Lokshasan

Lokshasan News portal

17/07/2025

LIVE:

महायुती सरकार मस्त, मुंबईकर मात्र त्रस्त

Mumbai Congress's Press Conference on corruption and misgovernance in Mumbai

#महायुती_मस्त_मुंबईकर_त्रस्त
#महाभ्रष्टयुती
Indian National Congress - Maharashtra

13/07/2025

LIVE:

लढाई आमुची सत्याची, संघर्ष संविधान जगवण्यासाठी..!
लढाई आमुची समतेची, संघर्ष लोकशाही टिकवण्यासाठी..!

संविधान जिंदाबाद जनसभा

📍भायखळा, मुंबई

#संविधान_जिंदाबाद #बाबासाहेब_जिंदाबाद
#जयभीम #जयसंविधान

09/07/2025

LIVE: महायुती सरकार मस्त, मुंबईकर मात्र त्रस्त

Mumbai Congress's Press Conference on corruption and misgovernance in Mumbai

#महायुती_मस्त_मुंबईकर_त्रस्त
#महाभ्रष्टयुती

 #नागोठण्यात  भिम जयंतीचा जल्लोष , नेत्र दिपवून टाकणारी भव्य मिरवणूक व प्रबोधनात्मक कार्यक्रमातून समाजप्रबोधन आंबेडकरी च...
27/04/2025

#नागोठण्यात भिम जयंतीचा जल्लोष , नेत्र दिपवून टाकणारी भव्य मिरवणूक व प्रबोधनात्मक कार्यक्रमातून समाजप्रबोधन

आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते एस.एन. गायकवाड यांना समाजभूषण पुरस्काराने गौरव

रायगड- धम्मशील सावंत
....... बौद्धजन पंचायत समिती नागोठणे विभाग शाखा क्रमांक 3 यांच्या विद्यमाने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वभूषण महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वा सार्वजनिक जयंती महोत्सव धुमधडाक्यात व जल्लोषात साजरा करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह एस टी स्टॅण्ड शेजारी भिम जयंती निमित्त विविध प्रबोधनात्मक वैचारिक कार्यक्रम, बहुजन महापुरुषांच्या जीवन कार्यावर व्याख्यान , महापुरुषांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक, तसेच प्रबोधनात्मक गीत गायन कार्यक्रम पार पडले.या कार्यक्रमात आंबेडकरी बहुजन चळवळीतील ज्येष्ठ नेते , मार्गदर्शक , सेवानिवृत्त विस्तार अधिकारी एस एन गायकवाड (भाऊसाहेब )यांना मान्यवरांच्या हस्ते समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी सन्मानार्थी एस एन गायकवाड यांनी समाजाने समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून पुढील आयुक्ष ही समाजहित व आंबेडकरी बहुजन चळवळीच्या उन्नतीसाठी खर्ची घालणार असल्याचे सांगितले.
या जयंतीत भिमानुयायी व बहुजन समाज बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन जयंतीची शोभा वाढवली. जयंतीदिनी सकाळी 9.00 वाजता बुद्ध पूजापाठ, पंचशील ध्वजारोहण, (बौद्धचार्य श्रामनेर संघ नागोठणे विभाग), दुपारी 3.30 ते 7.00 वाजता विश्वशांतीदूत तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची नागोठणे शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी 7.30 वाजता बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष एस.एन. गायकवाड यांच्या अध्यक्ष तेखाली जाहीर सभा पार पडली. यावेळी स्वागताध्यक्ष ज्येष्ठ सल्लागार चंद्रकांत गायकवाड व ऍड- प्रकाश कांबळे यांनी विचार व्यक्त केले .
कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन ज्येष्ठ कवी प्रभाकर ओव्हाळ यांनी केले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून भारतीय हितकारणी संघाचे संस्थापक अध्यक्ष सिध्दार्थ शिवमारे सभेला संबोधित केले. सिध्दार्थ शिवमारे यांनी आपल्या भाषणात डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला भारतीय संविधान देऊन राष्ट्राला लोकशाही प्रणालीवर वाटचाल करण्याची दिशा दिली. संविधानाचे पैलू उलगडताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात सात अधिकार दिले आहेत, अजून 63 अधिकार बाकी आहेत, हे 63 अधिकार मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे खरे आंबेडकरी चळवळीचे काम आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला दिलेल्या शिकवणुकीत खूप शिका, उच्च शिक्षण घ्या, परदेशी शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न करा, तसेच प्रशासनातील माऱ्याच्या आणि मोक्याच्या जागा बळकवा, एमपी एससी, युपीएस्सी चे शिक्षण घेऊन अधिकारी बना , शिक्षण घेऊन तुम्ही वकील व्हा डॉक्टर व्हा इंजिनियर व्हा, राष्ट्र उन्नतीसाठी काम करता करता स्वतःची आर्थिक परिस्थिती सुधारून स्वतः सक्षम बना असे शिवमारे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.
या कार्यक्रमास उपस्थितांकडून भरभरून दाद मिळाली.
दरम्यान काल कथित शोभाताई चंद्रकांत म्हात्रें यांच्या स्मरणार्थ साहिलभाई म्हात्रें (साहिल ऑप्टिकल नागोठणे)यांजकडून भोजनदान देण्यात आले. बौद्धजन पंचायत समिती नागोठणे विभाग शाखा क्रमांक 3 चे पदाधिकारी, सभासद,
जयंती उत्सव कमिटी चे सर्व पदाधिकारी सभासद, तसेच भीमशक्ती मित्रमंडळ व रमाई मंडळ आदींसह विभागातील मंडळांनी अहोरात्र मेहनत घेतली.
आदींनी मेहनत घेतली.

शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये, स्वर्गीय वसंतराव ओसवाल यांना अभिप्रेत असलेले शैक्षणिक काम , सेवाभाव व सामाजिक बांधिलकीचा ...
16/03/2025

शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये, स्वर्गीय वसंतराव ओसवाल यांना अभिप्रेत असलेले शैक्षणिक काम , सेवाभाव व सामाजिक बांधिलकीचा विचार व वारसा जोपासणारे कार्य आम्ही सर्व संचालक मंडळ एकमताने व एकदिलाने करू:सौ. गीताताई पालरेचा यांचे प्रतिपादन

सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या नव्या अध्यक्ष पदाची माळ कुणाच्या गळ्यात, 23 मार्च ला फैसला

रायगड.(धम्मशील सावंत)सुधागड एज्युकेशन
सोसायटी पाली ही संस्था गेली अनेक दशकापासून रायगड सह नवी मुंबईत ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत आहे. शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये यांनी सन १९४१ मध्ये लावलेल्या या शिक्षण संस्थेच्या रोपट्याचे रूपांतर आता वटवृक्षात झालेले आहे. शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये यांनी स्वर्गीय वसंतराव ओसवाल यांच्यावर त्या काळी अत्यंत विश्वासाने सोपवलेली जबाबदारी त्यांनी प्रामाणिकपणे व कर्तव्ये तत्परतेने पार पाडली. ही शैक्षणिक संस्था नावारूपाला यावी यासाठी ओसवाल यांचे योगदान मोठे व अतुलनीय राहिले आहे. सद्यस्थितीत स्वर्गीय वसंतराव ओसवाल यांच्या नंतर संस्थेचे अध्यक्ष पद हे रिक्त झालेले आहे. यावेळी सु. ए.सो शैक्षणिक संस्थेचा कारभार ओसवाल व लिमये एकत्रितच पाहणार असल्याचे प्रतिपादन सौ. गीताताई पालरेचा यांनी केले. पाली येथील कार्यालयात शनिवारी दि.(15)मार्च रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पालरेचा व संचालक मंडळातील पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. कै. शिक्षण महर्षी व आदिवासी सेवक दादासाहेब लिमये यांनी आदिवासी पाड्यांच्या नसानसांत शिक्षणाचे वारे पोहचवून, त्यांना शिक्षण प्रवाहात आणण्याचे असामान्य कार्य केले. १९४१ मध्ये त्यांनी स्थापन केलेल्या सुधागड एज्युकेशन सोसायटीमार्फत त्यांनी रायगड जिल्हयाच्या शहरी आणि ग्रामीण भागात सुमारे ४० शिक्षण संस्था स्थापन केल्या, पुढील काळात सु.ए. सो संस्था टिकवणे जोपासणे व वाढविणे यासाठी स्वर्गीय वसंतराव ओसवाल यांनी आपल्या हयातीत तन मन धनाने झोकून देत महत्वपूर्ण योगदान दिले. सद्यस्थितीत सु.ए.सो च्या या रिक्त असलेल्या अध्यक्ष व सचिव पदाच्या निवडीसाठी दि.23 मार्च 2025 रोजी संचालक मंडळाची महत्वपूर्ण बैठक पालीत आयोजित केली असून या बैठकीत सर्वानुमते व लोकशाही पद्धतीने रिक्त पदाची निवड करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. त्यामुळे सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या नव्या अध्यक्ष पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? याचा फैसला 23 मार्च रोजी होणार असल्याने या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पत्रकार परिषदेत बोलताना ज्येष्ठ पदाधिकारी प्रकाश कारखानीस, ग.रा.म्हात्रें , रमेश साळुंके म्हणाले की सुधागड एज्युकेशन शैक्षणिक संस्थेचे कामकाज आजवर पारदर्शक पद्धतीने व सर्व संचालक मंडळ यांच्या एकमुखी निर्णयाने होत आले आहे. आजवर संस्थेच्या कामकाजात कधीही कोणतीही गटबाजी व राजकारणाचा एक अंश ही दिसून आला नाही, यापुढे देखील शैक्षणिक उद्देश ठेवूनच हे कार्य निरंतर सुरू राहील असे म्हटले. शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये, स्वर्गीय वसंतराव ओसवाल यांना अभिप्रेत असलेले शैक्षणिक काम , सेवाभाव व सामाजिक बांधिलकीचा विचार व वारसा जोपासणारे कार्य आम्ही सर्व संचालक मंडळ एकमताने व एकदिलाने करू अशी शाश्वती सौ. गीता ताई पालरेचा यांनी दिली.
या पत्रकार परिषदेत सु.ए. सो संचालक मंडळातील पदाधिकारी व वसंतराव ओसवाल यांच्या कन्या सौ. गीताताई पालरेचा , तसेच ज्येष्ठ पदाधिकारी प्रकाश कारखानीस, ग रा म्हात्रें सर, रमेश साळुंके, हर्षा चांदोरकर आदी उपस्थित होते.

अश्विनीताई ठाकूर यांची रिपब्लिकन सेनेच्या महिला रायगड जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती, आनंदराज आंबेडकरांनी सोपवली मोठी जबाबदा...
02/02/2025

अश्विनीताई ठाकूर यांची रिपब्लिकन सेनेच्या महिला रायगड जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती, आनंदराज आंबेडकरांनी सोपवली मोठी जबाबदारी

पाली/बेणसे दि.(धम्मशील सावंत)- आंबेडकरी बहुजन चळवळीत तसेच सामाजिक सेवाभावी क्षेत्रात कायम अग्रेसर व सक्रिय राहणाऱ्या अश्विनी ताई ठाकूर यांची रिपब्लिकन सेनेच्या रायगड जिल्हा महिला अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि इंदू मिल लढ्याचे प्रणेते , रिपब्लिकन सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे पत्र रायगड जिल्हा अध्यक्ष अमित गायकवाड, महासचिव वैभव केदारी यांच्या उपस्थितीत नुकतेच प्रदान करण्यात आले. अश्विनी
ठाकूर यांनी आजवर विविध सामाजिक संघटनांची प्रमुख पदे भूषवली आहेत. ठाकूर या सर्वसामान्य जनतेचे मूलभूत प्रश्न व नागरी पायाभूत समस्या मार्गी लावण्यासाठी सतत कार्यरत असतात. आदिवासी ठाकूर समाजाचे प्रश्न सोडविण्यात देखील त्या अग्रेसर असतात. संकटात व अडीअडचणीच्या प्रसंगी त्या धावून येऊन सर्वांना मदत करतात. त्यांचा रायगड जिल्ह्यात जनसंपर्क दांडगा असून त्यांच्या एकूणच कामकाजाची दखल घेऊन त्यांच्यावर रायगड जिल्हा महिला अध्यक्ष पदी निवड केली आहे. अश्विनी ठाकूर यांच्या कुशल व सक्षम नेतृत्वाखाली पक्ष संघटना जोमाने वाढेल असा विश्वास वरिष्ठांनी व्यक्त केला आहे. रायगड जिल्हा हा क्रांतिकारी, लढाऊ व महापुरुषांच्या पदस्पर्शाने , पराक्रमाने पावन झालेला जिल्हा आहे. छ.शिवाजी महाराज आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर या जागतिक कीर्तीच्या महापुरुषांच्या महान विचारांनी ही भूमी पवित्र झाली आहे. महाडच्या क्रांतिभूमीत मनुस्मृती चे दहन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी
स्त्री स्वातंत्र्याचा हुंकार दिला. चवदार तळ्याच्या पाण्याचा सत्याग्रह करून सामाजिक समतेचे बीज रोवले. याच रायगड जिल्ह्यात रिपब्लिकन सेनेची झपाट्याने वाढ व्हावी, संघटनेची ध्येय उधिष्टे घराघरात पोहचून पक्ष संघटना अधिक मजबूत व बळकट व्हावी यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने जोमाने कामाला लागावे व तन मन धनाने योगदान द्यावे असे आवाहन आनंदराज आंबेडकर यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले आहे. पक्षाने माझ्यावर ज्या विश्वासाने जबाबदारी सोपवली त्या जबाबदारी ला योग्य तो न्याय देणार असून वरीष्टांनी माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थकी ठरविणार असल्याची ग्वाही नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षा अश्विनी ठाकूर यांनी दिली. ठाकूर यांची रायगड जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याने युवती व महिला वर्गात नवचैतन्य व उत्साह निर्माण झाला आहे. अश्विनी ठाकूर यांच्या
या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे. यावेळी रेखा सिंग यांची पेण तालुकाध्यक्षपदी, प्रज्ञा ताई भोजने यांची महासचिव पदी नियुक्ती करण्यात आली. या निवडीने पक्ष संघटना जोमाने वाढेल अस बोलले जात आहे.

फोटो ओळ 1
अश्विनीताई ठाकूर यांची रिपब्लिकन सेनेच्या महिला रायगड जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती होताच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देताना रिपब्लिकन सरसेनानी आनंदराज आंबेडकर व अन्य.(छाया: धम्मशील सावंत,पाली बेणसे)

27/01/2025

हरीश शेट्टी : कैंसर के खिलाफ और स्वस्त जीवन के लिए लड़ने वाले सामाजिक योद्धा

आप जो खाना खाते है, वह या तो सुरक्षित और शक्तिशाली दवा की तरह होता है, या ज़हर की तरह होता है। खाना और स्वास्त एक जंग की नज़र से देखना चाहिए, यह डॉ हरीश शेट्टी का अभियान है। एक प्रसिद्ध होटल व्यवसायी, परोपकारी और सार्वजनिक स्वास्थ्य देखभाल दाता जिन्होंने पोषण और स्वाद के बीच सामंजस्यपूर्ण संतुलन बनाने के लिए अपना जीवन समर्पित कर दिया है। एक यात्रा जिसने लाखों लोगों को प्रेरित किया और उनका जीवन बदल दिया।

अहार्वेद: भोजन के माध्यम से स्वास्थ्य के लिए एक क्रांतिकारी दृष्टिकोण
डॉ शेट्टी ने व्यक्तिगत रूप से इस बीमारी से लड़ाई लड़ी है। इस प्रकार उन्हें अनुभव हुआ कि पौष्टिक भोजन कितना शक्तिशाली होता है। इसीलिए डाॅ. शेट्टी ने पौष्टिक भोजन कैसे खाया जाए, इस पर एक अभियान शुरू किया है। डॉ.ने कहा कि भोजन न केवल जीविका का साधन है बल्कि एक प्राकृतिक औषधि है जो शरीर और मन को पोषण देता है। शेट्टी का आहारवैद दर्शन बताता है. आप जो खाते हैं वही तय करता है कि आप क्या हैं। इसीलिए डाॅ. शेट्टी के अनुसार, "आप अपने आहार और स्वास्थ्य से कैसे संबंधित हैं, यह तय करता है कि आप कौन हैं।"

सुधागड शिवसेनेत (शिंदे गट) वादाची ठिणगी, माजी जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई यांच्या आरोपांचे व टिकेचे सर्व पदाधिकाऱ्...
22/01/2025

सुधागड शिवसेनेत (शिंदे गट) वादाची ठिणगी,
माजी जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई यांच्या आरोपांचे व टिकेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी केले खंडन

रायगड(धम्मशील सावंत)

सुधागड तालुक्यात शिवसेनेत (शिंदे गट) वादाची ठिणगी पडली आहे. नुकताच प्रकाश देसाई यांनी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिला. त्यावेळी प्रकाश देसाई यांनी स्थानिक पदाधिकारी यांच्यावर टीका केली होती. त्या अनुषंगाने प्रकाश देसाई यांच्या टिकेला प्रत्युत्तर देण्यासाठी सोमवारी (ता.20) शिवसेनेचे (शिंदे गट) तालुकाप्रमुख व माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र देशमुख, रायगड उपजिल्हाप्रमुख अनुपम कुलकर्णी, रायगड जिल्हा युवा प्रमुख संजय म्हात्रे, मिलिंद देशमुख, संदिप दपके,यांनी पत्रकार परिषद घेऊन या टिकेचे खंडण केले.
प्रकाश देसाई यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये एक खंत व्यक्त केली. पक्षामधील काही लोकांनी पक्षात पदे अडवून ठेवलेली आहेत. तसेच पक्षाच्या कामात सुसुत्रता दिसत नाही. नेतृत्व गुण व कार्य नसलेल्या व्यक्तींनादेखील पदे दिली जात आहेत. पक्ष वाढीसाठी मेहनत घेणारे काम करणारे पदापासून दूर राहत आहेत. परिणामी पक्ष संघटनेला संघटनात्मक नुकसान सहन करावे लागत असल्याचे ताशेरे देसाई यांनी ओढले होते. शिवसेनेचे तालुकाप्रमुख रवींद्र देशमुख यांनी सांगितले की, पाली नगरपंचायतीमध्ये एक हाती सत्ता आणली नाही, असा आरोप प्रकाश देसाई यांनी केला होता. मात्र देसाई यांना एक हाती सत्ता स्वतःच्या ग्रामपंचायतीमध्ये आणता आली नाही. तसेच शिवसेनेच्या बहुतेक ग्रामपंचायती आम्ही निवडून आणल्या, यातील काही बिनविरोध जागा देखील आम्ही निवडून आणल्या आहेत. प्रकाश देसाई यांना स्वतःची ग्रामपंचायत देखील पूर्णता घेता आली नाही. असे रविंद्र देशमुख म्हणाले.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये जिल्हा संपर्कप्रमुख सुधागड तालुक्यात प्रचारासाठी कधी फिरलेच नाहीत. सुधागड तालुक्यात शिवसेनेच्या किती ग्रामपंचायती आहेत हे तरी त्यांना माहिती आहे का? पाली नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये असे सांगितले होते की पाली नगरपंचायतीमध्ये एक नगरसेवक जर निवडून आणलात तर अभिनंदन करेन. आम्ही चार नगरसेवक निवडून आणले. पाली पोटनिवडणुकीमध्ये शिवसेना (शिंदे गट) कडून जो उमेदवार दिला होता, त्याच्या विरोधात सर्व पक्ष एका बाजूला आणि शिवसेना (शिंदे गट) एका बाजूला अशी लढत होऊन देखील आम्ही शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून आणले असे देशमुख म्हणाले.
पाली नगरपंचायत शिवसेनेची व्हावी यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे दोन नगरसेवक शिवसेना पक्षात घेऊन आम्ही नगरपंचायत देखील घेतली. तसेच सुधागड तालुकाप्रमुख रवींद्र देशमुख म्हणाले की, प्रकाश देसाई यांनी खेळ आणि नाटक स्पर्धा घेतल्या नाहीत तर त्यांना एकही माणूस जमा करता येणार नाही.
शिवसेना युवा जिल्हा प्रमुख संजय म्हात्रे यांनी प्रकाश देसाई यांच्यावर टीका करताना म्हटले की, आत्तापर्यंत प्रकाश देसाई यांना जी पदे मिळाली, ती फक्त आणि फक्त आमदार महेंद्र दळवी यांच्यामुळेच. तसेच मुरुड नगर परिषदेचे श्रेय सुद्धा प्रकाश देसाई यांनी घेऊ नये. मुरुड नगर परिषदेमध्ये असंख्य कार्यकर्ते महेंद्र दळवी यांच्या कार्य प्रणालीवर विश्वास ठेवणारे आहेत. त्यामुळे मुरुड नगर परिषदेची सत्ता आली. त्यामुळे प्रकाश देसाई यांनी पक्ष सोडावा, पण वल्गना करू नये.
या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनुपम कुलकर्णी यांनी सांगितले की, राजकारणाचे धडे प्रकाश देसाई यांनी देण्याची आवश्यकता नाही. तसेच यापुढे माझ्यावर किंवा माझ्या शिवसैनिकांवर टीका केली तर त्यांना योग्य त्या भाषेत उत्तर देण्यात येईल.
मिलिंद देशमुख यांनी प्रकाश देसाई यांच्या टीकेला उत्तर देताना असे म्हटले की, प्रकाश देसाई आपल्या पदाचा राजीनामा देत असताना जिल्ह्यातील शिवसेनेच्या तीनही आमदारांना त्यांनी असा सल्ला दिला की संपर्कप्रमुख पद हे अशा व्यक्तीला द्यावं ज्याच्याकडे कर्तुत्व वकृत्व आहे. मुळात प्रकाश देसाई यांना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पद हे माझ्या व रवींद्र देशमुख यांच्या शिफारशीने आमदार महेंद्र दळवी यांनी दिले. या गोष्टीची आठवण मिलिंद देशमुख यांनी प्रकाश देसाई यांना पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करून दिली.
या पत्रकार परिषदेमध्ये संदीप दपके यांनी असे सांगितले की, पाली नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये नगरसेवक निवडीमध्ये प्रकाश देसाई यांचे काही योगदान नाही. खरे योगदान हे सुधागड तालुका प्रमुख रवींद्र देशमुख आणि उपजिल्हाप्रमुख अनुपम कुलकर्णी तसेच जिल्हाप्रमुख संजय म्हात्रे यांचे आहे.

वाल्मिक कराड हा सायको, सिरिअल किलरजितेंद्र आव्हाड यांचे गंभीर आरोप
08/01/2025

वाल्मिक कराड हा सायको, सिरिअल किलर
जितेंद्र आव्हाड यांचे गंभीर आरोप

बीड जिल्ह्यातील मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पव...

मिशन अयोध्या : राम मंदिर स्थापनेनंतर रामजन्मभूमीत चित्रित झालेला भारतातील पहिला चित्रपट #मिशनअयोध्या
08/01/2025

मिशन अयोध्या : राम मंदिर स्थापनेनंतर रामजन्मभूमीत चित्रित झालेला भारतातील पहिला चित्रपट

#मिशनअयोध्या


  मुंबई, (मनोरंजन प्रतिनिधी) : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या ऐतिहासिक निर्मितीनंतर भारतातील रुपेरी पडद्यावर प्र.....

HMPV व्हायरस बाबत आरोग्य विभागाची महत्त्वाची पत्रकार परिषद
07/01/2025

HMPV व्हायरस बाबत आरोग्य विभागाची महत्त्वाची पत्रकार परिषद

#थेटप्रसारणह्युमन मेटान्युमो व्हायरस (HMPV) बाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आण...

Chandrashekhar Bawankule I भाजप आमदार Suresh Dhas यांना चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्त्वाचा सल्ला
07/01/2025

Chandrashekhar Bawankule I भाजप आमदार Suresh Dhas यांना चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्त्वाचा सल्ला

आमदार सुरेश धस यांच्याकडे काही वेगळी माहिती असेल तर सरकार म्हणून त्यांनी ती देवेंद्रजींना सांगा...

Address

Thane

Alerts

Be the first to know and let us send you an email when Lokshasan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Lokshasan:

Share

Lokshasan News Network

Online News Portal In Marathi.