Amravati breaking

Amravati breaking "समाचार की नई परिभाषा - ब्रेकिंग अमरावती न्यूज़!"🎙️📺🎥

दर्यापूरच्या वारसा वृक्षाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात दाखल एकही झाड तोडू नका सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश.जलवृक्ष चळवळी...
19/06/2025

दर्यापूरच्या वारसा वृक्षाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात दाखल एकही झाड तोडू नका सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश.
जलवृक्ष चळवळीच्या प्रयत्नांना घवघवीत यश -विजय विल्हेकर

जलवृक्ष चळवळीचे संकल्पक विजय विल्हेकर व तमाम जलवृक्ष प्रेमींच्या पुढाकाराने गेल्या आठ वर्षापासून एसटी डेपो ते शिवाजीनगर रोडवरील ब्रिटिश कालीन झाडे.जपल्या गेली पाहिजे.यासाठी जलवृक्ष चळवळीने निकराचा लढा दिला. सावली देणारी झाडे जगली पाहिजे.हा प्रामाणिक हेतू ठेवून. हा निसर्ग लढा अभिनव सत्याग्रहातून लढवण्यात आला. ही झाडे पाडू नका असे 80 /90 वर्षाच्या वृद्ध नागरिकांपासून तरुणांपर्यंत सर्वांची मागणी असताना. रोड करा अशी कोणतीच मागणी नसताना. तत्कालीन नगरपालिका प्रशासक नंदू परळकरांनी विनाकारण आठ वारसा झाडे बेकायदेशीर कापली. त्या विरोधात आम्ही न्यायालयीन लढा उभा केला. हा न्यायालयीन लढा मा.सर्वोच्च न्यायालयात दाखल झाला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची जलवृक्ष प्रेमी चातकासारखी वाट पाहत होते. मा.सर्वोच्च न्यायालयाने एकही झाड तोडू नका असा मनाई हुकूम दिला. सर्वोच्च न्यायालयात आमच्या बाजूने परखड भूमिका दिल्लीचे सर्वोच्च न्यायालयाचे ख्यातनाम वकील अँड अमोल एन.सूर्यवंशी व ऍड.राहुल जे. शिंदे यांनी जबरदस्त युक्तीवाद केला. सर्वोच्च न्यायालयाने आपले म्हणणे ऐकून घेऊन एकही वृक्ष तोडू नका असे निर्देश दिले. असे विजय विल्हेकर यांनी सांगितले.
दर्यापूर ही भूमी वेदना संत गाडगेबाबा,डॉ.भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांची भूमी आहे. संत गाडगेबाबांनी कित्येकदा झाडाखालचा रस्ता झाडून काढला असेल. डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनाच्या कित्येक सभा या झाडांच्या सावलीत घेतल्या असतील. हा या झाडांच्या सावलीचा इतिहास आहे. दर्यापूरकरांना सार्थ अभिमान असलेले.याच दर्यापूर भूमितील विधी विद्वान सुपुत्र,सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा. भूषणजी गवई सर. रा. सू. गवईकाका,कमलआई यांचे बोट धरून या झाडांच्या सावलीतून चालले असतील कदाचित. अशी भावना विजय विल्हेकर यांनी या प्रसंगी व्यक्त केली. सर्वोच्चन्यायालयाच्या निर्णयामुळे दर्यापूरकरांनी प्रचंड आनंद व्यक्त केला.
या समग्र निसर्ग लढ्यात बंडू शर्मा,एड. विद्यासागर वानखडे, विजय लाजूरकरअनिरुद्ध वानखडे, दर्शन दीपक गवई,मालिनी पाटील, वर्षा अग्रवाल,संगीता पुंडे,अँड सुजाता वानखडे, वर्षा अग्रवाल, सिंधू विल्हेकर,जयश्री चव्हाण,सुनीता मांडवे, मनोज रेखे,मनोज तायडे, अनिल गवई, शेखर रेखे,नरेश मोहता,डॉ. कांबळे,यश कांबळे, माणिकराव मानकर,गणेश लाजूरकर, गजानन देशमुख, ,गजानन देवके,शरद रोहनकर,रमेश भले,सदानंद तिडके,सुभाष कीटे, अँड मुकुंद नळकांडे अशा असंख्य निसर्गप्रेमींनी सहभाग दिला.

Rushikesh Deshmukh यांच्या वाढ़दिवसा निमित्त आयोजित कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा..!
18/06/2025

Rushikesh Deshmukh यांच्या वाढ़दिवसा निमित्त आयोजित कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा..!

सौम्या शर्मा (चांडक)अमरावती महानगरपालिकेचे नवे आयुक्त* सचिन कलंत्रे यशदा, पुणे चे उपसंचालक पदी* सौम्या शर्मा नागपूरच्या ...
17/06/2025

सौम्या शर्मा (चांडक)
अमरावती महानगरपालिकेचे नवे आयुक्त
* सचिन कलंत्रे यशदा, पुणे चे उपसंचालक पदी
* सौम्या शर्मा नागपूरच्या स्मार्ट सिटीच्या सीईओ होत्या

मनी असेल मानवसेवेचा भाव, तर रक्तदानासारखा नाही उपाय - आमदार सौ. सुलभाताई खोडके.' रक्ताचा एक थेंब जीव वाचवू शकतो!  ते वाय...
15/06/2025

मनी असेल मानवसेवेचा भाव, तर रक्तदानासारखा नाही उपाय - आमदार सौ. सुलभाताई खोडके.

' रक्ताचा एक थेंब जीव वाचवू शकतो! ते वाया घालवू नका आणि रक्तदान करा.' चा अभिनव संदेश देत बहुसंख्येने रक्तदात्यांचा स्वेच्छा पुढाकार

संत निरंकारी मिशन भव्य रक्तदान शिबीर

अमरावती ( प्रतिनिधी )दिनांक - 15 जून -रक्तदानामुळे प्रत्येक वर्षी अनेकांना जीवनदान मिळते. अनेक मोठ्या सर्जरिंमध्ये किंवा गंभीर परिस्थितीत रक्तदानामुळे पेशंटचे प्राण वाचण्यास मदत होते. तसेच गरोदरपणात बाळाचे आणि आईचे प्राण वाचण्यास रक्तदान महत्वाचे कार्य करते. समाजाचे ऋण फेडायची ही एक संधी रक्तदानामुळे मिळते. आजार, आपत्ती आणि अपघातांनी ग्रस्त असलेल्या लोकांना मदत करण्यासाठी सुरक्षित रक्त आवश्यक आहे. तुमचे दान जीव वाचवते आणि आपला समुदाय सुरक्षित बनवते. रक्तदान हे इतरांना मदत केल्याने आपल्या आरोग्याला आणि कल्याणाला कसा फायदा होतो याचे एक एक उल्लेखनीय उदाहरण आहे. रक्त हे जीवन आहे. ते इतरांना द्या! एखाद्याच्या जीवनाला तुमच्या रक्ताची गरज आहे, कृपया ते दान करा. तुमचा छोटासा प्रयत्न इतरांना जीवन जगण्याची दुसरी संधी देऊ शकतो. एखाद्याला जीवन परत देण्यासाठी रक्तदान करा. असे प्रतिपादन आमदार -सुलभाताई संजय खोडके यांनी उपस्थितांना संबोधून केले. रविवार दिनांक 15 जून 2025 रोजी संत निरंकारी मिशन - संत निरंकारी चैरी्टेबल फौंडेशन द्वारे आयोजित भव्य रक्तदान शिबीर कार्यक्रमात त्या बोलत होत्या. रामपुरी कॅम्प परिसर येथे संत निरंकारी सत्संग भवन येथे आयोजित रक्तदान शिबीर स्थळी रविवारी आमदार - सौ. सुलभाताई खोडके यांनी भेट दिली. याप्रसंगी आयोजकांचे वतीने आमदार - सौ. सुलभाताई खोडके व शोध प्रतिष्ठान चे अध्यक्ष - यश खोडके यांचा पुष्पगुच्छ - शाल तसेच संत निरंकारी चैरिटेबल फौंडेशन चे लिटरेचर देऊन सत्कार करण्यात आला. " मनी असेल मानवसेवेचा भाव, तर रक्तदानासारखा नाही उपाय " असे थोर कार्य व अभिनव उपक्रम राबविणाऱ्या संत निरंकारी मिशन - संत निरंकारी चैरिटेबल फौंडेशन च्या थोर कार्याची आमदार महोदयांनी यावेळी प्रशंसा केली. यादरम्यान आयोजकांच्या वतीने संपूर्ण वर्षभर संत निरंकारी चैरिटेबल फौंडेशनच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या लोककल्याणकारी उपक्रमांची माहिती देऊन आमदार - सौ. सुलभाताई खोडके यांना अवगत करण्यात आले.याप्रसंगी बहुसंख्येने उपस्थित युवक - युवतीसह महिला भगिनी व पुरुष बांधवानी स्वेच्छा रक्तदान करून समाजाप्रती असलेल्या आपल्या दायित्वाचा सर्व उपस्थितांना यावेळी परिचय करून दिला.याप्रसंगी आमदार - सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन रक्तदात्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय येथील रक्तपेढी व त्यांच्या चमुने तसेच अमरावती जिल्हा रक्तदान समितीचे वतीने रक्त संकलन प्रक्रियेत व शिबिराच्या यशस्वीतेसाठी मोलाचे योगदान दिले.याप्रसंगी संत निरंकारी मिशन -संत निरंकारी चैरिटेबल फौंडेशनचे सर्व सदस्य व पदाधिकारी तसेच आमंत्रित सदस्य व रामपुरी कॅम्प येथील ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनींसह युवक - युवती मोठया संख्येने उपस्थित होते.

दर्यापूरचे ब्रिटिश कालीन झाडांचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाणार वनविभागाच्या उच्च अधिकाऱ्या कडून नव्याने वय निश्चित कर...
14/06/2025

दर्यापूरचे ब्रिटिश कालीन झाडांचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाणार

वनविभागाच्या उच्च अधिकाऱ्या कडून नव्याने वय निश्चित करण्यात यावे

जलवृक्ष चळवळीचे संकल्पक विजय विल्हेकर व तमाम जलवृक्ष प्रेमींच्या पुढाकाराने गेल्या आठ वर्षापासून एसटी डेपो ते शिवाजीनगर रोडवरील ब्रिटिश कालीन झाडे.जपल्या गेली पाहिजे.यासाठी झाडांना वस्त्र परिधान करून,झाडांचा वाढदिवस शेणाचा केक कापून साजरे केलेत. 80 /90 वर्षाच्या शेकडो नागरिकांकडून शपथ पत्र लिहून घेतले की,ही झाडे शंभर वर्षांपूर्वीचे आहेत.या उपक्रमातून झाडांच्या वयाची जाणीव करून दिली.जेणेकरून वन प्रशासनाचे लक्ष वारसा वृक्षा कडे गेले पाहिजे.
पण वनक्षेत्र अधिकारी परतवाडा यांनी झाडांचे वय दहा वर्ष ते 27 वर्ष. दोन झाडांचे 42 वर्ष. असा अहवाल दिला. त्यामुळे तब्बल आठ वारसा वृक्ष कापली गेली वृक्ष संवे.जलवृक्ष चळवळीने झाडांची अंत्ययात्रा काढून, झाडांचे तेरवी भोजन देऊन वृक्ष संवेदना व्यक्त केल्यात.
वृक्ष कटाई प्रकरणात दर्यापूर न्यायालयात दाद मागितली.मा. न्यायाधीश दर्यापूर यांनी झाडांची कटाई न करण्याचा मनाई हुकूम दिला. जलवृक्ष प्रेमींना दिलासा मिळाला. नगरपालिका प्रशासनाने जिल्हा न्यायालय अचलपूर यांच्या न्यायकक्षे मध्ये मनाई हुकुम रद्द केला. जलवृक्ष चळवळीच्या वतीने मा.हायकोर्टामध्ये प्रकरण दाखल केले. माननीय उच्च न्यायालय नागपूर यांनी मनाई हुकूम दिला. नगरपालिकेने वृक्ष प्राधिकरणाचा 80 85 वर्षाचा अहवाल असताना वनविभागाचा झाडांच्या वयाचा चुकीचा अहवाल सादर करून हाय कोर्टाची दिशाभूल केली.मा.उच्च न्यायालयाने मनाई हुकुम रद्द केला.
आता जलवृक्ष चळवळीच्या वतीने मा.सर्वोच्च न्यायालयात दर्यापूरच्या वृक्ष वय चोरी प्रकरण दाखल करणार. सर्वोच्च न्यायालय या पुराण वृक्षांना न्याय देईल या प्रतीक्षेत दर्यापूरचे तमाम वृक्ष प्रेमी वाट पाहत आहे.
दर्यापूर ही भूमी वेदना संत गाडगेबाबा,डॉ.भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांची भूमी आहे. संत गाडगेबाबांनी कित्येकदा झाडाखालचा रस्ता झाडून काढला असेल. डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनाच्या कित्येक सभा या झाडांच्या सावलीत घेतल्या असतील. हा या झाडांच्या सावलीचा इतिहास आहे. दर्यापूरकरांना सार्थ अभिमान असलेले.याच दर्यापूर भूमितील विधी विद्वान सुपुत्र,सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय भूषणजी गवई सर. रा. सू. गवईकाका,कमलआई यांचे बोट धरून या झाडांच्या सावलीतून चालले असतील कदाचित. अशी भावना विजय विल्हेकर यांनी व्यक्त केली.
वनविभाग अधिकारी परीक्षेत्र परतवाडा यांनी पौराणिक झाडांचा चुकीचा अहवाल देणे. हे वन रक्षकाचे काम नसून "वन भक्षकाचे काम आहे" आणि वनविभागाच्या "वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे" या ब्रीदपदा ऐवजी "वृक्षवल्ली हेच आमचे खरे वैरी"अशी करावी का?असा प्रश्न विजय विल्हेकर यांनी उपस्थित केला.
या झाडांच्या सावलीत बालपणी खेळलेले वन अधिकारी मित्र ज्याचं वन विकास प्रबोधनाचे कार्य जागतिक पातळीवर सन्मानपूर्वक प्रमाणित आहे. त्यांनी सुद्धा या चुकीच्या अहवाला संदर्भात अत्यंत खेद व्यक्त केला.
मा.सर्वोच्च न्यायालयाने वनविभागाच्या उच्च अधिकार्‍याकडून झाडाच्या वयाचे मूल्यांकन करून देण्यात यावे. ही विनंती करण्यात आली.वनविभागाने चुकीच्या अहवालाचा निषेध म्हणून आज दिनांक 14 रोजी याच प्राचीन झाडांच्या सावलीत निंदा निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी बंडू शर्मा,एड. विद्यासागर वानखडे,अनिरुद्ध वानखडे, दर्शन दीपक गवई,मालिनी पाटील, वर्षा अग्रवाल,संगीता पुंडे,अँड सुजाता वानखडे,गजानन देशमुख, शशांक देशपांडे,गजानन देवके,शरद रोहनकर,रमेश भले,सदानंद तिडके,सुभाष कीटे,मनोज रेखे,सुभाष वडुरकर,शिवाजी गोमाशे,कराळे, छत्रधर कुंभारकर,प्रकाश धर्माळे,रवी गावंडे,प्रवीण गवई,सचिन रवराळे,निलेश गव्हाळे,राजेंद्र अटाळकर,प्रवीण तायडे,प्रशांत तायडे,प्रदीप साखरे,दिलदार शहा,रहमान शहा,जुबेर शहा,कासम शहा, गोपाल वानखडे,शेख कासम,अरबाज पठाण,आनंदराव ठाकरे ई.हजर होते.

30/05/2025

आमदार रवी राणा यांच्या गंगा सावित्री निवासस्थानासमोर फासेपारधी समाजाच ठीया आंदोलन सुरू

माजलगावचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांचा अपघातलातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बेलकुंडजवळ माजलगावचे माजी आमदार आर. टी....
26/05/2025

माजलगावचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांचा अपघात

लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बेलकुंडजवळ माजलगावचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांचा भीषण अपघात झाला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अधिक तपशील प्रतीक्षेत आहेत.

मुर्तीजापुरजवळ अंबा एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली. मुंबई-हावडा मार्गावरील अनेक गाड्या थांब...
25/05/2025

मुर्तीजापुरजवळ अंबा एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली. मुंबई-हावडा मार्गावरील अनेक गाड्या थांबवण्यात आल्या असून, प्रवाशांचे हाल सुरू आहेत. तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
एक्सप्रेस मुंबईसाठी रवाना आता झाली

“Navneet Ravi Rana has received a death threat from Pakistan. We have all your information. Hindu Sherni, your days are ...
12/05/2025

“Navneet Ravi Rana has received a death threat from Pakistan. We have all your information. Hindu Sherni, your days are numbered. We will eliminate you — neither the sindoor (vermilion) nor the one who applies it will be spared. Calls have been coming from different numbers from Pakistan.”

“नवनीत रवि राणा को पाकिस्तान से जान से मारने की धमकी मिली है। हमारे पास तुम्हारी पूरी जानकारी है। हिंदु शेरनी, अब तुम्हारे दिन गिनती के बचे हैं। हम तुम्हें खत्म कर देंगे — ना सिंदूर बचेगा, ना सिंदूर लगाने वाली। पाकिस्तान से अलग-अलग नंबरों से कॉल आ रहे हैं।”

(Information - Navneet Rana team )










मा.शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्नPhotos- DIO
01/05/2025

मा.शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न

Photos- DIO

मा.जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहणPhoto - DIO
01/05/2025

मा.जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

Photo - DIO

Address

Amravati

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amravati breaking posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share