ABS News Marathi

  • Home
  • ABS News Marathi

ABS News Marathi जनतेचे न्युज चॅनेल
बातम्यां व जाहिराती साठी संपर्क - 7756878108

अर्धवेळ आरोग्य स्त्री परिचर नागपूर हिवाळी अधिवेशनावरील मोर्चा सहभागी; दिवसाला शंभर रुपये एवढ्या अवघ्या वेतनावर काम कसे क...
13/12/2025

अर्धवेळ आरोग्य स्त्री परिचर नागपूर हिवाळी अधिवेशनावरील मोर्चा सहभागी; दिवसाला शंभर रुपये एवढ्या अवघ्या वेतनावर काम कसे करायचे? असा तीव्र प्रश्न या महिलांनी उपस्थित केला आहे.

बार्शी - प्रतिनिधी - आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते अंशकालीन अर्धवेळ आरोग्य स्त्री परिचर कृती समितीच्या वतीने दिनांक 10 डिसेंबर 2025 वार बुधवार रोजी राज्य शासनाविरोधात नागपूर विधानसभा हिवाळी अधिवेशनावर काढण्यात आलेल्या विराट मोर्चात सोलापूर जिल्ह्यातील अर्धवेळ आरोग्य स्त्री परिचर मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. जिल्हाध्यक्ष कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे व सचिव कॉम्रेड डॉ. प्रवीण मस्तुद यांच्या नेतृत्वाखाली त्या नागपूरला गेल्या होत्या.

नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये अर्धवेळ आरोग्य स्त्री परिचर कडाक्याच्या थंडीमध्ये रात्रभर मुक्कामी राहिल्या. काढण्यात आलेला मोर्चा धरणे आंदोलनात रूपांतरित होऊन दोन दिवस मुक्कामी राहिला. दिवसाला शंभर रुपये एवढ्या अवघ्या वेतनावर काम कसे करायचे? असा तीव्र प्रश्न या महिलांनी उपस्थित केला आहे. आरोग्यमंत्री यांची शिष्टमंडळाला भेट झाल्याशिवाय मोर्चा माघारी घेणार नाही अशी भूमिका घेऊन त्यांनी आंदोलन केले. अखेर राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर व राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी शिष्टमंडळाला भेट दिली; व मुंबईमध्ये बैठक लावू व मागण्या सकारात्मक पद्धतीने सोडवू असे आश्वासन दिल्यानंतर मोर्चा स्थगित करण्यात आला. शिष्टमंडळात राज्याध्यक्ष कॉ. राजू देसले, आयटक राज्य सरचिटणीस कॉ. श्याम काळे, कॉ. विनोद झोडगे, कॉ. दिलीप उटाणे कॉ. मुगाची बुरुड आदींचा समावेश होता.

अर्धवेळ आरोग्य स्त्री परिचय यांना राज्य सरकारचे मासिक 2900 तर केंद्र सरकारकडून शंभर रुपये असे एकत्रित तीन हजार रुपये वेतन आहे. आरोग्य खात्याचे आयुक्त व संचालक यांनी पगारवाढीची शिफारस करून देखील त्यांची पगार वाढ गेली 5 वर्षे झालेली नाही. इतक्या अल्प वेतनामध्ये त्यांचे जगणे शक्य नसल्याने त्यांचे वेतन 21 हजार रुपये करावे ही मुख्य मागणी घेऊन या मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. अर्धवेळ आरोग्य स्त्री परिचरांना जिल्हा परिषदांच्या त्यांच्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे वर्ग ३ व ४ च्या पदावर सामावून घ्यावे, त्यांना केवळ स्त्री परिचर असे संबोधून पूर्णवेळ करण्यात यावे. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वार्षिक अर्जित रजा, किरकोळ रजा, वैद्यकीय रजा व राष्ट्रीय सणाच्या सुट्टया देण्यात याव्या, सेवानिवृत्तीनंतर त्यांना सामाजिक सुरक्षिततेचे सर्व लाभ देण्यात यावे तसेच ग्रॅच्यूईटी व पेन्शन लागू करण्यात यावी, प्रसुती रजा व भाऊबीज भेट अंगणवाडी कर्मचाऱ्यांप्रमाणे मिळावी, दरवर्षी दोन गणवेश, सेवानिवृत्तीचे वय ६५ वर्षे पुर्ववत ठेवण्यात यावे, बायोमेट्रीक हजेरीची सक्ती बंद करण्यात यावी, त्यासोबतच सरकार कामगार कायद्यांची मोडतोड करून चार श्रम संहिता लागू करत आहे त्यामुळे कष्टकरी वर्गाचे जीवन उध्वस्त होणार आहे व भांडवलदार पैसेवाल्या वर्गाला शोषण करण्याची मुभा मिळणार आहे ह्या चार श्रमसंहिता मागे घ्याव्या अशा मागण्या नागपूर हिवाळी विधिमंडळ अधिवेशनावर करण्यात आलेल्या मोर्चामध्ये मागण्या करण्यात आल्या होत्या.

*साताऱ्यात माणुसकीचा झरा — उत्तर प्रदेशातील तरुणावर खिदमत-ए-खलककडून हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार* सातारा | प्रतिनिधीउत्तर...
13/12/2025

*साताऱ्यात माणुसकीचा झरा — उत्तर प्रदेशातील तरुणावर खिदमत-ए-खलककडून हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार*

सातारा | प्रतिनिधी

उत्तर प्रदेशातील रामपूर मऊ येथील विकास भारद्वाज वय अंदाजे ३९ वर्षे हा तरुण कामाच्या शोधात सातारा येथे आला होता. वैयक्तिक कारणांमुळे त्याने दिनांक १२ डिसेंबर रोजी आत्महत्या केली. दुसऱ्या दिवशी १३ डिसेंबर रोजी त्याचे नातेवाईक सातारा येथे पोहोचले. मात्र अचानक घडलेल्या या दु:खद घटनेमुळे आणि आर्थिक व अन्य अडचणींमुळे मृत विकास भारद्वाज यांचे हिंदू धर्माप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यासाठी आवश्यक साहित्य त्यांच्याजवळ उपलब्ध नव्हते.
या परिस्थितीत नातेवाईकांनी सातारा पोलिसांकडे मदतीची विनंती केली. नेहमीप्रमाणे माणुसकीच्या भावनेतून तत्पर असलेल्या सातारा पोलिसांनी खिदमत-ए-खलक या सामाजिक संस्थेशी संपर्क साधला.
संस्थेचे अध्यक्ष सादिकभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष अब्दुल सुतार, आरिफ खान, हाफिज मुराद आसिफ खान, तसेच शाहरुख शेख, मुस्तफा बागवान व इतर स्वयंसेवकांनी पोलिस प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करून माहुली येथील घाटावर विकास भारद्वाज यांचे हिंदू धर्माच्या विधीप्रमाणे अंत्यसंस्कार पूर्णत्वास नेले.
या प्रसंगी मृत विकास भारद्वाज यांचे बंधू विनोद भारद्वाज व अन्य नातेवाईकांनी अश्रूंनी डोळे भरून आपल्या लाडक्या विकासला अखेरचा निरोप दिला. मात्र उत्तर प्रदेशातून साताऱ्यात येऊन भावाच्या मृतदेहावर परधर्मीय स्वयंसेवकांनी अत्यंत आपुलकीने व माणुसकीच्या भावनेतून केलेले हे कार्य पाहून नातेवाईकांचे डोळे पाणावले.
त्यांच्या मुखातून एकच वाक्य भावूकपणे बाहेर पडले —
“हमे हमारे प्यारे ने बताकर गया कि इन्सानियत आज भी जिंदा है.”
धर्म, भाषा व प्रांत यांच्या पलीकडे जाऊन माणुसकीचे दर्शन घडवणाऱ्या या घटनेमुळे साताऱ्यात खिदमत-ए-खलक संस्थेच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सन २०२४-२५ राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर : भारुड विधीनाट्य विभागात भारुडसम्राट हमीद अमीन सय्यद यांचा सन्मानमुंबई, 28 न...
28/11/2025

सन २०२४-२५ राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर : भारुड विधीनाट्य विभागात भारुडसम्राट हमीद अमीन सय्यद यांचा सन्मान

मुंबई, 28 नोव्हेंबर – महाराष्ट्र राज्याच्या कला, संस्कृती, लोकपरंपरा आणि वारसा जपणाऱ्या मान्यवर कलावंतांना दिले जाणारे राज्य सांस्कृतिक पुरस्कार २०२४-२५ घोषित झाले. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी ही घोषणा केली.

या प्रतिष्ठित पुरस्कारांमध्ये यंदा भारुड/विधीनाट्य/गौळण या विभागातून भारुडसम्राट हमीद अमीन सय्यद (2024) यांची निवड झाली असून, त्यांच्या दीर्घ कलासेवेला आणि लोककलेतील बहुमोल योगदानाला राज्य मान्यता मिळाली आहे.

भारुड या लोककलेच्या माध्यमातून सामाजिक भान, अध्यात्मिकता आणि रसिकांचे मनोरंजन यांचा सुंदर संगम साधणाऱ्या हमीद अमीन सय्यद यांनी अनेक दशके आपल्या अनोख्या शैलीने सभोवतालचा समाज जागृत ठेवला आहे. पारंपरिक भारुड सादरीकरणास आधुनिक भावार्थ देत, लोकसंस्कृतीचे जतन करण्याची त्यांची तळमळ विशेष स्तुत्य आहे.

यावर्षीच्या पुरस्कारांचे स्वरूप –

ज्येष्ठ पुरस्कार : ₹३,००,०००, मानचिन्ह, शाल, सन्मानपत्र

युवा पुरस्कार : ₹१,००,०००, मानचिन्ह, शाल, सन्मानपत्र

ही पुरस्कारवितरण सोहळा लवकरच मुंबईत दिमाखात पार पडणार आहे.

सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी तसेच सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सर्व पुरस्कारार्थींचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

*नाळे प्लॉटमध्ये जिओ नेटवर्क ठप्प; नागरिकांमध्ये तीव्र नाराजी* बार्शी – शहरातील नाळे प्लॉट परिसरामध्ये जिओ नेटवर्कच्या ग...
27/11/2025

*नाळे प्लॉटमध्ये जिओ नेटवर्क ठप्प; नागरिकांमध्ये तीव्र नाराजी*

बार्शी – शहरातील नाळे प्लॉट परिसरामध्ये जिओ नेटवर्कच्या गंभीर समस्यांमुळे नागरिकांना दिवसेंदिवस मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वारंवार कॉल ड्रॉप होणे, इंटरनेटचा वेग कमी होणे, अचानक नेटवर्क गायब होणे, अशा तक्रारींमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

नागरिकांनी जिओच्या ग्राहक सेवा अधिकाऱ्यांना अनेक वेळा दूरध्वनीद्वारे संपर्क, तसेच स्थानिक जिओ कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन तक्रारी नोंदवल्या तरीही संबंधितांकडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नाळे प्लॉट हा बार्शी शहरातील दाट लोकवस्तीचा परिसर असून येथे व्यवसायिक व्यवहार, ऑनलाइन पेमेंट्स, विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण, आपत्कालीन सेवांशी संपर्क यांसाठी मजबूत नेटवर्क सेवा अत्यंत आवश्यक आहे. मात्र नेटवर्कच्या सद्यस्थितीमुळे नागरिकांचे दैनंदिन कामकाज विस्कळीत होत आहे.

नागरिकांनी जिओ कंपनीकडे तत्काळ नेटवर्क सुधारणा, नवीन टॉवर उभारणी अथवा तांत्रिक समस्या दूर करण्याची मागणी केली आहे. तसेच या समस्येबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनीही पुढाकार घेऊन संबंधित कंपनीला नोटीस देऊन तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.

“मशालच्या प्रकाशात बार्शी प्रभाग 13 सज्ज – शिवसेना उमेदवारांच्या सभेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!”प्रतिनिधी - बार्शी...
26/11/2025

“मशालच्या प्रकाशात बार्शी प्रभाग 13 सज्ज – शिवसेना उमेदवारांच्या सभेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!”

प्रतिनिधी - बार्शी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 संदर्भात प्रभाग क्रमांक 13 मधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार शाईनबानो इमाम लांडगे व एजाज कदीर शेख यांच्या भव्य प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेला आमदार दिलीप सोपल यांनी विशेष उपस्थिती दर्शवली.

या कार्यक्रमाला युवा नेते आयर्न सोपल, नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार सौ. निर्मलाताई विश्वासभाऊ बारबोले, तसेच पक्षाचे इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभागातील मतदारांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत सभेला मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली.

सभेमध्ये मार्गदर्शन करताना मान्यवरांनी प्रभाग क्रमांक 13 मधील दोन्ही उमेदवारांना मशाल या चिन्हावर भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. प्रभागासाठी विकास, सुविधा व सर्वसमावेशक कामे करण्यास हे दोन्ही उमेदवार कटिबद्ध असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

सध्या उमेदवारांच्या घरभेटी व प्रचार कार्यक्रमांना मतदारांचा उत्साहपूर्ण आणि सक्रिय प्रतिसाद मिळत असून प्रभागात अत्यंत सकारात्मक वातावरण दिसून येत आहे.

#बार्शी #बार्शी_नगरपरिषद

तर शेतकरी कारखानदारांच्या गाड्या पेटवतील...शंकर गायकवाडवैराग (प्रतिनिधी) दि. 29 नोव्हेंबर,           मागील दहा वर्षांमध्...
19/11/2025

तर शेतकरी कारखानदारांच्या गाड्या पेटवतील...शंकर गायकवाड

वैराग (प्रतिनिधी) दि. 29 नोव्हेंबर,
मागील दहा वर्षांमध्ये ऊस उत्पादन खर्चामध्ये चौपटीने वाढ झाली परंतु ऊसाचा दर मात्र अद्यापही तोच रेंगाळत पडलेला असून, सिझन चालू होऊन वीस दिवस होत आले तरी सुद्धा कुठलाच साखर कारखानदार ऊस दर जाहीर करत नाही, त्यामुळे बार्शी तालुक्यातील जवळगाव दोन येथे शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांचे नेतृत्वाखाली ऊस उत्पादकांची बैठक पार पडली. यावेळी गायकवाड म्हणाले की, राज्यातील गुळपावडर तयार करणाऱ्या कारखान्यांसह साखर कारखानदार गाळप सुरू होऊन महिना होत आला तरी अद्यापही ऊस दर जाहीर न करता ऊसाची कमी दरात लूट करू लागलेले आहेत, आणि सरकारला तक्रारी देऊन सुद्धा कारवाई होत नाही, मग कारखानदार हे काय सरकारचे बाप लागतात का? असा सवाल उपस्थित करत, शेतकरी आता वैतागला असून ऊसाला कमी दर देणाऱ्या कारखानदारांच्या गाड्या पेटवतील असा गंभीर इशाराही यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना शंकर गायकवाड यांनी दिला. बैठकीनंतर लागलीच विविध कारखान्यावरती दिनांक 23 नोव्हेंबर पासून आंदोलने करणार असल्याची निवेदने सुद्धा देण्यात आली. त्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हनुमंत कापसे, कांदा उत्पादक संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन कापसे, दयानंद ढेंगळे, प्रदीप पाटील, आबासाहेब डिसले, किसन डिसले, सत्यवान भोसले, राजाभाऊ कापसे, शहाजी कापसे, बळीराम कापसे, दयानंद वीर आदींसह पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते.

घटस्फोटीत किंवा विधवा महिला यांनी आपली लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्यासाठी आपल्या गावातील अंगणवाडी सेविका यांच्याशी सं...
19/11/2025

घटस्फोटीत किंवा विधवा महिला यांनी आपली लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्यासाठी आपल्या गावातील अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधावा.

18/11/2025

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना e-KYC मुदतवाढ!

माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबवली जात आहे. याबाबत दिनांक १८ नोव्हेंबर २०२५ पूर्वी सर्व लाभार्थ्यांनी e-KYC प्रक्रिया करावी अशा सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या.

परंतु, गेल्या काही दिवसांत आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणींमुळे, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील अनेक पात्र भगिनींना e-KYC प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही, याची मला पूर्ण कल्पना आहे. या अडचणींची गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

लाडकी बहीण योजनेच्या e-KYC करण्याची अंतिम मुदत आता ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे. त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे e-kyc करावे व त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा मा. न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे.

या निर्णयामुळे योजनेच्या लाभाची सातत्यता आणि अखंडितता कायम राहणार आहे. ज्या भगिनींनी अद्याप e-KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांना विनंती आहे की त्यांनी या विस्तारित मुदतीचा लाभ घेत ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी.

11/11/2025

सिनेअभिनेते धर्मेंद्र यांची पत्नी हेमा मालिनी ह्या माझा पती जिवंत असून ते उपचाराला प्रतिसाद देत आहेत ,असं सांगत असताना मीडिया मात्र धर्मेंद्रचे निधन अशा बातम्या चालवत आहे.
#धर्मेंद्र

       #बार्शी
10/11/2025

#बार्शी

02/11/2025

बार्शी प्रतिनिधी: रविराज_साबळे_पाटील यांच्या वक्तव्यावरून ताडसौंदणे येथील #दत्तात्रय_पाटील यांची बार्शी तालुका पोलीस स्टेशन येथे तक्रार; भा.न्या.सं. 356(2) अंतर्गत तपास सुरू”

रविराज साबळे पाटील याच्या वरती शिक्षक वर्गाचा अपमान केल्याबद्दल बार्शी तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल...

मौजे ताडसौंदणे येथील दत्तात्रय सुरेश पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सोशल मीडियावर “रविराज साबळे पाटील” या नावाने फेसबुक अकाऊंटवरून एक रील पोस्ट करण्यात आली होती. त्या रीलमध्ये “मास्तरड्या तुला शेतीमधल्या वांगाचं तरी कळतं का?” असा अपमानास्पद शब्दप्रयोग करण्यात आला.

या वक्तव्यामुळे शिक्षक बांधवांच्या भावना दुखावल्या, तसेच फिर्यादी व स्थानिक समाजात अस्वस्थता निर्माण झाली. त्यामुळे फिर्यादी दत्तात्रय पाटील यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

या तक्रारीवरून अदखलपात्र अहवाल क्र. 794/2025 नोंद झाला असून, भा.न्या.सं. 2023 कलम 356(2) (मानहानी संबंधी कलम) नुसार पुढील कार्यवाही सुरू आहे.

फिर्यादीस न्यायालयात दाद मागण्याची समज देण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल बोबडे करत आहेत.

सदर कारवाई संविधानातील कलम 19(2) व 21 नुसार — व्यक्तीच्या सन्मान, प्रतिष्ठा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मर्यादा जपण्यासाठी करण्यात आली आहे.

ओरिएंटल पिकविमा कंपनी व कृषी आयुक्तालयात मुक्काम आंदोलन सुरूपुणे/बार्शी - अतिवृष्टी बाधितांना वाढीव नुकसान भरपाई द्या, प...
15/10/2025

ओरिएंटल पिकविमा कंपनी व कृषी आयुक्तालयात मुक्काम आंदोलन सुरू

पुणे/बार्शी - अतिवृष्टी बाधितांना वाढीव नुकसान भरपाई द्या, पोटखराब, सामूहिक क्षेत्र अशा व इतर चुकीच्या त्रुटी काढून वगळलेले तसेच २०२३ व २०२४ मध्ये खरीप व रब्बीतील राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांचा पिकविमा द्या या मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथील ओरिएंटल विमा कंपनीचे वाकडेवाडी येथील राज्यस्तरीय कार्यालयात तसेच कृषी आयुक्तालय पुणे यांचे कार्यालयात एक ऑक्टोबर रोजी बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले होते, त्यानंतर दहा दिवसात मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन मिळाले होते परंतु अतिवृष्टीची वाढीव नुकसान भरपाई व पोट खराब आणि सामूहिक क्षेत्राच्या नावाखाली वगळलेल्या शेतकऱ्यांना पिकविमा देण्याचे निर्णय झाले असले तरी, सन 2023 व 2024 च्या खरीप आणि रब्बीच्या पिकविम्या पासून अजूनही महाराष्ट्रातील अनेक शेतकरी वंचित असल्याचे फोन येऊ लागल्यामुळे कालपासून पुन्हा पिकविमा कंपनी कार्यालय व आयुक्त कार्यालयात ठिय्या व मुक्काम आंदोलन सुरू झाले असून मागण्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत या ठिकाणाहून हलणार नसून यामध्ये पोलिसांचा अडथळा आल्यास मंत्रालय, कृषीमंत्री किंवा मुख्यमंत्री यांचे कार्यालय व घरावर आंदोलन करणार असल्याचा खणखणीत इशारा शंकर गायकवाड यांनी यावेळेस आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिला, त्यावेळी महादेव काशीद, दिलीप चव्हाण, शरद भालेकर, सुशांत गव्हाणे, दिलीप आगलावे, अविराज आगलावे, सुजित आगलावे, रविकांत पाटील, अक्षय उंबरे, वैजनाथ शिंदे, गंगाधर जाधव, दयानंद गंभीरे, दिगंबर शेळके, दत्तात्र्य अंबुरे, आनंद नलवडे, समाधान जाधव, हनुमंत जगताप, तानाजी माळी, ब्रह्मदेव अंबुरे, राहुल हंगरकर, मुकुंद जाधव, शरद कोंढारे, अनिकेत पाटील, समाधान पाटील, दशरथ भंडारे, विशाल शेळके, अमर शेळके, राहुल गोरे आदींसह बहुसंख्य शेतकरी आंदोलनात सामील झालेले आहेत.
वाकडेवाडी येथील विमा कंपनी कार्यालयात सुरू असलेल्या आंदोलनाचा खडकी पोलीस स्टेशनच्या वतीने तर आयुक्तालयात सुरू असलेल्या आंदोलनाचा बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Address


413401

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ABS News Marathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to ABS News Marathi:

  • Want your business to be the top-listed Media Company?

Share