मOरpankh

मOरpankh 𝐏𝐨𝐞𝐭। 𝐰𝐫𝐢𝐭𝐞𝐫। 𝐬𝐩𝐞𝐚𝐤𝐞𝐫। 𝐢𝐧𝐟𝐥𝐮𝐞𝐧𝐜𝐞𝐫

19/11/2025

आजचा दिवसही रोजच्या सारखाचं गेला!
म्हणजे सकाळी उठल्या-उठल्या तीच आवराआवर, कॅन्टीनचा नाश्ता, पोटभर भात, गर्लफ्रेंडचा फोन, मैत्रीणींशी फ्लर्ट, रोजचा प्रवास, ऑफिस कामाचा व्याप, तेच ते लोकं, घरची खुशाली, नाक्यावरचा दूध अन् आत्ता हिंडायला निघणं... म्हणजे अगदी रोजच्या सारखचं!
औचित्य असला तरी सोशल मीडियावरही फार काही आगपाखड वा हार्डकोर सदिच्छा वैगरे दिसल्या नाहीत.

कारण तर, तू माणुस आहेस!
नी म्हणूनच तुझ्या औचित्याला वैगरे काही अर्थ नसतो. असा सरळसरळ अन् गोड गैरसमज बाळगते ही सो कॉल्ड सोसायटी!

म्हणजे बघ ना, आज 'जागतिक पुरुष दिन' म्हणजे आपल्या बोलीत इंटरनॅशनल मेन्स डे वैगरे... परंतू दरवर्षीप्रमाणं यंदाही नव्यान्नव टक्के माणसांना ते माहीतीच नाहीये.
कुठेच फेसबुकच्या वॉलला शुभेच्छा वा विवेकवाद्यांचा कसलाही आकांडतांडव नाही, कुठे भराभर पोस्ट नाहीत अन् कुठेच आगपाखडही नाही.

कुणी विश केली तर आनंद आहेच! पण नसेल केली तर, त्यातही छे छे त्याचं काय एवढं.. असं म्हणून स्वभावातला तो नम्रपणा जपून, मनात कसलीही अडी न ठेवता, तितक्याचं इंटरेस्ट ने बोलनं-वागणं सुरू ठेवणारा पुरूष या मॉडर्न नारीहून ग्रेटच! 😁
❤️

मादेशवार मंगेश | १९/११/२०२५

11/11/2025

खरंतर, सर्वच दुःखद आहे!
देशात काल दोन अप्रीय घटना घडल्या. एक, दिल्लीत लाल किल्ल्यापाशी आय ट्वेन्टी कारचा स्पोट आणि त्या दुर्घटनेत अनेकांचा दुर्देवी मृत्यू.
दूसरी, काल रात्री अचानकपणे बॉलीवुडचे जेष्ठ अभिनेते, पद्मभूषण धर्मेंद्रजी यांच्या मृत्यूच्या सोशल मिडीयावरील खोट्या आणि संतापजनक बातम्या.

देशात आजवर कुणाच्याच मरणाची एवढी घृणास्पद वाट याआधी पहिली गेली नसावी असे एकुणच कालचे चित्र होते. इंस्टावरचे मोठ-मोठे पेजेस प्रचंड घाईत होते. सर्वात आधी जर आपण पोस्ट केली, तर अल्गोरिदम मध्ये आपला पहिला नंबर लागेल इतकाचं काय तो बालहट्ट! कुणाला नाही.. मलाच आधी कळलं. असली फालतुची फुशारकी मारण्याचा बावळट प्रयत्नचं तो खरंतर!
माणसांपेक्षा सणसणीत ब्रेकिंग बातम्या मोठ्या असतात, दुसऱ्याच्या घरात काय चाललयं ही उत्सुकता म्हणजे "लाचारी अन् त्यावर उगवणारी बुरशी बेवारस" इतकं साधं कळू नये माणसाला?? 😢

ही-मॅन म्हणून अभिनेता धर्मेंद्र यांना जगभरात चाहतात.
त्यांच्या चतुरंग अभिनयाबरोबरच त्यांच्या चित्रपटातील दोन गाणी मला अतिशय आवडतात. एक, इज्जत चित्रपटातील 'ये दिल तुम बिन कहीं लगता नहीं' आणि दुसरा, ब्लैकमेल चित्रपटातील 'पल पल दिल के पास'

हे दोन्ही गाणे आज तासभर आलटूनपालटून ऐकल्यानंतर धर्मेंद्रजींना उत्तम दिर्घार्युरारोग्य लाभो या प्रार्थनेसह...

मादेशवार मंगेश | दि. ११/११/२०२५

Here we go.. - 09/11/2025
09/11/2025

Here we go..
- 09/11/2025

उम्मीद रखों, हवा बदलेगी! - ०५/११/२०२५
05/11/2025

उम्मीद रखों, हवा बदलेगी!
- ०५/११/२०२५

Beyond contemplation!🫆-28/10/2025
28/10/2025

Beyond contemplation!🫆
-28/10/2025

बिहाइंड दी फोटो! आजच्याच दिवशी वर्षभरापुर्वी काढलेला हा फोटो. सव्वीस आक्टोंबर दोनहजार चोवीसचा! कुणी काढला अन् मला धाडला ...
26/10/2025

बिहाइंड दी फोटो!

आजच्याच दिवशी वर्षभरापुर्वी काढलेला हा फोटो. सव्वीस आक्टोंबर दोनहजार चोवीसचा! कुणी काढला अन् मला धाडला हे आज नक्की सांगता येत नाहीये, पण तो फोटो काय सांगतंय? हे आपल्यातील अनेकांना हमखास माहीतीये.

नेहमीसारखा दिवस नव्हताच! त्यादिवशी साधारणत: साडेचार-पाच होत होते. आमचा दादा दिल्लीहून परतून फ्रेश होऊन ऑफिसला येऊन बसलेला. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समीकडनं केव्हाही महाराष्ट्रातील अन् विशेषतः आमच्या जिल्ह्यातील विधानसभा उमेदवारांची नावं जाहीर होतील अशी स्थिती. धाकधुक सगळीकडंच होती. पण बुडणाऱ्या जहाजातून उंदरं जशी इकडं तिकडं पसार होतात तसे काहीजण ईधर-उधर करत होते. माझं सर्वांवर बारीक निरीक्षण होतचं. त्यांचं नावानिशी सत्कार ईथे करताही आला असता, पण आवश्यक वाटत नाहीये.

दिल्लीहून येतांना दादाचा कॉल आलेला माझं बोलणं झालं. त्यामुळं जरासा निश्चिंत होतो. आता जरासा याकरता कारण तर 'कार्यक्रम करेक्ट झाल्याशिवाय पुर्ण आनंदी व्हायचं नसतं हा दादानीच मला दिलेला सल्ला' सारखा डोक्यात फिरत होता. तिकडं अंदमानचा विमान फिरवून विनायककाकाही रिटर्न यायले ही बातमी समजली. त्यामुळं आता ट्विटर अन् युट्यूब मधून डोकसं काढून आपल्या कामाला लागलो.
पंचविसला दादा दिल्लीच्या दिशेनं रवाना होतांना मी रात्री दिडपर्यंत स्टैटिस्टिक्स तयार केलं अन् धाडलं. परंतू काही आवश्यक सुधारणा असल्यानं सुधीरभाऊंनी फोन केला. चांगलं केलयं सारं म्हणत त्यांनी दोन राजकीय सुधारणा सांगीतल्या. तेवढ्याकरता पुन्हा जेवता ताट सोडून कार्यालय गाठलं. सुधारणा केल्या, दादानं ओके दिला. ते दिल्लीत गेले. त्यानंतरचा सबंध घटनाक्रम देशानं बघितला.

सव्वीसला दुपारी दादानं मी कार्यालयात येतोय असं फोन करून सांगितलं. लागलीच मी पोराला सांगून पुढच्या ऑफिसचा टिव्ही ऑन कर अन् दादानं आवाज दिला तर मी मागे आहेच असं सांगून पुन्हा कामाला लागलो. बघता-बघता गर्दी झाली. दादा दिल्लीहून आला, कायं झालं? तिकिट आपली आहे की कालपासून तिकडे फटाके फुटायले ते खरखं? हे कुणालाच कळेना. एकुण काय? तर कार्यकर्त्यांचा मेंदूचा केमिकल लोचा झाला होता पुरता. जो तो यायचा.. मंगेश? मी आपला भाऊ प्लिज जरासा कामात आहे. असा उत्तर देऊन मोकळा!

अशात कार्यालयामध्ये गर्दी वाढली. लोकं दादाला प्रश्न-प्रतीप्रश्न करू लागले होते. दादा नेहमीप्रमाणं स्मित करून शंकेचा समाधान करत होता. तेवढ्यात दादानं आवाज दिला मंगेश.. मी निवडणुकीचे नमुना पाम्प्लेट घेऊन मान्यतेसाठी दादाकडं गेलो. दादान ते न्याहाळलं, निरिक्षण नोंदवलं. जमलेली कार्यकर्ते आम्हा दोघांकडही पाहत होती. काहींनी तर तेव्हाच मला मुर्खात काढलं असावं. कारण इकडे तिकीटाचे वांदे झालेयेत यांचे अन् हा पोरगा काय प्रचार पाम्प्लेटचा नमुना दाखवायला? असा सूर होता एकूणच!
मी मान्यता घेतली. टिव्हीवर नजर फिरवली अन् पुन्हा वॉररूममध्ये घुसलो. अचानक आनंदाचा पारावार राहीला नाही! जो तो नाचायला लागला! काहींच्या तोंडावर ग्रहण लागले. तिकडं मुख्यरस्त्याकडं तर सुतकं लागलेला. टिव्ही नाईनवर बातमी फिरली. ब्रम्हपुरीतून क्रिष्णालाल सहारे, वरोरा करण देवतळे तर देवराव भोंगळे यांना राजुऱ्यामधून उमेदवारी देण्यात आली आहे! जल्लोषाचा अर्थ समजला. मी बीजेपी इंडीयाचा ट्विट बघितला. खात्री म्हणून पक्षाच्या फेसबुकवॉलला दोनदा स्कोल केलं. अन् मनात आनंद उफाळून आला. 'याजसाठी केला होता अट्टाहास' म्हणत स्वतःचचं अभिनंदन केलं अन् क्षणार्धात जबाबदारीची जाणीव ठेऊन पक्षाचे, पक्षश्रेष्ठींचे आभार मानण्याकरता देवरावजींची आभारपर ट्वीट लिहायला घेतली. लोकं मला ओरडून सांगत होती. कुणी आलिंगन तर कुणी 'भाऊ नाच' म्हणत होती. मी वॉररूममधनं पुढे आलो, सोनलताईच्या चेअरवर जाऊन बसलो आणि सोशल मीडियासह पत्रकारांकरता पोस्ट लिहायला घेतली. कार्यकर्ते दादांचं अभिनंदन करत होती. स्वप्न्यानं फटाक्यांची आतषबाजी सुरू केली. त्या आनंदापुढं राजुऱ्यात घालवलेला पुर्ण वर्ष कमी वाटत होता. आजवरची दुःख-प्रताडणा प्रत्येकजण विसरला होता. दादाच्या जिद्दीला अन् कर्तुत्वाला नेतृत्वानं लावलेली मोहर होती ती तिकीट जाहीरीची घोषणा!

साऱ्यांचा अभिनंदन आटोपलं. माझ्या सर्व सहकाऱ्यांनीही दादांना शुभेच्छा दिल्या. दादानं मला जवळ बोलावून घेतलं. आलिंगन दिलं. दोघांच्याही डोळ्यात आपसूकच आनंदाश्रू तरळले. एरवी दादानं डोळ्यानी खुणावलं की मी डोक्यानं समजून घ्यायचो असा आमचा स्नेह राहीला आहे. पण आता डोळे काहीच खुणावत नव्हते. निघणाऱ्या अश्रूंसह उद्यापासून करावयाच्या तयारीची धांदल स्पष्ट दिसत होती डोळ्यात. दादा म्हणाला मंगेश आपण जिंकलो. एक पडाव यशस्वी झाला... आता विजय दूर नाही. लढेंगे और जितेंगे भी! मी अश्रू पुसत नुस्ता होकार देत राहिलो.

पण हा क्षणचं माझ्यासाठी विजय होता!
विजय होता... पार्सल म्हणून हिणवणाऱ्यांवर!
विजय होता... पेड 'गु'मतीच्या कुरघोड्यांवर!
विजय होता... मागच्या वर्षभरात आम्हाला ठिकठिकाणी आपल्यांनीच मारलेल्या टोमण्यांवर!
विजय होता... लोकसभेनंतर फेसबुकवर भला मोठा ट्रक पाठवून आता सामान भरून निघा म्हणाऱ्यांवर!
विजय होता... आम्हाला अहंकारी म्हणणाऱ्या खुज्यांवर!
विजय होता... पक्षाच्या कार्यक्रमांना नावबोट ठेवणाऱ्या हरामखोरांवर!
विजय होता... इना-मिना-डिका म्हणून कार्यकर्त्यांवर होणाऱ्या चिखलफेकीवर!
विजय होता... निरर्थक लोकसभेच्या पराभवाचा ठपका ठेवणाऱ्यांवर!
विजय होता... कार्यकर्त्यांच्या फळीला टार्गेट करणाऱ्यांवर!
विजय होता... राजुरा रणसंग्राम अन् गडचांदूर सम्राट नावानं चिल्लरपणा करणाऱ्या अतार्किक वर्तवणुकीवर!
विजय होता... आपल्याच गटागटांनी गावागावांत जाऊन अपप्रचार करण्यावर!
विजय होता... घरका भेदी लंका ढाय प्रवृत्तींवर!
विजय होता... फुसळेल्या राजकीय पांडीत्यावर!
अन्
विजय होता... विणा अजेंड्याच्या रेडीमेट नेत्यांवर!

आता पुढची निवडणूक एकोणतीसमध्ये असेल. तथापि, आता अनेक बाबतीत भलामोठा बदल झाला आहे. स्थिती गती अन् परीस्थिती दररोज नाईंटी डिग्रीत बदलत चालली असली तरी.. ह्या आठवणी सदैव ताज्या राहोत या सदिच्छेसह...

पुन्हा भेटू... इथेच!

- मादेशवार मंगेश | दि. २६/१०/२०२५
(तिकिटाचा दिवस)

24/10/2025

बोलायचं अन् सांगायचही भरपूर आहे. ते टप्प्याटप्प्यानं अन् विस्तारानं बोलूचं!
तथापि, अतिशय शॉर्टकटमध्ये अलीकडच्या काही बाबी मांडतोय. मला साधारणतः सातेक दिवसांआधी माझ्या राजुऱ्यातल्या एका फार जुण्या मित्राचा फोन आलेला. त्याने एक-दोन विषय सांगितले. मी हसलो तो बावरला.. ही सेड काय फालतूपणा चाललायं यांचा? ह्यांच्या मायचा फोदा! मी म्हणालो भाऊ प्लिज.. आणि उत्तरलो, एकतर 'आय रीपीट' शिशुपालाचे शंभर अपराध मी दररोज मोजायलो. त्यात तो आता सत्यान्नऊ-अठ्यान्नऊ पर्यंत पोहोचलाय.. सो वेट! आणिक त्यानंतर एका सहकाऱ्याने डिटेल धाडलेल्या चिंतनीय संदेशाच्या उत्तरात लिहलं 'मौनं सर्वार्थ साधनम्ं!
बस्स..
खरंतर, कुठल्याही क्षेत्रात काम करणाऱ्यांना अडचणी, कुरघोडी, हस्तक्षेप, वाटाघाटी, डावपेच अन् सोयरसुतक आदिंचा ससेमिरा हा कधीना कधी अनुभवायला लागतोच. त्यातलाच मी देखील! त्यामुळं जमीनीशी पाय घट्ट असणाऱ्यांनी कसलीच तमा करायची नसते. हा सुविचार रटून-रटून लहानाचे मोठे झालेल्यांना त्याचे फार नवल वाटत नाही. प्रत्यक्षात माझी कुणाशी स्पर्धा नाही. मी कुणाला प्रतिस्पर्धी ही मानत नाही. कारण तेवढी तिथे कुणाची लानत नाही. मला सर्वांचाच भुत व वर्तमान माहीतीये. त्यामुळं मी अनेकांच्या बाबतीत फार कमी बोलतो. कारण तर च्युत्यांवर अर्थात् आमच्या मिरिबाईच्या भाषेत फुसळेल्यांवर एनर्जी अन् वेळ वाया घालवून काहीही साध्य होत नाही.
मराठीत एक सुंदर सुबोध आहे 'निंदकाचे घर असावे शेजारी' अन् मी तर वर्षभर निंदकांसह एकाच घरात राहीलोय.. त्यामुळं त्यांच्यात फार काही सर्जनशीलता किंबहुना परिपक्वता वैगरे नाहीये. हे मला चांगल्यानं ठाऊक आहे.
सो.. त्यांना योग्य वेळी योग्य उत्तर मिळेल!

आता राहीला दुसरा प्रश्न, सहकाऱ्याच्या संदेशाचा.. सटीक अन् तत्वावधानी होत त्याचं बोलणं. परंतू एकोणिसशे तेहतीस साली जर्मनीत हिटलर सत्तेत आल्यावर त्यानं नाझींच्या प्रचाराची धुरा ज्या जोसेफ गोबेल्सवर दिली, त्याची टेक्निक अन् भारतात ब्रिटिशांनी अवलंबिला 'फोडा आणि राज्य करा धोरण' त्याला मी आधीच मुद्देसूद पटवून सांगीतलं असल्यानं, त्याला मी नुस्तचं मौनं सर्वार्थ साधनम्ं म्हणून मोकळा झालो आहे.

सद्या घरी आहे. येत्या काळात काहीतरी नविन करायचं डोक्यात आहे. त्यासाठी तयारीही सुरूच आहे. त्यासंदर्भात ही आपल्याशी लवकरच शेअर करणार आहे. परंतू सद्या देशात अन् घरात टिव्हीनं बिहारच्या निवडणूकांचा हाहाकार माजवलाय. बिहारात राजद, जेडीयू, व्हिआयपी, भाजप, कॉंग्रेस यांसह प्रशांत किशोर यांचा जनसुराज्य ही चर्चेत आहे. निवडणूकांची प्रचारसीमा, निकाल आणिक स्ट्रेटेजी याकडं माध्यमशास्त्राचा विद्यार्थी म्हणून मी देखील लक्ष घालून आहे. परंतू आजवर लोकांसाठी प्रचाराची स्ट्रेटेजी ठरविणारे प्रशांत किशोर हे स्वतः निवडणूकीत सामिल झाले असल्याने सर्व काही मजेशीर चाललयं, अन् ते एन्जॉय करणे क्रमप्राप्त आहे.

वास्तविक पाहता, मी भाजप समर्थक असलो तरी अमीत शहा अन् स्वतःला अमीतभाई समजणाऱ्यांना फार मानत नाही. या प्रशांत किशोर नावाच्या अवलीयाने दोन हजार बारा साली मोदींच्या तिसऱ्या टर्मच्या मुख्यमंत्री पदाकरता अन् पुढं चौदा साली पंतप्रधान पदाच्या निवडणुकीकरता प्रचंड कल्पक अन् नाविन्यपूर्ण प्रचाररणनीती आणली. त्यानं सिटीझन्स फॉर अकाउंटेबल गव्हर्नन्स ह्या मीडिया व प्रसिद्धी कंपनीच्या माध्यमातनं देशात प्रचाराची नवी संकल्पना अवतरवीली. पण आपण भक्तांनी सरळसरळ शहांना श्रेय देऊन पाठ बडवीली. पुढे बिहारातही त्यांनी नितीशला यशस्वी मदत केली. सो.. यासंदर्भात 'रीलेटेड टू ग्राऊंड' असा अतिशय मजेशीर अभ्यास आहे. तो टप्प्याटप्प्यानं इथे मांडेन. आपल्याकडं भरपूर वेळ आहे.

याशिवाय, दोन हजार अठरा साली तिकडं राजस्थानात निवडणूकांच्या काळात हिंदूंवर झालेले अत्याचार अन् त्यासंदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनी केलेली डोळेझाक यामुळं मतदारांनी भाजपवर जबरदस्त रोष काढला होता, हे ही आपण बघितलं आहे.
तेव्हा तिथे जनतेने 'मोदी तुझसे बैर नहीं, और वसुंधरा तेरी खैर नहीं' असा उद्घोष केला होता. हे ही लक्षात असूनद्यात!
हे सर्व आज मांडण्याला विषेश कारण आहे.

असो...
पुन्हा भेटू... इथेच!

मादेशवार मंगेश | दि. २४/१०/२०२५

प्रकाशपर्व दिपोत्सव अन् लक्ष्मीपूजनाच्यासबंध आप्त-स्नेही-स्वकीयांना मंगलमय शुभेच्छा!🌼ही दिवाळी आपल्या आयुष्यात आनंद, ज्ञ...
21/10/2025

प्रकाशपर्व दिपोत्सव अन् लक्ष्मीपूजनाच्या
सबंध आप्त-स्नेही-स्वकीयांना मंगलमय शुभेच्छा!🌼

ही दिवाळी आपल्या आयुष्यात आनंद, ज्ञान, मर्यादा, समाधान, समृद्धी अन् सद्सद्विवेक घेऊन येवो, हीच सदिच्छा! 🪔💥

14/10/2025

जुनं सारंकाही विसरून पुन्हा नवी सुरवात करायची असं ठरवलं तरीही अचानक एखादं तारीख, एखादं व्यक्ती अन् विसरता विसरलेले ते शब्द अचानक आठवतात. क्षणार्धात सारा पसारा डोळ्यापुढं उभा ठाकतो. हात थांबतात, मेंदू जाम होतो अन् मन परत मागे जाते.
खरंतर स्तब्ध असतो आपण. काय आठवत असतो आपण? कदाचित काहीच नाही!
रिकामं असतं सारं! अचानक नजर शून्य झालेली असते. आपण जिथं आता होतो तिथं राहत नाहीत त्या क्षणाला. नजर शून्य झालेली असली तरी, मन फार दूर गेलेलं असतं. भूतकाळाच्या गर्द वनात वाट दिसत नसतानाही त्याच बेभान धावणं सुरूच असतं; शक्य-अशक्यतांच्या गोंधळात सैरभर धावत असतो तो, एखाद्या झपाटलेल्या कस्तुरीमृगाप्रमाणं!
कुठे धावतो मन? माहीत नसतं. त्या तारखेत, त्या व्यक्तीत की त्या शब्दांत? काय शोधतो आपण? कदाचित स्वतःला?
माहीत नाही!
पण त्यांना टाळून आपण पुढं जात नाहीत. तिथंच घुटमळतो. अस्वस्थता फार होत नसली तरी, थोडी काळजाच्या कोपऱ्यात एक सल कायम सलत राहते. काहीतरी असतं तिथं जे सांगता येत नाही, धडं लिहिता ही येत नाही.
ते प्रेम नाही, राग-अनुराग, मत्सर, आकर्षण, हेवा, आठवण, विरह यापैकीही काहीच नाही.
पण; काहीतरी आहे जे सुटल्यासारखं वाटत राहतं कायम... अगदी आयुष्यभर! पण तरीही सांगता येत नाही!
कदाचित, जे सुटले ते आयुष्य तर नसेल ना, सखे?

- १५/१०/२०२५

बिट्टू गेला! ही बातमीच खरंतर गाव, जंगल अन् अस्सल व्याघ्रप्रेमी असणाऱ्या माझ्या सारख्या सर्वांसाठी दुःखद आहे. आमच्या सिंद...
13/10/2025

बिट्टू गेला!
ही बातमीच खरंतर गाव, जंगल अन् अस्सल व्याघ्रप्रेमी असणाऱ्या माझ्या सारख्या सर्वांसाठी दुःखद आहे. आमच्या सिंदेवाही तालुक्यात असा एकही माणुस नसावा ज्याला बिट्टू (T-40) या वाघाबद्दल माहीती नसावी. अबालवृद्धांपासून जंगलांच्या चप्प्याचप्प्याला बिट्टू माहीत होता. काल रात्री गोंदिया-बल्लारशहा ट्रेननं सिंदेवाही रेल्वेस्थानकापासून अगदी दोन किमी अंतरावर कारगाटा जंगल परीसरात त्याला धडक दिल्याने तो मृत पावला.
चांदाफोर्ट टू गोंदिया या रेल्वेमार्गावरील ही साधारणपणे अठरावी घटना आहे. रेल्वेच्या धडकेने असे तरूण-तरणाबांड वाघं मरणं अन् वन व रेल्वे प्रशासनाला त्यावर काहीही ठोस निर्णय करता न येणं म्हणजे नुस्तेच दुर्दैवी आहे.

खरंतर, लहानाचे मोठे झालोत. समज अन् उमज आली तेव्हा आमच्या चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे हे पुस्तकातनं वाचलं. परंतू स्वतःच्या डोळ्यांनी चंद्रपूर पहायच्या आधीच आम्ही वाघं पाहीली. ताडोबाशी संबंध आला नसला तरी आमच्या तालुक्यातील वासेरा-पिपर्डा-कळमगांव कडील जंगल हा ताडोबा कोअर-बफर मध्ये असल्याने अन् आम्हीही ब्रम्हपुरी वनविभागाचा ताजा ऑक्सिजन घेऊनच मोठे झाल्यानं वाघ बघण्यात काही कमी नाही. त्यातचं तळोधीपासनं तर इकडे राजोली अन् नवरगांव पासनं तिकडे एकाऱ्यापर्यंत आपली टेरीटरी निर्माण करणारा बिट्टू आमच्या जवळचा!
तसा, बिट्टू हा सिंदेवाही शहराच्या चौफेर फिरतांनाचा अनेकांना आढळायचा. जाटलापूर-सिंदेवाही-आलेवाही-कच्चेपार-गुंजेवाही-तांबेगढी मेंढा हा त्याचा कोअर इलाका! असं आम्ही मानतो. पण बिट्टू ला आलेवाही रेल्वे स्टेशन अन् त्याच्या आसपासचा परीसर जबरदस्त पसंत पडला असावा, म्हणूनच की काय १२ वर्षाचा हा वाघ याच भागात नेहमी दिसायचा. त्याचा राजबिंडा देह, चित्तथरारक डरकाळी, भेदक नजर, शिकारीचा हूनर सारंकाही जबरदस्तचं होते.
माझा मित्र सुरज तर दररोज वनविभागाला पत्ता न लागू देता बिट्टूला नुस्ता भेटायचा. सुरज अन् बिट्टू हा समिकरणचं जुळलेला. सुरज आत्ता या क्षणाला बिट्टू कुठे असावा रे? असा प्रश्न जरी त्याला कुणी केला; तर तो परफेक्ट उत्तरापर्यंत जाईल, एवढं त्याचा बिट्टूप्रेम सर्वश्रुत होता.
आमच्या गावाकडील रस्त्यांनं दुपारी-तिपारी कधिही बाईकस्वारांना, गुराख्यांना, हौशांना अन् शेतकऱ्यांनाही भलामोठा ढोऱ्या वाघं दिसला, की समजावं 'ही ईजे बिट्टू'

खरोखरीच बिट्टू बिट्टू होता. एक व्याघ्रप्रेमी अन् त्याहून बिट्टू लवर म्हणून त्याच्या जाण्याची कल्पनाच करवत नाहीये. एरवी वाघांना दोन ते तिन फिमेल्स असतात. परंतु आमच्या बिट्टूला जवळजवळ तेरा ते चौदा फिमेल्स होत्या. हे किती मजेशीर अन् त्याचा दबदबा दाखविणारे आहे, नाही?

वयाच्या ऐण बारा-तेराव्या वर्षी बिट्टूच रेल्वेच्या धडकेत जाणं, त्याचा भाऊ श्रीनिवासचंही तिकडं ब्रम्हपुरी तालुक्यातील मुडझा गावाकडं शेतशिवारात विद्युत करंट लागून मरणं हे अतिशय दुर्दैवी आहे.

साधारणपणे दोन वर्षे वयानंतर वाघ शिकारीला सुरवात करतो परंतू अवघ्या दिडच वर्षात शिकारीवर तुटुन पडणाऱ्या अन् आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या 'जय' (T-01) वाघाचा बिट्टू बछडा! नागझिऱ्यात जन्मलेल्या अन् उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्याला पालथा घातलेल्या जय ची किर्ती जशी जगभर होती. अगदी तसाच बापाप्रमानं बिट्टू आमच्या गावगाड्यात फेमस होता.
'जय' आणि 'चांडीला' या दोन वाघांच्या पोटी बिट्टू आणि श्रीनिवास जन्माला आले. ही दोन्ही वाघं २०१४ साली उमरेड-कर्हांडला वन्यजीव अभयारण्यात जन्माला आली असली तरी तरणाबांड वाघांची कर्मभूमी असलेल्या आमच्या ब्रम्हपुरी वनविभागातच त्यांचा जीव रमला.
या भागात ते स्थिरावले, आपला साम्राज्य विस्तारला, जगले, तगले अन् नियतीच्या मनाने इथेच मेले सुद्धा!

खरंतर जंगलं अन् जंगली श्वापद जगली पाहीजेत या मताचेच आम्ही आहोत. परंतू धोरणकर्त्यांचे धोरण नुस्तेच कागदावर उपयोगाचे नाहीत. तर ते जमीनीवरही दिसलेत तर निसर्गाच्या कालचक्राप्रमाणं जगण्यात मज्जा येईल. काल बिट्टू गेला. अलीकडेच ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील बफर क्षेत्राचा अनभिषीक्त सम्राट म्हणून मिरवणारा 'सीएम' उर्फ 'छोटा मटका' (T-126) ब्रम्हा सोबतच्या युद्धात जखमी झाल्यानं त्याचेही आयुष्य आता कायमचे जेरबंद झाले. त्याची डरकाळी आता जंगलात ऐकू येणार नाही, तर ती आता पिंजऱ्यातच ऐकावी लागणार आहे. ही बाब देखील व्याघ्रप्रेमींसाठी तितकीच वेदनादायी आहे. परंतू ही गोष्ट विसरता-विसरताच असं अचानक बिट्टूचं जाणं मन हेलावून टाकणारं आहे.

त्यामुळं, भविष्यात असे दुर्दैवी घटना घडू नयेत याकरता वन व रेल्वे प्रशासनानं चालढकलं करणं सोडून यासंदर्भात ठोस उपाययोजना करणे क्रमप्राप्त आहे. बल्लारशहा-चांदाफोर्ट-गोंदिया हा रेल्वेमार्ग ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, ब्रम्हपुरी वनविभागाचा बहुतांश भाग आणि नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प अशा अतिसंवेदनशील वनक्षेत्रांमधून जात असल्यानं या क्षेत्राला 'वन्यजीव कॉरिडॉर' घोषित करून त्याठिकाणी Wildlife Mitigation Structures अद्ययावत करीत रेल्वे मार्गाच्या खाली किंवा वर प्राण्यांना सुरक्षितपणे मार्ग पार करता यावा यासाठी योग्य आकाराचे आणि नैसर्गिक स्वरूपाचे वन्यजीव अंडरपास आणि ओव्हरपास (पूल) बांधल्यास मोठे फायद्याचे ठरेल. रेल्वे ट्रॅकच्या दोन्ही बाजूंनी संवेदनशील क्षेत्रांमध्ये मजबूत आणि उंच तारांचे कुंपण (Fencing) उभारावेत ज्यामुळे प्राणी थेट ट्रॅकवर येऊ शकणार नाहीत. परंतु, हे कुंपण वन्यजीवांच्या पारंपरिक मार्गाला (कॉरिडॉरला) अडथळा न आणता, त्यांना अंडरपास/ओव्हरपासकडे वळवणारे असावेत हे ही तितकेच महत्त्वाचे आहे. यासोबतच रेल्वे मार्गाजवळ वन्यप्राण्यांची उपस्थिती ओळखण्यासाठी Thermal Imaging Cameras, Motion Sensors किंवा अन्य अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रेल्वेच्या मोटरमनना त्वरित अलर्ट देणारी प्रणाली स्थापित केल्यास फार चांगल होईल.

बिट्टूला भावपूर्ण श्रद्धांजली! 🐯🌼😥

मादेशवार मंगेश | दि. १३/१०/२०२५

Sooraj Prakash Bansod

कोजागिरी पौर्णिमा! 🩶- 06/10/2025
06/10/2025

कोजागिरी पौर्णिमा! 🩶
- 06/10/2025

आज स्वप्निलचा वाढदिवस!त्याचे सारे मनोवांछित पुर्ण होवोत या सदिच्छेसह त्याला उत्तम दिर्घार्युरारोग्याच्या भरपूर शुभेच्छा!...
05/10/2025

आज स्वप्निलचा वाढदिवस!
त्याचे सारे मनोवांछित पुर्ण होवोत या सदिच्छेसह त्याला उत्तम दिर्घार्युरारोग्याच्या भरपूर शुभेच्छा! 💐💐

चांगले सहकारी लाभणं हे तुमच्या सत्कार्माचे फळ असते. परंतू ते टिकवणं अन् जपणं यावर तुमचा यशापयश अवलंबून असतो. हे अगदी सरळ अन् साधं गणित आहे.
राज्याच्या पंधराव्या विधानसभेचे सदस्य असलेल्या देवरावदादांचा सारा पत्रव्यवहार त्यांच्या राजुरा कार्यालयातूनच होतो. आणि अतिमहत्त्वाचा, तातडीचा व वैशिष्ट्यपूर्ण पत्रव्यवहाराकरता लेखनाची धुरा जरी माझ्यावर असली, तरी ज्यांच्या संगणकावरून ते मुर्त रुपास येतं त्यात स्वप्निल माझा अतिमहत्त्वाचा साथीदार आहे.

मी सुरवातीलाचं म्हटलं चांगले सहकारी लाभणं हेच आपली शक्ती असते अगदी त्याचप्रमाणं माझ्याकरता काही माणसं आहेत. अतिमहत्त्वाचा मंत्रालयीन पत्रव्यवहार मी आमच्या जितूभाऊला देत असलो तरी आपणातिल अनेकांना ज्या सदिच्छासंदेश, अभिनंदनपत्रे वा आमदार महोदयांकरवी कौतुकाची थाप देणारे पत्रे मिळत असतील ते सारं स्वप्निल करतो. म्हणजे शब्द जरी माझे असले तरी ते मला हवे तसे पत्रांवर छापुन देणारा कौशल्यपुरुष तो आहे. आमच्या सर्वांत तो धाकटा असल्याने त्याच्यावर वजनापेक्षा कामाचा भार अधिक! त्याहूनही वाईट शिपायापासून तर बाबूपर्यंत साऱ्यांची कामं करण्याचा त्याचा शिव्याखाया स्वभाव. त्याला स्वतःला त्रासदायक ठरणारा आहे.
तरीदेखील मी दिलेली कामं शिताफीनं डन करणं, केव्हाही, कोणतंही मागीतलेलं पत्र हजरजबाबी देण्याची त्याची हातोटी अन् 'तुम्ही फक्त सांगा सर वेळेची पर्वा मी ही करत नाही' असा त्याचा अव्यक्त विश्वास माझ्या अंगावर किलोभरं मांस वाढवतो. हे नमुद करण्यासारखेच!
स्वप्नील अगदी सुरवातीपासून आमचा सहकारी आहे, मधात विधानसभेच्या निवडणुकीत तो नव्हता. पण त्याने आजतागायत कोणत्याही कामात कसलीच कसर सोडली नाही. स्वतःच्या अंतर्मनात काय घालमेल चाललीये वा कधी मी ही थकलोय अशी जाणिव ज्याच्या चेहर्‍यावर मला आजतागायत दिसली नाही. असा हा कनखर पोरगा मला दररोज नवउर्जा देतो. खरंतर त्याला आईबाबा दोघेही नाहीत, सद्यस्थितीही सद्या बेताचीच. तरीदेखील परीस्थितीचा ना बाऊ ना चिंता! 'कामात लक्ष रामा' या म्हणीप्रमाणं तो दररोज माझ्यासोबत असतो.

एरवी, मी गप्पा करतांना सहज म्हणतो, 'ये जितूभाऊ और स्वप्निल मुझे दे दो बस.. बाकी अख्खी विधानसभा अपुन संभाल लेगा' हे गमतीशीर असलं तरी, या पोरांच्या मेहनतीवर असलेला माझा विश्वास अन् त्यांची कामाप्रतीची प्रामाणिकता याचा हा सरळसरळ उद्घोष आहे.
पण असं म्हणतात ना, जसं दिसतं तसं नसतं, अन् म्हणुनचं जग फसतं.. अगदी त्याचप्रमाणं इव्हेंटबाज पुढं मिरवतात. तर प्रसिद्धीचा दर्प रील्सवर झळकतो. परंतु 'आपल्या नेतृत्वाची प्रगती, हीच आपल्या कामाची पोचपावती' असा धोरण स्विकारलेल्या मला सातत्यपूर्ण साथ देणारी ही माणसं, हा पोरगा कायम त्याच्या कामाप्रती कृतज्ञ करून जातो.

थाबंताना एवढंच... की, नेतृत्वाने बाविस केरेटच्या नादात आपली चोविस केरेटहून मौल्यवान माणसं दुर्लक्षीत करू नये इतकंच!

बाकी, स्वप्निल ला पुन्हा एकदा शुभेच्छा!
अन् मी कुठेही असलो तरी तुझ्या कायम सोबत आहे या विश्वासासह...

- मादेशवार मंगेश | दि. ०५/१०/२०२५

Address

Sindewahi

Alerts

Be the first to know and let us send you an email when मOरpankh posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to मOरpankh:

Share