Moral Maharashtra

  • Home
  • Moral Maharashtra
नवीन मोबाईल न दिल्याच्या कारणावरून १६ वर्षीय मुलाची आत्महत्या; खवड्या डोंगरावरून उडीमॉरल महाराष्ट्र न्यूज नेटवर्कछत्रपती...
04/08/2025

नवीन मोबाईल न दिल्याच्या कारणावरून १६ वर्षीय मुलाची आत्महत्या; खवड्या डोंगरावरून उडी

मॉरल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर – आई नवीन मोबाईल घेऊन देत नसल्याने रागाच्या भरात १६ वर्षीय मुलाने थेट १०० फूट उंच खवड्या डोंगरावरून उडी मारून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना रविवारी ३ ऑगस्ट रोजी दुपारी चारच्या सुमारास तिसगाव शिवारातील वाळूज एमआयडीसी परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अथर्व गोपाल तायडे (वय १६, रा. गल्ली क्र. ४, स्वस्तिक सिटी, तिसगाव, वाळूज एमआयडीसी, मूळ रा. रामदेवनगर, जळगाव जामोद, जि. बुलढाणा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. अथर्व ११ वीत शिक्षण घेत होता. पोलीस भरतीसाठीही तो सराव करत होता.

अथर्वकडे जुना मोबाईल होता, पण तो वारंवार आईकडे नवीन मोबाईल घेऊन देण्यासाठी आग्रह करत होता. मात्र, आर्थिक अडचणीमुळे आईने नकार दिला. रागाच्या भरात अथर्वने घर सोडले आणि थेट तिसगाव शिवारातील खवड्या डोंगर गाठला. त्याच्या मागे धावतच आईदेखील घराबाहेर पडली, मात्र डोंगरावर पोहचताच अथर्वने जवळपास १०० फूट उंचीवरून स्वतःला खाली झोकून दिले. हे दृश्य आईने पाहताच ती थरकापून गेली.

घटनेनंतर वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून अथर्वला छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात हलवले. मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केले. या घटनेने तायडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आईचा फोडलेला हंबरडा उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा होता. पोलीस अधिक तपास करीत आहेत..................................................

मॉरल छत्रपती संभाजीनगर WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/FS6jn0N3gfFIEDR7BPemWU

कोटा मिळताच संभाजीनगर ते मुंबई स्वतंत्र वंदे भारत रेल्वे सुरू करण्याची केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची ग्वाहीमॉरल महाराष्ट्र...
03/08/2025

कोटा मिळताच संभाजीनगर ते मुंबई स्वतंत्र वंदे भारत रेल्वे सुरू करण्याची केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची ग्वाही

मॉरल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

वंदे भारतचा विस्तार नांदेडपर्यंत झाला आहे. ही रेल्वे २६ आॅगस्टपासून धावणार आहे. परंतु संभाजीनगरकरांची रेल्वे पळवल्याचा आरोप होत होता. मात्र आता छत्रपती संभाजीनगर ते मुंबईसाठी स्वतंत्र नवीन एक्स्प्रेस ऑक्टोबरपासून सुरू केली जाईल, असे आश्वासन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी खा. डॉ. भागवत कराड यांच्या शिष्टमंडळास दिले.

छत्रपती संभाजीनगर ते परभणी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी २१८९ कोटी रुपयांचा निधी केंद्राने दिला. यानंतर शुक्रवारी (१ आॅगस्ट) मराठवाड्यासह विदर्भातील खासदारांच्या शिष्टमंडळाने वैष्णव यांची भेट घेतली. या वेळी खा. कराड यांनी स्वतंत्र वंदे भारत एक्स्प्रेसची छत्रपती संभाजीनगर नागरिकांची सोय लक्षात घेत सुरू करण्याचे निवेदन वैष्णव यांना दिले. तेव्हा वैष्णव यांनी वंदे भारत एक्स्प्रेससाठीच्या दुसऱ्या टप्प्यातील रेकचा कोटा उपलब्ध होत असल्याचे सांगितले. रेक उपलब्ध होताच छत्रपती संभाजीनगर ते मुंबई नवीन वंदे भारत एक्स्प्रेस सुरू केली जाईल, असे आश्वासन मंत्री वैष्णव यांनी दिल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले.

आधीची ट्रेन पळवल्याने गैरसोय

वंदे भारतचा विस्तार नांदेडपर्यंत केला आहे. वेळेत बदल केल्याने संबंधित रेल्वे दुपारी अडीच वाजता मुंबईत पोहोचते. यामुळे उद्योगनगरी म्हणून ओळख असलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांची मोठी अडचण होते. दरम्यान, आता नवीन वंदे भारत देण्याचे आश्वासन मिळाल्याचे खा. डाॅ. कराड यांनी सांगितले. खा. डॉ. कल्याण काळे, खा. डॉ. शिवाजी काळगे, खा. बळवंत वानखेडे आदींचा शिष्टमंडळात समावेश होता..................................................

मॉरल छत्रपती संभाजीनगर WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/FS6jn0N3gfFIEDR7BPemWU

जायकवाडी ९० टक्क्यांवर, दुपारी जलपूजन करून दरवाजे उघडणारमॉरल महाराष्ट्र न्यूज नेटवर्कपैठण : आज दिनांक 31 जुलै 2025 रोजी ...
31/07/2025

जायकवाडी ९० टक्क्यांवर, दुपारी जलपूजन करून दरवाजे उघडणार

मॉरल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

पैठण : आज दिनांक 31 जुलै 2025 रोजी जायकवाडी धरण (नाथसागर जलाशय) 90.13 टक्के क्षमतेने भरल्यामुळे दुपारी 3 वाजता ते 3.30 वाजेदरम्यान धरणाच्या सांडव्याद्वारे गोदावरी नदीपात्रात 9432 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे.

पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे आणि उर्ध्व धरणांतून येणाऱ्या पाण्याच्या जोरदार आवक लक्षात घेता विसर्गाची आवश्यकता भासली. त्यामुळे धरणाचे एकूण 18 दरवाजे प्रत्येकी 0.5 फुटाने उघडण्यात येणार आहेत.

पुढील काही तासांत पाण्याची आवक वाढल्यास विसर्गाचे प्रमाण वाढवले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, असे आवाहन जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.

कोणीही गोदावरी नदीपात्रात जाऊ नये. सुरक्षिततेची पूर्ण काळजी घ्यावी. जीवित वा वित्तहानी टाळण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे. .................................................

मॉरल छत्रपती संभाजीनगर WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/FS6jn0N3gfFIEDR7BPemWU

श्रावणी सोमवार:संभाजीनगरमधून आज वेरूळसाठी दर 15 मिनिटाला बस, 30 मिनिटांत दर्शनमॉरल महाराष्ट्र न्यूज नेटवर्कछत्रपती संभाज...
28/07/2025

श्रावणी सोमवार:संभाजीनगरमधून आज वेरूळसाठी दर 15 मिनिटाला बस, 30 मिनिटांत दर्शन

मॉरल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर - आज पहिला श्रावणी सोमवार (दि. २७) असल्याने लाखो भाविक दर्शनासाठी घृष्णेश्वर मंदिर येथे दर्शनासाठी येतील या अनुषंगाने मंदिर व्यवस्थापन व मंदिर ट्रस्टने व्यवस्थापन केले आहे. या वर्षी एक रस्ता भाविकांना येण्यासाठी व पूर्वेकडून भाविकांना बाहेर पडण्यासाठी नवीन रस्ता बनवण्यात आला आहे. यामुळे दर्शनासाठी जास्त वेळ लागणार नाही. यावर्षी साधारणपणे अर्ध्या तासात भाविकांना घृष्णेश्वराचे दर्शन होईल. तसेच स्मार्ट सिटी बस प्रत्येक १५ मिनिटाला छत्रपती संभाजीनगरातील मध्यवर्ती बसस्थानकातून धावणार आहे.

गर्दी बघता शनिवार, रविवारी व सोमवारी अभिषेक बंद राहतील. इतर दिवस मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी भक्तांची गर्दी बघता अभिषेक हा सकाळी ठेवले जातील, असेही मंदिर ट्रस्टकडून सांगण्यात आले. साधारणपणे सोमवारी दर्शनासाठी जवळपास २ लाख भाविक येण्याचा अंदाज आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या आदेशाने मंदिर परिसरात प्रसाद बनवण्यासाठी बंधने घालण्यात आली आहेत. तसेच मंदिर ट्रस्टकडून मोफत पिण्याचे पाणी व मोफत वैद्यकीय सेवा याचे व्यवस्थापन करण्यात आले आहे. मंदिर परिसरात दोन वैद्यकीय दवाखाने लावण्यात आले आहेत. तसेच बाहेर पडण्याच्या मार्गावर प्रसाद वाटप केला जाणार आहे.

विभागीय नियंत्रकांनी गतवर्षीप्रमाणे यंदाही वेरूळसाठी जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. प्रत्येक १५ मिनिटाला सिटी बस तर ५ एसटी बस मध्यवर्ती बसस्थानकातून धावतील. तसेच सिडको बसस्थानकातून ५ बसेस धावतील. याशिवाय पैठणहून १, सिल्लोड १, वैजापूर १, कन्नड ३ व गंगापूर बसबस्थानकातून २ अशा एकूण ८ बसेस ग्रामीण भागातून वेरूळसाठी दिवसभर धावणार आहेत. वेरूळ मंदिर परिसरात मंदिरापासून ३०० मीटर अंतरावरच तीन ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे. ही पार्किंगची सेवा पेड स्वरूपात असेल. कुणीही रस्त्यावर वाहन न लावता पार्किंमध्येच वाहने लावावीत, असे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे...................................................

मॉरल छत्रपती संभाजीनगर WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/FS6jn0N3gfFIEDR7BPemWU

शहरानंतर आता वेरूळ लेणी, घृष्णेश्वर मंदिर परिसरदेखील अतिक्रमणमुक्त होणारमॉरल महाराष्ट्र न्यूज नेटवर्कछत्रपती संभाजीनगर -...
24/07/2025

शहरानंतर आता वेरूळ लेणी, घृष्णेश्वर मंदिर परिसरदेखील अतिक्रमणमुक्त होणार

मॉरल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर - वेरूळ लेणी आणि श्री घृष्णेश्वर मंदिर परिसरातील रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. मंगळवारी (दि. २२) आणि बुधवारी (दि. २३) सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता एस. के. चव्हाण यांनी रस्त्याचे मोजमाप करून मार्किंगचे काम पूर्ण केले आहे. हे मार्किंग १५ मीटर म्हणजेच ५० फूट अंतरावर करण्यात आले आहे.

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गापर्यंत अतिक्रमण हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही छोटे व्यापारी आणि टपरीधारकांनी परिस्थितीची जाणीव ठेवत स्वखुशीने आपली दुकाने हटवण्यास सुरुवात केली आहे. तहसीलदार स्वरूप कंकाळ यांनी सांगितले की, मार्किंग पूर्ण होताच अतिक्रमणावर कारवाई केली जाईल. यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

प्रशासनाकडून अंतिम तयारी सुरू असून दोन ते चार दिवसांत कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरातील व्यावसायिक आणि दुकानदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. वेरूळ लेणी परिसर धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा आहे. त्यामुळे अतिक्रमणमुक्ती ही गरजेची असल्याचे पर्यटकांचे म्हणणे आहे. अतिक्रमण हटाव ही प्रशासनाने हाती घेतलेली मोहीम काळाची गरज आहे. धार्मिक, पर्यटनस्थळाचा दर्जा टिकवण्यासाठी ही कारवाई महत्त्वाची असल्याचे पर्यटक आणि नागरिकांनी सांगितले. हे अतिक्रमण निघाल्यावर पुढे गायरान व शासकीय जमिनीवरीलही अतिक्रमण लवकरात लवकर काढण्यात येईल. कुंभमेळ्यापूर्वी सर्व रस्ते मोकळे करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे. खुलताबाद तालुक्यातील शूलिभंजनपर्यंत लेखी नोटिसा देण्यात आल्या आहेत. वेरूळ शिवारात मार्किंग करून तोंडी सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधितांनी ३ दिवसांत केलेले अतिक्रमण काढून घ्यावे, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा अतिक्रमणधारकांना देण्यात आलेला असल्याने अनेक व्यावसायिकांनी अतिक्रमण स्वतःहून काढून घेण्यास सुरुवात केली आहे...................................................

मॉरल छत्रपती संभाजीनगर WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/FS6jn0N3gfFIEDR7BPemWU

पालकमंत्री शिरसाट यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न, शिरसाटांचे गंभीर आरोपमॉरल महाराष्ट्र न्यूज नेटवर्कछत्रपती संभाजीनगर -...
21/07/2025

पालकमंत्री शिरसाट यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न, शिरसाटांचे गंभीर आरोप

मॉरल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर - राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या येथील निवासस्थानी एका तरुणाने हल्ला केल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही घटना गंभीर असल्याचे स्पष्ट केले.

यासंबंधीच्या माहितीनुसार, सौरभ घुले असे आरोपी तरुणाचे नाव आहे. हा तरुण रविवारी मध्यरात्री मंत्री संजय शिरसाट यांच्या येथील निवासस्थानालगत आला. त्यावेळी तो मद्यधुंद अवस्थेत होता. त्याने त्याच स्थितीत शिरसाट यांच्या बंगल्याच्या दिशेने दगडफेक केली. यावेळी त्याने शिवीगाळही केली. सदर तरुणाने हे कृत्य का केले? हे समजले नाही. पण त्याने हा प्रकार दारुच्या नशेत केला असावा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी सदर तरुणास ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला. पोलिस पुढील तपास करत आहेत.

संजय शिरसाट यांनी या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, माझ्या घरावर हल्ला करणारा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर 302 चे गुन्हे दाखल आहेत. 'आज मुझे बडा काम मिला है' असे तो आपल्या मित्राला सांगत होता. मला ही घटना साधारण वाटली होती, पण आता ती गंभीर होणार आहे. मी पोलिसांशी बोलून याबाबत माहिती घेणार आहे. मी त्याला ओळखत नाही. पण तो माझ्या मतदारसंघातील आहे...................................................

मॉरल छत्रपती संभाजीनगर WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/FS6jn0N3gfFIEDR7BPemWU

हुल दिल्याच्या कारणावरून दर्गा चौकात रात्री उशिरा राडा; गाडीची तोडफोडमॉरल महाराष्ट्र न्यूज नेटवर्कछत्रपती संभाजीनगर - शह...
21/07/2025

हुल दिल्याच्या कारणावरून दर्गा चौकात रात्री उशिरा राडा; गाडीची तोडफोड

मॉरल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर - शहानूरमिया दर्गा परिसरात रविवारी (२० जुलै) रात्री साडेदहाच्या सुमारास दोन कारचालकांमध्ये किरकोळ वादातून मोठा राडा झाला. एका कारने दुसऱ्या कारला हुल दिल्यामुळे संतापलेल्या चालकाने पुढे जाऊन रस्त्यात गाडी आडवी लावली व दुसऱ्या कारची काचफोड करत चालकाला मारहाण केली.

ही घटना घडत असताना नागरिकांनी मध्ये पडण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. या सगळ्या गोंधळामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. जवाहर नगर व उस्मानपुरा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली, मात्र आरोपी चालक घटनास्थळावरून फरार झाला होता. विशेष म्हणजे, आरोपीने वापरलेली पांढऱ्या रंगाची कार पोलिसांची टोपी व फायबरचा रॉड घेऊन आली होती. त्यामुळे संबंधित व्यक्ती पोलिस दलातीलच असल्याचा संशय उपस्थित झाला आहे, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

घटनेपूर्वी दूध डेअरी सिग्नलजवळ दोन कारमधील किरकोळ वाद मोठ्या झगड्यात बदलला. भरधाव वेगात दोन्ही वाहनं एकमेकांच्या मागे जात होती. दर्गा चौकात सिग्नल लागल्याने काळ्या रंगाची कार (एमएच २० एचबी ०३९७) थांबली असता, पांढऱ्या रंगाच्या कारने ती अडवली. त्यातून उतरलेल्या दोन व्यक्तींनी फायबर रॉडने काळ्या कारच्या सर्व काचा फोडल्या. राडा वाढताच गर्दी जमा झाली आणि पांढऱ्या कारमधील चालकाने सोबत असलेली महिला व मुलगी घटनास्थळी सोडून पळ काढला...................................................

मॉरल छत्रपती संभाजीनगर WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/FS6jn0N3gfFIEDR7BPemWU

तिप्पट पैसे करून देतो म्हणत वृद्धाला ५० लाखांना लुटलेमॉरल महाराष्ट्र न्यूज नेटवर्कछत्रपती संभाजीनगर - दुबईत कंपनी असून त...
16/07/2025

तिप्पट पैसे करून देतो म्हणत वृद्धाला ५० लाखांना लुटले

मॉरल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर - दुबईत कंपनी असून ती ट्रस्ट, गोशाळा आणि नव्या कंपन्यांना फंडिंग करते, असे सांगून पुण्यातील अनिल गोविंदा शिंदे याने शेतकरी आणि उद्योजकाला ५० लाखांचा गंडा घातला. हा प्रकार १८ मार्च रोजी सिडकोमधील एसबीआय बँकेसमोर घडला.

फिर्यादी चंद्रभान बापूराव वटाणे हे मूळचे वलखेड, ता. परतूर येथील असून सध्या बजाजनगर येथे राहतात. ते शेतकरी आहेत. २०२१-२२ मध्ये नातवंडांच्या शिक्षणासाठी पुण्याला ये-जा सुरू होती. त्यावेळी त्यांच्या रूमजवळ अनिल शिंदे राहत होता. ओळख वाढल्यानंतर शिंदेने स्वतःची दुबईत कंपनी असल्याचे सांगितले. ही कंपनी लोकांना श्रीमंत करण्यासाठी पैसे वाटते, ट्रस्ट आणि धर्मादाय संस्थांना फंडिंग करते, असे त्याने सांगितले.

शिंदेने वटाणेंना सांगितले की, तुम्ही पाच लाख दिले तर मी तुम्हाला १५ लाख देतो. तुमच्याकडे किती पैसे आहेत, अशी विचारणा केली. तुमची कंपनी असेल तर तीन पट रक्कम फंडिंग मिळेल, असेही आमिष दाखवले. त्यानंतर शिंदे वटाणे यांच्या घरी ये-जा करू लागला. एखादी कंपनी किंवा ट्रस्ट दाखवा, मी त्यांना पैसे देतो, असे तो वारंवार सांगत असे. कमिशनही देतो, असेही त्याने सांगितले.

वटाणे यांनी ओळखीचे रमेश गौतम पाईकराव यांची समर्थ फार्मर प्रोड्युसर कंपनी असल्याचे सांगितले. त्यानंतर शिंदे आणि पाईकराव यांच्यात बोलणे सुरू झाले. शिंदेने बजाजनगर येथे आपल्या मेव्हण्या सुशीलकुमार दिलीपराव तायडे आणि हरी नारायण महाजन यांच्यासोबत तीन-चार वेळा भेट दिली. त्यावेळी त्याने दुबईतील कंपनीसाठी पैसे जमवण्यास सांगितले. पाईकराव यांनी कंपनीची सर्व कागदपत्रे आणि दोन कोरे बॉण्ड शिंदेला दिले.

वटाणे, त्यांचे पाहुणे विलास शेळके, मित्र युवराज चावरे, देवाशीस प्रधान, आबासाहेब चिंतामणी यांनी मिळून ५० लाख रुपये जमा केले. पाईकराव यांची कंपनी दाखविल्याने शिंदेने दीड कोटी रुपये देतो, असे सांगितले. १८ मार्च रोजी शिंदे वटाणे यांच्या घरी आला. त्याने ५० लाख रुपये मोजून घेतले. त्यानंतर वटाणे आणि पाईकराव यांना सिडकोमधील एसबीआय बँकेसमोर नेले. कॅनरा बँकेच्या आरटीजीएसद्वारे पैसे पाठवतो, तुम्ही बँकेत जाऊन फॉर्म भरा, असे सांगितले.

दोघेही बँकेत तीन तास बसून राहिले. पैसे आले नाहीत. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आले. वटाणे यांनी १४ रोजी पोलिस आयुक्तांकडे तक्रार दिली. त्यानंतर सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला...................................................

मॉरल छत्रपती संभाजीनगर WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/FS6jn0N3gfFIEDR7BPemWU

विद्यादीपच्या तीनही सिस्टर्सचा जामीन मंजूर; पोलिसांना दणकामॉरल महाराष्ट्र न्यूज नेटवर्कछत्रपती संभाजीनगर - विद्यादीप बाल...
15/07/2025

विद्यादीपच्या तीनही सिस्टर्सचा जामीन मंजूर; पोलिसांना दणका

मॉरल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर - विद्यादीप बालगृहातील अल्पवयीन मुलींवर छळ आणि दुर्लक्ष केल्याच्या प्रकरणात अटकेत असलेल्या तिघा आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. एम. एस. देशपांडे यांनी सोमवारी (१४ जुलै) प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि काही अटींसह जामीन मंजूर केला. या आरोपींची नावे सुचिता भास्कर गायकवाड (५६), अलका फकीर साळुंके (४६) आणि अन्वेली भगवान जोसेफ (३१) अशी आहेत. तिघांनाही यापूर्वी न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले होते. त्यानंतर आरोपींच्या वतीने अ‍ॅड. निलेश घाणेकर यांनी नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला होता, ज्यावर सोमवारी सुनावणी झाली.

सुनावणीदरम्यान अ‍ॅड. घाणेकर यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, अटकेवेळी पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केले आहे. तसेच, बालगृहातील मुलींवर कोणताही धार्मिक प्रभाव टाकण्यात आलेला नाही आणि आरोपींनी चौकशीदरम्यान सहकार्य केले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीची गरज नाही.

दुसरीकडे, सरकारी वकिलांनी प्रकरणाच्या गंभीरतेकडे लक्ष वेधून अजूनही एक आरोपी फरार असल्याचे सांगितले. तपास अपूर्ण असून साक्षीदारांवर दबाव येऊ शकतो, म्हणून जामीन नाकारावा अशी मागणी त्यांनी केली. मात्र न्यायालयाने “जामीन हा नियम आणि तुरुंगवास अपवाद” हे सूत्र अधोरेखित करत जामीन मंजूर केला.

जामीनाच्या अटींनुसार, आरोपींनी दर रविवारी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत कँटोनमेंट पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागेल. तसेच, ते कोणतेही पुरावे नष्ट करणार नाहीत, साक्षीदारांवर दबाव टाकणार नाहीत आणि पुन्हा गुन्हा करणार नाहीत, अशी अट घालण्यात आली आहे. न्यायालयाची परवानगी घेतल्याशिवाय त्यांना जिल्ह्याबाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे...................................................

मॉरल छत्रपती संभाजीनगर WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/FS6jn0N3gfFIEDR7BPemWU

रेल्वे बोगीच्यावर अडकलेला चेंडू काढताना शॉक लागून चिमुकला मृत्युमुखीमॉरल महाराष्ट्र न्यूज नेटवर्कछत्रपती संभाजीनगर - रेल...
14/07/2025

रेल्वे बोगीच्यावर अडकलेला चेंडू काढताना शॉक लागून चिमुकला मृत्युमुखी

मॉरल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर - रेल्वे बोगीवर अडकलेला क्रिकेटचा चेंडू काढताना विजेचा धक्का बसून गंभीर जखमी झालेल्या दहा वर्षीय अयान सलीम शेख (रा. सादातनगर) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गुरुवारी (१० जुलै) सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना बीड बायपासलगतच्या रेल्वे स्टेशन परिसरात घडली होती. रविवारी (१३ जुलै) दुपारी त्याचा घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सादातनगर येथील काही मुले रेल्वे स्टेशनच्या आवारात क्रिकेट खेळत होती. खेळताना चेंडू मालगाडीच्या डब्यावर जाऊन अडकला. चेंडू काढण्यासाठी अयान याला मुलांनी मदतीने वर चढवले. याच दरम्यान त्याचा संपर्क डब्याच्या वरील विद्युत तारेशी झाला. त्यामुळे त्याला जोरदार विजेचा शॉक बसला आणि तो भाजून खाली फेकला गेला. त्याचे मित्र धावत जाऊन प्रौढांना माहिती दिली. अयानला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला...................................................

मॉरल छत्रपती संभाजीनगर WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/FS6jn0N3gfFIEDR7BPemWU

समृद्धीच्या सावंगी टोलनाक्यावर मध्यरात्री गोळीबार; एक जण गंभीरमॉरल महाराष्ट्र न्यूज नेटवर्कछत्रपती संभाजीनगर - फुलंब्री ...
12/07/2025

समृद्धीच्या सावंगी टोलनाक्यावर मध्यरात्री गोळीबार; एक जण गंभीर

मॉरल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर - फुलंब्री तालुक्यातील सावंगी येथील समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्यावर रात्री दोन कर्मचाऱ्यांच्या झटापटीत अचानक पिस्तूलमधून गोळीबार होऊन थेट एका कर्मचाऱ्याच्या पोटात गोळी घुसली. गोळीबारात भरत घाटगे हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीबारानंतर दुसरा कर्मचारी फरार झाला. दोघांमध्ये वाद का झाला आणि त्यातून गोळीबार का करण्यात आला हे अजून स्पष्ट झालं नाही.

नेमकं काय घडलं?
फुलंब्री तालुक्यातील सावंगी येथील समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्यावर मंगळवारी रात्री एक गंभीर घटना घडली. दोन कर्मचाऱ्यांमध्ये वादाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या झटापटीत अचानक पिस्तूलमधून गोळी सुटली, आणि ती थेट एका कर्मचाऱ्याच्या पोटात घुसली. या गोळीबारात भरत घाटगे हे कर्मचारी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ही घटना काल (शुक्रवारी, ता-11) रोजी उशिरा रात्री समृद्धी महामार्गावरील सावंगी टोलनाक्यावर घडली. प्राथमिक माहितीनुसार, भरत घाटगे आणि दुसरा कर्मचारी यांच्यात काही कारणावरून वाद झाला. वाद इतका टोकाला गेला की त्यामध्ये हाणामारीची वेळ आली. त्या झटापटीदरम्यान दुसऱ्या कर्मचाऱ्याकडे असलेले पिस्तूल अचानक भरत घाटगे यांच्या दिशेने सुटलं, आणि गोळी थेट त्यांच्या पोटात घुसली. घटनेनंतर पिस्तूलधारी कर्मचारी घटनास्थळावरून पलायन करण्यात यशस्वी झाला. यामुळे पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. याप्रकरणी पोलिसांनी 'समृद्धी'च्या अधिकाऱ्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडून कर्मचाऱ्यांना पिस्तूल देण्यात आले नसल्याची माहिती मिळाली. त्यामुळे हे पिस्तूल दोन कर्मचाऱ्यांकडे कुठून आले, यासंदर्भात चौकशी सुरू आहे...................................................

मॉरल छत्रपती संभाजीनगर WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/FS6jn0N3gfFIEDR7BPemWU

वादग्रस्त विद्यदीप बालगृहावर गुन्हा दाखल; चार सिस्टरच्या छळाची व्यथा मुलींनी मांडलीमॉरल महाराष्ट्र न्यूज नेटवर्कछत्रपती ...
10/07/2025

वादग्रस्त विद्यदीप बालगृहावर गुन्हा दाखल; चार सिस्टरच्या छळाची व्यथा मुलींनी मांडली

मॉरल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर - विद्यादीप बालगृहातील अत्यंत गंभीर प्रकार उघडकीस आल्याने, या प्रकरणी अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालगृहातील नऊ मुलींनी अत्याचार, शिक्षणावर बंदी आणि अमानुष वागणुकीच्या आरोपांसह बालगृहातून पलायन केले होते. हा प्रकार समोर आल्यानंतरही गुन्हा नोंदवण्यात विलंब का झाला, असा सवाल औरंगाबाद खंडपीठाने उपस्थित केला होता.

यानंतर बुधवारी (९ जुलै) छावणी पोलिस ठाण्यात संबंधितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये नर्स चिता भास्कर गायकवाड (५६), केअरटेकर अलका फकिर साळुंके (४६), सहायक अधीक्षिका अन्वेली भगवान जोसेफ (३१) आणि कमल डेव्हिड गिऱ्हे (४८) यांच्या विरोधात बालिकांच्या फिर्यादीवरून कारवाई झाली आहे.

फिर्यादीत मुलींनी गंभीर आरोप करत सांगितले, की बालगृह प्रशासनाने त्यांच्या शिक्षणास प्रतिबंध केला. बाल कल्याण समिती येणाऱ्या वेळी मुलींना खोलीत बंद केले जायचे. पिण्याच्या पाण्याची योग्य सोय नव्हती; बाथरूममधील नळाचे पाणी प्यावे लागायचे. अन्नही अपुरे दिले जायचे. दोन खोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते, ज्यामुळे कपडे बदलताना लज्जास्पद स्थिती निर्माण होत होती. एकदा कॅमेऱ्याची दिशा बदलल्यावर सिस्टरने रागाने दरवाजा बंद केला. मुलींनी दार उघडले नाही, तेव्हा पोलिसांनी हस्तक्षेप करत प्रकरण शांत केले.

त्यानंतर एका मुलीच्या दातात खिळ बसल्यानंतर उपचाराऐवजी सिस्टरने पवित्र पाणी शिंपडल्याने संताप वाढला. दुसऱ्या दिवशी मुलींनी समितीला भेट देण्याची मागणी केली. मात्र समिती न आल्याने त्यांनी निषेध म्हणून कॅमेरा फोडला आणि गेट तोडून गच्चीवरून उडी घेत बाहेर पळ काढली. शेवटी कोर्ट परिसरात ‘दामिनी पथकाने’ त्या मुलींना ताब्यात घेतले, असेही फिर्यादीत नमूद आहे...................................................

मॉरल छत्रपती संभाजीनगर WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/FS6jn0N3gfFIEDR7BPemWU

Address

AK

Alerts

Be the first to know and let us send you an email when Moral Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Moral Maharashtra:

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share