yash

yash yash

11/04/2026
08/04/2026

उद्योगपती अनंत मुकेश अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या सोलापुरात समाजसेवेचा महाउपक्रम

५ हजार घरांत देणार "अनंत" आनंदाचा शिधा

१४ ठिकाणी होणार अन्न, शिक्षण, आरोग्य, पाणी आणि स्वावलंबन उपक्रमाचा संगम

“एक वाढदिवस… हजारो हास्य...माणुसकीचा महोत्सव"

सोलापूर व्हिजन न्युज,

प्रसिद्ध उद्योगपती अनंत मुकेश अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त शिखर पहारिया फाउंडेशनच्या वतीने गुरुवार दि. ९ एप्रिल २०२६ रोजी शहर व जिल्ह्यात तब्बल १४ ठिकाणी विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत सोलापूर शहरातील जुनी मिल कंपाऊंड मैदान येथे ५ हजार गरजू कुटुंबांना अन्नधान्य किट वाटप करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. याच वेळी इतर उपक्रमांचाही प्रारंभ होणार आहे. सोलापुरात समाजसेवेचा महाउपक्रम आणि माणुसकीचा महोत्सव होणार आहे, अशी माहिती फाउंडेशनचे तन्वीर शेख आणि राज सलगर यांनी दिली.
या कार्यक्रमास मान्यवर उपस्थित राहणार आहेत. फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दिवसभरात सोलापूर शहर व जिल्ह्यात विविध १४ ठिकाणी हे उपक्रम राबविले जाणार आहेत. जिल्ह्यातील २०० विद्यार्थिनींना सायकली, १ हजार विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात येणार आहे. अनाथ आश्रमासाठी ५० बेड देण्यात येणार असून, २०० महिलांना शिलाई मशीनचे वितरण करून त्यांना स्वावलंबनाकडे वाटचाल करण्यास मदत केली जाणार आहे.
शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी विविध १० शाळांमध्ये आरओ फिल्टर प्लांट बसविण्यात येणार आहेत. तसेच शहर व जिल्ह्यातील शाळांना डिजिटल स्मार्ट बोर्ड देण्यात येणार असून, १० शाळांमध्ये संगणक संच देऊन विद्यार्थ्यांना संगणक साक्षर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आर्थिक अडचणीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नयेत या उद्देशाने ३०० विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घेण्यात येणार आहे. याशिवाय सोलापुरात १०० ठिकाणी जनावरांसाठी पाण्याची सोय करण्यासाठी पाण्याची पात्रे बसविण्यात येणार असून, त्याठिकाणी नियमित पाणी पुरवठाही केला जाणार आहे.
वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या घरांसाठी तसेच मंदिरांसाठी १ हजार पत्र्यांचे वाटप करण्यात येणार आहे. कुंभारी येथील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नगर येथे बोअर मारून सबमर्सिबल पंप बसविण्यात येणार असून ग्रामस्थांच्या पाण्याची सोय केली जाणार आहे. तसेच कुंभारी येथील गेनसिद्ध देवालय येथे ५८.५ केव्हीए क्षमतेचा जनरेटर बसविण्यात येणार आहे.
आरोग्य उपक्रम राबवून मोठा दिलासा देण्यात येणार असून आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या गरजू रुग्णांसाठी विविध प्रकारच्या १०० शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत. एकाच दिवशी इतक्या व्यापक प्रमाणावर राबविण्यात येणाऱ्या या महाउपक्रमामुळे सोलापूर जिल्ह्यात माणुसकीचा महोत्सव होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन फाउंडेशनचे धर्मराज गुंडे, कौशल शिंदे, सूर्या शेट्टीयार, तुषार जोगदनकर, धीरज कारंडे यांनी केले आहे

वाढदिवसानिमित्त उपक्रमाची ठळक वैशिष्ट्ये

- सोलापूर शहर-जिल्ह्यात १४ ठिकाणी एकाच दिवशी उपक्रम
- ५ हजार कुटुंबांना अन्नधान्य किट करत गरजूंना थेट आधार
- शिक्षण, आरोग्य, पाणी व स्वावलंबनावर विशेष भर
- वरिष्ठ प्रशासनिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शुभारंभ
- ३०० विद्यार्थी दत्तक , १ हजार बॅग, २०० मुलींना सायकली वाटप
- १०० मोफत शस्त्रक्रियाने गरीब रुग्णांना दिलासा
- २०० महिलांना शिलाई मशीन

08/04/2026

पार्क चौकातील नेहरू वसतिगृह होणार इतिहासजमा!

चौकात नेहरू वसतिगृहाच्या जागी भव्य बहुमजली संकुल ; झेडपी उत्पन्नवाढीसाठी पालकमंत्र्यांचा धडाकेबाज निर्णय

प्रत्येक सदस्याला वर्षाला १ कोटी निधी; झेडपी इमारतीला लिफ्ट, शाळांच्या विकासालाही गती

जीर्ण इमारत पाडून बहुमजली आधुनिक संकुल उभारणार

सुमारे २ एकर मोक्याच्या जागेचा विकास होणार

विद्यमान गाळेधारकांना प्राधान्याने पुनर्वसन

झेडपीच्या उत्पन्नवाढीसाठी मोठा निर्णय

बीओटी तत्त्वावर विकासाला स्पष्ट नकार

झेडपी सदस्यांना ‘१ कोटी’चा विकासनिधी

ग्रामविकास खात्यातून निधीची हमी

विकासकामांना वेग देण्याचा निर्धार

सोलापूर व्हिजन,

सोलापूर, दि.७ एप्रिल

सोलापूर शहराच्या हार्ट ऑफ सिटीमध्ये म्हणजेच पार्क चौकात असलेले नेहरू वसतिगृहाची जीर्ण इमारत पाडून तेथे बहुमजली संकुल उभारण्याचा प्रस्ताव तयार करा अशा सूचना राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांची पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोमवारी बैठक घेतली. या बैठकीला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, समाजकल्याण सभापती संस्कृती सातपुते, आरोग्य व शिक्षण सभापती चेतनसिंह केदार, पक्षनेत्या रश्मी बागल यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, महापालिकेचे आयुक्त आदी उपस्थित होते.



या बैठकीत पालकमंत्री गोरे यांनी जिल्हा परिषदेचे नूतन पदाधिकारी व सदस्यांशी संवाद साधला. जिल्हा परिषदेत कामानिमित्त येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला मान द्या. त्याचे काम होईल याकडे पहा, अशा सूचना त्यांनी दिल्या. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वैद्य यांनी विकास कामासाठी निधी द्या अशी मागणी केली. उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी झेडपीचे उत्पन्न वाढले पाहिजे याबाबत उपाययोजना सुचवल्या. जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम विभागाचा पदभार घेतल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मालमत्तेची माहिती घेतली आहे.

सोलापूर शहर त्याचबरोबर तालुक्यात मोक्याच्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या जागा आहेत. या जागांचा विकास केल्यावर जिल्हा परिषदेच्या तिजोरीत भर पडणार असल्याचे त्यांनी सुचवले. समाज कल्याण सभापती संस्कृती सातपुते यांनी दिव्यांग कल्याण विभागाचे कामकाज आपल्याकडे येत असल्याने माझे कार्यालय पहिल्या मजल्यावर आहे. दिव्यांग बांधवांना मला भेटण्यास येण्यासाठी त्रास होत आहे. त्यासाठी लिफ्टची सोय करावी अशी मागणी केली. आरोग्य व शिक्षण सभापती चेतन सिंह केदार यांनी सोलापूर शहरातील शाळांचा स्मार्ट स्कूलच्या धरतीवर विकास करणे गरजेचे असल्याचे सांगितले.

जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनांचे पालकमंत्री गोरे यांनी स्वागत केले.

माझ्याकडे ग्रामविकास खाते असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या विकास कामाला निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी त्यांनी ग्वाही दिली. प्रत्येक सदस्याला वर्षाला एक कोटीचा विकास निधी मिळेल. झेडपीच्या मुख्य इमारतीला तातडीने लिफ्ट बसविण्याच्या त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांना सूचना केल्या. जिल्हा परिषदेच्या सोलापूर शहरात 12 शाळा आहेत. या शाळा मोक्यांच्या जागी आहेत. यापूर्वी महापालिकेने या शाळांची मागणी केली आहे. पण जागेची किंमत मोठी असल्यामुळे महापालिकेकडे या शाळा कोणत्याही परिस्थितीत वर्ग केल्या जाणार नाहीत असे त्यांनी स्पष्टीकरण दिले. या शाळांचा दर्जा वाढविण्यासाठी सुविधा दिल्या जातील असेही त्यांनी आश्वासन दिले.

उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी सुचवलेल्या उपाययोजनावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मोठे भाष्य केले आहे. जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढविण्यासाठी जागांचा विकास केला जाईल पण बीओटीवर या जागा दिल्या जाणार नाहीत असेही त्यांनी स्पष्ट केले. पार्क चौकात मोक्याच्या ठिकाणी असलेल्या नेहरू वस्तीगृहाची इमारत जीर्ण झाली आहे. ही इमारत पाडून बहुमजली संकुल उभारण्याचा जिल्हा परिषदेने प्रस्ताव तयार करावा व जिल्हा परिषदेच्या सर्व जागांना कुंपण बांधावे अशा सूचना त्यांनी दिल्या.

शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या वस्तीगृहाची दोन एकर जागा जिल्हा परिषदेच्या मालकीची आहे. या इमारतीच्या दोन्ही बाजूला असलेल्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांना प्राधान्यक्रम देत नव्याने या इमारतीचा विकास केला जाईल असा प्रस्ताव तयार करा असेही त्यांनी सुचविल्याचे सांगण्यात आले. जिल्हा परिषदेकडे ९९ वर्षे कराराने काही जागा होत्या. पण प्रशासक काळात काही जागा परत केल्याचे प्रकरण समोर आले आहे. याचीही चौकशी केली जाणार आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा परिषदेच्या प्रश्नात लक्ष घालून धडाकेबाज निर्णय घेण्याचे सुरू केल्यामुळे सदस्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व सदस्यांबरोबर संवाद साधला. पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवावेत विकासनिधी, जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढविण्यासाठी जागेचा वापर, शाळांचा विकास यावर सकारात्मक चर्चा केली आहे. नेहरू वसतीगृहाच्या विकासावरही चर्चा झाली आहे.

इंद्रजीत पवार उपाध्यक्ष, सोलापूर जिल्हा परिषद


07/04/2026
07/04/2026

“शांती चौक स्मशानभूमी वादावर अखेर पडदा; सिद्धेश्वर देवस्थानचा ठाम खुलासा”

‘ स्मशानभूमीबाबत आमची कोणतीही हरकत नाही; महापालिका घेईल जो निर्णय घेईल तो मान्य’ – धर्मराज काडादी

सोलापूर व्हिजन,
सोलापूर, दि. ७ एप्रिल

शहरातील शांती चौक येथील स्मशानभूमीच्या जागेबाबत सुरू असलेल्या वादावर अखेर श्री सिद्धेश्वर देवस्थानने स्पष्ट भूमिका मांडत पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. सदर जागा महापालिकेने होटगी मठाला किंवा इतर कोणत्याही संस्थेला दिल्यास त्याबाबत देवस्थानची कोणतीही हरकत नसल्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी जाहीर केले.
प्रसिद्धीपत्रकात त्यांनी स्पष्ट केले की, श्री सिद्धेश्वर देवस्थानने कधीही या जागेची मागणी महापालिकेकडे केलेली नाही.
मात्र, महापालिका निवडणुकीपूर्वी प्रशासनाच्या कार्यकाळात, लिंगायत समाजासाठी स्मशानभूमीचे व्यवस्थापन देण्याच्या दृष्टीने देवस्थानच्या अनुभवाचा विचार करून त्यांना सहकार्य करण्याबाबत प्रस्ताव देण्यात आला होता. या प्रस्तावात आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नावाचाही उल्लेख करण्यात आला होता.
या संदर्भात देवस्थानच्या बैठकीत चर्चा होऊन सहकार्याची तयारी दर्शविण्यात आली आणि त्यानुसार महापालिकेला होकारार्थी कळविण्यात आले होते. त्या काळात संबंधित जागा देवस्थानकडे देण्याबाबत ठरावही करण्यात आला होता. मात्र, निवडणुकीनंतर प्रत्यक्ष ताबा घेण्याबाबत कोणतीही पुढील कार्यवाही झालेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
निवडणुकीनंतर या मुद्द्यावरून सुरू असलेल्या राजकारणावर भाष्य करत काडादी यांनी काही मंडळींवर टीका केली. लिंगायत समाजात तसेच विविध संस्था आणि व्यक्तींमध्ये मतभेद निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. गेल्या काही वर्षांपासून देवस्थानविरोधात खालच्या पातळीचे राजकारण सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.
महत्त्वाचे म्हणजे, संबंधित जागेबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार पूर्णतः महानगरपालिकेकडे असून, कोणताही निर्णय घेतल्यास देवस्थान त्यास विरोध करणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.या खुलाशामुळे शांती चौक स्मशानभूमीच्या जागेबाबत सुरू असलेल्या चर्चांना दिशा मिळाली असून, अनावश्यक वादांना आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


▪ देवस्थानने स्मशानभूमीच्या जागेची कधीही मागणी केली नाही
▪ प्रशासनाकडून निवडणुकीपूर्वी सहकार्याचा प्रस्ताव देण्यात आला होता
▪ देवस्थानने त्या वेळी सहकार्याची तयारी दर्शवली होती
▪ निवडणुकीनंतर विषयावर राजकारण रंगले
▪ समाजात व संस्थांमध्ये दुही निर्माण करण्याचा आरोप
▪ अंतिम निर्णयाचा अधिकार महापालिकेकडेच

Address

Kumtha Naka
Solapur
413003

Alerts

Be the first to know and let us send you an email when yash posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share