
18/07/2025
तिसरीपासनंच इतिहासाच्या पुस्तकाच्या माग चिकटलेला नागरीकशास्त्र पुढं इयत्ता सहावीपासनं स्वतंत्र आल्यावरही तितकाचं मन लावून वाचला. त्यानंतर आंतराष्ट्रीय राजकारण अन् राज्यशास्त्र वाचायच्याआधी अथेन्सची लोकशाही, चाणक्य अन् त्याचा अर्थशास्त्र वाचला.
पुढं मगं सक्रिय राजकारण प्रैक्टिकली समजून घेण्याच्या आधीच लेनीन, स्टालिन, हिटलर, कार्ल मार्क्स यांचा वाद अन् नाद भराभरा वाचून काढत अमेरीकन, फ्रेंच अन् बोल्शेविक क्रांतीची पुस्तकंही कम्प्लीट केली.
हे सगळं करूनही एम. लक्ष्मीकांत, रामचंद्र गुहा अन् थापरच्या रोमीलाबाई यांसारख्या नावडत्या लेखकांसंग रात्रभर जागून काढत आवडते टिळक अन् सावरकर ही वाचले.
पण... काल, आज अन् उद्याही राजकारण समजून अन् समजाऊन बघतांना मला इटलीचा मॅकियाव्हेली अन् त्याचा 'द प्रिंस' दररोज वाचावा वाटतो.
तो म्हणतो, शासकाने लोकांना आकर्षित करण्यासाठी आणि स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी कोणत्याही मार्गाचा अवलंब करणे योग्य आहे, मग ते नैतिक असो वा नसो. त्यामुळं नैतिकतेला फाट्यावर मारून राजकारण करणे चुकीचे नाहीच. असे तो सरळसरळ म्हणतो. नव्हे तर मानतो!
अलीकडे मी ही राजकारण अन् राजकारणी जवळून पाहतो. त्यांच्या बोथट व्यूहरचना, भविष्य खड्ड्यात घालणारे निर्णय अन् धृतराष्ट्राचा कारभार बघून आज लिहावंसच वाटतयं!
काल-परवा विधानभवनात हाणामारी झाली. जिथे राज्याच्या हिताच्या निर्णयांचा गवगवा अपेक्षित आहे तिथे एकमेकांच्या आईबहिणींच्या गुह्यअवयवांचा उद्धार ऐकला. जिल्ह्यातल्या राजकारणातही खुला विरोध अन् जैसै को वैसा म्हणत अनेकांनी अनेकांना 'ना घर का, न घाट का' करून ठेवल्याची स्थिती.. मजेशीर आहे.
यालाच तर राजकारण ही म्हणतात, नाही?
मॅकियाव्हेली म्हणतो, की लोकांमध्ये शासकांबद्दल प्रेम असणे चांगले, पण त्यापेक्षा जास्त महत्वाचे म्हणजे लोकांनी शासकाला घाबरले पाहिजे. पण आपल्याकडे असेही चित्र नाही. कुठे प्रेमाच्या झऱ्याऐवजी विहीरीच लागल्यात तर कुठे घाबरवणाऱ्यांनाच गप्प केलं जातयं!
असो... जिसकी लाठी उसकी भैंस या म्हणीप्रमाणं चालूद्यायचं सगळं!
फक्त ज्यांना राजकारणातला 'र', शासनातला 'श' आणि प्रशासनातला 'प्र' अजूनही कळत नाही त्यांनी उगाच चोमडेपणा करून फुशारक्या मारू नये इतकचं!
बाकी.. एवरीथींग गोईंग ईज बॅड, सो गुड नाईट माय डियर!
मादेशवार मंगेश | - १९/०७/२०२५