News Wadi

News Wadi सय्यद नेहाल हसन रिपोर्टर मुंबई महाराष्ट्र
[email protected]

नेहाल हसन महाराष्ट्र ब्यूरो चीफ आज मेरा बेटा 12 मे पास होगाया है आप सभी से गुजारिश है कि उसकी कामयाबी के लिए दुआ करे और ...
05/05/2025

नेहाल हसन महाराष्ट्र ब्यूरो चीफ
आज मेरा बेटा 12 मे पास होगाया है आप सभी से गुजारिश है कि उसकी कामयाबी के लिए दुआ करे और प्रार्थना करें आगे और बड़े अपने देश का नाम रौशन करे पुरी दुनिया में धन्यवाद

नेहाल हसन दिवा प्रभाग समिति के अधिकारी अवैध निर्माण पर करवाई कब करेंगे बब्लू कंपाउंड खान कंपाउंड के पीछे शिलफाटा रोड मुं...
24/04/2025

नेहाल हसन दिवा प्रभाग समिति के अधिकारी अवैध निर्माण पर करवाई कब करेंगे
बब्लू कंपाउंड खान कंपाउंड के पीछे शिलफाटा रोड मुंब्रा ठाणे महाराष्ट्र

नेहाल हसन मुंबई से
24/04/2025

नेहाल हसन मुंबई से

14/04/2025
"लखपती दीदी" योजनेद्वारे ठाणे जिल्ह्यात 100% उद्दिष्टपूर्ती; महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणात मोठी झेप*नेहाल हसन दि. 11 (जि...
13/04/2025

"लखपती दीदी" योजनेद्वारे ठाणे जिल्ह्यात 100% उद्दिष्टपूर्ती; महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणात मोठी झेप*

नेहाल हसन दि. 11 (जिल्हा परिषद, ठाणे) - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ‘उमेद’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या "लखपती दीदी" योजनेच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील उद्दिष्टांची 100% पूर्ती करण्यात आली असून, एकूण 46399 स्वयंसहाय्यता गटांतील महिलांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांहून अधिक झाले आहे व याची नोंदणी Digital Aajeevika Register (App) मध्ये करण्यात आलेली आहे.
या योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील गरिब महिलांना किमान दोन उपजिविकेची साधने उपलब्ध करून देत त्यांचे कुटुंब दरवर्षी 1 लाखापेक्षा अधिक उत्पन्नाचे स्त्रोत गाठेल यासाठी आहे. महिलांना व्यवसायिक प्रशिक्षण, कर्ज व आर्थिक पाठबळ, डिजिटल नोंदणीसह आर्थिक साक्षरता कार्यशाळा यांचे नियोजन उमेद अभियानांतर्गत यशस्वीपणे राबविण्यात येत आहे, अशी माहिती प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांनी दिली. उमेद अभियानाचे उद्दिष्टः “तळागाळातील गरिबांसाठी मजबूत अशा संस्थांची बांधणी करुन, स्वंयरोजगार व कुशल वेतनाधारित रोजगाराच्या संधी मिळवून दारिद्र्य निर्मूलन व उपजिविकेत शाश्वत सुधारणा करणे ठाणे जिल्ह्यातील लखपती दीदी योजनेची उद्दिष्टपूर्ती (2024-25):*
तालुका बचत गट कुटुंबे ग्रामसंघ प्रभागसंघ उद्दिष्ट (लखपती दीदी)पूर्ती (ऑफ़लाइन)
अंबरनाथ 798 7928 59 4 3095 3465
कल्याण 1627 16411 83 6 6269 6629
मुरबाड 2294 22482 147 8 7940 7940
भिवंडी 3151 34153 295 9 11220 12866
शहापूर 2959 29284 280 7 17320 17893
एकूण महिलांची उद्दिष्टपूर्ती: 48793 / उद्दिष्ट: 45844 – 100% हून अधि या यशाबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी समाधान व्यक्त करताना सांगितले की, "उमेद अभियानांतर्गत राबविण्यात येणारी लखपती दीदी योजना ही केवळ महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणारी योजना नसून, ग्रामीण भागातील कुटुंबांची जीवनशैली बदलणारी शक्ती आहे. शेती आधारित, बिगर शेती आधारित, पशुपालन, समुदाय गुंतवणूक निधी, जोखीम प्रवणता निधी, उत्पादक गट स्थापना तसेच SVEP - Startup Village Enterpreneurship Programme शहापूर तालुक्यात तर MED - Micro Enterprise Development अंबरनाथ तालुक्यात या योजना राबवून ठाणे जिल्ह्यात १००% लखपती दीदी करण्यात यश मिळाले आहे उमेद अभियानांतर्गत महिलांचे संघटन, उत्पादक गट, महिला शेतकरी उत्पादक कंपन्या यांची यशस्वी स्थापना व संचालन करण्यात येत असून, प्रशिक्षित समुदाय संसाधन व्यक्तींच्या माध्यमातून गावपातळीवर कार्यरत राहून गरीब महिलांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्य केले जात आहे.
000

*ठाणे जिल्ह्यात गुंतवणूकदारांसाठी पोषक वातावरण; जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी समस्या निवारण करण्य...
13/04/2025

*ठाणे जिल्ह्यात गुंतवणूकदारांसाठी पोषक वातावरण; जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी समस्या निवारण करण्याचे दिले आश्वासन*

नेहाल हसन ठाणे, दि.12(जिमाका): ठाणे जिल्ह्यातील गुंतवणूकदार उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र, ठाणे आणि अतिरिक्त अंबरनाथ औद्योगिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दि.11एप्रिल,2025 रोजी अतिरिक्त अंबरनाथ, MIDC, आनंद नगर येथे एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे होते.
या बैठकीत अतिरिक्त अंबरनाथ औद्योगिक संघटना, मुरबाड औद्योगिक संघटना, पुनधे शहापूर औद्योगिक संघटना, आसनगाव औद्योगिक संघटना आणि जिल्ह्यातील इतर प्रमुख उद्योजक सहभागी झाले होते.
बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी महाराष्ट्र शासनाच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमाची माहिती दिली आणि शाश्वत विकासासाठी मानक कार्यप्रणालीची गरज असल्याचे सांगितले. त्यांनी विविध औद्योगिक संघटना आणि उद्योजकांनी मांडलेल्या सर्व समस्यांवर योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. आसनगाव येथे लवकरच अग्निशमन दल स्थापन करण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले. तसेच, ठाणे जिल्ह्यातील गुंतवणूकदार आणि उद्योजकांना येणाऱ्या अडचणींसाठी वेळोवेळी सहाय्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली, ज्यामुळे जिल्ह्यात उद्योग वाढीसाठी सकारात्मक वातावरण निर्माण होईल.
यावेळी ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. स्वामी यांनी उद्योजकांच्या समस्यांचे खेळीमेळीच्या वातावरणात निराकरण केले. त्यांनी उद्योगांना औद्योगिक सुरक्षिततेसाठी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आणि ‘माझी सुरक्षा, माझी जबाबदारी’ हे सूत्र पाळण्याचे महत्त्व सांगितले. उद्योग आणि प्रशासनाने परस्परांच्या सहकार्याने काम करावे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच, ठाणे ग्रामीण पोलीस यांच्या संकेतस्थळावर उद्योग संबंधित तक्रारींसाठी नवीन पर्याय उपलब्ध करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
बैठकीचे प्रास्ताविक करताना जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक श्रीमती सोनाली देवरे यांनी महाराष्ट्र शासनाच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमातील 7 कलमी कृती आराखड्याची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, या अंतर्गत जिल्ह्यात 65 सामंजस्य करार झाले असून त्याद्वारे सुमारे 4 हजार 896 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे, ज्यामुळे जवळपास 68 हजार रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. तसेच, 2024 या वर्षामध्ये झालेल्या सामंजस्य करारांपैकी 95 % करार पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहेत, असेही त्यांनी नमूद केले. श्रीमती देवरे यांनी ठाणे जिल्ह्यातील 11 MIDC आणि जिल्हा उद्योग मित्र समितीच्या माध्यमातून दर तीन महिन्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उद्योजकांच्या समस्यांचे निराकरण कसे केले जाते, याबद्दलचीही माहिती दिली. यासोबतच, MAITRI कायदा 2023 आणि MAITRI संकेतस्थळाद्वारे पुरविण्यात येणारी एक खिडकी योजनेची माहिती तसेच ठाणे जिल्ह्याचा विशेष प्रकल्प ‘ODOP – Millets’ ची सद्यःस्थिती आणि त्यासंबंधी उद्योजकांना मार्गदर्शन केले.
मुरबाड औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष श्री. उत्तमानी यांनी वाढत्या विजेच्या दरांबाबत आणि माथाडी कामगार कायद्यात सुधारणा करण्याची मागणी केली. शहापूर औद्योगिक संघटनेचे श्री. मनोज पाटील आणि TISSA औद्योगिक संघटनेच्या प्रतिनिधींनी शहापूरमधील उद्योजकांना अपुरा वीज आणि पाणीपुरवठा तसेच ESIC रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या कमतरतेबद्दल अध्यक्षांचे लक्ष वेधले.
अतिरिक्त अंबरनाथ औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष श्री. उमेश तायडे यांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून ZUM बैठकीत मांडलेल्या ट्रान्सफॉर्मरच्या समस्येचे निराकरण झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
त्यांनी सांगितले की, अतिरिक्त अंबरनाथ येथे 100 MVA चा ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला आहे आणि यासाठी त्यांनी जिल्हा उद्योग केंद्र, ठाणे यांच्या महाव्यवस्थापकांचे आभार मानले. याव्यतिरिक्त, त्यांनी जमीन, पाणी, वीज, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे परवाने, पर्यावरणीय मंजुरी प्रमाणपत्रानुसार मालमत्ता कर आणि माथाडी कामगार कायद्यासंबंधी उद्योजकांच्या अडचणी आणि सद्यःस्थिती बैठकीत मांडली. इतर उद्योजकांनीही आपल्या समस्या व अडचणी बैठकीत व्यक्त केल्या.
शेवटी उपस्थित सर्व उद्योजक प्रतिनिधींनी केंद्र व राज्य शासन उद्योग क्षेत्रासाठी घेत असलेल्या सकारात्मक धोरणात्मक निर्णयांबद्दल समाधान व्यक्त करून शासनाचे आभार मानले.

*गुरु स्वतःसाठी न लढता समाजासाठी लढतो; हा आदर्श येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचविणार*          *- मुख्यमंत्री देवेंद्र फडणव...
13/04/2025

*गुरु स्वतःसाठी न लढता समाजासाठी लढतो; हा आदर्श येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचविणार*
*- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

*नेहाल हसन ठाणे,दि.13 (जिमाका):-* कोणताही गुरु स्वतःसाठी न लढता समाजासाठी लढतो, हा आदर्श त्यांनी आपल्यासमोर ठेवला आहे . हा आदर्श पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम आपल्याला करावयाचे आहे, असे
प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गुरमत समागम कार्यक्रम, एनएमएमसी मैदान, गुरुद्वाराजवळ, lनवी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात केले.
यावेळी वनमंत्री गणेश नाईक, आमदार मंदा ताई म्हात्रे, आमदार प्रशांत ठाकूर, संजीव नाईक, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता पक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त कैलास शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गुरुमत समागम कार्यक्रमात गुरुजींचा आशीर्वाद
घेण्यासाठी उपस्थित राहता आले, हे माझे सौभाग्य आहे. आपण सर्वजण गुरुजींचा आशीर्वाद घेतो.
गुरु ग्रंथ साहेब यांच्या माध्यमातून जे विचार आपल्यापर्यंत पोहोचतात ते केवळ शीख समुदायाच्या कल्याणासाठी नसून समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी आहेत, असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, गुरुनानक देव साहेब यांनी जे विचार संपूर्ण देशांमध्ये पोहोचविले. त्यामुळे एक मोठा नानकपंथी समाज उभा राहिला, त्यामध्ये शीख समाजाबरोबर सिंधी लमानी बंजारा शिकलगार समाजही आहे. गुरुनानक देव साहेब यांनी जे विचार आपल्यासमोर ठेवले त्या विचारांवर चालण्याचे काम आपल्याला करावयाचे आहे.
ते म्हणाले, दहा गुरूंची परंपरा खूप महान आहे. आपल्या गुरूंनी नुसते विचार दिले नसून लढण्याची हिंमत व ताकद पण आपल्याला दिली आहे. गुरु तेग बहादूर सिंग यांच्या शहादतचा 350 वे पर्व सुरू आहे. त्यांना आजही "हिंद की चादर" असे संबोधले जाते. त्यांनी काश्मिरी पंडितांची जुलुमातून सुटका करण्यासाठी लढा दिला. गुरुगोविंद सिंग यांनी हा वारसा पुढे चालविला.
श्री.फडणवीस म्हणाले की,गुरु पुरव पर्वात महाराष्ट्र सरकार सामील होईल. शासनाच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. गुरूंची गाथा जनसामान्य माणसांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. पंजाब साहित्य अकॅडमीची पुनर्निर्मिती करण्यात आली आहे. या माध्यमातून त्यांचे विचार जनसामान्य माणसांपर्यंत पोहोचविण्यास मदत होईल. अकरा लोकांची कमिटी स्थापन करण्यात आली असून या कमिटीच्या माध्यमातून संवाद साधला जातो. समाजासाठी आवश्यक बाबींची माहिती या कमिटीच्या मार्फत शासनास कळविली जाते. निर्वासित लोक, प्रार्थना स्थळे यांना जागा देण्यात येणार आहे. मदरसे यांना ज्याप्रमाणे मदत केली जाते त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना शासनाकडून मदत करण्यात येणार आहे.
यावेळी आयोजक आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मुख्यमंत्री महोदयांचा विशेष सत्कारही करण्यात आला.

11/04/2025

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when News Wadi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share