Anil Gaganbhedi Thatte

Anil Gaganbhedi Thatte Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Anil Gaganbhedi Thatte, Digital creator, Thane.

60 वर्षांची तुफानी खळबळजनक पत्रकारिता, हादरवणारे शेकडो राजकीय गौप्यस्फोट, महाराष्ट्रातील शेकडो मान्यवर नेते, संपादक, उद्योगपती यांचे सल्लागार मीडिया मिडास बँक ऑफ आयडीया महागुरू
अनिल गगनभेदी थत्ते
यांच्याशी थेट ग्रेट भेट घडवून देणारे माध्यम

30/05/2026

Over the weekend, I filled up my car's fuel tank, and I thought fuel has become really expensive after the recent price hike.

But then I compared it with other common liquids and did some quick calculations, and I felt a little better.

To know why, see the results below – you'll be surprised at how outrageous some other prices are !

Diesel (regular) Rs.95 per litre..

Petrol Rs. 107 per litre.

Coca Cola 330 ml can : Rs.45 = Rs.135 per litre.

Dettol antiseptic 100 ml Rs.35 = Rs.350 per litre..

Radiator coolant 500 ml Rs.270= Rs.540 per litre..

Pantene conditioner 400 ml Rs.250 = Rs.750 per litre..

Medicinal mouthwash like Listerine 100 ml Rs.55 = Rs. 550 per litre.

Corex cough syrup 100 ml Rs.100 = Rs. 1000 per litre.

Evian water 500 ml Rs. 330 = Rs. 660 per litre.

Rs. 500 for a litre of WATER???!!! And the buyers don't even know the source (Evian spelled backwards is Naive.).

Cup of coffee at any decent business hotel 150 ml Rs. 175 = Rs. 1167 per litre.

Old Spice after shave lotion 100 ml Rs. 175 = Rs. 1750 per litre

Pure almond oil 25 ml Rs. 68 = Rs. 2720 per litre
And this is the REAL KICKER...

HP deskjet colour ink cartridge 21 ml Rs.1900 = Rs. 90476 per litre!!!

Now you know why computer printers are so cheap ? So they have you hooked for the ink !
So, the next time you're at the pump,
Just don't curse
the State and Central governments…..
just be glad your car doesn't run on cough syrup, after shave, coffee, or God forbid, printer ink !
सौजन्य: व्हाट्सअप मेसेज गृप

30/05/2026

प्रादेशिक पक्षांचे भाव उतरले

देशाच्या राजकारणात प्रादेशिक पक्षांचा प्रभाव कमी होत चालल्याची चर्चा सुरू असते. भाजपाची घोडदौड त्यास कारणीभूत आहे आणि प्रादेशिक अस्मितांपेक्षा हिंदुत्व आणि विकासाचे आकर्षण प्रादेशिक पक्षांच्या घटणाऱ्या लोकप्रियतेस जबाबदार आहेत, असे अनुमान काढता येईल. विशेष म्हणजे प्रादेशिक पक्षांनी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर त्यांच्या उत्पन्नाची माहिती पाठवली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी उत्पन्नात ५१.५७ टक्के घट झाली आहे.

प्रादेशिक पक्षांमध्ये सर्वात श्रीमंत पक्ष तेलगु देसम आहे. त्यांचे उत्पन्न २२८.३१ कोटी रुपये आहे. त्याच्या खालोखाल तृणमूल काँग्रेस (२१९.३५ कोटी), आंध्रप्रदेशातील वायएसआर काँग्रेस (१४०.३८) अशी यादी आहे. महाराष्ट्रातील दोन्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी मात्र त्यांचे लेखा परीक्षण अहवाल अद्याप सादर केलेले नाहीत. मनसेने दिलेल्या माहितीनुसार त्यांचे उत्पन्न ३७.७४ कोटी दिसत आहे. ते अण्णा द्रमुक पक्षापेक्षा जास्त आहे!

राष्ट्रीय पक्षांच्या तुलनेत प्रादेशिक पक्षांचे उत्पन्न कमी असणे स्वाभाविक आहे. सर्व प्रादेशिक पक्षांचे मिळून उत्पन्न ११९२ कोटी आहे. तेच गेल्या वर्षी २४३६ कोटी होते. हे उत्पन्न घसरण्यामागचे कारण राष्ट्रीय पक्ष, विशेषत: यांचा वाढता जोर हे आहे. पक्षांना निधी कधी दिला जातो? जेव्हा त्यांची उपयुक्तता असते तेव्हा. सत्तेत असणाऱ्या पक्षांकडून आर्थिक हितसंबंध राखले जाण्याची शक्यता असल्यामुळे तिथे पक्षनिधी जमा करण्याकडे कल असतो. राजकारणाकडे समाजकारणापेक्षा आर्थिक अंगाने पाहिले जाण्याचा दृष्टीकोन नवा नाही. जेव्हा देशात काँग्रेसचा जोर होता, त्या काळात (अगदी महात्मा गांधी हयात असतानाही) बडे-बडे उद्योजक (उदाहरणार्थ टाटा, बिर्ला वगैरे) सढळ हस्ते काँग्रेस अधिवेशनांसाठी पैसे देत असल्याचे पुरावे आजही सापडतील. त्यामुळे अलिकडे भाजपाला मिळत असलेल्या भरघोस मदतीचे आकडे पाहून अनेक जण अचंबित झाले, त्याचे आश्यर्चय वाटावे! भाजपा, म्हणजेच केंद्रातील सत्ताकेंद्राच्या हातात सर्व आर्थिक नाड्या असल्यामुळे दिलेले पैसे दामदुपटीने परत येण्याची शक्यता अधिक. याउलट प्रादेशिक पक्षांमध्ये गुंतवणूक जोखिमेची बनत चालली आहे. या पक्षांना 'मार्केट'मध्ये राहायचे असेल तर पक्ष दुकान म्हणून चालवता येणार नाही. पैसे वसूल करणे हे त्या-त्या पक्षाच्या उपद्रवमूल्यावर ठरत असते. म्हणून उपयुक्तता अगदीच नजरेआड करता येणार नाही. गेल्या काही वर्षात पायाभूत सुविधांचे मोठे प्रकल्प अगदी रस्ते बांधणीपासून ते मेट्रो -विमानतळे बांधण्यापर्यंतचे कोट्यवधींचे ठेके निघत आहेत. असा एखादा ठेका मिळावा या आमिषापोटीच देणगीदारांचे हात सैल होत असतात. एरवी कोण असे उदार होईल म्हणा?

पक्षांकडे जमा होणारे पैसे हे भ्रष्टाचाराचे प्रतिबिंबही ठरू शकते. हा पैसा निवडणूक लढवण्यासाठी प्रामुख्याने वापरला जातो. जो अधिक पैसे खर्च करतो त्याची निवडून येण्याची शक्यता असते. त्याच्याकडे देणगीदार आकर्षित होत राहतात. आपला पक्ष जनतेच्या नजरेत आणि मनात राहावा असे वाटत असेल तर खर्च करावा लागणार. त्यासाठी सत्ताही असावी लागणार. पैसा पैशाला ओढतो तसे सत्ताही पैशाला ओढतेच की!

मिलिन्द बल्लाळ
संपादक, ठाणेवैभव
9821116393

विषारी दारूचा नरसंहार आणि कारवाईचे ढोंग !!!  पुण्यात विषारी दारू पिऊन २० हून अधिक निष्पाप नागरिकांचा झालेला मृत्यू हा के...
30/05/2026

विषारी दारूचा नरसंहार आणि कारवाईचे ढोंग !!!

पुण्यात विषारी दारू पिऊन २० हून अधिक निष्पाप नागरिकांचा झालेला मृत्यू हा केवळ अपघाती गुन्हा नाही, तर तो स्थानिक पोलीस प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी आणि दारू माफिया यांच्यातील 'अर्थपूर्ण' संगनमतातून झालेला थेट नरसंहार आहे! गावोगावी आणि शहरांच्या गल्लीबोळांत अवैध दारूचे कारखाने उघडपणे चालतातच कसे? याचे साधे उत्तर म्हणजे दरमहा मिळणारा लाखांचा 'हफ्ता'. पैशांच्या या हव्यासापोटी पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सोयीस्करपणे डोळे मिटून घेतले आणि जनतेच्या जिवाचा सौदा केला.

अशी भीषण घटना घडल्यानंतर नेहमीप्रमाणे पोलीस खाते आणि प्रशासन कारवाईचे एक 'नाटक' उभे करते. वरवर प्रत्यक्ष गुन्हेगारांवर छापे टाकल्याचे आणि त्यांना अटक केल्याचे भासून जनतेचा रोष शांत करण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो. परंतु, हे केवळ मूळ सूत्रधारांना आणि स्वतःच्या खात्यातील भ्रष्ट मगरींना वाचवण्याचे क्रूर षड्यंत्र असते. मुख्य गुन्हेगार तर बाजूलाच राहतात, पण या गुन्हेगारांना वर्षानुवर्षे पाठीशी घालणारे, हप्ते खाणारे पोलीस आणि महापालिकेचे अधिकारी मात्र कमालीच्या साळसूदपणे यातून निसटतात. ही व्यवस्थाच मुळात गुन्हेगारांना आणि त्यांच्या पाठीराख्यांना वाचवण्यासाठी ढाल बनून उभी राहते, हे आजचे जळजळीत वास्तव आहे.

जर सरकारला आणि गृहमंत्रालयाला या निष्पाप नागरिकांच्या मृत्यूचे खरोखरच सोयरसुतक असेल, तर त्यांनी केवळ दारू विकणाऱ्यांवर कारवाई करण्याचे ढोंग बंद करावे. ज्या अधिकाऱ्यांच्या हद्दीत हा मृत्यूचा व्यापार राजरोसपणे सुरू होता, त्या संबंधित प्रशासकीय कर्मचारी आणि पोलीस अधिकाऱ्यांवर तात्काळ 'सदोष मनुष्यवधाचा' गुन्हा दाखल झालाच पाहिजे. नुसते निलंबन करून भागणार नाही; तर या भ्रष्ट पांढरपेशा गुन्हेगारांची नोकरीतून हकालपट्टी करून, मुख्य आरोपींच्या सोबत त्यांचीही भरचौकात जाहीर धिंड काढली पाहिजे. जोपर्यंत हप्तेखोर प्रशासनाची ही 'गिधाडं' तुरुंगात सडत नाहीत, तोपर्यंत महाराष्ट्रातील निष्पापांचे बळी असेच जात राहतील!

हे भ्रष्ट कर्मचारी आणि पोलिस अधिकारी किती निर्ढावले आहेत याचे एक उदाहरण देतो. 2013 साली महाविकास आघाडीचे सरकार होते. अजित पवार उपमुख्यमंत्री आणि आर आर पाटील गृहमंत्री होते. अजित पवारांनी पुण्याचे पालकमंत्री या नात्याने उरळी देवाची इथल्या कचरा डेपोच्या संदर्भातील कचर्‍याच्या तक्रारी तपासण्यासाठी तिथे दौरा केला तर त्यांना चक्क कचरा डेपोच्या आवारात देशी दारूचे बेकायदेशीर गाळप सुरू असल्याचे आढळून आले. यामुळे संतापलेल्या अजित पवारांनी पोलिस प्रशासन आणि महापालिका प्रशासनाला सवाल केला,”आता या दारूच्या भट्टया नष्ट करण्याचे काम सुद्धा अजित पवार आणि आर आर पाटील यांनी येऊन करायचे का ???”

दुर्दैवाची गोष्ट म्हणजे 2013 साली जी परिस्थिती होती 2026 साली सुद्धा तीच परिस्थिती असून पोलिस प्रशासन आणि महापालिका प्रशासन या बेकायदेशीर हातभट्टी बनवणार्‍या गुन्हेगारांचे रक्षणकर्ते बनून नोकरी करताना दिसत आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची गंभीर नोंद घेऊन या कर्मचार्‍यांना पाठीशी घालणे बंद करणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा आज 20 नागरिक बळी पडले आहेत उद्या 200 नागरिक सुद्धा विषबाधा होऊन मरणाला कवटाळू शकतात.

सदरील बातमीची लिंक.

https://www.dnaindia.com/pune/report-do-you-want-me-to-remove-illicit-liquor-dens-pawar-junior-to-cops-1941579

Deputy CM shocked to see country liquor den at Uruli garbage depot, gets it razed

थांबा !!! तुम्ही पण बॉडी शेमिंगला बळी पडला आहात का ????  'तू किती जाड झालास', 'रंग किती काळा पडलाय', 'उंची किती कमी आहे'...
30/05/2026

थांबा !!! तुम्ही पण बॉडी शेमिंगला बळी पडला आहात का ????

'तू किती जाड झालास', 'रंग किती काळा पडलाय', 'उंची किती कमी आहे' – आपल्या समाजात या गोष्टी आजही केवळ 'मस्करी' किंवा 'काळजी' म्हणून सहज बोलल्या जातात. परंतु, हा निव्वळ संवाद नसून 'बॉडी शेमिंग' नावाचा एक भयंकर मानसिक छळ आहे, याची जाणीव सर्वप्रथम स्वतःला करून देणे गरजेचे आहे. जर कोणी तुमच्या शरीराचा आकार, वजन, रंग किंवा उंचीवरून तुमची टिंगल करत असेल, तर तुम्ही एका क्रूर छळाला बळी पडत आहात, हे आधी ओळखा. हे केवळ अपमानास्पद नसून, तुमच्या आत्मविश्वासाचे पद्धतशीर खच्चीकरण करणारे आणि तुम्हाला नैराश्याच्या गर्तेत ढकलणारे चक्रव्यूह आहे. एखाद्या व्यक्तीचे मूल्य त्याच्या दिसण्यावरून ठरवणे हे केवळ सामाजिकदृष्ट्या चुकीचे नसून, माणसाच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारे आणि कायदेशीरदृष्ट्याही अपमानास्पद आहे.

या छळाचा सामना करताना मनात न्यूनगंड न बाळगता प्रचंड धैर्याने त्याचा प्रतिकार करणे आवश्यक आहे. जेव्हा कोणी तुमच्या शरीरावर नकारात्मक टिप्पणी करेल, तेव्हा गप्प न बसता "माझे शरीर, माझा अभिमान" या ठाम भूमिकेतून समोरच्याला जाब विचारा आणि तिथेच थांबवा. सोशल मीडियावरील 'फिल्टर' केलेल्या अवास्तव सौंदर्याच्या निकषांना बळी पडू नका. स्वतःच्या शरीरावर प्रेम करायला शिका, कारण तुमचे मूल्य तुमच्या वजनात किंवा रंगात नसून तुमच्या विचारात, कर्तृत्वात आणि चारित्र्यात आहे.

हा लढा जिंकण्यासाठी स्वतःचा आत्मविश्वास ढळू देऊ नका. तुमची शारीरिक वैशिष्ट्ये ही तुमची कमजोरी नसून तुमची वेगळी ओळख आहे. निरोगी जीवनशैली आणि सकारात्मक दृष्टिकोन (बॉडी पॉझिटिव्हिटी) अंगीकारून, अशा विषारी मानसिकतेच्या लोकांना आपल्या आयुष्यातून दूर ठेवा. हा अदृश्य छळ मोडून काढण्यासाठी प्रचंड आत्मबलाने आणि सामर्थ्याने जगाला सामोरे जा; कारण जेव्हा तुम्ही स्वतःचा स्वीकार सन्मानाने करता, तेव्हा जगाची तुम्हाला कमी लेखण्याची हिंमत होत नाही.

एक शायर की तनहा मौत !!! ईद उल अज्हा अर्थात बकरी ईद च्या दिवशी ख्यातनाम शायर बशीर बद्र यांचे दुर्दैवी निधन झाले आहे. उजाल...
30/05/2026

एक शायर की तनहा मौत !!!

ईद उल अज्हा अर्थात बकरी ईद च्या दिवशी ख्यातनाम शायर बशीर बद्र यांचे दुर्दैवी निधन झाले आहे.

उजाले अपनी यादों के हमारे साथ रहने दो
न जाने किस गली में ज़िंदगी की शाम हो जाए

दुश्मनी जम कर करो लेकिन ये गुंजाइश रहे
जब कभी हम दोस्त हो जाएँ तो शर्मिंदा न हों

या सारख्या अनुपम शेरांच्या माध्यमातून समस्त तरुणाईचे साहित्यिक विश्व समृद्ध करणार्‍या शायराची अशी गुमसुम मौत व्यथित करणारी आहे. सबका खून मिला है इस मिट्टी में म्हणणारा राहत इंदोरी समस्त पुरोगामी जगताचा लाडका असतो. परंतु निखळ देशभक्त असणार्‍या बशीर बद्र यांच्या नशिबात मात्र गुमनामीच असते. उर्दू शायरी हा मुळातून मुस्लिम प्रतिभावंतांचा प्रांत ज्यांच्यावर हिंदुत्ववाद्यांनी आधीच फुली मारलेली असते आणि देशभक्त उर्दू शायर हा पुरोगामी मंडळींना दुर्लक्षित ठेवण्याजोगा अॅसेट वाटतो. बशीर बद्र यांची प्रतिभा अशी पूर्वग्रहांच्या भेदाभेदात हेतूपूरस्सर दुर्लक्षली गेली.
18000 पेक्षा अधिक शेर , अनेक नज्म आणि गझल लिहिणारा हा मनस्वी शायर अत्यंत भरभरून जीवन जगाला आणि तितक्याच उन्मुक्तपणे आपली शब्दप्रतिभा त्याने उधळली. आयुष्याच्या अंतिम टप्प्यात स्मृतिभ्रंशाने ग्रासलेले आणि पत्नीच्या मुखातून आपलेच शेर ऐकून आपली ओळख शोधणारे बशीर जी बघून हृदयात कालवाकालव व्हायची.

शायर , कवि यांना प्रकृतीने खरे तर अमरत्वाचे वरदान द्यावे असे मला नेहमीच वाटत आले आहे कारण त्यांच्या प्रतिभेला वाढत्या वयाबरोबर जे आत्मिक अनुभवांचे खुमारे येतात ते त्या काव्याला झालेल्या ईश्वरी स्पर्शाची वाचकाला सुद्धा अनुभूती प्रदान करतात.

उस दर का दरबान बना दे या अल्लाह
मुझको भी सुल्तान बना दे या अल्लाह
इन आँखों से तेरे नाम की बारिश हो
पत्थर हूँ, इंसान बना दे या अल्लाह
सहमा दिल, टूटी कश्ती, चढ़ता दरिया
हर मुश्किल आसान बना दे या अल्लाह
मैं जब चाहूँ झांक के तुझको देख सकूँ
दिल को रोशनदान बना दे या अल्लाह
मेरा बच्चा सादा कागज़ जैसा है
इक हर्फे ईमान बना दे या अल्लाह
चाँद सितारे झुक के क़दमों को चूमे
ऐसा हिंदुस्तान बना दे या अल्लाह
डॉ. बशीर बद्र

बशीरजी बद्र यांच्या भावपूर्ण गजलीच्या स्मृति जागवत त्यांच्या चरणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आहे.

“काय सांगता !!!! तारीख पे तारीख इतिहासजमा ????” "Justice delayed is justice denied." हे वाक्य भारतीय न्यायव्यवस्थेच्या स...
30/05/2026

“काय सांगता !!!! तारीख पे तारीख इतिहासजमा ????”

"Justice delayed is justice denied." हे वाक्य भारतीय न्यायव्यवस्थेच्या संदर्भात सामान्य माणसासाठी नित्य अनुभवाला येणारे एक जळजळीत आणि वेदनादायी वास्तव आहे. कोर्टाची पायरी चढणारा सामान्य माणूस केवळ खटल्यात अडकत नाही, तर त्याचे आयुष्य, मानसिक शांतता, कष्टाची कमाई आणि संपूर्ण कुटुंबच त्या चक्रव्यूहात अडकून पडते. वर्षांनुवर्षे चालणारा युक्तिवाद, 'तारीख पे तारीख'चा न संपणारा सिलसिला आणि त्यानंतरही महिनोनमहिने राखून ठेवलेले निकाल. या प्रक्रियेत न्यायाची आस धरून बसलेला माणूस आतून पूर्णपणे खचून जातो.

अनेकदा तर गुन्हा सिद्ध न होताच केवळ न्यायालयीन विलंबाने कैदी तुरुंगात सडतात, तर काही जण निकाल लागण्यापूर्वीच जगाचा निरोप घेतात. सामान्य माणसाची ही मरणयातना आता थांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. न्यायप्रक्रियेतील बदलाची सुखद हवेची झुळूक मे महिन्याच्या रखरखत्या उन्हाळ्यात सुद्धा दिल्लीवासीयांना सुखावून गेली.

सर्वोच्च न्यायालयाने काल देशातील सर्व उच्च न्यायालयांना दिलेले कडक आदेश दिले असून आता निकाल राखून ठेवण्यासाठी ३ महिन्यांची कडक कालमर्यादा निश्चित केली आहे. तसेच मुख्य आदेशानंतर १५ दिवसांच्या आत सकारण निकाल संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक केले आहे; तसे न झाल्यास पक्षकारांना केस दुसऱ्या खंडपीठाकडे नेण्याचा अधिकार दिला आहे.

सर्वात मोठा दिलासा जामीन प्रकरणांमध्ये मिळाला असून, निकाल दुसऱ्याच दिवशी देणे आणि कैद्यांची तातडीने सुटका करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा हा ऐतिहासिक निर्णय जर काटेकोरपणे राबवला गेला, तर शहाणे सुद्धा न्याय मिळवण्यासाठी आनंदाने कोर्टाची पायरी चढू लागतील.

हुश्श !!! डोनाल्ड ट्रम्प यांचा जीव वाचला !!!! बांगलादेशच्या राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर सध्या एकाच गोष्टीची तुफान ...
30/05/2026

हुश्श !!! डोनाल्ड ट्रम्प यांचा जीव वाचला !!!!

बांगलादेशच्या राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर सध्या एकाच गोष्टीची तुफान चर्चा आहे, ती म्हणजे चक्क 'डोनाल्ड ट्रम्प' यांचा जीव थोडक्यात वाचला आहे! आता अमेरिकेचे माजी अध्यक्ष नाही, तर बांगलादेशातील एका पांढऱ्याशुभ्र 'अल्बिनो' प्रजातीच्या देखण्या रेड्याबद्दल आपण बोलत आहोत. बकरी ईदच्या तोंडावर या रेड्याचे केस आणि डोळे पाहून मालकाने गंमत म्हणून त्याचे नाव 'डोनाल्ड ट्रम्प' ठेवले आणि काय आश्चर्य, हा ट्रम्पराव सोशल मीडियावर असा काही व्हायरल झाला की थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची चर्चा सुरू झाली. ईदच्या बाजारात त्याला पाहण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी एकच गर्दी उसळली होती. शेवटी फरिदुज्जमान नावाच्या एका शौकिनाने त्याला विकत घेतले आणि गोठ्यातून थाटामाटात आपल्या घरी आणले.

पण, ट्रम्प यांच्या नशिबात काहीतरी वेगळंच लिहिलेलं होतं. ईदला अवघा एक दिवस उरला असताना बांगलादेशच्या गृहमंत्रालयाला अचानक काळजी वाटू लागली की, जर या हायप्रोफाईल 'डोनाल्ड ट्रम्प' यांची कुर्बानी दिली गेली, तर सोशल मीडियावर मोठा गदारोळ माजेल आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. मग काय, गृहमंत्री सलाहउद्दीन अहमद यांनी स्वतःच नायक बनण्याचे ठरवले आणि थेट पोलिसांना आदेश सुटले. पोलीस बंदोबस्तात 'डोनाल्ड ट्रम्प' यांना मालकाच्या घरातून ताब्यात घेण्यात आले.

विशेष म्हणजे, गृहमंत्र्यांनी स्वतः खिशातून पैसे घालून हा दुर्मिळ रेडा विकत घेतला आणि जाहीर केले की, "आमच्या ट्रम्प यांची कुर्बानी दिली जाणार नाही!" सध्या या व्हीआयपी रेड्याला एका आलिशान फार्मवर पोलीस सुरक्षेत ठेवण्यात आले असून, लवकरच त्यांची रवानगी प्राणीसंग्रहालयात केली जाणार आहे. नारायणगंजच्या ज्या फार्ममधून हा रेडा आला, तिथे असे आणखी ६ पांढरे रेडे आहेत. पण 'डोनाल्ड ट्रम्प' नावाच्या पुण्याईमुळे या एकाचा जीव मात्र अगदी ऐन वेळी हुशारीने वाचला, हेच खरे!

30/05/2026

29/05/2026

एक "रहस्यमयी सैटिंग का अड्डा "
जहा व्हिस्की पीकर नंगा नाच देखकर कोई भी सेटिंग की जा सकती थी
किस आंतकवादी को सजा देनी है माफ़ करना है आधी रात को भी जहा से कोर्ट खुलवा कर आंतकवादी छुड़ा सकते थे

दिल्ली का "जिमखाना क्लब" और इस क्लब के अन्दर जाते थे - IAS, IPS, JUDGE और कांग्रेस नेता
भ्रष्टाचार रिश्वत गद्दारी का अड्डा था जिमखाना

आम जनता तो इस क्लब के पास भी नही फटक सकती थी
क्योकी ये 27 ऐकड का क्लब प्रधानमंत्री निवास से एकदम सटा हुआ है

-इस क्लब के ठीक सामने इंदिरा गांधी का घर था जहां उनकी हत्या हुई थी
इस क्लब मे महात्मा गांधी भी जाते थे - नेहरू , राजीव और राहुल गांधी भी

इस क्लब मे होता क्या था ??

रहस्यमयी सवाल जो सबकी खोपडी मे आता आता है -
इस क्लब मे होती थी "सैटिंग

IAS अफसर अपनी पोस्टीग से पहले " सही लोगो से " यही मिलते थे

बडे जज और बडे वकील एक ही टेबल पर बैठ दारू पीते और मुकदमे फाईनल करते थे

बडे बडे उद्योगपति एक दुसरे से यही मिल धन्धे की " सैटिंग " करते थे

पत्रकारो को यही इसी क्लब से सनसनी खेज खबरे मिल जाती थी " सैटिंग " के कारण

एक तरहा से भारत को चलाने वाले लोग इस क्लब मे जनता की नजरो से दूर " दारू पीने और सैटिग करने " आते थे

सफेदपोश रहस्यमयी मुलाकात प्रेमसम्बन्ध भी यही बनते

लेकिन दिक्कत तब शुरू हुई जब बीजेपी सत्ता मे आई

बीजेपी के नेताऔ को क्लब की सदस्यता नही दी गयी
और फिर शुरू हुआ इस क्लब को अपने काबू मे लेने का चक्कर

बीजेपी सरकार ने सबसे पहले 2021 मे क्लब की कमेटी भंग करदी

सरकार ने 15 डायरेक्टर नियुक्त कर दिये क्लब चलाने बारे क्लब के सारे कागज़ो का आडिट करवा डाला

क्लब की एक " green card " scheme थी वो बन्द कर दी

अब आदेश जारी कर दिया के , 5 जून 2026 तक हर हाल मे जमीन खाली करो

कारण बडा सही दिया है " प्रधानमंत्री की सुरक्षा " - - सब चुप

कांग्रेस बेशक सत्ता मे नही है - लेकिन Gymkhana club मे आज भी कांग्रेस राज कायम रहा

देश के सबसे पावरफुल लोग 2 दिन के अंदर हाई कोर्ट में सुनवाई हो रही है. देश के दो सबसे महंगे वकील एक इलीट क्लब के पक्ष में खड़े हैं.
जो बकील आंतकवादी देश्द्रोहिओं और पाकिस्तान के साथ खड़े होते कपिल सिविल और अभिषेक मनु सिंगबी केस लड़ रहे है

आपमें है ये दम? मैं आपकी बात कर रहा हूं. आपके साथ सिर्फ नरेंद्र मोदी हैं. वही इनसे टकरा रहे हैं.
आप अपने विचार लिख सकते है ये लौकतन्त्र है

तुम्हें क्या लगा था कि अवैध के नाम पर सिर्फ झुग्गी-झोपड़ियों पर बुलडोजर चलेगा ?
अवैध मतलब अवैध, चाहे झुग्गी हो या कोठी।
दिल्ली जिमखाना क्लब सिर्फ क्लब नहीं, अंग्रेजों की बनाई वो औपनिवेशिक इमारत है जिसे 1913 में अंग्रेज अफसरों, सैन्य अधिकारियों और एलीट वर्ग की मौज-मस्ती के लिए बनाया गया था।
जहां भारतीयों की एंट्री लगभग ना के बराबर थी।
आजादी के बाद ही इस पर बुलडोजर चल जाना चाहिए था, लेकिन नेहरू खुद इसके सदस्य थे और आज कांग्रेस के युवराज भी इसके सदस्य बताए जाते हैं।
करीब 30 एकड़ में फैला यह क्लब लुटियंस ज़ोन के सबसे पॉश इलाके में स्थित है।
* सदस्यता शुल्क लगभग 30 लाख रुपए
* सदस्यता के बाद भी 37 साल की वेटिंग

* सरकार को सालाना किराया सिर्फ 1000 रुपए

* लगभग 3 करोड़ टैक्स बकाया

* PM हाउस और कई संवेदनशील सरकारी-रक्षा प्रतिष्ठानों के बेहद करीब लोकेशन

अब सरकार ने इसे 5 जून तक खाली करने का समय दिया है और कहा है कि यह जगह Defence Infrastructure और Public Safety के लिए चाहिए।
बधाई हो,

5 जून को गुलामी की एक और निशानी ढह सकती है।

मोदी हैं तो मुमकिन है 🙏

ऑपरेशन सिंदूर च्या यशाचे रहस्य काय ???  ९ ते १० मे २०२५ च्या रात्री पाकिस्तानने चीन आणि तुर्कस्थानी ड्रोन आणि मिसाईल यंत...
29/05/2026

ऑपरेशन सिंदूर च्या यशाचे रहस्य काय ???

९ ते १० मे २०२५ च्या रात्री पाकिस्तानने चीन आणि तुर्कस्थानी ड्रोन आणि मिसाईल यंत्रणेच्या बळावर रात्रीच्या काळोखात पाकिस्तानने एकाच वेळी ६०० हून अधिक ड्रोन, क्षेपणास्त्रे आणि रॉकेट्स सोडली. त्यांचा अंदाज होता की एवढ्या मोठ्या संख्येने एकाचवेळी हल्ला केला तर भारताची यंत्रणा गोंधळेल, कुठेतरी फट पडेलच. पण पहाट होईपर्यंत एकही हल्ला लक्ष्यापर्यंत पोहोचला नव्हता. सर्वच्या सर्व ड्रोन, मिसाईल आणि क्षेपणास्त्र हवेतच भेदली गेली आणि उध्वस्त झाली. पाकिस्तान ने हल्ला करताना भारतातील मुख्य शहरे , नागरी वस्ती , वैष्णोदेवी मंदिर , ताजमहाल हे टार्गेट ठेवले होते परंतु भारताच्या हवाई यंत्रणेने शंभर टक्के यश मिळवत सगळी शस्त्रे निष्प्रभ केली. भारताच्या जमिनीवर एकही ओरखडा उमटला नाही.

याचा परिणाम असा झाला की चीन आणि तुर्कस्तान दोघांनाही प्रचंड मोठा मानसिक धक्का बसला. इस्रायल अमेरिका आणि यूरोपियन देश स्वतःला तंत्रज्ञानात अग्रणी समजत होते ते अक्षरशः थक्क झाले. इतके निर्भेळ यश भारत मिळवू शकेल. भारत इतका तांत्रिक प्रगत आहे हे त्यांना धक्का देणारे सिद्ध झाले.

हे असं कसं घडलं? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला सव्वीस वर्षे मागे कारगिल युद्धात जावं लागेल. आपण ते युद्ध जिंकलो, पण त्या युद्धात आपली प्रचंड प्राणहानी झाली. त्या युद्धाने भारताच्या सैन्याची एक फार मोठी उणीव उघड झाली. युद्धकाळात सेना, हवाई दल आणि नौदल हे तिघेही आपापल्या परीने लढत होते. परंतु त्यांचा परस्पर संवाद नव्हता आणि ही तिन्ही दले एकत्रित आणि समन्वय साधून लढत नव्हती. एकमेकांना काय घडतंय हे कळायला तास लागायचे. त्यामध्ये प्रशासकीय दिरंगाई होत होती. फोन करा, लेखी आदेश पाठवा हे प्रकार सुरू असायचे आणि युद्धात एक एक क्षण महत्वाचा असतो या दफ्तर दिरंगाईमुळे भेदक आक्रमण करण्याच्या आणि निर्णायक विजय मिळवण्याच्या अनेक संधी निघून गेल्या. कारगिल रिव्ह्यू कमिटीने हे सरकारला स्पष्ट सांगितलं आणि त्यानंतरच तिन्ही सैन्यदलांनी समन्वयाने काम करण्याच्या दृष्टीने योजना आखल्या जाऊ लागल्या.

याला खरे मूर्त स्वरूप प्राप्त झाले २७ फेब्रुवारी २०१९ ला. बालाकोट हवाई हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी, जेव्हा आकाशात भारत-पाक लढाऊ विमानांमध्ये चकमक सुरू होती, तेव्हा श्रीनगरजवळच्या आपल्याच Spyder बॅटरीने आपलंच Mi-17 V5 हेलिकॉप्टर पाडलं. सहा जवान शहीद झाले. कारण एवढंच होतं की ते हेलिकॉप्टर आपलंच आहे हे बॅटरीला सांगणारी कुठलीही यंत्रणा नव्हती. त्या दुःखद घटनेने भारताला आतून हलवलं आणि बदलाची चाकं वेगाने फिरू लागली. त्यातून तीन यंत्रणा निर्माण केल्या गेल्या.

आकाशतीर ही सेनेची यंत्रणा. DRDO आणि ISRO च्या शास्त्रज्ञांनी तयार केलेली अत्यंत बुद्धिमान यंत्रणा, BEL ने बांधलेली. हिमालयाचे उंच डोंगर असोत, राजस्थानचं वाळवंट असो किंवा सीमेलगतचं शहर अगदी कुठेही तंबू ठोकून कार्यरत होण्याची या यंत्रणेत क्षमता आहे. तिच्यावर तापमान आणि प्रतिकूल निसर्ग यांचा काहीही परिणाम होत नाही.
IACCS ही हवाई दलाची यंत्रणा संपूर्ण भारताच्या आकाशावर नजर ठेवण्याचे काम करते. हवेत उडणारी प्रत्येक गोष्ट क्षणार्धात टिपायची, AI च्या मदतीने ती आपली आहे की परकी हे ओळखायचं आणि योग्य त्या यंत्रणेला रोखण्याचा हुकूम द्यायचा हे तिचे मुख्य कार्य. ऑपरेशन सिंदूरमध्ये निम्म्याहून अधिक हल्ले याच यंत्रणेने थोपवले.

त्रिगुण हे नौदलाचं अभेद्य शस्त्र आहे. सगळ्यात कमी चर्चिले गेलेलं परंतु तितकंच महत्त्वाचं हत्यार. समुद्राच्या दिशेने येणारा धोका जमिनीवरच्या रडारला उशिरा कळतो नेमकी हीच उणीव त्रिगुणने भरून काढली. जहाजांवरचे सेन्सर्स, किनाऱ्यावरचे रडार, समुद्रातली हालचाल हे सारं एकत्र करून सेना आणि हवाई दलालाही दाखवायचं. त्यामुळे कुठल्याही दिशेने आलेला हल्ला तिन्ही दलांना एकाच वेळी दिसतो.

या तिन्ही यंत्रणांनी एकत्र काम केलं आणि त्या रात्री पाकिस्तानचा एकही वार भारताला स्पर्श करू शकला नाही. आपण कारगिलच्या जखमेतून धडा घेतला, बालाकोटच्या दुःखातून शक्ती घेतली आणि शांतपणे, चिकाटीने काम करत राहिलो. जगाला माहीतही नव्हतं आणि भारताने आपली अदृश्य ढाल उभी केली होती.

भारताच्या या अद्वितीय यशाची गाथा इराण विरुद्ध इस्रायल आणि अमेरिका युद्धात अधिकच झळाळून उठली आहे. कारण इस्रायल आणि अमेरिकेच्या समस्त हवाई सुरक्षा यंत्रणा इराण आणि चीन ने दिलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी भेदून दाखवल्या आणि इस्रायल आणि अमेरिकेचे प्रचंड नुकसान केले परंतु याच चीन आणि तुर्कस्तानचे ड्रोन आणि क्षेपणास्त्र भारताने 100 % निष्प्रभ करून दाखवले. थोडक्यात आजच्या आधुनिक ड्रोन आणि मिसाईल युद्धात आपण इस्रायल आणि अमेरिकेच्या पेक्षाही तांत्रिक दृष्ट्या सरस आहोत हे आपण सिद्ध केले आहे.


लोकनेता गोपीनाथ मुंडे १२ डिसेंबर १९४९ रोजी परळीच्या एका सामान्य शेतकरी घरात जन्मलेला मुलगा एक दिवस महाराष्ट्राचा लोकनेता...
29/05/2026

लोकनेता गोपीनाथ मुंडे

१२ डिसेंबर १९४९ रोजी परळीच्या एका सामान्य शेतकरी घरात जन्मलेला मुलगा एक दिवस महाराष्ट्राचा लोकनेता होईल हे त्या वेळी कुणाला वाटलंही नसेल. पण गोपीनाथ मुंडे साहेबांनी ते जिद्दीने, कष्टाने आणि माणसांवरच्या निस्सीम प्रेमाने वास्तवात आणले.

कॉलेजमध्ये असताना प्रमोद महाजन यांची भेट झाली आणि दोन मित्रांनी मिळून राजकारणात उडी घेतली. इंदिरा गांधींच्या आणीबाणीविरोधात रस्त्यावर उतरले, नाशिकच्या तुरुंगात गेले, पण डगमगले नाहीत. अभाविपच्या माध्यमातून सुरू झालेला प्रवास पुढे भाजपच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षपदापर्यंत पोहोचला. बीडच्या मातीत जन्माला आलेला हा माणूस महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू कधी बनला हे कळलंच नाही.

१९९५ साली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री झाले तेव्हा मुंबईतल्या गुंडगिरीला त्यांनी सळो की पळो करून सोडलं. दाऊद गँगचा बिमोड केला, संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा बनवला आणि आजही हा कायदा गुन्हेगारांना ठेचण्यासाठी कामाला येतो आहे. गोपीनाथराव फणसासारखे होते. बाहेरून काटेरी दिसले तरी आतून रसाळ , मधुर होते. त्यांची नाळ गावाशी, शेतकऱ्याशी, सामान्य माणसाशी जोडलेली होती. शेतमालाला रास्त भाव मिळावा म्हणून त्यांनी काढलेली एल्गार यात्रा बारामतीत यशस्वीपणे संपवली. शरद पवारांना असे उघड आव्हान देण्याचे धाडस त्या काळात अत्यंत विरळ होतं.

२६ मे २०१४ रोजी मोदी सरकारच्या पहिल्या मंत्रीमंडळात ग्रामविकास मंत्री म्हणून शपथ घेतली आणि शपथविधीच्या पूर्वीच त्यांनी बीड जिल्ह्यातल्या सरपंचांना फोन लावायला सुरुवात केली. "गावचा विकास आराखडा तयार करा, पैशाची काळजी करू नका" केंद्रीय मंत्री झाल्यावरही हा माणूस बदलला नव्हता. शंभर दिवसांत शेतकरी आणि ग्रामीण महाराष्ट्रासाठी काय काय करायचं याच्या योजना त्यांच्या डोक्यात घोळत होत्या.

मुंडे साहेबांचं कार्यकर्त्यांशी असलेल्या भावनिक नात्यात खरे मोठेपण दडले होते. पैसा नाही, वशिला नाही पण काम करण्याची तळमळ आहे एखादा कार्यकर्ता घडवण्यासाठी त्यांना एवढं पुरेसे असे. मुरलीधर मोहोळ, अनिल शिरोळे, आर टी देशमुख, आजबे काका या सगळ्यांना घडवणारे हात मुंडे साहेबांचे होते. वेळ पडली तर स्वतःच्या पक्षाशीही ते भांडायचे, कारण कार्यकर्ता त्यांच्यासाठी केवळ मतदार नसून तो त्यांचा माणूस होता.

३ जून २०१४ रोजी दिल्लीत एका अपघातात त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. केंद्रीय ग्रामविकास मंत्री म्हणून त्यांना बरंच काही करायचं होतं, पण नियतीला ते मान्य नव्हतं. त्यांना जाऊन आज बारा वर्षे उलटली तरी साहेबांचं नाव निघालं तरी माणसांचे डोळे पाणावतात. कारण छोट्या खेड्यातून थेट दिल्लीपर्यंत पोहोचणारे अनेक नेते झाले आहेत पण माणसांच्या मनात कायमचे घर करणारे लोकनेते फार क्वचित जन्माला येतात. गोपीनाथरावांना भावपूर्ण आदरांजली.

Address

Thane
400601

Alerts

Be the first to know and let us send you an email when Anil Gaganbhedi Thatte posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share