Kokannama

Kokannama कोकणनामा हे लोकप्रिय वृत्तपत्र आहे, त?

सा. कोकणनामा
18/09/2025

सा. कोकणनामा

साप्ताहिक कोकणनामा
11/09/2025

साप्ताहिक कोकणनामा

चाकरमानी की कोकणवासी? विकासाचं बोला-उमाजी म. केळुसकर / दादागिरी    कोकण हा महाराष्ट्राचा रत्नजडित प्रदेश. निसर्गसंपन्नता...
27/08/2025

चाकरमानी की कोकणवासी? विकासाचं बोला
-उमाजी म. केळुसकर / दादागिरी
कोकण हा महाराष्ट्राचा रत्नजडित प्रदेश. निसर्गसंपन्नता, समुद्रकिनारे, सुपीक शेती, सांस्कृतिक वारसा आणि परंपरा यामुळे कोकणाची ओळख नेहमीच वेगळी राहिली आहे. मात्र रोजगार, शिक्षण आणि व्यवसायाच्या संधींच्या अभावामुळे गेल्या अनेक दशकांपासून कोकणातील लाखो नागरिक मुंबई, पुणे आणि देशभरातील तसेच परदेशातील शहरांमध्ये स्थायिक झाले. या स्थलांतरितांना खुद्द कोकणातले लोकच प्रेमाने ‌‘चाकरमानी‌’ असे संबोधन वापरतात. हा शब्द केवळ संबोधनापुरता नसून तो एका ऐतिहासिक स्थलांतर संस्कृतीचा भाग बनला होता. आता मात्र या शब्दावरून विवाद निर्माण झाला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे की सरकारी कागदपत्रांमधून ‌‘चाकरमानी‌’ हा शब्द काढून ‌‘कोकणवासी‌’ असा वापर केला जाईल. पण खरी गोष्ट एवढीच आहे का? की हा फक्त शब्दांवरची उठाठेव आहे?
(संपूर्ण लेख वाचण्यासाठी सोबतची लिंक ओपन करा. लेख आवडल्यास लाईक करा, प्रतिक्रिया द्या, लेखाची लिंक शेअर करा.)

कोकण हा महाराष्ट्राचा रत्नजडित प्रदेश. निसर्गसंपन्नता, समुद्रकिनारे, सुपीक शेती, सांस्कृतिक वारसा आणि परंपरा या....

रायगड जिल्हा परिषदेतील लाचखोरीचा नवा चेहरा-उमाजी म. केळुसकर / दादागिरी       रायगड जिल्हा परिषदेतील गेल्या दोन दशकांत भ्...
27/08/2025

रायगड जिल्हा परिषदेतील लाचखोरीचा नवा चेहरा
-उमाजी म. केळुसकर / दादागिरी
रायगड जिल्हा परिषदेतील गेल्या दोन दशकांत भ्रष्टाचाराची असंख्य प्रकरणे उघडकीस आली आहेत. कधी लहानशा लाचखोरीत अधिकारी पकडले गेले, तर कधी कोट्यवधी रुपयांचे बिल बनावट कागदपत्रांच्या आधारे फुगवून खाल्ले गेले. पण या सर्व घटनांतून आजवर घडत आलेला पॅटर्न म्हणजे भ्रष्टाचार हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रोजच्या व्यवहाराचा अविभाज्य भाग बनला आहे. ताजा प्रकार पेण तालुक्यातील शेणे गावातील जलजीवन मिशनच्या कामाशी संबंधित २५ हजार रुपयांची लाच, हा त्याचाच आणखी एक पुरावा आहे. या घटनेत तीन जण रंगेहाथ पकडले गेले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे लाच मागणारा आणि स्वीकारणारा केवळ एक अधिकारीच नव्हता, तर ती रक्कम पुढे इतरांकडे पोहोचवली गेली. म्हणजे भ्रष्टाचार हा एक साखळी व्यवहार झाला आहे.
(संपूर्ण लेख वाचण्यासाठी सोबतची लिंक ओपन करा. लेख आवडल्यास लाईक करा, प्रतिक्रिया द्या, लेखाची लिंक शेअर करा.)

रायगड जिल्हा परिषदेतील गेल्या दोन दशकांत भ्रष्टाचाराची असंख्य प्रकरणे उघडकीस आली आहेत. कधी लहानशा लाचखोरीत अधि.....

३६ वर्षांची सेवा, सात वर्षांची वाट पाहा-उमाजी म. केळुसकर / दादागिरी      महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एस.टी.) ...
26/08/2025

३६ वर्षांची सेवा, सात वर्षांची वाट पाहा
-उमाजी म. केळुसकर / दादागिरी
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एस.टी.) ही केवळ एक वाहतूक सेवा नसून, ग्रामीण-शहरी जीवनाची धडधड आहे. रायगडसारख्या जिल्ह्यात तर एस.टी. बसेस म्हणजे लोकांचा श्वास आहे. शेतकरी, कामगार, विद्यार्थी, व्यापारी, सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या दरात आणि विश्वासार्हपणे आपल्या गावी पोहोचवण्याचे काम हे कर्मचारी वर्षानुवर्षे करत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या घामावर आणि त्यागावर एस.टी. उभी आहे. मात्र या आधारस्तंभांनाच वेळेवर पगार न मिळणे, निवृत्त झाल्यावर पेन्शनसारख्या हक्कापासून वंचित राहणे हा अन्यायकारक प्रकार त्यांच्या कष्टाची थट्टा करणारा आहे. सध्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कार्यरत कर्मचाऱ्यांना सणासुदीपूर्वी पगार देण्याचा दिलासा दिला असला तरी, निवृत्त कर्मचाऱ्यांच्या व्यथा अजून कायम आहेत. कार्यरतांचा पगार आणि निवृत्तांचा पेन्शन या दोन्ही प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर रायगडसह संपूर्ण राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांचा विश्वासच डळमळीत होईल.
(संपूर्ण लेख वाचण्यासाठी सोबतची लिंक ओपन करा. लेख आवडल्यास लाईक करा, प्रतिक्रिया द्या, लेखाची लिंक शेअर करा.)

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एस.टी.) ही केवळ एक वाहतूक सेवा नसून, ग्रामीण-शहरी जीवनाची धडधड आहे. रायगडसार....

दुर्दैवी रस्ते, दुर्लक्षित नागरिक-उमाजी म. केळुसकर / दादागिरी       प्रत्येक सभ्य समाजाच्या अस्तित्वासाठी काही अलिखित नि...
26/08/2025

दुर्दैवी रस्ते, दुर्लक्षित नागरिक
-उमाजी म. केळुसकर / दादागिरी
प्रत्येक सभ्य समाजाच्या अस्तित्वासाठी काही अलिखित नियम आणि तत्त्वे असतात. त्यातली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नागरिकांची कर्तव्ये आणि सरकारची जबाबदारी. एक सुदृढ समाज तेव्हाच उभा राहतो, जेव्हा नागरिक आपली कर्तव्ये निष्ठेने पार पाडतात आणि सरकार आपली जबाबदारी पारदर्शकपणे आणि प्रामाणिकपणे निभावते. सीटबेल्ट लावणे, हेल्मेट घालणे, वेग मर्यादेचे पालन करणे ही नागरिकांची कर्तव्ये आहेत. पण याचबरोबर, सुरक्षित आणि सुलभ प्रवासासाठी चांगले रस्ते उपलब्ध करून देणे हे सरकारचे आद्य कर्तव्य आहे. दुर्दैवाने, गणेशोत्सवासारख्या राष्ट्रीय सणाच्या पार्श्वभूमीवर, जेव्हा लाखो लोक आपल्या घराकडे परतीच्या प्रवासाला निघतात, तेव्हा या दोन्ही तत्त्वांमध्ये मोठी दरी असल्याचे विदारक चित्र समोर येते.
(संपूर्ण लेख वाचण्यासाठी सोबतची लिंक ओपन करा. लेख आवडल्यास लाईक करा, प्रतिक्रिया द्या, लेखाची लिंक शेअर करा.)

प्रत्येक सभ्य समाजाच्या अस्तित्वासाठी काही अलिखित नियम आणि तत्त्वे असतात. त्यातली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे न.....

देशाची सूत्रे जनतेच्या हाती की उद्योगपतींच्या?-उमाजी म. केळुसकर / दादागिरीदेशाचा विकास म्हणजे केवळ आर्थिक प्रगती नव्हे, ...
25/08/2025

देशाची सूत्रे जनतेच्या हाती की उद्योगपतींच्या?
-उमाजी म. केळुसकर / दादागिरी
देशाचा विकास म्हणजे केवळ आर्थिक प्रगती नव्हे, तर तो समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या आशा-आकांक्षांची पूत करणारी एक व्यापक प्रक्रिया आहे. जेव्हा आपण विकास हा शब्द उच्चारतो, तेव्हा डोळ्यासमोर मोठमोठे रस्ते, गगनचुंबी इमारती, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि परदेशी गुंतवणुकीचे आकडे उभे राहतात. यात कोणतीही शंका नाही की, उद्योजक आणि उद्योगपती या विकासाचे महत्त्वाचे घटक आहेत. त्यांच्या उद्योगांमुळे रोजगार निर्माण होतो, अर्थव्यवस्थेला गती मिळते आणि देशाचे नाव जागतिक स्तरावर चमकते. परंतु, देशाचा विकास केवळ उद्योजकांनी आणि उद्योगपतींनी करायचा असतो, हा समज चुकीचा आहे. देशाची खरी ताकद, देशाचा खरा विकास हा सामान्य जनतेच्या योगदानातूनच होतो. देश हा लोकशाहीच्या मूल्यांवर आणि संकेतांवर चालतो, आणि ही लोकशाही काही मोजक्या उद्योगपतींच्या फायद्यासाठी नाही.
(संपूर्ण लेख वाचण्यासाठी सोबतची लिंक ओपन करा. लेख आवडल्यास लाईक करा, प्रतिक्रिया द्या, लेखाची लिंक शेअर करा.)

देशाचा विकास म्हणजे केवळ आर्थिक प्रगती नव्हे, तर तो समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या आशा-आकांक्षांची पूत करणारी एक ...

पाकिस्तानचे अण्वस्त्रधारी विषारी दात -उमाजी म. केळुसकर / विश्वभरारीदक्षिण आशियाच्या भूराजकीय परिस्थितीत भारत आणि पाकिस्त...
24/08/2025

पाकिस्तानचे अण्वस्त्रधारी विषारी दात
-उमाजी म. केळुसकर / विश्वभरारी
दक्षिण आशियाच्या भूराजकीय परिस्थितीत भारत आणि पाकिस्तान हे दोन महत्त्वाचे देश आहेत. या दोन्ही देशांमध्ये नेहमीच तणावपूर्ण संबंध राहिले आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून दोन्ही देशांमध्ये चार युद्धे झाली आहेत. काश्मीरचा मुद्दा हा नेहमीच वादाचा विषय राहिला आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत पाकिस्तानने भारताला अण्वस्त्रांची धमकी देणे सुरू केले आहे. ही धमकी केवळ भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी एक गंभीर आव्हान आहे. भारताने नेहमीच शांततेचा पुरस्कार केला आहे, पण पाकिस्तानने या शांततेचा गैरफायदा घेतला आहे.
(संपूर्ण लेख वाचण्यासाठी सोबतची लिंक ओपन करा. लेख आवडल्यास लाईक करा, प्रतिक्रिया द्या, लेखाची लिंक शेअर करा.)

दक्षिण आशियाच्या भूराजकीय परिस्थितीत भारत आणि पाकिस्तान हे दोन महत्त्वाचे देश आहेत. या दोन्ही देशांमध्ये नेहमी.....

गाणे गायल्याने होते सरकारची प्रतिमा मलिन?-उमाजी म. केळुसकर / दादागिरीअधिकारी म्हणजे काय? तर एक कठोर आणि निगरगट्ट यंत्रणा...
23/08/2025

गाणे गायल्याने होते सरकारची प्रतिमा मलिन?
-उमाजी म. केळुसकर / दादागिरी
अधिकारी म्हणजे काय? तर एक कठोर आणि निगरगट्ट यंत्रणा. त्यांच्या भावनांना थारा नसतो, त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण येत नाहीत, आणि त्यांच्या तोंडून गाणे निघणे म्हणजे मोठा गुन्हाच. अशी काहीतरी अलिखित नियमावली आपल्या देशात प्रचलित आहे की काय, असा प्रश्न आता पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. निमित्त आहे नांदेड जिल्ह्यातील उमरी येथील तहसीलदार प्रशांत थोरात यांच्यावर झालेल्या निलंबनाच्या कारवाईचे. केवळ एका गाण्यामुळे “तेरा जैसा यार कहाँ” एका निरोप समारंभात आपल्या सहकाऱ्यांसमोर गाणं गायल्यामुळे, एका कार्यक्षम अधिकाऱ्याला आपली खुच गमवावी लागली. ही कारवाई केवळ अवाजवी नाही, तर ती एका संकुचित आणि अमानवी विचारसरणीचे प्रतीक आहे.
(संपूर्ण लेख वाचण्यासाठी सोबतची लिंक ओपन करा. लेख आवडल्यास लाईक करा, प्रतिक्रिया द्या, लेखाची लिंक शेअर करा.)

८ ऑगस्ट रोजी उमरी तहसील कार्यालयातून बदली होऊन लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे रुजू होण्यापूव, प्रशांत थोरात यां....

'चिरीमिरी'च्या जाळ्यात अडकलेला महाराष्ट्र-उमाजी म. केळुसकर / दादागिरी    भ्रष्टाचार... हा शब्द आपल्या समाजात इतका रुळला ...
22/08/2025

'चिरीमिरी'च्या जाळ्यात अडकलेला महाराष्ट्र
-उमाजी म. केळुसकर / दादागिरी
भ्रष्टाचार... हा शब्द आपल्या समाजात इतका रुळला आहे की त्याचे गांभीर्यच कमी झाल्यासारखं वाटतं. 'चिरीमिरी' किंवा 'वरचा खर्च' यांसारख्या गोड नावांनी आपण त्याला स्वीकारलं आहे. पण या 'चिरीमिरी'ने आपल्या सामाजिक आणि नैतिक मूल्यांना पोखरून काढलं आहे. प्रामाणिकपणाची किंमत मोजावी लागत असताना, अनैतिकतेचा बाजार मात्र भरभराटीने सुरू आहे. यातून आपल्या न्यायव्यवस्थेची आणि प्रशासनाची इमारत ढासळत चालली आहे. महाराष्ट्र, जो एकेकाळी पुरोगामी विचारांसाठी ओळखला जात होता, तोही या भ्रष्टाचाराच्या अजगराच्या विळख्यातून सुटलेला नाही. लाच देणे आणि घेणे ही एक सामान्य बाब बनली आहे, आणि या मानसिकतेमुळे समाजाचं भविष्य अंधकारमय होत चाललं आहे. ही केवळ प्रशासकीय यंत्रणेची समस्या नसून, ती एक सामाजिक विकृती बनली आहे, जी विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर अडथळा निर्माण करत आहे.
(संपूर्ण लेख वाचण्यासाठी सोबतची लिंक ओपन करा. लेख आवडल्यास लाईक करा, प्रतिक्रिया द्या, लेखाची लिंक शेअर करा.)

भ्रष्टाचार... हा शब्द आपल्या समाजात इतका रुळला आहे की त्याचे गांभीर्यच कमी झाल्यासारखं वाटतं. 'चिरीमिरी' किंवा 'वरच....

Address

Alibágh
402201

Telephone

+919011360168

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kokannama posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Kokannama:

Share