24/10/2025
महाराष्ट्राची थाळी म्हणजे संस्कृती, परंपरा आणि प्रेमाचा संगम.
पुरणपोळीच्या गोडव्याने सण साजरे होतात, मिसळ पाव आणि वडापाव शहराच्या गजबजाटात जीव ओवाळतात, तर पिठलं-भाकरी गावाच्या साधेपणात सुखाचा अनुभव देतात.
मांसाहारी प्रेमींकरिता कोल्हापुरी मसाल्याचं तीखटपण, मालवणी फिश करीचं किनारी गोडवा आणि सावजी मटणचा जोश ही महाराष्ट्राची खरी ताकद आहे.
हा फक्त स्वाद नाही — ही महाराष्ट्राची ओळख आहे, जी प्रत्येक थाळीतून, प्रत्येक सुगंधातून जिवंत राहते. 🌶️🥥