Ahilyanagar Update’s अहिल्यानगर अपडेट्स

  • Home
  • Ahilyanagar Update’s अहिल्यानगर अपडेट्स

Ahilyanagar Update’s अहिल्यानगर अपडेट्स Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ahilyanagar Update’s अहिल्यानगर अपडेट्स, Digital creator, .

Opration Sindoorभारताचा पाकिस्तानावर क्षेपणास्त्र हल्ला...भारताने पहलगाम आतंकवादी हल्ल्याचा बदला घेतला. पाकिस्तानातील 9 ...
06/05/2025

Opration Sindoor

भारताचा पाकिस्तानावर क्षेपणास्त्र हल्ला...

भारताने पहलगाम आतंकवादी हल्ल्याचा बदला घेतला. पाकिस्तानातील 9 दहशतवादी ठिकाणावर भारताचा हल्ला... दहशतवाद्यांचे अड्डे केले उध्वस्त...

06/05/2025

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घ्या, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश

25/04/2025
श्री क्षेत्र रांजणगाव गणपती (जि. पुणे) येथील अतुल पाचुंदकर यांनी बाजारपेठेत भावणारा लाल आकर्षक, वजनदार व अधिक काळ टिकणाऱ...
24/04/2025

श्री क्षेत्र रांजणगाव गणपती (जि. पुणे) येथील अतुल पाचुंदकर यांनी बाजारपेठेत भावणारा लाल आकर्षक, वजनदार व अधिक काळ टिकणाऱ्या दर्जेदार कांदा उत्पादनात तज्ज्ञ शेतकरी (मास्टर) असे नाव तयार केले आहे.

Agriculture Success Story : पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यातील श्री क्षेत्र रांजणगाव गणपती येथील पाचुंदकर यांच्या एकत्रित कुटुंबाची १०० एकर शेती आहे. सध्या कुटुंबातील ३६ वर्षे वयाचे युवा शेतकरी अतुल कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने शेतीची मुख्य जबाबदारी सांभाळतात. एकूण शेतीपैकी ३० एकर शेती ओलिताखाली आणली आहे. उर्वरित शेती बागायती करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कांदा हे कुटुंबाचे मुख्य पीक असून त्यासह, ऊस, चिकू, सीताफळ आदी पिके घेतील जातात.

कांदा पिकात हातखंडा

अतुल यांनी कांदा शेतीत हातखंडा तयार केला आहे. दरवर्षी तीन ते चार एकरांत त्यांचे हे पीक असते. पूर्वी पारंपरिक पद्धतीने ते कांदा उत्पादन घेत. मात्र त्यातून हवे तसे उत्पादन व उत्पन्न मिळत नव्हते. बऱ्याच वेळा बाजारात भेटणारे बियाणे निकृष्ट किंवा कमी प्रतीचे असल्याने उत्पादनावर परिणाम व्हायचा. अखेर स्वतःच कांदा बियाणे निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पाच- सहा गुंठे क्षेत्रावर दरवर्षी नोव्हेंबरमध्ये बीजोत्पादन प्लॉट घेतला जातो. बियाणे निर्मितीसाठी त्यांनी सखोल अभ्यासही केला. त्यानुसार पुढीलप्रमाणे वाण व बियाणे निवड होते.

-गावरान वाणाची निवड. रोगप्रतिकारक शक्ती अधिक असलेले बियाणे. त्यावर करपा आणि फुलकिड्यांचा प्रादुर्भाव कमी जाणवतो.

-सिंगल रिंग, ओलसरपणा कमी. जो फुटत नाही. साधारण सहा महिने या बियाण्याचा कांदा वखारीत टिकतो.

-सुमारे १२० दिवसांत वाण काढणीला येते.

-आकर्षक लाल रंग, चवीला चांगला. ग्राहकांना तो आपल्याकडे आकर्षित करतो.

-अतुल सांगतात, की फुटीचा, दुबाळ, डेंगळे असलेला कांदा बीज निर्मितीसाठी वापरू नये. हा कांदा दीर्घकाळ टिकण्यास योग्य नसतो. त्यात ओलसरपणा अधिक असतो. यामुळे लवकर खराब होतो.

जमिनीची प्रतही चांगली हवी. परिसरातील भागात कीटकनाशकांचा वापर फार नसावा. म्हणजे मधमाश्‍यांना परागीभवन करण्यासाठी सोपे होऊन जाते. तसेच आसपास त्याच जातीचे बीजोत्पादन शेतकरी घेत असतील तर कांदा बियाण्यात भेसळ वा ते दूषित होण्याचा धोका कमी असतो.

कांदा शेतीतील व्यवस्थापन-

-नोव्हेंबरच्या दरम्यान चांगल्या जागेची निवड करून नांगरट व पाळ्या घालून शेत तयार केले जाते.

-त्यामध्ये शेणखत एकरी दोन ट्रेलर व लागवडीनंतर जमिनीतून

कीटकनाशक व बुरशीनाशक यांचा वापर. जेणे करून मातीतील किडी-रोगांना अटकाव व्हावा.

-वाफे तयार करून व खड्डे करून त्यामध्ये मोठ्या आकाराच्या कांद्याची लागवड. सुरुवातीला पाटपाण्याद्वारे पाणी. त्यानंतर ठिबक सिंचन. सुमारे आठ ते दहा दिवसांनी कांदे उगवून येतात.

-त्यानंतर सुमारे पंधरा दिवसांनंतर खुरपणी केली जाते. बियाण्यांचे गोठ काढणीपर्यंत किमान सहा ते सात खुरपण्या. त्यामुळे तणही चांगल्या पद्धतीने निघते व तणनाशक वापरण्याची गरज पडत नाही.

-चार महिन्यात गोठ तयार होतात. पुढे झोडपणी, खराब बियाणे बाजूला करण्यासाठी प्रतवारी, उफणणी, व चांगल्या दर्जाचे बियाणे तयार होते.

-डिसेंबरमध्ये कांद्याची लागवड असते. त्यासाठी या बियाण्याचा वापर होतो. सुरवातीला नर्सरी तयार केली जाते. त्यामध्येही शेणखताचा वापर होतो. दोन ते तीन टप्प्यांत रोपे तयार केली जातात. त्यामुळे सर्व लागवड एकाचवेळी येत नाही. टप्प्याटप्प्याने व दीर्घकाळ कांदा बाजारात विक्रीस उपलब्ध होतो.

-रोपे ५५ ते ६० दिवसांची पाणी सोडून वाफे भरल्यानंतर रोपांची पुनर्लागवड होते.

-दोन रोपांत पाच ते सहा इंच अंतर ठेवले जाते. त्यामुळे हवा खेळती राहून कांदा पोसण्यास मदत होते.

आंतरमशागत सोयीची होते. कांद्याचा कार वाढण्यास मदत होते.

-अतुल रासायनिक खते व कीटकनाशके यांचा वापर न करता सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन करण्यावर भर देतात. त्यात गोमूत्र, शेणखत, जिवामृत, जैविक खते आदींचा वापर करतात.

उत्कृष्ट व्यवस्थापनातून एकरी ९ ते १२ ते १५ टनांपर्यंत कांद्याचे उत्पादन अतुल यांनी साध्य केले आहे. कांद्याचे ५०० ग्रॅमपर्यंत वजनही त्यांनी साध्य केले आहे. त्यांच्या आकर्षक लाल, दर्जेदार कांद्याची व्यापाऱ्यांकडून बांधावरच खरेदी होते. अतुल सांगतात, की महाशिवरात्रीपर्यंत कांद्याला चांगले म्हणजे किलोला २४ रुपयांपर्यंत दर मिळतात. त्यानंतर बाजारात आवक वाढेल तशी त्यात घट येऊ लागते. त्यावेळी किलोला १४ रुपयांपर्यंत दर मिळतो.

मशागतीपासून ते काढणी मजुरीपर्यंत एकरी एक ते सव्वा लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. आपल्याकडून खरेदी केलेल्या कांद्याची व्यापारी पुढे काही महिने साठवणूक करतात, कांदा टिकतोही दीर्घ काळ असे अतुल सांगतात. यंदा सव्वा एकरात १४ टनांपर्यंत कांद्याची काढणी झाली आहे. यंदा ज्यावेळी बाजारात किलोला ९ ते १० रुपये दर सुरू होते त्यावेळी केवळ गुणवत्तेमुळे व्यापाऱ्यांनी १४ रुपये दराने आपला कांदा खरेदी केल्याचे अतुल सांगतात.

साधारण यंदाच्या फेब्रुवारीच्या दरम्यानची घटना. राज्याचे माजी साखर आयुक्त व यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड गावी जात असताना त्यांना वाटेतील अतुल यांचे कांदा पीक पाहण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी या शेताला भेट देऊन सर्व माहिती घेतली व कुटुंबाच्या प्रयत्नांची, कामांची प्रसंशाही केली.

अतुल यांचे वडील दिलीप, आई शकुंतला व चुलतबंधू सागर यांची शेतीत मदत होते. पत्नी प्रगती या बीएस्सी ॲग्री असून त्याही पतीच्या खांद्याला खांदा लावून शेती करतात. या दांपत्याला विश्‍वतेज व रुद्रनील अशी गोंडस मुलेही आहेत. अतुल चांगले ऊस उत्पादकही आहेत. ते एकरी सुमारे ८० टन उत्पादन साध्य करतात. अन्य शेतकऱ्यांना मार्गदर्शनही करतात.

अतुल पाचुंदकर, ९७६५१११४००

अक्षराची ओळख नसलेल्या पण आपल्या माणसाकडून एका IPS चा सत्कार...तो ही स्वतःच्या मेंढ्यांच्या पालावर.. नक्कीच ही काहीतरी सा...
24/04/2025

अक्षराची ओळख नसलेल्या पण आपल्या माणसाकडून एका
IPS चा सत्कार...तो ही स्वतःच्या मेंढ्यांच्या पालावर.. नक्कीच ही काहीतरी सामान्य गोष्ट नाही

हा सत्कार एक इतिहास आहे, एक अध्याय आहे, नवी पहाट आहे.
यमगे तालुका कागल येथील बिरदेव सिद्धपा डोने या एका सामान्य धनगर कुटुंबातील, मेंढ्या राखणाऱ्या तरुणाने UPSC सारख्या देशातील सर्वात कठीण परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवून सर्वांसमोर प्रेरणादायी उदाहरण ठेवलं आहे.
खडतर परिस्थितीतून, कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर त्याने आपल्या स्वप्नांना पंख दिले.
जिथे जिद्द असते, तिथे यश नक्की मिळते!
उघडे माळरान ते दिल्ली प्रवास हा नक्कीच कठीण, प्रेरणादायी थक्क करणारा आहे.
मेंढ्या राखताना अभ्यास, अपार मेहनत आणि अखंड आत्मविश्वास यामुळे त्याने अशक्य वाटणारं यश शक्य केलं.
तुमची पार्श्वभूमी कशीही असो, परिस्थितीला भेदून जाण्याची हिंमत आणि जिद्द तुम्हाला यशाच्या शिखरावर नक्की घेऊन जाईल.

परिस्थितीचं कंबरड मोडणाऱ्या आणि आपल्या स्वप्नांची उंची वाढवणाऱ्या या मेंढपाळ पुत्रास सलाम..

🛑आता उडणार “ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा”... 23 व 25 एप्रिलला निघणार आरक्षणाची सोडत !🛑कोण होणार तुमच्या गावचा सरपंच ? नक...
21/04/2025

🛑आता उडणार “ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा”... 23 व 25 एप्रिलला निघणार आरक्षणाची सोडत !

🛑कोण होणार तुमच्या गावचा सरपंच ? नक्की काय आहे तुमच्या गावच्या सरपंच पदाचे आरक्षण ?

🛑सविस्तर पाहण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या चॅनेलला Subscribe करा व Bell Icon दाबून ग्रामपंचायत निवडणुकीच्या झटपट अपडेट्स नक्की पहा.

Prashant Zaware Patil :- 9922942488

निळ्या रंगाच्या रॉकेलने आता चूल पेटत नाही, रॉकेल वर चालणारी कमांडर आता गावात दिसत नाही..!!ए.सी. च्या आधुनिक युगात काही व...
13/04/2025

निळ्या रंगाच्या रॉकेलने आता चूल पेटत नाही, रॉकेल वर चालणारी कमांडर आता गावात दिसत नाही..!!

ए.सी. च्या आधुनिक युगात काही वर्षानंतर कोणाला सांगितले की एक अशी गाडी होती जीच्या पाच उघड्या गेटमधून भर्र हवा खात लोक प्रवास करायचे. कोणाला खरे वाटणार नाही.
ख-या अर्थाने ग्रामिण भारत डोळ्यासमोर ठेऊन महींद्रा कंपनीने बनवीलेली कमांडर गाडी ग्रामिण भारताचा श्वास होती.
2000 सी सी चे दमदार DI इंजीन 62 हॉर्सपॉवर ची शक्ती अशा आयुधांनी सज्ज हे वाहन ऑफरोडवर एखाद्या अजेय योद्ध्याप्रमाणे होते.
नदी नाले असो डोंगर द-या असो , रस्ता असो की नसो कमांडरला कोणतीच अडचण रोखु शकत नसे. एखाद्या वेळी बंद पडली तरी इंजिन स्ट्रक्चर एवढे सोपे की कोणताही रोडसाईड मेकैनिक समस्या दुर करुन टाकायचा.
अगोदर रीवर्स सहीत चार गीअरची कमांडर पुढे पाच गीअरची झाली. कमांडरच्या ड्रायव्हरची बैठक अशी होती की ड्रायव्हर तीरपा बसायचा. बाहेरुन पाहील्यावर स्टेअरींगच्या मागे ड्रायव्हर कधीच बसलेला दीसत नसे . उजव्या बाजूने थोडासा पेंदा बाहेर काढुन हात तीरपे करुन कमांडरच्या ड्रायव्हींग सीटवर माणुस एकदा बसला की साक्षात सारथी बनल्याची फीलिंग यायची. या तीरप्या बसण्याचा एक फायदा अजुन होता, ड्रायव्हरच्या बाजुच्या सीटवर कमितकमी चारजण अजुन बसवता यायचे. दुरुन पाहील्यावर समोर बसलेल्या पाच जणांपैकी गाडी नेमका कोण चालवतोय हे कमांडर बनवीणारा इंजिनीअरही ओळखु शकत नव्हता.

गाडीची सीटिंग कैपिसिटी दहा सीट्सची असली तरी, फक्त दहा सीट्स बसविणे म्हणजे गाडीचा अवमान असायचा.
मी सांगतो तुम्ही हीशोब लावा..
समोरच्या सीटवर ड्रायव्हरसहित पाच, मधल्या सीटवर सहा, मागच्या डाल्यातल्या समोरासमोरच्या सीटवर तीन इकडुन तीन तीकडुन, त्याच सीटच्या ग्यापीत एखादी बारीक बुढी कींवा दोन बारकी खोसायची. समोरच्या भागात असलेल्या स्टेपनीवर एक.. हुश्श..!! कीती झाले ? टोटल एकोणवीस, मागे लटकणारे उत्साही पोरं सोडुन द्या.. कंडक्टर गाडीच्या खालुनच ड्रायव्हरला चलो.. अशी हाळी द्यायचा आणी चालत्या गाडीत असा काही शीताफीने गाडीला लटकायचा की अहाहा..!! सारे प्रवासी एकदम इम्प्रेस.लहान पोट्टे बाट्टे त आपण पुढे चालून कंडक्टरच बनायचं हे ठरवून घ्यायचे. जवान पोरगी सोरगी अशा कौतुकाने कंडक्टरकडे पहायची जणु काही सुपरमैन होय..
खरी मजा तर इकडे कॉकपीटमध्ये यायची. ड्रावरसाहेब झोकात स्टेअरींग फीरवत आणी पैसेंजरच्या टांगीखालून हात घालून खपाखप गेर मारत साक्षात सुखोई 2000 चा आनंद घ्यायचे.
एखादा पैसेंजर ड्रायव्हरशी सलगी दाखवत, आपलं गाडीच्या बा-यातलं ज्ञान पाजळत म्हणायचा,
" क्यों ड्राव्हरसाब, गाडी भोत कन्हार रई ?"

ड्रायव्हर त्याच्याकडे न पाहता उत्तर द्यायचा,
हौ साला, पम का काम करना पडता."

पैसेंजर नोबेल जींकल्याच्या अविर्भावात आजुबाजुच्या पैसेंजरकडे तुच्छतेने पहायचा..

कमांडर अशी खरी लेकुरवाळी गाडी, ग्रामिण भारताचे हीमोग्लोबीन. काळाच्या ओघात आता गडप होत चाललेली कमांडर एखाद्या थकलेल्या जीवट व्रुद्धाप्रमाणे खेड्यापाड्यात आपले अस्तीत्व टीकवत तग धरुन आहे. भवीष्यात पुढच्या पिढीला एक दुर्मीळ वाहन म्हणुन संग्रहालयात कमांडर पहायला मिळेल..!

कामं कोणी थांबवलं असेल आणि का थांबवले असेल बरं ? जनतेच्या प्रश्नावर असं वागणं बरं नव्ह...? प्रतिक्रिया कळवा !Devendra Fa...
13/04/2025

कामं कोणी थांबवलं असेल आणि का थांबवले असेल बरं ? जनतेच्या प्रश्नावर असं वागणं बरं नव्ह...? प्रतिक्रिया कळवा !
Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदेAjit Pawar Radhakrishna Vikhe Patil Nilesh Lanke Kashinath Date - काशिनाथ दाते सर

 #अहिल्यानगर-कल्याण रस्त्यावरील कामामुळे अपघातांचे सत्र; उपाययोजना करा अन्यथा आंदोलन करणार,  #सुप्रिया_साळवे यांचा इशारा...
12/04/2025

#अहिल्यानगर-कल्याण रस्त्यावरील कामामुळे अपघातांचे सत्र; उपाययोजना करा अन्यथा आंदोलन करणार, #सुप्रिया_साळवे यांचा इशारा...

गेल्या महिन्यापासून नगर-कल्याण रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. मात्र, मुळातच चांगल्या स्थितीत असलेल्या या रस्त्याला दुरुस्तीची गरज का भासली, यामागील कारण अस्पष्ट आहे. सध्या रस्त्याच्या एका बाजूला काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्याने दुसऱ्या बाजूने एकेरी वाहतूक सुरू आहे. या रस्त्यावर नेहमीच प्रचंड वाहतूक असते. काम पूर्ण झालेल्या बाजूला टोकदार लोखंडी गज आडवे लावले आहेत, तर दुसऱ्या बाजूला खोल गटारे,अरुंद रस्ता आहेत, ज्यामुळे प्रवास धोकादायक बनला आहे.

गेल्या पंधरा दिवसांत या मार्गावर १० ते १२ अपघात घडले आहेत. याशिवाय, अनेक वाहनांची टायर्स फुटल्याने मोठे नुकसान झाले आहे. या सर्व समस्यांना जबाबदार कोण, याबाबत कोणीच स्पष्टता देत नाही आणि यावर उपाययोजनाही सुचवली जात नाही. परिणामी, प्रवाशांमध्ये नाराजी आणि असुरक्षिततेची भावना वाढत आहे.
या संदर्भात संबंधीत ठेकेदार व महामार्ग प्रशासनाने लवकर ठोस कारवाई करावी अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल.

सौ.सुप्रिया ताई अमोल साळवे
मा.सदस्य पंचायत समिती पारनेर.

Devendra Fadnavis Ajit Pawar Radhakrishna Vikhe Patil Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Nitin Gadkari Office of Nitin Gadkari Nilesh Lanke Dr Sujay Vikhe Patil Kashinath Date - काशिनाथ दाते सर

अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड अहमदनगर च्या पारनेर शाखेच्या नूतन इमारतीचे पारनेर नगर मतदा...
04/01/2025

अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड अहमदनगर च्या पारनेर शाखेच्या नूतन इमारतीचे पारनेर नगर मतदारसंघांचे नेते सुजित पाटील झावरे यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले.

अहिल्यानगर जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांची कामधेनू असलेल्या. अहमदनगर डिस्ट्रिक सेकंडरी टीचर को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या पारनेर शाखेच्या इमारतीचे उद्घाटन अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित पाटील झावरे यांच्या शुभहस्ते झाले. जिल्हा कार्यक्षेत्र असणारी व आठशे कोटी रुपयांची उलाढाल असणारी जिल्यातील माध्यमिक शिक्षकांच्या आर्थिक कामधेनू असणाऱ्या या इमारतीचे पारनेर शाखेचे नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा पारनेर येथे आज पार पडला.

माध्यमिक शिक्षकांना आर्थिक दृष्ट्या पाठबळ देणारी ही संस्था जिल्ह्यातील अग्रणी संस्था असून यापुढेही माध्यमिक शिक्षकांच्या प्रश्नांसाठी आपण सदैव उभे राहू असे प्रतिपादन यावेळी सुजित पाटील झावरे यांनी केले. या वेळी संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन व त्यांचे सर्व सहकारी संचालक,अधिकारी, माध्यमिक शिक्षक संघटनेचे सर्व मान्यवर पदाधिकारी व माध्यमिक शिक्षक बांधव उपस्थित होते.

Address


Telephone

+919922942488

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ahilyanagar Update’s अहिल्यानगर अपडेट्स posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ahilyanagar Update’s अहिल्यानगर अपडेट्स:

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share