माझं नगर MAZA NAGAR

माझं नगर MAZA NAGAR राजकारण, समाजकारण,औद्योगिक क्षेत्र , खेळ , मनोरंजन आणि विविध ताज्या बातम्यांसाठी

जळणारी लोक काहीच करु शकत नाही -  नामदेव शास्त्री Ahilyanagar Update’s अहिल्यानगर अपडेट्स Ahilyanagar Mahakarandak
25/06/2025

जळणारी लोक काहीच करु शकत नाही - नामदेव शास्त्री Ahilyanagar Update’s अहिल्यानगर अपडेट्स Ahilyanagar Mahakarandak

जळणारी लोक काहीच करू शकत नाहीत!" | नामदेव शास्त्री | पंढरपूर वारी २०२५"जळणारी लोक काहीच करू शकत नाहीत!"नामदेव शास्त्.....

नगरचं सगळ्यात जुने तांबाखूचं दुकान
23/06/2025

नगरचं सगळ्यात जुने तांबाखूचं दुकान

नगरचं सगळ्यात जुने तांबाखूचं दुकान | J.S. Renavikar Tambakhuwala | Ahilyanagar Nagarनगरमधील सर्वात जुने आणि विश्वासार्ह तांबाखू दुकान – J.S. रेन.....

  Crime News : आरोपींवर कठोर कारवाई करा; आरपीआयची जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे मागणीअहमदनगर: पारनेर तालुक्यातील एका गावातील...
13/06/2024

Crime News : आरोपींवर कठोर कारवाई करा; आरपीआयची जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे मागणी

अहमदनगर: पारनेर तालुक्यातील एका गावातील दलित समाजातील महिलेला खासदार नीलेश लंके यांच्या समर्थकांनी घरात जाऊन केलेल्या मारहाणीची व अत्याचाराची घटना अतिशय गंभीर आहे. या गुन्ह्यातील आरोपीना जामीन होणार नाही, अशा पध्दतीची कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे करण्यात आली.
आरपीआयच्या जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिलांच्या शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, नगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष संजय भैलुमे, युवा जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे, पारनेरचे तालुका अध्यक्ष राजू उबाळे, श्रीगोंद्याचे राजा जगताप, पाथर्डीचे तालुका अध्यक्ष बाबा राजगुरू, राहाता तालुकाध्यक्ष करण कोळगे आदी उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, पारनेर तालुक्यातील एका गावात खासदार नीलेश लंके यांचे समर्थक राहुल झावरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ६ जून २०२४ रोजी लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार डाॅ. सुजय विखे यांचा प्रचार केल्याच्या रागातून विखे समर्थकास मारहाण केली.
पत्नी तसेच आईला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. महिलेशी गैरवर्तन केले. सदर महिलेला पोलिस ठाण्यात जाता येऊ नये, असे दहशतीचे वातावरण निर्माण केले. या घटनेमुळे पीडित कुटुंबीय अजूनही भीतीच्या सावटाखाली आहे. राजकीय वैमनस्यातून अशा प्रकारचे घडलेले कृत्य अतिशय निंदनीय असून, त्याची गंभीर दखल पोलिस प्रशासनाने घेऊन यामधील सर्व आरोपींवर कठोर कारवाई करावी.

मंत्री रामदास आठवले भेट घेणार
आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. त्यांनीही घटनेसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. लवकरच पीडित कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी मंत्री आठवले पारनेरला येणार आहेत.

जुन्या मीटरची जागा महावितरणचं नवं प्रीपेड स्मार्ट मीटर घेणारअहमदनगरः महावितरणचे सध्याचे विद्यूत मीटर कालबाह्य होणार आहेत...
13/06/2024

जुन्या मीटरची जागा महावितरणचं नवं प्रीपेड स्मार्ट मीटर घेणार

अहमदनगरः महावितरणचे सध्याचे विद्यूत मीटर कालबाह्य होणार आहेत. जुन्या पारंपारिक मीटरची जागा प्रीपेड स्मार्ट मीटर घेणार आहे. राज्यभरात २ कोटी ४१ लाख ग्राहकांचे, तर अहमदनगर जिल्ह्यातील ६ लाख ३६ हजार १९२ ग्राहकांचे विद्युत मीटर बदलणार आहेत. येत्या तीन-चार महिन्यांत जिल्ह्यातील मीटर बदलण्याची मोहीम सुरू होईल.
जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसविण्यासाठी ७९७.३८ कोटींच्या खर्चाची निविदा प्रक्रिया होऊन नागार्जुन कन्स्ट्रक्शन लिमिटेड यांना ७ ऑगस्ट २०२३ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आले आहे. कामाचा कालावधी २७ महिन्यांचा आहे.
शेतीचे वीजग्राहक वगळता घरगुती, व्यापारी, औद्योगिक वीजग्राहकांसह फीडर व रोहित्रांवर सुध्दा स्मार्ट मीटर बसविले जाणार आहेत. त्यादृष्टीने ठेकेदाराने फीडर व रोहित्रांचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. स्मार्ट मीटर बसविल्यावर वीजग्राहकांना मोबाईल फोनप्रमाने विजेसाठी पैसे भरावे लागतील. किती वीज वापरली, किती रक्कम शिल्लक आहे. याची माहिती ग्राहकांना मोबाईलवर मिळेल, त्यामुळे आर्थिक नियोजनानुसार वीज वापर करायचा हे सुद्धा ग्राहकांना समजणार आहे. सध्याच्या पध्दतीत मीटर रिडिंग घेऊन मोठे बिल आल्यावर ग्राहकांचे गणित बिघडते.
स्मार्ट मीटरमुळे वीज वापरावर ग्राहकांना नियंत्रण ठेवणे सोपे होणार आहे. ग्राहकांना घरबसल्या मोबाईलवरून ऑनलाईन स्मार्ट मीटरवर पैसे भरण्याची सुविधा आहे. पैसे संपत आल्यावर दोन दिवस अगोदर मोबाईलवर संदेश मिळणार आहे.
पैसे संपले तर सायंकाळी सहा ते सकाळी दहापर्यंत वीज पुरवठा चालू राहिल. त्यामुळे मध्यरात्री अचानक वीज बंद होण्याचा धोका नाही. संबंधित ग्राहकाने सकाळी दहापर्यंत पैसे भरून वीज पुरवठा चालू ठेवायचा आहे.
त्यातून पैसे संपल्यानंतर वापरलेल्या विजेचे पैसे वजा होणार आहेत. स्मार्ट मीटरचे नियंत्रण महावितरणच्या नजीकच्या कक्ष कार्यालयात असणार आहे. त्यामुळे मीटरमध्ये छेडछाड करणे ग्राहकांना शक्य होणार आहे.
फिडर व रोहित्र यांच्यावरही स्मार्ट मीटर बसविले जाणार आहेत. त्यामुळे वीज गळतीचा प्रश्न निकाली निघणार आहे. आकडे टाकून वीजचोरी बंद होणार आहे. ग्राहकांना नवे प्रीपेड मीटर मोफत मिळणार आहे.
मीटरचा खर्च केंद्र सरकारकडून मिळालेल्या अनुदानातून व महावितरणतर्फे केला जाणार आहे.

जिल्ह्यात स्मार्ट मीटरची संख्या
६,३६,१९२ ग्राहकांना स्मार्ट मीटर
२७,०४४ वितरण रोहित्रांना
१,७९९ फिडरला
६,६५,०३५ एकूण स्मार्ट मीटर
त्यामुळे रिडिंग घेणे, बिल तयार करून ग्राहकांना पोहोचविणे, थकीत वीजबिल वसुली करणे अशी कामे कमी होणार आहेत. मनुष्यबळाचा वापर ग्राहकांना जलद व चांगली सुविधा देण्यासाठी होईल.

रिश्वत मत लेना, गब्बर आ जायेगा! संभाजीनगरमध्ये पत्राने खळबळ; राजकीय नत्यांसह पोलिसांच्या हात्याकांडाची धमकीछत्रपती संभाज...
13/06/2024

रिश्वत मत लेना, गब्बर आ जायेगा! संभाजीनगरमध्ये पत्राने खळबळ; राजकीय नत्यांसह पोलिसांच्या हात्याकांडाची धमकी

छत्रपती संभाजीनगरः पोलिस महासंचालक कार्यालयाच्या नावाने निनावी पाठवण्यात आलेल्या एका पत्राने सोशल मीडियावर खळबळ माजली. 'गब्बर' असे टोपणनाव लिहिलेल्या या व्यक्तीने बिडकीन पोलिस ठाण्यात अराजकता माजली असल्याचा खळबळजनक आरोप केला. ही अराजकता न थांबल्यास राजकीय नेत्यांसह पोलिस अधिकाऱ्यांचे हत्याकांड करणार असल्याची धमकी या पत्रात दिली. याप्रकरणी पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया म्हणाले, "हा प्रकार आता आपल्यासमोर आला. याबाबात अधिकृत पत्र महासंचालक कार्यालयाकडून आल्यानंतर चौकशी करु," असे त्यांनी सागितले.
पोलिस महासंचालक कार्यालयाला टपालाने पाठवलेल्या या पत्रावर १७ जानेवारी २०२४ चा शिक्का आहे. हे पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीने स्वतः अर्जदार म्हणून 'कायदा आणि सुव्यवस्थेला कंटाळलेला गब्बर' असा उल्लेख केला. या पत्राचा आशय पुढीलप्रमाणेः अर्जदार हा ग्रामीण भागातील रहिवासी आहे. बिडकीन पोलिस ठाण्यात काही वर्षांत स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांमुळे हफ्तेखोरी वाढली. तसेच येथील २२ जणांचा उल्लेख केला असून, यांची परिसरात दहशत पसरली आहे. ही मंडळी राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते असल्याचा दावा केला आहे.
गोरगरिबांवर अत्याचार सुरू असून, हा प्रकार थांबला नाही. तसेच प्रामाणिक अधिकारी या भागात बसवले नाही तर मोठ्या हत्याकांड घडवून आणू आणि या हत्याकांडाची सुरवात पोलिस अधिकाऱ्यांपासृन करू. यानंतर जिल्ह्यातील कोठेही अत्याचार झाल्यास आणि आरोपी राजकीय नेत्यांचे समर्थक असतील, त्यांना जर नेते मंडळींनी वाचवण्याचा प्रयत्न केला तर आमची गँग अशा नेत्यांना ठार मारेल. आमच्या १०० जणांची टोळी आहे.
काही झाल्यास गँग बदला घेणार आहे, असा आशय या पत्राचा आहे. पत्राखाली सूचना लिहिताना ते लिहिणाऱ्याने त्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी नेते मंडळींची असून, त्याला काही झाल्यास नेते मंडळींना ठार मारण्याची धमकी पुन्हा एकदा पत्रात दिली. शिवाय यानंतर बिडकीनच्या गावगुंडाचा कुठल्याही केसमध्ये हस्तक्षेप झाला नाही पाहिजे, तसेच पत्रात नाव घेतलेल्या राजकीय गुंडांनी कायद्याच्या चौकटीत राहावे; अन्यथा त्यांचा शरद मोहोळ किंवा गजू तौर करू अशी धमकी दिली आहे.
अभिनेता अक्षयकुमारचा 'गब्बर'हा चित्रपट काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची हत्या नायक करतो, अशी या चित्रपटाची कथा आहे. या पत्रातील व्यक्तीने देखील स्वतः गब्बर असल्याचा उल्लेख करीत 'रिश्वत मत लेना, गब्बर आ जायेगा' अशी टीप पत्रात लिहिली आहे. त्यामुळे या चित्रपटाची आठवण झाली आहे.
हा प्रकार आताच आमच्या समोर आला. पत्रात उल्लेख केलेले पोलिस अधिकारी संतोष माने, गणेश सुरवसे यांची बदली पूर्वीच दुसऱ्या जिल्ह्यात झाली आहे. हे पत्र अधिकृत आम्हाला भेटल्यानंतर त्याची चौकशी करण्यात येणार आहे, असे छत्रपती संभाजीनगर ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी सांगितले आहे.

पोलिस महासंचालक कार्यालयाच्या नावाने निनावी पाठवण्यात आलेल्या एका पत्राने सोशल मीडियावर खळबळ माजली. ‘गब्बर’ असे टोपणनाव ...
13/06/2024

पोलिस महासंचालक कार्यालयाच्या नावाने निनावी पाठवण्यात आलेल्या एका पत्राने सोशल मीडियावर खळबळ माजली. ‘गब्बर’ असे टोपणनाव लिहिलेल्या या व्यक्तीने बिडकीन पोलिस ठाण्यात अराजकता माजली असल्याचा खळबळजनक आरोप केला. ही अराजकता न थांबल्यास राजकीय नेत्यांसह पोलिस अधिकाऱ्यांचे हत्याकांड करणार असल्याची धमकी या पत्रात दिली.

फायदाच फायदा! पोस्ट ऑफिसची ही योजना दर महिना देईल रु.५५५० ते रु.९२५० व्याज, सर्व खर्च भागेलआकर्षक व्याजदरांसह पोस्ट स्मॉ...
11/06/2024

फायदाच फायदा! पोस्ट ऑफिसची ही योजना दर महिना देईल रु.५५५० ते रु.९२५० व्याज, सर्व खर्च भागेल

आकर्षक व्याजदरांसह पोस्ट स्मॉल सेव्हिंग्ज स्कीम मंथली इनकम अकाउंट हा एक सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय आहे जो कोणासाठी नियमित उत्पन्नाचा स्त्रोत बनु शकतो. दर महा स्थिर उत्पन्नाच्या शोधात असलेल्यांसाठी ही योजना आर्थिक स्थैर्यासाठी एक मजबूत पर्याय ठरू शकते. विशेषतः निवृत्तीनंतर या योजनेचा लाभ घेता येईल.

१००% सुरक्षित योजना
पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम ही सरकार समर्थित अल्पबचत योजना आहे, जिथे गॅरंटीड परतावा मिळतो. पोस्ट ऑफिस योजनेमुळे ते १०० टक्के सुरक्षित आहे. एकाच खात्यासह जोडीदारासह संयुक्त खाते उघडण्याची ही सुविधा आहे.

ठेव नियम
पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेत एकाच खात्याद्वारे जास्तीत जास्त ९ लाख रुपये जमा करता येतात, तर संयुक्त खात्याद्वारे जास्तीत जास्त ठेवमर्यादा १५ लाख आहे. त्याचबरोबर खात सुरू करण्यासाठी किमान १००० रुपयांची गुंतवणूक आवश्यक असते, त्यानंतर ती १००० रुपयांच्या पटीत जमा करता येते. सयुक्त खात्यात प्रत्येक धारकाचा गुंतवणुकीत समान वाटा असतो.

खाते उघडण्याचे नियम
या योजनेत प्रौढ व्यक्ती आपल्या नावाने एकच खात उघडू शकेत, तर २ किंवा जास्तीत जास्त ३ प्रौढ मिळून संयुक्त खाते उघडू शकतात. लक्षात ठेवा संयुक्त खात्यात जास्तीत जास्त ठेवमर्यादा १५ लाख रुपये असेल. या योजनेअंतर्गत त्याचा पालक अल्पवयीन मुलाच्या नावानेही खाते सुरू करु शकतो, मात्र १० वर्षांचा अल्पवयीन असल्यास त्याच्या नावावर खाते उघडले जाईल.

हि योजना कशी काम करते?
पोस्ट ऑफिसमासिक उत्पन्न योजनेवर एप्रिल ते जून २०२४ या तिमाहीसाठी वार्षिक ७.४ टक्के व्याज दर आहे. या खात्यात जमा झालेल्या फंडावर मिळणारे वार्षिक व्याज १२ भागांमध्ये विभागले जाते आणि प्रत्येक भाग आपल्यासाठी मासिक उत्पन्न म्हणून काम करतो, जो आपण दर महिन्याला काढू शकता. या योजनेची मॅच्युरिटी ५ वर्षांची आहे, परंतु ५ वर्षानंतर नवीन व्याजदरानुसार ती वाढवली जाऊ शकते.

मासिक उत्पन्न गणित
जॉईंट खात्यातून जास्तीत जास्त गुंतवणूकः १५ लाख रुपये
व्याजदारः ७.४ टक्के वार्षिक
वार्षिक व्याजः १,११,००० रुपये
मासिक व्याजः ९२५० रुपये

सिंगल खाते असेल तर
सिंगल अकाऊंटमधून जास्तीत जास्त गुंतवणूकः ९ लाख रुपये
व्याजदारः ७.४ टक्के वार्षिक
वार्षिक व्याजः ६६,६००० रुपये
मासिक व्याजः ५५५० रुपये

मुदतपूर्व योजना बंद करण्याबाबत
१. ठेवीच्या तारखेपासून १ वर्ष पूर्ण होण्यासाठी कोणतीही ठेव काढता येणार नाही.
२. खाते उघडल्याच्या तारखेपासून १ वर्षानंतर आणि ३ वर्षापूर्वी योजना बंद केल्यास मुद्दलातून २ टक्के इतकी वजावट केली जाईल आणि उर्वरित रक्कम दिली जाईल.
३. खाते उघडल्याच्या तारखेपासून ३ वर्षांनंतर आणि ५ वर्षापूर्वी बंद केल्यास मुद्दलातून १ टक्के इतकी वजावट केली जाईल आणि उर्वरित रक्कम दिली जाईल.
४ संबंधित टपाल कार्यालयात पासबुकसह विहित अर्ज सादर करून खाते मुदतपूर्व बंद करता येईल.

Disclaimer:म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस माझं नगर जबाबदार राहणार नाही.

अभिनेता ते नेता… सिनेसृष्टीनंतर राजकीय मैदान गाजविनाऱ्या पवन कल्याणचं महाराष्ट्राचं नातं पहिल्या पत्नीला घटस्फोट देण्याआ...
10/06/2024

अभिनेता ते नेता… सिनेसृष्टीनंतर राजकीय मैदान गाजविनाऱ्या पवन कल्याणचं महाराष्ट्राचं नातं
पहिल्या पत्नीला घटस्फोट देण्याआधीच आपली सहकलाकार रेणू देसाईसोबत पवन कल्यान लिव्ह इनमध्ये राहत होते.
साऊथ इंडस्ट्रीमधील सुपरस्टार पवन कल्यानच्या जनसेवा पक्षाने आंध्र प्रदेशात अविश्वसनीय कामगिरी केली आहे. जनसेवा पक्षाने आंध्र प्रदेशात झालेल्या विधानसभा २०२४ निवडणुकीत २१ जागांवर विजय मिळवला आहे. तर लोकसभाच निवडणुकीत २ खासदार या पक्षाचे निवडुन आले आहेत. पवन कल्याण यांनी २०१४मध्ये जनसेवा पक्षाची स्थापना केली होती. अभिनेता म्हणुन पवन कल्याण यांची कारकीर्द यशस्वी राहिलीच पण आता राजकीय कारकिर्द देखील तितक्याच वेगाने बहरत आहे.
अभिनेता नेता यासोबत पवन कल्याण यांची पर्सनल लाईफ देखील तितकीच चर्चेत राहीली. ५२ वर्षीय पवन कल्याणने आतापर्यंत तीन लग्न केले आहेत. पवन कल्याण यांनी पहिल्या सिनेमानंतर नंदिनी सोबत विवाह बंधनात आडकले होते. घरच्यांच्या सांगण्यावरुन पवन कल्याण यांनी हे लग्न केलं होतं, पण त्यानंतर पहिल्या पत्नीला घटस्फोट देण्याआधीच आपली को स्टार रेणु देसाईसोबत पवन लिव्ह इनमध्ये राहत होते. यानंतर नंदिनीने कायदेशीर कारवाई देखील केली. २००७ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. पवन कल्याण यांना नंदिताला ५ कोटी रुपयांची पोटगी देखील द्यावी लागली.
नंदिनीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर रेणु आणि पवन कल्याण यांनी २००९मध्ये लग्न केलं. त्याआधी २००४मध्ये दोघांना एक मुलगा देखील होता. मात्र एवढं सगळं झाल्यानंतर अवघ्या तीन वर्षात म्हणजे २०१२ साली दोघांचा घटस्फोट झाला, त्यानंतर पवन कल्याण यांनी रशियन मॉडल अन्ना लेजनेवासोबत २०१३मध्ये लग्न केलं.

कोण आहेत रेणु देसाई?
मराठमोळी रेणु देसाई शंकर महादेवन यांच्या ब्रेथलेस गाण्यात पहिल्यांदा झळकल्या होत्या. त्यानंतर त्यांनी बद्री आणि जॉनी या सिनेमामध्ये पवन कल्याण यांचासोबत काम केलं. तसेच महाराष्ट्रात परतून त्यांनी पुन्हा मराठी सिनेसृष्टीत काम करण्यास सुरुवात केली. मंगलाष्टक वन्स मोर या मराठी सिनेमाची निर्मिती त्यांनी केली आहे.

मुंबईतील महत्त्वाकांक्षी अशा 'धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा मार्गा'वरील नरिमन पॉईंट ते हाजीआल...
10/06/2024

मुंबईतील महत्त्वाकांक्षी अशा 'धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा मार्गा'वरील नरिमन पॉईंट ते हाजीआली पर्यंतचा बोगदा आज खुला करण्यात आला. यामुळे शहरातील वाहतूक अधिक वेगवान होणार असून ४०-४५ मिनिटांचे अंतर अवघ्या ८ ते १० मिनिटात पार करता येणे शक्य होणार आहे. सागरी किनारा मार्गाच्या नरिमन पॉईंट येथून वरळी पर्यंत जाण्याऱ्या मार्गाची पाहणी करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत विंटेज गाडीतून प्रवास करत नरिमन पॉईंट ते हाजीआली पर्यंत तयार केलेल्या या बोगद्याची पाहणी केली. सध्या सव्वा सहा किलोमीटर लांबीचा हा बोगदा आजपासून सुरू करण्यात आला असून जुलै महिन्यापर्यंत नरिमन पॉईंट ते वरळी हा सागरी मार्गाचा दुसरा टप्पाही सुरू होईल.
हा बोगदा अत्यंत अद्ययावत पध्दतीने बांधण्यात आला आहे. अत्यावश्यक परिस्थितीत नियंत्रण कक्षाशी संपर्क करण्यासाठी टेलिफोन देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः या फोनवरून फोन करत नियंत्रण कक्षातून आपत्कालीन परिस्थितीत कशाप्रकारे प्रतिसाद मिळतो तेही जाणून घेतले.
यावेळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

गूगलकडून Gpay बंद करण्याचा निर्णय, हे आहे मोठं कारणज्याची भीती होती तेच Google ने केलं, बंद केलं Gpay App, भारतातील युजर...
10/06/2024

गूगलकडून Gpay बंद करण्याचा निर्णय, हे आहे मोठं कारण
ज्याची भीती होती तेच Google ने केलं, बंद केलं Gpay App, भारतातील युजर्सना वापरता येणार की नाही कंपनीने काय सांगितलं वाचा सविस्तर
ज्याची सर्वांना भीती होती अखेर तेच घडलं आहे. वापरायला सर्वात सोपं असलेलं GPay App आता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे लाखो युजर्सना मोठा फटका बसणार आहे. तुमच्या फोनमध्ये Gpay सुरू राहणार की नाही इथे लगेच चेक करा.
गुगलने ऑनलाईन पेमेंट अॅप gpay बंद केलं आहे. थांब घाबरु नका हा नियम सरसकट लागू करण्यात आला नाही. हळूहळू प्रत्येक देशात हा नियम लागू केला जात आहे. सध्या अमेरिकेत Gpay पूर्ण बंद केलं आहे.
4 जूनपासून प्ले स्टोरवरुन Gpay App हटवण्यात आलं आहे. असं करण्यामागे कंपनीने कारणही सांगितलं आहे. त्यामुळे आता लोकांना Gpay वापरता येणार नाही. भारतात सध्या Gpay सुरू राहणार आहे. मात्र लवकरच भारतातही असे बदल होऊ शकतात अशी चर्चा सुरू झाली आहे.
कंपनीने हा निर्णय गूगल वॉलेटला प्रमोट करण्यासाठी केल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आता Gpay ऐवजी गूगल वॉलेट वापरण्याचा सल्ला युजर्सना दिला जात आहे.
गूगलने 2011 मध्ये गुगल वॉलेट लाँच केलं होतं. Gpay सेवा युजर्स गुगल वॉलेटच्या माध्यमातून वापरू शकणार आहेत.
अमेरिकते Gpay पूर्ण बंद करण्यात आलं आहे. यावरुन कोणालाही पैसे पाठवता येणार नाहीत किंवा कोणाकडून पैसे घेताही येणार नाहीत. अनेक युजर्सना हे माहिती नसल्याने गोंधळ उडाला आहे.
भारतात सध्यातरी Gpay सुरू आहे. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. मात्र येत्या काळात गूगल वॉलेट सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतात Gpay गुगल वॉलेटसोबत सुरू राहणार की आणखी काही निर्णय घेतला जाणार याकडे लक्ष आहे.

09/06/2024

लोकसभेत एकही जागा न लढवता सलग तिसऱ्यांदा रामदास आठवले केंद्रात मंत्री झाले.

लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये एडीएला सलग तिसऱ्यांदा विजयश्री मिळाल्यानंतर, देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीत, पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताचे नवे सरकार स्थापन झालं. नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. यानंतर ते, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर पंतप्रधान पदाची हॅट्ट्रिक करणारे दुसरे पंतप्रधान ठरले.

09/06/2024

सशक्त भारताचे कणखर नेतृत्व मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची आज शपथ घेतली. याबद्दल आदरणीय मोदीजींचे अभिनंदन. मा. श्री. नरेंद्र मोदींजींच्या रूपाने देशाला पुन्हा एकदा सक्षम नेतृत्व प्राप्त झाले. मा.श्री. मोदीजींच्या नेतृत्वात गेल्या दहा वर्षांपासून विकसित भारताची यशस्वी घौडदौड सुरू आहे आणि ती अशीच निरंतर राहील, असा तमाम देशवासियांनी विश्वास आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्रीपदी नियुक्त झालेल्या सर्व मंत्री महोदयांचे खूप खूप अभिनंदन. देशाच्या आणि जनतेच्या विकासासाठी आपण मोलाची भूमिका बजावाल, असा विश्वास आहे. सर्व मंत्री महोदयांना आगामी कारकिर्दीसाठी शुभेच्छा..!!

Address

Suryanagar
Ahmednagar
414001

Alerts

Be the first to know and let us send you an email when माझं नगर MAZA NAGAR posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share