांना सात जल योगिनी, जलदेवता, अप्सरा म्हणतात. त्याचे साती आसरा, सती आसरा असे अपभ्रंशही झाले. कांहीं समाजात त्यांना गुरुकन्या मानले जाते. मत्सी, कूर्मी, कर्कटी, दर्दुरी, जतुपी, सोमपा, मकरी अशी त्यांची नावे आहेत. ही सर्व नावे जलचरांची आहेत. त्यांना त्रास दिल्यामुळे, नीट सेवा न केल्यामुळे त्यांचा कोप होतो. म्हणून त्या माणसांना ओढून पाण्यामध्ये नेतात अशी लोकांची श्रद्धा आहे. तसा कोप होऊ नये म्हणून प्रतीकात्मक ७ खडे आणून त्यांची पूजा केली जाते. हे खडे जल साठ्याजवळून, वाहत्या पाण्यातून, पवित्र वृक्षतळ अशा ठिकाणांहून आणले जातात. त्यांना समृद्धी देणाऱ्या, रक्षणकर्त्या सप्त देवता मानून त्यांची भक्तिभावाने सेवा केली जाते. गौरींच्या परंपरागत कहाणीमध्ये, दारिद्र्यामुळे तळ्यात जीव द्यायला निघालेल्या गरीब ब्राह्मणाला, वृद्ध स्त्रीचे रूप घेतलेल्या गौरी देवीने वाचविले व त्याला समृद्धी दिली, असे वर्णन आहे.

कोकणस्थ ब्राह्मणांमध्ये या सप्त देवतांचे, ७ खड्यांच्या रूपात पूजन करण्याचे व्रत पाळले जाते. हे सात खडे आपल्या घराजवळच्या आणि रोजच्या वापरातील जलसाठ्यावरून आणले जातात. त्यामुळे अपरिचित ठिकाणी उद्भवू शकणारा धोका इथे टळतो. या गौरी आणतांना व विसर्जन करतांना मौन धारण केले जाते. हे विसर्जनही जलसाठे, वाहते पाणी, पवित्र वृक्षतळ अशा ठिकाणी केले जाते. कोकणात सहज उपलब्ध असलेले पदार्थ म्हणजे तांदूळ आणि नारळ ! म्हणूनच गौरीसाठी पक्वान्न म्हणून तांदुळाचे घावन आणि नारळाच्या दुधात गूळ, केशर, वेलची घालून बनविलेले घाटले केले जाते. कोकणातील अन्य ब्राह्मण पोट जाती तसेच अन्य जातींमध्ये सुद्धा खड्यांच्या गौरी आणण्याची पद्धत आहे. कोकणात अनेक सुप्रसिद्ध मंदिरातील देवता या सप्त शिळांच्या रूपात आढळतात. त्यामुळे सप्त शिळांचे महत्व केवळ ब्राह्मणच नाही तर अन्य अनेक समाजांमध्ये आहे. त्यांच्या त्या कुलदेवताही आहेत. कांही कुटुंबांमध्ये, खड्यांच्या गौरी आणण्याचा नवस बोलला जातो. इच्छापूर्तीनंतर कायमच अशा प्रकारे गौरी आणल्या जातात असे दिसते.

"ज्येष्ठे, श्रेष्ठे, तपोनिष्ठे, धर्मीष्ठे, सत्यवाहिनी, समुद्रवसने देवी, ज्येष्ठा गौरी नमोस्तुते।".. असा श्लोक खड्याच्या गौरी आणताना म्हणतात. ही सात खड्यांच्या सात देवींची नावे नसून, एकाच जेष्ठा गौरीची ही सर्व विशेषणे आहेत.

हा मुळातच निसर्गाशी जोडणारा उत्सव असल्यामुळे, यामध्ये गौरी मुखवट्यांसाठी झाडांचा वापर, पत्री, जलसाठे यांच्याशी संबंध येतो. म्हणूनच गौरींसाठी खडेच वापरण्याची पद्धत आहे. कोकणात अनेक ठिकाणी असलेल्या सात आसऱ्याच्या देवी या मूळ अश्म स्वरूपातच आहेत. त्यांना सहसा सोन्या-चांदीचे देवीचे मुखवटे बनवून घातले जात नाहीत. म्हणूनच या गौरींसाठीही चांदीचे खडे, रंगवलेल्या सात सुपाऱ्या,७ कवड्या, सात छोटे मुखवटे यापेक्षा मूळ स्वरूपात खडे पूजन करणे, पारंपरिक आणि महत्त्वाचे असावे !

आनंदाच्या सणासुदीच्या काळात ( म्हणजे सध्याच्या पावसाळ्यात ) माणसाने आपण देवापेक्षाही ( निसर्गापेक्षाही ) शक्तिवान, बुद्धिवान आहोत असे समजून आपला जीव घालविण्यापेक्षा, त्याचा सन्मान राखावा हेच या ७ खड्यांच्या गौरींच्या कहाणीचे फलित आहे.

©( हा लेख व फोटो शेअर केल्यास कृपया माझ्या नावासह शेअर करावेत )
***** मकरंद करंदीकर
[email protected]

बोलीभाषा  - निकेत हळवे मुळात निसर्गातून तयार झालेल्या असंख्य बोलीभाषेतून प्रमाण भाषा तयार केली जाते . मग कालांतराने प्रम...
24/08/2025

बोलीभाषा
- निकेत हळवे

मुळात निसर्गातून तयार झालेल्या असंख्य बोलीभाषेतून प्रमाण भाषा तयार केली जाते . मग कालांतराने प्रमाणभाषेतील काही शब्द बोलीभाषेला मिळतात . ( याला तिथली शिक्षण व्यवस्था , सामाजिक व्यवस्था , राजकीय व्यवस्था , आर्थिक व्यवस्था , न्यूनगंड आणि इतर काही गोष्टी अवलंबून असतात . )

मात्र एकदा का प्रमाणभाषेतील शब्द बोलीभाषेला मिळाले की मग हळू हळू बोलीभाषा नष्ट होऊन आपल्या मुखात प्रमाणभाषा राहते . हा भौगोलिक इतिहास आहे .

२० मैलावर थोड्याफार फरकाने बोलीभाषेतील शब्द बदलतात . हळू हळू ते शब्द बदलत बदलत आपण दुसऱ्या भाषेच्या राज्यात प्रवेश करतो . मग त्या राज्यातील भाषेतील शब्द आणि आपल्या भाषेतील शब्द खूप कमी प्रमाणात देवाण घेवाण करतात . बॉर्डर वर जास्त देवाण घेवाण असते .

कोंकणी ही भाषा महाराष्ट्रात कोकणी , गोव्यात कोंकणी , कर्नाटक मध्ये मॅंगलॉरीयन कोंकणी आणि केरळ मध्ये त्रावणकोर किंवा केरळ कोंकणी मध्ये बोलली जाते . ही बोलीभाषा एवढी समृद्ध आहे की आपल्याला महाराष्ट्रात जरी ती ऐकताना मराठी वाटत असली तरी तिचा एक स्वतंत्र शब्दकोश आहे . ती रोमन , देवनागरी , फारसी , कन्नडा आणि मल्याळम मध्ये लिहिली जाते .

महाराष्ट्रात कोंकणी भाषेच्या बऱ्याच उपभाषा आहेत . त्यातलीच एक आहे मालवणी भाषा . गेल्या काही वर्षात या भाषेत प्रमाण मराठीचे असंख्य शब्द आले . उदा : पूर्वी सोरगत (लग्नासाठीचे स्थळ), टैटा (डोके), असकाट (झाडी), कळयारो (भांडण लावणारा), , झगो (झगा), निशान (शिडी), हावको (बागुलबुवा), इरागत (लघवी), वांगड (सोबत), मांगर (शेतघर), कुणगो (शेत) असे अनेक शब्द आता जाऊन सर्रास प्रमाण मराठी शब्द आले .

महाराष्ट्राच्या कोकणी वर जेवढा मराठी भाषेचा प्रभाव आहे तेवढा प्रभाव गोव्यातील कोंकणीवर नाही . मॅंगलॉरीयन वर कन्नडा प्रभाव आहे तर केरळ कोंकणी वर मल्याळमचा प्रभाव आहे .

शेवटी काय त्या त्या प्रांतातील ती ती प्रमाणभाषा समृद्ध बोलीभाषेवर आपला एवढा प्रभाव टाकते मग आपल्याला प्रमाणभाषा हीच आपली मुख्य भाषा वाटू लागते .

मुळात प्रमाणभाषा ही असंख्य समृद्ध बोलीभाषेतून तयार होऊन असंख्य बोलीभाषेतील लोकाना एकमेकांत संवाद सुकर होण्यासाठी बनवलेली एक भाषा आहे .

🌴 #राजापूर #कोकण #राजापूरकर #राजापूरकर #गावं_वाचवा

आमचा लाल्या आठवला , तो काळ 87 ते 88 चा असेल तसा त्याला आम्ही पाळला नव्हता पण अधून मधून दरात यायचा ,आई त्याला भाकरी चपाती...
24/08/2025

आमचा लाल्या आठवला , तो काळ 87 ते 88 चा असेल तसा त्याला आम्ही पाळला नव्हता पण अधून मधून दरात यायचा ,आई त्याला भाकरी चपाती टाकायची .. हळू हळू तो तिथेच बसायला लागला , दारात असायचा पण कधी उंबरा ओलांडून आत यायचा नाही .. चांगला धष्ट पुष्ट होता , लाल्या मूळे आमची चंगळ झाली होती त्याच्या सोबत मस्ती करायला मजा यायची .. संध्याकाळी शाळेतून घरी चालत यायला 6.20 व्हायचे मग काय आलो की लाल्या पायात घुटमळायचा , अंगावर उड्या मारायचा .. पण एक अडचण होती आमच्या वडिलांना त्याचा खूप राग यायचा , सारखे त्याला हकलायचे तसा लाल्या पण वडलांना थोडा द्बकुनच राहायचा .. मिलिटरी रिटायर्ड माणूस भारीच शिस्त आणि कडक स्वभाव .. आमची काय बिशाद शब्द बोलायची , असो पण का कोण जाणे वडील सेकण्ड शिफ्ट ला दुपारी कामावर जाताना लाल्या त्यांना सोडायला जायचा चालत , वडील पण चालत जायचे कामावर तेंव्हा आमच्या कडे साधी सायकल पण नव्हती , कम्पनी चे अंतर शॉर्टकट ने सुद्धा चांगलं 4.5 km होत .. 1.45 ला वडील आवरून बूट घालून बाहेर पडले कि लाल्या उठून शेपूट हलवत त्यांच्या बरोबर जायचा .. वडील कम्पनी च्या गेट च्या आत गेले कि हा माघारी फिरायचा .. जाताना आख्ख तळेगाव पालथं घालावं लागायचं , सांगायचा मुद्दा हा कि कुत्री म्हटलं की त्यांची हद्द ठरलेली असते पण लाल्या सही सलामत रुबाब गाजवून एकटा परत घरी यायचा , रस्त्यात त्याला येताना 20-ते 30 कुत्री वाटेत भेटायची पण कोणाचीच त्याला भुंकण्याची किंवा त्याच्या अंगावर जाण्याची बिशाद नव्हती , इतकी त्याने त्याची जबर बसवली होती .. बाकी सर्व कुत्री तो दिसला की शेपूट खाली घालून लाल्या ला सलाम ठोकत असत ..
हळू हळू वडिलांचं लाल्यावर प्रेम वाढलं आणि लाल्या ला आठवड्यातून दोन वेळा चिकन किंवा मटण अगदी उकडून हळद लाऊन मिळू लागलं .. आणि लाल्या एकदम आमच्या घरचा होऊन गेला .
हाच ताकदवान गावठी लाल्या घरामागे चम्पी कुत्री मरण पावली तेंव्हा तिची छोटी एकटी पिल्लं बघून हळवा झालेला आम्ही पाहिला होता त्याने चम्पी पश्चात पिल्लांची भरपूर काळजी घेतली आणि 5 पिल्लं जगवली , नॉर्मली अस कधी नर कुत्रा म्हटलं की बघायला मिळत नाही ..
पण लाल्या वेगळा होता , हळवा , प्रेमळ , मस्तीखोर , ताकतवाण आणि खरतर एक डॉन च होता ..
आई आजारी पडली की लाल्या काहीच खात नसे हे विशेष की त्याला आई नेच खायला द्यायला लागायचं दुसऱ्या कोणाकडून ही लाल्या काहीही खात नसे ..
अगदी घरातला एक मेम्बर असल्या सारखा होता तो ,
12 वर्ष आमच्या सोबत राहून तो देवाघरी गेला ..
लाल्या गेला त्या दिवशी आमच्या घरी चूल पेटली नाही आणि आम्ही सर्व जण उपाशी झोपलो होतो ..
वरील कथा वाचून त्याची आठवण झाली ,,
. #अनिल_शिंदे

Address

Rajapur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when राजापूरकर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share