Ahilyanagar Update’s अहिल्यानगर अपडेट्स

  • Home
  • Ahilyanagar Update’s अहिल्यानगर अपडेट्स

Ahilyanagar Update’s अहिल्यानगर अपडेट्स सोशल मीडियावर सर्वदूर व्यापक प्रसिद्धीसाठी संपर्क करा.🙏

25/09/2025
🛑के. के. रेंजचा प्रश्न पुन्हा उद्भवणार?🛑नक्की काय आहे आता पुन्हा हा प्रश्न... सविस्तर वाचा👇
15/09/2025

🛑के. के. रेंजचा प्रश्न पुन्हा उद्भवणार?

🛑नक्की काय आहे आता पुन्हा हा प्रश्न... सविस्तर वाचा👇

अहिल्यानगर :- जिल्ह्यातील के. के. रेंज या लष्करी सराव क्षेत्राचा मुद्दा पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता निर्माण झाली ...

खरी मैत्री कशी असावी तर अशी...१० मार्च. तो दिवस अजूनही डोळ्यासमोर उभा आहे. माझा सहकारी प्रज्वल गीते - जो रोज हसतमुखाने ज...
09/09/2025

खरी मैत्री कशी असावी तर अशी...
१० मार्च. तो दिवस अजूनही डोळ्यासमोर उभा आहे. माझा सहकारी प्रज्वल गीते - जो रोज हसतमुखाने जगाला सामोरा जायचा, त्या दिवशी छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त भगवा झेंडा लावत असताना अचानक विजेच्या तारेला धडकला. क्षणभरात त्याच्या संपूर्ण शरीराला ठिणग्या लागल्या, संपूर्ण अंग भाजलं, आणि जीवन-मृत्यूच्या दरम्यान त्याची लढाई सुरु झाली.

सुरभी हॉस्पिटलमध्ये जवळपास तीन महिने उपचार, चार ते पाच मोठ्या शस्त्रक्रिया, रात्री-दिवस डॉक्टर, औषधं, वेदना, रक्त आणि घाम... पण तरीही त्याच्या जखमा आजही शांत झालेल्या नाहीत. डॉक्टरांनी तर हात कापावे लागतील असंही सांगितलं होतं. म्हणजे कल्पना करा- ज्याचे हात कामासाठी, जगण्यासाठी, जगण्याचा हक्क मिळवण्यासाठी आहेत, तेच हात हरवण्याची वेळ त्याच्यावर येतेय.

या सगळ्या संकटाच्या वादळात त्याच्या घरी एकटं आधार आहे - वृद्ध वडील. आईचं आधीच निधन झालेलं. घरात ना बहीण, ना भाऊ, ना कोणी सांभाळणारं.

खरी मैत्री म्हणजे काय?

इथेच येतो एक नाव सार्थक आडेप. हा तरुण स्वतः नोकरी करतो, स्वतःचं आयुष्य सांभाळतो. पण गेल्या सहा महिन्यांपासून त्याने आयुष्याचं ध्येय ठरवलंय आपला मित्र प्रज्वल वाचवायचा.

दोन वेळा रोज, कामाच्या ताणातून वेळ काढून, तो स्वतःच्या हाताने प्रज्वलला जेवायला घालतो. मी जेवणाची व्यवस्था करतो, पण प्रज्वलचे हात जखमी असल्यामुळे तो स्वतः खाऊ शकत नाही. तेव्हा सार्थक स्वतःच्या हाताने घास घास प्रेमाने खाऊ घालतो. सहा महिन्यांत एकही दिवस त्याने हा नियम मोडलेला नाही. प्रज्वलच्या अजून दोन शस्त्रक्रिया होणे बाकी आहे त्याची पायाची बोटेही उपचारादरम्यान कापण्यात आली आहे.

प्रश्न पडतो - कुणी एवढं करेल का?

सुखात सगळे सोबती, दुःखात जो उभा... तोच मित्र सुखात पार्टी, फिरायला जाणं, फोटो, सेल्फी, हशा-टवाळक्या हे सगळेच करतात. पण खरी कसोटी तेव्हा असते, जेव्हा एखाद्या मित्राच्या आयुष्यावर संकट येतं, दुःख त्याचं दार ठोठावतं. तेव्हा कितीजण धावून येतात? बहुतांश लोक दूर सरकतात, कारण वेळ, पैसा, जबाबदारी, आणि त्रास कोणाला घ्यायचा असतो? पण सार्थकने दाखवून दिलं-खरी मैत्री म्हणजे हसण्यात साथ देणं नव्हे, तर वेदनेत हात धरून उभं राहणं.

सार्थक आडेप - एक जिवंत आदर्श

सार्थकने जे केलंय, ते पुस्तकात वाचायला मिळेल असं नाही. ही खरी कहाणी आहे, जी आजच्या समाजाला आरसा दाखवते. त्याच्या निःस्वार्थ सेवेला, त्याच्या जिद्दीला, आणि त्याच्या खऱ्या मैत्रीला माझा मनापासून सलाम.

मा.श्री.निखिल बाबासाहेब वारे
९८५००००८५२

02/09/2025

सरकार मराठा आंदोलन दडपतंय का ? मराठी माणूस मुंबईत अडचणींचा ठरतोय का ? महाराष्ट्रातच मराठी माणसाला आता कोर्टाच्या परवानगीशिवाय काही करता येणार का ?

30/08/2025

आपल्या मतदारसंघातील आमदार आणि खासदार यांनी मुंबईत मराठा आंदोलनात सहभाग घेतला का नाही हे पाहा आणि पुढील निवडणुकीत मत मागायला आल्यावर जाब विचारा..!

Yeeee....!!!फायनली नगर ते पुणे वंदे भारत सुरू झाली. नगर पुणे लाँग डिस्टन्स रिलेशनशिप संपले, आता मावा खायला डायरेक्ट नगरल...
12/08/2025

Yeeee....!!!
फायनली नगर ते पुणे वंदे भारत सुरू झाली. नगर पुणे लाँग डिस्टन्स रिलेशनशिप संपले, आता मावा खायला डायरेक्ट नगरला जायचं भो, अमुक अमुक साहेबांच्या कृपेमुळे ट्रेन आली भो, आपण तर आता रोज अप डाउन करणारा भावा!!

असे कायच्या काय मेसेज आणि रिल्स या 2-3 दिवसात पाहायला मिळाले. वंदे भारत ट्रेन आपल्या नगर मधून सुरू झाली म्हणून सुरुवातीला भारी पण वाटल. नगरची कितीतरी जनता जी पुण्यात राहते ती माझ्यासारखीच खुश झाली असणार.
मग नंतर मी ट्रेनचा टायमिंग पाहिला. ट्रेन रात्री 7.35 ला नगर मध्ये येणार आणि 9.35 पर्यंत पुण्यात पोहचणार. आणि पुण्यावरून सकाळी 6.25 ला सुटणार आणि नगर मध्ये 2 तासात म्हणजे 8.33 ला पोहचणार..!!

पुण्यावरून लोक कामानिमित्त नगरसारख्या महानगरात जात असावेत असा गैरसमज वंदे भारत ट्रेनचे टाइमटेबल ठरवणाऱ्या माणसांचा झालेला असावा. रात्री 9.30 वाजता पुण्यात येऊन काय करायचे? धड विद्यार्थ्यांना फायदा नाही, जॉब करणाऱ्यांना फायदा नाही, कोणालाच कसला फायदा नाही. मग एवढा जल्लोष आणि धांगडधिंगा कशासाठी?

मुळात ही ट्रेन नागपूर ते पुणे अशी आहे, स्पेशल नगरसाठी ट्रेन सुरू केलेली नाही. त्यात नगरचा स्टॉप अवघ्या 2 मिनिटांचा आहे. इथ कोच शोधायलाच 5 मिनिट लागतात. आणि या 2 मिनिटांसाठी नगरकर उड्या मारत आहेत, दुसरी गोष्ट ट्रेनचे तिकीट 750 ते 1300 रुपये एवढे आहे. म्हणजे ही ट्रेन कोणत्या क्लास साठी आहे याचा विचार कर मित्रा. आठवड्यातून 2 वेळा जरी ट्रेन ने तू जाऊन येऊन केलस तरी महिन्याच्या सुरुवातीला येणारा बजाज फायनान्सचा तुझा हफ्ता चुकेल अशी परिस्थिती आहे. या 700 रुपयात तुला एक सँडविच पण खायला भेटले. 2 तासाच्या प्रवासात एवढी शिदोरी लै झाली. हो ना?

काय ते सजावट, काय ते भाषण आणि reels, काय तो तामझाम. ' बेगानी शादी मे नगरकर दिवाणा' अशी गत झाली आहे. आणि हे पाहून एक नगरकर म्हणून अक्षरशः लाज वाटली..!!

मुंबई - पुणे, दौंड - पुणे, बारामती - पुणे असे रोज अप डाउन करणारे कितीतरी लोक आहेत. नगरची तर निम्मी लोक पुण्यात नाईलाजास्तव स्थायिक झालेले आहेत. कारण त्यांच्याकडे अप डाउन करण्याचा पर्याय नाहीये. आजुबाजूच्या शहरांत रेल्वेचे चांगले तगडे जाळे बनवले तर एकाच शहरावर ताण येणार नाही ही गोष्ट राजकारणी लोकांना समजत नसेल का? तसेच या अशा ट्रेन सर्वसामान्य लोकांसाठी नाहीत एवढी साधी सोपी गोष्ट उड्या मारणाऱ्या नगरकरांना समजत नसेल का?


नागपूर पुणे वंदे भारत बुलेट ट्रेन सुरू झाल्याबद्दल अनेकांनी श्रेयवादच्या नादात सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला, परंतु  पू...
11/08/2025

नागपूर पुणे वंदे भारत बुलेट ट्रेन सुरू झाल्याबद्दल अनेकांनी श्रेयवादच्या नादात सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला, परंतु पूर्ण माहिती नसल्यामुळे तो आनंद किती फसवा आणि निरुपयोगी आहे त्याविषयी...
_____________

काल परवा पुणे नागपूर वंदे भारत गाडी सुरू करण्याची घोषणा झाली त्यामध्ये अहिल्यानगर चा आणि येथील नेतेमंडळींचा खरे म्हणजे काहीही संबंध नाही, तरी पण सोशल मीडियावर अनेक मंडळी त्या गाडीचा उद्देश त्याचे टाईम टेबल याचा अभ्यास न करता, आणि समर्थनिय श्रेय घ्यायच्या नादात आनंद व्यक्त करू लागली..
परंतु ही गाडी नगरकरांसाठी अजिबात उपयोगाची नाही याला कारण असे की..
वास्तविक त्यापैकी कोणीही त्या गाडीच्या वेळा त्याचे टाईम टेबल नीट पाहिले देखील नाही., या गाडीच्या तिकीट प्रणाली विषयी माहिती घेतली नाही,

या गाडीचा आपल्या अहिल्यानगर स्टेशन वरून पुण्याला जायचा आणि यायचा टाईम बिलकुल कुणालाही कशाच्या ही बाबत सोयीचा नाही...
त्यामुळे नगर पुणे इंटरसिटी चा हा तसूभरही पर्याय कधीच असू शकत नाही.
त्याचे टाईम टेबल जरा लक्षपूर्वक पाहिले म्हणजे समजेल की आपल्या अहिल्यानगर स्टेशन वरून ही गाडी संध्याकाळी साडेसात वाजता निघून रात्री दहा वाजता पुण्याला जाणार आहे आणि नंतर
पुण्याहून ही गाडी पहाटे साडेसहा वाजता निघणार आहे , आणि नगरला सकाळी साडेआठ वाजता येणार आहे.. मग या गाडीने नगरकर पुण्याला काय रात्री फक्त मुक्कामाला पुण्याला जातील काय?
आणि तिथे रात्रभर झोपून पहाटे सहालाच उठून परत मागे येतील काय?
हे काय कामकाजाचे टाईम आहे का?
दुसरे म्हणजे या गाडीला ऐनवेळी साधे तिकीट मिळू शकत नाही, याला फक्त रिझर्वेशनच करावे लागते, आणि याच्या तिकिटाचा कमीत कमी चार्ज वंदे भारत च्या ठरवलेल्या नियमांनुसार पाचशे रुपये असू शकतो...
हे कुणाला माहित आहे का?

या गाडीच्या वेळा नगर पुणे प्रवासाला कुठल्याही बाबतीत अजिबात सोयीस्कर आणि योग्य नाहीत,
अर्थात नगर पुणे प्रवास डोळ्यासमोर धरून या गाडीची उद्घोषणा मुळीच करण्यात आलेली नाही, हे लक्षात घेणे अतिशय गरजेचे आहे, केवळ पुणे नागपूर प्रवास जलद गतीने व्हावा म्हणून वंदे भारत एक्सप्रेस सुरू झालेली आहे. त्यामुळे उगीचच नगर पुणे, नगर पुणे असा प्रवास जणू याच गाडीमुळे सोपा झाला अशी जनतेची समजूत करून देऊन श्रेय वादाच्या नादात उगीचच अजिबात संबंध नसलेल्या गाडीबाबत आनंद व्यक्त करण्यात काहीही अर्थ नाही.
वास्तविक सध्या पुण्याहून नागपूरला तीन चार एक्सप्रेस ऑलरेडी नियमीत धावतच आहेत. पुणे नागपूर, गरीब रथ, आजाद हिंद वगैरे..
आणि पुण्याहून दररोज किमान तिनशे लक्झरी बसेस रोज नागपूरला जातात..
तरीदेखील पुणे नागपूर साठीच अजून एक वंदे भारत विद्वान रेल्वे मंत्रालयाला का सुरू करावीशी वाटली काही समजत नाही.
नगर पुणे रस्ता वाहतूक प्रवासाची गंभीर दुरावस्था अजूनही कोणालाच समजलेली नाही., म्हणून तर रेल्वे मंत्रालयाकडून सावत्र आईचे लेकरं असलेल्या नगरकरांच्या मागणी कडे सतत दुर्लक्ष केले जाते.. आणि भलतीच आष्टी सारखी गाडी काहीतरी सुरू केली जाते.. जखम मांडीला आणि मलम शेंडीला....
नगरचे लोक फार फार तर या वंदे भारत ने शेगांव चा विचार करू शकत होते, तर त्यासाठी या गाडीला शेगांवला थांबा देखील नाही..

आजच्या मितीला पुणे नगर दरम्यान अशा किमान दहा रेल्वे गाड्या नगरकरांच्या दृष्टीने गैरसोयीच्या आणि अवेळी धावतच आहेत, परंतु त्यापैकी नगरहून सकाळची अमरावती पुणे आणि पुण्याहून संध्याकाळची तिकडून येणारी झेलम वगळता एकही गाडी नगरी जनतेसाठी कामाची नाही..

नगर पुणे हा अवघा 120 किलोमीटर चा आजचा प्रवास जो तब्बल सहा तासाच्या घरात पोहोचलेला आहे, तो जर आता सुखकर करायचा असेल तर सकाळी लवकर पुण्याला जाणारी आणि पुण्याहून संध्याकाळी निघणारी इंटरसिटी रोज सुरू होणे हाच त्याला एक मात्र पर्याय आहे.,
वंदे भारत एक्सप्रेस हा लांब पल्यांची अंतरे लवकर कापण्यासाठी आयोजित केलेला उपाय आहे.. त्याचे नगर पुणे प्रवासाशी काही देणे घेणे नाही,
त्यामुळे उगीचच सिमल्या मध्ये बर्फ पडला म्हणून इकडे नगरमधे स्वेटर घालण्यात अर्थ नाही.
आम्ही गेल्या पाच वर्षापासून नगर पुणे प्रवासाच्या बाबत अनेक आंदोलन करीत भीषण वास्तव मांडत आलेलो आहोत.
पण प्रशासनाकडून ठोस उपाययोजना ना रस्ते वाहतुकीच्या बाबत घडते आहे, ना पर्यायी रेल्वेच्या बाबत घडते आहे.
उलट हास्यास्पद प्रकार असा आहे... आपल्या स्टेशनवर दररोज उभे असलेली आष्टी रेल्वे यामध्ये ७०० प्रवासी क्षमता असलेल्या या गाडीतून सात देखील प्रवासी प्रवास करत नाही, जी दररोज जवळजवळ मोकळी धावते..
अशी ही आष्टीला जाणारी डेमु रेल्वे मात्र लाखो करोडो रुपयांचा तोटा सोसुन रोज 70 ,80 हजार रुपयांचे डिझेल जाळून आजही गेल्या तीन वर्षापासून दररोज चालू आहे..

आजपर्यंत तुमच्या आमच्या करातून आणि घरातून कापलेल्या पैशातून या तीन वर्षात सरासरी 10 कोटी रुपयांचे डिझेल रेल्वेने फुकट तोट्यात जाळले आहे...
नगर पुणे इंटरसिटी मात्र अजून दोन-तीन वर्षे सुरू होत नाही, तोपर्यंत रस्त्यावरची वाहतूक अजून दोन-तीन पटीने वाढेल आणि तिचाही उपयोग होणार नाही..
लहरी राजा.. प्रजा आंधळी अधांतरी दरबार ‌..अजब तुझे सरकार!

_ सुहासभाई मुळे
अध्यक्ष
जागरूक नागरिक मंच
9002668555

Address


Telephone

+919922942488

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ahilyanagar Update’s अहिल्यानगर अपडेट्स posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ahilyanagar Update’s अहिल्यानगर अपडेट्स:

  • Want your business to be the top-listed Media Company?

Share