Lokvruttant News - लोकवृत्तांत न्यूज़

  • Home
  • India
  • Thane
  • Lokvruttant News - लोकवृत्तांत न्यूज़

Lokvruttant News - लोकवृत्तांत न्यूज़ Lokvruttant Media is covering its fascinating namesake without fear or favour with insight accuracy. We bring to you news online.

15/10/2025

लाडक्या बहिणींच्या ई केवायसी सर्व्हरमध्ये सुधारणा केल्या जात आहेत. लाडक्या बहिणींना नोव्हेंबर पर्यंत ई केवायसी करण्याची मुदत आहे तसेच पूरग्रस्त भागासाठी आणखी पंधरा दिवस मुदत वाढवून घेणार असे महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.ठाणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचा पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास मंत्री आदिती तटकरे उपस्थित होत्या. मेळाव्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

15/10/2025

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि स्वराज्य महिला मंडळ यांच्या माध्यमातून खास दिवाळी निमित्ताने आयोजित “स्वराज्य दिवाळी उत्सव बाजार २०२५” चे उदघाटन ठाणे पूर्वेकडील अष्टविनायक चौकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा सेनेचे महाराष्ट्र राज्य विस्तारित राजेश (वायाळ) पाटील यांच्या शुभहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

15/10/2025

तीन हाथ नाका येथे गाडीला आग

14/10/2025

ठाण्यातील नौपाडा परिसरातील अनांधिकृत बांधकाम विरोधात भाजप नगरसेवक सूनेश जोशी आणि नगरसेविका मृणाल पेंडसे आक्रमक झाले असून ठाणे महानगपालिक आयुक्त सौरव राव यांच्या दालनात ठिय्या आंदोलन

13/10/2025

मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील लाखो तरुणांना कायमस्वरूपी रोजगाराची आशा दाखवली होती. मात्र ११ महिने प्रशिक्षणार्थी म्हणून काम करूनही या सुशिक्षित युवकांना सरकारने वाऱ्यावर सोडले.मागील काही महिन्यांत १३ आंदोलने करूनही सरकारने दखल घेतली नाही, त्यामुळे संतप्त प्रशिक्षणार्थींनी रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर धडक दिली.

13/10/2025

ठाणे येथील शेठ एन. के. टी. टी. वाणिज्य महाविद्यालय आणि शेठ जे. टी. टी. कला महाविद्यालय, यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने, दिनांक १३ आणि १४ ऑक्टोबर २०२५ रोजी आंतरक्षेत्रीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

13/10/2025

अफगाणिस्तानमधील तालिबानी सरकारच्या परराष्ट्र मंत्र्‍यांची नवी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आला. अफगाणिस्तानात महिलांना कुठेच स्थान नाही. तीच कृती भारतात तालिबानींनी केली असताना भाजप सरकार याबाबत मूग गिळून गप्प बसले आहे. तालिबानी प्रवृत्तीला खतपाणी घालण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड आणि जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी महिला काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली.

13/10/2025

चित्रफीत पाहिल्यानंतर पूर्वीच्या ठाणे शहराची आठवण झाली. पूर्वीचे ठाणे शहर आनंद देणारे होते, पण आता कंत्राटदारांचे झाले आहे, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.तसेच ठाण्यातील वाहतूक कोंडी आणि भ्रष्ट कारभार यांनी ठाण्याचा श्वास रोखल्याचा टोला त्यांनी लगावला.

13/10/2025

ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव ला महाविकास आघाडी नेत्यांनी घेराव टाकला

13/10/2025

आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे लाईव्ह

13/10/2025

ठाणे काँग्रेस जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांची पत्रकार परिषद लाईव्ह

*“हा पुरस्कार हा माझा एकट्याचा नव्हे, तर समाजातील प्रत्येक प्रामाणिक कार्यकर्त्याच्या कार्याचा सन्मान”* *ज्ञानराज माणिक ...
13/10/2025

*“हा पुरस्कार हा माझा एकट्याचा नव्हे, तर समाजातील प्रत्येक प्रामाणिक कार्यकर्त्याच्या कार्याचा सन्मान”*

*ज्ञानराज माणिक प्रभू यांच्या हस्ते ‘समाज स्नेह पुरस्कार’ स्वीकारताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावूक*

पुणे : “ब्राह्मण जागृती सेवा संघ पुणे यांच्यावतीने ' समाजस्नेह ' पुरस्कार दिल्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार मानतो. ज्ञानराज माणिक प्रभू यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारताना मला आनंद होत आहे. या पुरस्काराचे पावित्र्य वाढले आहे. हा पुरस्कार माझ्यासाठी फार मोठा आशीर्वाद आहे. हा पुरस्कार मी समाजात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना समर्पित करतो.” अशी कृतज्ञता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केली.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “हा पुरस्कार समाजातील एकोपा, सामाजिक समरसता आणि बंधुभाव वाढवण्यासाठी आहे. पुरस्कार घेण्यासाठी मी पात्र आहे की नाही, हे मला माहिती नाही. मी आतापर्यंत कोणतेही काम पुरस्कार मिळवण्यासाठी केलेले नाही. जे काही केलं ते सर्वसामान्यांच्या हितासाठीच केलं आहे. पुरस्कारामुळे कार्यकर्त्यांना प्रेरणा आणि ऊर्जा मिळते. अशा प्रकारचे पुरस्कार समाजाची आणि काळाची गरज आहेत.”

ते पुढे म्हणाले, “जिथे संकट असेल तिथे एकनाथ शिंदे असतो. इर्शाळवाडीचे संकट असो, कोल्हापूर-महाड-चिपळूणचा महापूर असो, किंवा उत्तराखंड, केरळमधील मदतकार्य असो आम्ही तिथे जाऊन काम केले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक लोक जम्मू आणि काश्मीरमध्ये अडकले होते, त्यांच्या मदतीसाठी मी तिथे पोचलो आणि त्यांना सुरक्षित महाराष्ट्रात आणले. त्यांना माझा आधार वाटला.”

“सर्वसामान्य शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री असा माझा प्रवास सोपा नव्हता. तो संघर्षमय होता. शेतकरी-वारकरी कुटुंबात माझा जन्म झाला. शेतकऱ्यांवरती आलेल्या आपत्तीच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहिलो. पूरग्रस्तांचे दुःख दूर करण्याचे काम महायुती सरकारने केले आहे. काही दिवसांपूर्वी ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज आम्ही जाहीर केले. शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, हे दिलेले अभिवचन आम्ही पूर्ण केले. हे सरकार सर्वसामान्यांचे आहे,” असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

“लाडकी बहीण योजना कधीच बंद होऊ देणार नाही. विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका. आम्ही जे बोलतो ते करतो. मला बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांनी शिकवण दिली आहे. कार्य करताना कधीही जात-धर्म आडवा आला नाही,” असेही ते म्हणाले.

“बाळासाहेब ठाकरे यांनी ब्राह्मण समाजातील शिक्षक मनोहर जोशी सरांना मुख्यमंत्री केले होते. जोशी सर मला म्हणाले होते की, ‘एक दिवस तू नक्की मुख्यमंत्री होशील.’ आनंद दिघे साहेबांनीही असेच भाकीत केले होते,” असे सांगत शिंदे यांनी आठवणी जागवल्या.

“मी केलेले काम राज्यासमोर आहे. जनतेच्या सेवेसाठी मी रात्रंदिवस झोकून दिले आहे. लोकाभिमुख कामामुळेच महायुतीला 232 जागा जिंकता आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन काम करत आहेत, तर देश पुढे नेण्याचे काम मोदीजी करत आहेत. देशाची अर्थव्यवस्था लवकरच तिसऱ्या क्रमांकावर येईल, असा मला विश्वास आहे,” असे शिंदे म्हणाले.

“देशाच्या सुरक्षेबाबत मोदींनी कधीच तडजोड केली नाही. पाकिस्तानलाही चांगला धडा शिकवला आहे. राज्याच्या विकासात मोदी आणि अमित शाह यांचा मोठा वाटा आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीत ब्राह्मण समाजाचे योगदान विसरता येणार नाही. राज्यात जातीपातीच्या भिंती उभ्या राहता कामा नयेत,” असे ते म्हणाले.

“परशुराम आर्थिक विकास मंडळाला चालना देण्यासाठी सर्व प्रयत्न करणार आहे. ब्राह्मण जागृती सेवा संघ प्रामाणिकपणे काम करत आहे,” असा गौरवोद्गार त्यांनी काढला.

“आज दिलेल्या पुरस्काराने माझी जबाबदारी अधिक वाढली आहे. शिक्षण घेण्यासाठी कोणालाही आत्महत्या करावी लागू नये, म्हणून 100% फी सरकार देणार आहे,” असेही शिंदे यांनी सांगितले.

“माझ्या वाढदिवशी तब्बल साडेसात हजार मुलांच्या हृदयाच्या शस्त्रक्रिया विनामूल्य केल्या आहेत. मी दोन्ही हातांनी देण्याचेच काम केले आहे. सीएम म्हणजे ‘कॉमन मॅन’ आणि डेप्युटी सीएम म्हणजे ‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन’ मी स्वतःला तसेच समजतो,” असे त्यांनी सांगितले.

“सत्तेत असताना सगळे ओळखतात, पण सत्ता गेल्यानंतरही लोक सोडून जात नाहीत, हीच तुमच्या कामाची खरी पोचपावती असते. सत्तेची हवा डोक्यात जाऊ न देणे महत्त्वाचे आहे,” असे त्यांनी अधोरेखित केले.

या प्रसंगी माणिक प्रभू संस्थानचे अधिपती सिद्धगुरू ज्ञानराज माणिक प्रभू महाराज, ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री मनोज जोशी, उद्योगरत्न सिद्धार्थ गाडगीळ, फायनान्स इन्फ्लुएन्सर रचना रानडे, अतुल शास्त्री भगरे गुरुजी, ब्राह्मण जागृती सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अंकित काणे, ईशानी जोशी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Address

Thane
Thane

Alerts

Be the first to know and let us send you an email when Lokvruttant News - लोकवृत्तांत न्यूज़ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Lokvruttant News - लोकवृत्तांत न्यूज़:

Share