Anil Gaganbhedi Thatte

Anil Gaganbhedi Thatte Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Anil Gaganbhedi Thatte, Digital creator, Thane.

60 वर्षांची तुफानी खळबळजनक पत्रकारिता, हादरवणारे शेकडो राजकीय गौप्यस्फोट, महाराष्ट्रातील शेकडो मान्यवर नेते, संपादक, उद्योगपती यांचे सल्लागार मीडिया मिडास बँक ऑफ आयडीया महागुरू
अनिल गगनभेदी थत्ते
यांच्याशी थेट ग्रेट भेट घडवून देणारे माध्यम

31/07/2026
31/07/2026

*युरोपने स्वतःला परत मिळवण्यासाठी ८०० वर्षे घालवली — आणि आता अवघ्या ५० वर्षांत ते सर्व गमावत आहे*

सध्या स्यूटा (Ceuta) — स्पेनमधील एक शहर, युरोपमधील शहर आणि आफ्रिकेशी असलेली युरोपियन संघाची (EU) एकमेव स्थलसीमा — येथे मोठ्या प्रमाणावर घुसखोरी होत असल्याचा दावा केला जात आहे.
एका मोठ्या लोंढ्यात हजारो लोकांनी कुंपणे आणि समुद्रकिनारे ओलांडण्याचा प्रयत्न केला आहे. मृतदेह किनाऱ्यावर वाहून येत आहेत. वाहने जाळली जात आहेत. युरोपच्या सीमा दररोज तुडवल्या जात असल्याचे चित्र दिसत आहे.
इतिहासाची पुनरावृत्ती
स्पेन असो, इटली, पोर्तुगाल, ग्रीस, युनायटेड किंगडम किंवा आयर्लंड — कथा तीच आहे. आणि ही काही नवी कथा नाही. पूर्वीही मुस्लिम सैन्याने स्पेनमार्गे युरोपमध्ये प्रवेश केला होता; मात्र त्या वेळी युरोपीय संस्कृतीने त्याला वेगळ्या पद्धतीने प्रतिसाद दिला.
इ.स. ७११ मध्ये तारिक इब्न झियाद नावाच्या एका बर्बर सेनापतीने उत्तर आफ्रिकेतून समुद्र पार करून त्या खडकावर पाऊल ठेवले, ज्याला आजही त्याचे नाव दिले गेले आहे — जबल तारिक (Jabal Tariq), म्हणजे "तारिकचा डोंगर", ज्याला आपण आज जिब्राल्टर म्हणतो.
त्यानंतर त्याच्या सैन्याने संपूर्ण स्पेनमध्ये वेगाने मोहीम राबवली.
पुढील जवळपास आठ शतके युद्ध सुरू राहिले. ब्रिटनसह युरोपातील ख्रिश्चन राज्यांनी आयबेरियन द्वीपकल्प परत मिळवण्यासाठी युद्ध केले, रक्त सांडले आणि मोठ्या प्रमाणावर बलिदान दिले. १४९२ मध्ये ग्रनाडाचा पाडाव झाल्यानंतर रिकॉनक्विस्टा (Reconquista) संपुष्टात आली.
तरीही तेथेच सर्व काही संपले नाही.
इ.स. १६०९ ते १६१४ दरम्यान मुस्लिम वंशज मानल्या जाणाऱ्या उर्वरित मोरिस्को लोकसंख्येला हद्दपार करण्यात आले. लाखो नव्हे, तर शेकडो हजार लोकांना तेथून हटवण्यात आले. त्या स्वातंत्र्याची किंमत युरोपने रक्त सांडून चुकवली.
त्यानंतर चारशेहून अधिक वर्षे स्पेन आणि युरोपने आपली सीमा कायम राखली.
आता, अवघ्या काही दशकांत, डाव्या विचारसरणीने हा इतिहास उलटवून टाकल्याचा दावा या लेखात केला आहे. पूर्वजांनी रणांगणावर मिळवलेले यश आधुनिक विद्यापीठांच्या वर्गखोल्यांत गमावले जात आहे. प्रचंड किंमत मोजून जपलेली भूमी आता दरवाजागणिक, कुंपणागणिक अशा लोकांच्या ताब्यात दिली जात आहे, ज्यांना या लेखात त्यांच्या पूर्वजांनी ८०० वर्षे लढून हाकलून दिलेल्या "सभ्यतेविरोधी बर्बरांचे वंशज" असे संबोधले आहे.
स्यूटा ही मानवतावादी मार्गिका नाही. ती अशा खंडाची आघाडीची सीमा आहे, ज्याने आपण कशासाठी लढलो होतो हेच विसरल्याचा दावा या लेखात करण्यात आला आहे.
यापेक्षा मोठी शोकांतिका आणि विश्वासघात असू शकतो का?
RIP Europe.

31/07/2026

एक पत्रकार... जनसंपर्क अधिकारी... ते ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त

संदीप माळवी : एका जिद्दी माणसाची विलक्षण यशोगाथा

एखाद्या व्यक्तीचा प्रवास हा केवळ पदांचा नसतो, तर तो जिद्द, मेहनत, प्रामाणिकपणा आणि माणुसकीचा असतो. अशाच संघर्षातून स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे संदीप माळवी. एका दुर्गम खेड्यातून सुरू झालेला त्यांचा प्रवास पत्रकारिता, जनसंपर्क, प्रशासन आणि साहित्य अशा विविध क्षेत्रांत यशस्वी ठरला. पत्रकारितेच्या क्षेत्रातून प्रवास सुरू करून प्रशासकीय सेवेतील सर्वोच्च जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळत हजारो लोकांच्या मनात विश्वासाचे स्थान निर्माण केले त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने त्यांच्या कार्याला आणि व्यक्तिमत्त्वाला मनःपूर्वक सलाम.

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील वाळोली या दुर्गम गावात त्यांचा जन्म झाला. आजही ज्या गावात राज्य परिवहनची बस पोहोचत नाही, अशा गाव खेड्यात बालपण गेले. याच गाव खेड्यातून पुढे शिक्षणासाठी एक संघर्षमय प्रवास सुरू झाला. पोहाळे तर्फे बोरगाव या छोट्या गावातील आश्रम शाळेत प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवत पुढे माध्यमिक शिक्षणासाठी कोल्हापूरच्या छत्रपती शहाजी कॉलेजच्या साई हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. आपल्या गुणवत्तेची चुणूक त्यांनी लहानपणापासूनच दाखवायला सुरुवात केली होती. पुढे कोल्हापूर महानगरपालिकेचे यशवंतराव चव्हाण (केएमसी) कॉलेज कोल्हापूर या ठिकाणी महाविद्यालय शिक्षणासाठी प्रवेश घेतला. महाविद्यालयात बीकॉम चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या मागे न धावता लिखाणाची तळमळ त्यांना स्वस्त बसू देत नव्हती म्हणूनच त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागामध्ये पत्रकारिता पदवी घेण्यासाठी प्रवेश घेतला, आपल्या गुणवत्तेच्या जोरावर त्यांनी पत्रकारिता विषयात शिवाजी विद्यापीठाचे सुवर्णपदक मिळवून शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा उमठवला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पत्रकारितेतून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.

पत्रकारिता हेच ‘पाहिलं प्रेम’

पत्रकार होवून सामान्य माणसाचा आवाज बनता येत.सामान्यच्या जगण्याचं दुःख,कष्ट आपल्या लेखणीच्या रूपाने प्रतिबिंबित करता येतात हा विचार कायमचा डोक्यात पक्का करून आपल्या धारदार लेखणीला सुरुवात केली. साप्ताहिक लोकप्रभा, महाराष्ट्र हेराल्ड, दैनिक तरुण भारत, दैनिक पुढारी अशा नामांकित वृत्तपत्रातून त्यांनी आपल्यातल्या संवेदनशील पत्रकारांची एक वेगळी छाप पाडली. त्याकाळी एका लेखाचे केवळ १५ रुपये मानधन मिळत असतानाही त्यांनी लेखणीवरील विश्वास कधीच सोडला नाही. पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी समाजजीवनाचा जवळून अभ्यास केला, सामान्य माणसाच्या समस्या जाणून घेतल्या आणि लोकांशी संवाद साधण्याची प्रभावी शैली विकसित केली. कारण पत्रकारिता हेच त्यांचे पहिले प्रेम राहिले आहे.


मुंबईच्या मायानगरीत नव्या संघर्षाला सुरुवात

कोल्हापूरच्या तांबड्या मातीतून मोठी स्वप्ने उराशी बाळगून त्यांनी मुंबईच्या मायानगरीत प्रवेश केला. सुरुवातीला बहिणीकडे चेंबूरच्या झोपडपट्टीत वास्तव्य केले. कोल्हापुरातून दोनच कपड्यावर मुंबईत येवून एका वेळच्या जेवणाची भ्रांत असताना करिअरच्या एका नव्या संघर्षाला सुरुवात केली. पत्रकार म्हणून काम करताना अनेक अडचणींचा सामना केला, पण मेहनत आणि सातत्य यांच्या जोरावर त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. काही दिवसातच त्यांनी राज्य शासनाच्या एड्स नियंत्रण संस्थेत संचालक म्हणून पहिल्या शासकीय सेवेत प्रवेश केला.

जनसंपर्क क्षेत्रातील प्रभावी नेतृत्व

सन २०१६ साली त्यांनी ठाणे महानगरपालिकेच्या मुख्य माहिती व जनसंपर्क अधिकारी म्हणून खऱ्या अर्थाने त्यांनी शासकीय सेवेत प्रवेश केला. याचवेळी त्यांनी आपल्या कार्यकाळात महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाला केवळ प्रसिद्धीपुरते मर्यादित न ठेवता, तो शासन आणि जनतेतील विश्वासाचा दुवा बनवला. विविध प्रकल्पांसाठी प्रभावी प्रसिद्धी साहित्याची निर्मिती, स्थानिक, राज्य व राष्ट्रीय माध्यमांशी समन्वय, पत्रकार परिषद व मुलाखतींचे नियोजन, मासिक प्रकाशन, माहितीपट व टीव्ही जाहिरातींची निर्मिती, तसेच विविध सामाजिक व पर्यावरण जनजागृती मोहिमांची यशस्वी अंमलबजावणी करून त्यांनी विभागाची वेगळी ओळख निर्माण केली. शासकीय विभागांशी सुसंवाद, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि प्रभावी जनसंपर्काच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक उपक्रम जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य अत्यंत समर्पणाने केले. त्यांच्या दूरदृष्टी, कर्तव्यनिष्ठा आणि कार्यक्षम नेतृत्वामुळे जनसंपर्क विभागाला नवी दिशा मिळाली. त्यांच्या संवादकौशल्यामुळे आणि लोकाभिमुख कामकाजामुळे ते सर्वांच्या पसंतीस उतरले.

प्रशासकीय कारकिर्दीचा सुवर्ण अध्याय

मुख्य माहिती व जनसंपर्क अधिकारी पदावर त्यांनी जबाबदारी, संवेदनशीलता आणि कार्यक्षमतेचा उत्कृष्ट नमुना सादर केल्यानंतर त्यांनी उप आयुक्त म्हणून पदोन्नती मिळाली. उप आयुक्त म्हणून मुख्यालय, जनसंपर्क, जाहिरात, क्रीडा विभाग अशा अनेक खात्यांचा पदभार त्यांच्याकडे आला. या प्रत्येक विभागाला त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला. उप आयुक्त (मुख्यालय) असताना ठाणे महानगरपालिकेतील अनेक कर्मचाऱ्यांचा पदोन्नतीचा विषय अनेक वर्ष प्रलंबित होता हा विषय अत्यंत तत्परतेने त्यांनी हाती घेऊन अनेकांना पदोन्नतीचा मार्ग सुकर केला. पदोन्नती वेतनश्रेणी वाढ यासारखे अनेक महत्त्वपूर्ण विषय त्यांनी योग्यरीत्या हाताळले. जनसंपर्क विभागात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे ठाणे महानगरपालिकेच्या कार्याचा डंका महाराष्ट्रसह देशभरात गाजला आहे. क्रीडा विभागात देखील ठाणे मॅरेथॉन, महापौर चषक कबड्डीसह इतर सर्व क्रीडा स्पर्धेत त्यांनी त्यांच्या उत्तम नियोजन व कार्याचा ठसा उमटवला आहे. त्याच काळात ठाणे महानगरपालिका परिवहन विभागाचा व्यवस्थापक म्हणून देखील त्यांनी पदभार घेतल्यानंतर कर्मचाऱ्यांचा अनेक वर्षाचा कायमस्वरूपीचा प्रश्न देखील त्यांनी मार्गी लावला. आपल्या कार्यतत्परतेने, प्रामाणिकपणाने आणि दूरदृष्टीने त्यांनी प्रशासनात स्वतंत्र ओळख निर्माण करत महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आणि ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदापर्यंत मजली मारली. याच काळात अत्यंत ताकतीने व धडाडीने मजल मारत एक उत्तम प्रशासकीय अधिकारी म्हणून एक वेगळा आदर्श निर्माण केला. शहर विकास, लोकसहभाग आणि प्रशासनातील नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे त्यांनी ठाणे शहराच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली ठाणे स्मार्ट सिटी प्रकल्पाने राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवला. "मोस्ट पब्लिक सीईओ ऑफ स्मार्ट सिटीज इन इंडिया" हा राष्ट्रीय सन्मान त्यांच्या लोकाभिमुख नेतृत्वाचा आणि दूरदृष्टीचा गौरव करणारा ठरला.
संदीप माळवी यांची सामान्य नागरिकांप्रती असणारी आत्मीयता आणि प्रशासनातील चोख कारभारामुळे राज्याचे तत्कालीन लोकप्रिय मुख्यमंत्री व विद्यमान उप मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून देखील त्यांना काम करण्याची संधी मिळाली. याही संधीचे सोनं करत त्यांनी राज्यभरातून आलेल्या प्रत्येक सामान्य नागरिकाला न्याय देण्याचं काम त्यांनी केले आहे. मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, ठाणे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी केलेले कार्यही उल्लेखनीय ठरले. झोपडपट्टी पुनर्वसनासारख्या संवेदनशील विषयात लोकांशी सातत्याने संवाद साधत त्यांनी प्रशासनाला मानवी चेहरा दिला. त्यांच्या कार्यशैलीमुळे अनेक विकासकामांना गती मिळाली आणि नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला.

गझलकार ' संदीप माळवी '

संदीप माळवी हे उत्तम प्रशासकीय अधिकारी जरी असले तरी त्या अधिकाऱ्यामागे एक हळवा गझलकार देखील दडलेला आहे. 1999 मध्ये गझलसागर प्रतिष्ठान मुंबई यांच्याद्वारे ‘’कारवा’’ हा पहिला गझल संग्रह त्यांचा प्रकाशित झाला. त्यानंतर ऋतू वेदनांचे हा दुसरा गजल संग्रह देखील त्यांनी प्रकाशित केला हे दोन्ही गझलसंग्रह रसिकांच्या पसंतीस उतरले. त्यांच्या अनेक गझलांना “ गझलनवाज भीमराव पांचाळ यांनी सूरबद्ध केले आहे. आईवर भरभरून प्रेम करणाऱ्या या अत्यंत हळव्या मनाच्या या कवीने 'आई'वर अनेक कविता शब्ध केल्या आहेत. त्यांनी आईवर शब्ध केलेली प्रत्येक कविता काळजाचा ठाव घेतल्या शिवाय राहत नाही. दूरदर्शन आणि आकाशवाणीवरही त्यांनी विविध कार्यक्रम सादर केले. जेके फिल्स पुणे निर्मित “ नौकेला शोध किनारा” या मराठी टीव्ही मालिकेसाठी त्यांनी संवाद लेखन केले आहे. तर सह्याद्री वाहिनी मुंबई दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या एचआयव्ही एड्स वरील “दैव जाणिले कुणी” या मराठी मालिकेसाठी काही भाग लिहिले आहेत. त्यांच्या लेखनाला अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार लाभले. उत्कृष्ट पत्रकारितेसाठी सन्मान, २००९ चा महाराष्ट्र साहित्य गौरव पुरस्कार, पी. सावळाराम पुरस्कार, विठ्ठल उमप पुरस्कार तसेच एकता कल्चरल अकादमी पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांच्या साहित्यिक योगदानाचा गौरव झाला आहे.

अनाथांचा नाथ ‘ एकनाथ '

सामान्य कार्यकर्त्यापासून महाराष्ट्राच्या नेतृत्वापर्यंतचा एकनाथ शिंदे यांचा संघर्षमय, प्रेरणादायी आणि जनसेवेने समृद्ध प्रवास 'अनाथांचा नाथ एकनाथ' या लोकप्रिय गीतातून संदीप माळवी यांनी प्रभावीपणे उलगडला आहे. जनतेप्रती असलेली तळमळ, सामाजिक बांधिलकी, विकासाची दृष्टी आणि नेतृत्वाचे विविध पैलू या गीतातून भावपूर्ण शब्दांत व्यक्त झाले आहेत. गीतकार संदीप माळवी त्यांच्या समर्थ लेखणीतून एकनाथ शिंदे यांच्या कार्याचा आणि जनमानसातील प्रतिमेचा प्रभावी शब्दरूपाने गौरव करण्यात आला आहे. हे गीत केवळ स्तुतिगीत नसून, एका सामान्य कार्यकर्त्याच्या असामान्य प्रवासाची संगीतमय कहाणी म्हणूनही ओळखले जाते.

"तू रणांगणातील वीर... सोडू नकोस तू धीर

कोरोना महामारीच्या कठीण काळात पोलीस, आरोग्य कर्मचारी आणि सफाई कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी संदीप माळवी यांनी "तू रणांगणातील वीर... सोडू नकोस तू धीर" हे प्रेरणादायी गीत लिहिले. या गीताला समाजमाध्यमांवर मोठा प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे, राज्य शासनाने या गीताची दखल घेत अधिकृतपणे हे गीत प्रसारित केले. या स्फुर्तीदायी गीतामुळे कोव्हीड मध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला एक वेगळी उर्जा,ताकद मिळाली. कोविड योद्ध्यांना सलाम करणाऱ्या या हृदयस्पर्शी गीतामुळे संदीप माळवी यांच्या संवेदनशील आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्त्वाचा नवा पैलू सर्वांसमोर आला.

अधिकारी नव्हे, माणूस म्हणून मोठेपण

संदीप माळवी यांचे व्यक्तिमत्त्व केवळ एका यशस्वी प्रशासकाचे नाही, तर संवेदनशील लेखक, अभ्यासू पत्रकार, आणि सर्वसामान्य माणसाशी नाळ जपणाऱ्या लोकाभिमुख अधिकाऱ्याचे आहे. त्यांनी पदाचा अधिकार गाजवला नाही; तर जबाबदारी पार पाडली. त्यांनी फाईलपेक्षा माणसाला महत्त्व दिले आणि प्रशासनाला लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. सहकाऱ्यांना प्रेरणा देणे, नव्या कल्पनांना प्रोत्साहन देणे, पारदर्शक प्रशासनावर भर देणे आणि समाजहिताला प्राधान्य देणे ही त्यांच्या कार्यशैलीची वैशिष्ट्ये राहिली. संदीप माळवी यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा अफाट जनसंपर्क. राजकारण, प्रशासन, पत्रकारिता, साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक आणि कला क्षेत्रात त्यांचे असंख्य जिव्हाळ्याचे संबंध आहेत. "माणसं जोडणं" ही त्यांची खरी ताकद ठरली. या जोरावरच त्यांनी विविध पदावर सक्षमपणे काम केले.

नव्या पर्वाची सुरुवात

त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास हा ग्रामीण भागातील तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. परिस्थिती कितीही कठीण असली, तरी शिक्षण, मेहनत, प्रामाणिकपणा आणि जिद्द यांच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते, याचे ते जिवंत उदाहरण आहेत. आज त्यांच्या शासकीय सेवेतून निवृत्तीचा क्षण आला असला, तरी त्यांची ओळख केवळ निवृत्त अधिकारी म्हणून नव्हे, तर एक संवेदनशील पत्रकार, कुशल जनसंपर्क अधिकारी, दूरदृष्टी असलेले प्रशासक, अभ्यासू लेखक, गझलकार आणि माणसं जोडणारा माणूस अशीच कायम राहील.

"सेवानिवृत्ती ही सेवेला पूर्णविराम नसून,
जीवनाच्या नव्या पर्वाची सुंदर सुरुवात आहे."

संदीप माळवी यांना निरोगी, आनंदी आणि सृजनशील निवृत्त जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांच्या संघर्षमय प्रवासातून अनेक पिढ्यांना प्रेरणा मिळत राहो, हीच सदिच्छा.

शब्दांकन
श्री. अभिजीत कोतोलीकर
जनसंपर्क अधिकारी
मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, ठाणे

31/07/2026

News for Heart ❤️ patients

अनेकदा डॉक्टर म्हणतात, "हृदयाची पंपिंग क्षमता (EF) ४०% आहे." आणि ते ऐकताच रुग्ण, कुटुंबीय आणि नातेवाईक सगळेच घाबरून जातात. लगेच चर्चा सुरू होते – "आता तर खूप गंभीर आहे!"
पण जरा थांबा…
"हृदय ४०% काम करत आहे" याचा अर्थ तुमचे आयुष्य ४०% उरले आहे किंवा जगण्याची शक्यता फक्त ४०% आहे, असा अजिबात होत नाही. डॉक्टर येथे Ejection Fraction (EF) या वैद्यकीय मोजमापाबद्दल बोलत असतात.
सोप्या भाषेत समजून घेऊया.
प्रत्येक ठोक्याबरोबर हृदय आपल्या आत असलेले सर्व रक्त बाहेर पंप करत नाही. निरोगी हृदयदेखील प्रत्येक ठोक्याला साधारण ५५% ते ७०% रक्तच शरीरात पंप करते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा EF ४०% असल्यास, त्याचा अर्थ फक्त एवढाच की हृदयाची पंपिंग क्षमता सामान्यपेक्षा कमी झाली आहे; हृदयाने ६०% काम करणे बंद केले आहे, असा त्याचा अर्थ नाही.
होय, ४०% EF ही निश्चितच लक्ष देण्यासारखी बाब आहे. याचा अर्थ हृदयाला अधिक काळजी आणि योग्य उपचारांची गरज आहे. पण आनंदाची गोष्ट म्हणजे अनेक रुग्णांमध्ये योग्य औषधे, रक्तदाब व मधुमेह नियंत्रणात ठेवणे, मीठाचे प्रमाण कमी करणे, वजन नियंत्रित ठेवणे, नियमित चालणे, धूम्रपान व मद्यपान टाळणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचे काटेकोर पालन करणे यामुळे EF ४०% वरून ५०% किंवा त्याहून अधिकही वाढू शकतो.
विशेष म्हणजे, जगभरात लाखो लोक ३५% ते ४५% EF असतानाही अनेक वर्षे चांगले आणि सक्रिय जीवन जगत आहेत. ते नोकरी करतात, प्रवास करतात आणि आपल्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्याही व्यवस्थित पार पाडतात.
म्हणून पुढच्या वेळी एखाद्याच्या अहवालात "EF ४०%" असे दिसले, तर त्याला घाबरवण्याऐवजी समजावून सांगा की हा एक वैद्यकीय निर्देशांक (Medical Parameter) आहे, मृत्यूचा टक्का नाही.
घाबरण्यामुळे हृदयावरचा ताण वाढतो, तर योग्य माहिती, सकारात्मक दृष्टिकोन आणि योग्य उपचार हृदयाला अधिक सक्षम बनवतात.
लक्षात ठेवा — प्रत्येक कमकुवत हृदय हरत नाही. योग्य काळजी, उपचार आणि जीवनशैलीतील बदल यांच्या मदतीने अनेक हृदये पुन्हा नव्या जोमाने धडकू लागतात.
आज एका रुग्ण जनजागृती (Patient Awareness) सेमिनारमध्ये ही माहिती ऐकली आणि ती आपणा सर्वांसोबत शेअर करावी असे वाटले.
टीप : ही माहिती केवळ जनजागृतीच्या उद्देशाने आहे. कोणताही वैद्यकीय निर्णय घेण्यापूर्वी आपल्या हृदयरोगतज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.
Subscribe to youtube channel and follow page Anil Gaganbhedi Thatte

31/07/2026

आजच्या न्यूयॉर्क टाइम्स मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखाचा स्वैर अनुवाद .
Asim Sarode

हे वर्तमानपत्र लाखो अमेरिकन्स वाचतात ज्यांच्याबरोबर आपली IT इंडस्ट्री आणि इतर कितीतरी उद्योग काम करतात . ह्या लोकांचं भारता विषयच मत गेले एक दशक हळू हळू बदलत गेलंय . "नीट" प्रकाराने त्यावर शेवटचा घाव घातला आहे.
-------------------------------------------
३१ जुलै २०२६

तीन दशकांपेक्षा अधिक काळ, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भीती, आदर आणि भक्ती यांवर आधारित एक राजकीय वलय निर्माण केले आहे . त्यामुळे लोकशाही जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्तिमत्त्वाच्या प्रतिमेची निर्मिती झाली.
ती प्रतिमा आता कोसळली आहे.

वैद्यकीय प्रवेश परीक्षा प्रश्नपत्रिका गळतीच्या विरोधात विद्यार्थ्यांनी केलेल्या विखुरलेल्या निषेधापासून सुरुवात झालेली ही लाट काही आठवड्यांत पंतप्रधानांच्या १२ वर्षांच्या सत्तेतील सर्वात राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण बंडखोरीत रूपांतरित झाली.विद्यार्थी, नुकतेच पदवीधर झालेले तरुण, बेरोजगार कामगार, शेतकरी आणि काही सेलिब्रिटी यांचा व्यापक आघाडी या चळवळीमागे उभी राहिली. दोन पिढ्यांमधील सर्वात शक्तिशाली भारतीय नेत्याला रस्त्यांवर आणि सोशल मीडियावर उपहासाने झोडपले गेले आणि नंतर नवी दिल्लीतील संसदेकडे मोर्चा काढला गेला. पोलिसांनी लाठ्या आणि अश्रुधुके वापरून निदर्शकांवर हल्ला चढवला.

पण गेल्या आठवड्याअखेरीस श्री. मोदींना अपरिहार्यतेत अडकून आपल्या शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याला सहमती द्यावी लागली — जे त्यांच्यासाठी अत्यंत अनपेक्षित आणि त्यांच्या ‘कधीही न वाकणाऱ्या’ राजकीय स्वभावाच्या विरुद्ध होते.

या उन्हाळ्यातील उठाव केवळ प्रश्नपत्रिका गळतीपुरता मर्यादित नव्हता. तो भारतीय लोकशाहीच्या स्वतःची दुरुस्ती करण्याच्या क्षमतेची परीक्षा होती.

ही चळवळ तरुण भारतीयांच्या जमा झालेल्या निराशेचा उद्रेक होती. पंतप्रधानांनी सांगितलेल्या ‘न्यू इंडिया’च्या समृद्ध कथा आणि त्यांचे खराकीट वास्तव यात त्यांना साम्य दिसत नव्हते. देशाच्या अजिंक्य वाटणाऱ्या नेत्याला दुर्मिळ माघार घ्यावी लागली.

यातून असे दिसते की, श्री. मोदींनी दशकाभरात लोकशाही संस्था पोकळ करून सत्ता स्वतःभोवती केंद्रित करण्याचे प्रयत्न केले असले, तरी भारतीय लोकशाहीचे अंतिम रक्षक अजूनही तिचे नागरिक असू शकतात.

श्री. मोदी सत्तेत आले तेव्हा भ्रष्टाचारमुक्त, प्रगती आणि संधींची भूमी निर्माण करण्याचे आणि लाखो नोकऱ्या निर्माण करण्याचे वचन दिले होते. परदेशी बँकांत ठेवलेल्या भ्रष्ट पैशाची परतफेड झाल्यास गरीब नागरिकांना १५ लाख रुपये मिळतील, असेही सांगितले होते.

त्याऐवजी त्यांनी एक आत्मस्तुती करणारे, अकार्यक्षम आणि द्वेषपूर्ण हिंदू-प्रथम शासन दिले. ज्यात अतिश्रीमंत लोकांनी विशाल संसाधनांवर पकड बसवून अर्थव्यवस्थेवर प्रभावी नियंत्रण मिळवले आहे.

तरुणांमध्ये बेरोजगारी भयंकर आहे. सरकार मुस्लिम आणि इतर धार्मिक अल्पसंख्याकांविरुद्ध क्रूरता वापरून स्वतःच्या अपयशापासून हिंदू बहुसंख्येला विचलित करते.

संसद, न्यायव्यवस्था आणि पत्रकारिता यांसारख्या लोकशाहीसाठी अत्यावश्यक संस्था आता श्री. मोदींच्या सुरेल स्वरात गातात.पंतप्रधानांचे गौरवीकरण ही आता राज्य यंत्रणेची प्रमुख प्राधान्ये झाली आहे. भारतातील सर्वात मोठे स्टेडियम त्यांच्या नावावर आहे, गरीबांना रेशन त्यांच्या छायाचित्राच्या पिशव्यांत दिले जाते, अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना त्यांचा वाढदिवस साजरा करण्यास भाग पाडले जाते आणि त्यांच्या रेडिओ प्रसारणासाठी मोठे जनसमुदाय जमवले जातात.

सामान्य जनतेत निराशेची भावना पसरली होती. श्री. मोदींच्या दडपशाहीच्या शासनाने त्यांना दुर्लक्षित केले आणि विरोधक पक्षही अकार्यक्षम ठरल्याने लोकांना वाटत होते की त्यांना निवडणुकीत पराभूत करणे अशक्य आहे.

आता ७५ वर्षांचे झालेले श्री. मोदी कदाचित हे स्वीकारतील की ते जगातील सर्वात मोठ्या तरुण लोकसंख्येचे नेतृत्व करण्यासाठी फारच जुने झाले आहेत आणि बाजूला होतील. पण जखमी आणि दुर्बल झाल्याने ते पूर्वीपेक्षा अधिक धोकादायक आणि अनिश्चितही होऊ शकतात आणि आपली खचलेली सत्ता पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करू शकतात.

निदर्शने संपल्यानंतर पोलिसांनी सरकारने दिलेल्या आश्वासनांचे उल्लंघन करून विद्यार्थ्यांना अटक केल्याचे किंवा ताब्यात घेतल्याचे अहवाल येत आहेत.कोणत्याही परिस्थितीत, एकेकाळी स्वतःला ‘देवाचे साधन’ आणि दिव्य ऊर्जेने संपन्न असल्याचे सांगणारा माणूस आता लक्षणीयरीत्या नम्र झाला आहे.

“मी लहानपणापासून त्यांची पूजा करायला शिकलो होतो,” दिल्लीतील एका निदर्शनस्थळी एका तरुण विद्यार्थ्याने गेल्या शुक्रवारी मला सांगितले. तिथे स्वयंसेवक अन्न-पाणी वाटत होते, कार्डबोर्डने हवा देत होते आणि गर्दी “जेव्हा मोदी भीतीने भरतात, तेव्हा हिंदू-मुस्लिम ऐकू येते” असे घोषवाक्य ओरडत होती.

“पण ज्या माणसाने अजूनही आपला डिप्लोमा सादर केलेला नाही, त्याच्या नेतृत्वाखाली आपण का असावे?” तो पुढे म्हणाला. श्री. मोदींच्या पक्षाने प्रसिद्ध केलेल्या पण सत्यता अजूनही संशयास्पद असलेल्या विद्यापीठ पदव्यांच्या दीर्घकाळ चाललेल्या वादाला तो संदर्भ देत होता.

श्री. मोदींच्या विवादास्पद शैक्षणिक पात्रतेची विडंबना विद्यार्थी निदर्शकांना चांगलीच जाणवली.लाखो तरुण भारतीयांसाठी व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांसाठीच्या तीव्र स्पर्धात्मक प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे हा सन्मानाच्या जीवनाचा मार्ग आहे.

कुटुंबे कर्ज काढतात, दागिने गहाण ठेवतात किंवा घरे गहाण ठेवून मुलांना कोचिंगसाठी पैसे देतात.पण विविध परीक्षांचे प्रश्न नियमितपणे गळतात आणि विकले जातात. महिनोनमहिने कष्टाने तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आयुष्य उध्वस्त होते. मे महिन्यात दोन दशलक्षाहून अधिक विद्यार्थ्यांनी दिलेली राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षा गळतीमुळे रद्द करून पुन्हा घेण्यात आली, तेव्हा कळस गाठला. काही विद्यार्थ्यांनी परीक्षा पुन्हा द्यावी लागेल हे समजल्यावर आत्महत्या केली.

भारताचे मुख्य न्यायमूर्ती यांनी असंबंधित टिप्पणीत बेरोजगार तरुणांची तुलना ‘झुरळांशी’ केली, तेव्हा निदर्शकांना त्यांचे प्रतीक मिळाले. ‘कॉकरोच जनता पार्टी’ — श्री. मोदींच्या भाजपचे विडंबन — जन्माला आली.

विनोद म्हणून सुरू झालेली ही गोष्ट एका पिढीच्या रागाचे साधन बनली. देशभरात लाखो लोक या चळवळीभोवती एकत्र आले. शिक्षण मंत्र्याचा राजीनामा आणि आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली. एका प्रमुख कार्यकर्त्याच्या आणि काही विद्यार्थ्यांच्या गांधीवादी उपोषणाने चळवळीला जोर दिला.सुरुवातीला सरकारने निदर्शकांकडे दुर्लक्ष केले.

माध्यमांतील त्यांच्या अनुयायांनी त्यांना भारत अस्थिर करू इच्छिणाऱ्या परदेशी शक्तींचे हत्यार ठरवले. पण २० जुलै रोजी दिल्लीतील मुख्यतः शांततापूर्ण निदर्शनांमध्ये पोलिसांनी तरुण भारतीयांना मारहाण केल्याच्या व्हिडिओंनी हे खोटे उघड झाले.

त्या दिवशी श्री. मोदी भारी सुरक्षा कवचासह संसदेतून बाहेर पडले. त्यांच्या अजिंक्यतेची आभा त्या धकाधकीत तुडवली गेली.

दक्षिण आशियातील डिजिटलली जोडलेल्या, तरुणांनी नेतृत्व केलेल्या चळवळींनी गेल्या काही वर्षांत श्रीलंका, बांगलादेश आणि नेपाळमधील वाढत्या हुकूमशाही राजवटींना पदच्युत केले.

भारतातील तरुणांच्या बिघडत्या परिस्थिती असूनही श्री. मोदी या प्रवाहांना मोठ्या प्रमाणात टाळत होते. आता त्यांना ह्या गोष्टी लपवणे अशक्य आहे

या उन्हाळ्यात भारतात घडलेल्या असामान्य घटनांनी देशाच्या संस्थापकांनी प्रोत्साहित केलेल्या लोकशाही सवयी किती खोलवर रुजल्या आहेत, हे उघड केले आहे. तरुण भारतीयांनी जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीला पुन्हा एकदा टिकून राहण्याची संधी दिली आहे.

Jagdish Naik यांच्या वॉल वरून साभार पुनर्रप्रक्षेपित

31/07/2026

चंद्रकांत दादा पाटील शिक्षण मंत्री: रहाणार की..

31/07/2026

ठाण्याच्या व शिंद्यांच्या बदनामीची मुंबईच्या बड्या बिल्डर्स कडून "सुपारी"

31/07/2026

मराठी नेत्यांच्या मुलांना मराठी जोडीदार का नकोत?

31/07/2026

दिपके खरा 'शत्रू' कोणाचा?
मोदी शहा की राहुल प्रियांका

Address

Thane
400601

Alerts

Be the first to know and let us send you an email when Anil Gaganbhedi Thatte posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share