Lokvrutta News

Lokvrutta News साताऱ्यातील जनतेचा नीडर आवाज. चालू घडामोडी, राजकीय, प्रशासकीय व इतर बातम्यांसाठी 'लोकवृत्त न्यूज' ला फॉलो करा.
चॅनेल संपर्क क्रमांक - 90110 51115

We have immense pride in introducing ourselves as the one of the leading local Cable Channel of Satara District. We have an experience of more than 33 Years in Print Media. throught "Daily Jivhala" Marathi News Paper. And since Year 2000. "Lokvrutta" is offering its sincere in the field of information & Electronic Media. Through News and various reports "Lokvrutta" is activating many Political, So

cial, Economical issues. Because of our Sensitivity we became able to expand our success that with Media we can make people aware. We think this is the cause of our success that people are closely related to our Channel through various programmes.

हर घर तिरंगा..!भारताच्या स्वातंत्र्याचा गौरव, देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या बल...
09/08/2026

हर घर तिरंगा..!

भारताच्या स्वातंत्र्याचा गौरव, देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाला कृतज्ञ अभिवादन आणि राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ करण्यासाठी “हर घर तिरंगा” अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊया..!

📅 दि. ९ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आपल्या घरावर अभिमानाने तिरंगा फडकवूया.

या अभियानात सहभागी होण्यासाठी —
📸 तिरंग्यासोबत सेल्फी काढा
🌐 harghartiranga.com या वेबसाइटला भेट द्या
📤 आपला सेल्फी अपलोड करा
#️⃣ हा हॅशटॅग वापरा
आणि आपल्या सहभागातून ‘वंदे मातरम्’चा जयघोष घराघरात पोहोचवूया..!

तिरंगा हा आपल्या एकतेचा, अखंडतेचा, स्वाभिमानाचा आणि राष्ट्रनिष्ठेचा अभिमान आहे.

चला, घराघरात तिरंगा आणि मनामनात राष्ट्रप्रेम जागवूया आणि या राष्ट्रीय अभियानाचा अभिमानाने भाग बनूया..!

जय शिवराय..!
जय हिंद..!

09/08/2026

*NEWSDAILY DEFENCE & GEOPOLITICS*

🇮🇳🇧🇩 Indian High Commissioner to Bangladesh Dinesh Trivedi says, "We all respect Bangladesh PM Tarique Rahman a lot. He is a people's person, & our PM is also people's person. When 2 leaders meet, a lot of problems are solved".

🇮🇳🪖 A 20-year-old Bangladeshi national named Tara Mia was shot dead by the BSF during a confrontation with a group of cross-border smugglers.

🇮🇳🇦🇺 Australia's exercise Talisman Sabre 2027 from 9th to 22nd August, announces Australian High Commissioner to Delhi Green. India is participating in these exercises as Delhi, Canberra firm up defence ties.

🇸🇦🇾🇪 Industrial Security Firefighting Teams of Saudi Aramco extinguished a fire that broke out at dawn today (Jazan, red sea coast), says Saudi Govt. Houthis have claimed responsibility for the attack on the refinery on the red sea.

🇮🇷🇺🇸 Talks with the US won't happen while the interim deal is breached, Iranian minister says.

🇷🇺🇮🇳 Russia needs a railway to the Indian Ocean for access to India, to bypass Bosphorus & Hormuz risks, Russian Deputy PM Marat Khusnullin tells TASS News; Sees Turkmenistan, Iran, Afghanistan & Pakistan link.

🇳🇵🇮🇳 Nepal PM B***n Shah to meet Indian & Chinese envoys tomorrow.

🇮🇱🇵🇸 Israel PM Netanyahu rejects Gaza peace plan, says no Palestinian state as long as I am PM.

🇮🇳🇨🇮 Indian Armed Forces march at the Independence Day celebrations of Côte d'Ivoire in Abidjan.

🇮🇳🚀 IAF undertaking 60 defence programmes with DRDO & Private Sector as ₹21,000 crore opportunities identified.

🇵🇰 LeT senior operative Qari Abdul dies mysteriously at Quba mosque in Islamabad.

*Courtesy-Aditya Productions*

कर्नाटकच्या पर्यटकांवर आलेले संकट टळले; कास पठार परिसरातील दरीत अडकलेला मौल्यवान ड्रोन 'शिवेंद्रराजे रेस्क्यू टीम'ने केल...
09/08/2026

कर्नाटकच्या पर्यटकांवर आलेले संकट टळले; कास पठार परिसरातील दरीत अडकलेला मौल्यवान ड्रोन 'शिवेंद्रराजे रेस्क्यू टीम'ने केला सुखरूप बाहेर!

कर्नाटकच्या पर्यटकांवर आलेले संकट टळले असून कास पठार परिसरातील गणेश खिंड येथे दरीत अडकलेला मौल्यवान ड्रोन 'शिवेंद्रराजे रेस्क्यू टीम'ने सुखरूप बाहेर काढला आहे. सातारा येथील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या कास पठार परिसरातील गणेश खिंड येथे कर्नाटकहून आलेल्या पर्यटकांचे शूट सुरू होते. या शूट दरम्यान अचानक ड्रोनवरील नियंत्रण सुटल्यामुळे तो ड्रोन दरीत एका उंच झाडावर जाऊन अडकला.
अचानक घडलेल्या या घटनेमुळे पर्यटक अडचणीत सापडले, मात्र माहिती मिळताच 'शिवेंद्रराजे रेस्क्यू टीम' तातडीने घटनास्थळी दाखल झाली. टीमच्या सदस्यांनी अतिशय धाडसाने आणि कौशल्याने मदतकार्य राबवून पर्यटकांचा तो मौल्यवान ड्रोन सुखरूप शोधून बाहेर काढला. आपला हरवलेला ड्रोन सुरक्षितपणे मिळाल्यामुळे कर्नाटकवरून आलेल्या पर्यटकांनी 'शिवेंद्रराजे रेस्क्यू टीम'चे मनापासून आभार मानले. या यशस्वी मदतकार्यात चंद्रसेन पवार, सिद्धार्थ गायकवाड, आदित्य पवार, ऋषी रंकाळे आणि गणेश निपाणे यांचा सहभाग होता.

09/08/2026

ऑगस्ट क्रांती स्तंभ अभिवादनाचा लोकप्रतिनिधीना विसर
सातारा : प्रतिनिधी
सातारा जिल्हा क्रांतीकारकांचा म्हणून ओळखला जातो. क्रांतीकारकांचा जाज्वल्य इतिहास चिरंतन ठेवण्यासाठी हजेरी माळावर ऑगस्ट क्रांती स्तंभ उभारण्यात आला आहे. दि. ९ ऑगस्ट हा दिवस ऑगस्ट क्रांती दिन म्हणून राज्यभरात साजरा केला जातो. मात्र साताऱ्यात ऑगस्ट क्रांती स्तंभाला लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांना अभिवादन करण्याचा विसर पडला याचा जाहीर निषेध करत अवघ्या १० सामाजिक कार्यकर्त्यांनी स्तंभ परिसराची स्वच्छता करून अभिवादन केले.
महाराष्ट्रात राजकारण्यांना आणि सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना उठता बसता क्रांतीकारकांचे नाव घ्यावे लागते. मात्र, त्यातील कोणालाही या क्रांती दिनाबद्दल सोयरसुतक नसल्याचे रविवार दि. ८ ऑगस्ट क्रांती दिनी उघड झाले. जिल्हयात चार मंत्री, डझनभर आमदार, शेकडो लोकप्रतिनिधी आणि ५० हून अधिक शासकीय विभागाचे प्रमुख असणाऱ्या अधिकाऱ्यांची उदासीनता या दिवशी चव्हाट्यावर आली.रविवार दि.९ रोजी सकाळी हजेरी माळावर ऑगस्ट क्रांती स्तंभाला अभिवादन करण्यासाठी काही कार्यकर्ते गेले असता मुख्य गेटला कुलूप होते. याबाबत फोनाफोनी केल्यानंतर १० वाजता गेट उघडले. स्तभांभोवती अस्वच्छता, गवत, झुडपे दिसताच कार्यकर्त्यांनी थेट स्वच्छता केली. नंतर अभिवादन करून घोषणा दिल्या. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे ,भरत राऊळ ,शिवाजी जाधव ,गणेश अहिवळे,महारुद्र तिकुंडे,गुलाब बनसोडे ,विजय जाधव,कैलास कुंभार ,जयवंत कांबळेप्रज्योत तिकुंडे ,सागर जगदाळे ,मोहन शिंदे ,हणमंत शिंदे एवढे उपस्थित होते.
यावेळी सुशांत मोरे म्हणाले, क्रांतीकारकांच्या जिल्ह्यात जन्माला आलेल्या प्रत्येकाने याठिकाणी अभिवादन करण्यासाठी यायला हवे होते. मात्र मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी, जिल्ह्यातील मुख्य शासकीय अधिकाऱ्यांना या दिवशी अभिवादन केलेच पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांना क्रांतीकारकांच्या बद्दल शब्द उच्चारण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे सांगून सर्वांचा जाहीर निषेध व्यक्त केला. यावेळी महारुद्र तिकुंडे, शिवाजी जाधव, गणेश अहिवळे, कैलास कुंभार, जयवंत कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.

नीट (NEET) पेपरफुटीच्या देशव्यापी आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा देणारे वरिष्ठ भाजप नेते आणि खासदार धर...
09/08/2026

नीट (NEET) पेपरफुटीच्या देशव्यापी आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा देणारे वरिष्ठ भाजप नेते आणि खासदार धर्मेंद्र प्रधान यांनी पहिल्यांदाच आपल्या राजीनाम्यावर उघडपणे भाष्य केले आहे. भुवनेश्वर येथील जीएम विश्वविद्यालयाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी, देश आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा तसेच आकांक्षा लक्षात घेऊनच आपण राजीनामा दिल्याचे स्पष्ट केले. मात्र, यादरम्यान काही लोकांनी या संपूर्ण प्रकरणावरून युवा पिढीची जाणीवपूर्वक दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.

मागील १२ वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात महत्त्वाचे पद भूषवणाऱ्या धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी देशभरात मोठे विरोध प्रदर्शन पाहायला मिळाले होते. विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनामुळे सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला होता. दरम्यान, कार्यक्रमाच्या बाहेर विरोधकांकडून घोषणाबाजी करण्यात आली तरी आपण या कसल्याही परिस्थितीला घाबरत नसून एक शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे मागे हटणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी या कार्यक्रमात मांडली.

अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अन्नपदार्थ आणि पेयांमधील भेसळीबाबत अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे...
09/08/2026

अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अन्नपदार्थ आणि पेयांमधील भेसळीबाबत अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. खाद्यापदार्थांप्रमाणेच मद्यामध्ये विषारी रसायने मिसळल्याने मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्यानंतर, एफडीएने आता मद्यापासून ते शीतपेयांपर्यंत सर्वच स्तरांवर तपासणी तीव्र केली आहे. दुध, पनीर, खादयतेलांप्रमाणेच 'अल्कोहोलिक' आणि 'नॉन-अल्कोहोलिक' पेयांचीही कसून तपासणी केली जाणार असून, नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कोणत्याही प्रकारची तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा सज्जड दम त्यांनी भरला आहे.

एका विशेष मुलाखतीदरम्यान बोलताना तुकाराम मुंढे यांनी तरुणांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "यशस्वी व्यक्ती दिसते, पण त्यामागील संघर्ष आणि अपयश फार कमी जण पाहतात. त्यामुळे अपयश आल्यास खचून न जाता त्यातून धडा घेत पुन्हा उभे राहण्याची तयारी ठेवली पाहिजे." दरम्यान, अन्न उद्योगात नियम पाळणे आणि ग्राहकांनी सजग राहणे याद्वारेच संपूर्ण व्यवस्थेत सकारात्मक बदल घडून येऊ शकतो, असे महत्वपूर्ण विचार त्यांनी मांडले.

बारामतीमधून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली असून, बारामती विमानतळावर पुन्हा एकदा विमान दुर्घटना घडली आहे. प्राथमिक ...
09/08/2026

बारामतीमधून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली असून, बारामती विमानतळावर पुन्हा एकदा विमान दुर्घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, हे एक प्रशिक्षण (शिकाऊ) विमान असल्याची माहिती मिळत असून, विमान कोसळल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच परिसरात आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

हे विमान नेमके कशामुळे कोसळले आणि या दुर्घटनेत पायलट किंवा इतर कोणी जखमी झाले आहे का, याबाबतची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून अपघाताच्या कारणांचा सखोल तपास सुरू आहे. बारामती विमानतळावर यापूर्वीही अशा प्रकारच्या विमान दुर्घटना घडल्या असल्यामुळे, या नव्या घटनेनंतर पुन्हा एकदा उड्डाण सुरक्षेचा प्रश्न गंभीरपणे ऐरणीवर आला आहे.

09/08/2026

पुणे जिल्ह्यातील बारामती विमानतळाजवळ एका खासगी कंपनीचे प्रशिक्षण (शिकाऊ) विमान कोसळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कुणबी प्रमाणपत्र रद्द केल्याच्या मुद्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले असून, सध्या सुरू असलेल्या पश्चिम ...
09/08/2026

कुणबी प्रमाणपत्र रद्द केल्याच्या मुद्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले असून, सध्या सुरू असलेल्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान त्यांनी राज्य सरकारवर आणि मंत्र्यांवर अत्यंत कडक शब्दांत तोफ डागली आहे. पंढरपूरमध्ये विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर एका जाहीर सभेत बोलताना, सरकार आपल्याला संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप करत "मी जीवही घेऊ शकतो, पण सूड घेतल्याशिवाय राहणार नाही," असा इशारा त्यांनी दिला.

यावेळी बोलताना जरांगे यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. बावनकुळे यांच्यामुळेच कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यात आल्याचा दावा करत, प्रमाणपत्रांना बोगस म्हणणारे मंत्रीच बोगस आहेत, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. तसेच, आपल्या दौऱ्यात अडथळे आणण्याचे आणि हल्ला घडवून आणण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला असून, या संपूर्ण घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे

Address

11 Raviwar Peth Powai Naka
Satara
415002

Alerts

Be the first to know and let us send you an email when Lokvrutta News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Lokvrutta News:

Shortcuts

Share