Xtralarge News

  • Home
  • Xtralarge News

Xtralarge News xtralargenews (XXL News) web portal Is all about giving othentic information. We are commited for Real Journalism, no parciality and not ajenda driven news.

only pure NEWS.

जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी मोदींचा मंत्री अडचणीत..पुणे, दि. २३ ऑक्टोबर...पुण्यातील जैन बोर्डींगच्या जमीन व्यवहारा...
23/10/2025

जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी मोदींचा मंत्री अडचणीत..

पुणे, दि. २३ ऑक्टोबर...

पुण्यातील जैन बोर्डींगच्या जमीन व्यवहारात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अडचणीत वाढ होत आहे. 3 हजार कोटींची जमीन अवघ्या 300 कोटीत सर्व नियम धाब्यावर बसवून खरेदी केल्याचा आरोप असून जमीन खरेदी करणारा गोखले बिल्डर व मंत्री मोहोळ यांचे निकटचे संबंध असल्याचा आरोप झाल्याने आता हा व्यवहाराला स्थगिती देण्यात आली आहे पण धर्मदाय आयुक्तांना स्थगिती देण्याचा अधिकार काय असा प्रश्न विचारून स्थगिती नाही व्यवहारच रद्द करा अशी मागणी माजी खासदार शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी केली आहे.

धंगेकर पुढे म्हणाले की, या प्रकरणात पदाचा गैरवापर करणारे मुरलीधर मोहोळ, जमिनीच्या विक्रीस नियमबाह्य परवानगी देणारे राज्याचे मुख्य धर्मदाय आयुक्त, कागदपत्रांमध्ये चुकीची माहिती देत धर्मदाय आयुक्तांची फसवणूक करणारे मेरिट कन्सल्टन्सी व बिल्डर विशाल गोखले यांच्यावर गुन्हे दाखल करावे.
#जैनबोर्डिंग #नरेंद्रमोदी #पुणे #भाजपा #मंत्रीमोहोळ #रविंद्रधंगेकर #शिवसेना

जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी मोदींचा मंत्री अडचणीत.. प

23/10/2025

कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची भाऊबीज...

इंदापूर, दि. २३ ऑक्टोबर :

भाऊबीज हा केवळ सण नाही, तर नात्यांच्या जिव्हाळ्याचा, आपुलकीचा आणि संस्कारांचा दिवस आहे. बहिणींचं आशीर्वाद आणि प्रेम हेच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं बळ आहे. त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यातच दिवाळीचा खरा आनंद आहे.” अशी प्रतिक्रिया कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

भाऊबीज हा सण म्हणजे भावंडांच्या प्रेमाचा, आपुलकीचा आणि नात्यांच्या दृढतेचा दिवस. याच भावनेने आज राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूरच्या भरणेवाडी येथील निवासस्थानी तीनही बहिणींच्या उपस्थित साधेपणाने आणि भावनिक वातावरणात भाऊबीज सण साजरा केला. याप्रसंगी, मंत्री भरणे यांच्या परिवारातील सदस्य, कार्यकर्ते, स्थानिक महिला बचत गट प्रतिनिधी, शेतकरी बहिणी आणि काही गृहिणी बहिणी उपस्थित होत्या. यावेळी सर्व लाडक्या बहिणींनी आपल्या लाडक्या भावाचं औक्षण केलं. तर भरणे यांनीही बहिणींच्या पाया पडत आशीर्वाद घेतला आणि शुभेच्छा दिल्या.



भरणे म्हणाले, "भाऊबीज म्हणजे प्रेम, जिव्हाळा आणि नात्यांचं बंधन घट्ट करणारा दिवस.
#इंदापूर #कृषीमंत्री #दत्तात्रयभरणे #दिवाळी #पुणे #भाऊबीज

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मोदींकडून फसवणूक :मुंबई, दि. २३ ऑक्टोबर :मोदी सरकारने या वर्षी सोयाबीनसाठी केवळ ५३२८ रुपये प...
23/10/2025

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मोदींकडून फसवणूक :

मुंबई, दि. २३ ऑक्टोबर :

मोदी सरकारने या वर्षी सोयाबीनसाठी केवळ ५३२८ रुपये प्रति क्विंटल इतका हमीभाव जाहीर केला आहे. परंतु २०१३ साली भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी दिंडी काढून सोयाबीनला ६,००० रुपये हमीभाव देण्याची मागणी केली होती. त्या दिंडीला आज १२ वर्षे झाली, आणि मोदी सरकार सत्तेत येऊन ११ वर्षे उलटली तरीही शेतकऱ्यांच्या सोयाबीनला ६,००० रुपये प्रतिक्विंटल हमी भाव मिळालेला नाही. मोदी-फडणवीसांनी शेतकऱ्यांची उघड फसवणूक केली आहे, असा आरोप काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

सावंत म्हणाले, २०१३ साली जेव्हा फडणवीसजी रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांसाठी लढत होते, तेव्हा त्यांचा आवाज व भावन भावना खरी होती की केवळ राजकारणाचा भाग होता, असा प्रश्न आता जनतेसमोर आहे. आज ते सत्तेत आहेत, त्यांनी स्वतः केलेल्या मागणीप्रमाणे भाव मिळवून दिला नाही. हेच भाजपच्या उक्ती आणि कृतीतील दुटप्पीपणाचे ठळक उदाहरण आहे. आज बाजारात शेतकरी आपले सोयाबीन फक्त ३५०० रुपये प्रति क्विंटल दराने विकत आहे.
#नरेंद्रमोदी #फडणवीस #शेतकरी #सोयाबीन #हमीभाव

Homeताज्या बातम्यासोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मोदींकडून फसवणूक : ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीयशेतकरी वार्ता स...

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळांची दिवाळी आदिवासींसोबत...मुंबई, दि. २३ ऑक्टोबर..दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा, असे या ...
23/10/2025

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळांची दिवाळी आदिवासींसोबत...

मुंबई, दि. २३ ऑक्टोबर..

दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा, असे या सणाचे वर्णन केले जात असले तरी आजही समाजातील लाखो लोक या सण, उत्सवापासून वंचित आहेत. आपण दिवाळीचा आनंद आपल्या कुटुंब व मित्रपरिवारासह साजरा करतो पण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासाठी दिवाळी म्हणजे केवळ सण नसून माणसांमधील नाळ अधिक घट्ट करणारा उत्सव आहे. दिवाळीचे तीन दिवस हर्षवर्धन सपकाळ यांनी सातपुडा पर्वतरांगांतील भिंगारा, चालीस टपरी, गोमाल या गावांतील गावकऱ्यांसोबत साजरे केले. दरवर्षी या आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्याचे त्यांचे हे मागील २६ वर्षांपासूनचे व्रत आहे..

आदिवासींसोबत दिवाळी साजरी करण्याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “हा गोमाळ परिसर माझ्यासाठी केवळ एक भूभाग नाही; माझे येथे सखोल ऋणानुबंध आहेत. येथील लोक माझे केवळ आप्तजन नाहीत, तर ते माझे स्वकीय, माझे कुटुंब आहेत. या सर्वांशी माझे अतूट आणि दृढ नाते जोडले गेले आहे. गेल्या २६ वर्षांपासून मी एक व्रत जपले आहे.
#आदिवासी #काँग्रेसप्रदेशाध्यक्ष #दिवाळी #सातपुडा #हर्षवर्धनसपकाळ

Homeताज्या बातम्याकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळांची दिवाळी आदिवासींसोबत... ताज्या बातम्यामहाराष्ट्र काँग्रेस प्.....

ठाण्यात एलिव्हेटेड आणि भुयारी रस्त्यांचे जाळे..ठाणे, ता, २१ ऑक्टोबर :मुंबईतून फ्रीवेवरून उतरल्यानंतर आनंदनगर–साकेते–गायम...
21/10/2025

ठाण्यात एलिव्हेटेड आणि भुयारी रस्त्यांचे जाळे..

ठाणे, ता, २१ ऑक्टोबर :

मुंबईतून फ्रीवेवरून उतरल्यानंतर आनंदनगर–साकेते–गायमुख–फाउंटन हॉटेल असा एलिव्हेटेड रस्ता उभारण्यात येत आहे. तसेच टिकुजी-नी-वाडी ते बोरिवली असा भुयारी मार्ग बांधला जात असून, या मार्गामुळे भविष्यात केवळ दहा ते पंधरा मिनिटांत हे अंतर पार करता येईल. सध्या मीरा-भाईंदर ते बोरिवली यासाठी दोन ते अडीच तास लागतात. या दोन्ही प्रकल्पांमुळे वाहतूक कोंडी कमी होईल आणि ठाण्याचा विकास अधिक गती घेईल,” असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

राजमाता जिजाऊ उद्यान ‘ऑक्सीजन पार्क’चे लोकार्पण आज मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते. त्यानंतर ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील जय भवानी नगर येथे नव्याने नूतनीकरण करण्यात आलेल्या स्वर्गीय आनंद दिघे उद्यानाचे लोकार्पण देखील करण्यात आले.
#एकनाथशिंदे #ठाणे #भुयारीमार्ग #वाहतूककोंडी

ठाण्यात एलिव्हेटेड आणि भुयारी रस्त्यांचे जाळे.. ठाणे, ता, २१

'कृषी यांत्रिकीकरण'साठी 32 लाख लाभार्थ्यांची निवडमुंबई , दि. २१ ऑक्टोंबर :"महाडीबीटी पोर्टलवरील प्रथम येणा-यास प्रथम प्र...
21/10/2025

'कृषी यांत्रिकीकरण'साठी 32 लाख लाभार्थ्यांची निवड

मुंबई , दि. २१ ऑक्टोंबर :

"महाडीबीटी पोर्टलवरील प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार कृषी यांत्रिकीकरण योजने साठी राज्यात 32 लाख लाभार्थ्यांची कृषी विभागातर्फे निवड करण्यात आली आहे. कृषी विभागाच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणावर कृषी यांत्रिकीकरण योजनेत लाभार्थ्यांची निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे. शेतातील कामे जलदगतीने व वेळेत पुर्ण होण्यासाठी निवड झालेल्या या सर्व लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा" असे आवाहन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील कुगाव ता.उत्तर सोलापूर येथे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते १०१ विविध कंपन्यांच्या अनुदानित ट्रॅक्टर वितरणाचा कार्यक्रम पार पडला. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते विविध कंपन्यांच्या लाभार्थींना ट्रॅक्टरच्या चावीचे हस्तांतरण करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, "सोलापुर जिल्हा हा कृषी क्षेत्रात अग्रेसर जिल्हा म्हणून ओळखला जातो.
#कृषीमंत्री #कृषीविभाग #ट्रॅक्टर #दत्तात्रयभरणे #शेतकरी #सोलापूर

Homeताज्या बातम्या'कृषी यांत्रिकीकरण'साठी 32 लाख लाभार्थ्यांची निवड.. ताज्या बातम्यामहाराष्ट्रशेतकरी वार्ता ‘कृषी ...

विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा उडवणार ... #आनंददिघे  #एकनाथशिंदे  #दिवाळी  #फटाके  #बाळासाहेबठाकरे  #शिवसेना
20/10/2025

विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा उडवणार ...
#आनंददिघे #एकनाथशिंदे #दिवाळी #फटाके #बाळासाहेबठाकरे #शिवसेना

विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा उडवणार ... ठाणे, दि. २

...तोपर्यंत महाराष्ट्रात निवडणुका घेऊनच दाखवा!मुंबई,  दि. २० ऑक्टोबर;महाराष्ट्रातील निवडणुका शांतपणे पार पाडायच्या असतील...
20/10/2025

...तोपर्यंत महाराष्ट्रात निवडणुका घेऊनच दाखवा!

मुंबई, दि. २० ऑक्टोबर;
महाराष्ट्रातील निवडणुका शांतपणे पार पाडायच्या असतील तर पहिले मतदार यादी स्वच्छ करा, जो खरा मतदार आहे त्याला मतदान करू देत. जोपर्यंत मतदार यादी पूर्णपणे स्वच्छ होत नाही, सर्व राजकीय पक्षांचं समाधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रात निवडणुका घेऊनच दाखवा असे आव्हान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले आहे.

राज ठाकरे यांनी गोरेगाव येथे 'मुंबई महानगर प्रदेश मतदार यादी प्रमुख मेळाव्याला' संबोधित केलं. यावेळी ते म्हणाले की, जेव्हा आपण ठरवू तेव्हा निवडणूक लागेल. २०१७ साली वोटिंग मशीन आणि मतदार याद्यांसंदर्भात मी पत्रकार परिषद घेतली होती. पण त्यावेळी अनेकांना त्याचं गांभीर्य समजलं न्हवतं. पुढे होणाऱ्या निवडणुकांसाठी जवळपास ९६ लाख खोटे मतदार यादीमध्ये भरले आहेत.अशा निवडणुका जर आपल्या देशात होणार असतील तर कशासाठी निवडणुका लढवायच्या, पैसे खर्च करायचे आणि मतदान करायचं?

आम्ही जर निवडणूक आयोगाला मतदार याद्या सुधारायला सांगतोय मग, सत्ताधारी यावर का उत्तरं देतायेत?
#गोरेगाव #नरेंद्रमोदी #निवडणूकआयोग #मतदारयाद्या #मनसे #मुंबई #राजठाकरे

...तोपर्यंत महाराष्ट्रात निवडणुका घेऊनच दाखवा! मुंबई, दि. २०

कोणाचेही आरक्षण काढून दुसऱ्याला देणार नाही ..   #आरक्षण  #चंद्रशेखरबावनकुळे  #भाजपा  #मराठवाडा  #मराठा  #विदर्भ  #हैदराब...
20/10/2025

कोणाचेही आरक्षण काढून दुसऱ्याला देणार नाही ..
#आरक्षण #चंद्रशेखरबावनकुळे #भाजपा #मराठवाडा #मराठा #विदर्भ #हैदराबादगॅझेट

Homeताज्या बातम्याकोणाचेही आरक्षण काढून दुसऱ्याला देणार नाही .. ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय कोणाचेही आरक्षण क...

आमच्या ताटातील कुणी घेत असेल तर गप्प बसणार नाही.बीड, दि. १९ ऑक्टोबर:आपले आरक्षण हक्काचे असून कोण कसे घेते ते बघून घेऊ. आ...
19/10/2025

आमच्या ताटातील कुणी घेत असेल तर गप्प बसणार नाही.

बीड, दि. १९ ऑक्टोबर:
आपले आरक्षण हक्काचे असून कोण कसे घेते ते बघून घेऊ. आमच्या ताटातील कुणी घेत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिला.

सकल ओबीसी समाजाच्या वतीने बीड येथील छत्रपती संभाजी मैदानावर महाएल्गार मेळावा पार पडला.

यावेळी धनंजय मुंडे म्हणाले की, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी कुणाची विरोध नाही. त्यातच त्यांचा फायदा आहे. मात्र काही मुठभर समाज ओबीसी मध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे. आज ओबीसी समाजाच्या न्याय हक्कावर गदा येत आहे. त्यामुळे आज सर्व आपण एकत्र येत आहोत. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याच्या संकल्पनेतील गावगाडा देखील चांगल्या रितीने हाकायचा आहे. याचा देखील ओबीसी बांधवानी विचार करून आपल्या न्याय हक्कासाठी लढायचे आहे.

यावेळी आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, आमच्या सर्व obc समाजाचा नेता छगन भुजबळ हेच असून सर्व ओबीसी समाजाने ओबीसींच्या न्याय हक्कासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. अनेक लोक आमच्यात फुट पाडण्याचा प्रयत्न करत आहे.
#धनंजयमुंडे #बीड #मराठा #महाएल्गार

Homeताज्या बातम्याआमच्या ताटातील कुणी घेत असेल तर गप्प बसणार नाही. ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय आमच्या ताटातील...

OBC च्या मुळावर उठणा-यांना आडवे करा...बीड , दि.१९ ऑक्टोबर:-आपलं आरक्षण आज धोक्यात आले आहे.मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण ...
19/10/2025

OBC च्या मुळावर उठणा-यांना आडवे करा...

बीड , दि.१९ ऑक्टोबर:-

आपलं आरक्षण आज धोक्यात आले आहे.मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी नोंदीमध्ये खाडाखोड केली जात आहे. त्यातून खोटे दाखले दिले जात आहे. हे कदापीही सहन करणार नाही. त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. ओबीसींच्या प्रश्नावर आपण न्यायालयीन लढाई व रस्त्यावरची लढाई लढणार आहोत. पण त्या सोबतच राजकीय लढाई देखील आपल्याला लढाई लढायची आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये ओरीजनल ओबीसी बांधवांना निवडून द्या आणि ओबीसींच्या मुळावर जे उठले असतील त्यांना आडवे करा, असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

ओबीसी व भटके विमुक्त आरक्षण बचावासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि सकल ओबीसी समाज यांच्या वतीने बीड येथे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत महाएल्गार सभा बीड येथील छत्रपती संभाजी मैदानावर पार पडला. यावेळी ते बोलत होते.
#कुणबी #छगनभुजबळ #बीड #मराठा

OBC च्या मुळावर उठणा-यांना आडवे करा... बीड , दि.१९ ऑक्टोबर:- आपलं

रब्बीसाठी बियाणे, खते व निविष्ठाचे नियोजन करा..पुणे १९ ऑक्टोबर :ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप ...
19/10/2025

रब्बीसाठी बियाणे, खते व निविष्ठाचे नियोजन करा..

पुणे १९ ऑक्टोबर :

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगाम महत्वाचा आहे. सध्या धरणं, विहिरी तुडुंब भरल्याने शेतकऱ्यांना या वर्षी पाण्याची फारशी टंचाई भासणार नाही. म्हणून यंदा रब्बी पिकाखालचं क्षेत्र 65 लाख हेक्टर पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर, राज्यातील रब्बी हंगामाचे नियोजन अधिक सक्षम व समन्वित पद्धतीने करून शेतकऱ्यांना थेट लाभ मिळवून देण्यासाठी ठोस उपाययोजना करा अशा सूचना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या.

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आणि विविध कृषी योजनांच्या अंमलबजावणी आणि प्रगतीबाबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था (VAMNICOM), पुणे येथे पार पडली. या बैठकीत रब्बी हंगामा साठीचे बी-बियाणे, खते, पाणी उपलब्धता, हवामानातील बदल, तसेच विविध योजनांच्या अंमलबजावणीतील प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला गेला.
#कृषीमंत्री #खते #दत्ताभरणे #निविष्ठा #बियाणे #रब्बी #शेतकरी

Homeताज्या बातम्यारब्बीसाठी बियाणे, खते व निविष्ठाचे नियोजन करा.. ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीयशेतकरी वार्ता रब...

Address

NJ

Alerts

Be the first to know and let us send you an email when Xtralarge News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Xtralarge News:

  • Want your business to be the top-listed Media Company?

Share